Friday, June 17, 2011

फुले साहित्य गाळल्याचा हेत्वारोप आणि वास्तव!


"महात्मा फुले समग्र वाद्मय" या ग्रंथाच्या चौथ्या आव्रुत्तीमद्धे संपादक डा. य.दि. फडके व मांडणीकार प्रा. हरी नरके यांनी सामाजिक द्रुष्ट्या क्रंतिकारी असलेला महत्वाचा मजकुर वगळल्याचा आरोप नागपुरचे श्री. प्रकाश बनसोड यांनी केला आहे. सदर आरोप निराधार असून तो द्वेषापोटी केलेला आहे.
प्रा. फडके यांचे निधन झालेले असल्याने व सदर हेत्वारोपाचा रोख माझ्यावर असल्याने त्याबाबतची सत्यस्थिती वाचकांपुढे मांडली पाहिजे. सध्याच्या काळात अर्धशिक्षित, अर्धवट आणि आर्थिक द्रुष्ट्या नाडलेल्या लोकांना हाताशी धरून चळवळीतील अभ्यासकांना बदनाम करण्याच्या मोहिमा चालवल्या जात आहेत. या बदनामीच्या मोहिमेचे केंद्र पुण्यातुन चालवले जाते. यासाठी सर्वप्रथम श्री. प्रकाश बनसोड यांनी ४० पानी पुस्तिका प्रकाशित केली. त्यानंतर ७०,००० रु. खर्च करुन २०० पानी पुस्तक प्रकाशित केले. अशाच प्रकारचे तिसरे पुस्तक मुंढव्याच्या एका संपादकानेही लिहून प्रसिद्ध केले. या तिन्हींचा आर्थिक स्त्रोत एकच आहे. या तिन्हींमद्धे केलेले सर्व आरोप अर्धसत्य आणि विपर्यस्त आहेत. आकसापोटी सतत खोटे आरोप करीत रहाणे हे त्यांच्या कार्यप्रणालीचे ठळक वैशिष्ट्य आहे. आजवर अनेक वर्तमान पत्रांतुन खुलासे करून सत्य मांडले तरीही त्याकडे दुर्लक्ष करुन निर्ढावलेपणाने पुन्हा-पुन्हा तेच तेच आरोप केले जातात.
श्री बनसोड यांनी २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकातुन मी महत्वाचा मजकुर गाळला असा आरोप आता केला आहे. यामागचे राजकारण लक्षात घेतले पाहिजे. महात्मा फुने समग्र वाद्मयाच्या ४थ्या आव्रुत्तीमधुन डा. वि.रा. घोले व डा. यशवंत फुले यांचे लेख गाळल्याचा बनसोड यांचा आरोप आहे. याचा अर्थ हे लेख तिस-या आव्रुत्तीपर्यंत होते आणि चवथ्या आव्रुत्तीत ते नरके/फडकेंनी गाळले असे बनसोड म्हणत आहेत. प्रत्यक्षात बनसोड व त्यांचे गुरु एन.जी. कांबळे (जे स्वत:च्या नावापुढे आय.पी.एस. असे लावुन आपण इंडियन पोलिस सेर्व्हिसमद्धे होतो असा भास निर्माण करतात, पण ते कधीही पोलिस सेवेत नव्हते.) या दोघांची संशोधन विषयातील समज शाळकरी असून त्यांचे या बाबतचे प्राथमिक द्न्यानही हास्यास्पद आहे. त्यांनी हा गंभीर हेत्वारोप करण्यापुर्वी समग्र वाड्मयाच्या पहिल्या तीन आव्रुत्त्या पाहिलेल्याही नाहीत, याला काय म्हणावे? समग्र वाड्मयाची पहिली आव्रुत्ती डा. धनंजय कीर व डा. स.गं. मालशे यांनी संपादित करून १९६९ साली साहित्य संस्क्रुती मंडळातर्फे प्रकाशित केली. पुढे दुसरी आव्रुत्ती १९८० साली तर तिसरी आव्रुत्ती १९८८ साली प्रकाशित झाली.
१९९०-९१ मद्धे फुले-आंबेडकर शताब्दिनिमित्त डा. य. दि. फडके संपादित चवथी आव्रुत्ती प्रकाशित झाली. जो मजकुर पहिल्या तीन आव्रुत्त्यांमद्धे नव्हताच तो नरके/फडके यांनी चवथ्या आव्रुत्तीत गाळल्याचा जावईशोध कांबळे/बनसोड यांनी लावला आहे. या घोर अद्न्यानाला (कि सामाजिक निर्ढावलेपणाला?) काय म्हणावे?
अर्थात कांबळे/बनसोडांचा नरकेद्वेष एवढा टोकाचा आहे कि आता पहिल्या आव्रुत्तीतुनच नरकेंनी मजकुर गाळला असे म्हणायलाही हे इसम कमी करणार नाहीत. या निमित्ताने वाचकांच्या माहितीसाठी सांगायचे म्हणजे १९६९ साली मी यत्ता पहिलीत होतो...तेंव्हा हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. डा. फडके यांनी आयुष्यभर फुले-आंबेडकरांच्या साहित्य संशोधनाला वाहुन घेतले होते. ते जन्माने ब्राह्मण होते म्हणुन त्यांनी मजकुर गाळला असे सुचवणा-या या महाभागांनी हे पुस्तक वाचण्याचे सोडा पहाण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत, हे संतापजनक नाही काय? केवळ जन्माच्या आधारे जे कांबळे/बनसोड फुले-आंबेडकरवादी असल्याचा दावा करतात त्यांनी किमान पहिल्या ३ आव्रुत्त्या पहायचे तरी कष्ट घ्यायला हवे होते. अडानीपणाचा आणि अहंकाराचा हा कळस चळवळीला कोठे घेवुन जाणार आहे? दु:खाची गोष्ट म्हणजे गेले वर्षभर हे प्रायोजित आरोप केले जात आहेत आणि ते धादांत खोटे आहेत याची खात्री असुनही तमाम फुले-आंबेडकरवादी अभ्यासकांनी मौनाचा कट केलेला आहे. चळवळीतील अनेक संपादक बनसोडांचे खोटे लेख छापत आहेत.
ज्या ग्रंथाचा मी कधीही संपादक नव्हतो त्यातील मजकुर मी गाळला असा आरोप करणे भंपकपणाचे नाही काय? तो आरोप ठळकपणे छापणे आणि तो वाचणे ही चळवळीतील संपादक आणि वाचकांची कोनत्या दर्जाची संवेदनशीलता आहे? चळवळीत आयुष्यभर काम केलेल्या माणसांना कोणीही भुरटे उठतात आणि त्यांच्यावर हेत्वारोप करुन त्यांची बदनामी करत सुटतात यावरुन चळ्वळीच्या विवेकबुद्धीबद्दल तटस्थ माणसाने काय मत बनवावे?
"महात्मा फुले समग्र वाड्मय" या शिर्षकाचा अर्थही ज्यांना कळत नाही असेच महाभाग या पुस्तकात डा. घोले व डा. यशवंत यांचे लेखन का नाही असे विचारु शकतात. फुले-आंबेडकर साहित्यावर समर्पितपणे गेली ३० वर्षे काम केल्यानंतर जर असे खोटारडे आणि निराधार हेत्वारोपच वाट्याला येणार असतील तर नवीन पिढीने यातुन काय संदेश घ्यावा? कोणताही अभ्यास न करता केवळ जन्माच्या अपघातालाच कर्तुत्व मानुन कोणीही लुंगासुंगा आयुष्य वाहुन घेणा-या अभ्यासकाला आरोपीच्या पिंज-यात उभा करुन झोडनार असेल व बाकी सर्व गंम्मत पहात बसणार असतील तर या देशातील संशोधनाला काय भवितव्य राहील?

