Friday, November 1, 2019

शेतीला उद्योगाचा दर्जा, बाजारभाव मिळावा- डॉ. आंबेडकर, १९१८ : प्रा.हरी नरके


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिंतनामध्ये शंभर वर्षांपुर्वी जे जे विषय होते त्यातला अग्रक्रमाचा विषय शेती, शेतीसमस्या आणि शेतकर्‍यांचे प्रश्न हा होता. याबाबत चळवळीत, अभ्यासकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये घोर अज्ञान आहे. त्याबाबत का बोलले/लिहिले जात नाही हे मला कायमच पडलेले कोडे आहे.
"Small Holdings in India and their remedies [ समॉल होल्डींग्ज इन इंडीया ॲण्ड देअर रेमेडिज"] हा बाबासाहेबांचा ग्रंथ शेती आणि शेतकरी यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना यावर आहे. तो त्यांनी १०० वर्षांपुर्वी १९१८ ला लिहिला.  हा ग्रंथ "बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" मालिकेच्या पहिला खंडात प्रकाशित केलेला आहे.

या ग्रंथातील महत्वाचे मुद्दे-

१. शेती हा सर्वात प्राचीन उद्योग आहे. भारतात ८५ टक्के लोक शेतीवर उपजिविका करतात.

शेतकर्‍यांनी कुटुंबनियोजन करावे, त्यांना जास्त मुलं असल्यानं व ती सर्वच शेतीवर अवलंबून असल्यानं शेतीचे सतत तुकडे पडतात. ती नफ्यात राहात नाही.

२. शेतीवरील अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍याने एकाच मुलीला/मुलाला शेतात ठेवावे, बाकीच्यांना उद्योग, व्यापारात घालावे,

३. शेतीचे तुकडे जोडून जमिनीचे एकत्रिकरण करावे, शेताच्या त्या एकत्रित तुकड्याला आर्थिक युनिट मानावे.

४. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, त्यामुळे सरकारी मदत शेतकर्‍याला मिळेल.

५. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळावा,

६. शेतीला सिंचनसुविधा पुरवाव्यात,

७. फक्त शेतीवर सर्वस्वी अवलंबून राहणे हे आत्मघातकी ठरेल.

८. वरील उपाययोजना तातडीने केल्या नाहीत तर शेती व शेतकरी संकटात सापडेल.

याचा अर्थ बाबासाहेबांनी १०० वर्षांपुर्वी शेतकरी आत्महत्त्यांचा इशारा  दिलेला होता.

प्रा. हरी नरके, १/११/२०१९

No comments:

Post a Comment