Saturday, November 26, 2011

घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ

Sunday, November 13, 2011
घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ

नाशिकरोड - संघटित कामगारांप्रमाणे असंघटित व असुरक्षित घरेलू कामगारांना मानसन्मान, संरक्षण व कामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाने कायदा केला आहे. त्याच्या अंमलबजावणीवर घरेलू कामगार संघटनेने लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रणित समता घरेलू कामगार संघटनेतर्फे येथील महात्मा गांधी टाऊन हॉलमध्ये नामदार छगन भुजबळ समतामित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. समारंभात प्रा. हरी नरके यांना भुजबळ यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कामगारांनी संघटीतपणे लढा दिल्यास शासनाला याची दखल घ्यावीच लागेल असे मत या प्रसंगी भुजबळ यांनी व्यक्त केले.
पुरस्काराने बळ मिळाले

भुजबळांसारख्या लढाऊ योद्धयाच्या नावाने दिलेला  हा पुरस्कार  सर्वोच्च आहे. काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मन उदास होते. अशावेळी पुरस्कार बळ देतात. असे मत या प्रसंगी प्रा नरके यांनी व्यक्त केले. सत्याचाच विजय होतो, अशी म्हण आहे. मात्र संघटित शक्तीशिवाय सत्याचा विजय अशक्य असल्याचे ते म्हणाले.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मायावती पगारे, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, विक्रम गायकवाड, संतोष सोनपाखरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष भगवान बिडवे आदी उपस्थित होते.
(With thanks from http://divyamarathi.bhaskar.com/)

Tuesday, November 15, 2011

महाराजा यशवंतराव होळकर चरित्राचे प्रकाशन

मवार १४ नोव्हेंबर २०११
प्रकाशन सोहळा........: आयु.मधुकर रामटेके

महाराष्ट्र हे पुरोगाम्यांचं राज्य आहे अशी कितीही आरोळी फोडली तरी त्याला सदैव जातियवादाची किनार होती व आहे. या जातियवाच्या ढिगा-यात कित्येक बहुजन नायक पूरले गेलेत. वर्चस्ववाद्यांचा प्रभाव असणा- सवर्ण आणि बहुजन दोन्ही वर्गातील लेखक, इतिहासकारानी नेहमीच अशा पूरलेल्या इतिहासाला फाटा दिला. बहुजनांच्या इतिहासाशी नजरा नजर होऊनही जाणीव पुर्वक कानाडोळा केला. उत्तुंग व्यक्तीमत्व, जगदविख्यात अन अत्यंत प्रभावी बहूजन व्यक्तीच्या इतिहासाशी फटकून वागण्यात आले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला कि आमचे खरे नायक आम्हाला कधी कळलेच नाही. अशाच एका महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून मोठ्या विर्याने उकरुन काढण्याचं अपूर्व कार्य केलं आयु. संजय सोनवणी यानी. हा धनगर सामाजात जन्मलेला व भारतभू साठी उभं आयूष्य पेटवून देणारा आध्य क्रांतिकरक, स्वातंत्र्य लढाची पायाभरणी करणारा वीर पुरूष म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय.
महाराजा यशवंतराव होळकर यांचं सोनवणी लिखित चरित्रग्रंथ ’भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर’ या पुस्तकाचा काल दि. १३ नोव्हे २०११ रोजी पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच बरोबर धनगर-अस्मिता नावाच्या धनगर समाजाच्या पाक्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून धनगर बांधवानी मोठी गर्दी केली. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला सामोर आणल्या बद्दल संजय साहेबांवर धनगर समाजानी अक्षरश: स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रिय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर स्वत: जातीने उपस्थीत होते. त्याच बरोबर बहुजन समाजाचे थोर विचारवंत हरी नरके सरही उपस्थीत होते.
धनगर समाजातर्फे संजय साहेबांचा सत्कार करण्यात आला. सहसा सत्कार करताना शाल देण्यात येते पण धनगर बांधवानी पारंपारीक पद्धतीने हा सत्कार करण्याचे ठरविले होते. संजय साहेबाना घोंगळं देण्यात आलं. व सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर पगडी चढविण्यात आली. ही होळकरी पगडी होती. सत्कार पुण्यात झाला अन पगडी दिली यावरुन लोकांत गैरसमज होऊ नये यास्तव आयोजकानी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचं माईकवरुन सांगितलं. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात होळकरी पगडीनी सत्काराचा मान पटकवीला. या वेळी संजय साहेबांचे माहितीपर भाषण झाले.
श्री. जानकर साहेबानी आपल्या भाषणात सोनवणी व नरके सरांचे आभार मानले. ते पुढे म्हणतात, “संसदेत दिवसेंदिवस आपल्या ओबीसी नेत्यांची भाषणं अत्यंत प्रभावी होत चालली आहेत. त्यांची भाषणं म्हणजे संग्रही ठेवावे अशी टिपणं असतात. त्याच बरोबर सरकारला कोंडीत धरणारी व सामाजीक नि राजिकय आघाड्यावर कामाचे वेध घेणारी विश्लेषणात्मक, तुलनात्मक, मर्मभेदक आणि दिमाखदार भाषणं असतात. ओबीसी नेत्याच्या सडेतोड आणि अचूक युक्तीवादाच्या मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचं मोठं योगदान असतं. आम्हाला आमचा पक्ष देशाच्या चारही सिमाना नेऊन भिडवायचा आहे. त्यासाठी नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला निकडीची गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यानी खबरदार व्हावे.” अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलिकरनातील भूमिका विशद केली. त्याच बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशार दिला की थोबाडं बंद नाही ठेवली तर थोबाडीत बसेल.
नरके सरानी घेतला ब्रिगेडचा समाचार
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना नरके सरानी केलेली ज्ञानाची चतूरस्त्र उधळण समाजाच्या नाना पैलूवर प्रकाश टाकणारी होती. चिकित्स, मार्गदर्शक, मनोवेधक नि आवाश्यक तिथे प्रक्षोभप्रवर्तक तोफा डागत नरके सर पुढे सरकतात. सामाजिक असमतोलतेचा अत्यंत तिटकारा बाळगणारे नरके नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणतात की, “केवळ ब्राह्मणाना शिव्या घालणे ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे ही चळवळीची उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोकं समतेच्या चळवळीत नवीन विषता तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसं लाथा बुक्क्याच्या बाता करतात. पण खबरदार या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही.” पुढे नरके सर मोठ्या त्वेषाने बोलतात की, “आज काल इतिहास संशोधकांच पीक आलं आहे. रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. ही लबाड लोकं विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचं चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार. अभ्यासाच्या नावानी शंख असलेले खेडेकर तर माझं संशोधन स्वत:च्या नावावर छापण्या पर्यंतचा चोरटेपणा केला.” हा नरके सरानी घेतलेला खेडेकरांचा समाचार सभागृहात हशा पिकवून गेला. खेडेकारांचे दोन अनुयायी माझ्या सोबतच बसलेले होते. त्यांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. एकेकाचा टप्प्या टप्प्याने समाचार घेत नरके सर पुढे जातात. ते म्हणतात, “इंग्रजांकडून इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहेत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी वस्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य वरील गुणसंपन्न माणूसच करू शकतो.” भावी इतिहासकाराना दिलेला हा मोलाचा सल्ला, चोरट्या इतिहासकारांची केलेली कान उघडणी आणि मस्तावलेल्याना दिलेला निर्वाणीचा ईशारा अशा प्रकारे घेतलेल्या चतूरस्त्र समाचारानी नरके सरांचे भाषण संपन्न झाले.
तिसरी आघाडी
महाराष्ट्रातील बहुजन चळवळीचे स्वत:कडे एकाधिकार मालकी हक्क असल्याच्या अविर्भावात हिंडणा-यांची एक मानसिकता आहे. त्यांच्याशी वैचारीक मतभेद असलेल्या प्रत्येक बहुजनास ते ब्राह्मणाचे हस्तक ठरवित असतात. ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी चळवळ चालू आहे नि जे जे आमच्या विरुद्ध आहेत ते सर्व ब्राह्मणांचे हस्तक आहेत अशी आरोळी फोडत असतात. बामसेफ व मराठा सेवा संघानी बहुजन विचारवंतावर चिखल फेक करताना ते ब्राह्मणाना जाऊन मिसळले अशी आवई उठवली होती. बहुजन विचारवंत हे कधिच ब्राह्मणांकडे बुद्धि गहान टाकत नाहीत याचा खणखणीत पुरावा देणारा कालचा सोहळा यांच्या थोबाडीत मारुन गेला. ओबीसींचं आरक्षण हिसकावुन नेण्याच्या तय्यारीत असलेल्या वर्चस्ववाद्याना तडाखेबंद प्रतिउत्तर देण्याची गरज होती. त्यासाठी संघटनात्मक कार्य उभारुन सडेतोड उत्तर देणे गरजेचे होते. कालच्या कार्यक्रमातून याची सुरुवात झाली आहे. बहुजन चळवळीची ही नवी आघाडी ख-या अर्थाने समता रुजविण्यात झोकून देईल. द्वेषमूलक कार्याला ईथे थारा नसणार आहे. नरके सरानी आपल्या भाषणातून वर्चस्ववाद्याना निर्वाणीचा ईशारा तर दिलाच पण त्याच बरोबर क्षमाशील हृदयाने असे आवाहनही केले की मोठ्या भावाप्रमाणे बंधूत्वाने वागालात तर विधायक नि भरीव कामात आमची साथच असेल. आम्ही नेहमी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे होतो अन असणार हे याद राखा. तोडा फोडा व झोडा करणा-यानी आता थांबावे अन्यथा त्याना तडाखेबाज प्रतिउत्तर देण्यात येईल.
त्या नंतर सोनवणी लिखीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले. हातो हात पहिली आवृत्ती विकल्या गेली, फक्त पन्नास साठच पुस्तक उरलीत. हा सुध्दा विक्रीचा विक्रमी सोहळा होता. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.
{सौजन्य: आयु.मधुकर रामटेके}mdramteke.blogspot.com

Tuesday, October 25, 2011

मराठी अभिजात कशी?

मराठी अभिजात कशी?
{लोकराज्य,दिवाळी अंक,आक्टोबर२०११ आणि लोकराज्य,जानेवारी २०१२ वरुन}

मराठी भाषा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. त्याबाबतच्या चर्चेत या संदर्भातील पुढील निकषांकडे लक्ष वेधले गेले. '' High antiquity of its early texts/ recorded history over a period of 1500-2000years, A body of ancient literature /texts ,which is considered a valuable heritage by generations of speakers. The literary tradition be original and not borrowed from another speech community. The classical language and literature being distinct from modern, there may be a discontinuity between the classical language and its later forms of its offshoots.'' मराठी ही जगातील १० व्या क्रमाकांची भाषा असली तरी तिचा जन्म २००० वर्षापूर्वीचा नसल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसल्याचा मुद्दा पुढे आला. मराठी भाषेचा जन्म नेमका केव्हा झाला याबाबत कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, संचालक-मराठी संशोधन मंदिर, यांचा मराठी भाषा उद्गम व विकास हा १९३३ साली प्रकाशित झालेला ग्रंथ अतिशय मोलाचा समजला जातो. त्यात ते म्हणतात, सर्व प्राकृत भाषा, अपभ्रंश व संस्कृत ह्या भाषांनी आपापल्यापरिने मराठीस जन्माला आणण्यास हातभार लावलेला दिसतो. निरनिराळ्या प्राकृतभाषा बोलणारे निरनिराळे समाज निरनिराळ्या काळी वरून आर्यावर्तातून अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात उतरले आणि तेथे स्थायी झाले. त्यांच्या संमिश्र बोलण्यानेच मराठी भाषा बनली. महाराष्ट्र देश ज्याप्रमाणे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, अश्मक, कुंतल, विदर्भ, कोकण इत्यादी लहान लहान देशविशेषांचा मिळून बनला व महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली, त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या-विशेषतः माहाराष्ट्री व अपभ्रंश ह्यांच्या मिश्रणाने बनली. महाराष्ट्र देश, मराठा समाज व मराठी भाषा ह्यांची घटना वर दिलेल्या रीतीने ख्रिस्तोत्तर ६००-७०० च्या सुमारास झाली. (पृ. १६८) कृ.पां.कुलकर्णी यांनी आपल्या ४९६ पृष्ठांच्या या शोधग्रंथात या विषयाचा सांगोपांग वेध घेण्यात आला आहे. विषयाचे सर्व पैलू मांडण्यासाठी त्यांनी या संदर्भातील तज्ज्ञांच्या ३२ मौलीक संदर्भ ग्रंथांचा वापर केलेला आहे. कुलकर्णीच्या मते मराठी भाषेचे वयोमान १३००-१४०० वर्षाचे ठरते. असे असेल तर मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकणार नाही. याबाबत (१) डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर लिखित प्राचीन महाराष्ट्र १ व २ खंड, (२) हाल सातवाहनाची गाथा सप्तशती - संपादक, स.आ. जोगळेकर (३) गुणाढ्याचे बृहत्कथा हे व राजारामशास्त्री भागवत,दुर्गा भागवत, इरावती कर्वे, वि.का.राजवाडे, वि.ल.भावे, रा.भी. जोशी आदींचे ग्रंथ तपासून काय चित्र समोर येते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु या.
कथा सरित्सागर या महाग्रंथाचे मराठी भाषांतर श्री. ह.अ.भावे यांनी केले असून त्याच्या पाचही खंडांना ख्यातनाम विदुषी दुर्गा भागवत यांच्या पाच प्रदीर्घ आणि विवेचक प्रस्तावना आहेत. त्या म्हणतात गुणाढ्याच्या बृहत्कथेची तुलना रामायण आणि महाभारताशी करण्यात येते. प्राचीन भारतातल्या साहित्याचा एक विशेष असा आहे की, पुष्कळ ग्रंथ लुप्त झाले आहेत. आणि असंख्य ग्रंथ केवळ खंडावस्थेतच आढळतात. अशा विलुप्त ग्रंथांत गुण्याढयाच्या बृहत्कथेचा समावेश होतो. बृहत्कथेसंबंधी उल्लेख अनेक जुन्या ग्रंथात आढळून येतील. बृहत्कथेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असलेले ग्रंथ संस्कृतात व प्राकृतात आहेत हे ग्रंथ शैव व वैष्णव मतातून निघालेले आहेत. आणि जैन मतातलाही ग्रंथ उपलब्ध आहे. तेव्हा भिन्न परंपरांना मान्य असलेला बृहत्कथा हा एक प्राचीन लोकप्रिय ग्रंथ होता यात संशय नाही.
बृहत्कथेशी प्रत्यक्ष संबंध असलेले ग्रंथ दोन आहेत ते दोन्ही काश्मीरचे असून अकराव्या शतकात उपलब्ध झालेले आहेत. दोहोंची भाषा संस्कृत व मते शैव आहेत. पहिला जागतिक ख्याती पावलेला ग्रंथ हा सोमदेवाचा कथा सरित्सागर आणि दुसरा क्षेमेद्गांची बृहत्कथा मंजिरी हे दोन्ही ग्रंथ श्लोकबद्ध असून ते वृत्त अनुष्टुभ आहे. कथा सरित्सागरची भाषांतरे युरोपिय भाषांमध्येही उपलब्ध आहेत. परंतु बृहत्कथा मंजिरी चे इंग्रजीत एकच व तेही काही भागांचेच भाषांतर झालेले आहे. अकराव्या शतकात सोमदेव शर्मा या काश्मीरचा राजा अंनत याच्या पदरी असलेल्या कवी पंडिताने अनंत राजाची राणी सूर्यवती हिला रिझवण्यासाठी पैशाची भाषेत त्याकाळी उपलब्ध असलेल्या बृहत्कथेवरुन संस्कृतात कथासरित्सागराची रचना केली. आपण हा ग्रंथ गुणाढयाच्या बृहत्कथेवरुन रचला आहे ही गोष्ट सोमदेवाने ग्रंथारंभीच सांगून गुणाढ्याचे चरित्रही सांगितले आहे. असे दुर्गा भागवत म्हणतात.
डॉ. श्री. व्यं.केतकर या ग्रंथाबाबत आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात म्हणतात, पैशाचीतील मुख्य विश्रुत ग्रंथ म्हटला म्हणजे बृहत्कथा होय. तो कुरु युद्धोत्तर इतिहासाचा संरक्षक आणि त्याबरोबरच इतिहास विपर्यासाचा संरक्षक आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात बृहत्कथेपासून इतिहास निष्कर्षणाचा पद्धतशीर प्रयत्न केलेला आढळेल. ऐतिहासिक कथासूत्राच्या शोधाच्या अनुषगांने अनेक प्रश्न विवेचनास घेतले गेले आहेत. त्यापैकी एक प्रश्न म्हटला म्हणजे बृहत्कथेच्या कालासंबंधीचा होय. .... बृहत्कथा अखिल भारतीय कथांचा संग्रह असल्यामुळे आणि त्यामध्ये प्रतिष्ठानकथा व दक्षिणापथकथा, कुंडीनपूर कथा येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासास त्या संग्रहाचा उपयोग करणे प्राप्त झाले. हा संग्रह तयार करण्यात वररुचीचा हात असल्यामुळे आणि वररुची हा महाराष्ट्राच्या भाषेचा आद्य वैय्याकरण असल्यामुळे वररुची विषयक अधिक विधाने करणे प्राप्त झाले. ... वररुचीची माहाराष्ट्री बुद्धपूर्व आहे आणि वररुचीचे व्याकरण पाली किंवा अर्धमागधी या भाषांच्या उदयापूर्वीचे आहे, असे आमचे मत आहे. आणि पैशाची भाषेचे प्रामुख्य ज्या काळात होते तो काळ वररुचीच्या व्याकरणाने दिग्दर्शित होत आहे. वररुचीच्या काळापूर्वी काही पिढ्या पैशाची ही वाङ्मयाची भाषा होती. ...त्या काळात माहाराष्ट्री भाषा प्रगल्भ झाली होती. आणि प्राकृत भाषांत तीच प्रमुख होती हे स्पष्ट आहे. या प्रगल्भतेचा काळ अर्थात वररुचीच्या पूर्वी दोनतीनशे वर्षे इतका तरी होता असे म्हणण्यास हरकत नाही ... त्यावरुन प्राकृत प्रकाशाच्या उत्पत्तीच्या काळी चारही प्राकृत भाषांचे व्याकरण असणे, आणि महाराष्ट्र हा शब्दही अस्तित्वात असणे हे पूर्ण संभवनीय वाटते. एवंच महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक मोठा उजेडाचा कालविभाग म्हटला म्हणजे वररुचीचा व पाणिनीचा काल होय. या वररुचीचे अस्तित्व पाणिनीच्या कालाहून दूर नसावे आणि वरुरुची व पाणिनी हे दोघेही जवळजवळ समकालीन असल्यामुळे ते दोघेही एका गुरुचेच शिष्य होते ही कल्पना उद्भूत होऊन आणि विद्वान वर्गाच्या आख्यायिका संग्रहात शिरुन ती कथापीठ लंबकात समाविष्ट झाली असावी. कथापीठलंबक रचनेचा काल मौर्य राज्याच्या प्रारंभाचा असावा, असे आमचे मत आहे. (पृ ११,१२)
ते पुढे म्हणतात, महाराष्ट्र हा शब्द व भाषा वररुचीच्या काळी होती आणि वररुचीच्या काली ही भाषा सवंर्धित झाली होती आणि वररुचीचा काल खिस्तपूर्व ८०० पासून ६०० पर्यंत केव्हातरी असा धरला तर महाराष्ट्राची स्वतंत्र भाषा अगोदर दोनतीनशे वर्षे तरी विकसित होत असली पाहिजे म्हणजे खिस्तपूर्व पहिल्या सहस्त्रकांच्या पूर्वीच म्हणजे खिस्तपूर्व दुसज्या सहस्त्रकात महाराष्ट्राचा आद्यविकासाचा काल जातो. आणि या भाषेच्या नावास कारण झालेले जे महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण जे ख्रिस्तपूर्व दुसज्या सहस्त्रकात झाले असावे असे दिसते. अश्मक राजा कुरुयुद्धात पडला आणि कुरुयुद्धापासून अश्मकांचे सातत्य आहे तर महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण आणि अश्मक राजाचे सातत्य याची संगती लावण्याचा प्रयत्न अवश्य होतो... अश्मक राज्य सुरु होण्यापूर्वीच महारांच्या देशात रठ्ठांचा प्रसार होऊन महाराष्ट्र बनले असावे आणि त्यांच्या संयुक्त जनतेत अश्मक राजकुल उत्पन्न झाले असावे असाच इतिहास असावा असे दिसते (पृ.१३)
डॉ. केतकर हालांच्या सप्तशतीबद्दल म्हणतात, महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणजे हालांची सप्तशती होय. तीवरुन असे दिसते की, त्या वेळेस प्रमुख जानपद हलिक होते. गोदातट आणि विंध्य पर्वत हे दोन्ही प्रदेश वाङ्मयात येत होते. भाषेला नाव प्राकृत हेच अधिक प्रिय होते (पृ. २९) केतकरांचे अनुमान आहे की, शातवाहनांच्या काळात अपभ्रंश भाषेचा उदय झाला असेल कारण शातवाहनांच्या काळी अपभ्रंशाचे अस्तित्व होते अशी साक्ष बृहत्कथा देते.
राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य दुर्गा भागवत यांनी संपादित केले असून त्याचा पहिला खंड मज्हाठ्यासंबंधाने चार उद्गार हा याविषयावर महत्त्वाचा प्रकाशझोत टाकतो. राजारामशास्त्री भागवत म्हणतात, महाराष्ट्र हा शब्द बराच जुनाट आहे. नंदाचे राज्य मगध देशावर असता म्हणजे शालिवाहन शकाचे पूर्वी सुमारे सव्वा चारशे वर्षे, वररुचि नावाचा विद्वान झाला. त्याने प्राकृत प्रकाश नावाचे प्राकृत भाषेचे म्हणजे संस्कृत नाटकातील बालभाषेचे व्याकरण केले आहे. त्या व्याकरणाचे अगदी शेवटचे सूत्र शेषं माहाराष्ट्रीवत् हे होय. अशोकाने महाराष्ट्र देशात धर्मोपदेश करण्यासाठी काही बौद्ध भिक्षुस पाठविले, अशी बौद्ध लोकांतही दंतकथा आहे. नंदाच्या नंतर चंद्गगुप्ताने राज्य केले. चंद्गगुप्ताच्या पाठीमागे त्याचा मुलगा बिंदुसार गादीवर बसला व बिंदुसाराच्या मागून त्याचा मुलगा प्रियदर्शी किंवा अशोक यांस गादी मिळाली. तेव्हा चांगला बावीसशे वर्षांचा मरहठ्ठ किंवा महाराष्ट्र शब्द आहे असे म्हणण्यास हरकत नाही (पृ ७ व ८)

