Thursday, July 25, 2019

सरदेशमुखांच्या डायरीत हरी नरकेंच्या पुस्तकाच्या नोट्स







त्यांचे चित्रण तथ्यानुसार असावे म्हणूनही त्यांच्यावरील पुस्तके,संदर्भ नोंदलेत. य.दि.फडक्यांचे लठ्ठे चरित्र, ज्योतिरावांवरील हरी नरकेंचे पुस्तक यांतून केलेली टिपणे आहेत. संस्थानातले तपशीलही निव्वळ आठवणींवर वा कल्पनेपेक्षा तथ्यांवर आधारावेत यासाठी या काळातल्या मिळतील त्या वृत्तपत्रातल्या संस्थानिकांसंबधीच्या बातम्या कात्रणं काढून ठेवत वा नोंदी करत.
...........................................
डांगोरा एका नगरीचा'ही सरदेशमुखांची सर्वात महत्वाची , महत्त्वाकांक्षी अभिव्यक्ती . १९९८ मधल्या २० जूनला तिचे प्रकाशन आम्ही एकत्र जेवणाने साजरे केले .
'आशय'मधले सहकारी जयंत राळेरासकर यांच्या घरी सोलापुरातल्या साहित्य क्षेत्रातले १५-२० जण जमलो होतो . त्याआधी 'डांगोरा..'चे समारंभपूर्वक प्रकाशन व्हावे असा अपयशी प्रयत्न आम्ही केला . भागवतांनी फार आनंदाने मौज परिवारासह येण्याचे मान्य केले होते . यानिमित्ताने सरदेशमुखांच्या साहित्यावर एक दिवसीय चर्चासत्र घ्यावे असे सुचवून त्याचा आराखडाही सुचवला होता , पण जमले नाही , ( या अनुभवावरही कधी स्वतंत्र लिहीता येईल , बघु ) तसे भागवतांना कळवले . त्यांच्या उत्तरातले पहिले वाक्य होते , 'उदास वाटले फार' . पण तरी आम्ही काही करू , असे म्हणालो तर त्यांनी काही केलेत तरी त्यात सरदेशमुखांना या त्रयाबद्दल ( ते कादंबरीत्रय म्हणत ) बोलते करा , त्याचे शब्दांकन नंतर करता येईल , असे सुचवले , त्यानिमित्ताने मग २० जूनला जमलो .
कादंबरी फार कुणी वाचली नव्हती , त्यामुळे विवेकजी घळसासी , आणि मी त्यावर बोललो . बाकी सगळ्यांनी चर्चा केली , बहुतेकांना तिन्हीतल्या आत्मपर तपशीलासंदर्भात कुतुहल होते . सरांनी ते टाळले नाही , आनंदात होते , बोललेही बरेच . पण नंतर 'आशय' मध्ये ते सविस्तार लिहावे असा आग्रह मी करीत राहिलो . ' बखर , डांगोरा , उच्छाद , एक भूमिका ' हा लेख आशय दिवाळी ९८ मध्ये प्रसिद्ध झाला , भागवतांना यांचा फार आनंद वाटला .
मुळात सरांनी हे सगळे सांगावे या आग्रहामागे एक पार्श्वभूमी होती . या त्रयीसाठी , विशेषतः डांगोरा..'साठी त्यांनी दीर्घकाळ घेतलेले अफाट परिश्रम हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय व्हावेत . १९६० च्या मे महिन्यात वि.म. सरदेशमुख गेले . त्याआधी सरदेशमुखांनी पौगंडावस्थेत अक्कलकोट सोडताना अनुभवलेले भयकारी दिवस , पुढे सोलापुरात असताना एकीकडे वडिलांनी सांगितलेल्या राजाच्या मैत्रीच्या रम्य आठवणी , दुसरीकडे त्यांचा सतत अन्यायनिवारणार्थ संस्थान आणि इंग्रज रेसिडेन्सी दोहोंशी एकाचवेळी सुरू असलेला अपयशी झगडा , या पार्श्वभूमीवर १९६३ साली कादंबरीचे बीज त्यांच्या मनात पडले . आरंभ आणि शेवट म्हटले तर एका महाकाव्याचे सर्ग असावेत तसे जोडलेले होते , म्हटले तर स्वतंत्र आस्वादमूल्य असलेल्या कथा , म्हणून त्यांनी त्या आधी लिहून ताण काहीसा कमी केला . तपशीलवार टिपणे काढणे अर्थात सुरू होतेच .
प्राध्यापकीतून निवृत्ती , सोबत आलेल्या कौटुंबिक अडचणी , हातातली धुके आणि शिल्प आणि रामदास ही प्रकाशने असे सगळे काहीसे मार्गी लागल्यावर १९८५ साली त्यांनी टिपणांचे बाड उघडले . काही दिवसांनंतर लगेच डोळ्यांचे दुखणे उद्भवले . दृष्टी जाईल काय भीतीत दोन-तीन वर्षे गेली . त्यातून बाहेर पडल्यावर लगेच जोमाने तयारी . जून १९८७ मध्ये प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात .
या तयारीच्या खुणा असलेल्या सहा डायऱ्या शिल्लक आहेत . या फक्त विविध तपशीलांच्या . मूळ हस्तलिखित , त्यांचे खर्डे ल.सिं.जाधव यांनी केलेली मुद्रणप्रत डोळ्यांखालून घातल्यावर लसिंच्याच घरामागे असलेल्या कंबर तलावाला त्यांनी स्वहस्ते अर्पण केले .
