Saturday, January 21, 2017

'लॉस्ट ईन म्यूनिख' आणि 'लेथ जोशी' पंधराव्या 'पिफ'मध्ये सर्वोत्कृष्ट

गेला आठवडाभर तमाम चित्रपटप्रेमींच्या गर्दीत सुरू असलेला जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा महोत्सव आज संपला. कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहात आज समारोप व बक्षीससमारंभ रंगला. समारोप समारंभाचं मुख्य आकर्षण होतं महोत्सवाच्या स्पर्धाविभागाचा निकाल. मराठी स्पर्धाविभागाचे परीक्षक होते श्री. गोरान पास्कलयेव्हिक, श्रीमती नर्गेस अब्यार आणि श्री. बेनेट रत्नायके. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'संत तुकाराम' पुरस्कार यावर्षी 'लेथ जोशी' या चित्रपटाला देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि रु. पाच लाख असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. दिग्दर्शक श्री. मंगेश जोशी आणि निर्माते सोनल जोशी - मंगेश जोशी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांना मिळाला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' या चित्रपटातील भूमिकेबद्दल आर्य आढाव यांना जाहीर करण्यात आला. 'पिफ'मध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते वयानं सर्वांत लहान अभिनेते आहेत. आर्य आढाव यांचं वय आठ वर्षं आहे. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'डॉक्टर रखमाबाई' या चित्रपटातील भूमिकेबद्दल तनिष्ठा चटर्जी यांना जाहीर करण्यात आला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'व्हेंटिलेटर' या चित्रपटासाठी राजेश मापुसकर यांना देण्यात आला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट छायालेखनासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'लेथ जोशी' या चित्रपटासाठी सत्यजीत शोभा श्रीराम यांना जाहीर झाला. 'नदी वाहते' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार देण्यात आला. 'लेथ जोशी' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेवा चौहान आणि 'एक ते चार बंद' या चित्रपटातल्या अभिनयासाठी पद्मनाभ भिंड यांना परीक्षकांचे विशेष पुरस्कार जाहीर झाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धाविभागाचे निकाल पुढीलप्रमाणे (कंसात परीक्षकांचं मत नोंदवलं आहे) - १. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'लॉस्ट ईन म्यूनिख' (For its re-reading of a tragic chapter of Czechoslovakian history in an effective, humorous and zany manner, the award for BEST FILM goes to the film scripted and directed by Petr Zelenka, produced by David Ondrícek - Lost in Munich) २. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - किरील सेरेब्रेनिकोव्ह (द स्टुडन्ट) ('For its innovative lighting design and cinematography, brilliant mise en scene and acting, and its commentary on the growing religious intolerance across the world today, the award for BEST DIRECTION goes to the Russian film THE STUDENT, scripted and directed by Kirill Serebrennikov) ३. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेडी ऑफ द लेक' (भारत) (For its metaphoric depiction of how modern developmental projects endanger human existence, the JURY PRIZE goes to the Indian film directed by Haobam Paban Kumar, LADY OF THE LAKE ४. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'झूलॉजी' (रशिया) (For its incisive presentation of superstition and cruelty directed by society towards anyone perceived as abnormal, the JURY PRIZE goes to the Russian film directed by Ivan I. Tverdovsky, ZOOLOGY) ५. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेझ'इनाँसाँ' या फ्रेंच / पोलिश चित्रपटातील भूमिकेसाठी अ‍ॅगता ब्यूझेक (For her convincing and charismatic interpretation of Maria in the French / Polish film The Innocents, AGATA BUZEK receives special mention for Best Actor. ६. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लॅण्ड ऑफ द एनलायटण्ड' या चित्रपटातल्या छायालेखनासाठी पीटर-जां द प्यू. (For its spectacular and evocative visuals where the camera finds a distinctive style of operation in The Land of the Enlightened, the director and cinematographer of the film PIETER-JAN DE PUE, receives special mention for BEST CINEMATOGRAPHY.) *** यंदा दरवर्षीपेक्षा प्रेक्षकांची नोंदणी कमी झाली. इफ्फी, केरळ महोत्सव, कोलकाता महोत्सव यांनाही या वर्षी असा अनुभव आल्यानं पुढच्या वर्षी प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करूया. यंदा उद्घाटनाचा सोहळा फारसा रंगतदार झाला नव्हता. अपर्णा सेन, सीमा देव, उ. झाकीर हुसेन असे दिग्गज मंचावर असूनही टाळ्यांचा कडकडाट झाला नाही. समारोपाचा समारंभ मात्र तरुण प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे कमालीचा बहारदार झाला. प्रत्येक निकाल जाहीर झाल्यावर प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहात विजेत्यांचं कौतुक केलं. अर्थात सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक टाळ्या, शिट्ट्या यांचा गजर समर नखाते मंचावर सत्कार स्वीकारायला गेले, तेव्हा झाला. महोत्सवातले सातही दिवस नखातेसर प्रेक्षकांच्या गराड्यात असतात. सतत तरुण प्रेक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. संपूर्ण भारतभर त्यांचे विद्यार्थी आहेत. आज त्यांचं नाव पुकारल्याक्षणी सार्‍या प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून त्यांना मानवंदना दिली, ही त्यांच्या फार मोठ्या कामाची पावती आहे. नखातेसर केवळ महोत्सवातल्या चित्रपटांची निवडच करत नाहीत, तर संपूर्ण चित्रपटभर ते अनेकांशी चित्रपटांबद्दल सतत संवाद साधत असतात. आज नखातेसरांमुळे चित्रपटांकडे डोळसपणे बघणारे देशभर अनेक आहेत. चित्रपट-साक्षरता वाढीस लागावी यासाठी नखातेसर आणि 'पिफ'चे आयोजक धडपडत असतात. कमालीची आर्थिक चणचण असूनही महोत्सव दणक्यात साजरा होतो. प्रत्येक महोत्सवात काही अडथळे येतातच. यंदा सिटिप्राईड (सातारा रस्ता) इथे एक खेळ रद्द झाला. चित्रपटाचे वेगवेगळे, नवनवे फॉर्मॅट महोत्सवाच्या आयोजकांकडे येत असल्यानं ऐनवेळी अडचणी येणं साहजिक आहे. बहुसंख्य महोत्सवांमध्ये हे घडतं. वर्तमानपत्रांत या अडचणींची बातमी आल्यावर समाजमाध्यमांतून कुत्सित शेरेबाजी होणं, हे म्हणूनच क्लेशकारक आहे. 'पिफ'च्या वातावरणाचा अजिबात अनुभव न घेता, आयोजकांच्या अडचणी (आर्थिक व इतर) लक्षात न घेता (न घडलेल्या घटनांवर) टीका होणं योग्य नाही. 'पिफ'च्या एकंदर व्यवस्थापनात काही सुधारणा मात्र जरूर व्हायला हव्यात. उद्घाटन आणि समारोप यांचे सोहळे अधिक नेटके असावेत. मंचावर डॉ. जब्बार पटेलांनी निवेदकांना सूचना देणं, निवेदकानं मान्यवरांची नावं चुकवणं, सत्कारमूर्ती मंचावर आले तरी त्यांचं बक्षीस अजून विंगेतच असणं हे प्रकार दरवर्षी न चुकता घडत असतात. ते यापुढे कमी होतील, अशी अपेक्षा आहे. हे सोहळे वेळेवर सुरू व्हावेत. यंदा उद्घाटनाचा चित्रपट वेळेआधी सुरू करण्यात आला. असं यापुढे होऊ नये. कार्यक्रम मोकळाढाकळा असला तरी तो शिस्तबद्ध असावा. जगभरातून येणार्‍या पाहुण्यांसमोर ढिसाळ वर्तणूक शोभत नाही. यंदा चित्रपटांच्या खेळांची संख्या कमी करण्यात आली. ती पुढच्या वर्षी वाढेल, अशी अपेक्षा करूया. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनानं आणि पुणे महानगरपालिकेनं महोत्सवासाठीचा निधी वाढवायला हवा. इफ्फी, मामि, केरळ, चेन्नई, कोलकाता इथल्या महोत्सवांचं बजेट 'पिफ'च्या बजेटापेक्षा कितीतरी जास्त असतं. 'पिफ' हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपटमहोत्सव आहे. त्याला शासनानं उचित महत्त्व द्यायला हवं. पुढचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' ११ ते १८ जानेवारी, २०१८ या काळात आयोजित होणार आहे. महोत्सवातले पुरस्कारप्राप्त आणि इतर अनेक दर्जेदार चित्रपट मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमधल्या 'पिफ'च्या सॅटेलाईट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतील. या शहरांमधल्या प्रेक्षकांनी आवर्जून या महोत्सवांना हजेरी लावावी. वर्षभर या महोत्सवाची वाट पाहणारे अनेक आहेत. केवळ महोत्सवादरम्यान भेटून वर्षभर न भेटणारे असंख्य प्रेक्षक दरवर्षी ओळखी जपतात, रोज चार-पाच चित्रपट बघून ताजेतवाने होतात. थेटरातला अंधार, पडद्यावरची हलती चित्रं आणि आवाज कितीजणांना ऊर्जा देतात, कोणास ठाऊक! म्हणून 'पिफ'सारखे महोत्सव कायम नांदते राहणं अत्यावश्यक आहे. पुढची भेट ११ जानेवारी, २०१८ रोजी. कोथरुडातल्या सिटिप्राइडात. Submitted by चिनूक्स on 19 January, 2017 - 13:52 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ..................................................... सौजन्य :- http://www.maayboli.com/node/61461

Tuesday, January 17, 2017

धर्मवेड,धर्मांधता आणि तरूणाईचा विनाश यांची रशियन कथा.