ते पुढे म्हणतात, बाकी सर्व मज्हाठी भाषेप्रमाणे शौरसेनी भाषेचे नियम आहेत असे समजावे हा सूत्राचा अर्थ ज्यास आपण बालभाषा म्हणतो त्यात पूर्वीच्या काळी शौरसेनीही होती. शूरसेना म्हणजे मथुरामंडळ या प्रांताची जी पूर्वीची भाषा ती शौरसेनी. उंच जातीच्या व कुलीन बायका जी भाषा प्राचीन काळी नाटकात बोलत ती हीच, शौरसेनी नाटक म्हटले म्हणजे लोकस्थितीचे हुबेहुब चित्र होय. तेव्हा संस्कृतात नाटके ज्यावेळी होऊ लागली त्यावेळी कुलीन व वरिष्ठ जातींच्या बायकांची भाषा शौरसेनी होती, याविषयी काही संशय नको. या शौरसेनी भाषेची एक प्रकृती जशी संस्कृत तशीच दुसरी प्रकृती माहाराष्ट्री उर्फ अतिप्राचीन मज्हाठी, असे कात्यायन म्हणतो. शौरसेनीपासून मागधी व पैशाची नावाच्या बालभाषा निघाल्या. मगध म्हणजे गयेच्या व पाटणाच्या आसपासचा मुलुख या देशाची जी पूर्वीची भाषा ती मागधी. पंजाब वगैरे प्रांतातील रहाणाज्या लोकांचे पिशाच हे प्राचीन नाव दिसते. बाल्हीक म्हणजे बल्क, बुखारा, व समरकंद वगैरे ठिकाणचे लोक सर्व पिशाचांची संतति, असे कर्णपर्वात लिहीले आहे. या लोकांची पूर्वीची भाषा पैशाची. शौरसेनीपासून मागधी व पैशाची निघाल्या व शौरसेनेची प्रकृति जशी संस्कृत तशीच मज्हाठी असे कात्यायन म्हणतो. तर मग सर्व बालभाषांचे मूळ प्राचीन मराठी असा सिद्धांत केल्यास काहीच प्रत्यवाय नाही. गाथांची भाषा महाराष्ट्री असे अलंकारिक म्हणतात. गाथा शब्द आलेला गै धातूपासून गाथा शब्दाने प्रायः आर्या किंवा गीति संस्कृतात समजली जाते. या अलंकारिकांच्या नियमावरुन गाण्याची भाषा प्राचीन काळी माहाराष्ट्रीयच होती असे म्हणावे लागते. तेव्हा सर्व बालभाषांची प्रकृति व गाणी प्राचीन काळची ज्या भाषेत, अशी एक प्राचीन मज्हाठी भाषा होय... शौरसेनीची प्रकृति संस्कृत हे तर कात्यायनाने प्रकरणाच्या आरंभीच सांगितले आहे. असे असता अखेरीस शेषं माहाराष्ट्रीवत् असे कात्यायन पुनः म्हणतो, त्यापक्षी महाराष्ट्री व संस्कृत या दोहोंची परस्परनिरपेक्षता त्यास इष्ट होती असे दिसते. मूळचा शब्द पाहू गेले असता पाअड होय. पाअड शब्दाच्या जवळजवळ संस्कृतात प्रकट हा शब्द येतो. पाअड भाषा=प्रकट भाषा. म्हणजे अर्थात सर्व लोकांचा व्यवहार व दळणवळण जीत चालते ती. संस्कृत भाषा पडली धर्माची, अर्थांत धर्मप्रसार करणे ज्यांच्या हातात असल्या ब्राह्मणांची. ती काही सर्वसाधारण भाषा नव्हती. पण पाअड भाषा पडली वाहत्या पाण्याप्रमाणे. ते सर्वांचे जीवन तेव्हा सर्वांचाच संबंध तिच्याबरोबर. सहजच तीस पाअड म्हणजे सर्वास समजण्यासारखी असे अन्वर्थक नाव मिळाले, व धर्मभाषेचे संस्कृत म्हणजे थोड्याशा विद्वान ब्राह्मणांनी मिळून आपल्या बुद्धीप्रभावाने तकतकी आणलेली असे ब्राह्मणांनीच नाव पाडले. काही काळाने संस्कृत या शब्दाबरोबर मेळ दिसावा म्हणून पाअड शब्दाचे प्रकट रुप न करता प्राकृत असे रुपांतर केलेले दिसते.
त्यामुळे प्राकृत हा शब्द संस्कृतात दररोज पहाण्यात येणारे, अर्थात क्षुल्लक या अर्थाचा वाचक झाला. शिक्षा म्हणून वेदाचे एक अंग आहे. त्यात प्राकृते संस्कृते चापि (प्राकृत भाषेत व संस्कृत भाषेत) असा लेख आला आहे. त्यापक्षी प्राचीन काळीही प्राकृत ही स्वतंत्र भाषा समजण्याचा संप्रदाय पुष्कळ दिवसापासून होता हे उघड होय. तेव्हा माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या सर्व जितक्या पाअड भाषा होत्या तितक्या प्राकृत झाल्या व या प्राकृत भाषांचे प्राकृतप्रकाश नावाचे सूत्रमय व्याकरण कात्यायनाने पहिल्याने लिहीले. वर लिहीलेल्या पाचही भाषा पाअड भाषा इतकेच की सर्वात प्राचीन व सर्वाची प्रकृती माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मज्हाठी. महाराष्ट्रीपासून निघाली शौरसेनी व शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हटले म्हणजे एकटी प्राचीन मज्हाठी भाषा. (पृ. १२, १३)
प्राचीन मराठीतील १) गाथा सप्तशती २) प्रवरसेनाचे सेतुकाव्य ३) गौडवध ४) राजशेखराची कर्पुरमंजिरी हे ग्रंथ आणि गुणाढ्याचे पैशाची भाषेतील बृहत्कथा हे फारच महत्त्वाचा पुरावा होत. नंदाच्या वेळच्या शालिवाहनाचा गुणाढय हा प्रधान होता. त्या ग्रंथाची हल्ली संस्कृतात दोन श्लोकमय भाषांतरे विद्यमान आहेत. श्रीलंकेतील महावंश या पाली भाषेतील सिंहली लिपीतील ग्रंथात अशोकाने बौद्ध भिक्षू महाराष्ट्रात पाठविल्याचा उल्लेख आहे. भवभूतीच्यानंतर दोनशे वर्षांनी राजशेखर झाला. तो महेंद्गपाल राजाकडे आश्रयाला होता. तो स्वतःला महाराष्ट्र चुडामणी म्हणवून घेत असे.
इरावती कर्वे आपल्या मराठी लोकांची संस्कृती या ग्रंथात म्हणतात पश्चिमेकडील शक व महाराष्ट्रातील शातवाहन येण्याचे आधीच महाराष्ट्राच्या भूमीत संस्कृत वा संस्कृतोद्भव भाषा दृढमूल झाली होती व म्हणून बाहेरुन आलेल्या राजांनी द्गाविड भाषा न उचलता महाराष्ट्री (संस्कृत प्राकृत अवतार) आत्मसात केली. (पृ.२०३) त्या पुढे म्हणतात, सर्व भारताची संस्कृती ज्या काव्यामध्ये साकारली ते वैदर्भी रीतीत होते, म्हणजे विदर्भाचे संस्कृत परंपरेमधील स्थान लक्षात येते. जसा अपरान्त त्याचप्रमाणे विदर्भ ही अति प्राचीन आर्य (संस्कृत बोलणाराची) वसाहत होती. दोन्हीही वसाहती वन्यांच्या प्रदेशात झाल्या. संस्कृत द्गाविडांशी लढा करुन नव्हे. पहिल्या प्रख्यात वैदर्भीचे नांव लोपमुद्गा आहे. हे नांव आर्य नव्हे ते लोपामुंडा ह्याचे तर रुप नव्हे ना? मुंड लोकांची राजकन्या लोपा असा त्याचा अर्थ होईल. मुंडांचा नागांशी संबंध होता, त्याबद्दल बौद्ध वाङ्मयात पुरावा सापडतो.
कोसलाचा राजा पसेनदी हयाचे मनात गौतम बुद्धाच्या घराण्यात लग्न करुन बुद्धाचे नातेवाईक व्हावे असे होते. वासभखत्तिया यांच्या विवाहातून जन्मलेल्या विदुडभ याने सर्व शाक्य कुळाचा नाश केला. ही कथा पाली वाङ्मयात सांगितली आहे. इ.स. पूर्व ५०० ते ६०० वर्षांची ती कथा आहे. म्हणजे त्यावेळी नाग व मुंड एक असावेत असे दिसते. (पृ. २१३ व १४)
इरावती कर्वे यांनी पुढे या संदर्भात अधिक माहिती देताना म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राजे सातवाहन यांनी प्रतिष्ठान उर्फ पैठण येथे राज्य केले. प्राकृत भाषेला उत्तेजन दिले. व पर्यायाने मराठीच्या जन्माला मदत केली. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व संतकवीचा जन्म मध्य महाराष्ट्रात झाला व हल्लीच्या मराठीचे स्वरुप त्यांनी निश्चित केले. ह्या प्रदेशाला जुने नाव अश्मक असे आहे. ...अश्मकाचे सर्वात प्रसिद्ध राजे म्हणजे प्रतिष्ठानचे शातवाहन. त्यांचे आधी प्रतिष्ठानला नरसिंह नावाचा राजा होता. असा उल्लेख सोमस्वामीच्या कथा सरित्सागरात सापडतो. त्या कथेबद्दल कै. श्री. व्यं. केतकरांनी प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात लिहीले आहे.. शातवाहनांना संस्कृत माहीत नव्हते, त्यांनी प्राकृताला आश्रय दिला, महारठी नावाच्या मांडलिक राजांशी लग्नसंबंध जोडला असे दंतकथा व शिलालेखांवरुन दिसते. ...शातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव ह्या घराण्यांनी महाराष्ट्रावर एकामागून एक राज्य केले. महाराष्ट्रातील बुद्ध लेणी शातवाहनांच्या व वाकाटक आणि चालुक्यांच्या कारकिर्दीतील आहेत. त्यातील सर्व लेख प्राकृतातील आहेत. लिलावती ह्या अपभ्रंश भाषेत लिहीलेल्या काव्यात सुप्रसिद्ध बौद्ध पंडीत नागार्जुन हा हालाचा मित्र व हितोपदेशक होता असे म्हटले आहे. ...त्यांच्या संबंधी रठ्ठ आणि महारठ ह्यांची नावे शिलालेखात येतात. ह्यांचे प्रमुख शिलालेख पश्चिम महाराष्ट्रातच आहेत. ...आंध्र व कर्नाटक अशा दोन संस्कृतीसंपन्न राष्ट्रांशी बरोबरी करून मराठीने आपल्या दक्षिण सीमा पक्क्या केल्या, एवढेच नाही तर मराठी भाषा कर्नाटकाच्या गाभ्यापर्यंत पोचली, ह्याला अनेक सांस्कृतिक कारणे आहेत. प्रख्यात सूत्रकार बौद्धायन व आपस्तंभ दाक्षिणात्य होते. बृहत्कथेत अपाणिनीय अशा ऐन्द्गादी व्याकरणांचा उल्लेख येतो ती दक्षिणात्यांनी रचिलेली होती असे दिसते. ...चालुक्य व राष्ट्रकूट दोघेही जैनानुयायी होते, व त्यांच्या आश्रयाखाली पुष्कळ महत्त्वाचे जैन ग्रंथ महाराष्ट्रात लिहीले गेले. पुष्पदंताचे हरिवंशपुराण राष्ट्रकूट राजांच्या अमदानीत मान्यखेड (मालखेड) येथे रचले गेले. कर्नाटकाच्या गाभ्यात महाराष्ट्री भाषेत ग्रंथनिष्पती राजाश्रयाने होत होती असे स्पष्ट दिसते. ...श्रवणबेळगोळचा हा शिलालेख मराठ्यांच्या आक्रमक राजसत्तेचे प्रतीक नसून जैनांच्या धर्मप्रसाराचे आहे. ...मध्ययुगातही भाषेच्या बाबतीत मराठीची आई जी महाराष्ट्री, तिचे वर्चस्व दक्षिणेत होते व तीत उत्तम ग्रंथांची उत्पत्ती होत होती.
कोऊहल कवीने रचलेल्या लिलावती काव्यात तो स्वतःचे काव्य मरहठ्ठ देशी लिहील्याचे सांगतो. काव्याचा काळ सुमारे ख्रिस्ताब्द ८०० असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. ...शातवाहन हे राजाचे नाव ख्रिस्तपूर्व दुसज्या शतकापासून तो थेट सत्पशती हालापर्यंत आढळते. ह्यातील एका शातवाहनाची (ख्रिस्तपूर्वीच्या शातवाहनाची) राणी पंडीता होती. ती राजाजवळ विनोदाने जे संस्कृत बोलली ते राजाला कळले नाही. म्हणून ती हसली व राजा अपमानित होऊन निघून गेला. राजाने सहा महिन्यात भाषा शिकण्याचा निश्चय केला व तो जी भाषा शिकला ती प्राकृत, हा कथाभाग बृहत्कथेच्या आरंभी येतो. व त्यात वररुचीचे नाव प्रामुख्याने येते. ...मराठी वाङ्मयाच्या प्रौढत्त्वाची, स्वयंसिद्धतेची बीजे ही ह्या प्राकृत वाङ्मयात आहेत. बृहत्कथेला जगातील कथावाङ्मयात तोड नाही. ... हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलीत असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राज्यांच्या दरबाराचे चित्रण नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहवयास सापडते. लिलावती ही अदभुतरम्य कथा हाल राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नहाणाज्या, अंगाला हळद फासणाज्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला मरहठ्ठ देसी भाषा असे नाव देतो (पृ. २२३-२६)
दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे की, जुनी महाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. (पृ.२)
थोर संशोधक श्री.व्यं.केतकर, राजारामशास्त्री भागवत, वि.का.राजवाडे, इरावती कर्वे, कृ.पां.कुलकर्णी, दत्तो वामन पोतदार, वि.ल.भावे, रा.भि.जोशी आदींच्या उपरोक्त संशोधनाच्या आधारे माहाराष्ट्री (मराठी) भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. माहाराष्ट्री, मज्हाठी, मराठी भाषेचा हा अडीच हजार वर्षाचा प्रवास साधार उलगडला म्हणजे मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्याचे निर्विवादपणे सिद्ध होते.

