Monday, April 3, 2017

न्यायाधीश ही सुद्धा माणसंच

न्यायाधीश ही सुद्धा माणसंच असतात. ती काही बेटावर राहात नाहीत. त्यांच्या जडणीघडणीतून त्यांची काही एक अभिरूची तयार झालेली असते.
त्यांनी व्यक्तीगत मतांचा प्रभाव पडू न देता नि:पक्षपातीपणे निकाल देणं अभिप्रेत असलं तरी शेवटी काहीनाकाही प्रभाव हा पडतोच.
सरकारी जमिनी भुमिहीनांनी ताब्यात घेण्याचा सत्याग्रह राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यासाठी एका डाव्या पक्षानं पुढाकार घेतला.
जोरदार आंदोलन झालं.
रितीप्रमाणं पोलीसांनी शेकडो सत्याग्रहींना अटक करून न्यायालयांसमोर हजर केलं.
रितसर केसेस चालल्या.
एका जिल्ह्यात न्यायमुर्तींनी सत्याग्रहींना कोर्ट उठेपर्यंत कैदेची शिक्षा फर्मावली, आणि कोर्ट [ ते स्वत:] तात्काळ उठून गेलं.
दुसर्‍या एका जिल्ह्यात न्यायमुर्तींनी त्याच गुन्ह्यासाठी प्रत्येकी तीनतीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
न्यायमुर्तींच्या अधिकारात त्यांच्या विवेकानुसार हे निकाल देण्यात आलेले होते. कायद्यानुसार ते योग्यच होते.
ज्या न्यायाधिशांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली होती, ते स्वत: एका भुमिहीन आईवडीलांचे पुत्र होते.
ज्यांनी तीनतीन महिने कारावासाची शिक्षा दिली होती ते स्वत: मोठ्या सरदार घराण्यातले होते आणि त्यांची शेकडो एकर जमीन कुळकायद्यात गेलेली होती.

No comments:

Post a Comment