Sunday, August 19, 2012

समाज साहित्य संमेलनः एक अनुभव

असे साहित्य संमेलन की ज्यात अध्यक्षपदाच्या निवडीचे वाद नाहीत, मुळात ज्याला अध्यक्षच नाही, उदघाटक नाही, कोणीही निमंत्रित वक्ते नाहीत, साचेबंद वेळापत्रक नाही, सर्व मान्यवर लेखक स्वखर्चाने येतात, जातात, तीन दिवस, चार रात्री रसिक वाचकांसोबत एकत्र राहून हृद्य संवाद साधतात, जाताना भरभरुन आनंद आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन जातात,  हे स्वप्नवत वाटते ना? पण असे साहित्य संमेलन आज अस्तित्वात आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय?
पाचगणीजवळ खिंगर नावाचे एक टुमदार गाव आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले, नितांतसुंदर! तिथे 27 ते 29 जुलै या काळात हे समाज साहित्य संमेलन पार पडले. सुमारे 150 लेखक, कवी आणि रसिक तीन दिवस चार रात्री धो धो पावसात साहित्यात रमले होते. गप्पांचे फड रंगत होते. लेखकांसोबत रसिकही व्यासपीठावरुनच बोलत होते. ख्यातनाम लेखक श्री.राजन खान यांची ही साहित्यिक अलिबाबाची गुहा. त्यांच्या अक्षर मानव या संस्थेतर्फे गेली चार वर्षे हे साहित्य संमेलन भरविले जाते. `मी’, `आम्ही’, `आपण’ यानंतर `समाज’ हा या वर्षीचा विषय होता. यावर्षी रंगनाथ पठारे, विद्या बाळ, नीरजा, अशोक राणे, रेखा देशपांडे, किशोर कदम, अश्विनी धोंगडे, सुमती लांडे, प्रसाद कुलकर्णी, हरिश सदानी, हेमंत जोगळेकर, सुनिता अरळीकर, छाया कोरगावकर, विद्यालंकार घारपुरे, अनुराधा औरंगाबादकर, हेमंत पाटील, शरद लांजेवार, छाया महाजन, साहेबराव ठाणगे, पवन वैद्य, अनिल सपकाळ, महावीर जोंधळे, शमशुद्दीन तांबोळी, संतोष नारायणकर,प्रविण धोपट आणि इतर अनेकजण मोठय़ा गोळ्यामेळ्याने या संमेलनात घरचे कार्य समजून वावरत होते.या संमेलनाला उदघाटक, अध्यक्ष, निमंत्रित वक्ते असे चौकटीतील काहीही नसल्याने सगळे कसे अनौपचारिक, उत्स्फूर्त आणि मोकळेढाकळे असते. म्हणूनच जिवंत आणि सच्चे असते. या संमेलनाला कुठलेही शुल्क आकारले जात नाही. सगळ्यांचे सगळ्यांनी ऐकणे, स्वतःचे बोलून निघून न जाणे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणे मात्र बंधनकारक असते.
राजन खान यांनी आस्थेवाईक प्रास्ताविक केल्यानंतर त्यांनी अचानक सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना मंचावर निमंत्रित करुन मनोगत व्यक्त करायला सांगितले. हेच साहित्य संमेलनाचे उदघाटन होते. त्यानंतर समारोपापर्यंत तीन दिवस याच पद्धतीने कार्यक्रम चालू होते. आता यानंतर कोण बोलणार आहे हे राजन खान सोडले तर कोणालाही माहीत नसायचे. सस्पेन्स कायम असायचा. कोणाही वक्त्यांना पूर्वकल्पना दिली जात नसे. अनेकदा रसिक, वाचक किंवा श्रोते म्हणून आलेल्यांनाही बोलायला सांगितले जाई. तर दुसरीकडे अनेक मान्यवरांना तीन दिवसात मंचावरुन बोलण्याची संधी मिळू शकली नाही. नवीन मंडळींची तारांबळ उडे. पण अनेकदा फार दर्जेदार, ताज्या दमाचे, नवेकोरे आणि चाकोरीबाहेरचेही ऐकायला मिळे. गुजरातमधून घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या