Friday, September 16, 2011

समतेसाठी च़ळवळीची गरज

समतेसाठी च़ळवळीची गरज
सर्वप्रथम, भय्या पाटील यांनी नमूद केल्याप्रमाणे, जर हरी नरके यांचे लेखन संदर्भ सोडून बाष्कळ, द्वेषमूलक आणि थिल्लर असेल तर एका मोठय़ा संघटनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने त्याची दखल घेऊन प्रत्युत्तर देण्याचे खरे तर कारण दिसत नाही. (खरे तर प्रा. नरके यांचे लेखन हे खेडेकरांच्या विचारधारेशी संबंधित असल्याने त्यावर त्यांनीच प्रतिक्रिया देणे योग्य ठरले असते.) हरी नरके यांनी बामसेफ आणि मराठा सेवा संघाला सोडले आणि लगोलग ब्राह्मणी छावणीने त्यांना (ते बेअक्कल असल्याने आणि नरकेंनी त्यांच्यावर किती टीका केली आहे आणि करत आहेत तिकडे दुर्लक्ष करून.. त्याला बेदखल ठरवून) लगोलग पदरात घेतले असेही त्यांनी सुचवले आहे. परंतु मग त्यांना सामाजिक जातीय तिढा अद्याप समजलेला नाही असे नाइलाजाने म्हणावे लागते. दुसरे असे की खेडेकरसाहेबांना जसा हवे ते लिहिण्याचा अधिकार आहे, तसाच आणि तेवढाच अधिकार त्यांच्या वा अन्य कोणाच्याही लेखनावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो नरकेंनी बजावला असेल तर त्यावरही टीका करण्याचा आपणास अधिकार आहे आणि तो आपण बजावला आहे. परंतु यात मूळ वादाचे केंद्रिबदू बदलवण्याचा प्रयत्न नाही काय? मूळ टीका ही खेडेकरांच्या जातीयवादी भूमिकेबाबत आणि वंशसंहाराला उत्तेजन दिले आहे त्याबाबत आहे. त्याबाबत पाटील यांनी मौन पाळून अप्रत्यक्षरीत्या त्याचे समर्थनच केले आहे, असे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट दिसते.
प्रा. नरके यांनी बामसेफ व मराठा सेवा संघाची साथ सोडली. मला असे वाटते की आपण ज्यांच्यासाठी, ज्यांच्या कल्याणासाठी बुद्धी राबवत आहोत, त्यांचे छुपे हेतू वेगळेच आहेत हे समजले तर विवेकी भूमिका घेत दूर जाणे योग्य की मेंदू विकून आहे तेथेच ठिय्या मांडणे योग्य? शाम सातपुते हे संघ स्वयंसेवक आहेत, भा.ज.प.चे नगरसेवक होते हे लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार. पण मग हाच न्याय आपल्याबाबत लावला तर? म्हणजे आपण स्वत: एके काळी संघाचे स्वयंसेवक होता आणि आता नाही.. हे आपल्यातील वैचारिक परिवर्तनच नव्हे काय? प्रा. नरकेंना आपण मोठे केलेत की त्यांनीच तुम्हाला मोठे केले याबद्दलही विधान केले असते तर बरे झाले असते.
पुढचे असे की, दादोजी कोंडदेवाचे सत्य स्वरूप समोर आणले की पुरोगामी आणि वाघ्या कुत्र्याबद्दल लिहिले तर प्रतिगामी.. (मूलनिवासी नायकमधील लेख.. बातम्या) हा कसला न्याय आहे? आपण नरकेंच्या गार्गी ते सावित्री या गाजलेल्या भाषणाबद्दल लिहिले आहे. महावीर सांगलीकर व मी या भाषणाला उपस्थित होतो. खरे तर कोणाही बहुजनीयाला अभिमान वाटेल असे ते भाषण होते. गार्गी-मत्रेयीबद्दल (आणि त्या दोघीही बहुजनीयच होत्या हे आपणास माहीत नाही हे आपले दुर्दैवच नव्हे काय?) ते जेमतेम ५-१० वाक्ये बोलले आणि नंतर अगदी झाशीच्या राणीवरही, केसरीकारांवरही यथायोग्य टीका करत त्यांनी सावित्रीबाईंची महत्ता सिद्ध केली. आपण या भाषणाला उपस्थित नव्हता. मी आणि सांगलीकर होतो. पण हे भाषण भांडारकरमध्ये झाले याबाबतच रोष आहे. तेही कसलीही माहिती नसता. एक जातीविशिष्ट चष्मा घातला की जे होते, तेच आपण केले आहे. नरकेंनी पूर्वी लेनप्रकरणी भांडारकर संस्थेवर संतप्त टीका केली हे आपले म्हणने मान्य करत मी विचारतो की दोष संस्थेचा असतो की त्यात कार्य करणाऱ्या लोकांचा? आणि त्या संस्थेतील नेमका कोण दोषी होता हे आजतागायत आपणास उमगले नसता त्याची जाण होऊन त्या संस्थेतच विधिवत मार्गाने जाऊन बहुजनीय विद्वत्तेची महत्ता वाढवणे, त्यात सहभागी होत बहुजनोपयोगी संशोधन योग्य की त्या संस्थांपासून फटकून राहणे योग्य?
आणि भय्या पाटील.. बाबासाहेबांनीच आम्हाला (बहुधा तुम्ही अनुपस्थित असावेत) शिकवले आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला समान दर्जा आहे.. मग तो कोणत्याही जात/धर्म/वर्गीय असो. ब्राह्मणांचा विरोध करायचे म्हणजे नेमके काय हे आपण आम्हाला शिकवावे. त्यांना कसे जाळून-कापून मारायचे हेही सांगितले असते तर बरे झाले असते. एखाद्या जातीचे वा विचारधर्माचे लोक ठार मारले म्हणजे तो विचार संपतो हा अलौकिक विचार आपली संघटना मांडत आहे याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. कारण आपण म्हणता ते वास्तवात आणायचे असेल तर सर्वप्रथम घटना दुर्लक्षित करावी लागेल. बाबासाहेबांचे नाव घेता कामा नये. गतइतिहासात धर्मपुरोहित ते सत्ताधाऱ्यांनी जी काही पापे केली त्याबद्दल फक्त धर्मपुरोहितांबाबत बोलावे.. सत्ताधारी मात्र वगळावेत असे तात्त्विक/बौद्धिक आरक्षण आपणास हवे आहे असे दिसते.. म्हणजे इतरांनी आपल्या न्याय्य हक्कांबाबत बोलले तर ते मात्र भटाळले.. आणि तुम्ही म्हणता तसे वागले.. बोलले तर मात्र बहुजनीय हा खाक्या कसा चालेल? चालणार नाही.. चालत नाही याची जाण आल्याने हा आपला उद्रेक आहे. माझी आपणास संपूर्ण सहानुभूती आहे. जेवढा असा उद्रेक आपण वाढवत राहाल, तेवढेच बहुजन शहाणे होत जातील. तुम्ही बदला हे सांगायचा अधिकार अर्थातच मला वा कोणाला नाही.. तुम्ही श्रेष्ठ आहात.. शक्तिशाली आहात हे माहीतच आहे. तुम्ही म्हणाल तो इतिहास.. बाकी सारी बकवास.. . हे आपले धेयवाक्यही मी तरी माझ्या हृदयात कोरून ठेवले आहे. पण फक्त प्रतिवाद करता येतील असे ऐतिहासिक प्रश्न उपस्थित करा ही विनंती.
आपलं म्हणणं आहे की, बहुजनीय स्त्रियांची पराकोटीची बदनामी ब्राह्मणांनी केली आहे. कोणत्या पुराणात नेमकं काय लिहिलं आहे याचे संदर्भ न देता (जणू काही कोणीच पुराणे वाचलेच नाहीत असा आव आणत) बेधडक विधानं करणं हे काही योग्य नाही. धर्मामधील सांकेतिकता आणि त्यांचे होणारे कथात्मक रूप हे समजलेले दिसत नाही म्हणून हा वृथा आरोप आहे. ज्या कोणी काही शतकांपूर्वी असे लेखन समजा केले असेल तर त्यावरील टीका/प्रबोधन समजता येऊ शकते, पण त्याचा बदला अखिल विशिष्ट समाज दोषी ठरवत आजच्या वर्तमानात कसा घेतला जाऊ शकतो? जे चूक आहे ते पुराव्यांनिशी उघड करणे हे श्रेय की उगाचच कसलाही संदर्भ न देता खेडेकरांच्या लेखनाचे अंध समर्थन करणे योग्य?
पाटील यांच्या प्रतिक्रियेत जी काही टीका आहे, ती स्वागतार्ह असली तरी ती व्यक्तिगत आहे, प्रा. नरकेंना बदनाम करणारी आहे. प्रा. नरकेंनी त्यांची साथ सोडली, मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून वगरे.. हे यामुळे समाजाला तरी समजले हे या लेखाचे फलित आहेच. प्रा. नरके यांनी त्यांच्या लेखात खेडेकरसाहेबांच्या साहित्याची समीक्षा केली आहे आणि कोणताही समीक्षक समीक्षा करताना मूळ लेखकाच्या लेखनातील समीक्षार्ह भाग अवतरणात देतो तसा दिलेला आहे. खेडेकरांचे साहित्य योग्यच आहे असा भय्या पाटील यांचा विश्वास असल्याने व तो त्यांनी उपरोक्त लेखात व्यक्त केला असल्याने व त्याबाबत मूळ लेखकास कसलाही खेद नसल्याचे व्यक्त केले असल्याने मग प्रश्न हा निर्माण होतो की मग हे प्रत्युत्तर मुळात आहे कशासाठी? नरके कसे भटाळले आहेत, त्यांच्या भूमिकेत कसा बदल झाला आहे, त्यांनी खाकी चड्डी कशी घातली आहे वगरे.. वगरे.. सांगत नरकेंचे व्यक्तिगत शिरकाण करणे हा जर या लेखाचा हेतू असेल तर तो योग्य आहे काय?
प्रतिपक्षाला छोटा दाखवून, बदनाम करून आपण मोठे होत नसतो. मूलनिवासी नायक या वृत्तपत्रांतून ब्रिगेडच्या सहयोगी संघटनेच्या मुखपत्राने गेली ८-९ महिने अशीच द्वेषाची गरळ सातत्याने प्रा. नरकेंविरुद्ध ओकली आहे.. त्यातून त्यांचे मित्रही सुटलेले नाहीत. याबाबत एक सामाजिक चळवळ चालवणारी म्हणून समजणारी संघटना आणि त्याचे प्रवक्ते अवाक्षर न काढता तीच द्वेषाची परंपरा चालवत आहेत आणि आम्ही त्याला फुले-आंबेडकरवादी समजू शकत नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
काही आडमुठे ब्राह्मण स्वत:ला सावरकरवादी/ नथुरामवादी/ सनातन प्रभातवादी वगरे समजत एका ब्राह्मण महात्म्याचा जयघोष करत सामाजिक रोष निर्माण करत आहेत तसेच.. आणि त्याहीपेक्षा भयंकर कृत्य करायला प्रेरित करणारी विधानं भय्या पाटील आणि त्यांचे स्वत:ला समतावादी समजणारे नेतेही आज अगदी जाहीरपणे करत आहेत.. याचे कोणाही मस्तक धडावर असलेल्या सुद्न्याला आश्चर्य वाटेल आणि खेदाने, शरमेने खाली मान झुकेल. चळवळींचा मृत्यू होतो तो असा आणि तिच्या अंताचे पाप यासारख्या समाजद्रोही लोकांकडे जाते. सारे विचारवंत या चळवळीपासून दूर का पळत आहेत, त्याचे कारण यात आहे. हुकूमशाही कोणालाही मान्य असू शकत नाही.. ज्यांना मान्य आहे त्यांनी बहुजनीय चळवळीत राहिले काय आणि समाजद्रोही संघटनांत राहिले काय.. फलित एकच आहे!
चळवळ समतेसाठी आहे.. नव्या विषमतेसाठी नाही.. नव्या मनुवादासाठी नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.
संजय सोनवणी,
sanjaysonawani@gmail.com  

[साप्ताहिक लोकप्रभा, दि.२३ सप्टे.२०११ वरुन साभार}

Friday, August 19, 2011

अण्णा हजारे आणि आपण


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला माध्यमे,मध्यमवर्ग,तरुणाई,आणि विरोधी पक्षांनी अभुतपुर्व पाठींबा दिलेला आहे.दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्ष आणि सामाजिक चळवळीतील काही समाजगट अण्णांच्या आंदोलनाबाबत विरोधी/साशंकही आहेत.संसद,विद्यमान राज्यघटना,प्रचलित कार्यपद्धती आणि लोकशाही यांनाच या आंदोलनामुळे काही धोका होईल काय अशी त्यांना काळजी वाटते.अण्णांच्याभोवती असणारे काही प्रतिगामी लोक आणि शक्ती यांच्यामुळे ती बळावली असावी. एक अपुर्व सामाजिक घुसळण होत आहे. अण्णांनी आजवर कधीही जातीव्यवस्थेतुन उद्भवणा-या सामाजिक समस्यांवर भुमिका घेतलेली नाही असाही आक्षेप घेतला जातो.मात्र आण्णांच्या आजवरच्या राळेगणचा विकास, माहीती अधिकार कायदा,बदलीचा कायदा,ग्रामसभांना अधिकार आदि कामांबद्दल सर्वदुर आदरभावनाही असताना दिसते.आजची राजकीय व्यवस्था कमालीची किडलेली आहे.आजच्या संसदेतील {अपवाद वगळता}सर्व
खासदार निवडणुकीत वारेमाप पैसा उधळुन निवडुन आलेले आहेत.त्यांनी कोणीही बहुधा निवडणुक खर्चाची मर्यादा पाळलेली नसुन त्याबाबतची त्यांची प्रतिद्न्यापत्रे अक्सर खोटी आहेत,असे जनतेला अनुभवाने वाटते.भ्रष्टाचार,महागाई,बेकारी आदिंनी जनता त्रस्त आहे.भ्रष्टाचारविरोधी द्रुतगती न्यायालये स्थापण करणे,निवडणुक सुधारणा कायदा आणणे,रोजच्या जीवनात निर्धाराने भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी जनमानसिकता तयार करणे,असे उपाय त्यावर योजावे लागतील.प्रश्न आहे तो सत्ताधा-यांच्या आकलनाचा आणि ईमानदारीचाही.आज कोणत्याही राजकिय पक्षाची भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची ईच्छाशक्ती दिसत नाही.त्यांनी देशातील जनतेची ताकद "अंडरईस्टीमेट" केली आहे.जनतेत असलेल्या संतापाचा त्यांना पत्ताच नाही.बहुदा जे.पीं.च्या वेळेपेक्षाही यावेळी जास्त तरुण आंदोलनाला पाठींबा देत आहेत.त्याचे कारण तरुणांची काहीतरी करण्याची ईच्छाशक्ती,समकालीन राजकारणाची तीव्र नफरत,नेत्यांचे भ्रष्ट वर्तन, मस्तवाल आणि बेदरकार सत्त्ताधिश आहेत.स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारावरुन एव्हढे माजी मंत्री/खासदार/प्रशाषक तुरुंगात गेलेले असावेत.हे सारे संतापजनकच आहे.लोकभावनेचा आदर करुनही केवळ भाबडेपणाने हा महाभयंकर प्रश्न सुटेल असे मानता येत नाही.अण्णांच्यामागे असणारे काही बेरकी/प्रतिगामी लोक कोण आहेत याचाही विचार झाला पाहिजे.त्यांचा आणखी काही छुपा अजेंडा तर नाही ना याचाही शोध घेतला जाणे चुकीचे म्हणता येणार नाही.संसदेला ओव्हरटेक करण्याऎवजी किंवा संसदेला वळसा घालण्याऎवजी आगामी निवडणुकीत सहभागी होवुन स्वच्छ चारित्र्याचे लोक संसदेत जातील असेही अण्णांनी पाहिले पाहिजे.राजकीय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये नफरत वाढु देणे परवडणारे नाही.त्यातुन विभुतीपुजक/सरंजामी भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे होईल. ती लोकशाहीची म्रुत्युघंटा असेल.
मात्र ज्या संसदेला आण्णा वेठीला धरीत आहेत अशी सत्ताधारी ओरड करीत आहेत तेथील खासदार तरी काय प्रकारचे आहेत?ते जर खरेच स्वच्छ असते तर त्यांनी जनतेचा विश्वास गमावला नसता.त्यामुळे ह्या खासदारांच्या हातात देश सुरक्षित आहे असे मानणे भाबडेपणाचे होईल.ज्या गटांना आण्णांच्या आंदोलनाबाबत शंका आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की चतुर सत्ताधारी आपल्याला आण्णांच्या विरोधात वापरुन तर घेत नाहीत ना? कारण एरवी याच सत्ताधा-यांचे जातवार जनगणना,दलित अत्त्याचार,महिला आरक्षणात ओबीसी कोटा ठेवणे याबाबतचे वर्तन कोणते प्रामाणिक आहे?आज अनुसुचित जाती/जमाती उपघटक योजनेचा निधी सरळसरळ दुसरीकडे वळवला जातो.,ओबीसी जातवार जनगणनेबाबत संसदेत दिलेले वचन सरकार पाळत नाही, महिला आरक्षणात ओबीसी महिलांना कोटा द्यायला सरकार तयार नाही,दलित अत्त्याचारांना रोखण्यात सरकार अजिबात गंभीर नाही.त्यामुळे आपण स्वता:ला ह्या सरकारला वापरु द्यायचे काय?याचाही विचार केला पाहिजे.सरकारच जर राज्यघटनेशी प्रामाणिक नसेल तर त्यांचा सध्याचा दावा कसा खरा माणणार?भारतीय जनता फार मोठ्या प्रमाणात आण्णांसोबत  असताना आपण या कोट्यावधी जनतेपासुन फटकुन राहिलेच पाहिजे काय?
सरकारच्या सापळ्यात अजिबात न अडकता आणि जनतेपासुन फटकुनही न राहाता आपण निर्णय घेतला पाहिजे. तथापि आण्णांच्या भोवतीच्या प्रतिगामी कोंडाळ्यालाही शरण न जाता चळ्वळीने आण्णांच्या आंदोलनाबाबत फेरविचार करावा असे मला वाटते.आपली भुमिका स्वतंत्र जरुर असावी परंतु ती विरोधातच असावी की आपली मुद्दे पुढे रेटणारी असावी याचीही चर्चा झाली पाहिजे.कारण ही लढाई फार मोठी आहे.लांबपल्ल्याची आहे.आपण समाजत "ब्रांड" व्हायचे की लोकशाही मार्गाने आपला अजेंडा राबविणारे हे आपल्या भुमिकेवर अवलंबुन राहणार आहे.

Friday, August 12, 2011

आरक्षण:शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी



Admagnet-X
आरक्षण - शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी
प्रा. हरी नरके
Friday, August 12, 2011 AT 07:39 AM (IST)

बहुचर्चित "आरक्षण' चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी बुधवारी हा चित्रपट पाहिला आणि आपली भूमिका मागे घेतली. या कार्यकर्त्यांचा विरोध का मावळला, याविषयी... 



संधी मिळाली तर मागासवर्गीयही उत्तम गुणवत्तावान होतात; यश प्राप्त करू शकतात, असाच संदेश "आरक्षण' चित्रपटाने दिला आहे. एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची ही कहाणी आहे. जातीय तेढ, सामाजिक फाळणी किंवा आरक्षणाला विरोध, असे त्याचे स्वरूप नाही. हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत असला तरी त्याला प्रदर्शनपूर्व विरोध खूप झाला. चित्रपट न्यायालयात गेला. चळवळीतील काहींनी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याला विरोध केला. शेवटी बुधवारी हा चित्रपट विरोधकांनी पाहिला आणि हिरवा झेंडा दाखविला.

प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्‍नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. "आरक्षण'मध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि घटनात्मक हक्कांना बाधा आणणारे आरक्षणविरोधी चित्रण असल्यास त्याला शांततामय मार्गाने विरोध करू, अशी भूमिका राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगांनी, तसेच समता परिषदेचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी घेतली होती. प्रकाश झा यांनी या मंडळींसाठी खास खेळाचे आयोजन केले होते. भुजबळांसह सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, महिला व बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार समीर भुजबळ, रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे, कृष्णकांत कांदळे, डॉ. जब्बार पटेल आदींसमवेत मीसुद्धा हा चित्रपट पाहिला. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर काही दृश्‍ये आणि प्रसंग काढण्याच्या अटीवर भुजबळांनी विरोध मागे घेतला. "आरक्षण हे घटनात्मक वास्तव असून, शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास आरक्षण जबाबदार आहे का, याचा शोध मी चित्रपटातून घेतला आहे,' असे झा या वेळी म्हणाले.
जागतिकीकरणामुळे झालेले शिक्षणाचे बाजारीकरण, कोचिंग क्‍लासेसचे वाढते महत्त्व आणि आरक्षणाबाबतचे सामाजिक ताणतणाव या कथानकावर चित्रपट उभा राहतो. प्रभाकरन (अमिताभ बच्चन) हा ध्येयवादी शिक्षक एका नामवंत खासगी महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आनंदोत्सव केल्यामुळे उच्चवर्णीय मुले भडकतात. तणाव निर्माण होतो. हातघाईची वेळ येते. महाविद्यालयातील आरक्षणविरोधी लॉबीला मानवतावादी प्रभाकरन अडचणीचे वाटत असल्याने ते कटकारस्थान करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतात. उपप्राचार्य मिथिलेश सिंग (खलनायक मनोज वाजपेयी) प्राचार्य बनतात. ते खासगी कोचिंग क्‍लासेस चालवत असतात. अमिताभचे घरच त्यांनी बळकावलेले असते. ते परत मिळविण्यासाठी अमिताभची ससेहोलपट आणि त्यांचा शैक्षणिक आदर्शवाद यांची टिपिकल हिंदी मसाला चित्रपटाची सगळी भट्टी वापरण्यात आली आहे.
गुंतागुंतीच्या प्रश्‍नांचे सुलभीकरण, आदर्शवादी मांडणी, मनोरंजनाची फोडणी आणि आरक्षण या ज्वालाग्राही प्रश्‍नाचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून केलेला वापर, या चित्रपटात बघायला मिळतो. दीपक (सैफ अली खान) हा मागासवर्गीय युवक प्रभाकरनच्या मदतीमुळे अभ्यासात टॉपर आहे. परंतु त्याला नोकरीत डावलण्यात येते. शेवटी प्रभाकरन त्याला आपल्या महाविद्यालयात नोकरी देतात. आरक्षण प्रश्‍नावरून निर्माण झालेल्या संघर्षात दीपक गप्प बसू शकत नाही. ज्या उच्चवर्णीय मुलांना प्रवेशात अडचणी येतात, त्यांच्याशी त्याचा थेट सामना होतो. प्रभाकरनशी वाद होतात. महाविद्यालय सोडावे लागते. प्रभाकरनची मुलगी पूर्वी (दीपिका पदुकोण) दीपकच्या प्रेमात असते. परंतु वडिलांच्या बाजूने ती उभी राहते आणि आरक्षणाच्या प्रश्‍नावरील मतभेदामुळे ते दोघे दुरावतात.

शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि विशेषतः प्रतिकूल परिस्थितीतील मुलांचे मोफत अभ्यासवर्ग प्रभाकरन म्हशींच्या गोठ्यात चालवतात. दीपक, पूर्वी आणि त्यांचे मित्र मदतीला पुढे येतात. त्यामुळे खासगी कोचिंग क्‍लासेसचा धंदा बसतो. मग कटकारस्थाने आणि संकटांची मालिका व शेवटी नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळण घेऊन गोड शेवट, अशी मांडणी आहे. आरक्षण प्रश्‍नावरील काही प्रचलित गैरसमज भडकपणे मांडले जातात. त्यांची धारदार उत्तरेही दिली जातात. काही प्रसंग आणि समूहदृश्‍ये प्रभावी आहेत. काही दृश्‍ये व संवाद वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह ठरू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यावर चर्चा, वादविवाद होऊ शकेल. झा यांनी खासगी क्षेत्रात येऊ घातलेले आरक्षण रोखण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे काय, त्यांनी कोचिंग क्‍लासेस आणि बाजारीकरणाचे खापर आरक्षणावर फोडणे अनुचित नाही काय, त्यांनी आरक्षण या प्रश्‍नाच्या गाभ्यालाही हात न घालता एक टिपिकल हिंदी मसालापट बनवून सरधोपट मार्गाने या प्रश्‍नांचे गांभीर्य कमी केले आहे काय, असे प्रश्‍न उद्‌भवू शकतात. झा यांच्याशी प्रतिवादही होऊ शकेल. तो केलाही पाहिजे. परंतु त्यांनी एका समकालीन प्रश्‍नाला हात घालण्याचे (टिपिकल हिंदी मसाला पद्धतीने का होईना) धाडस केल्याचे गुण त्यांना द्यावेच लागतील. चित्रपटाची हाताळणी खूप लाऊड आहे. संवाद मात्र धारदार आणि टाळ्या घेणारे आहेत. कष्टाचे महत्त्व उच्चवर्णीयांनी कष्टकऱ्यांनाच सांगावे यातला उपरोध नेमका टिपला आहे. एकूण काय, तर एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवरील टिपिकल हिंदी मसाला कहाणी म्हणजे "आरक्षण' होय.
टीव्हीवरील प्रोमो पाहून हा चित्रपट आरक्षणविरोधी असावा, असे वाटत होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर गैरसमज दूर झाला. काही दृश्‍ये आणि प्रसंगांमध्ये सुधारणा करण्याची तयारी झा यांनी दाखविल्याने समता परिषदेने विरोध मागे घेतला आहे.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री 



