Thursday, November 14, 2013

श्री.विश्वंभर चौधरी आणि सोशल आ‘डीट






Mandar Lele श्री.विश्वंभर चौधरी यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. पुणे विद्यापिठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ होणार असा सिनेटचा ठराव होताच हातातील सगळी कामे बाजूला ठेवून श्री.विश्वंभर चौधरी यांनी २ दिवसात लोकसत्तेत लेख लिहिला यावरून त्यांचा नामविस्तार आणि विद्यापिठाची शैक्षणिक गुणवत्ता याबाबतचा प्राधान्यक्रम स्पष्ट होतो. ते म्हणतात माझा सावित्रीबाईंच्या नावाला विरोध नाही.सर, मुद्दा असाय की आपला पाठींबा का नाही? आपल्याला त्यांच्याबद्दल आदर आहे तर नामविस्ताराला पाठींबा द्यायला अडचण काय? आपला लेख मला आवडला नव्हता. कारण तुम्ही "स्वसंरक्षणार्थ आपला विरोध नाही असे मी पुन्हा सांगतो" असे लिहिता यातच सगळे आले. सावित्रीबाईंमुळे जर तुमची आईबहिण पत्नी शिकली तर त्यांच्या नावाला खुल्यादिलाने पाठिंबा देण्यात तुम्हाला अडचण काय? तेच मला समजत नाही.तुम्ही हा लेख लिहून सावित्रीबाईंना मानणार्‍या सगळ्यांची मने गरज नसताना दुखावलेली आहेत. शब्दच्छल करणे, कावेबाजपणे शाब्दीक कसरती करणे हा उद्योग आतातरी आपण सोडला पाहिजे.आपल्या पुर्वजांच्या चुका {सावित्रीबाईंवर चिखलफेक करण्याच्या}निस्तरण्याची चांगली संधी आलेली असताना तुम्ही हा लेख लिहून बहुजनांची मने का दुखावलीत? तुमच्या या उद्योगाचा आम्हाला ताप होतो, त्याचे काय?आणि खुलाश्यातही तुम्ही माझा विरोध नाही असेच पुन्हा तुनतुणे वाजवताय. पाठींबा आहे म्हणायला तुमची तयारी का नाही? तुमच्यामुळे समग्र समाजाला फटके खावे लागतात. आम्ही तुमच्याशी सहमत असतो तर तेही खायला हरकत नव्हती. पण आज समाजातल्या तमाम सगळ्यांचा नामविस्ताराला पाठिंबा असताना तुम्ही हा उद्योग करून ठेवलात.
तुमचे समर्थक नरके सरांवर ज्या असभ्य भाषेत आरोप करीत आहेत ते पाहिले आणि त्यांची ब्राह्मणी आडनावे पाहिली की पुन्हा बहुजन समाज आपल्यावर भडकणार. कोणाला आपण "भाडोत्री विद्वान, भ्रष्ट, लोकांचा पाठींबा नसलेला" म्हणतोय हे त्यांना एक कळत नाही. "सारे ब्राह्मण पुरूष जाळून टाका, कापून मारा" असे सांगणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांवर गुन्हा दाखल करणारे नरके सर, ज्या माणसाने एकट्याने जातीयवादी ब्रिगेडला अंगावर घेतले, रोखले त्या नरके सरांबद्दल लिहिताना थोडीतरी कृतज्ञता बाळगा. आपले पुर्वज आजवर वर्ण - जाती अहंकारात आणि मिजाशीत जगल्यानेच सत्ताधारी जातीने आपल्याला बहुजनांचे शत्रू ठरवले हे आपल्याला कळत का नाही?की कळले पण वळत नाहीये?...पणती जपून ठेवा अंधार फार झाला.....

.......................................................

  • साक्य नीतीन "स्वसंरक्षणार्थ माझा सावित्रीबाईंच्या नावाला विरोध नाही" असे जेव्हा चौधरी म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हाच होतो कि त्याना जर एखाद्या पक्षाचे अथवा संघटनेचे सरंक्षण असते तर त्यानी उघडपणे नामविस्ताराला विरोध केला असता. चौधरी साहेब आत बुन्द से गई वो हौद से नही आती।

