Saturday, March 18, 2017

प्राधान्य कशाला?


बुद्ध आपल्या अनुयायांसह श्रावस्तीला निघाले होते. रस्ता जंगलातला होता.
इतक्यात एका भिक्कूला एक बाण येऊन लागला.तो जखमी झाला.
एक भंतेजी म्हणाले, " अरे,पळा आणि त्या बाण मारणाराचा आधी शोध घ्या. पकडा त्याला. आपण त्याला चांगला जाब विचारला पाहिजे."
दुसरे म्हणाले, "पण आधी मुळात असा बाण पुन्हा मारला जाणार नाही याची आपण कायमस्वरूपी व्यवस्था करायला हवी."
तिसरे म्हणाले, "माणसातली ही हिंसेची प्रवृत्ती मुळात येते कुठून याचा आधी शोध घेतला जायला हवा."
त्यांचं ऎकुन बुद्ध म्हणाले," आधी त्या जखमीवर उपचार करा. ते सध्या सर्वात महत्वाचं आहे. बाकी नंतर बघता येईल."

No comments:

Post a Comment