धर्मवेड,धर्मांधता आणि तरूणाईचा विनाश यांची रशियन कथा.
The Student, Dir. Kiril Serebrennikov,Russia,2016, WC.
Veniamin हा शाळकरी मुलगा अचानक कट्टर धार्मिक बनतो. मुलींनी पोहताना बिकिनी घालू नये, स्त्रियांनी पुर्ण पोशाखच घातला पाहिजे, शाळेत लैंगिक शिक्षण दिले जाऊ नये, वर्गात उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवू नये अशी भुमिका तो हट्टाने रेटू लागतो. एरवी रशियातील कम्युनिष्ट विचारसरणीमुळे सेक्युलर असलेल्या त्याच्या आई, प्राचार्या, वर्गशिक्षिका, मित्र, मैत्रिणी
यांच्याशी तो वाद घालू लागतो. त्याचे हे धर्मवेड अतिशय टोकाला जाते. एलेना या त्याच्या जिवशास्त्राच्या शिक्षिकेचा आपल्या या विद्यार्थ्यावर जीव असतो. ती विज्ञाननिष्ठेपोटी या मुलाला या वेडातून मुक्त करण्यासाठी झटते. त्याच्या आईलाही मुलाची काळजी वाटू लागते. तो आईलाही तिचा घटस्फोटीत नवरा [व्हेनिमिनाचा बाप] जुळवून घेण्याबद्दल आग्रह धरतो. उठसूठ बोलताना तो बायबलचा सोयिस्कर संदर्भ देत असतो. 2000 वर्षांपुर्वीच्या या धार्मिक विचारांचा आदर जरूर करावा पण त्याला समकालीन आयुष्यात प्रमाण मानून जगू नये असा त्याच्या शिक्षिकेचा आग्रह असतो. तो शिक्षिकेवरच आरोप करू लागतो.ती ज्यू असल्याने ती या धर्माचा तिरस्कार करते असा बिनबुडाचा आरोप तो वारंवार करू लागतो. हळूहळू आजुबाजूचे सारेच त्याच्या प्रभावाखाली कसे येतात आणि या विज्ञाननिष्ठ, ध्येयवादी शिक्षिकेला कसे एकटे पाडतात, तिला वेडे ठरवतात, याची वैश्विक कहाणी हा चित्रपट मांडतो. शेवटी एकटी पडलेली ही शिक्षिका आरोपांना कंटाळून धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करते आणि सप्रमाण प्रतिवाद करते, मात्र हा धर्मांध मुलगा तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धादांत खोटाच आरोप करतो, आणि तिला ठार मारण्याचा कट रचतो. सारेच लोक तिच्याविरूद्ध जातात, त्यामुळे त्या शिक्षिकेवर कोणती वेळ येते त्याची रशियन की भारतीयही? कथा सांगून हा चित्रपट सुन्न करतो.
The Student, Dir. Kiril Serebrennikov,Russia,2016, WC.
....................................
सेवाभाव जगण्याचे बळ वाढवतो..
Home Care, Dir. Slavek Horak, Czech Republic,2015, G.C.
व्लास्ता ही एक समर्पित नर्स आहे. घरोघर जाऊन ती वृद्ध नागरिकांच्या आजारपणात त्यांची मनोभावे सेवा करते. तिच्या या कामातून ती थकली तरी तिला या जगण्यातून अपार आनंद आणि उर्जा मिळत असते. तिचा नवरा लाडा आणि तिची तरूण मुलगी असे हे अतिशय सुखी कुटुंब असते.
अचानक एके दिवस व्लास्ताला असाध्य आजाराने गाठल्याचे आणि ही आजाराची अंतिम अवस्था असल्याचे आढळून येते. सारे कुटूंबच हादरून जाते. व्लास्ताला अवघे सहा महिनेच आहेत असे डाक्टर सांगतात. ही सेवाभावी बाई याही परिस्थितीला धिराने कशी सामोरी जाते, तिला आवडणारे नृत्य शिकायचे कामाच्या धबडग्यात राहून गेलेले असते. ती त्याही स्थितीत नृत्य शिकते. अत्यंत  वेदना सोसूनही ती सेवाकार्य चालूच ठेवते. निसर्ग, प्राणी, पक्षी या सार्‍यांवर तिचा विलक्षण जीव असतो.
विधायक कामांची पुण्याई तिच्या वेदना कमी करू शकत नसली तरी तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि असाधारण उमेद यांच्या जोरावर व्लास्ता आजारावर कशी मात करते याची सुंदर आणि प्रेरक कथा सांगणारा सहजसुंदर चित्रपट. दर्जेदार दिग्दर्शन, श्रेष्ठ अभिनय, उत्तम पटकथा, मानवी आयुष्याचे अनेकविध आयाम खुले करणारी कहाणी. सेवाभावी, समर्पित जगण्याच्या उर्जेचा विधायक परिणाम आणि निसर्गाची आस यांचा परिणामकारक गोफ.
...................
The Tip of the Iceberg, Dir. David Canovas, Spain, 2016, Social Awareness,
सोफिया ही एका मल्टीनॅशनल कंपनीतली उच्च पदावरील कार्यक्षम अधिकारी असते. तिच्या कंपनीतील दुसर्‍या शहरातील युनिटमधील तीन अधिकार्‍यांनी लागोपाठ आत्महत्त्या केल्याने कंपनी अडचणीत येते. या आत्महत्त्यांच्या कारणांचा शोध घेऊन अंतर्गत अहवाल तयार करण्याचे काम सोफियाकडे सोपवले जाते.
सोफिया संबंधित अधिकारी,कर्मचारी, सहकारी यांना भेटून सखोल चौकशी करते.
नफा,नफा, त्यासाठी सगळे मार्ग वापरण्याची कार्यपद्धती असलेल्या मल्टीनॅशनल मॅनेजमेंटच्या गंभीर चुकाच या आत्महत्त्यांना कारणीभूत असल्याचे तिला आढळून येते.
तिने खरा अहवाल न देता थातूरमातूर अहवाल दिल्यास तिला बढती आणि इतर लाभ दिले जातील अशी लालूच तिला दाखवली जाते. उच्चपदस्थ तिच्यावर दबावही आणतात. पण ती निर्भयपणाने सत्यशोधन करते आणि मॅनेजमेंटला धैर्याने सामोरी जाते. परिणामी तिची हकालपट्टी केली जाते.
अशावेळी ही धाडसी महिला अधिकारी दांभिक मल्टीनॅशनल मॅनेजमेंटची लक्तरे कशी वेशीवर टांगते याची वेधक कथा हा चित्रपट सांगतो.
जगभरचे राजकारणी असोत की भांडवलदार हे सगळे किती क्रूर, दांभिक आणि लबाड असतात, थंड डोक्याने ते कशी कटकारस्थाने करतात, दु्र्घटना झाल्यावर चौकशी समिती नेमणे वगैरे हे कसे फार्स असतात याची वैश्विक कथा हा चित्रपट उलगडतो
अतिशय प्रभावी मांडणी, सुंदर टेकिंग, अप्रतिम अभिनय, भव्य चित्रण. औद्योगिक जगतातील ताणतणाव बारकाईने टिपणारा आणि वरवर समाजहिताचा घोष करून आर्थिक लूट करण्यातली भांडवलदारांची क्रूरता सप्रमाण सांगणारा उत्तम चित्रपट.
.......................
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..5..
PIFF, 15th Edition, [12 to 19 Jan. 2017] पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]
......................

Monday, January 16, 2017

बापमुलीच्या निखळ नातेबंधाची वैश्विक उंचीवर जाणारी कथा



Daughter, Dir. Reza Mirkarimi, Iran, 2016,Social Awareness,
अनेक इराणी चित्रपट उत्तम असतात याचा प्रत्यय पुन्हापुन्हा येत असतो. खरं तर तिथे अतिशय जाचक सेन्सारशिप असतानाही काही दिग्दर्शक सातत्याने उत्तमोत्तम कलाकृती सादर करीत असतात. Reza Mirkarimi यांच्या Daughter या चित्रपटाचा समावेश Social Awareness विभागात करण्यात आला होता.

सितारा ही एक अत्यंत गुणी, आज्ञाधारक आणि सुसंस्कृत मुलगी आपल्या अजिझी या पित्याविरूद्ध बंड करते त्याची चटका लावणारी अत्यंत प्रभावी चित्रकथा या चित्रपटातून उलगडत जाते. अगदी पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत एखाद्या थरारकथेच्या अंगाने जाणारा हा चित्रपट, चित्रभाषा, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या सार्‍याच बाजूंनी दर्जेदार आहे. निखळ, नितळ मानवी नात्यांची उब आणि जिव्हाळा यांनी ओतप्रोत असलेल्या कुटुंबात बाप एकाधिकारशाही गाजवू लागल्याने निर्माण झालेले ताण आणि एकारलेल्या नातेसंबंधातील मानसिकता यांचे कलात्मक दर्शन हा चित्रपट देऊन जातो. एखाद्या एरवी सनातनी वाटणार्‍या कुटुंबातही नात्यांचे बंध किती घट्ट असतात ते यातून दिसते.

सिताराला तिच्या महाविद्यालयीन मैत्रिणीने तेहरान येथे निरोपाच्या पार्टीला बोलावलेले असते. वडील तिला पाठवायला नकार देतात. ती बंड करून विमानाने जाते. वडील घरी यायच्या आत ती विमानाने परतणार असते. पण ऎनवेळी खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण रद्द होते. वडीलांकडे तिचे बिंग फुटते. वडील संतापाच्या भरात कार काढतात आणि रात्रभर प्रवास करून सिताराला घ्यायला तेहरानला पोचतात.

तिला घेऊन येताना रस्त्यात एक अपघात होतो. त्या गडबडीत सितारा गायब होते. सिताराचे काय होते?
वडीलांना ती परत सापडते का? असल्यास कुठे सापडते?

या सार्‍या शोधात अजिझीतला सच्चा पिता कशाप्रकारे जागा होतो? लहानपणी आपल्या मुलींशी मित्राप्रमाणे वागणारा अजिझी, पण मुली मोठ्या होताच त्याचे अचानक एका सनातनी, हुकुमशाही करणार्‍या पित्यात का आणि कसे रूपांतर झालेले असते?

त्याचा भुतकाळ काय असतो? त्याचे वडील, त्याची प्रेमळ बहीण यांच्याशी घट्ट नाते असलेला अजिझी कशामुळे कोरडा आणि करडा झालेला असतो?

निखळ नातेबंधाची वैश्विक उंचीवर जाणारी कथा.

या चित्रपटाला गोवा महोत्सवात पुरस्कार मिळाल्याचे समजते.

मुळात सज्जन आणि प्रेमळ असलेला अजिझी, त्याची सुसंस्कारित मुलगी सितारा यांची ही कथा काळजाला स्पर्शून जाते.

Daughter, Dir. Reza Mirkarimi, Iran, 2016,Social Awareness,
......................
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..4..
PIFF, 15th Edition, [12 to 19 Jan. 2017] पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]

Sunday, January 15, 2017

बंडखोर कविंचे फॅसिस्ट शक्तीविरूद्ध / हुकुमशाहीविरूद्धचे बंड


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. 3..

Correspondences, Dir. Rita Azevendo Gomes, Portugal, 2016, w.c.

पोर्तुगालमधील फॅसिस्ट सरकारने Jorge de Sena या बंडखोर प्रतिभावंताला देश सोडून जाण्याची शिक्षा सुनावली. सुरूवातीला तो ब्राझिलमध्ये आणि नंतर अमेरिकेत जाऊन लेखन करीत राहिला. तो आपले स्वातंत्र्यवादी विचार आपल्या कविता आणि पत्राद्वारे आपल्या कवयित्री मैत्रीणीला Sophia de Mello Breyner Andresen ला  [1957 78] पाठवित राहिला.

त्याचा स्वातंत्र्याचा प्रत्येक उद्गार जगातील फॅसिस्ट शक्तींवर आसूड उगारीत राहिला.

मानवी जीवनातले सौंदर्य, मैत्रीचे अमुल्य वरदान, निसर्ग, मानवी जीवनाचे इप्सित, पंच महातत्वे आणि  नियती या सा‍र्‍यांबद्दलचे वैश्विक विचार या कवितांमधून व्यक्त होतात.

हुकुमशहा संपतात पण ते स्वातंत्र्याची असीम चाहत नष्ट करू शकत नाहीत.

दोन प्रतिभावंत मित्र आपल्या लेखणीच्या तलवारीने या बलाढ्य अशा फॅसिस्ट राजसत्तेविरूद्ध जो असाधारण लढा देतात त्याचे अत्यंत काव्यमय चित्रण करणारा Rita Azevendo Gomes यांचा काव्यमैफीलीसारखा अनुभव देणारा हा चित्रपट आहे.

पुण्यात संपन्न अभिरूचिचे अनेक प्रेक्षक राहत असल्याने या महोत्सवातील विविध मूडस आणि प्रयोग सादर करणार्‍या चित्रपटांना अलोट गर्दी लोटते. मात्र या हळूवार चित्रपटाच्या वेळी अनेक प्रेक्षक मध्येच उठून गेले याचं वाईट वाटलं.. हे वाढत्या आप्पलपोट्या मानसिकतेचे लक्षण मानायचे की पैसे देवून डोक्याला ताप देणारं काही कशाला बघायचं या वृत्तीचं लक्षण मानायचं? की वाढत्या भारतीय समकालीन अनास्थेचं, असहिष्णुतेचं प्रतिक मानायचं???

Saturday, January 14, 2017

एकतर्फी प्रेमाच्या अमानुषतेची प्रभावी कहाणी

Lantouri, Dir. Reza Dormishian,Persian, Iran,2016.
एकतर्फी प्रेमाच्या अमानुषतेची प्रभावी कहाणी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. 2..

PIFF, 15th Edition, 12 to 19 Jan. 2017, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]

लॅंटोरी या इराणी चित्रपटाने महोत्सवाचा 3 रा दिवस गाजवला. रझा डोर्मिशियन या तरूणाचा हा तिसराच चित्रपट आहे. त्याच्या आधीच्या दोन्हींप्रमाणे तो अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये गाजतोय.

एकतर्फी प्रेमातून तरूणींच्या चेहर्‍यावर/अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याच्या रानटी कहाण्या आपण अनेकदा ऎकतो/वाचतो. या चित्रपटातून ज्या भयानक कौर्याची कहाणी आपण पाहतो, ती अक्षरश: हादरवून टाकणारी आहे. मरियम ही एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने "हिंसेला नकार द्या" अशी मोहीम चालवलेली असते. तात्कालीक रागातून गुन्हा घडलेल्या कैद्यांना शिक्षेतून सूट मिळवून देण्यासाठी ती झटत असते. त्यासाठी त्या गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी गुन्हेगाराला माफ केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेत सूट मिळण्याची तरतूद असते.

तेहरानमध्ये लॅंटोरी ही टोळी खंडण्या वसूल करणे, गाड्या चोरणे, पर्स पळवणे अशा गुन्ह्यांसाठी कुख्यात असते. पाशा आणि त्याचे दोन मित्र व एक तरूणी त्या गॅंगमध्ये सक्रीय असतात.
एकदा पाशा मरियमची पर्स पळवतो. तो तिला ती परत करतो. कारण तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. मात्र हे प्रेम एकतर्फी असते.

तिचे एका तरूणावर प्रेम असल्याच्या संशयातून ही टोळी त्याला मारपीट करून तिच्यापासून दूर पळवून लावते.

पाशाच्या प्रेमाला मरियम होकार देत नाही म्हणून संतापातिरेकाने तो तिच्या चेहर्‍यावर तेजाब शिडकतो.
तिचा सुंदर चेहरा जळून विद्रूप होतो. तिचे डोळे जातात.

इअतरांना माफी मिळवून देणारी मरियम मात्र जेव्हा तिच्यावर बेतते तेव्हा सूडाने पेटते. इस्लामिक कायद्याप्रमाणे डोळ्याच्या बदल्यात डोळा नष्ट करण्याची तरतूद असल्याने ती पाशाचे डोळे अ‍ॅसिड टाकून जाळण्याची मागणी करते.

शिक्षेची अंमलबजावणी तिच्यासमोर होते.

हा चित्रपट अंगावर येणारा आहे. मरियमचा विद्रूप झालेला चेहरा, तिचे गेलेले डोळे हे सारे बघताना प्रेक्षक हादरून जातात.पाशाला शिक्षा दिली जात असताना सूडाचे समाधान मिळवणारी मरियमही खूप सतावून जाते.
अगदी शेवटच्या क्षणाला एक टर्निंग पोईंटही आहे.

या चित्रपटाचे टेकींग जबरदस्त आहे. अकिरो कुरासावाच्या राशोमनच्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्याला जाणवले ते सांगत जातो. त्यातली तफावत नाट्य वाढवित जाते. अनेक नविन प्रयोग केलेले असल्याने चित्रपट महत्वाचा ठरतो.

Lantouri, Dir. Reza Dormishian,Persian, Iran,2016.

या चित्रपटाला विलक्षण प्रबोधनमुल्य आहे. मोठे शिक्षणमुल्यही आहे. स्त्रीपुरूष समतेच्या आणि लिंगभावाच्या चळवळीतील कोणीही चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
................................

Friday, January 13, 2017

मानवी भावभावनांची प्रभावी गुंफन करणारा चित्रपट महोत्सव

1..........

PIFF, 15th Edition, 12 to 19 Jan. 2017
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 12 जाने. ते 19 जाने. 2017
जगभरातले दर्जेदार असे ताजे [ 2015/2016 सालातले ] निवडक चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी म्हणजे हा चित्रपट महोत्सव असतो.
या वर्षीच्या महोत्सवाची सुरूवात "Thank You for Bombing" दिग्दर्शक Barbara Eder, Switzerland या चित्रपटाने झाली. प्रसिद्ध पत्रकार होण्याची तीव्र इच्छा असलेली लाना ही टिव्ही चॅनलसाठी काबूलमधून अफगाणिस्थानच्या युद्धाचे वार्तांकन करीत असते. इवाल्ड आणि काल या दोन पुरूष पत्रकारांनाही तिथे काम करण्याची संधी मिळते. हे तिघे तीन वेगवेगळ्या साहसातून जाताना त्यांच्यावर ओढवलेली जीवघेणी परिस्थिती चित्रित करणारा हा चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. अफगाणी अतिरेकी उन्मादाचे आणि युद्धजन्य संहाराचे जे चित्रण या चित्रपटात येते ते युद्धाविषयी घृणा निर्माण करणारे आहे. वाहिन्यांमधली जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी लढवल्या जाणार्‍या क्लूप्त्या यांचे चित्रण करताना या तीन पत्रकारांना ज्या भीषण अनुभवांना सामोरे जावे लागते ते प्रत्यक्ष अनुभवायला लावणारा अतिशय दर्जेदार चित्रपट.

1. Rauf, Dir.Boris Kaya & Soner Caner, Turkey, कोवळ्या वयातल्या पहिल्या प्रेमाची हळूवार कहाणी मांडणारा अतिशय गोड सिनेमा. 11 वर्षाचा रौफ त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या [20 वर्षे] वयाच्या झानाच्या प्रेमात पडलाय. ती त्याच्या मालकाची मुलगी आहे. तो तिथे कोफीन बनवण्याचे काम करत असतो. झानाला पिंक कलरचा स्कार्फ त्याला भेट द्यायचा असतो. त्यासाठी गावचा अख्खा बाजार तो पालथा घालतो. त्याला तसा स्कार्फ मिळत नाही. त्याची आजी त्याला सांगते, दूर एका डोंगरावर पिंक रंगाची सुंदर फुले असतात. या हळुवार प्रेमकहाणीचा शेवट शोकांत आहे. झानाचा मृत्यू झाल्यावर हा पोरगा जिवाच्या कराराने डोंगरावर जातो आणि गाडीभर फुलं आणून तिच्या कोफीनवर उधळतो. फॅंड्रीचा अगदी वेगळा पण तरल अनुभव.

2. Playground, Dir.Bartosz M Kowalski, Poland, तीन वेगवेगळया कौटुंबिक पार्श्वभुमीवरील 3 मुले एकत्र शिकत असतात. एकजण आपल्या आजारी आणि पंगु वडीलांची मनोभावे सेवा करणारा आहे,पण त्याच्या मनात हिंसा भरून राहिलेली आहे. दुसरा मुलगा आपल्या धाकट्या भावाला अतिशय क्रुरपणे वागवणारा आहे. मुलगी मात्र अतिशय आत्ममग्न आहे. भित्री आहे. हे दोघे तिचे जे भयानक रॅगिंग करतात ते अंगावर येणारे आहे. त्यांच्या पदवी शिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या मुलांमधली आक्रमकता, हिंसा आणि गुन्हेगारीची मानसिकता यांचा स्फोट होताना दिसतो. पाश्चात्य जगातील तरूणाईतली हिंसकता कल्पकतेने आणि प्रतिकात्मतेने  मांडणारा एक महत्वाचा चित्रपट.

3. The Innocents, Dir. Anne Fontaine,France, दुसर्‍या महायुद्धात रशियन सैनिकांनी एका चर्चमधील अनेक नन्सवर बलात्कार केलेले असतात. त्या गरोदर असतात. रेडक्रासमध्ये काम करणारी एक नर्स या नन्सची बाळंतपणे करते. धार्मिक गैरसमजुतींमुळे मुख्य नन्स त्या नवजात बालकांची उघड्यावर त्यांना सोडून देऊन एकप्रकारे हत्त्या करते. कोवळ्या बाळांपासून ताटातूट झालेल्या या नन्सची कुतरओढ, नर्सचे धैर्य आणि माणुसकी याचा भव्य पट उलगडत जातो. शेवटी त्या नर्सच्या प्रयत्नाने गावातल्या सगळ्या बेवारस मुलांना नन्सच्यारूपाने आया मिळतात. लादलेले मातृत्व, धार्मिक संस्कार आणि माणुसकी यांची हळूवार गुंफन करणारा उत्तम चित्रपट. एका सत्यकथेवर आधारलेला हा चित्रपट काळजाला हात घालतो.

4. Godless, Dir. Ralitza Petrova, Bulgaria, बल्गेरिया या पाश्चात्य देशामध्ये सिनियर सिटीजन्ससाठी शासनाने त्यांची सामाजिक सुरक्षा बघण्यासाठी नेमलेली एक नर्स ड्रगच्या आहारी गेलेली असल्याने ती सिनियर सिटीझन्सची आयकार्डे चोरून त्याचा गैरवापर करीत असते. तिचे वागणे चारित्र्यहीन असते. ती सुखाच्या शोधात अनेक चुकीची पावले टाकीत जाते. गुन्हेगारीच्या रस्त्यावर तिची होणारी घसरण, ह्या मार्गावर कधीही शांतता आणि सुख असू शकत नाही यांची प्रतिकात्मक कथा प्रभावीपणे सांगणारा सुंदर चित्रपट.
...........................

Monday, January 9, 2017

महाराष्ट्र माझा निजला! -- संजय राऊत

http://www.saamana.com/ram-ganesh-gadkari/
दै.सामना, रविवार, दि.8 जाने.2017, रोखठोक: महाराष्ट्र माझा निजला! -- संजय राऊत
January 8, 2017, rautsanjay61@gmail.com
प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी यांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटवण्यात आला. दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत तेच घडले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे हे एका जातीचे नव्हते. शौर्य एका जातीची मक्तेदारी नव्हती. जनरल अरुणकुमार वैद्य, चिंतामणराव देशमुख यांची जात कुणी विचारेल काय? पण शिवाजी महाराजांनी २०० लढाया ज्या स्वकीयांविरुद्ध लढल्या ते कोण होते? संभाजीराजे मोगलांच्या तावडीत असताना घाईघाईत राज्याभिषेक उरकून घेणारे कोण होते? या सगळय़ांनीच छत्रपतींचा अपमान केलाय. त्यांच्यावर नवे ‘राजसंन्यास’ लिहायचे काय?

‘‘कीर्ती आणि निंदा यांचा गडकऱयांना एकाच वेळी लाभ होत गेला, पण गडकऱयांचे कर्तृत्व ज्यावेळी लोकांना कळून आले त्यावेळी त्यांचे शरीर काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावलेले होते.’’’ – आचार्य प्र. के. अत्रे

गडकऱयांच्या बाबतीत हे विधान आजही तंतोतंत लागू पडते. राम गणेश गडकरी यांच्या पुण्यातील पुतळय़ास पन्नास वर्षे होऊन गेली (१९६२), त्यावेळी पुण्याच्या संभाजी बागेत आचार्य अत्रे यांच्या हस्ते गडकरी यांच्या पुतळय़ाचे अनावरण झाले. हा अर्धपुतळा त्यांच्या निंदकांनी रात्रीच्या अंधारात हटवला, पण त्यामुळे शंभर वर्षांनंतर गडकरी पुन्हा चर्चेत आले व लोकप्रिय ठरले.

हे सर्व लोक स्वतःला शिवाजीराजांचे भक्त व संभाजीराजांचे मावळे मानतात, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते? गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील जातीय ऊरबडव्यांनी जो उच्छाद मांडला आहे त्याचे शेवटचे टोक म्हणजे पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा अंधारात हटविला हे होय. शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा मध्यरात्री हटवला. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्य होते व या झुंडशाहीचा निषेध करण्यात जे ‘बुद्धिमंत’ आघाडीवर होते तेच पांढरपेशे आज महाराष्ट्रात सत्तेवर आहेत. म्हणजे सत्ताधारी बदलले तरी शिवरायांच्या नावाने सुरू असलेली जातीय झुंडशाही कायम आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला व सहिष्णुतेला कलंक लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. समर्थ रामदास व शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसही या लोकांनी सोडले नाही. राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा ज्यांनी पाडला त्यांनी हे कृत्य रात्रीच्या अंधारात केले. ‘राजसंन्यास’ नाटक गेल्या शंभरेक वर्षांपासून मराठी साहित्यात अर्धवट अवस्थेत आहे. संभाजीराजे यांच्याविषयी काही आक्षेपार्ह प्रसंग व स्वगते ‘राजसंन्यास’मध्ये आहेत हे कळायला शंभर वर्षे लागली, हे वैचारिक दुर्बलतेचे लक्षण मानले पाहिजे. राम गणेश गडकरी हे शब्दप्रभू, प्रतिभेचे सम्राट होते. ते कुणी राजकारणी किंवा टाटा, बिर्ला, अंबानी नव्हते. ते गरीब बिच्चारे लेखक होते. महाराष्ट्राच्या पिढय़ान्पिढय़ा त्यांच्या नाटकांनी पोसल्या. मराठी काव्य, नाटय़, भाषा त्यांनी समृद्ध केली. त्यांच्या पुतळय़ावर काल ज्यांनी घणाचे घाव घातले त्यांनी यापुढे महाराष्ट्राचे नाव घेऊ नये.

गाव तेथे गडकरी

राम गणेश गडकरी यांच्या नावाचा रस्ता नाही, त्यांच्या नावाचा चौक नाही व त्यांच्या नावाचे रंगमंदिर नाही असा एकही जिल्हा किंवा शहर महाराष्ट्रात नसेल. गेली ८५ वर्षे महाराष्ट्र गडकऱयांची पूजा करतोय. मराठी भाषेत, साहित्यात राम गणेश गडकरी यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी या शतकातील फारच थोडय़ा मराठी लेखकांच्या वाटय़ास आली असेल.

आचार्य अत्रे हे गडकऱयांच्या सहवासात आले व भक्त झाले. संभाजी उद्यानातील जो पुतळा विकृतांनी पाडला त्या पुतळय़ाचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी १९६२ साली केले. अत्रे गडकरींविषयी लिहितात-

‘‘जो कवी असतो, तो कदाचित नाटककारही असू शकेल, पण तो विनोदकार असू शकणार नाही आणि जो विनोदाचा निर्माता असतो, तो नाटककार होऊ शकेल, पण उत्तम कवी असू शकणार नाही. मोलिअर नि शेक्सपीअर हे दोघेही महान नाटककार होऊन गेले. मोलिअरने हास्य निर्माण केले आणि शेक्सपीअरने काव्य निर्माण केले, पण मोलिअर हा कवी नव्हता नि शेक्सपीअर हा हास्यकार नव्हता. पण गडकऱयांनी मोलिअर आणि शेक्सपीअरवरसुद्धा मात केली. काव्य, नाटय़ आणि विनोद या परस्परविरोधी तिन्ही क्षेत्रांत ते सारख्याच वैभवाने आणि दिमाखाने तळपले. त्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात जरी ते वावरले असते तरी त्यांनी तेवढेच यश मिळविले असते, पण साहित्यामधल्या अत्यंत बिकट म्हणून समजल्या जाणाऱया या तिन्ही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळविले आणि अलौकिक यश संपादन केले! म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाभोवती नि व्यक्तिमत्त्वाभोवती अद्भुततेचे रोमहर्षक वलय निर्माण झाले आणि त्यांच्या ओठातून आणि बोटातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरा-अक्षराने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले.

अन् एवढा सारा दिग्विजय अवघ्या चौतीस वर्षांच्या वयात मिळवून ते निघून गेले. त्यांच्या अमर लेखनाचा नि कर्तृत्वाचा काळ अवघा सहा-सात वर्षांचा होता. 1911 पासून तो 1918 पर्यंत! एवढय़ा थोडय़ा काळात त्यांनी मराठी साहित्यात आपले जे क्रांतिकारक युग निर्माण केले ते अद्यापि चालूच आहे. त्यांची सद्दी अजून संपली नाही.’’ गडकरींना जाऊन शतक होत आले तरी त्यांची कीर्ती पहिल्याइतकीच प्रफुल्लित आणि टवटवीत आहे. किंबहुना त्यांच्या अवसानानंतर जशी जशी अधिकाधिक वर्षे लोटताहेत, तसा तसा त्यांचा लौकिक नि आकर्षण जास्त जास्तच वाढत चालले आहे.’’

प्रखर शिवभक्त

गडकरी त्यांच्या शब्दप्रभुत्वाने चिरंजीव होतेच, पण पुण्यातील त्यांचा पुतळा तोडल्यावर ते अजरामर झाले आहेत. ज्या ‘राजसंन्यास’वरून पुण्यात त्यांच्या पुतळय़ावर हल्ले झाले ते ‘नाटक’ त्यांनी कुणाला अर्पण करावे? तर छत्रपती शिवाजीराजांच्या चितेत आत्मार्पण करणाऱया त्यांच्या आवडत्या इमानी कुत्र्याला. ही हृदयस्पर्शी कल्पना फक्त गडकऱयांनाच सुचू शकते. गडकरी हे शिवाजी महाराजांवर ऊठसूट प्रवचने देत नव्हते, पण त्यांच्या शिवभक्तीची तऱहाच वेगळी होती.

