Thursday, February 9, 2017

" रेणकोट घालून आंघोळ करणे" ही टिका निरर्गल


मी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष किंवा गांधी घराणे यांचा चाहता नाही.
तथापि मी नियोजन आयोगात सल्लागार गटात काम करताना डा. मनमोहन सिंग यांची ऋजुता, व्यासंग आणि विनयशीलता जवळून अनुभवलेली आहे. ते रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर असताना मी त्यांना शेजारच्या पुस्तकांच्या दुकानात दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत पायर्‍यांवर बसून ग्रंथवाचन करताना पाहिलेले आहे.
या माणसाने रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री व दोन वेळा पंतप्रधान म्हणुन भारतीय अर्थकारणाला जबरदस्त वळण दिलेले आहे.
त्यांच्या कार्यावर टिका करतानाही हे लक्षात ठेवायला हवे की त्यांच्या पदव्या जागतिक विद्यापिठांमधल्या आहेत. त्यांच्याबद्दल यांच्यासारखे वाद उद्भवलेले नाहीत. अशा जागतिक किर्तीच्या अर्थशास्त्रज्ञाला त्यांचे आर्थिक विषयावरील भाषण दुसर्‍यांनी लिहून दिलेले असेल असा हीनकस आरोप करणारे सद्गृहस्थ हे माझ्या देशाचे पंतप्रधान असावेत याचा एक जबाबदार भारतीय म्हणून मला खेद वाटतो.
मनमोहनजी, आम्हाला क्षमा करा. या सामान्य वकुबाच्या गर्दीत, अतिसुमारांच्या सद्दीत, असल्या वाचाळांमुळे भारतीय संस्कृतीची घसरण होते आहे.
" रेणकोट घालून आंघोळ करणे" ही केवळ निरर्गल टिका नसून ती स्वत:ची हीनकस अभिरूची दर्शवणारी कृती आहे.
मतस्वातंत्र्य / मतभेद हा लोकशाहीचा गाभा आहे, पण ते व्यक्त करण्याची पातळी आज सुटली हेच खरे!

No comments:

Post a Comment