Thursday, April 30, 2020

डॉ. बाबासाहेबांना वैदीक धर्माचे समर्थक बनवले- प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 17



संघाची लबाडी २ - डॉ. बाबासाहेबांना वैदीक धर्माचे समर्थक बनवले- प्रा. हरी नरके


रा.स्व.संघाचे जे मोजके श्रेष्ठी आहेत त्यात मोहन भागवत, मनमोहन वैद्य यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो कृष्ण गोपाल शर्मा  यांचा. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील तत्ज्ञ म्हणून लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने व्याख्यानाला बोलावले होते. केंद्राची आणि युपीची सत्ता भाजपा-संघाच्या ताब्यात असल्याने विद्यापीठेही त्यांच्याच कब्ज्यात आहेत. 

ज्यांचा बाबासाहेबांच्या जीवन-कार्य-विचारांचा अभ्यास नाही अशा व्यक्तीला भाषणाला ही विद्यापीठे बोलावतातच कशी? बाबासाहेबांच्या नावावर शर्मांनी चक्क विरोधी विचार ठोकून दिले. त्यांना बाबासाहेबांना शंकराचा अवतार घोषित करायचे असणार. त्यांच्या भाषणांच्या मोठमोठ्या बातम्या दिल्या गेल्या. लोकांमध्ये त्या वक्त्यांची आंबेडकरांवरील अधिकारी विद्वान अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना आहे, साडेतीन वर्षांपु्र्वीची.

संघाचे सरसचिव मनमोहन वैद्य यांनी आरक्षणविरोधी वक्तव्यं केल्यानंतर आता संघाचे दुसरे श्रेष्ठी वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. संघाचे सह सरसचिव कृष्ण गोपाल शर्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत डॉ. आंबेडकर विद्यापीठात, लखनौमध्ये बोलत होते.

ते म्हणाले, " १. बाबासाहेबांनी कधीही वैदीक [ब्राह्मणी] धर्माला विरोध केलेला नाही.

२. बाबासाहेबांना वैदीक [ब्राह्मणी] धर्म प्रिय होता. ते त्याचे समर्थक होते. त्यांचा विरोध फक्त त्यात नंतर घुसवण्यात आलेल्या वाईट गोष्टींना होता. ते मूळ वैदीक विचारांच्या बाजूचे होते. 

३. भाषेच्या आधारावर राज्यं बनवायला आंबेडकरांचा विरोध होता.

४. आंबेडकरांचा कितीही अपमान झाला, त्यांना छळले गेले तरी त्यांनी ते विष [हालाहल] शंकर भगवानांप्रमाणे पचवले. [सुचन- बाबासाहेब शंकराचे अवतार होते]"

भाषण दीड तासांचे होते त्यात पाल्हाळच जास्त होते. मुद्दे एव्हढेच होते. पण ते लबाडीचे आणि घातक होते. बाबासाहेबांना वैदीकांच्या बाजूने उभे करण्याचे हे षडयंत्र होते.


हे भाषण विद्यापीठातले असल्याने ते विद्यापीठ पुस्तकरूपाने छापणार, मग ते अभ्यासक्रमाला लावले जाणार आणि इतिहास म्हणून रुजवले जाणार, अशी ही लबाडी होती.






मी कृष्ण गोपाल शर्मांना ताबडतोब उत्तर दिले आणि शर्मांचे वक्तव्य खोडून काढले. 

त्यांना सणसणीत भीमटोला देताना मी म्हटले, " १. संघाचे कृष्ण गोपाल शर्मा बाबासाहेबांच्या विचारांचा विपर्यास करीत आहेत. बाबासाहेबांनी १९३६ साली लिहिलेल्या "जाती संस्थेचे उच्चाटण" या ग्रंथात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणार्‍या वैदीक विचारधारेला संपुर्ण नकार दिलेला आहे. कठोर धर्मचिकित्सा करून बाबासाहेबांनी वैदीक विचारधारेवर आसूड ओढलेले आहेत. अशा स्थितीत त्यांना सनातनी ब्राह्मणी धर्माचे समर्थक म्हणून पेश करणे अन्यायकारक आहे. बाबासाहेबांची टोकदार मांडणी बोथट करण्याची संघाची ही साजिश आहे. संघाला बाबासाहेबांना शंकराचा अवतार बनवायचा असून त्यांचे क्रांतिकारक विचार लपवायचे आहेत.

२. बौद्ध धर्म स्विकारताना त्यांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञांपैकी आठ प्रतिज्ञा वैदीक विचारधारा नाकारणार्‍या आहेत. अशा बाबासाहेबांना वैदीक तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणून सादर करणे ही शर्मांची आणि पर्यायाने संघाची लबाडी आहे.

३. वैदीक धर्मग्रंथ हे बहिष्कृततेच्या तत्वाचे पुरस्कर्ते असल्याने या धर्मामुळे स्त्रिया, शूद्र [ओबीसी] आणि अतिशूद्र [अनुसुचित जाती] यांना अतोनात छळ सोसावा लागला. त्यांची उच्चवर्णियांनी ह्याच ग्रंथांच्या आधारे लूट केली असेही बाबासाहेबांनी सिद्ध केलेले आहे.

४. धर्माच्या आणि धर्मग्रंथांच्या नावावर स्त्री-शूद्रांवर शताकानुशतके अपार जुलूम करण्यात आला. ही तत्वं नुसती धार्मिक नसून ती कायदा आणि निर्बंध म्हणून राजसत्तेनं शेकडो वर्षे राजदंडाच्या जोरावर राबवलेली. त्यामुळे त्याला कायद्याचे, संविधानाचे रूप आलेले होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून तसेच राज्यघटनेच्या कलम १३ मध्ये हे विषमतावादी कायदे रद्द केलेले असताना त्यांना या वैदीक विचारधारेचा समर्थक ठरवणं हे आम्हाला मान्य नाही. 

५. गौतम बुद्धांनी वेद नाकारले. वैदीक विचारधारा फेटाळली. ब्राह्मणी कर्मकांड नाकारले. पुनर्जन्म आणि कर्मविपाकाचा सिद्धांत ठोकरला. श्रेणीबद्ध विषमता लादणारी वैदीक व्यवस्था बुद्धांनी उधळून लावल्याचे बाबासाहेबांनी सप्रमाण दाखउन दिले. बुद्ध गुणवत्ता आणि आचरणावर माणसाची पारख करीत होते, जन्मावर नाही हेही बाबासाहेबांनी सप्रमाण मांडले.

६. पुणे करारात बाबासाहेबांनी दुबळ्या, मागास समाजघटकांना आरक्षणाद्वारे न्याय मिळऊन दिला. संघाचा आरक्षणाला विरोध असल्याने बाबासाहेबांचे हे योगदान संघाला पुसायचे [ नष्ट करायचे ] आहे."

हे उत्तर यासाठी आवश्यक होते की हे लोक बाबासाहेबांना भगवान शंकराचा अवतार बनऊन मोकळे व्हायचे.

तेव्हा बोलणारी व्यक्ती कितीही मोठ्या पदावरील असली, शक्तीमान असली तरी उत्तर देणे भाग होते. 

संघ वर्तुळात या उत्तराने संतापाची लाट उसळली. त्यांचा खूप जळफळाट झाला. 

केलेल्या कामाचे ढोल वाजवण्याची आपली पद्धत नाही.पण बहुजन समाजाला सांगितल्याशिवाय कळतही नाही, त्याला काय करावे?

त्यावेळी टाइम्स समुहाने माझे म्हणणे ठळकपणे छापले होते. ते सोबत जोडले आहे.

संघ खडे टाकून अजमावतो. विरोध झाला नाहीतर सुसाट सुटतो. विरोध झाला तर दोन पावले मागे येतो. थांबतो. मात्र थोड्या दिवसांनी पुन्हा प्रचार सुरू करतो. अफवातंत्र, खिशात असलेले पत्रकार आणि मालक यांच्या जोरावर धडधडीत खोट्या गोष्टी इतिहास म्हणून लोकांच्या गळी उतरवतो. म्हणून वेळीच विरोध करावा लागतो.


प्रा. हरी नरके, 01/05/2020

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2fJwHv5DhnuAJvbAx_ab_ANshKPSE6eReuGzIQasl6DoBGcMrCDllpVkY


परिशिष्ट-१-

How Babasaheb rejected and criticised the Vedas?

इकॉनॉमिक्स टाईम्स, Jan 24, 2017, वैभव पुरंदरे

First eight of the 22 vows that Ambedkar administered to his followers on the day he embraced Buddhism involved an open repudiation of the Vedic religion.

By Vaibhav Purandare, TNN| Jan 24, 2017 

MUMBAI: Contrary to RSS official Krishna Gopal's claim that Dr Babasaheb Ambedkar had immense faith in the Vedic religion, the framer of India's Constitution not only never believed in the Vedas or Vedic faith but severely criticised it several times, once going to the extent of writing, in his canonical work 'Annihiliation of Caste', that “you have got to apply the dynamite to the Vedas and the shastras, which deny any part to reason; to the Vedas and shastras, which deny any part to morality .“

The first eight of the 22 vows that Ambedkar administered to his followers on the day he embraced Buddhism in Nagpur on October 14, 1956, were also an open repudiation of the Vedic religion, said scholar Hari Narke, who edited volumes 17 to 22 of Ambedkar's writings and speeches, published by the Maharashtra government.


In 1936, Ambedkar wrote, “The Hindu religion, as contained in the Vedas and the Smritis, is nothing but a mass of sacrificial, social, political and sanitary rules and regulations, all mixed up. What is called religion by the Hindus is nothing but a multitude of commands and prohibitions.“

Offering a radical solution to the problem of too many scriptures in Hinduism, he said the “Vedas, Shastras and Puranas, which are treated as sacred and authoritative, must by law cease to be so and the preaching of any doctrine, religious or social contained in these books should be penalised.“ Describing the great work of the Buddha, Ambedkar stated that the founder of Buddhism had “repudiated the authority of the Vedas“.When Buddha condemned “karma kanda“ (rituals) and Yagnas, Ambedkar stated, the “counter-revolutionaries“ opposed him saying these things “were ordained by the Vedas, the Vedas were infallible.“


But, he wrote, “People who had accepted the gospel of social equality and who were remaking society on the basis of each one according to his merits--how could they accept the Chaturvarnya theory of gradation and separation of man based on birth simply because the Vedas say so?“ 

In at least four of his works in addition to the controversial `Riddles in Hinduism -Caste in India' (1916), 'Annihilation of Caste' (1936), `Who were the Shudras' (1946) and `The Untouchables' (1948) -Ambedkar offered a strong indictment of the earliest known Hindu texts.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/how-babasaheb-rejected-and-criticised-the-vedas/articleshow/56750772.cms?from=mdr
......................................................

