Thursday, April 20, 2017

लालदिवे गाडीवरचे आणि ---

लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरचे लाल दिवे हटवले याचे स्वागतच आहे.
लाल दिवे काढणार ही बातमी भलतीच उचलून धरली गेलीय.
आपल्या देशात एकुणच प्रतिकात्मक कृतींवर सारा भर असतो. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट राहायचा नसेल तर खालील प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत.
जणू काही लालदिवेमुक्त भारत झाल्यानं क्रांतीच झाल्याचा गाजावाजा केला जातोय, प्रत्यक्षात तो खरा नाहीये.
सैन्यातील अधिकारी, न्यायाधिश यांच्या गाड्यांवर लाल दिवे राहणार की तेही जाणारेत?
लाल दिवे गेले तरी जोवर सिक्युरिटीच्या नावावर सोबत असलेला पोलीसफाटा असणारच आहे, तो तेच काम करील जे दिवा करायचा.
परदेशात लोकप्रतिनिधी रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहनातून प्रवास करतात ते आपल्याकडं कसं आणता येईल याचाही विचार व्हायला हवा.
ज्यांना खरंच धोका आहे अशा मोजक्या पदांचं ठिकाय, पण आज जे सरसकट कमांडो आणि पोलीस दलातील फौजा सोबत बाळगल्या जातात त्यांची खरंच गरज असते काय?
मंत्र्यांच्या ताफ्यात [कन्हाँयमध्ये] सतत पाचपन्नास गाड्या कशाला लागतात?
अधिकारी निळे दिवे वापरणार म्हणजे लाल गेला निळा आल्यानं कसलं डोंबलाचं परिवर्तन होणारेय?
दिवे गेले, आता टेबलाखालून आणि वरून चालणारी देवघेव थांबवण्यासाठी खरंच काही होणारेय का?
सतत लोकप्रतिनिधींच्या पगार नी भत्त्यात बेसुमार वाढ करायची नी दिवे वगैरे काढल्याचा गाजावाजा करायचा हा दांभिकपणा झाला. उद्या दिवे काढल्याचाही भत्ता सुरू व्हायचा.
अ‍ॅंब्युलन्स आणि फायर ब्रिगेड वगळता बाकी सगळेच दिवे काढायला काय हरकत आहे?
@ प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment