tag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post6771420132020126806..comments2023-10-07T13:02:42.066-02:30Comments on प्रा. हरी नरके: नामाचा गजर, गर्जे मुठा तीरProf. Hari Narke प्रा. हरी नरकेhttp://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post-58354948308823926082013-11-13T03:05:52.160-03:302013-11-13T03:05:52.160-03:30from:facebook...2
दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उ...from:facebook...2<br /><br />दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उडवलेले लवंगी फटाके पुढीलप्रमाणे....पोटात एक, ओठात दुसरेच असे हे "कावेबाज" लेखन आहे.<br /> १]जागतिक दर्जाच्या आक्सफर्ड...वगैरे परदेशी विद्यापिठांची गुणवत्ता आजवर टिकून आहे त्याचे एकमेव कारण त्यांना शहरांची नावे आहेत. राष्ट्रपुरूषांची नावे दिली असती तर हा दर्जा नक्कीच घसरला असता.<br /> २] ज्या जातीचे मतदार देशात आणि राज्यात कमी आहेत त्यातच केवळ नावे देण्याच्या योग्यतेचे गुणवान महापुरूष आहेत.चौधरीसर यातून कोणती "ज्ञानवंत"! जात सुचवित आहेत ते विश्वकुबेरांना बरोबर कळते. बरोबरच आहे सर, " गुरू तो सकळांशी,,,,," जोवर देशात फक्त उच्चवर्णीय {त्र्यवर्णिक} पुरूष तेव्हढे शिकत होते, तोवर गुणवत्ता शाबूत होती. फुले पतीपत्नींनी स्त्रिया आणि बहुजन यांना शिक्षण देण्याचे काम सुरू करून देशाचे वाटोळे केले. ज्यात त्र्यवर्णिकांचे नुकसान तेच देशाचे नुकसान!’.... मास एज्युकेशनमुळे गुणवत्तेची वाट लागली. फुले शाहू आंबेडकर यांच्या या राष्ट्रीय गुन्ह्याबद्दल त्यांना माफ करता येणार नाही. शिवाय त्यांच्या जातींमुळे त्यांची नावे देणे हाही राष्ट्रीय गुन्हाच मानला पाहिजे.<br /> ३}प्रतिभावंतांची नावे दिल्याने आपल्या राष्ट्रीय प्रतिभेत घाऊक घट होते.<br /> ४} रेल्वेगाड्या वेळेत धावत नाहीत, रस्तेअपघात कमी होत नाहीत, विमाने वेळेत धावत नाहीत, रोजगार हमीत भ्रष्टाचार होतो, विद्यापिठांची गुणवत्ता घसरतेय याचे एकमेव कारण रेल्वेस्टेशन्स, रस्ते, विमानतळ, विद्यापिठे यांना फुले शाहू आंबेडकरांची नावे दिल्यामुळे...किती अचूक निदान. नावे पुसा, बघा जादू होईल.सगळे कसे जागतिक दर्जाचे होईल...क्या बात है! अेव्हढा सोप्पा उपाय ज्यांनी सुचवला त्या चौधरीसरांना आपण राष्ट्रीय सलामच करायला हवा.सर, ग्रेट..तुसी ग्रेट हो सर...<br />माझी नम्र विनंती आहे की चौधरीसरांना भारतातल्या सगळ्या विद्यापिठांचे कुलपती करा नी बघा कसे रातोरात ते या सर्वांना सुतासारखे सरळ करतात. जगातल्या पहिल्या ३५० विद्यापिठात फक्त भारतीय विद्यापिठे असतील. हार्वर्ड....वगैरेनी यापुधे ३५१ पासून पुढचा विचार करायचा.....<br /> ५} आम्ही जनताजनार्दनलोक केवळ भोट...चौधरीसर डा.आंबेडकरांच्या नामांतराची आधीच्या लेखात खिल्लीही उडवणार, नी खुलाश्यात मात्र ते त्या नामांतराचे समर्थक होते असेही सांगणार. त्याबद्दल त्यांना "सुलभपणे सुनितीमान" म्हणून गौरविलेही जाणार....जगात नोनकरप्ट कोण याचे प्रमाणपत्र तुम्हीआम्ही यापुढे चौधरीसरांकडून घ्यायचे. गुणवत्ता कशाशी खातात ते आम्ही यांच्याकडून शिकायचे. ज्या लेखात पहिल्या वाक्यापासून केवळ आणि केवळ उपहास आहे, सावित्रीबाई आणि फुले-शाहू-आंबेडकरांची ऎशी की तैशी करण्यात आलीय, "स्वसंरक्षणार्थ" आपला नामांतराला विरोध नाही अशी जाहीर घोषणा ज्या लेखात आहे, तो लेख नामविस्ताराचा आनंद व्यक्त करण्यासाठी लिहिण्यात आला होता, हे ज्या हरी नरकेंना कळले नाही..ते नक्कीच भोट आहेत...नरके तुम्हारा तो चुक्याच!...<br /><br />FROM: FACEBOOK....Prof. Hari Narke प्रा. हरी नरकेhttps://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post-88998999033883053562013-11-13T03:04:27.455-03:302013-11-13T03:04:27.455-03:30नरके तुम्हारा तो चुक्याच!...
