Monday, November 18, 2013

कोहम महोक यांचा कुत्सितपणा



कोहम महोक यांच्या फेसबुकवर त्यांनी जातीवर्चस्व-जात्याभिमान आणि वर्णश्रेष्ठत्वाचा उग्र पुरस्कार करणारी एक पोस्ट टाकलेली आहे. त्यात सावित्रीबाईंचे कार्य शालेय शिक्षणात होते म्हणून  त्यांचे नाव एखाद्या शाळेला द्यावे असे अत्यंत कुत्सितपणे सुचवले आहे. ही सावित्रीबाईंची प्रच्छन्न टवाळी आहे. त्यांचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्या चर्चेतील काही अंश माहितीस्तव खाली देत आहे. श्री.राजन दांडेकर, श्री.मयुरेश कुलकर्णी आदींनी कोहमना सडेतोड उत्तरे दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
Koham Mahok
November 12
सध्या एक जातीयवादी वाद जोर धरू पाहतो आहे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे की जिजाबाई भोसले यांचे नाव द्यावे. सर्वसाधारणपणे मराठा आणि माळी/ इतरेजन असे ह्या वादाचे स्वरूप आहे. ह्या वादात माझ्या माहितीतील सर्व ब्राम्हणांनी सावित्रीबाई फुल्यांच्या बाजूने मत दिलेले आहे. उस्फुर्त चर्चेत सुद्धा ब्राम्हण युवक आणि इतर, सावित्रिबाइंच्या नावाला पाठींबा देत आहेत. ही घटना ब्राम्हण समाजाच्या विद्यादानाच्या क्षेत्रातील आणि पुणे विद्यापीठातील कमी होत चाललेल्या इंफ्ल्यूयन्सचे द्योतक आहे.
ह्यामागे लक्ष्यात घेण्याच्या काही गोष्टी आहेत:
१. जिजाबाई आणि सवित्रिबाई ह्यांची नावे चर्चेत असताना, बायबाई कर्वे, आनंदीबाई जोशी, अथवा झाशीची राणी लक्ष्मिबाइ यांची आठवण पण झालेली नाही. मला वाटते सवित्रिबाइंचे कार्य हे प्राथमिक शिक्षणात होते तेव्हा एखाद्या शाळेला (अजून दिलेले नसेल तर) त्यांचे नाव द्यावे हे जास्ती सयुक्तिक नाही का?
२. सावित्रीबाई ह्या म. फुल्यांचा ब्राम्हणद्वेषाच्या बाजूने होत्या की विरुद्ध ह्याचा खुलासा/ संशोधन होणे जरुरीचे आहे. म. फुले हे ब्राम्हणद्वेषाच्या बाबतीत तत्कालीन संभाजी बिग्रेड स्टायल (अहिंसक जहाल विरोधी) होते हे लक्ष्यात घेतले पाहिजे.
३. जिजाबाई ह्या नक्कीच ब्राम्हणद्वेषी नव्हत्या, मग ब्राम्हण समाजाने जिजाबाईच्या नावामागे का बरे उभे राहू नये?
सारांश, हा वाद निरर्थक आहे, आणि कोहमला स्वतःला शिक्षणाच्या घसरत चाललेल्या दर्जाच्या (ब्राम्हणांची कमी होत चाललेली संख्या हे घसरणाऱ्या दर्जाचे कारण आहे का?) संस्थेमागे कोणाचे नाव लागते ह्याची आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव लागत नाही ह्याचे बिलकुल वैषम्य नाही. किंबहुना झाशीच्या राणीचे नाव असल्या दर्जाहीन विद्यापीठाला नकोच, हे मात्र खरे.
पण सामाजिक वादात ही एक नवी "संधी" ब्राम्हण समाजाच्या बाजूला भविष्यात असणार आहे. ह्या असल्या आपापसात होणार्या वादात ब्राम्हण समाजाने एकजुटीने किंगमेकर होण्याची गरज आहे. तटस्थपणे नाना फडणवीसाला स्मरून किंगमेकर व्हा हा ह्या आधुनिक नामांतराचा धडा आहे.

बाकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा जिजाबाई भोसले पुणे विद्यापीठ ह्या वादात आपले मत कुणाला?
- कोहम
Rajan Dandekar स्त्री आणि अन्याय विधवा आणि अन्याय ह्यात अग्रेसर हा शतकानुशतके ब्राह्मण समाज होता...... आणि नाना फडनविस चा वारसा चालवणे म्हणजे व्यभिचाराचा वारसा चालवणे.....!!!!!! फुले आणि मराठा सेवा संघ यांत मुलभूत फरक आहे. फुले यांनी भटशाहीचा विरोध केला.... प्रतीकांवर हल्ला चढवून बळी सारख्या नायकाचे पुनर्र्जीवन केले.... फुल्यान्सोबत अनेक जन्माने ब्राह्मणही होते.... मसेस मात्र व्यक्ती म्हणूनही ब्राह्मणाचा द्वेष करतात. अर्थात याला विरोध करायलाच हवा.... सावित्रीबाई अश्या काळात प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम केले जेव्हा स्त्रिया आणि शुद्र यांना न्यानबंदी होती.... भटाळलेले पुणे विद्यापीठ कितीही घाणेरडे आणि बामणी जात्यांधांचा अड्डा असले तरी या निर्णयाचे स्वागत करायला हवे. जुलमी पेशवाई आणि सदाशिव पेठी मक्तेदारीला मिळालेली ही चपराक आहे....!!!!!!
November 13 at 2:41pm · Like · 2

Koham Mahok Rajan - राजन - मी आपल्या मताचे किंबहुना मतभेदाचे स्वागतच करतो. आपल्याकडे महापुरुषांना देवत्व बहाल केले जाते आणि तसे झाले की त्या महापुरुषाची कोणतीच गोष्ट चुकीची असूच शकत नाही. बहुजनांना ज्ञानबंदी होती ह्या विधानाला माझा आक्षेप आहे. अगदी शिवकालापासून बहुजन हे शिकत होतेच फक्त सामाजिक रचनेमुळे त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. अगदी आज २० १३ साली सुद्धा बहुजन समाज शिक्षणाबाबत उदासीनच दिसतो. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी सुद्धा हीच स्थिती आहे आणि ह्याला जबाबदार कोण? ब्राम्हण?
[फुले यांनी भटशाहीचा विरोध केला.... प्रतीकांवर हल्ला चढवून बळी सारख्या नायकाचे पुनर्र्जीवन केले.... फुल्यान्सोबत अनेक जन्माने ब्राह्मणही होते.... मसेस मात्र व्यक्ती म्हणूनही ब्राह्मणाचा द्वेष करतात. अर्थात याला विरोध करायलाच हवा]
जसे बहुजन पिढीजात चालत आलेल्या जातीय समाजरचनेचे बळी होते तसेच ब्राम्हण पण बळी होते. सर्व समाजरचनेला ब्राम्हण समाजाला दोष देणे हेच मुली मला मान्य नाही. हजारो वर्षांपूर्वी जी सिस्टीम प्रथा ज्या कोणी पडली होती त्याला सध्याच्या ब्राम्हण समाजाला जबाबदार धरणे हेच मुळी चुकीचे आहे. म. फुलेंच्या कार्यात अनेक चांगल्या गोष्टी असतील पण ते ज्या रीतीने ब्राम्हण समाजाला जबाबदार धरून ठोकायचा प्रयत्न करायचे ते मात्र चुकीचेच आहे. अर्थात म. फुलेंना देवत्व बहाल करणाऱ्यांना त्यांचे माणूस असणे आणि त्या न्यायाने एखादी भूमिका चुकीचे असणेच जर मान्य नसेल तर बोलणेच खुंटले.
खुलासा: आपण म्हणता की मसेस व्यक्ती म्हणून द्वेष करतात आणि फुले भटशाहीचा विरोध करतात. दोन्हीही विरोध माझ्या दृष्टीने चुकीचेच. आणि मी आधी म्हणाल्याप्रमाणे म. फुले हे आद्य ब्राम्हणद्वेषी होते. त्यांचा ब्राम्हणद्वेष हा सध्याच्या लिंगपिसाट खेडेकर, मेश्राम आदी लोकांपेक्षा भले मवाळ असेल, पण ह्या खोडकर द्वेषाची सुरुवात म. फुल्यांनी केली होती ही गोष्ट मी आपल्यासमोर नमूद करू इच्छितो.
म. फुले आणि त्यांचे जातीनिर्मुलन/ शिक्षणामधले कार्य ह्या विषयी किंचितही दुरादार न दाखवता मी हे आपल्या समोर आणु इच्छितो, कारण मी म. फुल्यांना माणूस मानतो, देव नव्हे. - कोहम
Rajan Dandekar बुद्धासकट सर्वांना देवत्व बहाल करून संपवण्याचा वैदिक धंधा हा ब्राह्मणांच्या पिढीजात वारसाहक्काचे द्योतक.... त्यामुळे आम्ही नास्तिक देवत्व बहाल करण्याच्या भानगडीत कशाला पडू....????? (सवित्रिबाइंचे कार्य हे प्राथमिक शिक्षणात होते तेव्हा एखाद्या शाळेला (अजून दिलेले नसेल तर) त्यांचे नाव द्यावे हे जास्ती सयुक्तिक नाही का?) कुत्सित पणा आणि (जिजाबाई आणि सवित्रिबाई ह्यांची नावे चर्चेत असताना, बायबाई कर्वे, आनंदीबाई जोशी, अथवा झाशीची राणी लक्ष्मिबाइ यांची आठवण पण झालेली नाही.) जात्याभिमान व वर्णश्रेष्ठत्व दिसून आले.....!!!!!!
Koham Mahok Rajan -
राजन - वर्णाभिमान? जसे आपण मान्य कराल की ब्राम्हण इतर कोणत्याही जतिपेक्षा श्रेष्ठ नाहीत, तसेच मी मानतो की ब्राम्हण हे इतर कोणत्याही जतिपेक्षा कनिष्ठपण नाहीत. आपण ही भूमिका मान्य कराल का?
वर्णव्यवस्थेला मी ब्राम्हण म्हणून एकटाच जबाबदार नाहीये, आणि ही सत्य भूमिका आपल्याला अवघड आहे. मुद्दा आहे ब्राम्हणद्वेषाचा, आणि ब्राम्हणद्वेष म. फुल्यांच्या काळात पण चुकीचा होता आणि आज पण आहे.
आपण निरीश्वरवाडी असाल पण आपण म. फुल्यांना ईश्वरासमान मानत असे माझे मत आहे.
November 13 at 3:58pm · Like · 3

