Sunday, March 23, 2014

Interview of Pramitee Narke

सकाळ, पुणे, रविवार दि. २३मार्च, २०१४, पान नं.४
"खर्‍या अर्थाने निर्भया"  --प्रमिती नरकेची मुलाखत

नराधमांनी फ्रंकाला बेदम मारलं.मुर्छितावस्थेत असताना तिला सिगारेटचे चटके दिले.तिच्या शरीरावर ठिकठिकाणी ब्लेडने वार केले अन अशा जखमी अर्धमेल्या अवस्थेत त्यांनी तिला रस्त्यावर फेकून दिलं...
गेल्या वर्षी देशभराला हलवून टाकणारं ’निर्भया’ प्रकरण याहून काय वेगळं होतं? फरक एव्हढाच होता की, "ऎका, बघा, ....हे घडलयं माझ्यासोबत...हे बदलू शकण्याची धमक आहे का तुमच्यात?" असा सवाल करत फ्रंका प्रत्येक प्रयोगात उभी राहत होती.
.......................................
"ही भुमिका म्हणजे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी संहिता शोधताना फ्रंकाचं हे स्वगत-नाट्य हाती आलं आणि मी हादरूनच गेले.एकीकडे एक स्त्री म्हणून मी तिच्याशी कनेक्टही होत होते अन दुसरीकडे तिने हे कसं सहन केलं असेल, या विचांरांनी मला कुंठित केलं होतं...."
इटालियन नाटककार व अभिनेत्री फ्रंका रामे हिच्या "द रेप" या एकपात्री नाट्यप्रयोगाविषय़ी प्रमिती नरके सांगत होती...
आपल्या अनेक नाट्यकृतींनी इटलीचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारी फ्रंका रामे. केवळ एक स्त्री म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही एखाद्याचं आयुष्य अंतर्बाह्य हलवून टाकणार्‍या "द रेप "या नाट्यप्रयोगाने फ्रंकाला एका क्षणात जगभरात नेऊन पोचवलं. स्वत:वर झालेल्या बलात्काराच्या प्रसंगाचं अन त्या विदारक अनुभवाचं धडधडीत वर्णन तिनं केलं होतं.
स्त्री-हक्कांसाठी झगडणारी फ्रंका एक कार्यकर्ती - रंगकर्मीच होती. त्या वेळी वयाच्या पंचेचाळिशीत असलेल्या आणि एव्हाना कम्युनिस्ट विचारसरणी अंगीकारलेल्या फ्रंकावर फासिस्ट  विचारांनी पछाडलेल्या चार नराधमांनी सामुहिक बलात्कार केला.बलात्काराचं कारण काय..? तर फ्रंकाच्या टोकाच्या स्त्रीवादी व साम्यवादी विचारांना विरोध! राजकीय विचारांतून जन्मणार्‍या क्रौर्याची ही घृणास्पद पातळीच होती. फ्रंका मात्र उन्मळून नाही पडली. या घटनेच्या केवळ दोनच महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा रंगमंचावर उभी राहिली. पूर्वीच्याच दिमाखात अन त्याच आत्मविश्वासानेही. यावेळी तिच्या नाटकाचा विषय होता "आंटी फासिझम".
नुकत्याच झालेल्या जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभुमीवर प्रमितीने फ्रंकाचं "द रेप" पुणे विद्यापिठाच्या काही डिपार्टमेंटसमध्ये सादर केलं. उण्यापुर्‍या बारा मिनिटांच्या प्रमितीच्या सादरीकरणाने उपस्थितांना केवळ अस्वस्थच नाही केलं, तर अंतर्मुखही केलं. पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्राची नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी असणारी प्रमिती म्हणते, "आमच्या पिढीने अशा सामाजिक प्रश्नांवर बोलतं होण्याची आज गरज आहे. मला म्हणून जे शक्य आहे, ते मी या नाटकातून करतीय. पण प्रत्येकानेच सामाजिक वास्तवाकडॆ अन मुख्य म्हणजे त्यात बदल घडवण्याकडे एक जबाबदारी म्हणून पाहायला हवं."
"फ्रंका या संपूर्ण प्रयोगात कुठेही किंचाळत नाही, आक्रस्ताळी होत नाही. तरीही तिचं एकुण असणं प्रेक्षकांच्या अंगावर येतं. तिच्या लिखाणातली ती ताकद आहे, असं मला वाटतं,." असे प्रमिती सांगते. शांततेलाही कित्येकदा गहन अर्थ असतो.हा प्रयोग तेच दाखवून देतो. आयुष्य आपल्या तत्वांप्रमाणे जगलेली फ्रंका गेल्या वर्षी मे महिन्यात हे जग सोडून गेली. आज फ्रंका जरी आपल्यात नसली तरी तिच्या अनेक नाटकांतून आणि मुख्य म्हणजे तिच्या "द रेप" या आत्मानुभावातून ती आपल्यात तिच्या वेदना जागवते आहे. कधी अमूर्त रुपात, तर कधी प्रमितीसारख्या एखाद्या अभिनेत्रीच्या मूर्त रूपात... {या संहितेचं मराठी भाषांतर स्वत: प्रमितीनं केलेलं असून ती हा प्रयोग मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून सादर करते..}.
मुलाखतकार--- स्वप्नील जोगी
.........................................
SAKAL, PUNE, sunday 23 March, 2014 pg 04 Hi Friends...
http://epaper.esakal.com/sakal/23Mar2014/Normal/PuneCity/page4.htm...
Interview of Pramitee Narke about "The Rape" One Act Play

