Monday, April 3, 2017

होरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1

ल. सि. जाधव - होरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1
दलित आत्मकथनांनी मराठी साहित्याची उंची जागतिक पातळीवर नेली. सामाजिक दस्तावेजीकरण यातून होत राहिलं.
80 च्या दशकातील अनेक आत्मकथनं गाजली.
यातली बहुसंख्य बौद्ध समाजातली होती. इतर समाजातल्या मंडळींचीही काही पुस्तकं आली असली तरी त्यांचा फारसा गाजावाजा झाला नाही.
श्री.ल.सि.जाधव हे सोलापूरचे. मातंग या उपेक्षित समाजातले उच्चशिक्षित, बॅंक अधिकारी. त्याचं होरपळ हे आत्मचरित्र 2011 साली प्रकाशित झालं. त्याची दुसरी आवृत्तीही 2014 साली आली. बहुतेक दलित आत्मकथनं ही वयाच्या तिशी पंचविशीत लिहिलेली आहेत. अनेक आत्मकथनांमध्ये चढा सूर लावल्याचा आक्षेप घेतला गेलाय.
जाधवांनी मात्र वयाच्या साठीनंतर हे पुस्तक लिहिलं. अत्यंत संयत सूर, समंजसपणे जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि कसलाही कडवटपण नसलेलं नितळ आत्मकथन.
जाधवांच्या लग्नांच्या चित्तरकथा मुळातूनच वाचायला हव्यात.
वय वर्षे 21 असलेल्या उच्चशिक्षित मुलाचं लग्न वडील ठरवतात. मुलाला लग्नाआधी मुलगी निदान दाखवा तरी असं कोणीतरी म्हटलं तर वडील उसळले, "आमच्या बापानं कुठं आम्हाला आमच्या लग्नाआधी मुलगी दाखवली होती?"
मुलगी न बघताच साखरपुडा आणि पुढं लग्न होतं.
लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी लग्नातल्या धावपळीमुळं बहुधा नवर्‍या मुलाचे वडील हृदयविकाराच्या झटक्यानं निधन पावतात. त्यामुळं नवरीला मात्र पांढर्‍या पायाची म्हणून सासू हिनवू लागते. तिचा इतका दु:स्वास केला जातो की मुलीला माहेर पळून जावं लागतं आणि शेवटी घट:स्फोट होतो.
पुढं जाधवांचं दुसरं लग्न ठरतं.
लग्नाची जोरदार तयारी करताना नवरीचे वडील ब्रेन हॅमरेज होऊन जातात.
आता पाळी नवर्‍या मुलाची असते. नवरीकडचे नवर्‍या मुलाला शिव्या घालू लागतात. त्याच्यामुळेच नवरीचा बाप वारला अशी हाकाटी पिटली जाते आणि चक्क लग्न मोडतं.
आजवर बाईला जबाबदार ठरवल्याची अनेक उदाहरणं ऎकली /वाचली होती, पण आपल्या समाज व्य्वस्थेत मुलग्यालाही जबाबदार धरले जाते हे सांगणारे हे पहिलेच पुस्तक.
क्रमश:---

No comments:

Post a Comment