शामिया मिर्झा आणि निमेष पटेल या नवविवाहित इंजीनियर जोडप्याचे अनुभव ऐकताना एखादा थरारक चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. ते दोघे गर्भश्रीमंत,उच्चशिक्षित हिंदु-मुस्लीम कुटुंबातील तरुण. शाळेपासूनची दोघांची मैत्री. त्यांच्या आंतरधर्मिय लग्नाला मात्र दोन्ही घरचा कडवा विरोध. दहा महिने शामियाच्या आईवडीलांनी तिला घरात कोंडून ठेवले. मोबाईल काढून घेतला. टीव्ही बघायला बंदी केली. कडक पहारा. घराबाहेर जायचे नाही. मैत्रिणींनाही भेटायचे नाही. काम नाही, धाम नाही. आई 24 तास सोबत. मुलगी जणू तुरुंगात असावी तशी. पण मुलाने शेजारच्या घरी कुरियरवाला बनून जावून तिच्याशी संपर्क केला. आणि मग त्यांनी रात्री अडीच वाजता बंगल्याच्या टेरेसवरुन उडय़ा मारुन पोबारा केला. थेट पुणे गाठले आणि नोंदणी पद्धतीने विवाह केला. हे करताना भारत खरेच 21 व्या शतकात आहे का? असा प्रश्न पडत होता. आपला समाज जाती-धर्मात कसा वाटला गेलेला आहे त्याचे हे विदारक दर्शन होते.
`हिरकणीचे बिर्हाड’, हे नवे दलित आत्मकथन. अतिशय ताकदीचे. लेखिका सुनिता अरळीकर या चर्मकार समाजाच्या. त्यांचे पती दिलीप अरळीकर हे ब्राह्मण समाजाचे. त्यांच्या आंतरजातीय विवाहाला ब्राह्मण वडिलांनी विरोधासाठी जी गलिच्छ हत्यारे वापरली ती चीड आणणारी. त्यांच्या सहजीवनाचे अनुभव उपस्थितांना सामाजिक वास्तवाचे नवे पदर उलगडून दाखवणारे ठरले. त्यांचे अनुभव थरारुन सोडणारे होते. तरुण पिढीतील कविता आणि अमृता दोन मुलींनी आजच्या तरुणाईबद्दलची मांडलेली मते शॉक ट्रिटमेंट देणारी होती. `लिव्ह इन रिलेशनशिप’चं त्यांना आकर्षण वाटतं. तरुण मुलांना जे आवडतं तिथेच त्यांना रमू द्या, त्यातच खरं जगणं आहे, असंही त्यांनी सांगितलं. नातेसंबंधातील निष्ठा त्यांना महत्वाची वाटत असली तरी एकनिष्ठ राहणे अव्यवहारीपणाचे वाटते. नात्याचे ओझे घेवून जगायला त्यांचा नकार आहे. तरुण लेखक प्रविण धोपट म्हणाले, तरुण पिढीची काळजी करायचे सोडून द्या. ती वाचन करीत नाही म्हणून चिंता करु नका. जातीपाती नष्ट करायच्या असतील तर सर्वांनाच ब्राह्मण करा. ही तरुण पिढीची प्रातिनिधिक मतं नसतीलही, पण दिशा कळायला मदत होते. वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत त्याचा कयास बांधता येतो. कवी  आणि अभिनेते किशोर कदम यांचे सिनेसृष्टीतील जिवंत अनुभव चिंतनाला खाद्य पुरविणारे होते. राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण कमळ विजेत्या समर या चित्रपटात शाम बेनेगल यांनी कलावंत आणि जातीव्यवस्थेचे पदर स्पष्ट केले आहेत. त्यात कदमांनी केलेला रोल आव्हानात्मक होता.