Thursday, March 20, 2014

"दि रेप" एकपात्री- आयुकात सादरीकरण










जागतिक महिला दिन आणि ज्ञानजोती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन यानिमित्ताने या आठवड्यात विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. निर्भया खटल्यातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम करणे, शक्ती मिल घटनेबाबत सुरक्षाभिंत बांधणे याबाबतचे निकाल याच आठवड्यात उच्च न्यायालयाने दिले. पुणे विद्यापिठात नुकतेच एकतर्फी प्रेमातून काही घटना झाल्या. या पार्श्वभुमीवर आयुका आणि पुणे विद्यापिठाचे अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभाग यांनी विशेष प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या गंभीर प्रश्नावर चर्चा घडवून आणली. काही वर्षांपुर्वी फ़्रं‘का रामे या इटालियन लेखिका आणि अभिनेत्रीने स्त्रीप्रश्नावर "दि रेप" चे लेखन करून ते एकपात्री प्रयोगाद्वारे सादर केले आहे. तिचे हे स्वानुभवावर आधारित एकपात्री सादरीकरण जगभर गाजले आहे. नराधमांनी तिच्यावर केलेल्या सामुदायिक बलात्काराचा अनुभव तिने धैर्याने मांडला. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, हलवणारा आणि सुन्न करून जाणारा हा प्रयोग पुणे विद्यापिठाची [ललित कला केंद्राची] नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी प्रमिती नरके हिने सादर केला.या संहितेचे मराठी भाषांतरही प्रमितीनेच केलेले आहे. आयुकात झालेल्या कार्यक्रमाला ख्यातनाम शास्त्रज्ञ डा‘. जयंत नारळीकर, आयुकाचे संचालक डा‘. अजित केंभावी आणि अनेक शास्त्रज्ञ उपस्थित होते. या एकपात्री प्रयोगातून प्रमितीने स्त्रियांच्या समकालीन परिस्थितीवर केलेले भाष्य अस्वस्थ करून जाते. सर्व स्त्री-पुरूष या अनुभवाने सुन्न होतात. तरूण मुलांमुलींनी या कलात्मक प्रयोगाला विशेष दाद दिली. प्रमितीने मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून हा प्रयोग सादर केला.शमा भाटे, प्रा. श्रुती तांबे, प्रा. धनमंजिरी साठे प्रयोगांना उपस्थित होते. एक रंगकर्मी म्हणून आपण या प्रयोगाद्वारे तरूणांना समकालीन प्रश्नांवर बोलते करण्यासाठी हा प्रयोग करीत असल्याचे प्रमितीने सांगितले. विद्यापिठाच्या विविध विभागांमध्ये जाऊन युवकांना या प्रयोगाद्वारे स्त्री प्रश्नांवर जागृत करण्याचा तिचा मानस आहे. तिला डा‘. सतिष आळेकर यांचे या प्रयोगासाठी मार्गदर्शन लाभले आहे.

