Wednesday, December 25, 2013

आज २५ डिसेंबर:




आज २५ डिसेंबर:
१८७३ साली: जोतीराव सावित्रीबाईंनी या दिवशी पहिले सत्यशोधक लग्न लावले. त्यात त्यांनी हुंडा, डामडौल, अवाजवी खर्च, बालविवाह, भटजी यांना नकार दिला.वय,गुण,प्रेम व आवडीनिवडी बघून लग्न करावीत असा सल्ला दिला. स्त्रियांचे मानवी अधिकार स्थापन करण्यासाठी झटण्याची प्रतिज्ञा या लग्नात नवरा मुलगा जाहीरपणे करीत असे.
आज बहुजनांनी बडेजाव, अवाजवी खर्च, हुंडा आणि मानपानाद्वारे जोतीराव-सावित्रीबाईंचा सगळा पराभव करून टाकला आहे.तुम्हाला काय वाटते?
१९२७ साली: बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सुरबा नाना टिपणीस, पोलादखान पठाण हे त्यांच्या सोबत होते. तेव्हा मनुस्मृती हे भारतीय संविधान होते. आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय जाळले असते?
आजही मनुस्मृतीला आणि ब्राह्मणांना तोंडाने शिव्या देत पण ती डोक्यावर घेऊन स्वत:मध्ये उच्चनिचतावादीवृत्ती मुरवून कोण तिचे पालन करतायेत?अशाप्रकारे बहुजन आजही भारतीय संविधान पायदळी तुडवित असतील तर त्यांनी बाबासाहेबांचे नाव घ्यावे काय? तुम्हाला काय वाटते?

1 comment:

  1. khar ahe sir ,

    Jat vait nahi tr Rutti vait ahe.

    vishisht lokanna shivya denyat kahi chalvali dhanyata mantat

    an aashanich babasahebancha parabhav kele.v kart ahet.

    lok kharya aarathane kevha sudharnar ?????????????????????????????????????????????????????????????????????????????????

    ReplyDelete