Wednesday, April 29, 2020

संघाची लबाडी - संघाने उभे केले महात्मा फुले यांचे नकली / डमी वंशज- प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 14












सुमारे साडेचार वर्षांपुर्वी संघाने पुण्याजवळ एक मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. तेव्हा गोदीमिडीयाला हाताशी धरून खोट्या बातम्यांचा पाऊस पाडण्यात आला. त्यातली एक फुसकी म्हणजे अर्धी चड्डी घातलेल्या काही बनावट लोकांचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्यात आले. ते महात्मा फुल्यांचे वंशज असल्याची दवंडी पिटण्यात आली. स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच असे लिहून ठेवले होते की " हे लोक आपले वारस नाहीत, " अशांच्याच पुढच्या पिढ्यांना भजनी लावून ते जोतीरावांचे वारस असल्याची प्रसिद्धी संघ देत आहे. महात्मा फुल्यांचे अपहरण करण्याचा हा बनाव साडेचार वर्षांपुर्वी मी उधळून लावला होता.


पुण्याचे एक पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना यासाठी हाताशी धरण्यात आले. ते आमच्याशी खाजगीत बोलताना संघाची टर उडवायचे. वर्षानुवर्षांची ओळख. पण त्यांनी कधी कळूच दिले नाही की ते संघवाले आहेत. जशी मोदीफडणविसांची सत्ता आली तसे यांचे खरे रूप उघडे पडले. परांजपे चक्क संघाची तळी उचलून धरायला लागले.

त्यांनी डी.एन.ए.मध्ये ही बातमी दिली. मी तात्काळ खुलासा केला, बातमी खोटी आहे. महात्मा फुल्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता. त्याला मुलगा झाला नाही. त्यामुळे फुले आडनावाचे कोणीही फुले वंशज शिल्लकच नाहीत. केवळ आडनाव हा पुरावा मानायचा तर प्रत्येक भोसले आडनावाचा माणूस छत्रपती शिवरायांचा वंशज मानावा लागेल. महात्मा फुले यांच्या हयातीतच काही भाऊबंद, फुले मंडळी, जमिन आणि घरदाराच्या लोभाने, पिढीजात वादांमुळे किंवा सनातन्यांचे हस्तक म्हणून जोतीराव -सावित्रीबाईंच्या विरोधात गेलेले होते. क्रांतिकारक विचार पेलायला काळीजही मोठे लागते. छटाकभर काळजाचे लोक सनातन्यांचे हस्तक बनू शकतात. क्रांतिकारक नाही. त्यातल्या काही बुटक्या लोकांना हाताशी धरून संघ हाच फुले विचार चालवतो असं वदवणं हे किळसवाणं होतं. ज्यांनी महात्मा फुले वाचले नाहीत, त्यांचे पुस्तकही हातात धरलेले नाही असे लोक टिव्हीवर येऊन फुलेविचार आणि संघ किती जवळचे आहेत यावर पोपटपंची करीत होते.  पढवलेले सुमार लोक दुसरं काय करणार?

स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट केलेले आहे, की आपले कोणीही भाऊबंद हे आपले वारस नाहीत, अशांच्याच पुढच्या पिढ्यांना संघ फुलेवारस म्हणून प्रसिद्ध देत होता. आजही हे कारस्थान चालूच आहे.

डी.एन.ए.चे संपादक उदय निरगुडकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझा खुलासा संपादित स्वरूपात प्रकाशित केला. [पाहा-परिशिष्ट १]

अशाच खोट्या बातम्या लोकमत दैनिकातही झळकळ्या होत्या. लोकमतचे मुख्य संपादक दिनकर रायकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर लोकमतनेही माझा खुलासा छापला. [पाहा-परिशिष्ट २]

ह्याच खोडसाळ बातम्या ए.बी.पी. माझा वाहिनीवरही देण्यात आल्या होत्या. तिकडेही संपादक श्री राजीव खांडेकर यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझ्या खुलाशाचा बाईट बातम्यांमध्ये दाखवला. मात्र तो ऑनलाईनवर ठेवण्यात आला नसल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही.

त्यावेळी आय.बी.एन. लोकमतवर यानिमित्ताने संपादक मंदार फणसे यांनी एक "बेधडक" चर्चा घेतली होती. तिच्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो. त्या चर्चेत मी संघाचा खोटेपणा सप्रमाण उघडा पाडला होता. [ पाहा- परिशिष्ट ३]

यावेळी संघाची असत्यकथन, सत्यापलाप आणि खोटा इतिहास रचण्याची साखळी उघडी पाडणारा ब्लॉगही मी लिहिला होता. [ पाहा-परिशिष्ट-४ ]

" Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage " असा लेख मुंबई मिरर [ दि. 12 january 2016, mumbai mirror] या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यात मिररच्या प्रतिनिधी अलका धुपकर यांनी माझा दावा नोंदवला होता. [ पाहा परिशिष्ट-५] 


लोकमतने माझे म्हणणे विस्ताराने छापले होते, " राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:

१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.

४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.

५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.

६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, 

" स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे सच्चे वैचारिक वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव, ना.मे.लोखंडे आणि केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत हे हास्यास्पद आहे. रा.स्व.संघाला अशा बनावट आणि तकलादू मना्च्या श्लोकांची रचना करावी लागावी हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे. 

विद्यमान फुले मंडळींनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. ते महात्मा फुल्यांचे वारसदार असल्याचा नकली दावा करीत आहेत. फुलेविचारांच्या बोगस प्रमाणपत्रांचे वाटप ते करू शकत नाहीत. तो नैतिक अधिकार महात्मा फुले व सावित्रीबाईंचा ध्येयवाद सच्चेपणाने पुढे नेणारांनाच आहे. इतर लांडग्यांना नाही.

संघाच्या घृणास्पद वर्तनाचे असे कितीतरी पुरावे देता येतील. 
तेव्हा बलाढ्य रा.स्व. संघाला माझ्यामुळे [मी त्यांचा खोटापणा सिद्ध केल्याने] माघार घ्यावी लागल्याने संघ संतापणे स्वाभाविक आहे. संघ तोंडघशी पडला तो माझ्यामुळे नाही,त्यांच्या लबाडीमुळे. असत्याचा सहारा  घेतल्याने. महात्मा फुले सत्यमेव जयते चे पुरस्कर्ते होते. संघाने तेव्हापासून आपल्या चेल्याचपाट्यांकरवी अफवा पसरावायला सुरूवात केली. तेच ते त्यांचे गेल्य ९५ वर्षांचे जन्मापासूनचे अफवातंत्र. 

अहो, कळलं का, हरी नरके तर आमचेच आहेत. अरे लबाडांनो, मी तुमचा होतो म्हणून तुमचा खोटारडेपणा जगाच्या वेशीवर टांगला काय? जो सज्जड पुराव्यांनिशी तुम्हाला उघडं पाडतो, तुम्हाला जाहीरपणे चॅलेंज करतो तो तुमचा असतो म्हणून काय? मी संघाला गेल्या ३२ वर्षात अनेकवेळा उघडं पाडलं पण संघाच्या लबाड्या काही थांबत नाहीत. उद्या संघाच्या आणखी एका लबाडीबद्दल वाचा- 

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/


प्रा. हरी नरके, ३०/४/२०२०



....................................
परिशिष्ट १-

Thursday, January 21, 2016
Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
http://www.dnaindia.com/mumbai/report-morally-improper-to-call-rajaram-s-descendants-as-mahatma-phule-s-prof-hari-narke-2167460
DNA,Online, 21 Jan.2016

Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3.
Researcher on Mahatma Phule's life and works prof Hari Narke has said it is not morally proper to project the Rajaram Phule's descendants as those of Mahatma Phule as the latter gave importance to ideological inclination than biological lineage. Narke pointed out that Mahatma Phule himself had disowned his elder brother Rajaram by registering his will.

dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3. Narke said the report headline said three members of the Phule family, who are descendants of Mahatma Phule, had attended the event, which is far from reality as, Narke said, they are in no way descendants of Mahatma Phule.

He added that Mahatma Phule and his wife Savitribai had adopted the son of a Brahmin widow, who went on to become a doctor. While adopting the boy, Phule had put the condition that if the boy did not adhere to Satyashodhak Samaj principles, his wife should look for another one to adopt, Narke said, reiterating the fact that Mahatma Phule gave importance to ideological inclination rather than biological lineage.
The professor also said that Mahatma Phule's will had clearly mentioned that neither his elder brother Rajaram nor his son Ganpat could have any share in his property. "So when Mahatma Phule himself had disowned his brother, how can his brother's descendants claim to be Mahatma Phule's?" he asked.

Morally Improper To Call Rajaram's Descendants As Mahatma Phule's: Prof Hari Narke...
.............................................

परिशिष्ट -२
Monday, January 18, 2016
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच

http://m.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11284626
ऑनलाइन लोकमत, सोमवार, दि.18 जानेवारी, 2016.First Published: 18-January-2016 : 13:25:00
Last Updated at: 18-January-2016 : 13:54:11
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच - हरी नरके
पुणे, दि १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.
४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.
५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.
६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

uesday, January 12, 2016
ते फुल्यांचे वारस नव्हेत!....
............................................

परिशिष्ट ३
आय.बी.एन.लोकमतवरील बेधडक कार्यक्रमाची लिंक-
https://www.youtube.com/watch?v=NjL7LqCqBzE
bedhadak 12 Jan 16 on Mahatma Phule family's 4th, 5th generation and RSS show
News18 Lokmat
23 K views 4 years ago

......................................................................

परिशिष्ट-४
माझा त्यावेळी लिहिलेला ब्लॉग-
1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.

त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.
.......................................

परिशिष्ट -५
मुंबई मिरर मधील लेख-
Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage
12 january 2016 mumbai mirror

Read more at:

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppsthttps://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms
................................................