पण हा रोल देताना कदमांच्या जातीचा विचार झाला असावा, हे कळल्यानंतरची त्यांची मानसिकता, सत्यदेव दुबेंचे अनुभव, आयडेंटिटी क्रायसिस, याबद्दल ते खुलेपणाने बोलले. हेमंत पाटील आणि शरद लांजेवार यांनी गुजरात आणि आंध्रच्या सामाजिक जीवनाचे केलेले विश्लेषण संपूर्ण नवे आणि वेगळे होते. आंध्रातील कष्टाळू सामान्य माणसाचे सिनेमावेड, गुजराती समाजातील जातींची उतरंड आणि अर्थ अभियांत्रीकी हे चित्रण महत्वाचे होते. तीन दिवसात चाळीसपेक्षा अधिक लोक बोलले. त्यात क्वचित काही जणांचा सूर लागला नसला किंवा काहींनी थोडाफार अपेक्षाभंगही केला असला तरी एकूण लेखाजोखा समृद्ध करणारा होता. उदघाटनात नीरजा म्हणाल्या, समाज म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाच्या समाजशास्त्रीय व्याख्या झालेल्या आहेत. पण एक सामान्य माणूस म्हणून या समाजाकडे पाहताना नेमकं काय असतं आपल्या मनात? समाजातील राजकारण, अर्थकारण, जातीयता दंगे, अराजक, इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, संगीत यांचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. तो आपल्या जगण्याच्या भूमिका ठरवत असतो. समाजाच्या दडपणामुळे कलावंताचा कोंडमारा होत असतो. शब्दाशब्दांवर आजकाल काही संघटना सेन्सॉरशीप लादताना दिसतात. निकोप लोकशाहीला आणि लेखन स्वातंत्र्याला बाधक असलेली जगण्यातली ही ढवळाढवळ, ही झुंडशाही कलावंतानी झुगारली पाहिजे. नीरजा यांच्या विवेकी, आत्मसंवादी आणि प्रागतिक चिंतनाने या संमेलनाची उत्तम पायाभरणी केली.
समारोपाला रंगनाथ पठारे यांनी शेती, शेतकरी, राज्यकर्ते आणि जागतिकरण यांचा एक धारदार छेद प्रस्तुत केला. आपण स्वतः शेतकरी समाजातून आलो असून आता शहरात राहून, आपला वर्ग आणि वर्गजाणीवा बदलल्या तरी या प्रश्नांशी नाळ जोडलेली असल्याने त्या जगातल्या गुंतागुतीच्या रसायनाशी आपले आतडयाचे नाते आहे. आजचे राज्यकर्तेच शेतकर्यांचे खरे शोषणकर्ते आहेत, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. हरीष सदानी यांनी स्त्री भ्रूणहत्या या शब्दांऐवजी आपण स्त्रीलिंगी गर्भपात हे शब्द वापरावेत अशी साधार मांडणी केली. साहेबराव ठाणगे यांनी आजच्या खेडय़ाचे बदलते वास्तव उलगडून दाखवले. ते म्हणाले, माझ्या गावातील 40 वर्षांचे चुलत भाऊही ज्येष्ठ नागरिक म्हणून एस.टी.चे अर्धे तिकीट काढून प्रवास करतात आणि बापाला उपाशी मारणारेच दहाव्याला अख्या तालुक्याला जेवायला घालतात!
हेमंत जोगळेकरांनी समाजात सलणार्या अनेक गोष्टी शेअर केल्या. माझं आयुष्य म्हणजे केवळ एक टिंब आहे असं म्हणणार्या अनुराधा औरंगाबादकरांनी आपल्या अनुभवकथनाने उपस्थितांना खिळवून ठेवले. रेखा देशपांडे म्हणाल्या, बाईचं पिढय़ानपिढय़ा ऐकलं गेलं नाही. आता ते ऐकले जायला लागले आहे. तेव्हा आता बायकांनी कंठाळी बोलण्याऐवजी शांतपणे बोलले तर ते अधिक प्रभावी ठरेल. सुमती लांडे म्हणाल्या, मला बाईपणाकडून माणूसपणाकडे जायला आवडते. आज चाळीशीची प्रत्येक स्त्री घाबरलेली आणि तरुण पिढी गोंधळलेली आहे. मुलं अपडेट आहेत पण वाचत नाहीत त्यामुळे आई धास्तावलेली असते.
प्रत्येक सत्रात प्रश्नोत्तरे, चर्चा होत असत. काही वेळा त्या फार रंगत असत. रंगनाथ पठारे यांनी चर्चेत बोलताना लेसिंग डोरिस यांच्या `द गोल्डन नोटबुक’ या स्त्री-पुरुष संबंधावरील जागतिक साहित्यातील मानदंड ठरलेल्या ग्रंथांच्या तोडीचे लेखन भारतीय स्त्रियांनी करावे असे आवाहन यावेळी  केले.