    आता विश्वंभर चौधरी म्हटले कि डोळ्यांसमोर सावित्रीमाईंच्या नावाला विरोध करणारा माणुस डोळ्य़ांसमोर येईल.
  • Sagar Killarikar Its True that "तुम्ही तोंडदेखले काय म्हणता यापेक्षा, तुमचा लेख जे बोलतो ते महत्वाचे" !! I agree with objections raised by Shri. Hari Narke ! The Article by Mr. Vishwanbhar Chaudhary was against renaming of Pune University.It was nothing but unsuccessful attempt of Incrustation of Fairness ! We deprecate such mentalities ! We generally call it as an "RSS" mentality i.e. drastic difference between 'inner feelings' & 'actual expressions' !
  • Amravatiche Mali आईच्या नावाला विरोध करतो तो नालायकच म्हटला पाहिजे..........
    Yesterday at 2:43am via mobile · Edited · Like · 1
  • Yogita Rege नरके तुम्हारा तो चुक्याच!...
    "नामाचा गजर...." हा राजकीय - सामाजिक विचारवंत डा.श्री.विश्वंभर चौधरीसर यांचा लोकसत्तेतील लेख अप्रतिम मनोरंजन करणारा आहे. सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला मिळणार म्हटल्यावर आलेल्या सात्विक संतापाने पेटून उठून चौधरींसरांनी २ दिवसात लिहिले, लोकसत्तेने ते सत्वर ठळकपणे छापले. देशाला मार्गदर्शक करण्याचा घाऊक ठेका सध्या एकमेव मा. चौधरीसर आणि लोकसत्ता यांच्याकडेच असल्याने हे दोघेही आम्हा पामरांना विचारांचे कुबेर बनविण्याच्या मोहिमेत रात्रंदिन गर्क आहेत.
    या लेखाचा मतितार्थ संपादकांनी लिडमध्ये दिलेला आहे." ज्या देशात विद्यापिठांना आतून आणि बाहेरून राजकारणाने वेढलेले असते, त्या देशात उत्तम शिक्षण वगैरे वल्गना वृथा ठरतात." माझे मराठी विश्वमराठी किंवा विश्वंभर मराठी नसल्याने एक शंका- वल्गना या "सार्थ" आणि "वृथा" अशा दोन्ही प्रकारच्या असतात हे नवेच ज्ञान या लेखामुळे आम्हाला झाले. जर या देशात काहीही दुरूस्त होऊ शकत नाही इतके सडलेले आहे, अशी चौधरीसरांची खात्री झालेली आहे तर मग लेखाचा हा डोंगर पोखरण्याची गरजच काय होती? चौधरीसर आपण जेव्हा विद्यमान राजकीय प्रक्रियेविषयी जनतेत निराशा/तिरस्कार आणि तुच्छतावाद पेरता, तेव्हा पर्यायी राजकारणाचे आपले संकल्पचित्रही आपण दिले पाहिजे ना?
    शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा एकही पर्यायी कार्यक्रम ज्या लेखात दिलेला नाही त्या चौधरीसरांच्या लेखाचे गुणगान गाणारे त्यांचे मध्यमवर्गीय समर्थक मला पामराला हे सांगतील का, की राजकारणविरहीत शिक्षण जगाच्या कोणत्या विद्यापिठात मिळते? राजकारण हद्दपार करण्याची तुच्छतावादाव्यतिरिक्त कोणती नवी गुरूकिल्ली चौधरीसर आपल्याला देतात? सध्याचे सगळेच वाईट आहे हे सांगायला तुमची गरज नाही. ते बदलायचे कसे त्यावर जरा बोला की.गुणवत्ता सुधारायची कशी यावर जरा प्रकाश टाकाना. काय आहे ते आम्हाला पुरेसे माहित आहे, ते बदलण्याचे संकल्पचित्र जर तुम्हाला देता येत नसेल तर डोंगर पोखरून ऊंदीरही काढता आला नाही असेच म्हणणे भाग आहे मालक.
    दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उडवलेले लवंगी फटाके पुढीलप्रमाणे....पोटात एक, ओठात दुसरेच असे हे "कावेबाज" लेखन आहे.
  • Yogita Rege दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उडवलेले लवंगी फटाके पुढीलप्रमाणे....पोटात एक, ओठात दुसरेच असे हे "कावेबाज" लेखन आहे.
    १]जागतिक दर्जाच्या आक्सफर्ड...वगैरे परदेशी विद्यापिठांची गुणवत्ता आजवर टिकून आहे त्याचे एकमेव कारण त्यांना शहरांची नावे आहेत. राष्ट्रपुरूषांची नावे दिली असती तर हा दर्जा नक्कीच घसरला असता.
    २] ज्या जातीचे मतदार देशात आणि राज्यात कमी आहेत त्यातच केवळ नावे देण्याच्या योग्यतेचे गुणवान महापुरूष आहेत.चौधरीसर यातून कोणती "ज्ञानवंत"! जात सुचवित आहेत ते विश्वकुबेरांना बरोबर कळते. बरोबरच आहे सर, " गुरू तो सकळांशी,,,,," जोवर देशात फक्त उच्चवर्णीय {त्र्यवर्णिक} पुरूष तेव्हढे शिकत होते, तोवर गुणवत्ता शाबूत होती. फुले पतीपत्नींनी स्त्रिया आणि बहुजन यांना शिक्षण देण्याचे काम सुरू करून देशाचे वाटोळे केले. ज्यात त्र्यवर्णिकांचे नुकसान तेच देशाचे नुकसान!’.... मास एज्युकेशनमुळे गुणवत्तेची वाट लागली. फुले शाहू आंबेडकर यांच्या या राष्ट्रीय गुन्ह्याबद्दल त्यांना माफ करता येणार नाही. शिवाय त्यांच्या जातींमुळे त्यांची नावे देणे हाही राष्ट्रीय गुन्हाच मानला पाहिजे.