शिवछत्रपतींच्या चरित्राबद्दल आणि इतिहासाबद्दल त्यांना पराकाष्ठsचे प्रेम नि कमालीचा जिव्हाळा वाटत होता. रायगड पाहावयाला जाण्याचा एकदा काही मित्रांनी त्यांना आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, ‘‘रायगडच्या पहिल्या पायरीवर पाय टाकताच मी बेशुद्ध होऊन पडेन!’’ त्या त्यांच्या उद्गारातली ज्वलंत भावना कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. पुण्यापासून सिंहगड इतका जवळ असताना तो पाहण्यासाठी ते एकदाही गेले नाहीत. का? तर ते म्हणत, ‘‘सिंहगडाच्या पठारावर एकदा का मी उभा राहिलो तर ‘इंडियन पिनल कोड’ची 124 (अ) नि (ब) ही कलमे मला खाली ओढून आणायला असमर्थ ठरतील!’’ हे सर्व त्यांचे परमभक्त अत्र्यांच्या लेखनात आले आहे.

विनोदी आणि गमतीदार

गडकरी हे गमतीदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावावर जितके विनोद खपवले तेवढे पुलंच्या नावावरही खपवले नसतील. ते स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मास आले व त्याच काळात मरण पावले. त्यामुळे आज किरकोळ लोकांना सरकारी इतमाम वगैरे मिळतो तसा त्यांना मिळाला नाही. किर्लोस्कर नाटक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज किंवा रँग्लर परांजपे यांच्याविषयी गडकऱयांची भक्ती अगदी पराकोटीची होती. त्यामुळे या संस्थांवर टीका केली की गडकरी त्यांच्यावर तुटून पडत. रँग्लर परांजपे हे त्यांच्या मिश्यांचे आकडे वळवितात म्हणून त्यांच्यावर कोणीतरी टीका करताच, ‘‘रँग्लरांच्या मिश्या टोचल्याची तुमच्या घरातून तक्रार आली आहे काय?’’ असा सरळ प्रश्न विचारून गडकऱयांनी त्या टीकाकारास आडवे केले. गडकरी आजाराला भीत व डॉक्टरांचे अजिबात ऐकत नसत. डॉक्टरांनी त्यांना दात काढून कवळी बसवायला सांगितली, पण गडकरी मुळीच ऐकेनात. दातांचा आणि बुद्धीचा निकट संबंध आहे असे त्यांनी कुठेतरी वाचले होते. ते म्हणाले, ‘‘मी बुद्धिजीवी माणूस आहे. दात काढून माझ्या बुद्धीला अपाय झाला तर मी जगणार कसा?’’

सहज विनोद!

गडकऱयांच्या विनोदाची मौज ही होती की, तो अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त असे. त्यांच्या प्रतिभेचा झपाटाच वेगळा. त्यांच्या विनोदी वचनांची आणि सुभाषितांची कित्येक उदाहरणे देता येतील.

जगण्यासारखे जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे.

मरणाने माणसाला मोल येते.

लाखात एखादा हात खरा असतो.

पाणी चंचल आहे, पण मन पाण्याहून चंचल आहे.

रामाशी मन रमल्यावर माकडाशी मिठय़ा मारण्यात काय अर्थ आहे?

पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे, तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे.

पाय मोडल्यावर मैना कसली!

गळा दाबल्यावर कोयल कसली!

दात पाडल्यावर नागीण नाही!

डोळे फोडल्यावर वाघीण नाही.

पतिक्रतांची पुण्याई पातकी पुरुषालाही परमेश्वराच्या पदवीला पोचविते आणि नरपशूला नारायणस्वरूप बनविते. पतिक्रतेच्या पुण्याईपुढे पाप पांगळे पडून तिच्या पायाशी लोळण घेते!

‘‘जा, बाप, भाऊ, माझे जगात कोणी नाही. पतिक्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते. देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवऱयाची ती बायको असते!

‘एकच प्याल्या’तील मद्याच्या दुष्परिणामांवरील त्यांचे हे ज्वलंत संवाद वाचा. नशाबंदीवर सरकार कोटय़वधी रुपये ‘रिकाम्या’ ग्लासात वाया घालवते. त्याऐवजी गडकऱयांचे हे ज्वलंत ‘संवाद’ प्रसिद्ध केले तरी लोक नशामुक्त होतील. गडकरी लिहितात,

‘‘आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसतं तुला? काबाडकष्ट उपसून आलेला थकवा घालविण्यासाठी दारू पिणाऱया मजुरांच्या या पहा झोपडय़ा! निरुद्योगाची वेळ घालविण्यासाठी म्हणून दारू पिणाऱया श्रीमंतांच्या या पहा हवेल्या! प्रतिष्ठतपणाचे लक्षण म्हणून चोचल्याने दारू प्यायला शिकलेल्या पढतमूर्खांचा हा पहा तांडा! उद्योगी-गरीब, आळशी-श्रीमंत, साक्षर-पढतमूर्ख, निरक्षर-व्यवहारी या सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पहा एकच प्याला! दारूबाज नवऱयाच्या बायकांची ही पहा पांढरी फटफटीत कपाळे, दारूबाजाच्या पोरक्या पोरांच्या उपासमारीच्या ऐका या किंकाळय़ा! स्त्री जातीला नटवण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितके मोती बाहेर निघाले, त्याच्या दसपट आसवांचे मोती दारूमुळे स्त्री जातीने या एकाच प्याल्यात टाकले आहेत. जगावर अंमल चालविणारा सिकंदर दारूच्या अमलाखाली मारेकरी बनून तो पहा आपल्या जिवलग मित्राचा खून करीत आहे! मेलेल्यांना सजीव करणारा दैत्यगुरू शुक्राचार्य, तो पहा आपल्या त्या संजीवनीसह या एकच प्याल्यात स्वतःच मरून पडलेला आहे! जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे हे पहा छप्पन्न कोटी यादव वीर दारूच्या एकच प्याल्यात बुडून अधःपात भोगीत आहेत!’’

काही धाडसी प्रश्न

‘गोविंदाग्रज’ या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. ते खऱया अर्थाने ‘महाराष्ट्र शाहीर’ होते.

महाराष्ट्र गीत

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंडय़ाच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।१।।

असे महाराष्ट्र देशाचे स्तवन त्यांनी गायले. गडकऱयांविषयी असे सांगतात की, त्यांनी ज्याला आपला म्हटले त्याच्यासाठी ते जिवाचे रान करावयाला तयार असत. चिंतामणराव कोल्हटकर यांच्याविरुद्ध एकाने त्यांना काही सांगितले, त्याबरोबर ‘‘मी चिंतामणरावांबरोबर नरकात जाईन, पण तुमच्याबरोबर स्वर्गात येणार नाही!’’ असे खाड्कन गडकऱयांनी त्यांना बजावून सांगितले. ज्या काळात केवळ लेखनावर उपजीविका करणे अशक्य होते, त्या काळात केवळ लेखनासाठी आणि लेखनावर जगण्याचा प्रयत्न गडकऱयांनी केला. दारिद्रय़ाशी आणि लोकनिंदेशी त्यांना मरेपर्यंत झगडावे लागले. छगन भुजबळांसारख्या नेत्याच्या सुटकेसाठी समाज रस्त्यावर येतो, पण छत्रपती शिवाजीराजांची तलवार तोडल्यावरही जो समाज डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवून बसतो तोच समाज राम गणेश गडकरींचा पुतळा तोडल्यावरही षंढासारखा गप्प बसतो. शिवाजी महाराजांपासून राम गणेशांपर्यंत सगळय़ांना जातीची लेबले लावून आपण जणू राजकीय बाजार भरवला आहे. ज्यांनी पुतळय़ांवर हातोडे मारले त्यांच्यासाठी सोशल मीडियावर विचारलेले दोन प्रश्न देतो व विषय संपवतो.

हरी नरके धाडसाने विचारतात, ‘‘छत्रपती संभाजीराजांना पकडून देणारे, त्यांची साथ सोडून पळून जाणारे आणि शंभूराजे शत्रूच्या कैदेत असताना त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अवघ्या आठवडाभरात स्वतःला राज्याभिषेक करणारे नेमके कोण होते? हे ऐतिहासिक ‘सातबारे’ कोणाकडे मागायचे?’’

‘झी’ मराठीचे ‘बिझनेस हेड’ दीपक राजाध्यक्ष यांनी जोरकसपणे विचारले आहे, ‘‘हत्या करून, पुतळे फोडून, संशोधन संस्थांची राखरांगोळी करून अद्यापि पुरेसे समाधान झालेले नसताना कशाला हवेत नवे पुतळे…
नवी स्मारके…

नव्या संशोधन संस्था…

शिल्लक असलेलं सगळं आधी नष्ट होऊन जाऊ दे. मग नव्याने सगळे पुन्हा उभारता येईलच. निर्मितीपेक्षा नष्ट करण्याची झिंग वाढत चालली आहे काय?’’

गडकरी यांची जात शोधून हल्लेखोरांनी त्यांचा पुतळा फोडला. महाराष्ट्राच्या इभ्रतीला व पुरोगामित्वाला लावलेली ही चूड आहे. जातीय तळीरामांनी मराठी संस्कृतीवर टाकलेल्या या दारूच्या गुळण्या आहेत. असे जातीय द्वेषाचे व विध्वंसाचे काही घडले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पवार-पाटील, भोसल्यांवर टीकेची झोड उडविणाऱयांचे आज महाराष्ट्रात राज्य आहे. सर्व जातीधर्माच्या मराठी माणसांनी निषेध करावा असा हा प्रकार आहे. जोपर्यंत अशा विकृत विचारसरणीवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यात एकही साहित्य संमेलन, नाटय़संमेलन आयोजित करण्यात येणार नाही अशी भूमिका घेऊन उभे राहायलाच हवे. कर्नाटकातील लेखक एम. एम. कलबुर्गी व महाराष्ट्रातील गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जे लेखक व चळवळे रस्त्यावर उतरले ते सर्वजण राम गणेश गडकरी यांच्या पुतळय़ावरील हल्ल्यानंतर गप्प बसून आहेत.

‘राजहंस माझा निजला’ हे शोकगीत राम गणेशांनी म्हणजे गोविंदाग्रजांनी लिहिले होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही शोकगीतच झाले आहे.

‘‘महाराष्ट्र माझा निजला!’’ त्याला कुणी जागे करील काय?
....................
टॅग pune ram ganesh gadkari
......................

Sunday, January 8, 2017

पुन्हा पुन्हा मनुस्मृती...