मराठा सेवा संघाच्या अशोक राणांना रंगनाथ पठारे, हरिष साळवे आणि इतर अनेकांनी फैलावर घेतले. आधी आपण जात मानत नाही म्हणणारे राणा नंतर मात्र आपण अमुक जातीचे नाही वगैरे बोलू लागले. पुरुषोत्तम खेडेकरांचे जातीय दंगलीचे तसेच विशिष्ट समाजातील सर्व पुरुषांची कत्तल करण्याला चिथावणी देणारे लेखन आपण वाचलेले नाही असे सांगून त्यांनी अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. त्यांची ही दांभिक  भाषणबाजी कुणालाच आवडली नाही. जातीय संघटनांचा प्रचार करण्याच्या त्यांच्या भूमिकेला सर्वांनी कडाडून विरोध केला. राज्यात दहशतवाद पसविणा-या समाजविघातक विचारांना या साहित्यमंचावरुन  झालेला विरोध हे सुचिन्हच म्हटले पाहिजे. साहित्यिक मंडळी अनेकदा "अभासात" वावरतात आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर हे चित्र फार भावणारे होते.
समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, ख्यातनाम चित्रपट समिक्षक अशोक राणे, प्रा. अश्विनी धोंगडे, स्त्रीवादी विचारवंत विद्या बाळ, आणि स्वता: राजन खान  आदींच्या मनोगतांनाही उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. ही चिंतनशील मनोगते त्यांचा व्यासंग आणि अधिकार यांनी संपन्न होती. या ज्येष्ठांना ऎकणे फार सुखावह होते. तीन दिवस कोसळणा-या पावसात सतत होत असलेल्या या थेट संवादाने सगळेच चिंब भिजून निघाले. "स्त्री-भृणहत्या, स्त्रीपुरुष समता, आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह, आजचे बदलते जातीवास्तव, धार्मिक उन्माद आणि धर्माचे राजकारण, जागतिकीकरण आणि बाजार व्यवस्थेचे आक्रमण,शेतकरी आत्महत्या, अभिजात मराठी भाषा,संस्कृती आणि सांस्कृतिक राजकारण, सत्ता आणि माध्यमे यांचे समाजावरील नियंत्रण" अश्या अनेक विषयांवर खोलवर चर्चा झाल्या.
`अभासात’ संमेलनाला विटलेल्या साहित्यप्रेमींना एक चौकटीबाहेरची सुंदर वाट या संमेलनाने दाखविलेली आहे. महाराष्ट्रात वर्षभरात सुमारे 250 साहित्य संमेलने होतात. पण एका विषयाला वाहिलेले आणि इतके सळसळते संमेलन दुसरे नसावे. अशी संमेलने गावागावात झाली तर मराठी साहित्याची मरगळ आणि शीण झटकला जाईल आणि मराठीला नवी जोमदार पालवी फुटेल यात शंका नाही. पुढील वर्षीच्या संमेलनाला नक्की यायचंच असा निर्णय घेऊन मंडळी परतली. समाज साहित्य संमेलनाने मला दिलेली तीन दिवसांची शिदोरी पुढील 365 दिवस निश्चित पुरेल असा मला विश्वास वाटतो.
प्रा. हरी नरके