8 comments:

  1. मा.सर ,तुमच्या बदनामिचे सर्व प्रयत्न फसल्यावर विरोधकांची ही नवी खेळी आहे.कांही मुर्ख याला बळी पडतात एवढच.शेवटी हाथी चलता है.........!

    ReplyDelete
  2. Our best wishes. We are so proud of the scholarly tradition of Maharashtra, which you and the late YD Phadke, just to name a few, represent. Do not worry about this blind tirade. Time will screen out all this noise.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. u r right,narke.we r with u.we know yr efforts.

    ReplyDelete
  5. Dear, Hari Narke Sir, Jaibheem! Don't worry about BAMCEF / BSP. We will be fight with social communication. Be start fight against fascism, caste-ism, capitalism and corruption. People will be diverse where there is nationalist, humanist. If we are right, we will be win to the waman / kanshiram / mayavati and any anti-nationalist. Kanshiram was a Hitler, Just like Bal Thakre. Both are caste base thinkar and actors. Waman Meshram also a another student of Kanshiram. Blind follower is every where, they are Fakir of the Lakir. They are not studious. Without study anybody,anywhere can't be success.They are divider in India. Where is social and economic democracy in up? Be aware the peopleabout the democracy!! jjjjjjjjjjjjay Braaat! Jai Bharat.

    ReplyDelete
  6. PROF. NARKESAHEB, AS USUAL YOUR DETAILED AND ANALYTICAL BLOG IS A TREAT FOR READERS AND SCHOLARS. IT IS VERY RARE TO FIND THIS TYPE OF LOGICAL THINKING,BRILLIANCE AND LOVE FOR KNOWLEDGE.PEOPLE LIKE BANSODE ARE PAID SERVANTS OF SOME EVIL GUYS LIKE PURSHOTTAM KHEDEKAR WHO ARE USING MONEY POWER TO SPREAD POISON OF CASTE HATRED IN MAHARASHTRA AND VITIATE THE DEMOCRATIC TRADITIONS.THE RULING PARTY IS ALSO SUPPORTING THEM WITHOUT THINKING OF LONG TERM DAMAGE TO THE SOCIAL FABRIC.BUT A TIME HAS COME TO HIT BACK .AND SOON THERE WILL BE UNITED OPPOSITION TO THESE MISCREANTS.DILIP ALONI

    ReplyDelete
  7. You are doing your best to strengthen the FULE- AMBEDKAR Movement. Don't afraid of these type of baseless remarks. We are all with you.

    ReplyDelete
  8. प्रा. हरिभाऊ,

    तुमच्या प्रगल्भतेवर आणि प्रामाणिकपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण तरीही या लेखामुळे संभ्रमाचे धुके निवळायला मदत होईल, हे नक्की.

    वस्तुस्थिती लोकांसमोर मांडलीत हे चांगले झाले.

    शुभेच्छा.

    धोंडोपंत

    ReplyDelete