Saturday, August 6, 2011

फ्यासिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन- भाग २

प्रा. हरी नरके
पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते विविध आंदोलनांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. खेडेकर केवळ आंदोलनं करून थांबले नाहीत तर त्यांनी विविध पुस्तकांमधून आंदोलनाएवढय़ाच कडवट टीकेचं सत्र कायम राखलं आहे. खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.
(भाग २)
फुले-अांबेडकरी चळवळी कब्जात घेण्याचा खेडेकरांचा एक ‘ब्लूिपट्र’ आहे. त्यांचा हा छुपा अजेंडा विवेकी कार्यकर्त्यांना सहज ओळखता येतो. स्वत:चे मनोगत ते नकळत सांगून जातात. ‘‘असे कलाकार स्वत:चा माल खपवण्यासाठी बहुजन समाजाच्या मालासोबत आपल्या मालाची भेसळ करतात. धान्य, तेल, खाद्यपदार्थ, तूप, मसाले अशा खाद्यपदार्थाच्या भेसळीपेक्षा विचारांची भेसळ अत्यंत घातक असते. असे नाटकी कलाकार अत्यंत क्रूर असतात व या क्रूरपणाशी प्रामाणिक असतात. हा अत्यंत हलकट क्रूरपणा हाच अशा नाटकी लोकांचा स्वार्थी स्वभाव झालेला असतो. त्यामुळे नाना प्रकारची नाटकं निर्माण करून असे कलाकार श्रोत्यांना झुलवतात, पेटवतात, त्यांच्याशी समरस होतात.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ६)
मुळात खेडेकरांनी ही टीका समरसतावाद्यांवर केलेली आहे. तथापि ती खेडेकरांनाही चपखलपणे लागू पडते. खेडेकर सांगतात, ‘‘प्रतिचळवळी ओळखणे अत्यंत अवघड असते. तसेच अनेकदा तिची ओळख होईपर्यंत ती आपल्याच चळवळींवर स्वार झालेली असते.. प्रतिचळवळी या मूळ चळवळी संपवण्यासाठी असतात. प्रतिचळवळ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, निर्दयपणे, सातत्याने, संघटितपणे, निराश न होता राबविली जाते.. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही नीती अमलात आणली जाते.. चळवळीत प्रवेश मिळाल्यावर नेतृत्व ताब्यात घेणे व प्रतिचळवळीचा विचार मूळ चळवळीच्या आदर्शाच्या माध्यमातून पसरवणे.. चळवळ हायजॅक केल्यावर म्हणजेच ताब्यात घेतल्यावर तिच्यावर पूर्ण प्रतिचळवळीचा ताबा प्रस्थापित करणे अशी वाटचाल आहे.’’ (बहुजनांच्या सत्तांतरांचा संघर्ष, पृ. २६, २७)
संघपरिवार आणि प्रतिगामी शक्तींचे हे डावपेच आहेत असे सांगणारे खेडेकर स्वत:च त्यांचा वापर करताना दिसतात हे पुराव्याने सिद्ध करता येते. इथेच तर चळवळीचा त्यांच्याशी वाद आहे. बहुजन समाजातीलच मराठेतर नेत्यांना संपवण्याचे खेडेकरांचे मनसुबे आहेत. ते लिहितात, ‘‘आम्ही मराठा तितुका मिळवावा आणि गुणदोषांसह स्वीकारावा असे धोरण स्वीकारले आहे.. या संबंधाने आमच्याशिवाय कुणीही चर्चा करायला तयार नाही.. अस्तित्वात असणाऱ्या जातींची अस्मिता जागृत करून बहुजन समाज निर्माण करावा लागतो.. मराठा अस्मिता ही जगातील मानव समूहातील सर्वश्रेष्ठ अस्मिता आहे.. कुणबी मराठा समाज एकसंध असता तर त्यांना बिगर मराठा नेतृत्वाच्या पाठीमागे लाचार होऊन धावण्याची वेळच आली नसती. शिवसेना असो की भाजप, ज्या राजकीय पक्षाचे नेतृत्व बिगर कुणबी मराठय़ांच्या तालाने चालत असते, तिथे कुणबी मराठय़ांचे हित सुरक्षित कसे राहील?’’ (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. ६, २४, २६)
मराठाप्रेमाची साखरपेरणीही बेगडी आहे. मुळात ती एक धोरणीपणाने खेळलेली चाल आहे. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धारण केलेला तो एक मुखवटा आहे.
खेडेकरांची स्पष्ट मागणी आहे की ‘‘मराठय़ांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओबीसीमध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इत्यादी सवलती त्वरित द्याव्यात’’ (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. ३३) बहुजनातील छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, प्रा. हरी नरके यांचा त्याला अडसर होत आहे या समजुतीपोटी खेडेकर त्यांना बहुजनद्रोही व ब्राह्मणांचे हस्तक ठरवून त्यांच्यावर आगपाखड करतात. खेडेकर म्हणतात, ‘‘शिक्षण संस्था व साखर कारखाने मराठा जातीतील लोकांपेक्षा जास्त कुणबी, लेवा कुणबी, माळी, तेली, वंजारी, धनगर, आगरी समाजांच्या ताब्यात आहेत.’’ (मराठा आरक्षणाचा खून बापट आयोग, पृ. ५३) प्रत्यक्षात राज्यातील सुमारे ९५ टक्के साखर कारखाने आणि सुमारे ५५ टक्केपेक्षा जास्त शिक्षण संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. जे खेडेकर स्वत: कुणबी असूनही कुणब्यांच्याही बाबतीत खोटे लिहितात ते कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ नाहीत काय?
खेडेकर म्हणतात, ‘‘मराठा समाजाच्या मनात जातीयता कधीच नव्हती. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांना मराठय़ांनीच भरघोस मतांनी निवडून दिले. हे दोघे व त्यांचे भक्त मराठा समाजाचा द्वेष करतात. मराठा विरोध हे त्यांचे अस्तित्व आहे. ओबीसी, एससी, एसटी व ब्राह्मण संघटित होऊन मराठा समाजाविरोधात अभद्र युती करून सामाजिक विष पेरीत आहेत. मराठा समाजास एकटे पाडून त्यांचा टोकाचा द्वेष करायचा ही भुजबळ, मुंडे यांची राजनीती आहे. ओबीसी समूहातील या जात्यंधांनी मराठा विरोधाची बोथट झालेली धार अत्यंत धारदार बनविली. त्यासाठी फुले-आंबेडकरांचा विचार विकृत बनवला. त्यातून ब्राह्मणालाच एकटे पाडून मुळासकट गाडून टाकण्याचा फुले विचारच गाडण्यात आला. आणि मराठा विरोधालाच समाजात रुजविण्यात आले. यातून ‘मराठा विरुद्ध मराठेतर’ असा बामणी कावा ओबीसी समाजाने स्वीकारला. ‘मराठा तेवढा अडवावा, मातीत पुरून गाडावा’, ‘मराठा अडवा, मराठा जिरवा’ असे नवे नारे जन्मास आले.’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ५०, ५१) असा कांगावा खेडेकर करतात.
चोराच्या उलटय़ा बोंबा ही म्हण त्यांना चपखलपणे लागू पडते. खेडेकर ब्राह्मण समाजाची बदनामी करत असतील तर बहुजनांनी कशाला मध्ये पडायचे? असा प्रश्न काही जण विचारतात. वास्तवात ब्राह्मणांना विरोध हा खेडेकरांचा फक्त ‘पवित्रा’ असला तरी त्यांचा खरा विरोध ओबीसी, दलितांना आहे हे ओळखता आले पाहिजे. प्रगत ब्राह्मण समाज स्वतच्या लढाया लढायला सक्षम आहे. समर्थ आहे. त्यांची वकिली इतरांनी करण्याची गरज नाही. प्रश्न आमच्या दलित-ओबीसींच्या अस्तित्वाचा आहे. भारतीय समाज पुढील चार गटांत विभागला गेला आहे. (१) उच्चवर्णीय ब्राह्मण, भूमीहार, बनिया; (२) सत्ताधारी जाती गुजर, रेड्डी, पटेल, जाट, मराठा; (३) ओबीसी, भटके विमुक्त; (४) दलित अन् आदिवासी. या चार गटांतील सामाजिक विभागणी समजून घेणे, त्यांच्या उत्थानासाठी, हितसंबंधाच्या जपवणुकीसाठी झटणे हा गुन्हा ठरत नाही. तथापि िहदुत्ववादी जसे मुस्लीमविरोधाची आवई उठवून ‘िहदू सारा एक’ म्हणत असतात आणि दुसरीकडे दलित, ओबीसी, भटके, आदिवासी यांच्या आरक्षण, जातवार जनगणना अशा कार्यक्रमांना विरोधही करीत असतात. त्याच धर्तीवर ‘ब्राह्मण आपला शत्रू’ असे म्हणत ओबीसींना साथीला घेऊन त्यांच्याच ताटातील घास अलगद काढून घेण्याचा डाव खेडेकर खेळत असतील तर हे राजकारण ओबीसी-दलितांना समजावून सांगणे हे आमचे कर्तव्यच आहे. मॉरिस जोन्सची परिभाषा वापरून सांगायचे तर फुले-आंबेडकरी चळवळीत आज आधुनिकता, परिवर्तन, सदाचार आणि परंपरा यांची गतिशील ऊर्जा कार्यरत आहे. तिला फॅसिझमची कीड लागू द्यायची काय?
खेडेकर सांगतात, ‘‘मराठा जातीपेक्षा गावातील, माळी, वंजारी, तेली निश्चितच श्रीमंत आहेत.. ओबीसींचे सगळे फायदे धूर्तपणे फक्त माळ्यांनीच ओढून नेले.’’ (बापट आयोग, पृ. ५०, ५१) यावरचा उपाय म्हणून मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, माळ्यांना ओबीसीतून बाहेर काढावे, कुणब्यांना ओबीसीत स्वतंत्र गट बनवून वेगळे आरक्षण द्यावे. अनुसूचित जातीचे सगळे आरक्षण बौद्ध पळवतात. सबब मातंग, चर्मकार, ढोर, भंगी यांचे आरक्षणासाठी स्वतंत्र गट करावेत असे सल्ले खेडेकर देतात. (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५४) खेडेकरांचा हा कार्यक्रम बहुजन समाजाच्या ऐक्याचा कार्यक्रम आहे काय? मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिले की िहदुत्चवादी त्यावर तुटून पडतील आणि िहदू-मुस्लीम भांडण लागले की दलित-आदिवासी, ओबीसी-भटके अजेंडय़ावरून आपोआप गायब होतील. हा खेडेकरांचा डाव आहे. ‘‘अत्यंत नीच पातळीवर जाऊन मराठा समाजाची िनदानालस्ती करणारे, स्वत:ला फुले-शाहू-आंबेडकरांचे जिवंत एकमेव वारसदार असल्याचे दावा करणारे हरिभाऊ नरके हे सुमारे गेले चार वर्षे मराठा जातीचा ओबीसीत समावेश करणे कसे अन्यायी आहे यावर राज्यात व राज्याबाहेर भाषणे देत आहेत.’’ (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५३) अशी टीका खेडेकर करतात. मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक मुद्दे दुबळ्या ओबीसी-भटक्यांना समजावून सांगणे ही हरि नरके यांची कृती मराठा समाजाची िनदा-नालस्ती कशी ठरते ते खेडेकरच जाणोत. घटनात्मक पातळीवरील मतभेद मांडायचे नाहीत काय? मतभेद मांडणे म्हणजे शत्रू होणे असते काय? त्यासाठी ठेचून काढू, संपवून टाकू अशा धमक्या देणे हा चळवळीत साथ देणाऱ्यांचा हा विश्वासघात नाही काय? इथे कुठे आला ब्राह्मण? आम्ही जिवंत राहण्याची धडपड करणे हीही तुम्हाला ब्राह्मणी खेळी वाटत असेल तर ती तुमची गरसमजूत आहे. आमचा मात्र तो हक्क आहे. ब्राह्मणवादी संघटनांच्या अजेंडय़ाशी आम्ही सहमत होणे कदापिही शक्य नाही. आजही त्यांना कुळकायदा रद्द करायचा आहे. आरक्षण आणि जातवार जनगणनेला त्यांचा विरोध आहे. आजही जे ज्ञानगंडाने मातलेले आहेत, परशुराम ज्यांचा आदर्श आहे, हिटलर ज्यांना अनुकरणीय वाटतो, त्यांच्याशी आमची हातमिळवणी होऊ शकत नाही. त्यांचे आणि खेडेकरांचेच एकमत आहे. कारण खेडेकर म्हणतात परशुराम हा मराठा होता. (पृ. ३७) एवढेच नाही तर त्यांचे असेही प्रतिपादन आहे की ‘‘मराठय़ांच्या वीर्यसंकरातून आज जगातील मानववंश वाढलेले आहेत.. वैद्यकीय व शास्त्रीयदृष्टय़ा मराठय़ांचा संकर होऊन निर्माण झालेला आजच्या ब्राह्मण समाजाचा बाप मराठाच आहे हे जगत्सत्य आहे.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) यावरून मराठा आणि ब्राह्मण हे एकच आहेत आणि त्यांच्यातील भांडणं ही भाऊबंदकीच आहे असे खेडेकरांचे मत आहे. असे असेल तर या भांडणाशी दलित-ओबीसींचा कुठे संबंध येतो?
मराठाप्रेमाची तुमची साखरपेरणीही बेगडी आहे. मुळात ती एक धोरणीपणाने खेळलेली चाल आहे. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धारण केलेला तो एक मुखवटा आहे. तुम्हाला जे थारा देत नाहीत ते सारे ‘बहुजनविरोधी’ या तुमच्या खेळी आता मराठा समाजाच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत. अण्णा हजारे यांच्याबद्दल सर्वदूर आदरभावना आहे. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. त्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका होऊ शकते. परंतु खेडेकर त्यांना चक्क वेडसर ठरवतात. ते म्हणतात, ‘‘मराठा अस्त्र आण्णा हजारे यांच्या हाती लागले. आता या अस्त्राचाही वापर संपत आला आहे. ते आता कोणत्याही क्षणी नेहमीसाठी टाळेबंद होईल आणि प्रसिद्धीचा हव्यास मेंदूत जास्तच भिनला असल्यास एखादे दिवशी आत्महत्या करेल वा अपघातात मरेल!’’ (बहुजन हिताय, पृ. ३८) या शब्दात अण्णांच्या मृत्यूची अपेक्षा करणे मराठा धर्माला शोभते काय?
खेडेकरांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या २० वर्षांत महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाज हा या फॅसिस्टांचा वेठबिगार बनेल आणि त्यांच्यावर भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.
खेडेकरांना पसा न देणाऱ्या मराठय़ांबद्दल खेडेकरांनी किती आगपाखड करावी? ‘‘९० टक्के श्रीमंत-साक्षर, सत्ताधीश, मराठा समाज स्मशानाची वाटचाल करीत आहे. गेल्या २० वर्षांत याच मराठा समाजाने ‘मराठा सेवा संघाची’ वाट न चालता वाट लावली आहे. हाच समाज प्रामुख्याने ब्राह्मणांचा रक्षणकर्ता बनलेला आहे.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४५) ‘‘शिकलेली माणसं जेवढी गांडू-भेकड असतात, तेवढी अशिक्षित नसतात.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. १०) असा शेरा मारून खेडेकर पुढे म्हणतात, ‘‘लता मंगेशकर ही गोवन मराठा कुटुंबातील जगप्रसिद्ध गायिका होताच ब्राह्मणांनी तिचे ब्राह्मणीकरण करून टाकले.’’ (पृ. १३) लोकप्रतिनिधींबद्दल खेडेकर म्हणतात, ‘‘आपले लोकप्रतिनिधी न्यायालय म्हटले की, गांडीत शेपूट घालतात, एवढी भारतात न्यायालयांची दहशत आहे.’’ (पृ. २०) ‘‘इतर समाजाच्या पावत्या राजरोसपणे फाडणारे आमचे उच्चपदस्थ ढोंगी बांधव, मराठा सेवा संघाचे नाव घेतले की एरंडेल तेल प्यायल्यासारखा चेहरा करतात, याची खंत वाटते.’’ (कुणबी मराठा पंचसूत्री, पृ.१७) या सर्व मजकुरावरून काय सिद्ध होते? सबसे बडा रुपय्या! नोकरीत असताना खेडेकरांच्या ठाणे येथील सरकारी बंगल्यावर आयकर विभागाची धाड पडली होती.
खेडेकरांचेच मत आहे की, ‘‘१०० टक्के वैयक्तिक स्वार्थाशिवाय ९९ टक्के मराठा समाज एकत्र येत नाही.’’ (पृ. १८) स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठीच तर हे जातीप्रेमाचे ढोल वाजवले जात आहेत. लोकांचे मतपरिवर्तन करता येत नसेल तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा, हे फॅसिस्ट तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे सूत्र असते. अफवा, कुजबूज तंत्र, उलटसुलट विधाने, धरसोड आणि घुमजाव ही सगळी फॅसिस्टांची वैशिष्टय़े खेडेकरांच्या पुस्तकात ठासून भरलेली आहेत. एकीकडे खेडेकर एकूण एक ब्राह्मण पुरुष जाळायची आणि कापायची भाषा करतात आणि त्याच वेळी ते आपले हे पुस्तक एका ब्राह्मणालाच अर्पण करतात. सच्चे शिवप्रेमी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेल्या शिवरायांच्या गौरवपूर्ण सेवेबद्दल त्यांना व इतर चारजणांना सन्मानपूर्वक हे पुस्तक अर्पण करीत असल्याची पानभर नोंद पृ.३ वर खेडेकर करतात. खेडेकर म्हणतात, ‘‘ब्राह्मण अधिकारी मला स्वयंस्फूर्तीने आजही सर्वार्थाने मदत करतात हे मुद्दाम नमूद करतो.’’ (पृ.१६) खेडेकरांची संघटना जर ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या पशावर चालत असेल तर ते कसले ब्राह्मण विरोधक? ब्राह्मण विरोधाची ही निव्वळ आवई उठवून खेडेकर ओबीसी-भटक्यांना फसवू पाहात आहेत. प्रत्यक्षात ‘ते ब्राह्मणांना शिव्या देतात हा फार मोठा गरसमज असल्याचीही’ कबुली खेडेकरच देतात. पुढे ‘‘ब्राह्मण अधिकारी अरिवद इनामदार व जयंत उमराणीकर यांच्यापासून मराठा अधिकाऱ्यांनी काही शिकावे, त्यात मराठय़ांचेच कल्याण आहे’’ असाही सल्ला द्यायला ते विसरत नाहीत (पृ.१६) दुसरीकडे मराठा अधिकारी मात्र खेडेकरांना आíथक मदत करीत नाहीत, अशी त्यांची खरी तक्रार आहे. ‘‘मराठा अधिकाऱ्यांना संघटनेसाठी पसे मागितले तर ते देत नाहीत. परंतु त्याच वेळी अनेकजण हप्ते जमा करण्यात क्रमांक एकवर आहेत.’’ (पृ. २०/२१) एवढेच सांगून ते थांबले नाहीत. पुढे ते म्हणतात, ‘‘मराठा संघटनांचा वापर हे मराठा अधिकारी स्वत:चे काळे धंदे लपविण्यासाठी कवच म्हणून करतात.’’ (पृ. २१) मराठा अधिकारी काळे धंदे करतात, हप्ते घेतात हा खेडेकरांचा जाहीर आरोप आहे. मराठा अधिकाऱ्यांना तो मान्य आहे काय? खेडेकरांची संघटनाच या काळ्या धंद्यांना संरक्षण पुरवते असा कबुलीजबाब ते देऊन जातात. लेखक विश्वास पाटील यांना खेडेकरांनी मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले होते. पाटील त्यापूर्वी संघपरिवाराच्या समरसता मंचच्या साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. खास मर्जीतील असूनही खेडेकरांनी पाटलांवर टीकेची झोड उठवलेली आहे. त्यांना चक्क शिवरायांचे विरोधक ठरवले आहे. संभाजी राजांवर महाकादंबरी लिहिणारे विश्वासराव शिवरायविरोधी कसे, हा प्रश्न विश्वास भक्तांना पडू शकेल. तथापि खेडेकरांच्या तोफेपुढे कुणाचीही खैर नाही. ‘‘विश्वास पाटील, भुजंगराव िशदे, प्रताप दीघावकर, शामसुंदर िशदे, ज्ञानेश्वर फडतरे, रवींद्र िशदे, विश्वास भोसले हे सारे मराठा अधिकारी अत्यंत मतलबी व शिवरायविरोधी आहेत. मराठा अधिकारी नोकरी, कमाई, पोस्टिंग, प्रमोशन, स्वार्थ अशा बाबींसाठी ‘मराठा’ जातीचे दाखवून सर्वच पातळ्यांवर सर्वच फायदे घेत आहेत. दुर्दैवाने अपवाद वगळता कुणीही समाजासाठी व स्वत:च्याच रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांसाठी उष्टय़ा हाताने कावळाही मारीत नाहीत अथवा फुकट कुणाच्या करंगळीवर मुतत नाहीत.’’ (पृ.१६) असा दावा ते करतात. मराठा समाजातील सर्व मंडळींना मराठापणाचा लाभ मिळतो. खेडेकर याबाबतची स्पष्ट कबुली देताना म्हणतात, ‘‘आज जे जे मराठे कोणत्याही पदावर पोहोचलेले दिसतात, त्यात ते मराठा असल्याचा वाटाच सर्वात मोठा आहे!’’ ( पृ.३२) ‘‘केवळ मराठा याच एकमेव गुणवत्तेवर जन्मभर नोकरी करणारे अधिकारी कधी कुणाच्या कल्याणासाठी कुणाच्या करंगळीवर मुतेलेले नाहीत’’ असे नमूद करून खेडेकर पुढे असेही म्हणतात की, ‘‘अनेक मराठा ज्येष्ठ आयएएस व आयपीएस अधिकारी शब्दातून सहानुभूती दाखवतात. माझा बाप मेल्यासारखे माझे सांत्वन करतात, पण प्रत्यक्ष आíथक व इतर सहभाग शून्य!’’ या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की खेडेकरांना ही मंडळी पूर्वीसारखी आजकाल पुरेशी आíथक मदत करीत नाहीत. जे खेडेकरांना व्यक्तिगत मानसन्मान देतात, भरघोस अर्थसहाय्य पुरवितात तेच तेवढे ‘‘सच्चे शिवप्रेमी! सच्चे मराठे! बाकी सारे खराटे!’’ असे खेडेकरच म्हणतात. (पृ. २५) ‘खेडेकरप्रेम म्हणजेच शिवप्रेम! खेडेकर म्हणजेच समाज’ असे समीकरणच पुस्तकांच्या पानापानांवर मांडले गेले आहे. ‘खेडेकर साहब अंगार है, बाकी सब भंगार है!’ अशी त्यांच्या अनुयायांची घोषणाच असते. हे अनुयायी खेडेकरांना युगपुरुष मानतात. त्यामुळे खेडेकर या युगातील कायदे आपल्याला लागू होत नाहीत असे मानतात.
‘‘राजकारणी मराठय़ांना शिवाजी हे निवडणुकीत विजय मिळवून देणारे पात्र वाटत नाही.’’ (पृ.३१) असे खेडेकर सांगतात. इतर कुणाची महाराजांना ‘पात्र’ म्हणायची हिंमत झाली नसती. खेडेकरांचे महाराजांवर ‘विशेष’ प्रेम असल्याने त्यांना तो अधिकारच असणार. खेडेकरांनी शिवरायांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही. मराठा राजकीय नेत्यांवर खेडेकरांचा भलताच ‘जीव’ असावा! त्यांच्यावर तोंडसुख घेताना खेडेकरांनी त्यांना लावलेली विशेषणे, त्यांचे केलेले गुणवर्णन मुळातूनच वाचायला हवे. खेडेकर म्हणतात, ‘‘शिवाजीराव देशमुख, आर.आर. पाटील, पतंगराव कदम हे व इतर सर्वच मराठा नेते आजही शिवरायांना ‘अक्करमासे’ मानतात. शिवरायांची बदनामी होण्यास जास्त हातभार यांनीच लावला आहे.’’ (पृ.३०) बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसेपाटील यांच्यावरही खेडेकरांच्या या पुस्तकात प्रखर टीका आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतचा पुढील उल्लेख एक नमुना म्हणून बघता येईल. ‘‘विधिमंडळातील शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी स्वत:च्या घरचा कार्यक्रम असल्यासारखी स्वतची जाहिरात केली. हे सर्व पाहिल्यावर शिवरायांच्या ऐवजी हर्षवर्धन पाटील यांच्याच पुतळ्याचे अनावरण विधानभवनात करणे योग्य झाले असते, असे सर्वच पाहुण्यांसह उपस्थित हजारो शिवप्रेमी रयतेस वाटले. एवढा निर्लज्जपणा पोसणारे आमचे नेते.’’ (पृ.२७) खेडेकर या शब्दांत पाटलांवर तुटून पडतात. पाटलांनी त्यांना केलेल्या आजवरच्या मदतीची अशा प्रकारे ते परतफेड करतात!
‘‘शिवाजी हे सार्वजनिक चावडीसारखे झाले आहेत. फायद्यासाठी प्रत्येकाचेच, पण करण्यासाठी कोणाचेच नाहीत.’’ (पृ.२९) अशी तक्रार करून खेडेकर विधिमंडळावर हल्ला करताना राज्याच्या विधिमंडळानेच शिवरायांचा घोर अपमान केलेला आहे असा आरोप करतात. ते म्हणतात, ‘‘महाराष्ट्राचे विधिमंडळ व स्वत: महाराष्ट्र शासनच शिवरायांच्या बदनामीत सहभागी आहेत. हा बेशरमपणाचा कळस आहे. असे विधानमंडळ व शासन संपवण्यासाठी शिवप्रेमींनी विचार करून कृती करावी.’’ (पृ.२९, ३०) खेडेकर विधिमंडळाविरुद्ध दंड थोपटतात आणि थेट आव्हान देतात, ‘‘विधिमंडळाने माझ्यावर हक्क भंग टाकावा.’’ (पृ.२९) महाराष्ट्र विधिमंडळ हे आव्हान स्वीकारेल काय? असा सामान्यांचा प्रश्न आहे. सार्वभौम विधिमंडळाची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा खेडेकरांना ‘वरदहस्त’ असल्याचे बोलले जाते. तशी लोकभावना आणि मीडियात चर्चा आहे. यासंबंधात काही बिघाड किंवा तणाव निर्माण झाला आहे काय हे समजायला मार्ग नाही. कदाचित ‘कात्रज घाट पॉलिसी’ही असेल. या पुस्तकात आर. आर. पाटील यांचे वाभाडे काढण्यात आलेले आहेत. ‘‘दंगा व जाळपोळ केल्याशिवाय पोलीसही समाजाशी चांगुलपणाने वागत नाहीत. त्यांना लाथा घालणाऱ्यासमोरच मराठा पोलीस माथा टेकतात. मराठा पोलीस अधिकारी अत्यंत खोटे वागतात. मराठा पोलीस कार्यकर्त्यांचा विश्वासघात करतात. अत्यंत घातक व फसवा माणूस एचएमव्ही पोपटलाल आर. आर. पाटील आहे. गाडगेबाबांचा फसवा चेहरा वापरून सर्वच फसव्या व असामाजिक भानगडीत एचएमव्ही पोपटलाल आर. आर. पाटील अग्रेसर आहे. एक नंबरचा ढोंगी माणूस याला साथ देऊन मराठा समाजाचे अनंत नुकसान करणारे मराठा पोलीस मराठा समाजाचे सर्वात मोठे शत्रू आहेत.’’ (पृ.२२, २३) अशी आगपाखड करून खेडेकर म्हणतात, ‘‘हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट येथे जेम्स लेन प्रकरणात सरकार पराभूत होण्यास एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे पोपटलाल आर. आर. पाटील. अशा ढोंगी आर. आर.सारख्या नालायकांना आम्ही भरचौकात नंगे करू शकत नाही, हीच मराठा समाजाची खरी खंत आहे.’’ (पृ.१३) आर. आर. पाटील व सांगली जिल्ह्य़ातील इतर मंत्र्यांवर खेडेकरांचा आणखी एक गंभीर आरोप आहे, ‘‘आय.एस.आय., तालिबान, नक्षलवादी, माओवादी, एलटीटीई अशा क्रूर संघटनांपेक्षा महाभयानक असणाऱ्या, ज्याच्यावर तडीपारीचे अनेक गुन्हे आहेत अशा सांगलीच्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडेला आर. आर. पाटील गुरू मानतात. सांगलीतील सर्वच प्रमुख मंत्री, राज्यकर्ते, श्रीमंत व सत्ताधीश मराठे जाहीरपणे भिडेच्या पायावर डोके ठेवतात.’’ (पृ.५३) आर. आर. पाटील यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे उपकार आहेत अशी जाहीर भूमिका खेडेकर घेतात. ते म्हणतात, ‘‘संभाजी ब्रिगेडने आबांना जागतिक उंची दिली. भांडारकरला अज्ञानातून भेट देऊन झालेली चूक आबांनी पुढे जमेल तशी सुधारली आणि महाराष्ट्रात व केंद्रात शासनव्यवस्थेत वाटेकरी झाले. हे त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे उपकार आहेत.’’ (प्रसारमाध्यमातील दहशतवाद, पृ.१५) हे सगळेच आरोप अतिशय गंभीर आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर ते करण्यात आलेले असल्याने त्याबाबतची वस्तुस्थिती जनतेला कळेल काय?
महाराष्ट्रात मराठा व कुणबी समाजाची एकत्रित लोकसंख्या ३० ते ३१ टक्के असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोलाचे योगदान आहे. या कर्तबगार समाजाचे प्रबोधन करण्यासाठी कोणी पुढे येत असेल आणि त्यांना आपले सहकार्य हवे असेल तर ते देऊ केले पाहिजे या भावनेने मी स्वत: गेली अनेक वर्षे खेडेकरांच्या संघटनांच्या स्टेजवर गेलो आहे. ‘जातीयवादी संघटनांच्या कार्यक्रमाला जाऊ नये’ अशी भूमिका असूनही ‘मराठा समाजाचे प्रबोधन महाराष्ट्राच्या भल्यासाठी अनिवार्य असल्याच्या भावनेपोटी’ मी हा अपवाद केलेला होता. त्यापायी पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंत आणि नेत्यांकडून बोलणीही खाल्ली होती. मात्र मी या संघटनांचा किंवा वामन मेश्रामांच्या बामसेफचा कधीही सदस्य नव्हतो. त्यांच्या संघटनात्मक कामकाजात माझा कधीही सहभाग नव्हता. या मंडळींनी कधी प्रवासखर्च दिला तर ठीक, नाहीतर स्वखर्चाने मी त्यांच्यासाठी व्याख्याने दिली आहेत. मानधनाचा तर कधी सवालच नव्हता. मी उदरनिर्वाहासाठी त्यांच्यावर कधीही अवलंबून नव्हतो. अन्यथा लाचार आणि हीनदीन बनावे लागले असते. जसजशी ताकद वाढत गेली तसतसे खेडेकरांचे रूप पालटत गेले. ते आणि मेश्राम एकत्र आले. दोघांचाही खाक्या एकचालकानुवíतत्वाचा. सुलभीकरण, आक्रमकता, प्रेषितपणाचा साक्षात्कार, िथकटँकमधील सहकाऱ्यांना कस्पटासमान मानणे, विचारवंत, अभ्यासकांची मुद्दाम टिंगल करणे याचा या दोघांनी धडाकाच लावला. दादोजी कोंडदेव आणि भांडारकर प्रकरणाच्या प्रसिद्धीची हवा आणि ‘मूलनिवासी नायक’ या वृत्तपत्राची भडक पत्रकारिता यांच्या जोरावर आकाशात भरारी घेणाऱ्या या दोघांनी बहुजन समाजातील ओबीसी समाज घटकांना वाऱ्यावर सोडून द्यायचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाचा विषय ओबीसी-भटके विमुक्त समाजातील कोणीही कार्यकर्ते, अभ्यासकांना विश्वासात न घेता अचानक आणला गेला. आक्रमकपणे हा अजेंडा ‘एकमेव’ म्हणून राबवायला सुरुवात झाली. बहुजन समाजाच्या नावावर मिळालेली राजकीय सत्ता एकाच जातीच्या हाती एकवटलेली असताना, ओबीसी आरक्षणातून ओबीसींच्या ताटात पडलेला पंचायत राज्यातील राजकीय सत्तेचा पहिलावहिला घासही पळविण्याची पद्धतशीर मोहीम आखण्यात आली. सगळे ओबीसी-भटके विमुक्त कार्यकर्ते भयभीत झाले. अशा प्रकारे बहुजनांमध्ये पहिली फूट खेडेकर-मेश्रामांनी पाडली. आरक्षण हा प्रतिनिधित्व देण्याचा, सामाजिक न्यायाचा कार्यक्रम असताना या दोघांनी त्याला ‘गरिबी हटाव’चा कार्यक्रम बनवला. हे वर्तन घटनाविरोधी होते. खेडेकरांच्या शिवराज्य पार्टीने विधानसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांची डिपॉझिटे जप्त झाली. त्यामुळे ‘बहुजन समाज म्हणजे हागणदारी’ अशी टीका खेडेकर करू लागले. बहुजनातले महापंडित शरद पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, लक्ष्मण गायकवाड अशा अनेकांना जाहीरपणे अपमानित करण्यातच त्यांना पराक्रम वाटू लागला. ‘मराठा म्हणजे जे ब्राह्मण नाहीत ते सर्व’ (बहुजन हिताय, पृ. ७) असे म्हणणारे खेडेकर अचानक छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे अशा बहुजन नेत्यांना विषमतावादी, ब्राह्मणांचे हस्तक असे म्हणून हिणवू लागले. सर्व मराठेतरांना टार्गेट करण्याचा सपाटा लावण्यात आला. फुले-आंबेडकरी चळवळ म्हणजेच मराठा सेवा संघ आणि सेवा संघ म्हणजेच चळवळ, असे समीकरण बनविण्यात आले. (बहुजन हिताय, पृ. ८) मराठा व कुणबी, बहुजन, फुले-अांबेडकरवाद हा सगळा आपला मतदारसंघ आहे असे मानणाऱ्या खेडेकरांनी पुढे मराठेतरांचे खच्चीकरण सुरू केले. या मतदारसंघातून संभाव्य स्पर्धकांची हकालपट्टी करण्याचे मनसुबे रचण्यात आले.
मुस्लीम जातीयवादी आणि धर्माध नेत्यांची (मुल्ला मौलवींची) संघपरिवाराशी, िहदुत्ववाद्यांशी युती आहे असे खेडेकरांचे प्रतिपादन आहे. (बहुजन हिताय, पृ. १७) बहुजन िहदूंच्या मनात असुरक्षिततेचे वातावरण तयार करण्याचे काम या दोघांच्या संगनमताने केले जाते असा खेडेकरांचा आरोप आहे. दुसरीकडे आमचा अनुभवही असाच आहे की, खेडेकरांनी ‘सरसकट सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने संघाऐवजी सर्वच ब्राह्मणांना टार्गेट करायला सुरुवात केली. शिवीगाळ, हल्ले आणि दणक्यांचे उदात्तीकरण सुरू झाले आणि तिकडे ब्राह्मण अधिवेशनांची गर्दी वाढू लागली. इकडे चिकित्सा, वादविवाद, चर्चा याऐवजी दमबाजी, अरेरावी, कमरेखालची भाषा यांनाच अग्रक्रम मिळू लागला. अशा स्थितीत या मंडळींच्या कार्यक्रमांना जाणे अशोक राणा, गणेश हलकारे, रावसाहेब कसबे, डॉ. आ. ह. साळुंखे आदींना बंद करणे क्रमप्राप्त झाले. साळुंखे सरांनी तर जाहीरपणे संबंध तोडले. यातून या फॅसिस्ट शक्तींनी बहुजनात स्पष्ट विभाजनच घडवून आणले. ओबीसी-भटके विमुक्त यांना आणि विवेकी मराठा व कुणबी समाजालाही खेडेकर-मेश्रामांपासून फारकत घेणे अनिवार्य बनले. स्वनेतृत्वाच्या प्रस्थापनेसाठी कत्तली व दंगलींचा त्यांचा विद्यमान अजेंडा बघून बहुजन चळवळ अचंबित झाली. त्यांचा आजवरचा हा छुपा अजेंडा आता स्पष्टपणे उघडा पडलाय. शिवधर्म, शिवराज्य पार्टी, भारत मुक्ती मोर्चा यातून राजकीय सत्ता मिळविण्यासाठी आक्रमकता, त्यासाठी कत्तली, दंगलींचे समर्थन असा हा प्रवास सुरू आहे. सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीच्या काळातील पतन ज्यांना माहीत आहे, त्यांनी इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे. असल्या आततायी, अतिरेकी आणि आत्मघातकी डावपेचांनी बहुजन चळवळ बदनाम होते, क्षीण होते हे लक्षात घेतले पाहिजे. बहुजनांचे विभाजन करणारे हे राजकारण नाकारले पाहिजे. फॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी आणि व्यक्तिगत वैमनस्य बाळगणाऱ्या असतात.
खेडेकरांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या २० वर्षांत महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाज हा या फॅसिस्टांचा वेठबिगार बनेल आणि त्यांच्यावर भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.
मार्टीन निमोलर नावाच्या जर्मन कवीची एक मौलिक कविता आहे. हिटलरच्या नाझी सनिकांनी जेव्हा उच्छाद मांडला होता तेव्हाची. निमोलर म्हणतो, ‘‘जेव्हा नाझी कम्युनिस्टांसाठी आले तेव्हा मी शांत राहिलो, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. जेव्हा त्यांनी येऊन समाजवाद्यांना पकडले तेव्हा मी गप्प राहिलो, कारण मी काही समाजवादी नव्हतो. जेव्हा ते कामगार नेत्यांना घेऊन जात होते तेव्हा मी चूप होतो, कारण मी काही कामगार नेता नव्हतो. जेव्हा ते ज्यूसाठी आले तेव्हाही मी चूपच होतो, कारण मी काही ज्यू नव्हतो. जेव्हा ते आले आणि त्यांनी मलाच पकडले तेव्हा माझ्या मदतीला यायला कोणीही शिल्लक नव्हते.’’
तेव्हा अशी वेळ चळवळींवर यायची नसेल तर गडय़ा आपली फुले-आंबेडकरी लोकशाहीच बरी! हिटलर आपल्याला परवडणारा नाही. दुरून डोंगर साजरे! हिटलर हा शुद्ध रक्त, वंशश्रेष्ठत्व व आर्यत्व यांचा पुरस्कर्ता होता. फुले-आंबेडकरी चळवळ प्रामुख्याने स्त्री-शुद्र-अतिशुद्रांची (महिला, ओबीसी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती यांची) आहे. तिला हा वंशश्रेष्ठत्वाचा उच्चवर्णीय ताठा परवडणारा नाही. हिटलर हा संघपरिवाराचा आणि खेडेकरांचाही आदर्श असावा यातच सगळे आले!
harinarke@yahoo.co.in
(लेखक पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक असून ते गेली ३० वर्षे फुले-आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांची या विषयावरील आजवर ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

Monday, August 1, 2011

जातीप्रश्न आणि संवाद


"स्वातंत्र्योत्तर काळातही म्हणजे १९८० सालात मंडल आयोगाची स्थापना होईपर्यंत भारतातील जातिसंघर्षाचं सांस्कृतिक परिमाण ब्राह्मण्यविरोध हेच होतं, राखीव जागा आणि जमिनीचं फेरवाटप हा आर्थिक-सामाजिक कार्यक्रम होता.१९९० नंतर मात्र ब्राह्मणेतर जातिसमूहांच्या एकजूटीची विविध जातनिहाय विभागणी होऊ लागली. हे तुकडीकरण एकविसाव्या शतकात अधिक विस्तारत गेलं. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु होते का, ह्या प्रश्नाची उकल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. ह्या समितीवर फक्त ब्राह्मण आणि मराठे या दोनच जातीच्या विद्वानांची नियुक्ती सरकारने केली अशी टीका महात्मा फुले यांच्या विचाराचे अभ्यासक, हरी नरके यांनी केली. त्यांच्यामते ब्राह्मण आणि मराठे यांच्यासमवेत अन्य जातींच्या विद्वांनांचाही या समितीत समावेश करायला हवा होता. मराठा समाजाला स्ट्रॅटेजिक पाठिंबा आपण देऊ पण सत्तेच्या वाटपात आपण मराठा समाजाशी स्पर्धा करू असंच माळी समाज अर्थातच हरी नरके सांगू पाहात आहेत." --श्री.सुनिल  तांबे{नथुराम विभुती?दादोजी कोंडदेव व्हीलन?}तरुण विचारवंत आणि ख्यातनाम पत्रकार श्री.सुनिल तांबे यांच्या लेखातील ऊतारा वर दिला आहे.माझे मित्र श्री.तांबे हे संयमी आणि सहिष्णु लेखक आहेत.कोणाही लेखकाच्या जातीचा अकारण उल्लेख करणे हे सद्भिरुचिला धरुन आहे असे मानले जात नाही. तांबेंनी मात्र किती सहजपणे माझी जात काढलीय. हेच जर त्यांच्याबाबतीत अन्य कुणी केले असते तर त्यांची प्रतिक्रिया काय राहिली असती?खरे म्हणजे मी ऊपस्थित केलेला प्रश्न त्यांना कळलाच नाही.यानिमित्ताने मी एकुण ३ प्रश्न उपस्थित केले होते.
१]दादोजी कोंडदेव वादात संभाजी ब्रिगेड ही तक्रारदार संस्था असुनही महाराष्ट्र सरकारने सदर समितीवर ब्रिगेडच्या ५ सदस्यांची नेमणुक करणे न्यायतत्वाला धरुन होते काय?जगात कोठेही फिर्यादीलाच न्यायाधिस नेमण्याची पद्धत आहे काय?
२]सदर शाषकिय समितीवर मराठा समाजाचे बहुमत राहील अशी व्यवस्था करणे म्हणजे "म्याच फिक्सिंग" करणेच नव्हते काय?हे सर्वजण ईतिहासकार तरी होते काय?नाही. त्यातील बरेचसे ब्रिगेडचे कार्यकर्ते होते.त्यांची नियुक्ती नैतिकद्रुष्ट्या कितपत उचित होती?
३]राज्यात शेकडो ईतिहासकार असताना सरकारने फक्त मराठा व ब्राह्मण या दोनच समाजातील लोकांची निवड समितीवर करणे हा जातीयवाद नव्हता काय?शिवाजी महाराज आणि दादोजी ज्या दोन समाजांचे होते नेमक्या त्याच दोन समाजातील सदस्यांची नियुक्ती करुन सरकारने या प्रश्नाला जातीय रुप दिले नाही काय?
या तीनही प्रश्नांना बगल देवुन तांबेंनी चर्चा कश्याची करावी हा त्यांचा प्रश्न आहे.मी आयुष्यभर दलित-आदिवासी-भटके-विमुक्त,ओबीसी चळवळीत काम करीत आलो आहे.तांबेंना ते माहित नसते तर एकवेळ ठिक होते.मी कधीही एका जातीपुरती भुमिका घेतलेली नाही.तरीही तांबेंनी असा ऊल्लेख करावा याच्या वेदना झाल्या.
तांबे जातीय ध्रुवीकरणासाठी मंडल आयोगाला जबाबदार धरतात.हाही काही पुरोगामी विचारवंतांचा लाडका सिद्धांत आहे.खरे म्हणजे मंडलवर असे दुषित पुर्वग्रहातुन आणि आकसापोटी लिहिण्याऎवजी कधीतरी खुलेपणाने चर्चा केली पाहिजे.आमची तयारी आहे.प्रश्न आहे तो असा की,आपल्या ठाम मतांना केवळ हट्टीपणाने चिकटुन राहायचे की खुलेपणाने आपले विचार तपासणीसाठी खुले करायचे?

म्हणे चित्रपटांचा परिणाम होतच नाही


श्री.मुकेश माचकर हे ज्येष्ट पत्रकार आहेत.त्यांनी माझ्या फेसबुकवरिल लेखणाची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.त्यांनी माझ्या लेखणातील सामाजिक कळकळ लक्षात न घेता अत्यंत असहिष्णुतेने टिका केलेली आहे. ती करण्याचा त्यांना अधिकारच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण एकमेव आणि घाऊक रखवालदार आहोत असे माणणा-या माचकरांनी माझ्यावरचा राग बिचा-या विचारवंतांवर काढायाची गरज नव्हती."त्यामुळेच ईथे विचारवंतांचाही सुकाळ आहे", "....विचारवंतांनी चिकाटीने हेच काम केले पाहिजे.नाहीतरी त्यांची गरज काय आणि उपयोग तरी काय?" ह्या माचकरांच्या अनाहुत सल्ल्याबद्दल आभार.विचारवंतांबद्दल असुया असायला हरकत नाही.एव्हढे वर्तमानपत्री लिहुनही आपल्याला कोणी विचारवंत मानित नाही याबद्दलची त्यांची खंत अश्याप्रकारे बाहेर पडली हे बरे झाले.यापुढे समाजाने विचारवंत कोणाला मानायचे आणि विचारवंताची समाजाला गरज आहे की नाही याबाबतचा "परवाना"माचकरांकडुन घेतला पाहिजे.विचारवंतांनीही आपले काम काय असते हे समजुन घेण्याची शिकवणी माचकर क्लासला  लावावी.व्याकरण आणि शुद्धलेखनाचे पोलिसिंग १३७ वर्षांपुर्वी विष्णुशास्त्री चिपळुणकर करित असत.ही फौजदारकी आता माचकरांनी स्वताच्या शिरावर घेतलेली दिसते.सामाजिक अद्न्यान,मध्यमवर्गिय तोरा,असहिष्णुता आणि अनुदारता यात ते चिपळुणकरांचे वारस शोभतातच मुळी. ज्यांची नजर आणि अभिरुची ऊच्चभ्रु आहे त्यांना सामाजिक वास्तावातील गुंतागुंत समजणे अवघडच आहे. भारतात प्रत्येक गोष्टीमागे ३ ड्रायव्हींग फ़ोर्स असतात.१,जात.२,वर्ग.३,लिंगभाव. जे ९१ कोटी लोक जातीव्यवस्थेचे बळी आहेत,त्यांच्या नजरेने या प्रश्नाकडे पाहिल्याशिवाय त्याची तिव्रता समजणार नाही.
चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम जे पत्रकार नाकारतात त्यांचीही समाजाला गरज असतेच.जो माझा अन्यत्र् प्रकाशित झालेला लेख माचकरांना झोंबलाय त्यातच मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्पष्ट पुरस्कार केलेला आहे.ते बहुजन समाजाचे शक्तीवर्धक आहे.{हे समजुन घेण्यासाठी मी माचकरांच्या क्लासची शिकवणी लावली नव्हती हे अम्मळ चुकलेच.} घटनेच्या कलम १९ मधील ही तरतुद अनिर्बंध नाही.अनुसुचित जाती,जमातींच्या हिताआड काही येत असेल तर त्याचा विचार होवु शकतो.राज्यघटनेतील कलम १४,१५,१६,व१७ आणि३३९यांची माचकरांना प्राथमिक माहिती असायला हरकत नव्हती. माचकरांच्या या लेखात अंतर्गत विसंगती ईतक्या आहेत की त्य सर्वांवर लिहिणे विस्तारभयास्तव अवघड आहे.लोकांनी काय पाहावे/पाहु नये हेच सेंसोर बोर्ड ठरवते हेही माचकरांना माहित नसावे? ते मान्य असेल तर मग जे सेंसोर ठरवते ते घटनात्मक अश्या आणि सेंसोरपेक्षाही वर असलेल्या राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने ठरवायला ते कसा नकार देवु शकतात?शोषितांच्याबद्दल नफरत हीच ज्यांची ओळख आहे आणि त्याच तो-यात जे वावरतात त्यांच्याकडुन सामाजिक न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

Sunday, July 31, 2011

आरक्षण चित्रपट आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य


"आरक्षण" चित्रपटाच्या निमित्ताने जोर्दार घुसळण चालु आहे.यानिमित्ताने "अभिव्यक्ती स्वातंत्र्य खतरेमे" अशी ओरड काही मंडळींनी सुरु केलेली आहे.आम्ही काहीतरी "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मारेकरी" वगैरे आहोत असा कांगावा सुरु आहे.आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते आहोत हे सर्वप्रथम स्पष्ट करु ईच्छीतो.अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच चर्चा,चिकित्सा,वादविवाद होऊ शकतात आणि त्यातुनच उपेक्षितांचे प्रश्न ऎरणीवर येतात.या चर्चा आमच्या विरोधातील अस्ल्या तरीही आम्ही त्याचे स्वागतच करतो.कारण आम्हाला समाजाच्या प्रबोधनात रस आहे. मुकबधीरपणात नाही.यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे.
१]भारतीय राज्यघटनेच्या मुलभुत अधिकारातील १९{१}[अ]या कलमाद्वारे’भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तथापि ते अनिर्बंध नाही. त्यावर कायदा व सुव्यवस्था.सभ्यता, नितिमत्ता व अनुसुचित जनजातीच्या हितसम्बंधाच्या संरक्षणासाठी निर्बंध घालता येतात.{पाहा: भारतीय संविधान,पान,७}
२]राज्यघटनेच्या मुलभुत अधिकारातील कलम १४,१५,१६,व १७ नुसार,समानता,जातीय भेदभावाला मनाई,समान संधी,आणि अस्प्रुश्यता उच्चाटनाचे हक्क देण्यात आले आहेत.या चित्रपटामुळे जर या देशातील दुबळ्या अश्या ७५ टक्के दलित-ओबीसी लोकांच्या वरिल कलम १४,१५, १६, १७ च्या हक्कांना बाधा येणार असेल तर काय करायचे याचे उत्तर कोण देईल?
३]सेन्सोर बोर्ड जरी सरकारनियुक्त असले तरी त्याच्यापेक्षा न्यायालय वर असते.असेच घटनात्मक अधिकार घटनेच्या कलम ३३९ अन्वये राष्ट्रपतींनी नेमलेल्या "अनुसुचित जाती आयोगाला" आहेत. {पाहा:पान,१०५,१०६}या आयोगाचे अध्यक्ष न्या.पुनिया हे सुप्रिम कोर्टाचे निव्रुत न्यायाधिश आहेत.अनुसुचित जातींच्या कल्याणाला बाधा आणणा-या कोणत्याही गोष्टीला हा आयोग रोखु सकतो.हा आयोग घटनात्मक असल्याने तो सेन्सोरबोर्डाच्या वरचा आहे.त्यामुळे न्या.पुनिया यांनी हा चित्रपट प्रदर्शनपुर्व पाहण्याची केलेली मागणी कशी उडवुन लावता येईल?
४]महाराष्ट्रात "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाची सेन्सोरने रद्द केलेली परवानगी  हायकोर्टाने  दिली होती. याचा अर्थ  न्यायालय हे "समांतर सेन्सोर बोर्ड"आहे असा होत नाही.तद्वतच राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग हे समांतर सेन्सोर ठरत नाही.
५]प्रकाश झा यांच्या यापुर्वीच्या चित्रपटातुन दिसलेली सामाजिक जाणिव प्रगत नाही.त्यांचे नायक उच्च वर्णीय असतात आणि खलनायक नेमके मागासवर्गिय असे का बरे?
६]सेन्सोर बोर्डावरील मंडळींची सामाजिक जाणिव काय प्रतीची असते? श्रीमती आशा पारेख,श्रीमती शर्मिला टागोर या अभिनेत्री म्हणुन मोठ्या असतीलही,परंतु त्यांना जातीव्यवस्था,आरक्षण,सामाजिक न्याय यावरिल तद्न्य मानायला आम्ही तयार नाही.
७]आरक्षणच्या प्रति नफरत असलेल्या सेन्सोर बोर्ड,प्रकाश झा,अमिताभ बच्चन,सैफ अली खान वगैरें ऊच्चभ्रुंच्या हातात ९१ कोटी मागासवर्गियांचे हित सोपवावे असे आम्हाला वाटत नाही.
हे लोक म्हणजे कोणी समाजशात्रद्न्य,किंवा समाजहितैशी नव्हेत.
८]त्यांचा गल्लाभरुपणा ९१ कोटी लोकांच्यापेक्षा ज्यांना मोठा वाटतो त्यांना नम्र आवाहन आहे की,या देशात आधीच जात,धर्म,भाषा,प्रांत अश्या अनेक मुद्यांवरुन मोठी फुट आहे.आरक्षणाला विरोध करण्यासाठी अनेक दंगली झालेल्या असुन त्यात हजारो लोकांचे जिव गेलेले आहेत. तेव्हा सिनेमा लागु तर द्या,मग बघु, सिनेमांचा कुठे काय परिणाम होतो? तुम्ही प्रतिसिनेमा काढुन ऊत्तर द्या, आरक्षणविरोधी मते मांडायचा अधिकार नाही काय?वगैरे युक्तीवाद तकलादु  आहेत.ह्या सिनेमातुन जर आरक्षण विरोधी लोकांना कोलित मिळाले तर त्याचे परिणाम भिषण असतील.शिवाय बहुजनातही काही फुटीर आणि द्वेषासाठी टपलेल्या अतिरेकी शक्ती आहेत.त्यांना खतपाणी मिळेल.अभिसरणवादी शक्ती कमकुवत होतील.ऊच्चवर्णियांविरुद्ध वेगाने तेढ वाढते आहे.दलित आदिवासी-ओबीसींच्या सहनशक्तीला फार ताणु नका.विषाची परिक्षा घ्यावीच का?
९] "सामाजिक सौहार्द"सर्वोपरी महत्वाचे आहे.ते जपले पाहिजे.ते पणाला लावुन ज्यांना "निखळ अभिव्यक्ती"स्वातंत्र्यासाठी काही करयचे असेल तर त्यांनी आरक्षण विरोधी चर्चा घडवाव्यात.त्यांनी लेख,पुस्तके, सभा,संमेलने,चर्चासत्रे,परिषदा घ्याव्यात.परंतु सिनेमा हे फार प्रभावी,संवेदनशील रसायन आहे.क्रुपाकरुन या देशाची सामाजिक विण उसवु नका.