Tuesday, August 14, 2012

विलासराव देशमुख : उमदा लोकनेता


महाराष्ट्राचे नेते विलासराव देशमुख यांच्या निधनाने एक उमदा लोकनेता आपण गमावला आहे. ते विलक्षण मुत्सद्दी,उत्तम प्रशासक, उत्तुंग महत्वाकांक्षा,विनोदबुद्धी आणि विलासी देशमुखी जीवनशैली यांचे वेगळे रसायन होते.ते  मुख्यमंत्री झाले तेव्हाची गोष्ट:
१] मी त्यांची वेळ घेवुन त्यांना भेटलो.लेखी पत्र दिले.राजर्षी शाहु महाराजांची जयंती राज्यात शासनाने साजरी करावी अशी मागणी केली.ते म्हणाले, "तुमची मागणी चांगली आहे.पण आजवर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांच्या नजरेतुन ही गोष्ट कशी सुटली? ते तपासुन बघावे लागेल.पुणेकर काय म्हणतील हेही बघावे लागेल." त्यांनी उपसचिव श्री.भुषण गगराणी यांना बोलावले, अहवाल द्यायला सांगितला. गगराणी कोल्हापुरचे आणि माझे मित्र. त्यांनी तात्काळ अनुकुल अहवाल दिला. विलासरावांनी जी.आर.काढण्याचे आदेश दिले.महाराजांच्या जन्माला १२५ वर्षे आणि निर्वाणाला ८० वर्षे झाल्यानंतर प्रथमच राज्यात  शाहुजयंती शासकीयस्तरावरुन सर्वत्र साजरी होवु लागली.पुढे हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केला जावु लागला. लातुरच्या एका जयंती कार्यक्रमाला ते उद्घाटक असताना त्यांनी मला प्रमुख वक्ता म्हणुन आवर्जुन बोलाविले होते.
२]सरकारतर्फे दरवर्षी उत्तम ग्रंथांना पुरस्कार दिले जातात.मी मंत्री रामकृष्ण मोरे यांना हा कार्यक्रम दरवर्षी साहित्यप्रेमी नेते आणि राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला घेण्याची सुचना केली.ती त्यांना आवडली.ते मला घेवुन लगेच मुख्यमंत्री विलासरावांकडे गेले. विलासरावांपुढे  आम्ही हा दिवस "संस्कृती दिन" म्हणुन साजरा करण्याची कल्पना मांडली.त्यांना ती इतकी आवडली की ते म्हणाले आत्ताच्या आत्ता एंटीचेंबर्मध्ये बसुन प्रस्ताव तयार करा,उद्याच्या केबिनेटमध्ये मंजुर करुन घेवु.आम्ही केलेला प्रस्ताव त्यांनी मंजुर करुन घेतला.पहिल्या पुरस्कार वितरण आणि साहित्यसंमेलनाच्या या कार्यक्रमाला ते स्वता क-हाडला आले.त्या सुंदर एक दिवसीय संमेलनाचे सुत्रसंचालन मला देण्यात आले होते.
३]विलासराव शिक्षण व सांस्कृतिक  खात्याचे मंत्री असताना फुले-आंबेडकर प्रकाशन समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष होते.मी सदस्यसचिव होतो.  आम्ही संपादित केलेला आणि साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला डा.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ शासनाने सवलतीत अवघ्या ६० रुपयांना द्यावा अशी मी सुचना केली. त्यांनी त्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठवुन तो मंजुर करुन घेतला आणि ते पुस्तक ६० रुपये किमतीत मिळेल याची व्यवस्था केली.
४] बाबासाहेबांच्या साहित्याच्या १९ व २० व्या  खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री विलासरावांच्या हस्ते करण्याचे ठरले.ग्रंथ तयार होते, काही अडचणींमुळे प्रकाशन लांबले होते. विलंबाबद्दल काहींची नाराजी होती.के.सी.कोलेजात ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात ते करावे असे ठरले. कार्यक्रमाच्या काहीतास आधी ऎनवेळी  विलंबाबद्दल नाराजी दाखवणा-या एका मोठ्या नेत्याने आपण व्यक्तीगत अडचणींमुळे कार्यक्रमाला येवु शकत नसल्याने कार्यक्रम पुढे ढकला असे विलासरावांना फोनवरुन सांगितले. त्यांनी मला मंचावर बोलवुन घेतले आणि प्रकाशन करुया नको, असे सांगितले. मी हो म्हणालो, पण माझी नाराजी त्यांनी हेरली.ते मला म्हणाले, "तुम्ही तरुण आहात,तुम्हाला कल्पना नाही, हा नेता फार न्युशंन्सव्हेल्युवाला आहे. उद्या डोक्याला ताप करील. कटकट नको." प्रकाशनाचा कार्यक्रम झाला नाही. पुढे या नेत्याने त्याच्या सोयीने त्याच्या गावात हा कार्यक्रम ठेवला.तेव्हा मात्र विलासरावांनी काहीतरी कारण सांगुन कार्यक्रमाला जाण्याचे शिताफीने टाळले.
५]विलासराव "हेपी गो लकी" वाटावेत असे कायम वागत असत. ते फ़ारसे गंभीर आहेत असे कधीच वाटत नसे. लातुरच्या एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी आम्हा काहीजणांना सकाळी बाभुळगावच्या त्यांच्या देशमुखी गढीवर  चहा-नास्त्याला बोलावले.ठरल्याप्रमाणे सकाळी ९ वा आम्ही गेलो.पण विलासराव आरामात १२ वाजता झोपेतुन उठले, त्यामुळे आम्ही तसेच परत आलो. माझ्यासोबत काही पत्रकार,साहित्यिक आणि प्रशासनातले ज्येष्ठ अधिकारी होते. देशमुखी थाठाचा तो अनुभव होता.दुपारी भेटल्यावर हसुन ते म्हणाले, पुणेकर,पुढच्यावेळी याल तेव्हा मात्र चहा-नास्ता घेतल्याशिवाय जायचे नाही बरंका!
६]मुंबई महापुर, रेल्वे बाम्बस्फोट, शेतकरी आत्महत्या,सानंदा प्रकरण,सुभाष घई प्रकरण या सगळ्यांत त्यांनी कायम "आदर्श व्यवहारवाद" सांभाळला.काही म्हणुन अंगाला लावुन घ्यायचे नाही, सगळे लक्ष हायकमांड आणि त्यांचे हितसंबंध सांभाळण्यावर केंद्रीत करायचे यात ते वाकबगार होते.जातवार जनगणनेमुळे ओबीसी राजकारण बळकट होईल म्हणुन त्याला त्यांनी जाहीरपणे विरोध केला.सरकारने जनगणनेचा अनुकुल निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मौन बाळगले. शेतक-यांना न्याय देण्यातले राज्यकर्त्यांचे-सत्ताधा-यांचे अपयश जेव्हा ठळकपणे पुढे येवु लागले तेव्हा त्याच्याकडुन सामान्य शेतक-याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सत्ताधारी जातीला आरक्षणाचे गाजर दाखवुन  जे राजकारण केले गेले त्यात विलासराव भुमिगत राहुन रसद पुरवित होते.
७]पद्मगंधा दिवाळी अंकाने सर्व मंत्री,  उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बायकांच्या मुलाखतीवर आधारित अंक काढला होता. त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्री गणपतराव देशमुख यांच्या पत्नींच्या दिलखुलास व बहारदार मुलाखती होत्या.विलासरावांच्या पत्नीने आपण "देशमुख" असल्याने "मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलो" तरी मुलाखत देवु शकत नाही, असे कळवळुन सांगितले होते.
विलासरावांच्या कितीतरी आठवणी सांगता येतील.
त्यांना माझी विनम्र श्राद्धांजली!

Sunday, August 12, 2012

ह्रद्य संवाद


E-mailPrintPDF
ukal-hari-naik









अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. नेहमीप्रमाणे ही निवडणूक गाजू लागली आहे. पावसाळ्यात उगविणार्या छत्र्यांप्रमाणे हे वाद उगवतात, गाजतात आणि पेल्यातील वादळाप्रमाणे शमतातही. शासकीय अनुदान आणि देणग्या व  प्रायोजक यांच्याद्वारे  कोटय़ावधी रुपये जमा केले जातात, मानधन प्रवासखर्च आणि डामडौल यावर ते खर्ची पडतात. तेच ते वक्ते, तीच ती भाषणे आणि त्याच त्या कविता असा अत्यंत निर्जीव, निरस, शीण आणणारा एक निरर्थक उपचार पार पाडला जातो. जत्रा `जंक्शन' होते. निष्पन्न मात्र काहीच नाही असा हा आता परिपाठच झाला आहे. अशावेळी असे साहित्य संमेलन की ज्यात अध्यक्षपदाच्या निवडीचे वाद नाहीत, मुळात ज्याला अध्यक्षच नाही, कोणीही निमंत्रित वक्ते नाहीत, साचेबंद वेळापत्रक नाही. सर्व मान्यवर लेखक स्वखर्चाने येतात, तीन दिवस, चार रात्री रसिकवाचकांसोबत एकत्र राहून हृदयसंवाद साधतात, जाताना भरभरुन आनंद आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन जातात, असे साहित्य संमेलन आज अस्तित्वात आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय? पाचगणीजवळ खिंगर नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाच्या कुषित वसलेले, नितांतसुंदर! तिथे 27 ते 29 जुलै या काळात हे साहित्य संमेलन पार पडले. सुमारे 150 लेखक, कवी आणि रसिक तीन दिवस चार रात्री धो धो पावसात रमले होते. गप्पांचे फड रंगत होते.
मान्यवरांसोबत रसिकही व्यासपीठावरुन बोलत होते. ख्यातनाम लेखक श्री.राजन खान यांची ही अलिबाबाची गुहा. यांच्या अक्षर मानव या संस्थेतर्फे गेली चार वर्षे हे साहित्य संमेलन भरविले जाते. रंगनाथ पठारे, विद्या बाळ, नीरजा, अशोक राणे, रेखा देशपांडे, किशोर कदम, अश्विनी धोंगडे, सुमती लांडे, प्रसाद कुलकर्णी, हरिश सदानी, हेमंत जोगळेकर, सुमती अरळीकर, छाया कोरगावकर, विद्यालंकार घारपुरे, अनुराधा औरंगाबादकर, हेमंत पाटील, शरद लांजेवार, छाया महाजन, साहेबराव ठाणगे, पवन वैद्य, अनिल सपकाळ, महावीर जोंधळे, शमशुद्दीन तांबोळी, संतोष नारायणकर आणि इतर अनेकजण मोठय़ा मेळ्याने या संमेलनात घरचे कार्य समजून वावरत होते. या संमेलनाला उद्घाटक, अध्यक्ष, निमंत्रित वक्ते असे चौकटीतील काहीही नसते. सगळे कसे अनौपचारिक, उत्स्फूर्त आणि मोकळे ढाकळे. म्हणूनच जिवंत आणि सच्चे. या संमेलनाला कुठलेही शुल्क आकारले जात नाही. सगळ्यांचे सगळ्यांनी ऐकणे, स्वतःचे बोलून निघून न जाणे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणे मात्र बंधनकारक असते. राजन खान यांनी प्रास्ताविक केल्यानंतर अचानक सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना मंचावर निमंत्रित करुन मनोगत व्यक्त करायला सांगितले. हेच साहित्य संमेलनाचे उद्घाटन होते. त्यानंतर समारोपापर्यंत तीन दिवस याच पद्धतीने कार्यक्रम चालू होता. आता कोण बोलणार आहे हे राजन खान सोडले तर कोणालाही माहीत नसायचे. कोणाही वक्त्यांना पूर्वकल्पना दिली जात नसे. अनेकदा रसिक वाचक किंवा श्रोते म्हणून आलेल्यांनाही बोलायला सांगितले जाई. त्यांची तारांबळ उडे पण अनेकदा फार दर्जेदार, ताज्या दमाचे, नवेकोरे आणि चाकोरीबाहेरचे ऐकायला मिळे. गुजरातमधून घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या शामिया मिर्झा आणि निमेष पटेल या नवविवाहित जोडप्याचे अनुभव तसेच हिरकणीचे बिर्हाड, या गाजणार्या आत्मकथनाच्या लेखिका सुमती अरळीकर आणि त्यांचे पती दिलीप अरळीकर यांचे आंतरजातीय विवाहाचे आणि सहजीवनाचे अनुभव उपस्थितांना थरारुन सोडणारे होते. तरुण पिढीतील दोन मुलींनी मांडलेली मते शॉक ट्रिटमेंट देणारी होती. किशोर कदम यांचे सिनेसृष्टीतील अनुभव चिंतनाला खाद्य पुरविणारे होते. हेमंत पाटील आणि शरद लांजेवार यांनी गुजरात आणि आंध्रच्या सामाजिक जीवनाचे केलेले विश्लेषण संपूर्ण नवे आणि वेगळे होते. तीन दिवसात चाळीसपेक्षा अधिक लोक बोलले त्यात क्वचित काही जणांचा सूर लागला नसला किंवा काहींनी थोडाफार अपेक्षाभंगही केला असला तरी एकूण लेखाजोखा श्रीमंत करणारा होता. नीरजा म्हणाल्या, समाजाच्या दडपणामुळे कलावंताचा कोंडमारा होत असतो. शब्दाशब्दांवर आजकाल काही संघटना सेन्सॉरशीप लादताना दिसतात. निकोप लोकशाहीला आणि लेखन स्वातंत्र्याला बाधक असलेली ही झुंडशाही कलावंतानी झुगारली पाहिजे.
