Thursday, August 27, 2015

मतांच्या टक्केवारीचा इतिहास! PURANDARE N PAWAR 1808

https://deshiindia.wordpress.com/अभिजित कारंडे यांच्या Blogवरून,
मतांच्या टक्केवारीचा इतिहास!
PURANDARE N PAWAR 1808
ज्यांनी नागपंचमीला शिकार केलीय, त्यांना वाघर लावणं हा प्रकार चांगला माहिती असणार. वाघर म्हणजे जाळं. ते जो परफेक्ट लावतो तो चांगला शिकारी. शिकार कुठून येणार?, कधी येणार?, वाघर कुठं लावली पाहिजे? हा तसा माईंड गेमचा प्रकार आहे. तसं गोळी झाडून लांबून धूड मारता येतं. पण वाघर लावण्यात जी मजा आहे ती बंदूकीच्या शिकारीत नाही. महाराष्ट्रात शरद पवार हे उत्तम वाघर लावणारे शिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या तरबेज, शिकाऊ राजकारण्यांना, बुद्धिवाद्यांना, कलावंतांना, साहित्यिकांना अनेकदा आपल्या वाघरीत अल्लाद झेललंय. माईंड ब्लोईंग माईंड गेम.
आता बाबासाहेब पुरंदरेंना दिलेल्या महाराष्ट्र भूषणचंच घ्या. सरकारनं पुरस्कार 4 महिन्यापूर्वी जाहीर केला. आणि त्याचवेळी पवारांना त्यात संधी दिसली. सत्तेत असताना कधीही इतिहास प्रबोधनासाठी वेळ नसलेले जितेंद्र आव्हाड कामाला लागले. गावोगाव शिवजागर परिषदा सुरु झाल्या. युक्तीवाद एवढाच होता की ज्या बाबासाहेबांनी जिजाऊ आईसाहेबांची बदनामी केली, शिवाजी महाराजांचा मुस्लिमद्वेष्टे म्हणून प्रसार केला त्यांना महाराष्ट्रभूषण का? शिवाजी महाराजांचा विषय महाराष्ट्रासाठी किती सेन्सिटिव्ह आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. (( थोड्या वेळासाठी इतिहास बाजूला ठेऊन वर्तमानावर बोलू ))
महाराष्ट्राच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. कधीही सत्तरी न ओलांडलेल्या भाजपच्या तब्बल 123 जागा निवडून आल्या. सिंचन, महाराष्ट्र सदन, बेहिशेबी मालत्तेची प्रकरणं आणि अँटी इन्कंबसी हे सगळं राष्ट्रवादीला पुरुन उरलं. विशेष म्हणजे मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण आणि 13 टक्के मुस्लिमांना दिलेला 5 टक्क्याचा कोटाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाचवू शकला नाही.
महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकड्यावर 30 हून अधिक आमदार मराठा आहेत, त्यातील वीसएक जणं तर राष्ट्रवादीतूनच गेलेले आहेत. याचा अर्थ सरळ आहे मराठा समाजानं राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली. 32 टक्के मराठा समाज महाराष्ट्रात असूनही निवडणुकीत Caste फॅक्टर चालला नाही. त्याअर्थी सोवळा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपला लोकांनी भरभरुन मतं दिली. मग आता 15 पालिका निवडणुकीच्या तोंडावर, दुष्काळाची धग वाढली असताना जर ग्रामीण भागात राहणारा हा समाज ‘जागृत’ झाला नाही तर कसं होणार? त्यातून इतिहास नावाचं कमालीचं हुकमी शस्त्र हातात घेण्यावाचून पर्याय नव्हता.
पण हे सगळं करतानाही ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रकार सुरु होता. तो स्ट्रॅटेजी म्हणूनच का? म्हणजे शरद पवारांनी बाबासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला, मात्र आपण त्यांना इतिहासकार मानत नाही असं म्हणून सूचक इशारा दिला. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी बाबासाहेबांच्या अभिनंदनाचं पत्र लिहिलं. अजित पवार यांनी “बाबासाहेबांचं काम मोठं आहे, त्यामुळं त्यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झाल्याबद्दल आनंद झाल्याचं म्हटलं.” पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्य कार्याध्यक्ष, माजी मंत्री, विद्यमान आमदार वैयक्तिकपणे महाराष्ट्रभर बाबासाहेबांच्या महाराष्ट्र भूषणला विरोध करत फिरत होते. अगदी 2009 पर्यंत जे आव्हाड विधानपरिषदेवर होते, त्यांचे राज्यभर कार्यकर्ते तयार झाले. शिवजागर परिषदेशी राष्ट्रवादीचा काडीमात्र संबंध नव्हता. असा दावा आव्हाडांनी केला. असो तर यातून दोन गोष्टी साध्य झाल्या, एकतर बिगरमराठा नेता 94 वर्षाच्या बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात उभा राहिल्यानं पवार नामानिराळे राहिले. (( असं राष्ट्रवादीला वाटतं )) आणि दुसरं म्हणजे छगन भुजबळांची जागा घेण्यासाठी दुसरं ओबीसी नेतृत्व आपोआपच महाराष्ट्रभरात पोहोचलं. (( जे तितकसं सोपं नाही ))