Rajan Dandekar ब्राह्मण्य आणि ब्राह्मण व्यक्ती ह्यातील फरक तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जन्माने ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचेच आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त भूमिकांना विरोध हा असणारच.....!!!!!! तुमच्या भूमिका ब्राह्मण्य ग्रस्त नाहीत काय....?????
Rajan Dandekar Ketan Mahajani या बाबत माझी भूमिका तुम्ही कोहमांना विचारा ते सांगती..... मराठा सरंजामी जात्यंधाविरोधात कायमच आक्रमक भूमिका आम्ही घेतलेली आहे,
Rajan Dandekar कोहम पेशवाईचा सामाजिक इतिहास जरा तपासून पहा...... महात्मा फुले यांची प्रतिक्रिया आणि क्रिया ही कालानुरूप होती, यात शंकाच नाही. आणि हजारो वर्ष राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि जुलमी धार्मिक अबाधित सत्ता अगदी मोगलाइतहि ज्या ब्राह्मण वर्गाने इतर समाज घटकांना ओरबाडून उपभोगली त्या समाजाने खर तर इथल्या सामंजस आणि अतिरेकविहीन समाज धारणेचे ऋणी असले पाहिजे..... आणि सरंजामी शक्तींच्या विरोधात दलित श्रमिक आदिवासी महिला आणि प्रगतिशील शक्तीन्सोबत उभे ठाकले पाहिजे..... सामुराई जातीने जपान मध्ये जसे सर्व अधिकार राष्टउनातीसाठी सोडले व आपले अस्तित्व जपानी नागरिक म्हणून ठेवले तसे..... पण हिटलरची पूजा करून हिंदुराष्ट्राच्या नावाखाली चातुर्वर्ण्य पुन्हाः प्रस्थापित करण्याची हुकुमशाही स्वप्ने पाहणे यात नामशेष होण्याचा पुढे धोका आहे......!!!!!! गोडसे ने केलेले राजकीय नुकसान याबाबत विचार करा......
November 14 at 8:57am · Like · 2

Koham Mahok Rajan - राजन - पेशवाई आणि तेव्हा काय झाले, किती चूक होते हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे, आणि तेव्हा फक्त ब्राम्हण समाज सत्तेत, उच्चवर्नियांत नव्हता आणि पण त्यामुळे "फक्त" ब्राम्हण समाजाला ज्या रीतीने म. फुले यांनी टार्गेट केले ते चुकीचे होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मुलनाची चळवळ, ह्या म. फुल्यांच्या अतिरेकी टीकेमुळे कमी झालेल्या ब्राम्हण आणि मराठा समाजाच्या पाठीम्ब्याशिवाय मागे पडली. आजही जाती समाजात घट्ट स्थान पटकावून आहेत.आणि ह्याचा थोडासा का होईना दोष म. फुल्यांकडे जातो. माझ्यासारख्या जातीवर अजिबात विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याचे वैषम्य वाटते. ब्राम्हण कोनपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण त्याच न्यायाने ते कनिष्ठ सुद्धा नाहीत. - कोहम
Mayur Kulkarni "जसे बहुजन पिढीजात चालत आलेल्या जातीय समाजरचनेचे बळी होते तसेच ब्राम्हण पण बळी होते"

_/\_
Gabbar Singh bichara daku prathecha bali hota.
November 13 at 3:24pm · Like · 1

Koham Mahok Mayur Kulkarni -
डाकू ही काय जात आहे काय? आपल्याला मला काय म्हणायचे तेच समजलेले नाही.
November 13 at 3:27pm · Like

Mayur Kulkarni Chngalach samajlay.