नीरजा यांच्या विवेकी, आत्मसंवादी आणि प्रागतिक चिंतनाने या संमेलनाची उत्तम पायाभरणी केली. समारोपाला रंगनाथ पठारे यांनी शेती, शेतकरी, राज्यकर्ते आणि जागतिकरण यांचा एक धारदार छेद प्रस्तुत केला. आपण स्वतः शेतकरी समाजातून आलो असून आता शहरात राहून, वर्ग आणि वर्गजाणीवा बदलल्या तरी या प्रश्नांशी नाळ जोडलेली असल्याने या जगातल्या गुंतागुतीच्या रसायनाशी आतडय़ाचे नाते आहे. आजचे राज्यकर्तेच शेतकर्यांचे खरे शोषणकर्ते आहेत, असे खडे बोल त्यांनी सुनावले. हरीष सदानी यांनी स्त्री भ्रूणहत्या या शब्दाऐवजी आपण त्रीलिंगी गर्भपात हे शब्द वापरावेत अशी साधार मांडणी केली. साहेबराव ठाणगे यांनी आजच्या खेडय़ाचे बदलते वास्तव उलगडूनदाखविले. ते म्हणाले, माझ्या गावातील 40 वर्षांचे चुलत भाऊही ज्येष्ठ नागरिक म्हणून एस.टी.चे अर्धे  तिकीट काढून प्रवास करतात आणि बापाला उपाशी मारणारेच दहाव्याला अख्या तालुक्याला जेवायला घालतात! हेमंत जोगळेकरांनी समाजात चालणार्या अनेक गोष्टी शेअर केल्या. माझं आयुष्य म्हणजे केवळ एक टिंब आहे असं म्हणणार्या अनुराधा औरंगाबादकरांनी आपल्या अनुभवकथनाने उपस्थितांना खिळवून ठेवले. रेखा देशपांडे म्हणाल्या, बाईचं पिढय़ानुपिढय़ा ऐकलं गेलं नाही. आता ते ऐकले जायला लागले आहे. तेव्हा आता बायकांनी कंठाळी बोलण्याऐवजी शांतपणे बोलले तर ते अधिक प्रभावी ठरेल. सुमती लांडे म्हणाल्या, मला बाईपणाकडून माणूसपणाकडे जायला आवडते.  आज चाळीशीची प्रत्येक स्त्री घाबरलेली आणि तरुणपिढी गोंधळलेली आहे. मुलं अपडेट आहेत पण वाचत नाहीत त्यामुळे आई धास्तावलेली असते. प्रत्येक सत्रात प्रश्नोत्तरे होत असत. रंगनाथ पठारे यांनी लेसिंग डोरिस यांच्या `द गोल्डन नोटबुक' या त्री-पुरुष संबंधावरील जागतिक साहित्यातील मानदंड ठरलेल्या गंथांच्या तोडीचे लेखन भारतीय त्रियांनी करावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. मराठा सेवा संघाच्या अशोक राणांना त्यांच्या दांभिक भाषणामुळे रंगनाथ पठारे आणि इतर अनेकांनी फैलावर घेतले. आपण जात मानत नाही म्हणणारे राणा नंतर मात्र आपण अमुक जातीचे नाही वगैरे बोलू लागले.
खेडेकरांचे जातीय दंगलीचे तसेच विशिष्ट समाजातील सर्व पुरुषांची कत्तल करण्याला चिथावणी देणारे लेखन आपण वाचलेले नाही असे सांगून त्यांनी अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. त्यांची भाषणबाजी कुणालाच आवडली नाही. जातीय संघटनांचा प्रचार करण्याच्या त्यांच्या भूमिकेला सर्वांनी कडाडून विरोध केला. राज्यात दहशतवाद पसविणार्या समाजविघातक विचारांना अशा मंचावरुन झालेला विरोध हे सुचिन्हच म्हटले पाहिजे. साहित्यिक मंडळी अभासात वावरतात आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर हे चित्र फार भावणारे होते. प्रसाद कुलकर्णी, अशोक राणे, अश्विनी धोंगडे, विद्या बाळ, राजन खान आणि हरी नरके आदींच्या मनोगतानाही उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. तीन दिवस कोसळणार्या पावसात सतत होत असलेल्या या द्वंदसंवादाने सगळेच चिंब भिजून निघाले. `अभासात' संमेलनाला विटलेल्या साहित्यप्रेमींना एक चौकटी बाहेरची सुंदर वाट या संमेलनाने दाखविलेली आहे. अशी संमेलने गावागावात झाली तर मराठी साहित्याची मरगळ आणि शिण झटकला जाईल आणि मराठीला नवी पालवी फुटेल यात शंका नाही. पुढील वर्षीच्या संमेलनाला नक्की यायचंच असा निर्णय घेऊन मंडळी परतली. समाज साहित्य संमेलनाने मला दिलेली तीन दिवसांची शिदोरी पुढील 365 दिवस निश्चित पुरेल असा मला विश्वास वाटतो.