"नामाचा गजर.......नरके तुम्हारा तो चुक्याच!...<br /> "नामाचा गजर...." हा राजकीय - सामाजिक विचारवंत डा.श्री.विश्वंभर चौधरीसर यांचा लोकसत्तेतील लेख अप्रतिम मनोरंजन करणारा आहे. सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला मिळणार म्हटल्यावर आलेल्या सात्विक संतापाने पेटून उठून चौधरींसरांनी २ दिवसात लिहिले, लोकसत्तेने ते सत्वर ठळकपणे छापले. देशाला मार्गदर्शक करण्याचा घाऊक ठेका सध्या एकमेव मा. चौधरीसर आणि लोकसत्ता यांच्याकडेच असल्याने हे दोघेही आम्हा पामरांना विचारांचे कुबेर बनविण्याच्या मोहिमेत रात्रंदिन गर्क आहेत.<br />या लेखाचा मतितार्थ संपादकांनी लिडमध्ये दिलेला आहे." ज्या देशात विद्यापिठांना आतून आणि बाहेरून राजकारणाने वेढलेले असते, त्या देशात उत्तम शिक्षण वगैरे वल्गना वृथा ठरतात." माझे मराठी विश्वमराठी किंवा विश्वंभर मराठी नसल्याने एक शंका- वल्गना या "सार्थ" आणि "वृथा" अशा दोन्ही प्रकारच्या असतात हे नवेच ज्ञान या लेखामुळे आम्हाला झाले. जर या देशात काहीही दुरूस्त होऊ शकत नाही इतके सडलेले आहे, अशी चौधरीसरांची खात्री झालेली आहे तर मग लेखाचा हा डोंगर पोखरण्याची गरजच काय होती? चौधरीसर आपण जेव्हा विद्यमान राजकीय प्रक्रियेविषयी जनतेत निराशा/तिरस्कार आणि तुच्छतावाद पेरता, तेव्हा पर्यायी राजकारणाचे आपले संकल्पचित्रही आपण दिले पाहिजे ना?<br />शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा एकही पर्यायी कार्यक्रम ज्या लेखात दिलेला नाही त्या चौधरीसरांच्या लेखाचे गुणगान गाणारे त्यांचे मध्यमवर्गीय समर्थक मला पामराला हे सांगतील का, की राजकारणविरहीत शिक्षण जगाच्या कोणत्या विद्यापिठात मिळते? राजकारण हद्दपार करण्याची तुच्छतावादाव्यतिरिक्त कोणती नवी गुरूकिल्ली चौधरीसर आपल्याला देतात? सध्याचे सगळेच वाईट आहे हे सांगायला तुमची गरज नाही. ते बदलायचे कसे त्यावर जरा बोला की.गुणवत्ता सुधारायची कशी यावर जरा प्रकाश टाकाना. काय आहे ते आम्हाला पुरेसे माहित आहे, ते बदलण्याचे संकल्पचित्र जर तुम्हाला देता येत नसेल तर डोंगर पोखरून ऊंदीरही काढता आला नाही असेच म्हणणे भाग आहे मालक.<br /> दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उडवलेले लवंगी फटाके पुढीलप्रमाणे....पोटात एक, ओठात दुसरेच असे हे "कावेबाज" लेखन आहे.<br /> <br />Prof. Hari Narke प्रा. हरी नरकेhttps://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.com