    ३}प्रतिभावंतांची नावे दिल्याने आपल्या राष्ट्रीय प्रतिभेत घाऊक घट होते.
    ४} रेल्वेगाड्या वेळेत धावत नाहीत, रस्तेअपघात कमी होत नाहीत, विमाने वेळेत धावत नाहीत, रोजगार हमीत भ्रष्टाचार होतो, विद्यापिठांची गुणवत्ता घसरतेय याचे एकमेव कारण रेल्वेस्टेशन्स, रस्ते, विमानतळ, विद्यापिठे यांना फुले शाहू आंबेडकरांची नावे दिल्यामुळे...किती अचूक निदान. नावे पुसा, बघा जादू होईल.सगळे कसे जागतिक दर्जाचे होईल...क्या बात है! अ‍ेव्हढा सोप्पा उपाय ज्यांनी सुचवला त्या चौधरीसरांना आपण राष्ट्रीय सलामच करायला हवा.सर, ग्रेट..तुसी ग्रेट हो सर...
    माझी नम्र विनंती आहे की चौधरीसरांना भारतातल्या सगळ्या विद्यापिठांचे कुलपती करा नी बघा कसे रातोरात ते या सर्वांना सुतासारखे सरळ करतात. जगातल्या पहिल्या ३५० विद्यापिठात फक्त भारतीय विद्यापिठे असतील. हार्वर्ड....वगैरेनी यापुधे ३५१ पासून पुढचा विचार करायचा.....
    ५} आम्ही जनताजनार्दनलोक केवळ भोट...चौधरीसर डा.आंबेडकरांच्या नामांतराची आधीच्या लेखात खिल्लीही उडवणार, नी खुलाश्यात मात्र ते त्या नामांतराचे समर्थक होते असेही सांगणार. त्याबद्दल त्यांना "सुलभपणे सुनितीमान" म्हणून गौरविलेही जाणार....जगात नोनकरप्ट कोण याचे प्रमाणपत्र तुम्हीआम्ही यापुढे चौधरीसरांकडून घ्यायचे. गुणवत्ता कशाशी खातात ते आम्ही यांच्याकडून शिकायचे. ज्या लेखात पहिल्या वाक्यापासून केवळ आणि केवळ उपहास आहे, सावित्रीबाई आणि फुले-शाहू-आंबेडकरांची ऎशी की तैशी करण्यात आलीय, "स्वसंरक्षणार्थ" आपला नामांतराला विरोध नाही अशी जाहीर घोषणा ज्या लेखात आहे, तो लेख नामविस्ताराचा आनंद व्यक्त करण्यासाठी लिहिण्यात आला होता, हे ज्या हरी नरकेंना कळले नाही..ते नक्कीच भोट आहेत...नरके तुम्हारा तो चुक्याच!...
  • Vishwambhar Choudhari नरके सर धन्यवाद...माझ्याकडून ही चर्चा मी इथेच थांबवत आहे...
  • Amol Dixit @ Yogita Rege ..... 
  • साक्य नीतीन विश्वंभरांच दिवाळी रॉकेट बुमरॅंग झाल....
    22 hours ago · Unlike · 4
  • Nitin Chate प्रतिक्रियेच्या ताकाला जाऊन प्रतिवादाचे भांडे लपवू नये !!
    20 hours ago via mobile · Unlike · 3
  • Sanjeev Ghorpade मा.डा.चौधरीसर, कात्रज,पुणे येथे मा.अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्रींच्या नावाने वसतीगृह आहे. ते नाव दिल्यामुळे दर्जा उंचावला की खालावला?
    नामविस्ताराच्या निर्णयाआधी आपण पुणे विद्यापिठाच्या गुणवत्तेबद्दल काही लिहिले होते का? असल्यास सांगावे. कधी वाचनात
     आले नाही.
    एसपी कालेज, फर्ग्युसन कालेज, बीजे मेडीकल कालेज, आदी महानुभावांची नावे असलेल्या पुण्यातील नामवंत महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेत गफले केल्याबद्दल, किंवा भ्रष्ट आणि गैर कारभार केल्याबद्दल शिक्षण खात्याने त्यांच्यावर गेले ४ महिने कारवाई सुरू केलीय, यावर आपले भाष्य वाचायला मिळाले नाही. त्यांचे वागणे आणि त्यांची नावे यांचा काडीमात्र संबंध अर्थातच नसणार! आपण कधी केलीय यांच्यावर मल्लीनाथी?
    आपले एक भक्त मा.शशांक हळबे म्हणतात, शरद पवारांना जनाधारच नाही. आपल्या आणखी एका भक्ताने दाभोळच्या एनरोन कंपनीच्या रिबेकाबाईंचे पीएस म्हणून आणि मंत्रालयात एका दिवंगत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून लोकांकडे खोकी पोचवण्याची कामे इमानेइतबारे केल्याचे तमाम महाराष्ट्र जाणतो.सर, त्यांनी आता तुम्हाला मदत करावी, शाबासकीची थाप द्यावी, हळबेंना लाइक करावे याचा अर्थ काय घ्यायचा? की यातच सगळे आले?
    18 hours ago · Unlike · 4...................................