Saturday, March 15, 2014

मराठी भाषा अभिजातच…

Kalamnaama,
http://kalamnaama.com/marathi-bhasha-abhijatach/....
By कलमनामा on March 9, 2014
feature size
दहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तामीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम् या भाषांनी हा दर्जा पटकावला. गेल्या आठवड्यात उडीयाने ही मान्यता मिळवली. त्यामुळे मराठीचं काय झालं हा प्रश्न विचारला जाऊ लागला. ‘अभिजात मराठी समितीला मायमराठीचं प्राचीनत्त्व केंद्रापुढे मांडता आलेलं नाही,’ ‘केंद्र सरकारच्या भाषा समितीने मराठी भाषेचं अभिजातपण स्वीकारलं नाही’ अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या अभिजात मराठी भाषा समितीने जुलै २०१३ मध्येच मराठीच्या प्राचीनत्त्वाचे असंख्य पुरावे मराठी अहवालातून केंद्राला सादर केले असून या अहवालाचा इंग्रजी अनुवादही समितीने नोव्हेंबर २०१३ मध्ये ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. केंद्रीय पातळीवरील तज्ज्ञांच्या तो विचाराधीन असून फार लवकरच मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे.
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सानेगुरुजी, लक्ष्मीबाई टिळक, मालती बेडेकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, गडकरी, आगरकर, टिळक, रानडे, लोकहितवादी, उद्धव शेळके, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, पुल, अत्रे, चिंवी, नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल, विजय तेंडूलकर, विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर यांच्या मराठीचं श्रेष्ठत्व स्वयंभू आहे.
या विश्वात खूप जैवविविधता आहे. माणूस हा विचारशील प्राणी आहे. अर्थातच प्रत्येक माणूस आपल्या भाषेतून विचार करतो. भाषा ही माणसांची अस्मिता नि एकप्रकारचं ओळखपत्र असतं. आपापल्या मायबोलीचा प्रत्येकाला अभिमान असतो. माणूस भाषेच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करतो. साहित्य, विचार, तत्त्वज्ञान यांच्याद्वारे संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे वाहून नेण्याचं मोलाचं काम होत असतं. संशोधक असं सांगतात की लक्षावधी वर्षांच्या मानवी प्रवासात सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी माणसाने भाषा पहिल्यांदा जन्माला घातली. पुढे जगभरात हजारो भाषा निर्माण झाल्या. आज जगभरात प्रचंड मोठी भाषक विविधता असून तिचं जतन करण्याची गरज आहे. जगात आज छोट्यामोठ्या २० हजार भाषा असून त्यातल्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या भाषांची संख्या सुमारे २००० आहे. त्यातल्या ३० टक्के भाषा एकट्या भारतात आहेत. १९०७ साली ग्रियरसनच्या नेतृत्वाखाली पहिलं भारतीय भाषा सर्वेक्षण झालं. २०१३ साली गणेश देवी यांच्या पुढाकाराने नवं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे.
असं असताना आता गरज आहे ती मराठी माणसांनी आपला ऐतिहासिक न्यूनगंड आणि भाषक करंटेपणा झटकून मराठीचं लॉबिंग आणि मार्केटिंग करण्याची. बारा कोटी लेकरं एकमुखाने मराठीच्या बाजूने बोलू लागली तर मराठीला यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. अर्थात मराठी माणसांची अभिरूची इतकी संपन्न आहे की मराठीला वेगळ्या विरोधकांची गरजच नाही. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी ही ज्ञानभाषा आणि महानुभवांची धर्मभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्या सातवाहन आणि मराठे यांचं राज्य भारतभर तर होतंच पण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठीभाषेची पताका फडकत होती. मराठी बोलणारे लोक आज देशाच्या ३६ ही राज्यं आणि प्रदेशात आणि जगातल्या १०० देशांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे अडीच हजार पुस्तकं प्रकाशित होतात. कोश वाङमयाच्या बाबतीत मराठी जगातली दुसरी समृद्ध भाषा आहे. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे पन्नास साहित्य संमेलनं होतात. नामवंत खाजगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशनं यांची वार्षिक उलाढाल आणि पाठ्यपुस्तकं, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे अडीचशे कोटींपर्यंत आहे. बालभारती ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असून ती दरवर्षी १९ कोटी पुस्तकं छापते. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालयं एकट्या महाराष्ट्रात आहेत. लोकराज्य हे भारतातलं नंबर एकचं मासिक आहे.
अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा किंवा उच्चवर्णियांची तथा उच्च कुलीणांची भाषा असा भ्रम आपण आजवर जोपासत आलो आहोत. अभिजाततेचा सर्वाधिक महत्त्वाचा निकष आहे, भाषेची आणि साहित्याची श्रेष्ठता. भाषेचं वय सांगणारे लिखित दस्तावेज दीड हजार वर्षांचे असावेत, भाषिक आणि वाङमयीन परंपरा स्वतंत्र आणि स्वयंभू असावी, प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांच्यात खंड असला तरी त्यात नातं असावं हे उर्वरित निकषही मराठी पूर्ण करते.
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही. ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ सालीच राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिलेलं आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल.रा. पांगारकर, शं.गो. तुळपुळे, अन फेल्डहाऊस, वि.भि. कोलते आदींनी मराठीचं वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत. ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र, विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असं आम्ही अडाणीपणाने सांगतो. एवढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकेल? गाथा सप्तसती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे. एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचं घर होतं मेणाचं… प्रत्येक मराठी घरांत सांगितली जाणारी ही गोष्ट. लिळाचरित्रात आलेली असली तरी त्यापूर्वी किमान हजार वर्षं ती लोकपरंपरेत होती. तमिळ भाषेत संगम साहित्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा काळ सुमारे २६०० ते २३०० असा आहे. या साहित्यातही मराठी भाषक लोकांचा उल्लेख आहे. गोदावरी नदीवर धरण बांधण्यासाठी जगभरातून तंत्रज्ञ आले. त्यात मराठीत बोलणारे गवंडी कामात अतिशय प्रवीण आहेत, असं मराठी लोकांबद्दलचं वर्णन सापडतं. सातवाहन काळातील एक शिलालेख जुन्नर येथील नाणेघाटात सापडला आहे. २२२० वर्षापूर्वींच्या ब्राह्मी लिपीतील या शिलालेखात ‘महारठीनो’ असा उल्लेख आहे.
विनयपिटक या पाली भाषेतील बौद्ध धर्मग्रंथात तसंच दिपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील सिंहली ग्रंथात महारट्ठचा उल्लेख सापडतो. दुसर्या शतकात वररूचीने प्राकृतप्रकाश हा व्याकरण ग्रंथ लिहिला. पैशाची, शौरसेनी, मगधी, पाली, महाराष्ट्री या प्रमुख प्राकृत भाषा असून, या सर्वांना मराठीचे नियम लागू पडतात, असा नियम त्यांनी सांगितला आहे. जम्मू-काश्मीरच्या गुणाढ्य याने बृहतकथा हा ग्रंथ पैशाची भाषेमध्ये लिहिला. तो मुळचा वत्सगुल्म म्हणजे वाशिमचा होता. त्यात तो मराठीचा मुक्तहस्ते वापर करतो. हेमचंद्र हा व्याकरणकारही मराठीचे अनेक दाखले देतो. सातव्या शतकातले हरिभद्र आणि उद्योत्तन सुरी हे मराठीचे अभिजात साहित्यकार आहेत. संस्कृत कवी शुद्रक, महाकवी कालिदास यांनीही मराठीचा वापर केलेला आहे. महाभारतात असंख्य मराठी शब्द आहेत. यज्ञमंडपात मराठीतून बोलायला बंदी घालण्यात आलेली होती याचाच अर्थ हे पंडित खाजगीत मराठीत बोलत असत, हे स्पष्ट आहे.
हॉर्वड विद्यापीठातील मिखाईल विट्झेल यांनी ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स या ग्रंथात संस्कृत ही वैदिकपूर्व बोलीभाषेतून जन्माला आली असल्याचं दाखवलं आहे. मराठी, अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत या तीन वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची ती तीन वेगवेगळी नावं असल्याचे शेकडो पुरावे आहेत. मराठी (महारठी, महाराष्ट्री)चा जन्मही अशाच एका वैदिकपूर्व बोलीतून झालेला आहे. यावरून मराठीची आई आणि संस्कृतची आजी या बहिणी होत्या असं दिसतं. मराठीने संस्कृतकडून जरूर घेतलं पण दामदुप्पट परतही केलं. आजच्या मराठीवर इतर प्राकृत भाषा, पर्शियन आणि द्राविडीभाषा यांचा प्रभाव आहे. तथापि मराठीचे अस्सल जे आहे ते जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. म्हणूनच संत एकनाथ विचारतात, ‘संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली?’
समन्वयक – अभिजात मराठी भाषा समिती, महा.शासन
 प्रा. हरी नरके