Wednesday, August 1, 2012

Panel has PROOF to make Marathi classical language


The committee working to prepare a base for the demand of classical status to Marathi language is confident to have achieved the proofs of fulfilling the criteria to obtain the status.

The proofs that have accumulated by the committee run back to as many as 2,219 years ago when the script was written in Brahmi, which is the rootscript of Marathi.

After the decision to demand the classical status for the Marathi language was taken by the state government, a committee of experts was constituted under the chairmanship of writer Ranganath Pathare.

The panel, which has been working on the project, feels that the language fulfils all the four criteria to obtain the status.

Hari Narake, historian and member of the committee, claimed to have accumulated number of proofs proving the language to be more than 2000 years old.
“Shilalekhs written in 207 BC in Brahmi scripts are available. Gatha Saptashati, a book by Hal, Satvahan Nripati, was written in the first century and contains 700 shlokas. The novel is in Prakrit-Maharashtri language,” Narke said.

He added that they have enough literature available in the language to prove the inter- connection of its ancient, mid-age and modern age literature.

He added the Bhandarkar Oriental Research Institute in Pune has more than 80 manuscripts that are more than 1,500 years old.

The criteria to obtain the classical language status include high antiquity of its early texts/recorded history over the period of 1,500 to 2,000 years; ancient literature/text as valuable heritage by generations of speakers; literary tradition be original and not borrowed from another speech community and classical language and literature being distinct from modern but should have internal linkage with each other.


An official from Mantralaya said after the state made an appeal to the people for suggestions and to provide the supportive documents, the response was tremendous.

“But the letters we received were more of well wishes and less of providing any documents. The committee had to research on its own,” he said. The officer added that once the report was submitted, the proposal would be sent.


{DNA..30 July2012, ...By ...Surendra Gangan}