Tuesday, March 28, 2017

भारतीय मुस्लीम परके आहेत काय?

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 3 :-
भारतीय मुस्लीम परके आहेत काय?
सामान्यपणे मुस्लीम समाजाबद्दल बोलताना काही मंडळी जाणीवपुर्वक मुस्लीम हे परके असल्याचं, ते बाहेरून आल्याचं सांगतात. त्यात किती तथ्य आहे हे तपासायचं तर मग जे 99% धर्मांतरीत मुस्लीम आहेत त्यांना कसं परकं म्हणता येईल? फार तर 1% अश्रफ - अ - बाबत असं म्हणता येऊ शकेल. उरलेले 99% तर धर्मांतर केलेले इथलेच आहेत.
पण तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच.
हे विश्व सुमारे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी अस्तित्वात आल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. असेही सांगितले जाते की माणसाच्या आधीचा माणसाचा जो पुर्वज आहे तो 1 कॊटी वर्षांपुर्वी जन्माला आला.
माणसाच्या आधीच्या या पुर्वजाची हाडं केनिया आणि टांझानिया या दक्षिण आफ्रिका प्रांतातील देशात सापडतात ती सामान्यपणे 22 लाख वर्षांपुर्वीची आहेत.
भारतीय उत्खननात मात्र अशी इतकी जुनी हाडं सापडलेली नाहीत. याचा अर्थ असा असू शकतो की कधीतरी आपले पुर्वज अन्न,पाणी यांच्य शोधात या प्रातांत आले असतील. पुर्वी असे मानले जायचे की आर्य सुमारे साडेसहा ते साडेतीन हजार वर्षांपुर्वी भारतात आले. लोकमान्य टिळक ते इतिहासाचार्य राजवाडे यांना हा शोध मान्य होता. मात्र डा.बाबासाहेब आंबेडकर व अन्य संशोधकांनी हा सिद्धांत नाकारलेला आहे.
शक, हुण, रठ्ठ अशा अनेक टोळ्या बाहेरून आल्याचं मानलं गेलं. आक्रमणं होत राहिली.
रोम आणि इतर प्रांतांशी भारताचा व्यापार दोन हजार वर्षांपुर्वींपासून असून त्याचे पुरावे आता तेर, उस्मानाबाद, लोथल [गुजरात] उत्खननात मिळतात.
प्रेषित महंमद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना ज्याकाळात केली त्याच लगतच्या काळात केरळमध्ये पहिली मशिद उभारली गेल्याचं सांगितलं जातं.
पार्शीसुद्धा असेच भारतात बाहेरून आले.
याचा अर्थ सतत बाहेरून लोक येत राहिले. फार तर काही आधी आले तर काही नंतर आले इतकाच फरक.
अशा परिस्थितीत कोण मुळचा आणि कोण परका हे कळायचं कसं?
एक मार्ग आहे.
बाबर आला, इंग्रज आले, फ्रेंच आले, पोतुगीज आले, अन्य काही आले.
काहींनी इथं राज्य केलं. संपत्ती लुटली आणि आपल्या देशाला ती घेऊन गेले. इंग्रज परत गेले, फ्रेंच परत गेले, पोर्तुगीज परत गेले. असे जे परत गेले ते परके. जे इथेच राहिले, इथेच त्यांनी लग्नं केली, इथंच मेले. इथल्याच मातीत त्यांची कबर उभारली गेले त्यांना या न्यायानं परकं कसं म्हणायचं?
या दीडदोन हजार वर्षात अनेक गोष्टी एकमेकांनी एकमेकांच्या स्विकारल्या. संगित, आर्कीटेक्ट, खाद्य पदार्थ, कला, कौशल्यं, ज्ञान, केशभुषा, वेशभुषा, भाषा, संस्कृती, तत्वज्ञान कितीतरी.
त्यातून एक गंगाजमना तहजीब म्हणजे "गंगाजमुना" संस्कृती जन्माला आली.
राजकीय सत्तेसाठी जरूर लढाया झाल्या, पण याकाळात सामान्य माणूस मात्र एकमेकांशी गुण्या गोविंदानं नांदत होता.
भारतात पहिली हिंदुमुस्लीम दंगल इंग्रज सरकारनं जाणीवपुर्वक "फोडा आणि झोडा" नीती वापरून घडवली ती 13 आगष्ट 1893 मध्ये.
हिंदू आणि मुस्लीम या देशात 1400 वर्षे एकत्र राहात असताना राज्यकर्त्यांमध्ये सत्तेच्या लढाया जरूर झाल्या पण जनतेमध्ये जातीय-धार्मिक दंगल झाली नाही, ती इंग्रजांनी घडवली 1893 साली, याचाही विचार आपण करायला हवा.
अकबराच्या नाण्यांवर तो राम सीता यांचं चित्र कोरतो. हैदर अली हा टिपूचा बाप आपल्या नाण्यांवर शंकर पार्वतीचं चित्र कोरतो. का कोरतो? पेशवे आपली नाणी फारशी आणि पर्शियनमध्ये कोरतात हे पुरावे अतिशय बोलके आहेत.
गणिताच्या विकासातून आज आपण फार मोठी प्रगती केलेली आहे.
शून्याचा शोध भारतात लागतो, पण "हिसाब अल्जब्र" मात्र "अल झफर मोहम्मद ख्वारिझ्मी" [ इ.स.780 ते 850] हा अरब व्यापारी लिहितो, काय आपल्याला हे माहित आहे?
क्रमश:--

No comments:

Post a Comment