Oppressors are oppressors, they can't be the victims of that same oppression.
We can make tomorrow better by accepting the shortcomings of the past.
Truth is we (brahmin's) were oppressors, we treated dalit people with lesser status than animals. We were the people who threw faeces at them.. We still do by our words.
November 13 at 3:32pm · Like · 1
Koham Mahok Mayur Kulkarni - that is ridiculous, I koham, has never done that, neither I consider any other caste any lower, nor oppress anyone, much less threw feces at any one. Most of the bramhins are like that, and are being blamed for eternity. How about the second layer of the caste system? If anyone was violent against dalits (even today's day and age), that was this second layer of caste based model? I don't see M. Phule criticizing marathas for any of the atrocities. This selective outrage is what I want to point out and condemn. If you want to worship M. Phule as a God, that is your choice. - koham
November 13 at 3:39pm · Like · 1
Mayur Kulkarni I am atheist & don't worship anyone as god. Someone saving different views than you doesn't he is idolizing people.
Brahmin were the highest echelons & most prominent beneficiaries of the caste system.

I agree, that today we are not the most aggressive of oppressors, maratha have overtook us. But we once hold power even over maratha king Shivaji maharaj. He had to prove that he wasn't a Shudra & had ties with Sisodiya clan to prove his Kshatriya status.
This says a lot.

I am happy most of us don't think same wy today. The reason I support to name change is she was a first woman teacher in first woman's school of India.
Her husband being Brahmin hater or not is other issue, we can't take her work away from her. We are talking about naming a university, her works regarding that field should be consider like a rational mind. Not her husband's communal views, that is just plain stupid or far fetched in order to oppose her name.
Koham Mahok Mayur - I may agree with the last paragraph of what you have said. But you are guessing, do we know or has anyone researched Shrimati Savitribaai's disposition about bramhins? Thanks for agreeing that bramhins are not the aggressors, this is a beginning . Mahatma Phule was the seed of organizations like Sambhaji B-grade and BAMSEF by their own admission. I disagree that bramhins were the only beneficiaries of caste system, kshatriyas were equally benefited by the caste system. - koham
Koham Mahok Rajan - [ब्राह्मण्य आणि ब्राह्मण व्यक्ती ह्यातील फरक तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जन्माने ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचेच आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त भूमिकांना विरोध हा असणारच.....!!!!!! तुमच्या भूमिका ब्राह्मण्य ग्रस्त नाहीत काय....?]
माझा ब्राम्हण म्हणून द्वेष न करण्याबद्दल धन्यावाद.
जर का कोणीही मी ब्राम्हण जातीत जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ आहे असे म्हणत असेल तर त्याला माझा पण विरोध राहील.
माझी भूमिका एकाच आहे - ब्राम्हण म्हणून कोणीही श्रेष्ठ नाही तसेच ब्राम्हण म्हणून कोणीही कनिष्ठ नाही. हजारोवर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टींना "फक्त" ब्राम्हण समाजाला जबाबदार धरून ठोकू नका. इथे म. फुले चुकले असे मी खेदाने नमूद करतो, कारण खोडसाळ ब्राम्हणद्वेषाची सुरुवात तेव्हापासूनच झाली.
Koham Mahok Rajan - राजन - पेशवाई आणि तेव्हा काय झाले, किती चूक होते हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे, आणि तेव्हा फक्त ब्राम्हण समाज सत्तेत, उच्चवर्नियांत नव्हता आणि पण त्यामुळे "फक्त" ब्राम्हण समाजाला ज्या रीतीने म. फुले यांनी टार्गेट केले ते चुकीचे होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मुलनाची चळवळ, ह्या म. फुल्यांच्या अतिरेकी टीकेमुळे कमी झालेल्या ब्राम्हण आणि मराठा समाजाच्या पाठीम्ब्याशिवाय मागे पडली. आजही जाती समाजात घट्ट स्थान पटकावून आहेत.आणि ह्याचा थोडासा का होईना दोष म. फुल्यांकडे जातो. माझ्यासारख्या जातीवर अजिबात विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याचे वैषम्य वाटते. ब्राम्हण कोनपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण त्याच न्यायाने ते कनिष्ठ सुद्धा नाहीत. - कोहम

https://www.facebook.com/koham.mahok


No comments:

Post a Comment