Friday, July 29, 2011

फ्यासिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन- भाग १


५ ऑगस्ट २०११
ताळेबंद
प्रा. हरी नरके
भांडारकर इन्स्टिटय़ूटवरील हल्ला, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत यांच्यावरील हल्ले, पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविणे, रायगडावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे अांदोलन इत्यादींमुळे पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते प्रसिद्धीच्या झोतात आले. एका ओबीसी नेत्याने खुल्या प्रवर्गातील आणि तेही सत्ताधारी असलेल्या जातीची संघटना उभारण्याची, ती सक्षमपणे चालविण्याची आणि तिला एक ‘दादा’ संघटना म्हणून नावारूपाला आणण्याची ही घटना समाजशास्त्रीयदृष्टय़ा लक्षणीय होय. खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.
महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनासाठी झटणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यांचे मोहोळ मानले जाते. राज्यात फुले-आंबेडकरी विचारांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. सामाजिक न्याय, लोकप्रबोधन, अत्याचार निवारण, शिक्षण, पुनर्वसन आदी क्षेत्रात या संघटना काम करतात. बहुजन समाजातील नानाविध प्रश्न ऐरणीवर आणून काम करणाऱ्या या संघटना विविध समाजघटकांत पाय रोवून उभ्या आहेत. या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी संघ आदींचा बराच बोलबाला आहे.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर पुणे पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते शाम सातपुते यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीवरून हा एफ.आय.आर. दाखल झाला आहे.
खेडेकरांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकात त्यांनी जातीय दंगली व कत्तलींना चिथावणी देणारे लेखन केल्याबद्दल कलम १५३(अ), ५०५(२) व ३४ अन्वये खेडेकर, त्यांचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या कलमाखाली एकत्रित मिळून ७ वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. ‘‘विविध गटात तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या किंवा दुष्टाव्याच्या भावना वाढविल्यास’’ १५३(अ) खाली आणि ‘‘अफवा, भयप्रद वृत्त याद्वारे निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषक गट किंवा जाती, समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची, द्वेषाची, दुष्टाव्याची निर्मिती होण्याची शक्यता असेल’’ तर कलम ५०५(२) खाली गुन्हा दाखल केला जातो.
खेडेकरांचे हे पुस्तक सुमारे ७ महिन्यांपूर्वी (१३ नोव्हे. २०१०) प्रकाशित झाले आहे. जिजाऊ प्रकाशनाचे हे पुस्तक ५५ पानांचे असून त्याची किंमत २५ रुपये आहे. जिजाऊ प्रकाशनाचे हे १५० वे पुस्तक असून खेडेकरांनी आजवर सुमारे ५० पुस्तके किंवा छोटय़ा-छोटय़ा पुस्तिका लिहिलेल्या आहेत.
खेडेकर हे बहुजन समाजातील बाहुबली नेते असून आक्रमक वक्ते आहेत. ते उत्तम संघटक आहेत. त्यांच्यामागे मराठा व कुणबी तरुणांचा मोठा संच आहे. त्यांच्या संघटनेला २० वर्षे पूर्ण झाली असून संघटनेचे काम वेगवेगळ्या ३१ कक्षांद्वारे (सेल) चालते. विदर्भ, मराठवाडय़ात या संघटनेचा चांगला जोर आहे. भांडारकर इन्स्टिटय़ूटवरील हल्ला, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत यांच्यावरील हल्ले, पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविणे, रायगडावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे अांदोलन इत्यादींमुळे ते आणि त्यांचे कार्यकर्ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. या संघटनांचा राज्यात फार मोठा दरारा आहे. त्यांच्या विरोधात ‘ब्र’ उच्चारायलाही प्रसार माध्यमातील दिग्गज आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी घाबरतात. खेडेकर शिवधर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत. मुस्लीम खलि ज्याप्रमाणे धर्मसत्ता आणि राजसत्तेचे एकमेव सूत्रधार असत, त्याप्रमाणे सत्ताधारी जातींचे किंगमेकर आणि शिवधर्माचे शंकराचार्य बनण्याची खेडेकरांची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. खेडेकरांच्या संघटनेतील ‘सेवासंघ’ या शब्दाचा अर्थ सामाजिक सेवा अथवा सामाजिक कार्य असा नसून मुळात ती सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची एकजातीय ‘युनियन’ आहे. मराठा समाजातील सरकारी नोकरांना बदली, बढती, खाते अंतर्गत चौकशी किंवा शिक्षा या कामी मदत किंवा संरक्षण पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. संघटनेला कर्मचाऱ्यांकडून फार मोठे आíथक पाठबळ दिले जाते. खेडेकर त्यासाठी ‘मराठा टॅक्स’ घेतात, असे त्यांनी त्यांच्याच एका पुस्तकात नमूद केले आहे. (पाहा- कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृष्ठ क्र. १७) अन्य मार्गानीही पसा उभा केला जातो. सरकारी नोकरांच्या अनेक संघटना असल्या तरी थेट जातीच्या नावावर कार्यरत असलेली राज्यातील ही पहिली आणि एकमेव संघटना असावी. खेडेकर स्वत: कार्यकारी अभियंता या पदावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातून चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेले आहेत. खेडेकरांना सत्ताधाऱ्यांचा थेट वरदहस्त असल्याची लोकभावना आहे. त्यांच्या ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या एका अंकात त्यांनी आपल्या ‘गॉडफादर्सचा’ ऋणनिर्देशही केलेला होता. खेडेकर स्वत: जन्माने कुणबी समाजाचे आहेत. हा समाज ओ.बी.सी.मध्ये आहे. त्यांच्या पत्नी सौ. रेखाताई भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या १५ वर्षे आमदार होत्या. एका ओबीसी नेत्याने खुल्या प्रवर्गातील आणि तेही सत्ताधारी असलेल्या जातीची संघटना उभारण्याची, ती सक्षमपणे चालविण्याची आणि तिला एक ‘दादा’ संघटना म्हणून नावारूपाला आणण्याची ही घटना समाजशास्त्रीयदृष्टय़ा लक्षणीय होय. त्यातून खेडेकरांचे नेतृत्व आक्रमक, महत्त्वाकांक्षी, जिगरबाज आणि बलदंड असल्याची साक्ष पटते. अशा खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी (अकाऊंटेबल) नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.
ते आणि त्यांचे कार्यकर्ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. या संघटनांचा राज्यात फार मोठा दरारा आहे. त्यांच्या विरोधात ‘ब्र’ उच्चारायलाही प्रसार माध्यमातील दिग्गज आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी घाबरतात. खेडेकर शिवधर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत.
खेडेकर आपल्या पुस्तकात स्पष्टपणे म्हणतात, ‘‘हिटलरशाहीप्रमाणेच प्रतिज्ञा मराठा व बहुजनांच्या मनावर कोरावी लागेल.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ५५) अशा प्रकारे आपला आदर्श हिटलर असल्याची जाहीर कबुली ते देतात. ज्यूंच्या कत्तली करणारा हिटलर हा त्यांचा आदर्श असल्यामुळेच ते म्हणतात, ‘‘विचारांच्या लढाईला दणक्यांची जोड पाहिजेच, म्हणून भांडारकर तो झाँकी है! या संभाजी ब्रिगेडने दिलेल्या नाऱ्याचा अर्थ समजून घ्या.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ३१) खेडेकर पुढे असेही म्हणतात, ‘‘लोकसत्ताचे कार्यालय फोडणे, तोडणे याचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो.’’ (प्रसार माध्यमातील दहशतवाद, पृ. ११) आपण फुले-आंबेडकरवादी असल्याचाही दावा खेडेकर करीत असतात. (शिवधर्म प्रेरणा व ब्राह्मण जेम्स लेन, पृ. १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात वावरलेल्या दादासाहेब रूपवते यांचे वकील पुत्र अ‍ॅड. संघराज रूपवते यांच्याबद्दल खेडेकर म्हणतात, ‘‘अ‍ॅड. संघराज रूपवतेंनी आंबेडकरी चळवळ हे नाव वापरून आंबेडकरांच्या मोठेपणाला आपल्या विकृतीची झालर लावू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक व जागतिक व्यक्तीत्त्व आहे. त्यांचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे. ते केवळ महार व नवबौद्धांच्याच मालकीसाठी नाही. मराठा सेवा संघाचे कार्यही आंबेडकरवादी आहे. बहुजन विघटनाला वा विकृतीला आंबेडकरांनी मान्यता दिलेली नाही. अ‍ॅॅड. रूपवते यांनी आपली विकृती बाबासाहेबांच्या वटवृक्षाखाली लपवू नये. त्यांनी जेम्स लेनचे हे पुस्तक पूर्णपणे वाचले आहे. पारायणे केली आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायास व आदर्शास स्मरून कोणते अगाध ज्ञान प्राप्त केले त्याचा हिशोब आम्हा आंबेडकरवाद्यांसमोर प्रामाणिकपणे मांडावा.’’ (शिवधर्म प्रेरणा, पृ.११, १२) यातून ते आणि त्यांची संघटना आंबेडकरवादी असल्याचा खेडेकरांचा दावा स्पष्ट होतो. खेडेकर एक व्यक्ती म्हणून व त्यांची संघटना एक स्वतंत्र संघटना म्हणून काय करतात याच्याशी आम्हाला फारसे देणेघेणे नाही. मात्र अांबेडकरवादी खेडेकर आणि अांबेडकरवादी मराठा सेवा संघ जर काही लिहीत असतील, कृती करीत असतील आणि त्या जर अांबेडकरवादाच्या विपरीत असतील तर त्याची दखल घेऊन त्याचे अॉडिट करणे आम्हा चळवळवाल्यांचे कर्तव्य बनते.
हिटलर आणि फुले-आंबेडकर यांना एका पंक्तीत बसविणारे खेडेकर खैरलांजी हत्याकांडाबाबत म्हणतात, ‘‘गावागावात मराठा समाजच दलितांवर अत्याचार करतो, असे चित्र निर्माण करण्यासाठी भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी प्रकरणाला अत्यंत विकृत स्वरूप दिले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या धंदेवाईक एनजीओंनी हे प्रकरण जाणीवपूर्वक पेटविले. त्यातून मराठा व दलित हे एकमेकांचे शत्रू म्हणून उभे करण्यात ब्राह्मणी रामदासी यंत्रणा यशस्वी झाली.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४९) खैरलांजीत भय्यालाल भोतमांगे या बौद्धाचा वंशसंहार झाला. त्यांची दोन तरणीबांड मुले, एक मुलगी व पत्नी यांना जमावाने क्रूरपणे ठार मारले. सारा देश ज्या घटनेने हादरला, संपूर्ण बौद्धजगत ज्या घटनेमुळे संतप्त झाले, जगभरचे मानवतावादी न्यायासाठी पुढे आले, त्या अमानुष घटनेकडे पाहण्याचा खेडेकरांचा हा संवेदनाहीन दृष्टिकोन फुले-आंबेडकरवादी आहे काय?
भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख खेडेकर आपल्या ‘बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात पुढील जातीवाचक शब्दात करतात, ‘‘महार समाजाने ब्रिटिशांना मदत केली याचा प्रचंड राग बामणांना आहे. पुढे इंग्रज भारतातून गेल्यावर ब्राम्हणांनी गांधी हत्या घडवून आणली. परंतु डॉ. आंबेडकर या महाराने देशाची समतावादी राज्यघटना लिहून ब्राह्मणाच्या हक्क अधिकारावर गंडांतर आणले. म्हणून ब्राह्मणांनी डॉ. आंबेडकरांची हत्या घडवून आणली.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ४०) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम जातीवाचक उल्लेख करण्याची काय गरज होती तेच कळत नाही.
मराठा समाजातील सरकारी नोकरांना बदली, बढती, खाते अंतर्गत चौकशी किंवा शिक्षा या कामी मदत किंवा संरक्षण पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. संघटनेला कर्मचाऱ्यांकडून फार मोठे आíथक पाठबळ दिले जाते. खेडेकर त्यासाठी ‘मराठा टॅक्स’ घेतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना बनविण्यासाठी रक्ताचे पाणी केले. त्यांच्या अपार परिश्रम, विद्वत्ता, तळमळ आणि त्यागातून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर आधारलेली घटना देशाला मिळाली. हजारो वर्षे लिहिण्या-वाचण्याची व बोलण्याची बंदी असलेला बहुजन समाजघटनेच्या कलम १९ मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्याने जागतिक भरारी घेऊ लागला. लोकशाही, शांततामय सहजीवन आणि बुद्धाचा परिवर्तनाचा मार्ग बाबासाहेबांनी दिला. चर्चा आणि चिकित्सा यामुळेच दलित, उपेक्षित, वंचितांचा विकास होऊ शकतो, हा बाबासाहेबांचा विश्वास होता. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय चर्चा होते तेव्हा तेव्हा त्या चर्चेचा बहुजनांना लाभच होतो असा अनुभव आहे. उदा. मंडल आयोगाच्या विरोधात रान पेटविले गेले. नामांतर, रीडल्स, उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण, जातवार जनगणना यांना विरोध झाला. पण महाचर्चा झडल्या. त्यातून बहुजनांमध्ये जागृतीच्या लाटा उसळल्या. चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात. ते म्हणतात, ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे समाज व्यवस्था नाकारणे, देश व गावगाडा नाकारणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न स्त्री-पुरुष एकत्र येऊन संभोग क्रीडा करणे अशा बाबीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही मागणी म्हणजे राज्यघटना रद्द ठरवून पुन्हा मनुस्मृतीच लागू करावी या प्रकारची आहे.’’ ( शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४, ८) डॉ. आंबेडकरांच्या या लाडक्या कलमाविरुद्ध कुऱ्हाड चालवणारे खेडेकर ‘आंबेडकरवादी’ असल्याचे सांगत असतील तर त्यांची कथनी आणि करणी यातील विसंगती चळवळीने ओळखली पाहिजे. मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले होते, म्हणूनच ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भारतीय घटनेचे निर्माते असलेले बाबासाहेब स्वीकारणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच, तथापि त्याचा अतिरेक टाळावा असे खेडेकरांनी म्हटले असते तर समजण्याजोगे होते.
चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात.
राज्यघटनेच्या कलम १७ द्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. हजारो वर्षे अस्पृश्यांना अमानवी जीवन जगावे लागले. अन्याय, अत्याचार आणि अपमानाचे चटके सोसावे लागले. कोणीही फुले-आंबेडकरवादी कोणत्याही स्वरूपाच्या अस्पृश्यतेचे समर्थन करूच शकत नाही. खेडेकर आणि त्यांनी स्थापन केलेला ‘शिवराज्य पार्टी’ हा राजकीय पक्ष अस्पृश्यतेचे उघडपणे समर्थन करतात. ते म्हणतात, ‘‘ब्राह्मणांनी १०० वर्ष अस्पृश्य म्हणून जगावे. बहुजन समाज ब्राह्मणांचा विटाळ पाळेल. विज्ञान युगात हे अमानवी आहे, पण न्यायाचे आहे. ५० वर्षे आमचे उष्टे खा. ब्राह्मणांनी बहुजनांना सुमारे ५००० वर्षे झोडपले. आम्हाला ५०० वर्षे तरी झोडपू द्या.’’ (बहुजनांच्या सत्तातरांचा संघर्ष, पृ. ३६) ही मांडणी सनसनाटी आणि चटकदार असली तरी बुद्ध, कबीर, फुले, बाबासाहेब यांच्या विचारात ती बसणारी नाही. दंगली, कत्तली, अस्पृश्यता, विटाळ यांना आधुनिक भारतीय समाजाने थारा देता कामा नये. हा अतिरेकी, दहशतवादी मार्ग बहुजन तरुणांची माथी भडकावून त्यांना पोलिसांच्या आणि तुरुंगाच्या सापळ्यात अडकवणारा मार्ग आहे. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने त्याच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांची बदनामी केली आहे. त्याच्या या दुष्टाव्यामुळे सारेच भारतीय दुखावले गेलेत. सर्व भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या या नतद्रष्ट माणसाला खेडेकरांनी त्यांचे दादोजी कोंडदेवांवरील पुस्तक अर्पण केले आहे. खेडेकरांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये जेम्स लेनचे आभार मानलेले आहेत, हा प्रकार म्हणजे भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. मधुकर रामटेके, संजय सोनवणी, भूपाल पटवर्धन आणि हरी नरके यांनी श्याम सातपुतेंना साथ द्यायचे ठरवले. १८ मे २०११ रोजी आंबेडकरवादी चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते अशोक धिवरे, सहआयुक्त, पुणे पोलीस यांना भेटून लेखी अर्ज व खेडेकरांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकाची प्रत सादर केली. पोलिसांनी योग्य ती छाननी आणि शहानिशा करून सुमारे ३ आठवडय़ांनी खेडेकरांवर गुन्हा दाखल केला. ‘‘प्रशिक्षित मराठा युवकांनी पुढाकार घेऊन देशात धार्मिक व जातीय दंगली घडवून आणल्या पाहिजेत, तरच समाजात सुधारणा, क्रांती व परिवर्तन शक्य आहे. हिटलरशाहीप्रमाणेच ब्राह्मण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा कोरावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापून वा जाळून मारावेच लागतील. महाराष्ट्रासह भारत देश ‘निब्र्राह्मण’ करावा लागेल. हेच खरे शिवप्रेम, हेच खरे शिवकार्य. आज छत्रपती शिवराय पुन्हा आल्यास हेच कार्य करतील.’’ (पृ. ५४, ५५) असा थेट चिथावणीखोर मजकूर खेडेकरांनी लिहिलेला आहे.
२० वर्षांत प्रथमच खेडेकरांना संघटनांतर्गत समर्थक उरलेला नाही. त्यांचे सर्व सहकारी या लेखनाचा निषेध करीत आहेत. संघटनेत उभी फूट पडण्याच्या मार्गावर आहे. जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवधर्म यांना खतपाणी घालून वाढविले आहे. बामसेफचे वामन मेश्राम आणि खेडेकर यांच्यापासून डॉ. साळुंखे यांना दूर का व्हावे लागले, याचे आत्मपरीक्षण कधी तरी त्या दोघांनी केले पाहिजे. नेत्यांच्या सूरात सूर मिसळूनच बोला, नाही तर शत्रू ठरविले जाईल ही वृत्ती अभ्यासकांना कशी मानवेल? या संघटनांचे ‘दै. मूलनिवासी नायक’ नावाचे मुखपत्र चालविले जाते. त्यात गेली २ वर्षे प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. विलास वाघ, प्रा. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, प्रा. दत्ता भगत, उत्तम कांबळे, नामदेव ढसाळ, डॉ. सुखदेव थोरात, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राजा ढाले, जोगेंद्र कवाडे, छगन भुजबळ, नागनाथ कोतापल्ले, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, य. दि. फडके, भालचंद्र फडके, गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर, बाळकृष्ण रेणके, डॉ. सदानंद मोरे, प्रा. आ. ह. साळुंखे, प्रा. उषा वाघ, प्रा. अंजली आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर आणि इतर अनेकांविरुद्ध मोहीम उघडण्यात आल्या. अत्यंत भडक, धादांत खोटय़ा, चिथावणीखोर आणि विकृत हेडलाइन्स देण्यात आल्या. पानभर मजकूर, अग्रलेख, लेख यांचा भडिमारच करण्यात आला. सगळे वृत्तपत्रीय संकेत पायदळी तुडवून पुन्हा-पुन्हा एकतर्फी अर्धसत्य मजकुरांचा मारा करण्यात आला. कोणाचाही खुलासा छापण्यात आला नाही. फॅॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी तसेच व्यक्तिगत वैमनस्य करणाऱ्या असतात, याचा प्रत्यक्ष अनुभव चळवळीतील लोकांना येत गेला. डिवचणाऱ्यांनी डिवचत रहायचे आणि डिवचले जाणाऱ्यांनी गप्प रहावे, अशी अपेक्षा बाळगायची हा प्रकारच क्रूरतेच्या पातळीवर जाणारा आहे. ही कोंडी आणि हे अपमानकारक डिवचणे किती काळ पचवून घ्यायचे? पुस्तिका, पुस्तके, प्रचारपत्रके, उस्मानाबाद, अमरावती, नाशिक येथील खोटय़ा पोलीस तक्रारी यांचा उच्छाद मांडण्यात आला. शेवटी चळवळीतील लोकांच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात. वारंवार विनवणी करूनही हा भडिमार थांबला नाही. अत्यंत गलिच्छ पत्रे पाठवून आणि खेडेकरांच्या फेसबुकवरील ‘शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच’च्या माध्यमातून बदनामी, धमक्या आणि शिवीगाळीचा वर्षांव चालूच राहिला. शेवटी भारतीय राज्यघटनेने चळवळीतील लोकांनाही आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे.
खेडेकर म्हणतात, ‘‘महाराजांनी रामदासांचे सुमारे सहाशे ब्राह्मण शिवराज्याभिषेकास विरोध करण्यासाठी आले असता उभे कापून काढले. महाराजांनी गोळीबाराचा हुकूम फर्मावला. पटापट शेपाचशे मुडदे पडले. रामदासी संपले. रस्ता मोकळा झाला. राज्याभिषेक समारंभ ब्राह्मण संपल्यावर निर्वघ्निपणे पार पडला.’’
चळवळीतील संशोधन आणि साहित्य राजरोसपणे स्वत:च्या नावावर छापायचे, इतरांना सरसकट शिवराय- फुले- शाहू- अांबेडकर- अण्णाभाऊ विरोधी ठरवायचे, अनुयायांकरवी धाकदपटशा दाखवून मनस्ताप द्यायचा, रात्रीबेरात्री फोनवर धमक्या, भाषणांचे विकृतीकरण आणि वैयक्तिक चारित्र्यहनन करून अपमानित करायचे, छळायचे हे फुले-अांबेडकरी मार्ग आहेत काय? या वर्तनामागे एक तत्त्वज्ञान आहे. खेडेकर त्यांच्या ‘आपली माणसं अशी का वागतात?’ या पुस्तकात म्हणतात, ‘‘नेता हाताबाहेर जातो, असे वाटल्यास जवळचे जपून ठेवलेले त्याचे विरोधातील ‘शिवअस्त्र’ काढावे. सरळसरळ त्याला ‘ब्लॅकमेल’ करून खुंटय़ाला बांधून ठेवावे.’’ (पृ. २७) ब्लॅकमेिलगचे शस्त्र हे फुले अांबेडकरी विचारधारेत बसते काय? चळवळी आणि अंडरवर्ल्ड यात काही फरक असणार की नाही? ‘हुजरेगिरी’ आणि ‘चमचेगिरी’ हा चळवळीचाच भाग समजावा, असे लिहिण्यापर्यंत ज्यांची मजल जाते त्यांचा अध:पात कोण थांबवणार? (आपली माणसं, पृ. २७) चळवळीतील सहकारी काही चिकित्सा करायला लागला की त्याला ब्राह्मणांचा हस्तक, दलाल, गद्दार अशा ठेवणीतल्या शिव्या देऊन त्याचे तोंड बंद करायचा प्रकार केला जातो. खेडेकर आणि मूलनिवासी नायकचे संपादक यांच्या लेखणीने सगळे ताळतंत्रच सोडले आहे. इतिहासाची मोडतोड करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. उच्चवर्णीय इतिहासकारांनी गाय मारली म्हणून बहुजनांनी वासरू मारले पाहिजे काय? खेडेकर विरोधी छावणीच्या लेखनामागील तत्त्वज्ञान उलगडवून दाखवताना म्हणतात, ‘‘मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार एकच बाब सतत सांगत राहिल्यास ती खरी वाटते. (गोबेल्स तंत्र) खोटी गोष्ट भावनेला जोडून सांगितल्यास ती खरी वाटते.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. १०) स्वत: खेडेकर या तंत्राचाच तर वापर करीत असतात.
खेडेकर म्हणतात, ‘‘महाराजांनी रामदासांचे सुमारे सहाशे ब्राह्मण शिवराज्याभिषेकास विरोध करण्यासाठी आले असता उभे कापून काढले. महाराजांनी गोळीबाराचा हुकूम फर्मावला. पटापट शेपाचशे मुडदे पडले. रामदासी संपले. रस्ता मोकळा झाला. राज्याभिषेक समारंभ ब्राह्मण संपल्यावर निर्वघ्निपणे पार पडला.’’ (‘आपली माणसं’ अशी का वागतात? पृ. १७) ते पुढे म्हणतात, ‘‘रामदासाने आदिलशहासमोर शपथ घेतल्याप्रमाणे जिजाऊ, शिवराय, संभाजी व राजाराम यांचे खून केले.’’ (महाराज माफ करा, पृ. २५) ‘‘श्रीकृष्ण हा स्त्रीउद्धारक होता.. श्रीकृष्ण हा समतेचे, न्यायाचे प्रतीक आहे. तर विष्णू हा विषमतेचे, अन्यायाचे प्रतीक. श्रीकृष्ण बहुजनांचा तर विष्णू ब्राह्मणांचा! जातिनिर्मूलनासाठी श्रीकृष्णाने सर्व जातबांधवांच्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला तयार केला’’ (मराठय़ांचे रामदासीकरण, पृ. १९) असे खेडेकरांचे संशोधन आहे. रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण लिहिणाऱ्या आणि रामकृष्णांचे गौडबंगाल उलगडून दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी खेडेकरांची ही मते काडीमात्र जुळत नाहीत. किंबहुना ती पूर्णपणे विरोधात जातात. तरीही खेडेकर आंबेडकरवादी आहेत असे कसे म्हणायचे? शिवरायांनाही वेठीला धरताना शिवरायांच्या तोंडी ते चक्क काल्पनिक मजकूर घालतात. ते म्हणतात, ‘‘शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टाने महाराजांना प्रायश्चित्त घेण्यासाठी यज्ञ करावा लागेल असे सांगितले. तेव्हा महाराजांना त्यांनी प्रत्येक ब्रह्महत्येमागे आठ हजार होन दक्षिणा मागितली. महाराज म्हणाले, ‘ब्रह्महत्या म्हणून प्रत्येकी आठ हजार होन द्यायला मी तयार आहे. पण एक करा, सध्या जिवंत असलेल्या भटांचीही मोजणी करा, त्यांनाही संपवून टाकू. त्याबद्दल प्रत्येकी आठ हजार होन देऊन टाकू. गागाभट्ट चरकला. महाराजांचे हे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी शिवभक्तांवर येऊन पडली आहे. त्यासाठी शिवभक्तांनी तयार राहावे.’’ (ब्राह्मण राष्ट्राचा बुरखा हिंदू राष्ट्र, पृ. १९) असे खेडेकरांचे हिंसक प्रतिपादन आहे. यातून हे स्पष्ट होते की, खेडेकर बिनदिक्कतपणे शिवरायांना वेठीला धरून स्वत:च्या हिटलरी विचारांचा प्रचार करीत आहेत.
खेडेकरांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा वाईट आहेत. खेडेकर म्हणतात, ‘‘औरंगजेब बादशहाने बापाला तुरुंगात टाकून मारले. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारीत केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवले, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्या करून महापाप केले आहे. शारीरिक हत्या ही राज्यकारभारात क्षम्य असते. परंतु सामान्य जनतेच्या उत्थानासाठी असलेली विचारधारा नष्ट करणे यास क्षमा नाही. या मापदंडानुसार बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा जास्त अपराधी ठरतात. कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना रामदासांच्या दावणीला बांधली. आपल्याच बापाशी प्रतारणा करणारे बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख आहेत.’’ (बहुजनहिताय, पृ. २७) बाळासाहेब ठाकरेंना सुनावताना खेडेकर म्हणतात, ‘‘ठाकरे, आमच्या मातेऱ्यावर तुमचे पूर्वज पोसलेत व तुम्ही करोडपती झालात.’’ (पृ. ३३) ठाकरेंची शिखांच्या विरोधात बोलण्याची िहमत नाही असे खेडेकरांना वाटते. ‘‘शिखांच्या विरोधात बोलल्यास इंदिरा गांधींसारखे मरावे लागेल. बाळासाहेब ठाकरी भाषेत यावर एकदा बोलाच’’ (पृ. ४१) अशा शब्दांत ते बाळासाहेब ठाकरे यांना चॅलेंज करतात. खेडेकरांचे अजब तर्कशास्त्रच कुठूनही कुठे जात असते. ते म्हणतात, ‘‘आज लोकशाही नसती तर नारायण राणे, राज ठाकरे अशा अनेक मर्दानी बाळ ठाकरे, मनोहर जोशी यांच्या हत्या याच तत्त्वानुसार केल्या असत्या. इत:पर आजही ठाकरे कुटुंबातीलच मीनाताई ठाकरे वा िबदुमाधव ठाकरे या मायलेकांच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही.’’ (बहुजन हिताय, पृ. २१) शिवसनिकांनी हे सारे वाचलेले नसणार. त्यांनी हे साहित्य काळजीपूर्वक वाचून त्यावर खेडेकरांशी चर्चा केली पाहिजे.
खेडेकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावरही टीका करतात. ते म्हणतात, ‘‘आज संपूर्ण देशात एकाही राजकीय पक्षावर मराठी नेतृत्वाचा अंकुश नाही. एकाही पक्षाचा प्रमुख कुणबी-मराठा नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष कुणबी शरद पवार आहेत. पण सत्यशोधकी आई शारदाबाईंचे संस्कार त्यांनी शंकराचार्याच्या चरणी वाहिलेत.’’ (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. २५) मराठा स्त्रियांबद्दल खेडेकरांच्या मनात नेमक्या काय भावना असाव्यात? ते म्हणतात, ‘‘पुरुषार्थ हाच जगातील सर्व समाजांमध्ये पुरुषाचा अलंकार समजला जातो. शुद्ध व बीजधारी वीर्य हेच पुरुषांसाठी सर्वकाही असते.. पुरुषाचा पुरुषार्थ हा त्याच्या सहकारी स्त्रीचे पूर्ण लंगिक समाधान करण्यात असतो.. आपली मादी आपल्याच ताब्यात राहावी व आपणच भोगावी यासाठी जनावरे मरणही पत्करतात; परंतु जिवंतपणी आपली मादी इतर कुणी भोगत असल्याचे पाहू शकत नाही.. गावातील एखाद्या सुंदर कुत्रीच्या पाठीमागे अनेक कुत्रे असतात, पण ती इतरांना हुंगतही नाही. एखादा बलदंड कुत्रा तिची कामेच्छा पूर्ण करण्यात पुढाकार घेतो.. आपली सुंदर, तरुण, भरगच्च भरलेली बायको कोणाशी साधी लगट करताना दिसली तरी मराठा बहुजन आकांडतांडव करतो. आपल्या देखण्या बायकोवर सोबतचे लोक लाइन मारतील एवढय़ा साध्या कल्पनेनेही मराठा पुरुष आपल्या रूपवान तरुण बायकोला सार्वजनिक कार्यक्रमांना नेत नाहीत.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ३४, ३५) मराठा स्त्रियांच्या विशेषत: जिजाऊ ब्रिगेडच्या माताभगिनींच्या प्रतिक्रिया या लेखनाबाबत कळल्या तर बरे होईल. हे लेखन मराठा समाजातील स्त्री-पुरुष या दोघांचीही बदनामी करणारे नाही काय? तसेच या पुस्तकात इतरत्र मराठा पुरुषांचे चित्रण पुरुष वेश्या म्हणून सरसकट करण्यात आले आहे, हा लढवय्या मराठा पुरुषांचा अपमान नाही काय? आपण काहीही लिहिले किंवा बोललो तरी मराठा समाज निमूटपणे त्यावर विश्वास ठेवील अशी खेडेकरांना खात्री आहे. त्यांची मदार तरुण पिढीची ऊर्जा, हिटलरी आदर्शवाद, ओबीसी विरोध, दुषित पूर्वग्रह आणि माथेफिरूपणा यावर आहे. फुले-आंबेडकरी विचारधारेला त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणाची कळा आणली आहे. हे चालवून घ्यायचे काय?
खेडेकरांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा वाईट आहेत. खेडेकर म्हणतात, ‘‘औरंगजेब बादशहाने बापाला तुरुंगात टाकून मारले. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारीत केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवले, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्या करून महापाप केले आहे.
खेडेकर बहुजन समाजाने यशस्वी क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आदर्श नेते आणि विचारवंत यांच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देतात. (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ३१) त्यांनी दिलेल्या महापुरुषांच्या व विचारवंतांच्या ६८ जणांच्या यादीतील २६ जण दिवंगत झालेले आहेत. ४२ विद्यमान प्रबोधनकारांमध्ये खेडेकरांनी कोणाकोणाचा समावेश केलेला आहे हे बघणे उद्बोधक ठरेल. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी कर्त्यां लोकांची यादी केली होती. त्यात म. फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, ताराबाई शिंदे आदींचा समावेश नव्हता. खेडेकरांच्या या यादीतील हयात ४२ जणांपकी ३४ जण हे सत्ताधारी मराठा किंवा कुणबी जातीतील आहेत. २ बौद्ध आहेत. २ मुस्लीम आहेत. उर्वरित सर्व दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, ओबीसीतून खेडेकरांनी अवघे ४ जण घेतलेले आहेत. या यादीत धनगर, माळी, वंजारी, आग्री, भंडारी, कुंभार, चर्मकार, साळी, न्हावी, िशपी आदी समाजातून एकालाही स्थान मिळालेले नाही. ज्यांचे अनुकरण करणे म्हणजे फुले-अांबेडकरी विचाराचा प्रचार, प्रसार करणे अशी खेडेकरांची धारणा आहे त्या यादीची ही अवस्था आहे. या यादीत न्या. पी. बी. सावंत, शरद पाटील, रावसाहेब कसबे, भालचंद्र मुणगेकर, डॉ. जनार्दन वाघमारे, गोिवद पानसरे, एन. डी. पाटील, सदानंद मोरे, डॉ. बाबा आढाव, उत्तम कांबळे, रझिया पटेल, सय्यदभाई, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड, बाळकृष्ण रेणके, महादेव जानकर, श्रावण देवरे, प्रदीप ढोबळे, हनुमंत उपरे, बाबुराव गुरव, लक्ष्मण गायकवाड, राजा ढाले, गेल ओम्वेट, सुनील सरदार, शाम मानव, सुखदेव थोरात अशा बहुजनातील कोणालाही स्थान नाही. फुले-आंबेडकरी चळवळीला आपला मतदारसंघ समजून तेथील आधीपासूनच्या नेत्यांना हाकलू पाहणारे खेडेकर कोणाला फुले-अांबेडकरवादी मानतात ते स्पष्ट होते. खेडेकर मुळात जाती निर्मूलनवाले नसून जात्योन्नतीवादी आहेत, हा प्रा. श्रावण देवरे यांचा दावा योग्यच आहे. खेडेकरांना फुले-अांबेडकरी चळवळीत घुसखोरी करून ती चळवळ हायजॅक करायची आहे. त्यासाठी मूळच्या चळवळवाल्यांस बदनाम करणे किंवा त्यांना हद्दपार करणे यावर त्यांचा भर आहे. त्यांचा आराखडाच त्यांनी आपल्या एका पुस्तकात दिला आहे. ‘‘आपले काम सिद्धीस नेण्यासाठी प्रसंगी शत्रूबरोबरही मत्रीचे नाटक करावे लागते. ते तुम्ही करा.. तुमची ताकद कावेबाजपणे वाढवा.. योग्य वेळ येताच आपल्या कपटनीतीचा अवलंब करून (राक्षस) समाजावर हल्ला करावा.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ५८) खेडेकर हा उपदेश विष्णूचा म्हणून सांगत असले तरी मुळात तो स्वत:च्या अनुयायांना व सत्ताधाऱ्यांना खेडेकरांनी केलेला उपदेश आहे. फुले-अांबेडकरी चळवळ कशी ताब्यात घ्यायची याचा तो मूलमंत्रच आहे. खेडेकरांचे फुले-अांबेडकरी प्रेम अस्सल आहे की तो त्यांचा मुखवटा आहे याचा शोध त्यांच्याच लेखन आणि कृतींच्या आधारे घेता येतो. ब्राह्मण समाजाबाबतचे त्यांचे आक्षेप हे ‘शिवाजी महाराज व ब्राह्मण’ याऐवजी ‘फुले-अांबेडकर व दलित-ओबीसी’ असे लावून बघा. खेडेकर म्हणतात, ‘‘आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्वात जास्त ब्राह्मणच दिसतात. प्रत्यक्षात ब्राह्मणांना शिवाजीबद्दल प्रेम नाही. तर त्यांना बहुजन समाजाच्या मनावर शिवरायांच्या नावाची असलेली पकड वापरावयाची आहे. ब्राह्मणांना शिवचरित्राचे विकृतीकरण करावयाचे आहे.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) खेडेकरांनी फुले-अांबेडकरांच्या साहित्याचे जे विकृतीकरण चालविले आहे त्यातून त्यांचा छुपा अजेंडा उघडा पडतो.
महात्मा फुले यांचे साहित्य उद्धृत करताना खेडेकर लिहितात, ‘‘जोतिबांनी सर्वप्रथम परशुराम या ब्राह्मणाच्या बापास सरळ नोटीस पाठवून आमच्या पूर्वजांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचे व हत्या या बाबत तुझ्या विरोधात (म्हणजेच आजच्या तुझ्या वंशजांच्या विरोधात) आम्ही हत्यासत्र ही कारवाई का करू नये, अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावली’’ (महाराज, माफ करा, पृ. ३४) प्रत्यक्षात ‘हत्यासत्र’ हा शब्द महात्मा फुल्यांच्या नोटिशीमध्ये नाही. तो खेडेकरांनी पदरचा घातला आहे. स्वत:च्या अविचारी मतांचा प्रचार करण्यासाठी ते फुल्यांना वेठीला धरीत आहेत. फुल्यांना हत्यासत्रांचे पुरस्कर्ते आणि माथेफिरू ठरवण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. जोतिरावांनी दि. १ ऑगस्ट १८७२ रोजी परशुरामाला जाहीर नोटीस दिली होती. ‘‘तू चिरंजीव असशील तर सहा महिन्यांत येऊन हजर हो,’’ असा मजकूर या नोटिशीत होता. (पाहा- महात्मा फुले समग्र वाङ्मय २००६, पृ. १७१). त्यात हत्या किंवा हत्यासत्र असा उल्लेखच नाही. स्वत:च्या दंगली, कत्तली आणि हत्यासत्रांच्या हिटलरी विचारसरणीच्या प्रचारासाठी खेडेकर महात्मा फुल्यांच्या साहित्यामध्ये बदल करण्याचा हा जो उद्योग करीत अहेत, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताच संपुष्टात येते.
‘‘आपली सुंदर, तरुण, भरगच्च भरलेली बायको कोणाशी साधी लगट करताना दिसली तरी मराठा बहुजन आकांडतांडव करतो. आपल्या देखण्या बायकोवर सोबतचे लोक लाइन मारतील एवढय़ा साध्या कल्पनेनेही मराठा पुरुष आपल्या रूपवान तरुण बायकोला सार्वजनिक कार्यक्रमांना नेत नाहीत.’’
फुल्यांनी ब्राह्मण मुलींसह सर्व स्त्रियांसाठी शाळा काढल्या. ब्राह्मण विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधकगृह’ काढले. एक ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला. त्याच्या नावे मृत्युपत्राद्वारे आपली सगळी स्थावर-जंगम मालमत्ता केली. ‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणांशी धरावे पोटाशी बंधुपरी’ (महात्मा फुले समग्र वाङ्मय, पृ. ५६९) म्हणणाऱ्या फुलेंना ब्राह्मणद्वेष्टय़ा म्हणून रंगविण्यासाठी खेडेकरांनी ‘भटोबाचा कर्दनकाळ जोतिबा’ ही पुस्तिका लिहिली. नांगराचा फाळ ब्राह्मणाच्या पोटात खुपसून जोतिराव ब्राह्मणाची हत्या करीत आहेत असे चित्र मुखपृष्ठावर दाखविले. फुल्यांनी ब्राह्मणवादावर टीका केलेली आहे. त्यांची टीका तळमळीतून आलेली होती, द्वेषातून नाही. त्यामागे व्यक्तिद्वेष नव्हता. त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता. खेडेकरांना वैयक्तिक आणि पक्षीय स्वार्थासाठी कत्तली, दंगली, िहसाचार घडवायचा आहे, त्यासाठी फुले वापरावयाचे आहेत. या कामात जे कोणी आडवे येतील त्यांना खेडेकर झोडपतात. छगन भुजबळ, महादेव जानकर आणि रावसाहेब कसबे यांना फुलेविरोधी ठरवायचे आहे. फुल्यांचे बालपणापासूनचे मित्र भांडारकर यांचे फुल्यांनी ‘शिवाजी महाराजांच्या पोवाडय़ात’ जाहीरपणे आभार मानले. ‘‘हा पोवाडा एकंदर तयार करतेवेळी माझे लहानपणीचे मित्र भांडारकर यांनी इतर दुसऱ्या लोकांसारख्या पायात पाय न घालता मला या कामात नेहमी िहमत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे.’’ (म.फु.स.वा, पृ. ४४) असे कृतज्ञतेने १८६९ साली नमूद करणाऱ्या फुल्यांनी आपल्या या जिवाभावाच्या नि आयुष्यभराच्या मित्राची स्वत:च्या मृत्युपत्रावर १८८७ साली साक्ष घेतलेली आहे. (म.फु.स.वा., पृ. ६४८) साक्षीदार म्हणून जवळच्याच व्यक्तीची निवड केली जाते ना? याच मृत्युपत्राचा खेडेकर ब्राह्मणद्वेषासाठी सतत वापर करीत असतात. सदर मृत्युपत्राची अस्सल प्रत मी स्वत: सह जिल्हानिबंधक पुणे, (मध्यवर्ती अभिलेख) कार्यालयातून शोधून काढून फुले समग्र वाङ्मयात छापलेली आहे. मृत्यूनंतर करावयाचे विधी फुलेंना भटजीऐवजी सत्यशोधक पद्धतीने करायला हवे होते. त्याची नोंद करताना तेथे भटजी नको असे फुले लिहितात. त्यातही ‘शूद्रातिशूद्रांना दासानुदास मानणाऱ्या’ भटजींना फुले प्रवेश वर्जति करतात. तथापि, खेडेकर मात्र या मजकुराचा गरवापर करून फुल्यांचे विद्वेषवादी चित्रण करीत असतात. खेडेकर म्हणतात, ‘‘छगन भुजबळ यांनी जोतिरावांचे मृत्युपत्र मुळातच वाचावे. त्यांनाच ब्राह्मणांचा जास्त पुळका आहे.. आम्ही ब्राह्मणद्वेष वाढवतो असे भुजबळांचे गरसमज आहेत. ते दूर होण्यासाठी त्यांनी जोतिबांचे पूर्ण साहित्य वाचावे. नंतर समता सांगावी.’’ (आपली माणसं, पृ. २०) खेडेकरांच्या क्लृप्त्या उघडय़ा करणाऱ्यांना ते ‘भटाळलेला’ अशी पेटंट शिवी देत असतात. ते म्हणतात, ‘‘बहुजन समाजातील भटाळलेला, शिकलेला माणूस हा कट्टर ब्राह्मणापेक्षा धोकादायक असतो.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ४) एवढेच नाही तर असे लोक हे आपले शत्रू आहेत. अशी शिकवण ते अनुयायांना देतात. ‘‘आपली लढाई कट्टर, जात्यंध, कर्मठ ब्राह्मणशाहीविरुद्ध आहे. तशीच आपल्या बहुजन समाजातील ब्राह्मणशाहीचे हस्तक व गुलाम झालेल्या बहुजनांविरुद्धही आहे.’’ (पृ. २४) खेडेकरांचे आदर्श मुळातच हिटलर व औरंगजेब हे असल्याने त्यांना चर्चा, चिकित्सा किंवा मतभेद मान्यच नसतात. वेगळ्या सुरात बोलणारा प्रत्येक माणूस आपला शत्रूच आहे अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे सोबत काम केलेल्या कुणालाही ते रातोरात शत्रू घोषित करून मोकळे होतात. खेडेकर आत्मकेंद्रित आणि ‘नार्सििसस्ट’ आहेत. त्यांचे फक्त स्वत:वरच प्रेम आहे. जबर महात्त्वाकांक्षा आणि उतारवयामुळे येत असलेले नराश्य यातून ते अधिकाधिक अतिरेकी बनत चालले आहेत. ते म्हणतात, ‘‘सध्या संभाजी ब्रिगेडची वाटचाल याच दिशेने चालू आहे. (असे कधीच न सुटणारे प्रश्न मरेपर्यंत वा आम्ही थकेपर्यंत चालवत असतो. आमची क्षीण होत जाणारी ताकद व शरीरयष्टी नेते पाहत असतात.) संभाजी ब्रिगेडचे अनेक नेते व कार्यकर्ते गळाला स्वत:च्या माना टांगून लटकावून आहेत. त्यांच्या तोंडात मासा पडण्याची शक्यता कमी आहे. हे सगळे मला दिसते. पण माझी अवस्था तरुण व सुंदर बायको असणाऱ्या हाडकुळ्या बामणासारखी झाली आहे.’’ (आपली माणसं अशी का वागतात, पृ. २७) खेडेकरांचा हा कबुलीजबाब स्वयंस्पष्ट आहे. त्यावर कोणतीही टिप्पणी करायची गरजच नाही. सत्ताधारी नेत्यांनी आपला वापर केल्याची आणि फसवणूक केल्याची खंत त्यांच्या लेखनातून अनेकदा व्यक्त होते. ‘‘आमच्या पुढाऱ्यांनी व आमच्या नेत्यांनी आमच्या चळवळीची अंतर्बाह्य़ सर्वच मापे जुळवलेली आहेत.. चळवळीचे नेते विकत घेतले जाऊ शकतात, हे ते सिद्ध करत असतात.. नेते जातीने आपले असतात, मतीने असतातच असे नाही. आणि आतातर आपली औकातच त्यांना माहीत आहे. आपणच त्यांना पुढे होऊन वाकून ‘जय जिजाऊ’ करतो, अस्मिताच मेली!’’ (आपली माणसं, पृ. २५, २६) ही खेडेकरांची व्यथा आहे की आत्मकथा? अपयश, अपराधगंड आणि मानसिक असंतुलन यांचा पगडा खेडेकरांच्या अलीकडच्या सर्वच लेखनावर जाणवतो.
(क्रमश:)harinarke@yahoo.co.in