दरवर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिनानिमित्त मनुस्मृतीच्या आठवणींना उजाळा मिळतो. मनुविरोधक आणि मनुसमर्थक यातले बहुतेक मूळातले फारसे काहीही न वाचताच "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" चमकून घेतात.
त्या सर्व "वाचन निरक्षर ज्ञानीजनांसाठी",
मित्रवर्य बालाजी सुतार यांच्या भिंतीवरील त्यांच्या पोस्टवर मी दिलेली Coment काही मित्रांच्या सुचनेवरून खाली देत आहे...

1.मनुस्मृती हा कायद्यांचा कायदा असलेला प्राचीन ग्रंथ आहे. त्याचे इंग्रजी नाव " Manu's code of Law" "Manav Dharmashastra " आहे. त्यावर महात्मा फुले, पेरियार, डा.बाबासाहेब आंबेडकर आदींनी गंभीर आक्षेप घेतल्यामुळे व 25 डिसेंबर 1927ला महाडला तो बाबासाहेबांनी जाळल्यामुळे त्याची चर्चा जास्त होते.

2.त्याच्या लोकप्रिय आवॄत्त्या बाजारात आहेत त्या प्रामुख्याने वाईच्या बापट शास्त्री यांनी मराठी अनुवादासह प्रकाशित केलेल्या आहेत. प्रकाशक आहेत रमेश रघुवंशी आणि वितरक आहेत गजानन बुक डेपो, मुंबईत दादरला कबुतर खाना आणि पुण्यात भरत नाट्य मंदिरासमोर.

3.हा ग्रंथ 2684 श्लोकांचा आणि 12 अध्यायांचा आहे. मनुस्मृतीचा कालसापेक्ष अर्थ लावणारे मेधातिथी आदी विद्वानांचे भाष्यग्रंथ वाचल्याशिवाय मनुस्मृती वाचणे अर्धवट ठरेल.
4. मेधातिथी ते पुढच्या सर्व भाष्यकारांच्या भाष्याचे भारतीय विद्याभवनने 8 खंड प्रकाशित केलेले आहेत.

5. मनुस्मृतीची संशोधित आवृत्ती प्रकाशित झालेली आहे.
Manu's code of Law, By Patrick Olivelle,OXFORD University Press, 2005.

6. मनुस्मृतीवर टिकात्मक भाष्य करणारे लेखन अनेकांनी केलेले असून त्यातील नरहर कुरूंदकर, पटवर्धन, डा.आ.ह. साळुंखे आणि भदंत आनंद कौशल्यायन यांचे ग्रंथ खूपच गाजलेले आहेत.
7."हिस्ट्री आफ धर्मशास्त्र", धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात [खंड 1, पृ.306 ते 349] भारतरत्न पां.वा.काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रंथ इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. 2 रे शतक याकाळात विकसित झाला.

8. डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते इ.स.4 थ्या शतकात अस्पृश्यता निर्माण झाली तेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली. "भारतीय जातिसंस्थेचा इतिहास" लिहिणारे इतिहासकार संजय सोनवणी यांच्या मते 11/12 व्या शतकानंतर या ग्रंथाची जबरी पकड भारतीय समाजावर बसली. त्यामुळे सर्व स्त्रिया व शूद्र आणि अतिशूद्र यांना भेदभाव,पक्षपात,अन्याय, शोषण यांची शिकार व्हावे लागले. इतिहासकार उमेश बगाडे यांच्या संशोधनानुसार भारताचा सर्व महसुली कारभार या ग्रंथाच्या आधारे चालवला जाई, अगदी कडव्या औरंगजेबाच्या काळातही महसुलव्यवस्था याच ग्रंथाच्या आधारे चालवली जात होती असे ते म्हणतात.

9. इतर अनेक स्मृती असल्या तरी मनुस्मृतीला एकप्रकारच्या संविधानाचा दर्जा होता. तो केवळ धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ असल्याने, अन्यायकारक कायदे आणि राजदंडाच्या आधारे करण्यात आलेला घटनात्मक अन्याय म्हणून मनुस्मृतीवर जास्त बोलले/लिहिले जाणे स्वाभाविक आहे.

10. अर्थात मनुविरोधक किंवा मनुसमर्थक हे सारे ग्रंथ वाचून मगच आपली मते बनवतात असा आरोप मी करणार नाही.

11. अगदी इंग्रजी राजवटीतही आयपीसी, सीआरपीसी तयार होईपर्यंत अनेक बाबतीत आणि ते तयार झाल्यावरही कौटुंबिक विेषयावर मनुस्मृतीच प्रमाण मानली जाई.
............................

Wednesday, January 4, 2017

राम गणेश गडकरी तुम्हारा तो चुक्याच....


सावित्रीबाईंची जयंती 3 जाने. हाच मुहुर्त का निवडला असेल बरे?
2019 ला पुढचा नंबर कोणाचा?
.......................
प्राथमिक शाळेत आम्हाला अरण्य नावाचे एक गडकरीभक्त शिक्षक होते. त्यांनी बालवयात गडकर्‍यांची गोडी लावली. बालपण तसे अत्यंत काटेरी आणि खडतर होते.
त्या करपलेल्या वातावरणात ज्यांनी अमाप आनंदाचे झरे खोदले त्यातलं सर्वात लाडकं व्यक्तीमत्व म्हणजे राम गणेश गडकरी.
काय गारूड केलेलं या  भाषाप्रभुनं! सारं बालपण गडकर्‍यांच्या झाडानं झपाटलेलं!
मी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धांची शेकडो बक्षिसं शाळेपासून महाविद्यालयापर्यंत मिळवली. अनेक विषयांमध्ये पंचेस साठी गडकरी मदतीला धावून यायचे.
राम गणेश गडकरी यांच्या अवतरणांबद्दल त्यांना स्वामित्वधन द्यायचं ठरलं असतं तर त्या काळात मिळवलेल्या पारितोषिकांमधून काही हजार रूपये नक्कीच द्यावे लागले असते.
शाळकरी वयात मी पुस्तकं विकत घ्यायला सुरूवात केल्यानंतर एका लेखकाच्या सर्व पुस्तकांचा पहिला संच खरेदी केला तो गडकर्‍यांचा होता.
त्यावेळी मला स्मशानातील नोकरीचा महिन्याचा पगार मिळायचा 20 रूपये. पुण्याच्या रम्यकथा प्रकाशन, 392 नारायण पेठ च्या वा.ग.मेहेंदळे यांनी प्रकाशित केलेला हा संच 1970 च्या दशकात अवघ्या 25 रूपयांना मिळाला. मला वर्षाचा पगार वाचवून वाचवून साठवलेले हे पैसे त्यासाठी उपयोगी आले.
महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असताना प्र.ना.परांजपे सर एकदा एका स्पर्धेला मला परिक्षक होते.  रा.ग. गडकरी यांच्या संमोहनातून त्यांनी माझी काही प्रमाणात सुटका केली.
अर्थात आजही गडकरी पुर्वी  इतके नसले तरी आवडतातच.
तेव्हा आम्हाला गडकर्‍यांची जात माहित नव्हती. यापुढे कोणताही ललित लेखक [ कथाकार,कादंबरीकार, नाटककार ] वाचायला घेताना आधी त्यांची जात बघून घेतलेली बरी. यापुढे प्रत्येक  पुस्तक दुकानात लेखकांच्या जातींचा तक्ता ठेवण्याची सक्ती करायला हवी. किंवा पुस्तकाच्या नावासमोरच लेखकाच्या जातीची नोंद अनिवार्य करण्यात यावी.
विशेषत: त्यानं जर शिवकाळाबद्दल काही लिहिलं असलं तर त्यांनी "ए" किंबा "बी" ग्रेडी प्रमाणपत्र घेतले होते किंवा कसे याचा तपास काढायला हवा. कदाचित उद्या लेखक संपले तर वाचक,संग्राहक,प्रकाशक यांच्यावरही मालकांची खप्पा मर्जी व्हायची.
मराठीतले आद्य पोवाडाकार महात्मा फुले आणि दुसरे लेखक म.मो.कुंटे यांचा सुद्धा लवकरच नंबर लागणार हे निश्चित.
गडकरी तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात तिला शिवराय,शंभुराजे ही पवित्र नावं उच्चारण्याचा अधिकार तरी होता काय?
100 वर्षांपुर्वीच्या तुमच्या गुन्ह्याला माफी नाही.
पुतळा झाला. आता गडकरी यांच्या अस्थीसुद्धा आम्ही सोडणार नाही.
3 जानेवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. यापुढे लोकांचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हावे आणि राम गणेश पुतळा दिनाचा इतिहास रचला जावा यासाठी तर हा मुहुर्त काढण्यात आला नाही ना?
नाटककार गडकरी, कवी गडकरी, विनोदकार गडकरी यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
ते इतिहासकार नव्हते.
पण त्या काळातले ख्यातनाम इतिहासकार कृष्णाजी अर्जून केळुस्कर यांचे शिवचरित्र वरदा प्रकाशनाच्या भावे आणि साकेत च्या बाबा भांडांनी अलिकडे पुन्हा एकदा प्रकाशित केलय.
आता केळुसकर पडले मराठा.
2019 च्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचाही नंबर लागणार काय? गेल्या 12 वर्षात दर निवडणुकीआधी एक याप्रमाणे भांडारकर झाले, दादोजी कोंडदेव झाले, वाघ्या कुत्राही सुटला नाही. आता राम गणेशानंतर नंबर कोणाचा?
.......................

Monday, January 2, 2017

OBC Literary movement...Why? -- Sanjay Sonawani

Thinker, Author and Philosopher Sanjay Sonawani writes on OBC Literatur......
http://sanjaysonawani.blogspot.in/
........ संजय सोनवणी (Sanjay Sonawani)
........ Monday, December 12, 2016

In our country, the literature too seems clearly has been divided in the four categories. That is the literature of the so-called upper castes, dalits, tribal and OBC. The upper caste and Dalit literature is dominant though they are conflicting with each other and stands opposite in socio-cultural views. However, the OBC literature, though a recent concept, has very few takers even among the OBC authors and thinkers. There have been attempts to combine the both Dalit and OBC literature, but they have not been successful. The thinkers those are trying to promote the concept of the OBC literature also are confined to what the ideological base should this literary movement carry.

Mahatma Phule and Dr. Ambedkar are the obvious idols to the thinkers those are in this attempt, but practically it is experienced that combining the both to create an ideology for the OBC hasn't worked out well. The reasons may be probed, however, let us first decide what the OBC literature means? For that let us ask few questions to ourselves.

1.    Can literature only written by OBC be OBC literature?
2.    Can the literature in which OBC characters and their strife is depicted and penned by the OBC be the OBC literature?
3.    Can the literature authored by anybody but depicting OBC characters and their life be the OBC literature?
4.    What is meant by the term literature?

Let us discuss the above questions.

-         Technically, any literature written by any OBC writer can become OBC literature. There is no dearth of OBC writers now in the country. There are many poets, playwrights, novelists and story writers of fame that belong to the OBC category.

However, when we come to the second and third question, we can see clearly that the literature written by the OBC cannot become OBC literature because their characters, the ideologies and the social relationships depicted in their works are almost devoid of any OBC aspiration or their strife for the better tomorrow through their complexities of the life.

Then how it can become OBC literature?

The literature in which the OBC protagonists are portrayed on the backdrop of their social conditions, their aspirations, their strife, their sentiments, their driving forces and their achievements or failures are portrayed can be treated as the OBC literature.

But what if the writer is not OBC? Can still it be called OBC literature?

Technically it should because the literature in question will be all about OBCs and their social relationship with rest of the society.

What is literature? Literature is any form of the written or vocal expression in which human life is depicted in creative artistic manner. I exclude autobiographies from this term because it doesn’t fulfill the definition of the literature though it may embrace the some of the essential ingredients of the literature. Autobiographies do expose and explore the social conditions of certain groups those were unknown to the rest of the world. Dalit autobiographies are the fine example of this. However, this is not the case with the OBC though there are ample of autobiographies, but the expression limited to their own life without relating it to the vision as OBC and any contribution to the ideology, no matter what it is.

The literature is almost devoid of the OBC protagonists and their life. Uddhav Shelke’s “Dhag” is an exception that I have come across. There could be other exceptions as well. In rest of the literature, there are OBC characters here and there but their role is subordinate and seems to be picked up randomly to suit the plot.

Why this could have happened?

The first thing comes to my mind is OBC community is still overburdened with the inferiority complex that makes him reluctant to choose protagonists from his own caste or from OBC community. They do not think the life of the OBC could be or is exciting enough that can provide charming plots to write novels or plays. Moreover, they try to look for so-called glorious plots where mighty people provide attractive characters those can be easily popularized or already popular. They also might be feeling that the readers may not welcome the book if it is on the backdrop of their community as no one would be interested for lack of appealing characters. However, an artist should be able to sense the appeal even in the simplest characters.

I know many OBC authors and poets but they hesitate to present themselves as OBC. Rather they desire upward mobility in the literary circles by adjusting their ideologies accordingly. Having own ideaology is quite rare among all the authors belonging to any camp. In lack of that, they mostly enter the Hindutva camp for they provide stage and fame through their numerous tentacle organizations/groups. Dalit literary movement, though that too has been slowed down recently, is more aggressive, full of Amebedkarite ideology,  cope up some OBC writers who are rebellious and are prone to the social change. In a way, OBC writers have no option to belong to this or that camp because they do not have their own. The OBC thus seldom can voice their own thoughts those are independent of the influence of both the camps. This is why the ideological construction of the OBC movement could not progress at all!

It may be asked whether there really is a need of an independent literary movement of OBC? Why divide literature on basis of the castes? I would like to ask, are the problems, aspirations, social conditions and the sufferings of OBC are as same as of the writers belonging to the other camps? There won't be any necessity of separate camps if the life of the OBC was portrayed enough with the unprejudiced psyche and human sympathy. This is not the case.

It is said that the OBC community is a group of so many castes that it is impossible to incorporate them in a single voice. This is not true. The common link between every OBC caste is that they were all creators since Indus times, makers of the utilitarian innovative commodities those they had invented in the remote past and became the pillar of the economy since then by their immense contribution. Many castes are included in OBC category and some are excluded. However, the fact remains that all the Creator Communities belong to the OBC category, though legally they might be excluded or thrown in some other category for the constitutional criterion.

Hence Mandal Commissions or later categorization cannot limit the scope of OBC in a social sense.  It has to be broadened to some extent when we speak of OBC literature.

Most importantly OBC has not been cautious or even curious about searching their own roots. They either are dependent on the Vedic sources, foreign sources or on the Dalit sources. They do not have their own vision because they never tried to know their past better! They are unaware of their cultural history, rather they are least interested in it. They do not know even they were one who were the creators of the culture as well.

Hence there is no independent research that can throw proper light on their existence and help to understand what they are! Rather they want to connect some or other way with either Kshatriya Race or Brahmin varna and eventually become subordinate to both the communities. OBC are religious but they are unaware of the fact that their deities and philosophies have been hijacked long ago. The rebellion OBC takes the opposite stance and joins the camp that trusts vehemently that those were the Brahmins who forced caste system on them. Both the claims are illogical, unhistorical and hence no independent ideology of the OBC ever could develop. Knowing the roots is the first step towards building an independent ideology. In absence of this the lack of the OBC literature was a natural outcome. The OBC literary meets have started from past decade but I do not find they have been addressing the root cause.

Necessity

OBC or creator community is the largest in the country, no matter what religion they belong to today. The common factor is they all are a class of the innovative creators and builders of the economy and culture till the advent of the British Raj.  I call this class as the “Nirmankarta samaj”. Caste meant profession or occupation. There is no question of anybody forcing it to enslave them. The OBCs have seen glorious days right from Indus days till 11th century AD. There has been a drastic decline in their socio-economical conditions since then. Before that, they enjoyed all the privileges from the Royal courts and honor in the society as they had built powerful guilds of every manufacturing profession. But is there any novel that depicts, for example, invention of the iron, blacksmiths guild, their life and the challenges they overcame to excel? Is there no romance enough to portray for a good historical novel?

Is history only belongs to the kings, the nobles and priests?

 With wake of the industrial revolution, gradually he lost his businesses and turned to the factories or farms as a labor for survival, forcibly abandoning his ancestral occupations. They were never provided with the viable alternatives for the survival. Isn’t there a chance to portray a socio-economic upheaval that drastically affected his life that not only changed his surroundings and the social relationships with his usual way of life in such a manner that he lost his honor and remained only struggler and sufferer? There are so many seeds that can become independent plots for the classic literature if we allow to sprout them.

The need has arisen because there is no proper depiction of the OBC communities in the literature. As if they do not exist as a human being. Hence there is no reflection of their aspirations, their strife, dreams and philosophy in the literature. Even, there is no as yet proper research in their history and the changes they underwent through the ages. The cultural roots of the OBC are almost forgotten. The inferiority complex has forced them to build fictitious stories about the origin to counter Vedic explanation or he is forced to trust whatever is told to him without an opportunity to check the reality. So, OBC is the community that is totally confused and hence  OBC writer too does not dare much to portray OBC protagonists and their life.

In the modern era, only Mahatma Phule could dare the closed walls of the ignorance and the social oppression.  There has been no attempt to create any ideology out of Mahatma Phule’s works that could attract the writers to make it a part of their literary expressions. In fact, the identity crisis seems to be affecting the Nirmankartas and hence no firm and concrete vision is being developed.

The tragedy is the creator community utterly have failed in creating literature out of their life.The OBC literature is needed to give new philosophy, the vision and the goal for OBCs life. The literature should be a mirror where any OBC can find his reflection and aspire for new heights. His present condition is terrifically bad as compared with other communities in India. He is almost voiceless, powerless and whatever achievements he embraces are out of his mountainous hard work. Most OBCs are a failure or enjoy the camps where they do not belong.  No matter whether it is literary, education, economic or political world.

And unless this class is empowered in all he will be left neglected forever. Literature, where one can relate and identify….feel his self is a base of the motivations.  Unfortunately, OBC has nothing to relate with in the literature.

OBC literary movement is to inspire OBC writers to change their stance and find material from their own community to do the creative work. The researchers should find time to search for the roots of the OBCs with the unbiased mind and find answers to the present predicament OBCs are facing. There could be many views but those can be debated over for the betterment of the society.

One thing is clear, unless OBC stands strong and erect India never can become a true Superpower ever!
Posted by Sanjay Sonawani at 7:16 PM
.......................