Tuesday, April 28, 2020

महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?, रा.स्व.संघ 13














महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?- प्रा. हरी नरके

२००७ साली मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकले. सनातन प्रभातमध्ये बातमी आली की महात्मा फुले हे देशद्रोही होते असे भिडे म्हणाले. ही मुक्ताफळे प्रकाशित झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. ओबीसी म्हणजे तमाम थंड आणि बत्थड लोक. कोणाचीच काहीही प्रतिक्रिया दिसली नाही.

त्याच दिवशी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकरांचा निवृत्तीसमारंभ होता.त्यांनी आग्रहाने बोलावले म्हणून मी गेलो. पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके, [काँग्रेस] राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, [राष्ट्रवादी] भाजपाचे पांडुरंग फुंडकर, आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील असे अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. माझ्या भाषणात मी मनोहर भिड्यांच्या महात्मा फुले विषयक संतापजनक वक्तव्याचा ती बातमी सर्वांना दाखवून जाहीर निषेध केला. मात्र निरोपाच्या जल्लोशात त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये कोणीही नव्हते.

मी नंतरही अनेकांशी बोललो. उपयोग झाला नाही. एकहाती लिहित राहिलो. बोलत सुटलो. ज्यांच्या विरोधात बोलत-लिहित होतो त्या भिड्यांनी मात्र खुन्नस ठेवली.

बहुजन समाजाचं एकूण खूप कठीण प्रकरण आहे. जिथं जोतीराव-सावित्रीबाईंची सून [दत्तक पुत्र यशवंतची बायको] पुण्यात खडक माळ आळीत बेवारस म्हणून मेली. तिची मयत पुणे नगरपालिकेने केली. हाकेच्या अंतरावर जेधे मॅन्शन म्हणजे महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचे पुढे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर झाले होते, त्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे यांचे निवासस्थान तसेच कार्यालय होते. तेव्हा १९३० साली चळवळ जोरात होती.

त्यांनी तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले असेल असे मी म्हणणार नाही. नसेल आले लक्षात. तीही भिक मागून जगली. विनातक्रार मरून गेली. तिच्या पोटच्या लग्न झालेल्या मु्लीनं जिथं आईच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली नव्हती, तिथं इतर कुणी का मदतीला यावं ना? बहुजन समाज बिचारा आपापले संसार, देवदेव, बायकामुलांचे वाढदिवस आणि कशाकशात बिझी असतो. त्याला तरी काय दोष देणार ना? सगळे लोक रोजीरोटीच्या शोधात, संपुर्ण थंड, आत्ममग्न, स्वत:चा इतिहास माहित नसलेला, कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला, मुर्दाड समाज. बहुजन हा या पृथ्वीतलावरचा विलक्षण प्राणी आहे.

त्यांच्या मेंदूत निसर्गाने मेमरी इरेज [ डिलीट] केलेले सॉफ्टवेअर बसवलेले असल्याने त्यांना विस्मरणाचे अतोनात वरदान लाभलेले असते.

या देशात जे स्वत:ची जात सोडून राबतात, त्यांच्या मदतीला लोक येतात का? की घर का न घाट का अशी त्यांची अवस्था होते? फुल्यांचा किंवा शिंद्यांचा विषय निघाला की लोक म्हणतात, बघतील त्यांचे समाज. बघा ना महर्षि वि.रा.शिंदे यांना आपण किती सहज विसरलो. राजर्षि शाहू छत्रपतीही पंधरावीस वर्षांपुर्वीपर्यंत दु्र्लक्षितच तर होते.

फुलेही बाबासाहेबांनी जवळ केले म्हणून आज जे काही दिसतात, अन्यथा आजवर आपला समाज फुल्यांन ठार विसरूनसुद्धा गेला असता. लोकांचंही काय चुकतंय? फुल्यांनी काय माळी महासंघ काढला होता? नाही ना! उलट माळी म्हणतात, त्यांनी आमच्यासाठी कुठं काय केलं? हे खरंय की फुल्यांनी एकट्या माळ्यांसाठी काहीच केलं नाही. कधीकधी वाटतं फुले तुम्हारा तो चुक्याच.

माणसानं कसं आपापल्या जातीपुरतं बघावं. खरंतर स्वत:पुरत बघावं. आपलं घर, आपला संसार. बायकापोरं. बाकी सगळं झूट. समाज, कृतज्ञता, भविष्य,... गये भाडमें.













तर हेच आंबापुत्र, मनुसमर्थक मनोहर भिडे मोदी-फडणविसांना परमवंदनीय आहेत. फडणवीस-मोदी पाच वर्षे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायचं गाजर दाखवित राहिले. २०१९ च्या निवडणुकीआधी फडणवीस सरकारनं म्हणे केंद्राला शिफारस केली, महात्मा फुले नी स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून. द्यायचं नव्हतंच. फक्त निवडणूक स्टंट करायचा होता. आजच एक मित्र सांगत होता, कोणा संघोट्या उपाध्यायनं म्हणे त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. एकट्या सावरकरांना भारतरत्न द्या. तो देशद्रोही फुले त्यांच्या सोबत नको.


प्रा.हरी नरके, २९/४/२०२०

Fekulogy of RSS – Spreading Fake Claims About Babasaheb Ambedkar, RSS12,









Fekulogy of RSS and The Print – Spreading Fake Claims About Babasaheb Ambedkar


On Dr Ambedkar Jayanti, ThePrint published an article from RSS member Arun Anand claiming Babasaheb Ambedkar’s link to RSS. When Prof. Hari Narke, editor of Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, refuted such fake claims, yesterday, once again ThePrint carried another piece from the member of the Delhi State RSS executive claiming closeness of Dr Ambedkar to RSS and claim about Dr Ambedkar’s visits to RSS camps and how impressed he was and all that blah blah blah. We debunked that claim almost a year ago. There is no proof that Dr Babasaheb Ambedkar ever visited RSS camp or was impressed by RSS’s work. Instead, he had warned his followers that RSS is a dangerous organization.


As a proof to the claim that RSS Brahmin, Dattopant Thengadi, was appointed as general secretary of the Scheduled Caste Federation, Rajiv Tuli, RSS member, bring proof from ‘Organiser’, RSS mouthpiece and Brahminical propaganda magazine. Any writing from Organiser or any of the members of RSS does not carry more weightage than a pinch of salt in the ocean.

Not a single historian would accept such claims from Hindutva propaganda machinery so why is Brahmin-Bania outlet ThePrint and RSS pushing so hard to claim Babasaheb Ambedkar? It is nothing new, appropriation of Babasaheb Ambedkar by Brahminical media houses and fanatic organizations such as RSS is going on for a long time. All these Brahminical organizations want a piece of Babasaheb’s legacy to fulfil their ulterior motives, remember how RSS and media collaborated and pushed the fake claim that Dr Ambedkar was against Article 370. We debunked that claim as well.

All these Brahminical organizations that hated Babasaheb Ambedkar to the core, opposed him throughout his life, never accepted the Indian flag, forget about hoisting it, reject Indian constitution written by Babasaheb Ambedkar, now wants to grab Babasaheb Ambedkar to get some votes from Dalits. There are no such things as change of heart or love in their hearts towards Dalits, sidelining and killing Dalits is part of their ideology.

https://velivada.com/2020/04/24/fekulogy-of-rss-and-theprint-spreading-fake-claims-about-babasaheb-ambedkar/

Monday, April 27, 2020

चंद्र, सूर्य, राहू, केतू, मंगळ, बुध, गुरूसह नायजेरियामध्ये कोरोनात मदतीला धावले स्वयंसेवक- रा.स्व.संघ 11






चंद्र, सूर्य, राहू, केतू, मंगळ, बुध, गुरूसह नायजेरियामध्ये कोरोनात मदतीला धावले स्वयंसेवक- प्रा. हरी नरके

आमच्या हाती आलेल्या खात्रीशीर बातम्यांनुसार कोरोनापिडीतांसाठी आज विश्वात फक्त स्वयंसेवकच मदतीचे काम करीत आहेत. सरकारं ठप्पं आहेत, सैन्यं झोपलीयत, पोलीस पर्यटनाला गेलेत. काम करताहेत ते फक्त एक  हजार कोटी स्वयंसेवक. [जगाची लोकसंख्या भले ८०० कोटी असेल पण आमचे स्वयंसेवक मात्र १ हजार कोटी आहेत.] स्वयंसेवक रात्रंदिवस सलग २९ ते ३२ तास दररोज  मदतीचे काम करतात. न थकता, न खातापिता, न झोपता. प्रत्येक स्वयंसेवक विश्वातील सर्वांच्या मदतील धावलेला आहे. जगातील ३३३ देशांमध्ये आज स्वयंसेवक मदतवाटप करीत आहेत. [ काय म्हणता जगात २२० च देश आहेत, असतीलही, पण आमचे स्वयंसेवक ३३३ देशांत काम करताहेत.]

विशेषत: राहू आणि केतू या ग्रहांवरील काम विशेष प्रशंसनीय आहे. झालेच तर नायजेरिया, रशिया, जपान, चीन, फ्रान्स, जर्मनी येथील कार्याबद्दल तेथील राष्ट्रप्रमुखांनी प्रशंसोद्गार काढलेत. कोरोना संपल्यावर त्यांनीही स्वयंसेवक होण्याचे अभिवचन दिलेले आहे. तिथे घरोघर जाऊन स्वयंसेवक चितळेंचे दूध, नागपूरची टरबुजं, नरेंद्र केळी, अमित गाजरं, आंबाभुर्जी आणि संघप्रणीत शेतीतील धान्य वाटत आहेत. आजवर सुमारे दहा लाख कोटी टन धान्याचं वाटप झालेलं आहे. वाटलेल्या गंगाजल, गोमुत्र आणि गोमयाची तर मोजदादच नाही.

परवाच ट्रंपतात्यांचा शेटना फोन आला होता. म्हणाले, मला गुजरात चहा, चितळेतुपाचा शिरा, मनोहर भुर्जी आंब्याचा रस, रेशीमबागेतील भरीत आणि मोतीबागेतील कोशिंबीर भयंकरच आवडली. तात्या पुढे असेही म्हणाले की, व्हॉईटहाऊसमध्ये सगळे कामचोर भरलेत. काम करताहेत ते फक्त स्वयंसेवक. असेच फोन राहू, केतू आणि आणखी साताठसे ग्रहांवरून तसेच पाचकशे तार्‍यांवरून आलेत. मोजदाद तरी किती ठेवणार?