१३८ व्यक्तिरेखा असलेले हे मिनी महाभारत . दशकभराचा कालावधी , छोटेसे स्वतंत्र साईखेड संस्थान , सोलापूर जिल्हा , देश आणि जग सगळीकडे वेगवान घटितांची गजबज आहे , सगळ्यांचे घट्ट जोडलेले संदर्भ यात आहेत . महत्त्वाच्या पात्रांपासून छोट्यात , छोट्या सगळ्या पात्रांच्या पार्श्वभूमी असलेल्या स्वतंत्र कथा , त्यांच्या आपापसातल्या घट्ट वीणीने बांधलेले कथेचे एकसंध महावस्त्र .
'बखर' पासून 'उच्छाद' संपेतो २८ वर्षांचा कालावधी . यातल्या प्रमुख घटना आधी नोंदवून ठेवलेल्या . या तारखा इंग्रजी तारखा होत्या , त्यावेळच्या मराठी तिथ्यांची नोंद करता यावी म्हणून सर धुंडीराजशास्री दातेंकडे काही दिवस पंचांग शिकायला जात होते . जवळपास तीन दशकातली त्यांच्याकडची सर्व पंचांगं अभ्यासली , नोंदी केल्या .
तिन्ही कादंबऱ्यांत कायदेशीर कार्यवाहीचे - पोलिस आणि न्यायालयीन दोन्ही - तपशील आहेत . त्याची माहितीही सर अनेकांकडून घेत होते . काही पाने इंडियन पीनल कोडची त्याकाळातली कलमे , त्याअंतर्गत गुन्हे आणि होऊ शकणाऱ्या शिक्षा नोंदलेल्या आहेत .
सोलापूरचा मार्शल लॉ ही स्वातंत्र्यचळवळीतली तेजस्वी घटना . तिचे पडसाद कमी-अधिक संस्थानातही उमटले . ( डांगोरा'चा हाच काळ )याच काळात भगतसिंग आणि सहकाऱ्यांवर अटकेनंतर खटले चालू होते . जगातही काहीबाही घडत होते . या सगळ्यांचे तपशील मिळवण्यासाठी सोलापूरची त्यावेळच्या समाचार आणि कल्पतरू या दोन्ही वृत्तपत्रांचे या काळातले सर्व अंक , हिराचंद नेमचंद -दयानंद - संगमेश्वर अशा उपलब्ध ग्रंथातले संदर्भ , ते पुरे झाल्यावर भाचेजावई माधव मोहोळकर यांच्या मदतीने मुंबईचे एलफिस्टनचे ग्रंथालय , ब्रिटीश कौन्सिलचे ग्रंथालय ( इथून या काळातले बॉम्बे क्रॉनिकल व अन्य इंग्रजी वृत्तपत्रांचे अंक पाहिले , दोन वृत्तपत्रातले एकाच घटनेच्या बातम्यांच्या तपशीलातले फरक , मग अन्यत्र पाहून खरेखोटे करणे ) , वेगवेगळी गॅझेटियर्स अशा मिळतील तिथून , कळेल तिथून संदर्भ नोंदवणे , ते ताडून पाहणे . शेवटी शासनाच्या विधानमंडळातल्या ग्रंथालयात बसून केलेली सोलापूरच्या मार्शल लॉचे उमटलेले पडसाद , वेळोवेळी यासंदर्भात झालेली भाषणे यांचीही टिपणे आहेत .
कथेत अठरापगड जातीजमाती-धर्माचे लोक आहेत , राज्यातले शाहू , ज्योतिरावांसारखे महापुरूष ही अप्रत्यक्षरूपात आहेत , त्यांचे चित्रण तथ्यानुसार असावे म्हणूनही त्यांच्यावरील पुस्तके , संदर्भ नोंदलेत . य.दि.फडक्यांचे लठ्ठे चरित्र , ज्योतिरावांवरील हरी नरकेंचे पुस्तक यांतून केलेली टिपणे आहेत . संस्थानातले तपशीलही निव्वळ आठवणींवर वा कल्पनेपेक्षा तथ्यांवर आधारावेत यासाठी या काळातल्या मिळतील त्या वृत्तपत्रातल्या संस्थानिकांसंबधीच्या बातम्या कात्रणं काढून ठेवत वा नोंदी करत .
इतर अनेक क्षेत्रातल्या लोकांशीही सर बोलत . मिळालेले तपशील नोंदवत . उदा. तिन्हीत , विशेषतः उच्छाद ' मध्ये 'गांजेकस' या शब्दाचा वापर आहे . तर त्याचा नेमका अर्थ काय , वैद्यकीय परिभाषेत त्याने काय होते , तो ओळखावा कसा , लक्षणे कोणती ? यासंदर्भात एका चिठोऱ्यावर केलेली नोंद डायरीत टाचून ठेवली आहे .
या सगळ्या तपशीलांना अखेर वाट मिळाली ,९२ संपतासंपता , शारदीय चंद्रकळा'च्या प्रकाशनानंतर . ते पुरे झाले ९५ च्या १६ जूनला . आमच्या भेटीचा हा काळ . याकाळात अर्धेअधिक लिहून झाल्यावर त्यांची काहीशी दमछाक झाली . एक दिवस बोलावून म्हणाले ,' माझा थोडा गोंधळ होतोय . तपशील मागे आलेत का नाहीत लक्षात येत नाहीये . आलेत म्हणून गाळावे तर कदाचित राहून जाणार , घ्यावे तर कदाचित पुनरावृत्ती होणार .
आपण एकदा हे झालेले सलग वाचुया .' मग हुतात्मा स्मृती मंदिराच्या हिरवळीवर त्यांनी ते आम्हा काही लोकांसमोर सलग १५ दिवस वाचले . मग आत्मविश्वासाने पुरे केले . एफोर पेक्षा मोठ्या आकारातल्या बारीक अक्षरात गच्च भरलेल्या हजारांवर पानांच्या ४ फाईल्स . यानंतर बरोबर चार वर्षांनी २० जूनला आम्ही एकत्र जेवण घेऊन 'डांगोराचे प्रकाशन साजरे केले . त्याआधी १२ जूनला सरदेशमुखांनी मौजकडून आलेल्या गठ्ठ्यातली पहिली पर्यंत मला नाव घालून दिली .
हस्तलिखित पुरे झाले त्यादिवशी १६ जून ९५ यादिवशी सर हिरवळीवर येताना पेढे घेऊन आले होते .
Neeteen Vaidya

Tuesday, July 23, 2019

टिळक कोण होते?




आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. १ ऑगष्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतीशताब्धी वर्ष सुरू होत आहे.
लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही गौरवाची बाब होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तुरूंगवास भोगला. ते फार मोठे पत्रकार-संपादक-लेखक-विचारवंत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते एक प्रवर्तक मानले जातात. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांना मंडालेच्या तुरूंगात पाठवण्यात आले तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी बंद पाळला होता.

मात्र जहाल-मवाळ वाद, टिळक-आगरकर वाद, आधी सामाजिक की आधी राजकीय यावरचा वाद यांनी तसेच वेदोक्त व ताईमहाराज प्रकरण यातनं त्यांची प्रतिमा कट्टर सनातनी नेते अशी झाली. त्यांनीही ती आवर्जून जपली.

याविषयावरची " लोकमान्य व शाहू छत्रपती- य.दि.फडके," आणि "लोकमान्य ते महात्मा- सदानंद मोरे" ही पुस्तकं वाचनीय आहेत.

टिळक नेमके कोण होते? हा एक सार्वकालिक वादाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्या मृत्यूला शतक लोटत असताना तरी दुषित पुर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्याकडे निर्मळ मनाने बघता येईल का?

त्यांचा मुलगा श्रीधर हा सत्यशोधकांचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मित्र होता. त्याला सनातनी टिळक अनुयायांच्यामुळे आत्महत्त्या करावी लागली.

महर्षि वि.रा.शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यता निर्मुलन परिषदेत टिळकांनी जोरदार भाषण केले मात्र "मी माझ्या खाजगी जिवनात अस्पृश्यता पाळणार नाही" या प्रतिज्ञापत्रांवर त्यांनी सही केली नाही. त्यांचे हे अस्पृश्यता निर्मुलन परिषदेतले जहाल भाषण त्यांनी लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आणले मात्र केसरीत त्यातला एक शब्दही छापू नये अशा सुचना दिल्या.

महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही. अशावेळी महात्मा फुल्यांनी रातोरात रामशेट बापूशेट उरवणे ह्या सत्यशोधक समाजाच्या कोषाध्यक्षांमार्फत त्यावेळच्या दहा हजार रूपयांच्या जामिनाची व्यवस्था करवली. त्यावेळी सोन्याचा भाव एका तोळ्याला पंचवीस रूपये होता, तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आत्ताचे सव्वा कोटी रूपये होतात. हे रोख पैसे जोतीरावांनी रातोरात उभे केले.


ते तुरूंगातून सुटल्यावर त्यांचे जाहीर सत्कार फुल्यांनी घडवून आणले. त्यांना मानपत्रे दिली. हे सारेच टिळकांनी केसरीत ठळकपणे छापलेही, मात्र महात्मा फुले वारल्यावर त्यांच्या निधनाची एका ओळीचीही बातमी त्यांनी दिली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे समाजसुधारक गोपाळराव आगरकरांनीसुद्धा आपल्या सुधारकात महात्मा फुले गेल्याची बातमी दिली नाही.

ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात ठेवली. पुढे टिळक गेल्यावर मूकनायक मध्ये बाबासाहेबांनी अवघ्या एक ओळीची बातमी दिली. पुण्याचे टिळक गेले एव्हढेच बाबासाहेबांनी छापले. सनातनी पत्रकार भडकले. त्यावर "आम्हा बहुजनांच्या जिवनात टिळकांचे जेव्हढे स्थान होते तेव्हढी बातमी दिली. टिळकांनी तर फुल्यांची एव्हढीही बातमी दिली नव्हती." असा खुलासा त्यांनी केला.

मूकनायकची जाहीरात आम्ही छापणार नाही असे केसरीने  कळवले होते. ज्याकाळात केसरीत चप्पल आणि जोड्यांच्या जाहीराती छापून येत असत त्याकाळात मूकनायकची जाहीरात छापायला आमच्या पेपरमध्ये जागा नाही असे अहंमन्य उत्तर दिले गेले.

केसरी हा भारतातला सर्वात लोकप्रिय पेपर असल्याची जाहीरात वारंवार केली जाते. केसरीचा सर्वाधिक खप जेव्हा होता तेव्हा केसरीच्या तीन हजार प्रती छापल्या जात असत.

महात्मा गांधी टिळकांना फार मानत असत. टिळक वारले तेव्हा गांधीजींना त्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायचा होता.मात्र टिळकांच्या सनातनी अनुयायांनी त्यांस विरोध केला. कारण गांधीजी बनिया होते. ब्राह्मण नव्हते.

महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीचे श्रेय टिळक अनुयायांनी टिळकांना दिले. खरंतर फुल्यांनी पुण्यात शिवजयंती सर्वप्रथम सुरू केली. कामगार चळवळीचे जनक ना. मे.लोखंडे यांनी मुंबईत  ती पसरवली. त्याच्या बातम्या तेव्हाच्या दीनबंधूत अनेकदा आलेल्या आहेत. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी टिळकांनी ती आणखी मोठी केली. देशात अनेक ठिकाणी पोचवली.

टिळकांचे बहुतेक सर्व अनुयायी सनातनीच का होते? टिळकांचा बहुजनांना व स्त्रियांना शिक्षण द्यायला विरोध का होता? वेदोक्त प्रकरणात टिळक शाहूमहाराजांच्या विरोधात का वागले?

टिळकांनी आरक्षणाला का विरोध केला? टिळक जर अस्पृश्यता मानत नव्हते तर मग त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही का केली नाही? टिळकांनी आगरकर- न्या.रानडे- लोकहितवादी - गोखले या सार्‍या समाजसुधारकांना कायम विरोध केला.

सयाजीरावांनी पुण्यातला आपला गायकवाडवाडा टिळकांना दिला. मात्र पुढेमागे ब्रिटीशांचा जाच होऊ नये म्हणून खरेदीखताने तो दिल्याचे दाखवले. टिळकांच्या आत्ताच्या वंशजांनी काही वर्षांपुर्वी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव पुसून त्याचा केसरीवाडा केला.


प्रश्न अनेक आहेत.

- प्रा. हरी नरके, २३ जुलै २०१९

Saturday, July 13, 2019

उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथेचे ५० भाग पुर्ण होणार



आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर दशमी क्रिएशनचे सन्मित्र नितीन वैद्य यांनी मालिका करायचे ठरवले तेव्हा एकीकडे आनंद झाला होता तर दुसरीकडे जबाबदारीच्या, जोखमीच्या जाणीवेने ताणही आला होता. ज्याअर्थी आजवर हिंदी, मराठी, इंग्रजी अथवा कोणत्याही भारतीय भाषेत या विषयावर मालिका झालेली नाही त्या अर्थी हे काम अतिशय अवघड असणार यात शंका नाही. अनेक बायोपिक मालिका लोकप्रिय होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका करण्याची हिम्मत आजवर कोणीही केलेली नाही.

नितीनसरांची माझी मैत्री नामांतर आंदोलनापासूनची. ४० वर्षांपुर्वी जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा ठराव महाराष्ट्र विधान सभेने एकमताने केला तेव्हा त्याला मराठवाड्यात प्रचंड हिंसक विरोध करण्यात आला. गोरगरिबांची घरं जाळण्यात आली. अन्याय अत्त्याचाराचा आगडोंब उसळला. त्याच्या निषेधात पुणे-मुंबई शहरांमध्ये झालेल्या आंदोलनात अनेक मध्यमवर्गीय शाळकरी तरूण उतरले. नितीन वैद्य, सुनिल तांबे, प्रतिमा जोशी, ज्योती नारकर, सविता कुरतडकर आणि इतर अनेकांशी या आंदोलनातून माझी दोस्ती जुळली.
नितीनसर पुढे म.टा. मध्ये काम करीत होते. त्यांची दिल्ली वार्तापत्रे प्रचंड गाजली.

१९९० च्या दशकात भारतात खाजगी वाहिन्या सुरू झाल्या. प्रिंट मिडीयामधून नितीनसर इलेक्ट्रॉनिक माध्यमात गेले. स्वत:च्या कर्तबगारीवर नितीनसर झी वाहिनीच्या सर्वोच्च पदावर पोचले. झी मराठी वाहिनी सुरू झाल्यावर तिला नितीनसरांनी नावारूपाला आणले.
पुढे स्टार इंडीयाच्या अनेक महत्वपुर्ण पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले.

नंतर नितीनसरांनी दशमी क्रिएशनची स्थापना केली. दशमी नावारूपाला आली. त्यांची "कमला" सारखी मालिका खूप गाजली. "मुरांबा" हा चित्रपट यशस्वी झाला.

सामाजिक जाणीव असणार्‍या नितीनसरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मालिका बनवायचे ठरवणे महत्वाचे. स्टार प्रवाह या मोठ्या वाहिनीने रात्री ९ ते ९:३० हा सर्वाधिक महत्वाचा प्राईम टाईम या मालिकेला दिला. मालिकेचे २०० एपिसोड बनवण्याचा निर्णय झाला. स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे, अभिजीत प्रकाश खाडे, Abhijeet Prakash Khade नरेंद्र मुधोळकर Narendra Mudholkar यांचा पुढाकार आणि पाठींबा मोलाचा ठरला.

आणि टीम स्टार प्रवाहसोबत टीम दशमी कामाला लागली. पडद्यावर दिसणारे कलाकार, पडद्यामागे काम करणारे लोक आणि लेखन प्रक्रियेत असलेले लोक असे सुमारे १०० जण एकत्र आले. प्रत्यक्ष शुटींगमध्ये गुंतलेले, पडद्यामागे काम करणारे, त्या सर्वांसाठी राबणारे आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये गुंतलेल्या मंडळींचे असे एकुण २०० हात दररोज काम करतात. ते दररोज किमान १६ तास काम करतात तेव्हा तुम्हाला एक एपिसोड बघता येतो. मालिका सुरू होण्याच्या किमान सहा महिने आधीपासून शोध, संशोधन आणि लेखनकार्य सुरू झालेले होते. प्रत्यक्ष शुटींगही २ महिने आधीपासून चालू झालेले होते. ही मालिका जरी मुळात महान इतिहासकार चां.भ. खैरमोडे यांच्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित असली तरी या मालिकेसाठी आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी आदी भाषांमधील किमान आठशे पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे. सत्यकथनावर आमचा भर आहे.


आणि १८ मेपासून मालिका सुरू झाली.

दशमी क्रिएशनने अपर्णा पाडगावकर आणि शिल्पा कांबळे यांच्यावर पटकथेची तर चिन्मय केळकर यांच्यावर संवादलेखनाची जबाबदारी सोपवली. अजय मयेकरांसारखा कल्पक दिग्दर्शक, निनाद वैद्य, अक्षय पाटील, दादा गोडकर यांच्यासारखी सदैव उत्साहानं काम करणारी मंडळी मालिकेची निर्मिती प्रक्रिया सांभाळू लागली. सागर देशमुख, मिलिंद अधिकारी, शिवानी रांगोळे, चिन्मयी सुमित, अमृत गायकवाड, श्रीहरी अभ्यंकर, पूजा नायक आणि इतर अनेकांच्या भुमिका गाजल्या.

बाबासाहेबांचे कार्य अनेकांना माहित असले तरी त्यांची बालपणीची जडणघडण कशी झाली याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. त्यांची ज्ञानार्जनाची तहानभूक वाढवण्यात त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचा किती मोठा वाटा होता हे या मालिकेतून प्रथमच लोकांना कळले.

आज कोट्यावधी लोक ही मालिका बघतात. एरवी कधीही टिव्ही न बघणारे अनेकजण या मालिकेमुळे टिव्ही बघू लागले. कित्येकांची अभ्यास न करणारी लहान मुलं मालिकेतल्या भिवाकडे बघून अभ्यास करू लागल्याचे त्यांनी कळवले. अनेक बालमंडळी नेहमी कार्टून बघतात.चित्रपट आणि क्रिकेटमध्ये रमतात. मात्र वर्ल्ड कपचा हंगाम चालू असतानाही या मालिकेची प्रेक्षकसंख्या सतत वाढती राहिली.

परवा मालिकेत भिवाच्या तोंडी नेपोलियनचा उल्लेख येताच काही मुलांनी आपापल्या घरातली नेपोलियनची चरित्रं शोधून वाचायला घेतली.

ही मालिका लोकप्रिय करण्यात तिची साधकबाधक चर्चा करणारांचा वाटा खूप मोठा आहे. या मालिकेच्या निर्मितीमागे जसा बाबासाहेबांचे कार्य सर्व जातीधर्माच्या कोट्यावधी भारतीयांच्या घराघरात पोचवण्याचा उद्देश आहे, तसाच यानिमित्ताने युवापिढीला वाचन, चर्चा, चिंतन, प्रबोधन याकडे वळवण्याचाही उद्देश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फेसबुक पेज, सन्मित्र वैभव छाया आणि टिमला खूपखूप धन्यवाद.

चिकित्सक बना, योद्धा बना, योद्धा कसा तयार होतो ते समजुन घ्या, पालक असाल तर सुभेदार रामजी बना, विद्यार्थी असाल तर भिवा बना हा संदेश या मालिकेतून घरोघरी पोचतोय याचा चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मला विशेष आनंद वाटतो.

कोणतेही पुस्तक कितीही लोकप्रिय असले तरी, कोणाही वक्त्याचे भाषण कितीही मोलाचे असले तरी कोट्यावधी लोकांपर्यंत अवघ्या ५० दिवसात पोचत नाही. ही ताकद फक्त फिक्शनमध्ये आहे. एरवी मालिकांकडे ढुंकूनही न बघणारे सामाजिक चळवळवाले मित्र कोट्यावधी लोकांच्या हृदयात पोचलेल्या या मालिकांच्या जगाचा कधीतरी गंभीरपणे विचार करतील अशी आशा करूयात. ही दररोज दाखवली जाणारी मालिका आहे. तिला अनेक मर्यादा आहेत.

हा अनुबोधपट [ डॉक्युमेंटरी नाही ]

हा कोरड्या इतिहासाचा निरस संदर्भग्रंथ नाही.

तरिही पुढची किमान शंभर वर्षे मालिकेचा हा दस्तऎवज पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.

बाबासाहेबांचे या देशावर, प्रत्येक भारतीयावर आणि विशेषत: आमच्यासारख्यांवर खूपखूप उपकार आहेत. त्यातून उतराई होणे शक्य नाही.

मात्र या मालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब अनेकांच्या काळजाला भिडत असल्याचा आनंद अपार आहे.

येणारा काळ बाबासाहेबांचा असेल. जय भीम.








- प्रा.हरी नरके, १३ जुलै २०१९

Thursday, July 11, 2019

महाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा होऊ शकतो?



तमीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गांना ती ती राज्यभाषा शिकवणे कायद्याने सक्तीचे करून आता जमाना उलटला आहे. ह्या कायद्यांना आजवर कोणीही न्यायालयात आव्हान दिलेले नाही. त्यांची काटेकोर अंमलबजावणी चालू आहे. मग महाराष्ट्रातच असा कायदा का नको?

महाराष्ट्रात २००९ साली मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करणारा शासनादेश काढला गेला. गुजराती, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषक मंडळींनी त्या शासनादेशाला केराची टोपली दाखवली. काही मंडळी त्या शासनादेशाविरूद्ध न्यायालयात गेली. पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. मात्र सर्व न्यायालयांमध्ये ते हरले. मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठीची अशी सक्ती करणे हे योग्यच असल्याचा निकाल दिला.

तरिही काही बोर्डांच्या व काही माध्यमांच्या शाळांचा मराठी द्वेष चालूच राहिला.

माजुर्डेपणाचा कळस म्हणजे काही शाळांनी तर शाळेच्या मैदानावर दोन मराठी विद्यार्थी आपसात खाजगीत मराठीत बोलल्याबद्दल त्यांना अमाणूष शिक्षा केल्या. त्यात काहींचे जीवही गेले. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? पण अनेक शाळांनी तसे नियम केलेले आहेत. मराठी बोलणाराला तुच्छ लेखले जाते, त्यांचा द्वेश केला जातो, त्यांना शिक्षा आणि दंड केला जातो, हे तुम्हाला योग्य आहे असे वाटते काय ?

आम्ही सर्वच भाषांचा आदर करतो. ज्यांना कोणाला इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, सिंधी, उर्दू,बंगाली अशा कोणत्याही भाषेच्या माध्यमातून कोणत्याही बोर्डाच्या शाळेतून शिकायचे वा बोलायचे /लिहायचे असेल त्यांना आम्ही अडवत नाही.

कारण आमचा इतर कोणत्याही भाषेला विरोध नाही.

इंग्रजी ही आज संपर्काची, रोजीरोटीची, प्रतिष्ठेची भाषा बनलेली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच आम्ही २० वर्षांपुर्वी मराठी माध्यमाच्या सर्व शाळांना इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था केली.
ज्यांना कोणाला आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचे असेल त्यांना आम्ही विरोध करीत नाही.
मात्र महाराष्ट्रातच मराठीवर बंदी घातलेली आम्ही खपवून घेणार नाही. सर्व शाळांनी हव्या त्या भाषा शिकवाव्यात, मात्र या राज्याची संपर्कभाषा मुलामुलींना आली पाहिजे म्हणून एक विषय म्हणून मराठी भाषाही शिकवावी एव्हढेच आमचे म्हणणे आहे.

जर शासकीय आदेश पाळला जाणार नसेल तर त्यांना दंड करण्याची /त्यांच्या शाळांची मान्यता काढून घेण्याची तरतूद करणारा कायदा हा मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आवश्यक आहे.