बाबासाहेबांबद्दल जो प्रचार अपेक्षित होता, तो सुरु झाला. त्यावरुन वाद सुरु झाले. ट्विटर आणि फेसबुकवर गलिच्छ भाषेतील चिखलफेक सुरु झाली. गावोगाव त्याची प्रत्यंतरं दिसू लागली. तब्बल 500 ग्रामपंचायतींनी बाबासाहेबांना पुरस्कार देऊ नये असा एकमुखी ठराव केला. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून जात नावाचा फॅक्टर जो निद्रीस्त अवस्थेत होता, तो जागा झाला. लोकांच्या मनाला संशयाची सुई टोचू लागली. बाबासाहेबांच्या बाजूनं आणि बाबासाहेबांच्या विरोधात असे थेट दोन गट पडले. आणि इथं चर्चेच्या पातळीवर का होईना समाज पवारांच्या वाघरीत अल्लाद आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दुय्यम मुद्दा होता.
हे सगळं सुरु असताना बाबासाहेबांचा इतिहास मान्य नसल्याचं सांगत ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, माजी कुलगुरु नागनाथ कोत्तापल्ले, दादासाहेब नाईकनवरे, मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यावरुन राज्यात वादळ उठलं.
त्याला उत्तर म्हणून बाबासाहेबांच्या बाजूनं दुसरं पत्रक निघालं. ज्यावर इतिहासकार गजानन मेहेंदळे, पुरातत्व तज्ज्ञ गो.बं.देगलूरकर, माजी कुलगुरु द.ना.धनागरे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, इतिहासकार किंवा कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या सह्या होत्या.
म्हणजे पुन्हा इथं दोन गट पडले. ते जरी जातीच्या पातळीवरचे नसतील तरी जे बाबासाहेब समर्थक ते मराठाविरोधक ठरले. (( सोशल नेटवर्किंग आणि गावागावातल्या बातम्या बघाव्यात ))
गेले अनेक महिने कुठल्याही राजकीय विषयाशी स्पर्श होईल अशा चर्चेत नसलेले राज ठाकरे जागे झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
“ शरद पवार यांनी जातीचं गलिच्छ राजकारण सुरु केलं” असं वक्तव्य करुन राज यांनी फुलटॉस दिला. त्यापुढं जाऊन “नेमाडेंनी ज्ञानपीठ मिळाल्यानंतर कसं वागावं हे विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रजांकडून शिकावं” असं सांगून हिट विकेट टाकली.
हेच पवारांना हवं होतं. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी पवारांच्या या राजकारणाला दुर्लक्षित करुन मारणं चालू ठेवलं होतं. पण राज ठाकरेंनी एका गटाची मतं मांडून त्यात राजकारण आणलं. (( अर्थात हे करण्यात राज यांचा कुठलाही राजकीय तोटा नव्हता झाला तर फायदाच, जरी यात राजकारण नाही असं ते कोकलून सांगत असले तरी. ))
राज ठाकरेंना उत्तर देण्यासाठी पुन्हा एकटे आव्हाडच मैदानात होते. राष्ट्रवादीकडे अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, वळसे-पाटील अशी तगडी फळी असतानाही या फ्रंटवर आव्हाडांना लढवणं हासुद्धा ‘स्ट्रॅटेजी’ चा भाग नव्हता असं म्हणणं निव्वळ दूधखुळेपणाचं ठरेल.
राज यांच्या आक्रमक हल्ल्यामुळं मग शिवसेना आणि भाजपलाही मौन सोडावं लागलं. (( तरी शिवसेनेनं सामना वगळता कुठंही अवाक्षर काढलं नाही )) हा स्ट्रेट ड्राईव्ह होता. कारण आता काँग्रेस-राष्ट्रवादी पुरंदरेंच्या विरोधात आणि भाजप-सेना-मनसे पुरंदरेंच्या बाजूनं अशी थेट दुही पडली. गेले काही दिवस जो निखारा फक्त धुपत होता, त्यावर जोरदार फुंकर मारुन आग लावण्यात यश आलं.
माध्यमांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. सकाळ, लोकमत, पुढारीच्या हेडलाईन आणि इतर पेपरच्या हेडलाईन्समध्ये मोठा फरक दिसला. काही ठिकाणी पुरंदरेंच्या बातम्या आतल्या पानावर, तर काही ठिकाणी पहिल्या पानावर झळकल्या. काहींनी तर सिंगल कॉलममध्येच महाराष्ट्रातला हा वाद निपटून टाकला. पवारांचा शॉट किती पावरफुल होता हे याचं हे उदाहरण आहे. ((अर्थात कुठलंही माध्यम आपण यात Partial होतो हे मान्य करणार नाही ))
म्हणजे जिथं शक्य होतं, तिथं फूट पडलीच.
आता प्रश्न उरतो तो इतिहासाचा..
तर आता त्यावरच उत्तर अगदी दोन वाक्यात जे आव्हाडांनीच सांगितलंय..
इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्रामची म्हणतो..
“ ज्या समाजावर तुम्हाला पकड निर्माण करता येत नाही, काळानुरुप त्याचा इतिहास विकृत करुन टाका, त्याच्या पुढच्या पिढ्या तुमच्या मागे चालायला सुरुवात करतात

No comments:

Post a Comment