Sunday, March 9, 2014

महात्मा फुले वाड्याला भेट

’अक्षरनंदन’ ही पुण्यातील एक नामवंत शाळा असून त्या शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. या शाळेच्या इयत्ता ५ वीच्या गुणी मुलांनी पालकांसमवेत आज महात्मा फुले वाड्याला भेट दिली. मित्रवर्य प्रा. डा‘. श्रुती तांबे व श्री.गणेश तांबे यांनी या उपक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. फुलेवाड्यात ही मुले रमली. मुलांच्या समवेत गप्पांमध्ये २ तास कसे गेले ते कळलेच नाही. त्याची गणेश विसपुते यांनी टिपलेली ही काही क्षणचित्रे...


Friday, March 7, 2014

Yeola, Muktibhumi, Buddhavihar




Yeola, Muktibhumi, Buddhavihar
डा‘. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे १३ आक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची ऎतिहासिक घोषणा केली होती. त्या पवित्र जागेवर श्री. छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने जागतिक दर्जाचा महाविहार उभारण्यात आलेला आहे. त्याचे उद्घाटन परवा झाले. त्याची क्षणचित्रे...

मराठीच्या विकासासाठी हवी पंचवार्षिक योजना

http://epaper3.esakal.com/7Mar2014/Normal/PuneCity/page5.htm...
Sakal, Pune, Pg 05 Dt 07 March 2014
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4820133567322463867&SectionId=10&SectionName=पुणे&NewsDate=20140307&Provider=-+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=मराठीच्या+विकासासाठी+हवी+पंचवार्षिक+योजना
मुख्यपान » पुणे » बातम्या
मराठीच्या विकासासाठी हवी पंचवार्षिक योजना
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मार्च 2014 - 01:15 AM IST
Tags: Pune, Marathi, Culture, Language
भाषा धोरणाच्या लेखनाला प्रारंभ; मे महिन्यात सरकारकडे करणार सुपूर्द
पुणे - मराठी ही सर्वांत जुनी भाषा आहे, त्यामुळे बदलत्या काळानुसार भाषेसमोर उभी राहणारी आव्हाने ओळखून तिचा मुकाबला कसा करता येईल, हे ठरविण्यासाठी आणि मराठीचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारने पंचवार्षिक योजना लागू करावी, अशी सूचना मराठी भाषा धोरणात नमूद करण्यात आली आहे. याबरोबरच बंद पडणाऱ्या शाळांवरही धोरणात विशेष भर देण्यात आला आहे.

मराठी भाषेसाठी सरकारने पुढील 25 वर्षांत काय करायला हवे, हे ठरविण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच भाषा धोरण तयार होत आहे. हे धोरण तयार करण्याची जबाबदारी सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार समितीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन सूचना जमा केल्या. त्यांचा विचार करून मसुदा लेखन करण्यासाठी उपसमितीचीही स्थापना करण्यात आली होती. या उपसमितीने नुकतेच मसुदा लेखनाचे काम हाती घेतले असून, त्यात मराठी शाळांवर भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मसुदा लेखनासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकीला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, दत्ता भगत, डॉ. माधवी वैद्य, विश्‍वनाथ शिंदे, हरी नरके, डॉ. विलास खोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भाषेचा खरा विकास शिक्षणाच्या माध्यमातून होतो, त्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या बंद पडत असलेल्या मराठी शाळांना घटनात्मक संरक्षण पुरवण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यासाठी आवश्‍यक नियमांमध्ये बदल करावा, बोलीभाषांचे दस्तऐवज करून ठेवावेत, उत्तमोत्तम ग्रंथांचे अनुवाद करावेत, अशा सूचनांचा समावेश आहे. मसुदा लेखनाचे काम याच महिन्यात पूर्ण करून समितीसमोर ठेवले जाणार आहे. मे अखेरीस ते सरकारकडे सुपूर्द करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