तुमचे मत कॉमेंटमध्ये अवश्य लिहा. त्याची दखल घेऊन या कायद्याच्या मसुद्यात आवश्यकता भासल्यास तशी दुरूस्ती केली जाईल.

-प्रा.हरी नरके, ११जुलै २०१९

मराठीची सक्ती का?

Wednesday, July 10, 2019

महाराष्ट्र में धूम मचा रहा है बाबासाहब आंबेडकर का सीरियल






बाबासाहब आंबेडकर के जीवन पर `डा.बाबासाहब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा' (डा.बाबासाहब आंबेडकर महामानव की जीवनगाथा) बुद्ध पूर्मिमा 18 मई से शुरू हुआ सीरियल मराठी में धूम मचा रहा है.
हिन्दी सिनेमा में आजकल बायोपिक की धूम मची हुई है. टीवी पर जीवनगाथाओं पर सीरियल बन रहे हैं. मगर संविधान निर्माता और देश के दलित आंदोलन के प्रेरणास्रोत और सूत्रधार डा.आंबेडकर पर न कभी कोई फिल्म नजर आई न सीरियल. इस कमी को स्टार टीवी के मराठी चैनल स्टारप्रवाह ने पूरा किया है. डा. बाबासाहब आंबेडकर के जीवन पर `डा.बाबासाहब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ (डा.बाबासाहब आंबेडकर महामानव की जीवनगाथा) बुद्ध पूर्मिमा 18 मई से शुरू हुआ सीरियल मराठी में धूम मचा रहा है. रोजाना रात नौ बजे शुरू होने वाले इस सीरियल का टाइटल सांग लोगों को झकझोरे बिना नहीं रहता. मराठी के जाने माने संगीतकार और गायक आदर्श शिंदे द्वारा गाए गए इस गीत के बोल इस प्रकार हैं –
क्रांति सूर्य तू शिल्पकार तू
बोधिसत्व तू  मूकनायका
मोडल्या रूढी त्या परंपरा दीव्यतेजा
तुम क्रातिसूर्य तुम शिल्पकार
हे मूकनायक तुम वोधिसत्व हो
दिव्यतेज से सडी गली रूढियों को तोड़ा
तूच सकल न्याय दायका
जीवन तूझे आम्हास प्रेरणा
दाही दिशा तूझीच गर्जना
तुमने संपूर्ण न्याय दिया
तुम्हारा जीवन हमारी प्रेरणा
दसों दिशाओं में तेरी गर्जना

यह शीर्षक गीत लोगों की जुबान पर है .दशमी फिल्मस द्वारा बनाए गए इस सीरियल की खासियत यह है एक कमर्शियल चैनल इसे प्रसारित कर रहा है और शोध ,लेखन और निर्माण की दृष्टि से आकर्षक है.
भारत के संविधान के निर्माता और दलितों के अधिकार के लिए संघर्ष करनेवाले डा. बाबासाहब आंबेडकर का जीवन भारतीय इतिहास का महान पर्व है. इतिहास के इन स्वर्णिम पृष्ठों को आप एक बार फिर स्टार प्रबवाह पर देख सकेंगे. बाबासाहब केवल दलितों के मसीहा ही नहीं थे वरन. राजनीतिक,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकऔर कानून के क्षेत्र में महत्वपूर्ण भूमिका निभानेवाले नेता भी थे. उन्होंने अपने कुशल नेतृत्व और ओजस्वी वक्तृत्व से इन क्षेत्रों को प्रकाशित किया. दलितों के अंधकारमय जीवन में नई आशा का संचार किया.
इस सीरियल का निर्माण दशमी क्रिएशन नामक संस्था ने किया है और इसके निर्देशक अजय मयेकर हैं. स्टार प्रवाह चैनल के कंटेट हेड और फिल्म निर्देशक सतीश राजवाडे कहते हैं. एक व्यक्ति जिसके प्रति कृतज्ञ होकर लाखों लोग मुंबई की चैत्य भूमि और नागपुर की दीक्षाभूमि में इकट्ठा होते है और कहते हैं कि हमारी जीविका और जीने पर केवल बाबा साहब का अधिकार है. तब सोचिए कि उस व्यक्ति का प्रभाव कितना व्यापक है. आज भी किसी से पूछिए तो लोगों को उनके संविधान निर्माता होने से ज्यादा उनके बारे में लोगों को जानकारी नहीं है. उनके संघर्ष, उनके जीवन के चढ़ाव उतार उनका त्याग और उनके द्वारा सारे देश के लिए किया गया कार्य इतना बड़ा है. उसके बारे में जानकारी सारे देश के लोगों तक पहुंचे यही हमारी कोशिश है. दशमी क्रिएशन्स की प्रतिनिधि अपर्णा पाडगांवकर कहती हैं उन्हें केवल पिछड़ों का नेता भर माना जाता है. यह हमारा अज्ञान है. गर्भवती महिलाओं के तीन महीने की अधिकृत छुट्टी. आठ घंटे की शिफ्ट, बहुपत्नी प्रतिबंधक कानून आदि विविध नारी अधिकार और मजदूर अधिकार के कानूनों में उनका महत्वपूर्म योगदान है. यह बात सब तक पहुंचनी चाहिए. मैं मानती हूं कि एक महिला के रूप में उनके मुझ पर बहुत उपकार हैं. उसी ऋण से उऋण होने की यह छोटी सी कोशिश है.