अशा मजकूराच्या प्रत्येकी शंभर पोस्टी एकेकाने आज फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सपवर फिरवा. हाणा तिच्यामायला. हाय काय, अन नाय काय! लक्षात ठेवा आपले ब्रीदवाक्य काय आहे? काम चिमुटभर, पण प्रसिद्धी, मार्केटिंग आभाळभर. सरकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था मदतीचे काम करीत असतील तिथे जाऊन आपला बॅनर लावून फोटो काढून आणायचे. लक्षात ठेवा काम न करता फक्त फोटो खेचायचे नी पोस्ट करायचे. आयटी सेलकडून आम्ही फोटोशॉंपी मारून घेतोच आहोत.

प्रत्येक पोस्टींमागे एक अमितकेळे, देवेंद्रगाजर आणि नरेंद्र चलनातले चाळीस पैसे दिले जातील. जे स्वयंसेवक एव्हढेही करणार नाहीत त्यांना वळूंच्या गोठ्यात बांधण्यात येईल. चला लागा कामाला ******! सुस्तावलेत नुसते.

प्रा. हरी नरके,२७/४/२०२०

Sunday, April 26, 2020

Malayalam Translation of my article- The Print on Dr Babasaheb Ambedkar and RSS, rss10

द प्रिंट मधील माझ्या कालच्या लेखाचा केरळच्या विदुषी Vineetha Vijayan यांनी मल्याळममध्ये केलेला अनुवाद. द प्रिंटमधला माझा पहिला लेख त्यांनी मल्याळममध्ये अनुवादीत केल्यानंतर केरळमध्ये तो तुफान गाजला. माझ्याकडे खूप प्रतिक्रिया आल्या. ही ताकद आहे आंबेडकरी चळवळीची! जयभीम! This is Malayalam Translation of my yesterday's article from THE PRINT On BABASAHEB AMBEDKAR AND RSS. Translated by The Great Scholar Vineetha Vijayan.Thanks. and Jai Bhim. #VineethaVijayan-


അംബേദ്കറും ആർ‌എസ്‌എസും തമ്മിൽ ‘പ്രത്യയശാസ്ത്ര ഐക്യം ഉണ്ടായിരുന്നുവെന്നും ജനസംഘവും ഡോ: അംബേദ്കറുടെ പട്ടികജാതി ഫെഡറേഷനും തമ്മിൽ 1952ൽ പ്രീ പോൾ സഖ്യം ഉണ്ടായിരുന്നുവെന്നും
1954 ലെ ഭണ്ഡാര ഉപതെരഞ്ഞെടുപ്പിൽ അംബേദ്കർ ഒരു ആർ‌എസ്‌എസ് നേതാവായ തെങ്കാടിയെ തൻ്റെ തിരഞ്ഞെടുപ്പ് ഏജൻ്റായി നിയമിച്ചു എന്നും അബേദ്കർ ആർ.എസ് എസ് കാര്യാലയം സന്ദർശിച്ചു എന്നും കപടവാദങ്ങൾ ഉയർത്തിക്കൊണ്ടു രാജീവ് തുലി എന്ന ആർ.എസ്.എസ് വക്താവ് എഴുതിയ ലേഖനത്തിനുള്ള മറുപടിയായി പ്രൊ: ഹരി നാർകേഎഴുതിയ ലേഖനത്തിന് ഞാൻ ചെയ്ത മലയാള പരിഭാഷയാണിത്. കഴിഞ്ഞ ദിവസം പോസ്റ്റ് ചെയ്തിരുന്ന, അരുൺ ആനന്ദ് എന്ന ആർ.എസ് എസ് നേതാവിൻ്റ വാദങ്ങൾ തകർത്തു കൊണ്ട് ഹരിനാർകെഎഴുതിയ ലേഖനത്തിൽ പ്രകോപിതരായാണ് RSS വക്താക്കൾ രാജീവ് തുലി വഴി വീണ്ടും പച്ചക്കള്ളങ്ങൾ പ്രചരിപ്പിക്കുന്നത്, രാജീവ് തുലിയുടെ ലേഖനത്തിൻ്റെ ലിങ്കുചേർക്കുന്നു
https://theprint.in/…/ambedkar-appointed-rss-man-a…/407030/…
രാജീവ് തുലി ,സാങ്കൽപ്പികവും അടിസ്ഥാനരഹിതവും കെട്ടിച്ചമച്ചതുമായ കുറേ അവകാശവാദങ്ങളാണ് ഡോ: അംബേദ്കറെപ്പറ്റിഉന്നയിക്കുന്നത്
ആർ.എസ്.എസ്. വക്താവ് അരുൺ ആനന്ദിൻ്റെ വാദങ്ങൾ അതേപടിഏറ്റു പാടി ക്കൊണ്ടാണ് രാജീവ് തുലിയും,
ഡോ. അംബേദ്കർ ദത്തോപന്ത് തെങ്കഡിയെ പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ സെക്രട്ടറിയായി നിയമിച്ചുവെന്ന് തന്റെ ലേഖനത്തിൽ എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നത് ."അംബേദ്കറുടെ ഏറ്റവും വിശ്വസ്തൻ തെങ്കഡിയായിരുന്നതിനാൽ മഹാരാഷ്ട്രയിലെ 1954 ഭണ്ഡാര ലോക്സഭാ ഉപതിരഞ്ഞെടുപ്പിൽ തൻ്റെ ഇലക്ഷൻ ഏജന്റായി നിയമിച്ചു "വെന്നും അദ്ദേഹം അവകാശപ്പെടുന്നു. അങ്ങനെയുണ്ടായിട്ടുണ്ടെങ്കിൽ ഇതുസംബന്ധിച്ച് തിരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ ഉദ്യോഗസ്ഥർക്ക് ഔദ്യോഗിക കത്ത് ഉറപ്പായുംസമർപ്പിക്കും, അത്തരത്തിലൊരു ആധികാരിക തെളിവും അവർക്കില്ല.ഒരു പോളിംഗ് പ്രതിനിധിയെ വാമൊഴിയായിട്ടല്ല നിയമിക്കുന്നതെന്ന് അദ്ദേഹം അറിഞ്ഞിരിക്കണം;
വായുവിൽ വിരൽ കൊണ്ട് വരച്ച് സ്വപ്നക്കൊട്ടാരം പണിയുന്നതിനുപകരം അംബേദ്കർ തെങ്കഡിയെ നിയമിച്ചതുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഏതെങ്കിലും തരത്തിലുള്ള രേഖാമൂലമുള്ള തെളിവ് കൊണ്ടുവരാൻ തുലിക്ക് സാധിക്കുമോ?
തുലിയുടെ അടിസ്ഥാന രഹിതമായഅവകാശവാദങ്ങൾ അവിടെ നിൽക്കട്ടേ, ആരൊക്കെയായിരുന്നു ഡോ.അംബേദ്കറുടെ ഇലക്ഷൻ ഏജൻ്റ്സ് എന്നതിനുള്ള തെളിവുകളോടുകൂടിയ മറുപടി ഞാൻ തരാം.അഖിലേന്ത്യാ പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ ജനറൽ സെക്രട്ടറി പി‌എൻ രാജ്ഭോജ്, മധ്യപ്രദേശിലെ പട്ടികജാതി ഫെഡറേഷൻ സെക്രട്ടറി ബാബു ഹരിദാസ് അവ് ല, എന്നിവരായിരുന്നു അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുഖ്യ തെരഞ്ഞെടുപ്പ് ഏജൻ്റ് മാർ. ഇതിനുള്ള തെളിവുകൾ , ഡോ. ബാബാസാഹേബ് അംബേദ്കർ: രചനകളും പ്രസംഗങ്ങളും, DBAWS, വാല്യം 18, ഭാഗം 3. ൽ ഉണ്ട്
പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ ഭരണഘടന അനുസരിച്ച്, പട്ടികജാതി ഇതര വ്യക്തികളെ അംഗമോ ഭാരവാഹിയോ ആയി നിയമിക്കുന്നത് നിയമവിരുദ്ധവും ഭരണഘടനാ വിരുദ്ധവുമാണ്. അതേ രീതിയിൽ, മറ്റേതെങ്കിലും പാർട്ടിയിലോ സംഘടനയിലോ അംഗമാകുന്ന പട്ടികജാതി ഫെഡറേഷനിൽ ഒരാളെ ഉൾപ്പെടുത്തുന്നത് “ഭരണഘടനാവിരുദ്ധമാണ്”. (DBAWS, വാല്യം 17, ഭാഗം രണ്ട്, പേജ് 459)
തെങ്കടി പട്ടികജാതിക്കാരനായിരുന്നില്ല. രാഷ്ട്രീയ സ്വയംസേവക സംഘം (ആർ‌എസ്‌എസ്) പ്രവർത്തകനും മധ്യപ്രദേശിലെ ഭാരതീയ ജനസംഘം ഭാരവാഹിയായുമായിരുന്നു. അതിനാൽ, എസ്‌സി‌എഫിന്റെ സെക്രട്ടറിയായി അദ്ദേഹത്തെ നിയമിച്ചു എന്ന വാദം അടിമുടി കള്ളമാണ് മാത്രമല്ല, തിരഞ്ഞെടുപ്പ് നടന്നത് ഭണ്ഡാരയിലായിരുന്നു, തെങ്കടി ആ നിയോജകമണ്ഡലത്തിൽ ഉൾപ്പെട്ടിരുന്ന ആളു പോലുമല്ല. വാർധയിലെ ആർവി ജില്ലയായിരുന്നു അദ്ദേഹത്തിൻ്റെ നിയോജക മണ്ഡലം. യുക്തിസഹമായി പരിശോധിച്ചാൽ തെങ്കഡിയെപ്പോലുള്ള ഒരുവ്യക്തിയെ ഭണ്ഡാരയിലെ തിരഞ്ഞെടുപ്പ് ഏജന്റായി അംബേദ്കർ നിയമിച്ചു എന്ന വാദത്തിൽ ഒരു തരിമ്പോളം പോലും യാഥാർത്ഥ്യമില്ല എന്നു മനസ്സിലാക്കാം
ഭണ്ഡാര ഉപതിരഞ്ഞെടുപ്പ് 1954 മെയ് 2 മുതൽ 5 വരെയാണ്നടന്നത് .(ഡോ. ധനഞ്ജയ് കീർ, ഡോ. ബാബാസാഹേബ് അംബേദ്കർ, ജീവചരിത്രം, ആദ്യ പതിപ്പ് 1966, ഒമ്പതാം എഡി. 2014, മുംബൈ, പേജ് 630).ഈ തിരഞ്ഞെടുപ്പിലെ പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ പ്രവർത്തനങ്ങൾ - പ്രചാരണം, മീറ്റിംഗുകൾ, റാലികൾ, പ്രസംഗങ്ങൾ മുതലായവ - 1954 ഏപ്രിൽ, മെയ് മാസങ്ങളിൽ അംബേദ്കർ തൻ്റെ ജനത പത്രത്തിലൂടെ സമഗ്രമായും പതിവായുംറിപ്പോർട്ട് ചെയ്തിരുന്നു. റാലികളിൽ പങ്കെടുക്കുകയും അഭിസംബോധന ചെയ്യുകയും ചെയ്ത എല്ലാ നേതാക്കളെയും ജനത റിപ്പോർട്ടുകളിൽ പട്ടികപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട് .അവിടെ ഒന്നും തെങ്കടിയുടെ പേരില്ലാത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്?
തെങ്കടി അംബേദ്കറുടെ വിശ്വസ്ത സഹകാരിയായിരുന്നുവെങ്കിൽ, പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ എല്ലാ മീറ്റിംഗുകളിലും റാലികളിലും അദ്ദേഹം പങ്കെടുക്കേണ്ടതല്ലേ? ജനതയിൽ അംബേദ്കർ നടത്തിയ തിരഞ്ഞെടുപ്പ് കവറേജിൽ സ്പീക്കർ എന്ന നിലയിലോ വിശിഷ്ടാതിഥി എന്ന നിലയിലോ തെങ്കടിയെപ്പറ്റിഒരു പരാമർശവും കാണുന്നില്ലല്ലോ?
ഭണ്ഡാര ഉപതിരഞ്ഞെടുപ്പിൽ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടി ഓഫ് ഇന്ത്യയും (സിപിഐ) മറ്റു പലരും അംബേദ്കറെ പിന്തുണച്ചിരുന്നു. എസ്‌സി‌എഫിന്റെ പ്രചാരണ റാലികളിൽ സി‌പി‌ഐയിലെ എ. ബി. ബർദൻ പങ്കെടുത്തു (ഡി‌ബി‌ഡബ്ല്യുഎസ്, വാല്യം 18, ഭാഗം മൂന്ന്, പേജ് 374). ഈ തിരഞ്ഞെടുപ്പിൽ സി.പി.ഐയും ജനസംഘവും സഖ്യത്തിലായിരുന്നുവെന്ന് തുലി എന്തുകൊണ്ടാണ് അവകാശവാദം ഉന്നയിക്കാത്തത്?
ആർ‌എസ്‌എസിനെക്കുറിച്ചുള്ള അംബേദ്‌കറുടെ പ്രസ്താവനയും 1952 ലെ തിരഞ്ഞെടുപ്പും തമ്മിലുള്ള ഒരു വർഷത്തെ ഇടവേള തുലി സൂചിപ്പിക്കുകയും ഒരു വർഷത്തിനിടയിൽ രാഷ്ട്രീയത്തിൽ എന്തും സാധ്യമാണെന്ന് പ്രസ്താവിക്കുകയും ചെയ്യുന്നുണ്ട്
1952 ജനുവരി 4 ന് നടന്ന ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിലാണ് ഹിന്ദു മഹാസഭയുമായും ആർ‌എസ്‌എസുമായും സഖ്യമുണ്ടാക്കാനുള്ള സാധ്യത നിരസിച്ചതുമായി ബന്ധപ്പെട്ട പട്ടികജാതി ഫെഡറേഷൻ പ്രകടന പത്രിക ഇറക്കിയത്.
തുലി പറയുന്നതുപോലെ ഒരു വർഷം മുമ്പ് തീരുമാനിച്ചതല്ല അത്, 1951 ഒക്ടോബറിലാണതിറക്കിയത്.1952 ജനുവരി 4 ന് നടക്കാനിരിക്കുന്ന തിരഞ്ഞെടുപ്പിനുള്ള പ്രകടന പത്രിക കുറഞ്ഞത് മൂന്ന് മാസം മുമ്പെങ്കിലും, അതായത് 1951 ഒക്ടോബറിൽ തയ്യാറാക്കുന്നത് സ്വാഭാവികവുമാണ്.
പക്ഷേ, തുലി ഈ മൂന്ന് മാസത്തെ ഒരു വർഷം എന്ന്കണക്കാക്കുന്നു. ഒരുപക്ഷേ, അയാൾക്ക് വസ്തുതകൾ അറിയില്ലായിരിക്കാം; അല്ലെങ്കിൽ വാസ്തവത്തെ അംഗീകരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. രണ്ടായാലും(DBAWS, വാല്യം 17, ഭാഗം ഒന്ന്, തീയതി 3 ഒക്ടോബർ 1951, പേജ് 402).
Ambedkar called RSS ‘poisonous’ എന്ന ലേഖനം വായിച്ചാൽ അദ്ദേഹത്തിൻ്റെ വാദങ്ങൾ പൊളിയുന്നതു കാണാം
“ ഇന്ത്യാ പാക് വിഭജനത്തെയും ഇസ്ലാമിലെ തീവ്രവാദത്തെയും കുറിച്ചുള്ള അദ്ദേഹത്തിന്റെ വീക്ഷണങ്ങൾ ആർ.എസ്എസിൻ്റേത് തന്നെയാണ് എന്നത് അംബേദ്കറും ആർ എസ് എസും തമ്മിലുള്ള വ്യക്തമായ പ്രത്യയശാസ്ത്ര സമന്വയത്തെ പ്രതിഫലിപ്പിക്കുന്നു” എന്നാണ് തുലിയുടെ അടുത്ത അവകാശവാദം. ഡോ. അംബേദ്കറുടെ ''പാകിസ്ഥാൻ അല്ലെങ്കിൽ ഇന്ത്യയുടെ വിഭജനം" എന്ന പുസ്തകത്തെ തൻ്റെ വാദം സ്ഥാപിക്കുന്നതിനായി അദ്ദേഹം തന്ത്രപരമായി ദുർവ്യാഖ്യാനം ചെയ്ത് വളരെ ആവേശത്തോടെ പരാമർശിക്കുന്നു. എന്നാൽ അതേ പുസ്തകത്തിലെ ആർ‌എസ്‌എസിനെക്കുറിച്ചുള്ള അംബേദ്കറുടെ നിന്ദ്യമായ പരാമർശങ്ങൾ അദ്ദേഹം സൗകര്യപൂർവ്വം മറക്കുന്നു. അംബേദ്കറും ആർ‌എസ്‌എസും തമ്മിൽ പ്രത്യയശാസ്ത്രപരമായ ഒരുസാമ്യതയും ഉണ്ടായിരുന്നില്ല.
ഗോൾവർക്കർ വിചാരധാരയിൽ പറയുന്നു "താൻ ചാതുർ‌വർണ്യ സിദ്ധാന്തത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നു. സനാതന സംസ്‌കൃതിയുടെസംരക്ഷണവും ഉന്നമനവും ഒരു ഹിന്ദു രാഷ്ട്രത്തിന്റെ നിർമ്മാണവുമാണ് തങ്ങളുടെ ലക്ഷ്യം" എന്ന്. എന്നാൽ. ഡോ. അംബേദ്കർ പറയുന്നു, “ഹിന്ദു രാജ് ഒരു വസ്തുതയായി മാറുകയാണെങ്കിൽ, അത് ഈ രാജ്യത്തിന്റെ ഏറ്റവും വലിയ വിപത്തായിരിക്കുമെന്നതിൽ സംശയമില്ല. ഹിന്ദുക്കൾ എന്തുപറഞ്ഞാലും സ്വാതന്ത്ര്യത്തിനും സമത്വത്തിനും സാഹോദര്യത്തിനും ഭീഷണിയാണ് ഹിന്ദുമതം. ആ കണക്കിൽ അത് ജനാധിപത്യവുമായി പൊരുത്തപ്പെടുന്നില്ല. ഹിന്ദു രാജ് എന്ത് വില കൊടുത്തും തടയണം. ” (പാകിസ്ഥാൻ അല്ലെങ്കിൽ ഇന്ത്യയുടെ വിഭജനം, 1946, പേജ് 358. ഡി‌ബി‌ഡബ്ല്യുഎസ്, വാല്യം 8, 1990, 358)
1949 സെപ്റ്റംബർ 7 ന് ഗോൾവാൽക്കർ അന്നത്തെ .നിയമമന്ത്രിയായിരുന്ന അംബേദ്കറെ ദില്ലിയിൽ പോയികണ്ടു. മറാത്തക്കാരെ തടയാൻ അദ്ദേഹം അംബേദ്കറുടെ സഹായം തേടി. അംബേദ്കർ പറഞ്ഞ മറുപടി, “ആർ‌എസ്‌എസ് ഒരു വിഷവൃക്ഷമാണ്. ആർ‌എസ്‌എസ് പേഷ്വ ഭരണം സ്വപ്നം കാണുന്നു. ഒരു കാരണവശാലും എനിക്ക്നിങ്ങൾക്കൊപ്പം നിൽക്കാൻ കഴിയില്ല.നിങ്ങളെ പിന്തുണയ്ക്കാൻ കഴിയില്ല. ” എന്നായിരുന്നു.
ഈ സന്ദർശനത്തിന്റെ വിശദമായ റിപ്പോർട്ട് 1949 സെപ്റ്റംബർ 10 ന് അംബേദ്കറുടെ ജനത പത്രത്തിൽ പ്രസിദ്ധീകരിച്ചു. മാത്രമല്ല, അംബേദ്കർ സ്ഥാപിച്ച ദില്ലി ബൗദ്ധ് മഹാസഭയുടെ തലവനും പ്രശസ്ത പണ്ഡിതനുമായ സോഹൻലാൽ ശാസ്ത്രി ഈ കൂടിക്കാഴ്ച നടക്കുന്നസമയത്ത് അവിടെ സന്നിഹിതനായിരുന്നു.'' ബാബാസാഹാബ് ഡോ. അംബേദ്കർ കെ സമ്പർക്ക് " എന്ന തൻ്റെ പുസ്തകത്തിൽ [ ഭാരതീയ ബുദ്ധ മഹാസഭ, ദില്ലിപ്രദേശ്, (ന്യൂഡൽഹി, പേജ് 54-55) ] അദ്ദേഹവുംഈ കൂടിക്കാഴ്ചയെപ്പറ്റി വിശദീകരിച്ചെഴുതിയിട്ടുണ്ട്
ഇതെല്ലാം നടക്കുന്ന കാലഘട്ടത്തിൽ, യഥാർത്ഥത്തിൽ സംഭവിച്ചുകൊണ്ടിരുന്നത് അംബേദ്കർ എഴുതിയ ഭരണഘടനയെ ആർ‌എസ്‌എസ് തകർക്കാൻ ശ്രമിക്കുകയായിരുന്നു. ആർ‌എസ്‌എസ് ഹിന്ദു കോഡ് ബില്ലിനെതിരായിരുന്നു. ഭരണഘടനാ അസംബ്ലിയെ ഇല്ലായ്മ ചെയ്യാൻ അതിലെ ആർ എസ് എസ് അംഗങ്ങൾ ഓഡിറ്റോറിയം ഗാലറി ഉപരോധിച്ചു.ആ സംഭവങ്ങൾപാർലമെന്ററി രേഖകളിൽ റിപ്പോർട്ടുചെയ്യുന്നുണ്ട്. (ഭരണഘടനാ അസംബ്ലി ഡിബേറ്റുകൾ, ഗവൺമെന്റ് ഓഫ് ഇന്ത്യ പബ്ലിക്കേഷൻ, ന്യൂഡൽഹി, വാല്യം 7 പേജ് 1233, തീയതി, 4 ജനുവരി 1949).
രേഖകൾ വാക്കാലുള്ള അവകാശവാദങ്ങളേക്കാൾ ആധികാരികമാണെന്ന് പറയേണ്ടതില്ലല്ലോ. മാത്രമല്ല, തെങ്കഡിയും അരുൺ ആനന്ദും അവകാശവാദക്കാരൻ തുലിയും ആർ‌എസ്‌എസുകാരുമാണ്, അതിനാൽ തന്നെ അവരുടെ അവകാശവാദങ്ങൾ ആധികാരികതയും സാധുതയും ഇല്ലാത്തവയാണ്
അംബേദ്കറുടെ നിര്യാണത്തിന് വർഷങ്ങൾക്കുശേഷം അദ്ദേഹത്തിനു മേൽ ആർ.എസ്.എസ് അവകാശവാദം ഉന്നയിച്ചു ലേഖനങ്ങളും പുസ്തകവും എഴുതുന്ന തെങ്കടി, അരുൺ ആനന്ദ്, തുലി മുതൽ പേർക്ക് എന്തുകൊണ്ടാണ് ഡോ:അംബേദ്കറുടെ ജീവിത കാലത്ത് നിന്ന് എടുത്ത ഒരൊറ്റ ആധികാരിക രേഖപോലും തങ്ങളുടെ വാദങ്ങൾക്ക് തെളിവായി നൽകാനാവാത്തത്?
ആർ‌എസ്‌എസ് കാര്യാലയം ഡോ: അംബേദ്കർ സന്ദർശിച്ചു എന്ന വാദം പോലും സാങ്കൽപ്പികമായ പച്ചക്കള്ളമാണ്.ഇവർ പറയുന്നതിന് എന്തെങ്കിലും സാധുതയുണ്ടെങ്കിൽ അന്നെടുത്ത ഫോട്ടോകൾ, കത്തിടപാടുകൾ അല്ലെങ്കിൽ അന്നത്തെ പത്രങ്ങളിൽ പ്രസിദ്ധീകരിച്ച വാർത്തകൾ പോലുള്ള ഒരുതെളിവും അതിന് ആർ‌എസ്‌എസ് ന് നൽകാനാവാത്തതെന്താണ്?
അംബേദ്കർ മനുസ്മൃതി കത്തിച്ചു, ഹിന്ദുമതം ത്യജിച്ചു, ഹിന്ദുമതത്തെ തള്ളിപ്പറഞ്ഞു, ബുദ്ധമതം സ്വീകരിച്ചു. ബുദ്ധമതം സ്വീകരിക്കുന്ന സമയത്ത് അദ്ദേഹം 22 പ്രതിജ്ഞകൾ എടുത്തു, അതിൽ എട്ട് എണ്ണം: -
1. എനിക്ക് ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നിവയിൽ വിശ്വാസമില്ല, അവരെ ആരാധിക്കുകയുമില്ല.
2. രാമനിലും കൃഷ്ണനിലും എനിക്ക് വിശ്വാസമില്ല, അവരെ ആരാധിക്കുകയുമില്ല.
3. ഗൗരി, ഗണപതി, മറ്റ് ദൈവങ്ങളിലും ഹിന്ദുമത ദേവതകളിലും എനിക്ക് വിശ്വാസമില്ല, ഞാൻ അവരെ ആരാധിക്കുകയുമില്ല.
4. ദൈവങ്ങളുടെ അവതാര സിദ്ധാന്തത്തിൽ ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നില്ല.
5. ശ്രീബുദ്ധൻ വിഷ്ണുവിന്റെ അവതാരമാണെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുകയോ വിശ്വസിക്കുവാൻ സാധ്യതയോ ഇല്ല. മാത്രവുമല്ല ഇത് നികൃഷ്ടവും തെറ്റായതുമായ പ്രചാരണമാണെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു.
6. ഞാൻ “ശ്രാദ്ധം” നടത്തുകയോ “പിണ്ഡം” നൽകുകയോ ഇല്ല.
7. ഞാൻ ബ്രാഹ്മണരിലൂടെ ഒരു ചടങ്ങും നടത്തുകയില്ല.
8. മനുഷ്യരാശിയുടെ അഭിവൃദ്ധിക്ക് ഹാനികരവും മനുഷ്യരോട് വിവേചനം കാണിക്കുകയും അവരോട് താഴ്ന്ന രീതിയിൽ പെരുമാറുകയും ചെയ്യുന്ന എന്റെ പഴയ ഹിന്ദു മതം ഉപേക്ഷിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ ബുദ്ധമതം സ്വീകരിക്കുന്നു.
(DBAWS, വാല്യം 17, ഭാഗം മൂന്ന്, പേജ് .531).
അങ്ങനെയാണെങ്കിൽ, അംബേദ്കറെ ഏറ്റെടുക്കുന്ന ആർ.എസ്.എസ്.മേൽപ്പറഞ്ഞ വ കൂടി ഏറ്റെടുക്കണം! രാമരാജ്യം എന്ന ആശയം ആർ‌എസ്‌എസ് ഉപേക്ഷിച്ചിട്ടുണ്ടോ എന്നത് അവരോട് ചോദിക്കാവുന്ന രസകരമായ ഒരു ചോദ്യമാണ്. അംബേദ്കറുടെ പുസ്തകങ്ങളായ ഹിന്ദുമതത്തിലെ പ്രഹേളികകൾ, റിഡിൽസ് ഓഫ് റാം, കൃഷ്ണ, സംസ്കൃതിയും പ്രതി സംസ്കൃതിയും, തുടങ്ങിയ പുസ്തകങ്ങൾ അവർക്ക് എന്നെങ്കിലുംഅംഗീകരിക്കാനാവുമോ?
ആർ‌എസ്‌എസ് ആഗ്രഹിക്കുന്നത് ഹിന്ദു ഭൂരിപക്ഷ നിർമ്മിതിക്കായുള്ള സമരസത ( ലയനം) മാത്രമാണ്, അതേസമയം അംബേദ്കർ ജാതി ഉന്മൂലനമാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്, അത് അദ്ദേഹത്തിന്റെ അടിസ്ഥാന പ്രത്യയശാസ്ത്ര നിലപാടാണ്.
ചുരുക്കത്തിൽ, സൂക്ഷ്മതലത്തിൽ എങ്ങനെയെല്ലാം പരിശോധിച്ച് നോക്കിയാലും അംബേദ്കറും ആർ‌എസ്‌എസിന്റെ പ്രത്യയശാസ്ത്രങ്ങളും തമ്മിൽ യാതൊരു സാമ്യവുമില്ല. ആഗോളതലത്തിൽ അംഗീകരിക്കപ്പെടുകയും അടിച്ചമർത്തപ്പെട്ടവരുടെ ഏറ്റവും വലിയ ദാർശനിക നേതാവായി അംഗീകരിക്കപ്പെടുകയും ചെയ്ത അംബേദ്കറെ ഹൈജാക്ക് ചെയ്യാൻ അവർ സമർത്ഥമായി ശ്രമിക്കുന്നുണ്ട്; ആർ‌എസ്‌എസിന്റെ മറ്റൊരു ഫാസിസ്റ്റജണ്ട എന്നതിനെ തിരിച്ചറിയുക
ഹരി.ആർ.നാർകെ
https://theprint.in/opinion/no-ideological-synergy-between-ambedkar-and-rss-rajiv-tuli-can-read-my-book-for-facts/408612/?fbclid=IwAR3-Tm0d5heRhuZV4jYtXv1oj-plwLkoF0y1TSpDfiGvE0UlhXpnUeq_H0g

.....................................................................................................
"ഇല്ല, ഡോ:അംബേദ്കർക്ക് ആർ‌എസ്‌എസുമായി സഖ്യമോ അവരെപ്പറ്റി മതിപ്പോ ഉണ്ടായിരുന്നില്ല. RSS വക്താവ് അരുൺ ആനന്ദ് പച്ചക്കള്ളം വിളിച്ചു പറയുകയാണ് "
#ഹരിനാർകേ
[ഡോ. ബാബാസാഹേബ് അംബേദ്കർ: രചനകളും പ്രസംഗങ്ങളും, വാല്യം. 17 മുതൽ 22 വരെ, മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ പ്രസിദ്ധീകരിച്ചത് എഡിറ്റു ചെയ്ത വ്യക്തിയാണ് ലേഖകൻ ഹരിനാർകെ. പൂനെ യൂണിവേഴ്സിറ്റി പ്രൊഫസറും മഹാത്മാ ഫുലെ ചെയറിെന് റ അദ്ധ്യക്ഷനും ആണദ്ദേഹം. അദ്ദേഹമിന്ന് ദി പ്രിൻ്റ് ഡോട്ട് ഇൻ ജേണലിൽ ,ഇഗ്ലീഷിൽ എഴുതിയ ലേഖനം അത്രമേൽ പ്രസക്തമായി തോന്നിയതിനാൽമൊഴി മാറ്റിയതാണ്]
ബാബാസാഹേബ് ഡോ: അംബേദ്കറുടെ 129-ാം ജന്മദിനത്തിൽ RSS വക്താവും ആർ‌എസ്‌എസ് അഫിലിയേറ്റായ ഇന്ദ്രപ്രസ്ഥ വിശ്വസംവദ്കേന്ദ്രത്തിൻ്റെ സിഇഒയുമായ അരുൺ ആനന്ദ് തന്റെ വീഡിയോയിലും ലേഖനത്തിലുമായിഎന്തുകൊണ്ടാണ് അംബേദ്കറെRSS തങ്ങളുടെ നേതാവായി കണക്കാക്കുന്നത് എന്നതിന്
മൂന്ന് അവകാശവാദങ്ങൾ ഉന്നയിക്കുന്നുണ്ട്.
അവ മൂന്നും പച്ചക്കള്ളമാണ് എന്ന് ചരിത്രപരമായും വസ്തുതാപരമായും പരിശോധിച്ചാൽ മനസ്സിലാക്കാം.ഹരിനാർകേ എന്ന ഞാൻ മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ പ്രസിദ്ധീകരിച്ച"ഡോ. ബാബാസാഹേബ് അംബേദ്കർ: രചനകളും പ്രസംഗങ്ങളും എഡിറ്റു ചെയ്ത വ്യക്തിയാണ്. അതിനാൽ, അരുൺ ആനന്ദിന്റെ അവകാശവാദങ്ങളെ നിരാകരിക്കുന്നതിനുള്ള തെളിവുകളും വസ്തുതകളും കൊണ്ടുവരാൻ എനിക്കു സാധിക്കും
അംബേദ്കർക്ക് ആർ‌എസ്‌എസ്നെപ്പറ്റി വലിയ മതിപ്പായിരുന്നു
വസ്തുത:
ആർ‌എസ്‌എസിനെക്കുറിച്ച് 1951 മെയ് 14 ന് അംബേദ്കർ വളരെ രൂക്ഷമായ പരാമർശങ്ങൾ നടത്തിയതിൻ്റെ തെളിവുകൾ, പാർലമെന്റിന്റെ രേഖകളിൽ ലഭ്യമാണ്. അദ്ദേഹം പറഞ്ഞു: “ഞാൻ R.S.S. അകാലിദൾ തുടങ്ങിയവ വളരെ അപകടകരമായ കൂട്ടങ്ങളാണ്എന്നു മനസ്സിലാക്കുകയും വ്യക്തമായിത്തന്നെ പറയുകയും ചെയ്യുന്നു”
Sourse:(Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 15, edited by Vasant Moon, Govt. of Maharashtra, Mumbai, 1997, pp. 560), (Parliamentary Debates, Vol. 11, Part Two, 14 May 1951, pp. 8,687-90).
പാർലമെന്റിൽ നടത്തിയ ഡോ:അംബേദ്കറുടെ ഈ പരാമർശം, ആർ‌എസ്‌എസിന്റെ പ്രത്യയശാസ്ത്രത്തെക്കുറിച്ച് അദ്ദേഹം വളരെ വ്യക്തമായ ബോധ്യമുള്ളവനാണ് എന്ന് തെളിയിക്കുന്നുണ്ട്. എന്നതിനാൽ, തന്നെ ആനന്ദിന്റെ അവകാശവാദങ്ങൾ ആശ്ചര്യകരമെന്നല്ല, പറയേണ്ടത് മറിച്ച് ആർ‌എസ്‌എസിന്റെ സമർത്ഥമായ കപടരാഷ്ട്രീയം പ്രകടമാക്കുന്നതാണ്.
അംബേദ്കർ സ്ഥാപിച്ചപട്ടികജാതി ഫെഡറേഷനും ഭാരതീയ ജനസംഘവും 1952 മധ്യപ്രദേശ് തിരഞ്ഞെടുപ്പിൽ ‘വോട്ടെടുപ്പിന് മുമ്പുള്ള സഖ്യം’ രൂപീകരിച്ചു.
വസ്തുത
1952 ലെ പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ പ്രകടനപത്രികയിൽതിരഞ്ഞെടുപ്പിന് മുമ്പ് തന്നെ അംബേദ്കർ പറഞ്ഞത് ഇതാണ്: “മറ്റ് രാഷ്ട്രീയ പാർട്ടികളോട് താരതമ്യം ചെയ്താൽ പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ മനോഭാവം എളുപ്പത്തിൽ ഇങ്ങനെനിർവചിക്കാം. പട്ടികജാതി ഫെഡറേഷന് ഹിന്ദു മഹാസഭയോ ആർ‌എസ്‌എസോ പോലുള്ള ഒരു പിന്തിരിപ്പൻ പാർട്ടിയുമായി ഒരു കാലത്തുംഒരു തരത്തിലുമുള്ള സഖ്യവുംമുണ്ടാകില്ല. ”
Sourse: (Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 17, Part One, edited by Prof Hari Narke, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp. 402).
ഡോ. അംബേദ്കറുടെ പ്രസ്താവനയിൽ നിന്ന് വളരെ വ്യക്തമാണ് അദ്ദേഹം ആർ‌എസ്‌എസിനെയും ഹിന്ദു മഹാസഭയെയും അതി ശക്തമായിത്തന്നെ എതിർത്തിരുന്നുവെന്നത്. എന്നിട്ടും, മധ്യപ്രദേശ് തെരഞ്ഞെടുപ്പിൽ ആർ‌എസ്‌എസുമായി അംബേദ്കറിന് പ്രീ-പോൾ സഖ്യമുണ്ടായിരുന്നുവെന്ന് ആനന്ദ് തികഞ്ഞ ആത്മവിശ്വാസത്തോടെ പറയാൻ ദത്തോപന്ത് തെങ്കഡിയെ ഉദ്ധരിക്കുന്നത് പച്ചക്കള്ളം സത്യമെന്ന് വിളിച്ചു പറയുന്ന RSS ശീലം കൊണ്ടാണ്
#അവകാശവാദം3:
അംബേദ്കർ ചെയർമാനായിരിക്കുമ്പോൾ പട്ടികജാതി ഫെഡറേഷന്റെ സെക്രട്ടറിയായി ആർ.എസ്.നേതാവായ ദത്തോപന്ത് തെംഗ് ഡി നിയമിക്കപ്പെട്ടു.
വസ്തുത:
ഒരു പട്ടികജാതിക്കാരനെ മാത്രമേ ഫെഡറേഷനിൽ അംഗമായി പോലുംനിയമിക്കാൻ കഴിയൂ, എന്നതാണ് ചട്ടം. ദത്തോപന്ത് തെങ്കാടി ഒരു പട്ടികജാതിക്കാരനായിരുന്നില്ല. പിന്നെ എങ്ങനെയാണ് പട്ടികജാതി ഫെഡറേഷൻ്റെ സെക്രട്ടറിയായി തെങ്കാടിയെ നിയമിക്കാൻ അംബേദ്കർ എന്തടിസ്ഥാനത്തിലാണ് അനുവദിച്ചു എന്ന് ഇവർ വാദിക്കുന്നത്?
ഡോ:അംബേദ്കറെ കളങ്കപ്പെടുത്താൻ അരുൺ ആനന്ദ് നെറികെട്ട കളികൾ കളിക്കുകയാണ്. ആർ‌എസ്എസിന്റെ പതിവ് വൃത്തികെട്ട രാഷ്ട്രീയമാണിത്. അരുൺ ആനന്ദ് അംബേദ്കറിനെ അപകീർത്തിപ്പെടുത്തിയതിനെ ഞാൻ ശക്തമായി അപലപിക്കുന്നു.

Saturday, April 25, 2020

संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - रा.स्व.संघ 8







संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - प्रा. हरी नरके , द वायर, मराठी 

सारे जग कोरोनाच्या दु:खात असताना काही चतुर मंडळींनी हीच वेळ साधायचे ठरवले. लोक जेव्हा चिंतेत असतात, दु:खात आणि तणावाखाली असतात, तेव्हा त्यांच्या त्या बेसावधपणाचा वापर करून आपला अजेंडा चतुरपणे पुढे रेटणे ही हिटलरची खासीयत होती. आपल्या देशातल्या गावठी हिटलरची चाल पण तशीच !


अरूण आनंद नावाचं एक उच्चभ्रू प्रस्थ आहे. ते ‘इंद्रप्रस्थ’ नावाची एनजीओ चालवतात. तिचे ते सीईओ आहेत. ते पत्रकारही आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा वरच्या वर्तुळात वावर असतो. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती होती. देशभरातील लॉकडाऊनमुळे ती लोकांनी घरातच साजरी केली. तर आनंद यांनी त्यानिमित्त एक व्हीडीओ प्रसारित केला व एक लेखही प्रकाशित केला. विषय – डा.आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशंसक होते, त्यांचे इतके प्रेम होते, की ते म्हणाले, संघ वाढवा, तुमच्याबरोबर मी निवडणुक युती करतो. संघाचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे जीव की प्राण. त्यातल्या एकाला तर त्यांनी आपल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, या पक्षाचे सचिव, निवडणूक प्रमुख आणि प्रवक्ता नेमले. संघाचे सुप्रिमो गोळवलकरगुरूजी आणि डॉ. बाबासाहेब यांच्या भेटीगाठींमध्ये खलबते होत असत. रणनिती ठरे. बाबासाहेब पुन्हापुन्हा संघाच्या शिबिरांना भेटी देत असत. संघाचे कौतुक करीत असत. त्यामुळे संघाचे लाडके बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा लाडका संघ असे घट्ट नाते होते. हे चित्र असे काही रंगवले गेले की आता बाबासाहेब हे संघाचे स्वयंसेवक होते, एव्हढेच सांगायचे बाकी राहिले.

संघाची एक कार्यपद्धती आहे. एकाचवेळी संघ अनेक आघाड्यांवर कार्यरत असतो. म्हणजे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक बाळ गांगल, भिडेगुरूजी, अरूण शौरी हे महात्मा फुले व बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्याचवेळेला दत्तोपंत ठेंगडी, भिकुजी इदाते, रमेश पतंगे संघ समरसतेच्या मनाचे श्लोक लिहित असताना बाबासाहेब आणि फुले यांच्या आरत्याही करीत असतात. त्याद्वारे त्यांना फुले-आंबेडकरांचे अपहरण करायचे असते. तिसरीकडे अफवा पसरवून घराघरात त्यांच्याबद्दल विद्वेशही पेरला जात असतो. अंगलट आलेच तर आम्ही तर त्यांची नावे प्रात:स्मरणीय म्हणून घेत असतो, असे सांगून सारवासारवही केली जाते.

३२ वर्षांपुर्वी बाळ गांगलांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकली. महाराष्ट्र संतापला. संघाने गांगलांचा आपला संबंध नाही, असे घोषित करून टाकले. माझ्या पहिल्या पुस्तकात मी गांगलांची मुलाखत छापलीय. तुम्ही फुल्यावर एव्हढे का संतापलात असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षापासून मी स्वयंसेवक आहे. फुले हा हिंदूराष्ट्राच्या स्थापनेतला मुख्य अडथळा आहे, त्यांच्यामुळे ब्राह्मणांचे पावित्र्य, महात्म्य, गारूड धोक्यात आले, हे संघाने मला पटवले, तेव्हापासून मी फुल्यांना शत्रू क्रमांक एक मानतो. भिडेगुरूजी म्हणतात फुले देशद्रोही होते. म्हणजे ज्याने ब्राह्मण्यावर टिका केली, तो देशद्रोही. एका वाहिनीवर बोलताना जाहीरपणे ते म्हणाले, ‘बाबासाहेब मनूला मानणारे होते. मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब जयपूरला स्वत: हजर होते.’ हा पुतळा जयपूरच्या उच्च न्यायालयात बसला १९८९ ला. डॉ. बाबासाहेब त्यापुर्वी ३३ वर्षे आधीच निधन पावलेले. इतके तर बुद्धीमान हे आंबापुत्र भिडेगुरूजी!

अरुण आनंद म्हणाले, ‘बाबासाहेब संघाचे प्रशंसक होते.’ बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले, ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
” May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. “[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]
“मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.”  हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले बाबासाहेबांचे उद्गार आहेत. हे आर.एस.एस.चे कौतुक आहे का?

आनंद म्हणाले, ‘बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाची १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात संघाचे पिल्लू असलेल्या जनसंघाबरोबर युती केली होती.’ १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-
“As regards other Political Parties, the Scheduled Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S.” [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]

“इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही.” तेंव्हा जनसंघाबरोबर युतीचा प्रश्नच उद्भवत नाही.

आता ही सगळी अस्सल आणि छापील साधने आहेत म्हणून तरी बरे, नाहीतर या लोकांनी काय हैदोस घातला असता माहित नाही.

आनंद यांनी दावा केला, की संघाचे दत्तोपंत ठेंगडी बाबासाहेबांचे लाडके होते. त्यांना बाबासाहेबांनी स्वत:च्या पक्षाचे सचिव नेमले. प्रचारप्रमुख नेमले. प्रवक्ता नेमले. आता आनंद यांनी एव्हढेच सांगायचे बाकी ठेवले की बाबासाहेबांनी ठेंगडींना आपला सर्वोच नेताच [बॉस] मानले.

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) या पक्षाची घटना छापील आहे. ती आम्ही "डॉबाआंलेभा" मालिकेच्या १७ व्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित केलेली आहे. या घटनेनुसार तीच व्यक्ती पक्षाचा सदस्य वा पदधिकारी होऊ शकते, जी अनुसुचित जातीची आहे. ठेंगडी काही अनुसुचित जातीचे नव्हते. शिवाय दुसर्‍या संघटनेचे सभासद असलेल्या व्यक्तीला ‘शेकाफे’चे दरवाजे बंद होते. ठेंगडी या काळात संघाचे, इंटक व रेल्वे व पोस्टल युनियन [कम्युनिस्ट] यांचे पदाधिकारी होते. आता अशा माणसाला नियमाप्रमाणे मुदलात ‘शेकाफे’चा सदस्यच होता येत नव्हते. पदाधिकारी तर फार दूरची बात.

आनंद म्हणतात, ‘बाबासाहेबांनी संघाच्या पुण्यातील शिबिरांना दोनदा भेटी दिल्या, तिकडे बाबासाहेब जेवले, त्यांनी संघाचे कौतुकही केले. इ. इ.’ बाबासाहेबांच्या या भेटीची छायाचित्रे, पत्र्यव्यवहार, त्याच्या बातम्या यांची कात्रणे यातले काहीही संघातर्फे पुरावा म्हणून दिले गेलेले नाही. १९२७ पासून बाबासाहेब जिथे जिथे जात तिथल्या बातम्या त्यांच्या ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये छापल्या जात. संघाच्या शिबिरांना बाबासाहेबांनी जर खर्‍याच भेटी दिल्या असत्या, तर त्याच्या बातम्या निदान ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये तरी आल्याच असत्या ना? अशी कोणतीही बातमी आलेली नाही. संघाचे आणि केसरीचे गुळपीठ होते. बाबासाहेब याच काळात लोकमान्य टिळकांच्या मुलाला श्रीधरला भेटत असत. त्यांचा पत्र्यव्यवहार आहे, बातम्या आहेत, मग संघाच्या भेटीच्या बातम्या निदान केसरीत तरी यायला हव्या होत्या. संघाला मानणारी या काळात निदान डझनभरतरी पुणेरी वर्तमानपत्रे होती. त्यातही खबरबात नाही, असे का? संघाने या भेटींचे पुरावे द्यावेत, ते तपासून ठरवू.

आनंद म्हणतात, ‘संघसुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले आणि त्यांना बाबासाहेब म्हणाले संघ वाढवा.’ प्रत्यक्षात काय घडले होते?

मराठ्यांना रोखण्यासाठी मदत मागायला आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले होते हे खरे आहे. बाबासाहेब तेंव्हा देशाचे कायदा मंत्री होते. मंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. गुरूजी भेटले. त्यांनी मदत मागितली, सहकार्य मागितले, पण रा.स्व. संघ हा " विषवृक्ष" आहे असे, सांगत बाबासाहेबांनी सहकार्य नाकारले.

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन ते बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले होते.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. “पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत, ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवाईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मण राज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही,” अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब – गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री, हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जात-येत असत. गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, “हे ब्राहमण गृहस्थ, हिंदूंचे पोप आहेत. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!” { पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५} या भेटीची जनतामध्ये बातमीही प्रकाशित झाली होती.

चातुर्वर्ण्याची प्रस्थापना आणि संवर्धन करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील? दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषय पत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

बरं याच काळात संघाचे काय उद्योग चालले होते, तर संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत घुसले होते.

शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून, हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? यालाच हे संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब यांचा ते सन्मान करीत होते असे म्हणतात का?

(वाचा-) “संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले, की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात.” (संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९)

सुर्यवंशी नावाच्या एका संघ स्वयंसेवकाने लिहिले आहे, की बाबासाहेब घटना सभेत निवडून यावेत यासाठी जनसंघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणले. किती सराईतपणे खोटे बोलतात हे संघीय. मुदलात श्यामाप्रसाद यांनाच काँग्रेसने निवडून आणले होते. त्यांचा अन्य कुणीही सदस्य नव्हता. बाबासाहेब प्रथम निवडून आले, ते बंगालमधून. जोगेंद्रप्रसाद मंडल हे बाबासाहेबांचे तिथले आमदार होते. त्यांनी बाबासाहेबांना घटना परिषदेवर निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. पुढे बाबासाहेबांचा हा मतदार संघ पाकीस्तानात गेल्याने बाबासाहेबांचे सदस्यत्व गेले. पण पुण्याचे बॅ. जयकर हे काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांनी उभे राहावे अशी विनंती राजेंद्र प्रसाद व वल्लभभाईंनी त्यांना केली. याकाळातील सगळा पत्र्यव्यवहार उपलब्ध आहे. ही गोष्ट आहे, जुलै १९४७ ची. तेंव्हा जनसंघ नव्हताच, आणि त्यामुळे त्यांचा कोणी सदस्यही नव्हता.

खुद्द माझ्याबद्दलसुद्धा या सूर्यवंशींनी काही भन्नाट शोध लावलेत, म्हणे मी संघाच्या कार्यक्रमांना गेलो आणि तिथे संघाचा गौरव केला. साफ खोटे. मी आजवर संघाच्या एकाही कार्यक्रमाला गेलेलो नाही. गौरवाचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही.

माझे महात्मा फुल्यांवरील [ संघाच्या बाळ गांगलचा प्रतिवाद करणारे ] पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला माझ्या पिंपरीच्या घरी नवले नावाचे एक गृहस्थ भेटायला आले. ते म्हणाले, महात्मा फुले शताब्दी निमित्त आम्ही मुंबईत एक वैचारिक चर्चासत्र घेतोय, तुम्ही फुल्यांवर पेपर वाचा. मी गेलो. पेपर वाचला. आयोजक संस्थेचे नावही तोवर मी ऎकलेले नव्हते. त्यांनी त्याची पुस्तिकाही छापली आहे. माझा पेपरही त्यात आहे. पुढे त्यांनी असेच दुसरे चर्चासत्र नाशिकला घेतले. तिथेही मला बोलावले. मी म. फुल्यांवर बोललो. मात्र तेंव्हा मला संशय आला. मी खोदून खोदून माहिती काढल्यावर कळले, की ‘समरसता मंच’, या नावाने वावरणारी ही मंडळी संघाशी संबंधित आहेत. माझ्यापासून खरी माहिती दडवून ठेऊन माझी फसवणूक केल्याबद्दल मी त्यांना फटकारले आणि त्याउप्पर त्यांना माझ्या दारातही उभे केले नाही, या गोष्टी फुले शताब्दी वर्षातल्या म्हणजे ३० वर्षांपुर्वीच्या आहेत.

आता तर हे लोक माझ्याच तोंडात संघाचे मी कौतुक केल्याचे शब्द घुसवू लागलेत! या खोटारडॆपणाचा, बुद्धीभेद अभियानाचा आणि फुले-आंबेडकरांचे अपहरण करण्याच्या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो. मी संघाशी संबंधित असतो, तर संघाचे सरकार महाराष्ट्रात असताना राज्य शासनाच्या मागासवर्ग आयोग, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती, भाषा सल्लागार समिती, बालभारती, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन, या सर्व संस्थामधून देवेंद्र फडणवीस सरकारने मला काढून टाकले असते काय?

प्रा. हरी नरके, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’, या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.

रविवार विशेष  April 26, 2020 12:43 am

https://marathi.thewire.in/rss-fake-story-and-dr-babasaheb-ambedkar