Saturday, March 1, 2014

पिढी तुझी - माझी






संगिता नरके आणि प्रमिती नरके

माहेर, मार्च २०१४, पृ.५२ ते ५४


पिढी तुझी - माझी
संगिता नरके आणि प्रमिती नरके


सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक चणचण हातात हात घालून असतात. पण इच्छाशक्ती,बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर त्यावरही मात करता येते.संगीता ही त्या पिढीची प्रतिनिधी.या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड असेल तर पुढच्या पिढीचा पाया सर्वार्थाने भक्कम होतो, तिला भरारी घ्यायला बळ देतो, जसं प्रमितीला मिळालं. वाचा या मायलेकींच्याच शब्दात-

--संगिता
माझं बालपण मुंबईत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच लग्न झालं. आमचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यानं खूप विरोध झाला. माझं माहेर भटक्या-विमुक्त समाजातलं. हा समाज म्हणजे निरक्षरता, कुपोषण, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज. पोटासाठी चोर्‍यामार्‍या करावं लागण्याचा वारसा लाभलेला समाज. आई-वडीलांनी मुंबईच्या फूटपाथवरून त्यांच्या आयुष्याची सुरूवात केलेली. वडील सामाजिक चळवळीत काम करीत असूनही मुलगाच हवा या हट्टापायी आम्हा ५ बहिणांना जन्म दिला गेला. त्यामुळं कोणतीही हौसमौज वाट्याला आली नाही. आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळालं नाही ते सगळंही त्यांना मिळायलाच हवं अशी खूणगाठ कळत्या वयात मनात बांधलेली.
वडील कधी घरी नसायचेच. घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळं काही झालं तरी कार्यकर्त्याशी लग्न करायचं नाही असा निश्चय केलेला होता. नामांतर आंदोलनात हरीची भेट झाली. तो टेल्कोत रात्रपाळीची पूर्णवेळ नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यानं चळवळीलाही वाहून घेतलेलं होतं. त्यामुळं त्यानं जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा मी चक्क नकार दिला. पुढं आम्ही "झोळ्या जाळा-बेड्या तोडा" परिषदेला औरंगाबादला भेटलो. त्यानंतर अजिंठा - वेरूळचा एकत्र प्रवास झाला. महाडच्या चवदार तळ्यावरील स्त्रीमुक्ती परिषदेनंतर रायगड-प्रतापगड-महाबळेश्वर सहल झाली. आपला जोडीदार शिकलेला हवा. स्त्री-पुरूष समानता मानणारा हवा. व्यसनी नी अंधश्रद्धाळू नसावा. जात, दिसणं, सांपत्तिक स्थिती या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत हे मात्र मनात पक्कं होतं. साडेसतरा नळीच्या झोपडीवजा घरात हरी राहायचा. तिकडे "होल वावर इज अवर-गो एनी व्हेअर" अशी पद्धत असल्यानं स्वच्छतागृहाची सोयही नव्हती. तिथल्या मंडळींना त्याची गरजही वाटत नव्हती.
लग्नात मानसिक, शारिरिक, वैचारिक, अनुरूपतेच्या बाबी भक्कमपणे जुळायला हव्यात असं मला वाटे. मुख्य म्हणजे बलदंड प्रेम हवं. प्रेमामुळं शेवटी माझा कार्यकर्त्याशी लग्न न करण्याचा निर्धार ढासळला. आम्ही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण चालू राहिलं. फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून आम्ही दोन निर्णय घेऊन टाकलेले होते. उच्चशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचं नाही. नी मुलगा होवो की मुलगी एका अपत्यावर कुटुंबनियोजन करायचं. लग्नाआधीच हरीनं पिंपरीत सदनिका घेतली होती. सासरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा, पण हरीनं शाळेत असतानाच ग‘स बुक केलेला होता. त्यानं वयाच्या ५ व्या वर्षापासून स्मशानात नोकरी करीत पुणे मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं. त्याच्या घरात पिढ्यानपिढ्या शेतमजुरीची परंपरा असल्यानं कष्टाची गोडी होती. मात्र भीक आणि चोरीची प्रचंड नफरत होती. त्याचे वडील तो लहान असताना औषेधपाण्याविना गेले होते. त्यामुळे काटकसर त्याच्या नको इतकी हाडीमाशी मुरली होती. त्याचा कधीकधी अतिरेक झाला की मला त्रास होई. पण तरिही आम्ही उमेदीचे दिवस पोटाला चिमटे घेऊन अतिशय काटकसरीने काढले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमच्या गरजा अतिशय मर्यादित राहिल्या. पुस्तके विकत घेण्याचे व्यसन वगळता आम्हाला दुसरे कोणतेही व्यसन नाही. भिकेचा आणि लाचारीचा तिटकारा पण चांगल्या जीवनमानाची ओढ यामुळे आम्ही आधी झोपडी, मग दोन खोल्यांची सदनिका आणि पुढे कोथरूडला चार खोल्यांचे घर असा प्रवास केला.सध्या मी लोणकर माध्यमिक विद्यालयात मुंढवा,पुणे येथं काम करते.
प्रमिती ३ महिन्यांची असतानाच मला मोठा अपघात झाला. तिचे खूप हाल झाले. तिला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून आम्ही पिंपरीहून कोथरूडला राहायला आलो. तिला मराठी माध्यमात घालायचं आमचं ठरलेलं होतं. अभिनव विद्यालयाचे प्रमुख चिं.स.लाटकर अण्णा यांनी तिला प्रवेश द्यायचं मान्य केलेलं. मात्र आम्हाला तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे असं ते गृहीत धरून चाललेले. त्यामुळे अभिनव मराठी माध्यमाची शाळा सुरू झाली तरी इंग्रजी शाळेचे प्रवेश उशीरा असल्याने ते निवांत होते. आम्ही हादरलो. मराठी शाळेत घालून आम्ही तिचे नुकसान करू नये असे त्यांना मनापासून वाटत होते. शेवटी आमच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि तिला मराठी शाळेत प्रवेश दिला.
