Friday, January 17, 2020

डॉ. बाबासाहेबांनी कशी जिंकली चवदार तळ्याची केस?

डॉ. बाबासाहेबांनी कशी जिंकली चवदार तळ्याची केस?- प्रा.हरी नरके

" डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा " ही मालिका सध्या एका रहस्यकथेसारखी पकड घेत आहे. आज मालिकेचा २११ वा भाग आम्ही सादर केला. महाडच्या चवदार तळ्याची केस बाबासाहेबांनी कशी जिंकली त्याचा उलगडा आजच्या भागात प्रेक्षकांना झाला असेल. ज्यांनी आजचा भाग बघितला नसेल त्यांनी तो हॉटस्टार वर अवश्य बघावा. टिम गौरवगाथाने, विशेषत: दशमी आणि स्टार प्रवाहच्या मंडळींनी, कलाकार, लेखक, दिग्दर्शक व सर्व संबंधितांनी अपार मेहनत घेऊन ही अभिनव मालिका आपल्यासमोर सादर केलेली आहे. या मालिकेने टेलिव्हीजन इंडस्ट्रीत प्रथमच एक नवा ट्रेंड निर्माण होत आहे.

बॅरिस्टर डॉ. आंबेडकरांचे युक्तीवाद कौशल्य, त्यावेळच्या नामवंत वकीलांपैंकी जे तोवर एकही केस हरले नव्हते अशा अ‍ॅड. ल.ब. भोपटकरांना बाबासाहेबांनी पराभूत करणे, सुरबानानांनी जिवावर उदार होऊन पुरावे जमा करणे, तोवर अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाने चळवळीच्या जोरावर कायदेशीर मार्गाने ब्रिटीश कोर्टात प्रथमच विजय मिळवणे हे मालिकेतले भाग आपल्याला कसे वाटले?

२११ भाग झाले तरी बुद्धीवंतांपैकी काहीजण या मालिकेबाबत मौनाच कट करून बसलेत. सामान्य प्रेक्षक मात्र प्रचंड प्रतिसाद देताहेत. मला या मालिकेच्या टिमचा एक प्रमुख सदस्य या नात्याने तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की,

तुमच्यापैकी किती लोकांना फत्तेखान देशमुख आणि केस जिंकण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी सुरबानानांमार्फत मिळवलेले सरकारी पुरावे याबाबत आधी माहित होते? कृपया कमेंटमध्ये लिहा.

-प्रा.हरी नरके, १७ जानेवारी २०२०

सुचना - उद्यापासून यापुढे शनिवारी ही मालिका नसेल. फक्त सोम ते शुक्र असेल.

No comments:

Post a Comment