      • Kiran Kendre लेखाच्या शेवटी लिहिलेला नामाचा गाजर हा परिच्छेद तर तद्दन मूर्खपणा आहे. संपादकांना पाठविलेल्या फाईल चे नाव जगात कधीच कुणी लेखाला वापरत नाही. हे चोधरीना चांगले माहित असणारच . पण तरी फालतू कोटी करण्याची संधी त्यांनी घेतलीच . याला मराठीत `गरळ `हा चांगला शब्द आहे .
      • Rationalist Rajendra Gadgil he chaudhari yanche vaicharik daridry ani jatyvaad yacha nishedh .
        ................
        • Vishwambhar Choudhari Mee hi post vachli...sadhya me mazya khede gavat aslyane ithe sanganak nahi ani mazya mobile madhye marathi type karaychi soy nahi..me marathi typing chi soy upalabdh hotach pratyek muddyala uttar dein...kinva denyacha prayatn tari karen.. dhanywaad....
        • Shyam Ranjankar पण या संघाच्या विचारसरणीने अनेक नावे घेउन देशात धुमाकुळ घातला आहेच की, आधी हिदु महासभा, नंतर जनसंध नंतर भाजपा, आणी त्याची उप मुखवटे, घातलेली अ भा वि प, आणि ईतर प्रयेक क्षेत्रात सोईस्कर नामकरणकरुन हे लोक वावरता आहेतच की, जरासं खरवडलं की त्यांचं मुळ रुप उघडं पडतं. आता ते सरदार वल्लभ भाइ पटेल यांचं नाव धेउन त्यंच्या पुतळ्याच्या निमीत्ताने पैसे जमा करता करता आपली जात धर्म दाखवत धुमाकुळ घालतील..

2 comments:

  1. वि. चोधरी ला प्रमोद महाजन पुरस्कार चालतो पण सावित्रीबाई फुले यांचे नाव का चालत नाही
    " भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या हस्ते "प्रमोद महाजन स्मृती' पुरस्कार चौधरी यांना देण्यात आला " www.esakal.com/esakal/20121030/5575439374575658227.htm

    ReplyDelete
  2. विश्वभंर चौधरी एखाद्या व्यक्तीच्या नावाने पुरस्कार घेतल्या नंतर पुरस्कार घेणार्‍या व्यक्तीत बदल होतो का एवढ सांगा ? म्हणजे प्रमोदा महाजना सारख तुमच्या मध्ये भ्रष्ट्राचारा जातीवाद आला का नाही ते समझेल ??
    http://www.esakal.com/esakal/20121030/5575439374575658227.htm

    ReplyDelete