हरी एकतर फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशनाच्या कामासाठी मुंबईला मंत्रालयात किंवा व्याख्यानांच्या दौर्‍यांवर सतत घराबाहेर असायचा. मी मुंढव्याच्या लोणकर विद्यालयातली माझी नोकरी सांभाळून प्रमितीच्या अभ्यासाचं बघायचे. प्रमितीच्या शाळेतील कार्यक्रमांना मीच उपस्थित असायचे. प्रमिती अभ्यासात हुशार होती. परंतु तिने पहिला-दुसरा क्रमांक मिळविण्याऎवजी अभ्यासेतर उपक्रमातही भाग घ्यावा असे मला वाटत असे. बालवाडीपासूनच मी तिला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. ती कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य यात सहभागी व्हायची. मात्र बक्षीस घ्यायला व्यासपीठावर जायला बुजायची. ती चित्रकला व गायनाच्या क्लासलाही जायची. पण तिला त्यात फारशी रुची निर्माण झाली नाही. मात्र पोहणे तिने मनापासून एंजा‘य केले. पोहण्याचे सर्व प्रकार तिने आत्मसात केले. आम्ही तिला भरपूर बालनाट्यं दाखविली. तिला त्याची इतकी गोडी लागली की अनेकदा ती एकट्याने जायची. काही नाटकं तिने अनेकवेळा पाहिली. तिला कविता करायला आवडतं. त्या ती मला आवर्जुन वाचून दाखवते. त्या बाबाला दाखव म्हटलं की मात्र ती आपल्या दोघीतलीच गंमत आहे असं म्हणते. सुट्ट्यांमध्ये ट्रेक, ओरीगामी, सुदर्शन मंच यात ती गर्क असायची. सहावीत असताना तीने एकट्याने हिमाचल, पंजाबचा प्रवास केला होता. चारित्र्य प्रतिष्ठानचा आंतरशालेय आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तिला मेधा पाटकरांच्या हस्ते टिळक स्मारकला मिळाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती," आमच्या घरात पुस्तके राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही राहतो."
राष्ट्र सेवादलाची वार्षिक शिबिरे ती चुकवायची नाही. तिथे एका वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे तिला भेटले. त्यांनी तिची अभिनय क्षमता हेरली. त्यांनी तिची सत्यशोधक नाटकातील सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी निवड केली. तिने तालमीही केल्या. पुढे ललित कलाच्या वर्गांमुळे तिला ते सोडणे भाग पडले. सत्यशोधक खूप गाजले. पर्ण पेठेने तो रोल उत्तम केला. परंतु तिच्या उच्च महाविद्यालयीन शिक्षणामुळे ती पुढील प्रयोगांसाठी वेळ देऊ शकत नव्हती. प्रयोग पाहिल्यावर सतिश आळेकरांनी पेठेंना या रोलसाठी प्रमितीचे नाव सुचविले, या योगायोगाची मला गंमत वाटली.
  दहावीनंतर पुढे काय करावे याबाबत तिचा निर्णय होत नव्हता. तिचा निर्णय तिनेच घ्यावा असे आम्ही तिला सांगितले होते. अभिनयात तिला रस होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चितता व स्पर्धा बघता जोडीला आणखी एक आधार असावा असे तिला वाटत होते. त्यासाठी ती जर्मन, मानसशास्त्र, मासकौम यांचाही विचार करित होती. हरीने भारतीय प्रशासनसेवेचे क्षेत्रही सुचवुन ठेवले होते. तिने फर्ग्युसनला अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला. दरम्यान बारावीतच तिचा ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाला होता.
हरी आरक्षण धोरणाचा समर्थक असला तरी मुलीने मात्र ललितकलाला खुल्या गटातूनच प्रवेश घ्यावा यासाठी तो आग्रही होता. प्रवेश परिक्षेत जर यश नाही आले तर १ वर्ष थांबून पुन्हा प्रवेश परिक्षा द्यायची पण तिकडेच जायचे यावर प्रमिती ठाम होती. तिने कसून तयारी केली. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या नामवंत परिक्षकांनी तिची निवड केली. गेल्या ३ वर्षात या क्षेत्राचा ध्यास घेऊन ती करीत असलेला अभ्यास, सकाळी ८ ते रात्री १ किंवा २ वाजेपर्यंत तिच्या चालणार्‍या वर्ग, तालमी यात ती आरपार बुडालेली असते. ललितला जातानाची प्रमिती आणि आजची प्रमिती यात खुप फरक पडलाय. तिला कष्टाचे महत्व कळावे, घामाचे पैसे मिळवताना काय वाटते, हा अनुभव यावा यासाठी तिने विद्यापिठाच्या "कमवा आणि शिका" योजनेत भाग घेतला. सुट्टीत बिग बझार आणि इतर अनेक ठिकाणी काम करून अर्थार्जन करीत शिक्षण घेतले.
मितुची पिढी अतिशय प्रैक्टीकल आहे. बोल्ड आहे. जेंडर सेंसेटिव्ह आणि अर्थातच न्यायासाठी आग्रही आहे. ती जिथे जाईल तिथे तिने आपली स्पेस मोठी करण्यासाठी झटावे एव्हढीच अपेक्षा आहे. हरीला सामाजिक चळवळीत  आणि लेखन-संशोधनात  रस होता, आहे. मला स्वत:ला अभिनयाची आवड होती. मी तिकडे जावे असे मी एकदा माझ्या पालकांना बोलून दाखवले तेव्हा ते उडाले होते. ते तसा विचारही करू शकत नव्हते. माझ्या मुलीने हे क्षेत्र निवडले याचा मला आनंद आहे. तिचे आवडीचे क्षेत्र तिनेच निवडले आहे. तिच्यात कोणताही भाबडेपणा नाही. कठोर परिश्रमांची तिची तयारी आहे. तिने स्वाभिमानी, निर्भीड, कष्टाळू, संवेदनशील असावे. कितीही  स्पर्धा असली तरी ती तिची मुद्रा नक्की उमटविल असा मला विश्वास आहे.
तिचा जोडीदार निवडताना तिने जात, धर्म, वर्ण, वंश, प्रांत, भाषा असला कोणताही विचार करून तिचे निवडीचे क्षेत्र संकुचित करू नये असे आम्ही तिला सांगितलेले आहे. ती जे ठरविल त्याला आमचा संपुर्ण पाठिंबा असेल. तिने चांगला माणूस बनावे एव्हढीच आमची अपेक्षा राहणार. तसे संस्कार आम्ही तिच्यावर केलेले आहेत.
..............................
प्रमिती--