ओबीसी साहित्याची चळवळ -- श्रीधर तिळवे नाईक

या टीपणात श्रीधर तिळवे नाईक सर यांनी अतिशय महत्वाची मांडणी केलीए. यावर साधकबाधक चर्चा झाल्यास त्यातूनच एक संकल्प चित्र तयार होऊ शकेल. सर, धन्यवाद.-- Prof Hari Narke
............................
Shridhar Tilve:-- 6 hrs · 
ओबीसी साहित्याची चळवळ -- श्रीधर तिळवे नाईक
साठोत्तरी साहित्यात ज्या काही महत्वाच्या चळवळी निर्माण झाल्या त्या सर्वच मार्गी साहित्य चळवळीविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या 
१ देशीवादी चळवळ 
२ दलित चळवळ 
३ आदिवासी साहित्याची चळवळ
४ अल्पसंख्यांक साहित्य चळवळ उदा ख्रिस्ती व मुस्लिम साहित्य चळवळ 
५ ग्रामीण साहित्य चळवळ 
६ स्त्रीवादी चळवळ
१९९० नंतर मात्र एक नवीन चळवळ उभी राहिलीये ती म्हणजे ओबीसी साहित्य चळवळ मंडल आयोगामुळे नव्याने संघटित झालेल्या ओबीसी जाती यात येतात आणि पारंपरिक क्षत्रिय(कुणबी , लेवा पाटील व धनगर ) , वैश्य(तेली व इतर ) आणि शूद्र (अलुतेदार आणि बलुतेदार )वर्णातील अनेक जाती ह्यात येतात . ११०० च्या आसपास ब्राह्मणांनी सर्वच ब्राह्मणेतरांना शूद्र ठरवल्याने ब्राह्मणेतर टायटलखाली साहित्यिक चळवळी संघटित झाल्या पण मंडल आयोगाने नेमक्या अप्रगत जातीजमाती वेचून काढून आरक्षण सवलतपात्र ओबीसी समाज नव्याने निर्माण केला आणि ह्या समाजातून ही चळवळ निर्माण झाली आहे . प्रश्न असा आहे कि ह्या चळवळीचा वर उल्लेख केलेल्या चळवळींशी नेमका काय संबंध आहे आणि ती वरील चळवळीपासून कशी कुठे आणि का वेगळी आहे . तिच्या साहित्याचे वेगळेपण कशात आहे ?
संख्यात्मक पातळीवर पाहिले तर भारतातील ओबीसी समुदायाची संख्या तब्बल ४२ ते ४५ टक्के आहे म्हणजे एका अर्थाने भारतातील सर्वात विशाल समुदायाची ही साहित्य चळवळ आहे त्यामुळे भविष्यात तिचा आवाज हा सर्वाधिक मोठा होणे अटळ आहे . असे असूनही ह्या साहित्य चळवळीचे स्वतःचे \साहित्यशास्त्र मात्र तयार झालेले नाही हा दुर्विलास नाही का ? त्याचबरोबर साठोत्तरी चळवळीशी ह्या चळवळीने काय संबंध ठेवायचे हा प्रश्न आहे . ओबीसी हा समुदायचं मूळात बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक मांडणीतून तयार झालाय त्यामुळे दलित साहित्यिकांना ह्या चळवळीविषयी विशेष ममत्व वाटते पण ह्या ममत्वाचे काय करायचे हा प्रश्न सुटत नाहीये त्याचबरोबर ओबीसी आपल्या चळवळीचे अर्ध्वयू माळी समाजातून आलेल्या महात्मा फुलेंना मानतात पण जे ममत्व महात्मा फुलेंना दलितांविषयी वाटत होते ते ओबीसींना दलितांविषयी वाटते का ?
दलित . ओबीसी आणि आदिवासी ह्या सगळ्यांनी मिळून एक महाआघाडी उघडावी अशी तळमळ ह्यातील कितीजणांना आहे ? एकेकाळी दलित आणि ओबीसी ह्यांचे एकत्रीकरण होईल असे वाटले होते पण ओबीसींच्यातील जातीयतेने दलितांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकार दिला त्यातच सगळा ओबीसी हा शैव असल्याने त्याला बौद्ध व्हायचे नाही हे काळाच्या ओघात आता स्पष्ट झाले आहे अशावेळी शैवांच्यातील पुरोगामी विचारवंतांना मान्यता देत आगम आघाडी उघडणे हाच पर्याय होता जो मी गेली कित्येक दशके मांडत आलोय पण त्याला मान्यता मिळणे अजूनही कठीण जाते कारण दलितांच्या डोक्यात अजूनही सगळा भारत बौद्धमय करेन ह्या आंबेडकरांच्या प्रतिज्ञेचा पवित्रा ताजा आहे वस्तुस्थिती अशी आहे की सगळा भारत बौद्ध होणार नाही पण सर्व भारताला बुद्ध आत्मसात करता येईल पण अजूनही बुद्धाला आत्मसात करण्यात ओबीसी कमी पडत आहेत ह्यामुळे एक अनावश्यक दरी दलित आणि ओबीसी ह्यांच्यात निर्माण झाली आहे जिचा अंतिम फायदा भाजपला होतो आहे .
ह्याक्षणी एकेकाळी दलित साहित्यापुढे असलेले सर्व प्रश्न ओबीसी साहित्यापुढे उभे राहणे अटळ आहे हे प्रश्न पुढीलप्रमाणे 
१ दलित साहित्य म्हणजे काय ?
२ दलित साहित्यकृती कशाला म्हणावे ?
३ दलित साहित्यिक कुणाला म्हणावे ?
४ दलितेतर साहित्यिकांच्या कलाकृतींना दलित साहित्य म्हणावे कि म्हणू नये ? म्हणावे तर का आणि म्हणू नये तर का ?
५ जन्माने दलित असणारे पण दलितांविषयी न लिहिणाऱ्या साहित्यिकांचे काय करायचे ?त्यांना दलित म्हणायचे कि नाही ? त्यांना दलित म्हणून चळवळीचा फायदा द्यायचा कि नाही ? कि छुपी भलावण करत उघडपणे नकार द्यायचा ?
दलित साहित्यातले हे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही असेच प्रश्न ओबीसी साहित्यापुढे उभे राहणे अटळ आहे म्हणजे 
१ ओबीसी साहित्य म्हणजे काय ?
२ ओबीसी साहित्यकृती कशाला म्हणावे ?
३ ओबीसी साहित्यिक कुणाला म्हणावे ?
४ ओबीसींतर साहित्यिकांच्या कलाकृतींना ओबीसी साहित्य म्हणावे कि म्हणू नये ? म्हणावे तर का आणि म्हणू नये तर का ?
५ जन्माने ओबीसी असणारे पण ओबीसीविषयी न लिहिणाऱ्या साहित्यिकांचे काय करायचे ?त्यांना ओबीसी म्हणायचे कि नाही ? त्यांना ओबीसी म्हणून चळवळीचा फायदा द्यायचा कि नाही ? कि छुपी भलावण करत उघडपणे नकार द्यायचा ?
माझी दलित साहित्याविषयीची मते मी इथे प्रथम देतो 
१ दलित जातीजमातींना किंवा दलित जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य 
२ दलित जातीजमातींना किंवा दलित जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली साहित्यकृती म्हणजे दलित साहित्यकृती 
३ दोन किंवा त्याहून अधिक दलित साहित्यकृती लिहिणारा साहित्यिक तो दलित साहित्यिक 
४ साहित्यिकाची धर्म , वर्ण , जात वा जमात पाहू नये दलितेतर लेखकांनी लिहिलेल्या दलित साहित्यकृतीही दलित साहित्यात मोडतात 
५ जन्माने दलित असूनही दलित साहित्य न लिहिणाऱ्या साहित्यिकाला दलित साहित्यिक मानू नये मात्र त्यांच्या साहित्यकृतींचे मूल्यमापन कसलाही पूर्वग्रह न बाळगता करावे ग्रेससारखा कवी मार्गी संस्कृतीत राहून अभिजात दर्जाची निर्मिती करत असेल तर आणि ही निर्मिती करतांना तो वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बाजूने उभा रहात असेल तर त्याला जरूर दाद द्यावी आणि तो जर वर्णव्यवस्थेच्या बाजूने साहित्यात उभा राहतोय असे वाटत असेल तर तेही नीट उलगडून मांडावे अशावेळी तो केवळ जन्माने दलित आहे म्हणून त्याला सवलत देऊ नये ह्याचबरोबर अदलीत साहित्यात डोकावणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या समर्थनावर जोरदार हल्ले करत रहावे .
आत्ता ह्याच पातळीवर ओबीसी साहित्यावर बोलणे अशक्य नाही
१ ओबीसी जातीजमातींना किंवा ओबीसी जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले साहित्य म्हणजे ओबीसी साहित्य उदाहरणार्थ आनंद यादव ह्यांची गोतावळा किंवा उद्धव शेळके ह्यांच्या जवळ जवळ सर्वच साहित्यकृती 
२ ओबीसी जातीजमातींना किंवा ओबीसी जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली साहित्यकृती म्हणजे ओबीसी साहित्यकृती 
३ दोन किंवा त्याहून अधिक ओबीसी साहित्यकृती लिहिणारा साहित्यिक तो ओबीसी साहित्यिक 
४ साहित्यिकाची धर्म , वर्ण , जात वा जमात पाहू नये ओबीसीतर लेखकांनी लिहिलेल्या ओबीसी साहित्यकृतीही ओबीसी साहित्यात मोडतात उदाहरणार्थ तू वेडा कुंभार हे व्यंकटेश माडगूळकरांचे नाटक . 
५ जन्माने ओबीसी असूनही ओबीसी साहित्य न लिहिणाऱ्या साहित्यिकाला ओबीसी साहित्यिक मानू नये मात्र त्यांच्या साहित्यकृतींचे मूल्यमापन कसलाही पूर्वग्रह न बाळगता करावे विलास सारंगसारखा लेखक मार्गी संस्कृतीत राहून अभिजात दर्जाची निर्मिती करत असेल तर आणि ही निर्मिती करतांना तो वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध उभा रहात असेल तर त्याला जरूर दाद द्यावी आणि तो जर वर्णव्यवस्थेच्या बाजूने साहित्यात उभा राहतोय असे वाटत असेल तर तेही नीट उलगडून मांडावे अशावेळी तो केवळ जन्माने ओबीसी आहे म्हणून त्याला सवलत देऊ नये ह्याचबरोबर अओबीसी साहित्यात डोकावणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या समर्थनावर जोरदार हल्ले करत रहावे .
प्रश्न असा आहे कि ओबीसी साहित्याची चळवळ आवश्यक आहे का ?
ह्यासाठी प्रश्न मुळात पडतात कि ओबीसींचे पुरेसे प्रतिबिंब भारतीय साहित्यात पडले आहे का ?
किती भारतीय साहित्यकृतीत ओबीसी नायक आलेले आहेत ?
लोहार , गुरव , धनगर ह्या सारख्या समाजांना भारतीय साहित्यिकांनी न्याय दिला आहे का ?
ह्यासारख्या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी असेल तर ओबीसी साहित्याची चळवळ काही काळ तरी आवश्यक आहे हे मान्य करावे लागेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे . त्यामुळे एक सामाजिक आपदा म्हणून तरी का होईना ह्या चळवळीची आवश्यकता पटावी .
आता काही साहित्यिक हे निखळ मानवतावादी असणे अटळ तर अशांना ओबीसी साहित्य चळवळीने विरोध करू नये कारण ह्याही चळवळीचा अंतिम उद्देश मानवता हाच असला पाहिला पाहिजे सर्व मानवांना करुणेने कवटाळणे ह्यातच तिचे साफल्य असले पाहिजे अन्यथा संख्येचा फायदा घेऊन ह्या चळवळीत जितके राजकारण घुसण्याची शक्यता आहे तितके इतर साहित्य चळवळीत शक्य नाही . फाटाफूट हा भारतीय चळवळींचा स्वभाव आहे त्या स्वभावापासून रक्षण करण्याची प्रचंड जबाबदारी चळवळीवर आणि चळवळीतील लोकांच्यावर येते . ही साहित्य चळवळ भारतीय साहित्यात नेमका काय रोल निभावते ह्याविषयी एक समाजशास्त्रीय उत्सुकता माझ्या मनात आहे . पाहू सुरवात तर झाली आहे 
------------------------------------------------------------------------------------------
श्रीधर तिळवे नाईक
..............................