Thursday, October 16, 2014

नमोभक्त आणि नमोरुग्ण




"मतदान करा" असे सांगणार्‍या मोहीमा जोरदारपणे चालवूनही सुमारे ६५ % मतदान झाले. हे प्रमाण खरेतर सरासरी ९०% ते ९५ %  पर्यंत जायला हवे. लोक मतदान का करीत नाहीत?

राजकारणाविषयीची तुच्छताबुद्धी, नेत्यांच्या दांभिकतेची लोकांना असलेली चिड आणि पैशाचा महापूर बघून आलेली किळस यातून  जो तिरस्कार मनात साकळतो त्यामुळे मतदान कमी होते का?

आपला देश विभुतीपुजकांचा देश आहे. लोकशाही जरी आपल्याकडे रूजली असली तरी आजही लोकांना एकखांबी तंबूचे जबरदस्त आकर्षण वाटत असते. त्यामुळेच नमोभक्त आणि नमोरुग्ण यांची संख्या खूप मोठी आहे.

आधींच्याबद्दलचा तिटकारा {प्रस्थापित विरोधी जनमत} आणि आक्रमक बाजाराच्या तालावर चालवली गेलेली प्रचारमोहीम यात कोणकोण बाजी मारतेय ते बघायचे.

अभय बंग म्हणाले तसा आता विचारधारेचा फरक हा पाचही प्रमुख पक्षांमध्ये केवळ तोंडी लावण्यापुरताच उरलेला असल्याने आणि निवडणुका लढवणे हे आता केवळ कोट्याधिशांनाच शक्य असल्याने आता फंडे फक्त सत्तेचे ...आणि सत्तेचे...
भाकरी फिरवली जाणार हे चंगलेच म्हणायचे.

No comments:

Post a Comment