माझी लहानपणीची पहिली आठवण म्हणजे बालवाडीत असताना शाळेच्या छोट्याशा सभागृहात पन्नास एक वर्गमित्र-मैत्रिणी आणि पाच-सहा शिक्षकांच्या समोर घाबरत घाबरत केलेलं वक्तृत्व स्पर्धेतलं बिरसा मुंडावरचं छोटसं भाषण. पण त्या भाषणाच्या आधिचा आणि नंतरचा तासभर माझं अंग आणि मन ज्या गतीने, ज्या प्रकारे थरथर कापलं होतं ते म्हणजे काही विचारता सोय नाही. त्यानंतर प्रत्येकच स्पर्धेच्यावेळी एन्गझायटीच्या परमोच्च बिंदूशी गाठ पडणं काही चुकत नव्हतं. परंतु तरीही बक्षिसं मिळवणंही चुकत नसल्याने वारंवार स्पर्धेत उतरतच होते. या सगळ्यात शालेय जिवनातच कधीतरी कलेची, अभिनयाची, नाटकाची गोडी लागली. घरातून आईचा मिळणारा संपूर्ण पाठींबा आणि बाबाचा असलेला आदर्श याचीही खूप मदत झाली. हे सगळं करत असताना तेंव्हा गंभीरपणे करीयर म्हणून अभिनयाचा तसा विचार केला नव्हता. पण मनातल्या मनात मी अभिनेत्री व्हायची स्वप्नं नेहमीच रंगवत होते. पण गुप्तपणे. उघडपणे नाही. कारण, एक म्हणजे बाबाची मी आय.ए.एस. व्हावं ही अपेक्षा आणि दुसरं म्हणजे " ज्यांना दुसरं काही जमत नाही, ते पूर्णवेळ अभिनय करतात " हा शाळेत, समाजात असलेला गैरसमज. त्यात मी दिसायला तशी चारचौघींसारखी. त्यामुळे अभिनेत्री व्हायचं असं म्हटल्यावर वर्गातली चार टाळकी फिदीफिदी हसणार याची खात्री होती. पण तरी धीर करून एकदा, "सुंदर दिसण्याचा अभिनयाशी काहीही संबंध नाही" यावरून शाळेतल्या बाईंशी वाद घातल्याचं मला आठवतं. तेंव्हापासूनच माझी "उद्धट" म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती.
  शाळा संपली. पण पुढे काय करायचं हे माझं काही ठरत नव्हतं. माझं "गुप्त स्वप्न" तर मला पूर्णत्वास न्यायचच होतं. पण कसं? हा प्रश्न होताच. बाबाच्या अपेक्षा अन माझ्या मनाचा कल पाहता आईने हुशारीने एक मध्यममार्ग सुचवला. तो म्हणजे मासकौम.  जेणेकरून "पत्रकारीता" असं ऐकून बाबाही खूश होणार होता आणि "अभुनयाच्या जवळपास जाणारच हे क्षेत्र आहे" ही तात्पुरती गोळी मलाही पुरणार होती. त्यानुसार ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून थेट फर्ग्युसन मधल्या सगळ्या कॊन्व्हेंटच्या क्राऊडशी मेचअप करताना आधी नाकी नऊ आलेले. अभ्यासात मन रमेना अन आर्ट सर्कल मधल्या अंतर्गत राजकारणामुळे तिथेही घुसता येईना. हा काळ म्हणजे माझ्यासाठी करीअरच्या दृष्टीने अगदीच अंधूक आणि घाबरवून सोडणारा होता. पण त्याचा उलट परिणाम असा झाला, की अनेक पर्याय चाचपडल्यानंतर मी आपल्याला काय करायचं नाहीये, ते पक्कं करून टाकलं. या सर्व घडामोडींची पूर्णवेळ साक्षीदार म्हणजे माझी मम्मा. माझा कलाक्षेत्राकडे १२०, १३० वरून थेट १८० अंशात वळलेला कल पटवून देऊन बाबाचं मन वळवण्यात ती सफल झाली. आणि मी १२ वी नंतर पूर्णवेळ नाट्यशास्त्राला ललितकला केंद्रात प्रवेश घ्यायचा निर्णय झाला. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता.
निर्णय तर झाला. पण प्रवेश प्रक्रीया सोपी नव्ह्ती. लेखी परीक्षा आणि मग शोर्टलिस्टेड मुलांची प्रत्यक्ष मुलाखत अन परफोरमन्स टेस्ट व्हायची होती. त्यात लिमिटेड सीटस - फक्त दहा. आता पूर्वीसारखा थरकाप उडत नसला तरी टेन्शन खूप आलं होतं. दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आमच्या पिताश्रींनी ओबीसी कोट्यातून प्रवेश न घेता ओपन केटेगरीतून प्रवेश मिळवायचा असे आपले धोरण जाहीर केले. बरं त्यामागे भक्कम विचारधारणा असल्याने मला काही बोलताही येईना. झपाटून तयारी केली आणि प्रवेश परिक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
  ललितला आल्यानंतर अभिनयाकडे, नाटकाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला मिळाली. ललित हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा म्हणावा लागेल. सतिश आळेकर, प्रविण भोळे, समर नखाते, राजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही समृद्ध झाल्याचे मला जाणवते. शालेय जिवनातही मी नाटकात कामं केली. पण इथे आल्यावर मी " जाणीवपूर्वक ’ नाटक करायला शिकले. याकाळात मी  माझ्या स्वत:च्या चार संहिताही लिहिल्या.फर्ग्युसनच्या सुरुवातीच्या दिवसांत मला नेहमी खंत वाटत असे, की माझ्या पालकांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले नाही. पण आता मला याच गोष्टीचा प्रचंड फायदा होत आहे. माझ्याच वर्गातील इंग्रजी माध्यमातून शाळा शिकलेल्यांना जी भाषा दुर्बोध व त्यामुळे कंटाळवाणी वाटते ती मी सहज समजून घेऊ शकते, माझं मराठी साहित्य मला जवळचं वाटतं. संहिता समजून घेणे, संदर्भ जुळवणी, शैलीचा अभ्यास यासाठी लागणारी समज प्रगल्भ होत गेली. अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करत असताना मी शेक्सपिअरच्या हेम्लेट आणि अ मिडसमर नाईटस ड्रीम, मेक्झीम गोर्कीचं द लोअर डेप्थ,  विजय तेंडुलकरांचं मित्राची गोष्ट, बर्टोल्ट ब्रेक्थचं दी कोकेशिअन चोक सर्कल इ. नाटकांत कामे केली. दी कोकेशिअन चोक सर्कलचे मुंबईला पृथ्वी थिएटर, दिल्लीला आंतरराष्ट्रीय भारतरंग महोत्सवामध्ये प्रयोग केले. सकाळ व हिंदू मध्ये याची परिक्षणे आली. संदेश कुलकर्णी, अनिरूद्ध खुटवड यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना नाटकाच्या अनेक अंगांचा अभ्यास करता आला.
  "संहिता ते प्रयोग" या अभ्यासक्रमांतर्गत लेखक आणि दिग्दर्शक याही पातळ्यांवर विचार करण्याची संधी मिळाली.मीही दोन संहिता लिहिल्या.त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व अनुभवांतून माझ्या पुढ्च्या आयुष्याची दृष्टी मिळत गेली. आमच्या घरात स्वतंत्र ग्रंथालय काढता येईल एवढी पुस्तकं आहेत. याचा मला खूपच फायदा झाला. केवळ नाटकांचीच नाही तर कथा, कादंबर्‍या, कविता, संदर्भग्रंथ पटकन हाताशी असतात. यासाठी मी स्वत:ला प्रचंड लकी मानते.
  आता मी ललितकला केंद्रातून पदवीधर होऊन बाहेर पडते आहे. अजून खूप काही शिकायचे आहे.
      ....................................