Sunday, March 19, 2017

साधूचा वेश..

राणी एकदा आजारी पडली.
राजा काळजीत पडला.
त्यानं राजवैद्याला हरप्रकारे प्रयत्न करा, राणी बरी झालीच पाहिजे असा हुकुम सोडला.
राजवैद्यानं खूप प्रयत्न केले, पण यश काही मिळत नव्हतं.
राजा चिडला.ओरडला. तुम्हाला जमत नसेल तर नोकरी सोडा म्हणाला. राजवैद्य म्हणाले महाराज एक उपाय आहे. शेजारच्या राज्यातले वैद्य अतिशय निष्णात आहेत.त्यांना पाचारण करावे.
दूत दौडले.
शेजारच्या राज्यातले राजवैद्य यांचे आगमन झाले.
त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या. म्हणाले, "आजार गंभीर आहे. आता एकच उपाय, राणीला दररोज राजहंसाचे मांस घाऊ घातल्रे तरच राणी जगेल."
राजानं हुकुम सोडला. सैनिक सरोवरावर धावले. त्यांनी राजहंस मारून आणला. राणीला मांस खाऊ घातले.
चार दिवसात सैनिक हिरमुसले होऊन रिकाम्या हातानं परतले. "महाराज, आम्हाला येताना बघितलं की राजहंस दुर पळून जातात. शिकार काही मिळत नाही."
राजानं राजपुरोहितांना बोलावलं.
सल्लामसलत केली.
नवा निर्णय झाला.
सैनिकांचा गणवेश बदलण्यात आला. सैनिकांनी साधूंचा वेश परिधान केला.
साधूच्या वेशात सैनिक निघाले.
राजहंसांनी बघितलं. म्हणाले," चिंतेचं कारण नाही.हे साधू आहेत. सर्वसंगपरित्याग केलेले. त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही."
साधूनं लपवलेला धनुष्यबाण बाहेर काढला. राजहंसाची शिकार केली.
राणी राजहंसाच्या मांसावर ताव मारू लागली.

No comments:

Post a Comment