यह सीरियल लोकप्रिय होने के साथ-साथ काफी चर्चित भी है. एक चैनल पर बाबा साहब आंबेडकर के पोते प्रकाश आंबेडकर पत्रकारों से बातचीत कर रहे थे, जिसमें पत्रकारों ने बहुत से सवाल सीरियल के बारे में ही पूछे. इस सीरियल में बाबा साहब की भूमिका सागर देशमुख निभा रहे हैं. उन्होंने मराठी के जाने-माने लेखक पुल देशपांडे पर बनी दो बायोपिक फिल्मों में अभिनय कर सराहना हासिल की है. बाबासाहब की पत्नी रमाबाई की भूमिका में नजर आंएगी शिवानी रांगोले. बालक बाबा साहब की भूमिका अमृत गायकवाड अदा कर रहे हैं, जिनके अभिनय को बहुत पसंद किया जा रहा है. तो पिता रामजी सुभेदार भूमिका  मिलिंद अधिकारी निभा रहे हैं.

सीरियल में अब तक के एपिसोड में कहानी बाबा साहब के परिवार के 1904 में मुबई में जा बसने तक पहुंची है. इससे पहले वे महाराष्ट्र के सातारा जिले में रहते थे. जहां जातीय भेदभाव अपने चरम पर था. बाबासाहब के पिता रामजी अपने दोनों बेटों भीमराव और आनंदराज के पढ़ाई को लेकर बहुत सजग थे. वे अपने दोनों बेटों को स्कूल में भर्ती कराने ले जाते है शिक्षक तैयार हो जाता है मगर कहते कि बच्चों को कल से भेजे. वजह पूछने पर शिक्षक कहता है कि उनके बेटों के लिए बैठने का अलग इंतजाम करना पड़ेगा. उनके बेटों को सबके साथ फर्श पर बिठाने पर बाकी बच्चे एतराज करेंगे. इस पर बाबा साहब के पिता अपने साथ लाए अंगोछे को दो टुकडों मे फाड़ते हैं और जमीन पर बिछा देते है और कहते हैं कि बच्चों की पढ़ाई आज से ही शुरू की जाए. बाबा साहब की बचपन से ही खासियत यह थी कि वे पढ़ाकू थे और विद्रोही भी वे बचपन में मां-बाप से पूछते है कि क्या ध्रूवतारा आज भी दिखाई देता है. तो वे उन्हे ध्रूव तारा दिखाते है. इस पर बाबा साहब कहते है कि वे खूब पढ़ेगे और ध्रुवतारे की तरह अपना अलग स्थान बनाएंगे.

भेदभाव उन्हें हमेशा सताता था. पानी पिलाने से पुण्य मिलता है मानने वाले अन्य जाति के लोग. दलित या महारों को पानी तक नहीं पिलाते थे. इस पर बाबा साहब की बहुत तीखी प्रतिक्रिया होती थी कि वे जानवरों को पानी पिला देते हैं पर हमें पानी नहीं पिलाते, क्योंकि उन्हें लगता है कि इससे उनका धर्म भ्रष्ट हो जाएगा. यहां तक कि भेदभाव व्यापार तक में हावी था. बाबा साहब की बहन की शादी में परिवार साड़ी खरीदने जाता है दुकानदार पैसे लेता है पर उस पर गंगाजल छिड़कने के बाद और साड़ी हाथ में नहीं देता सड़क पर कीचड़ में फेंक देता है. जिस पर बालक भीम भी तीखी प्रतिक्रिया प्रगट करता है.

आम दलित का जीना कितना दूभर था कि भीम को अपने पिता से मिलने गोरेगांव जाना था. अव्वल तो कोई गाड़ी वाला तैयार नहीं हुआ. बड़ी मुश्किल से एक तैयार हुआ पर दोगुने पैसे लेकर. उस पर भी उसकी शर्त थी भीम और उसके भाई गाड़ी से दस कदम दूरी पर चलेंगे वह भी अपना सामान लेकर. इस सफर में बच्चों को पानी तक नहीं मिला. क्योंकि कोई दलितों के बच्चों को पानी कर नहीं पिलाता था.

जातिभेद के कारण पड़ोसियों के साथ मारपीट की घटनाएं तो आम बात थी. ऐसे में भी बाबा साहब ने पढ़ाई लिखाई पर अपना ध्यान केंद्रीत किया. अच्छे नंबरों से पास हुए, जबकि उनका ब्राह्मण मित्र परीक्षा पास भी नहीं कर पाया. सातारा के जातीय भेदभाव के माहौल से अजीज आकर बाबा साहब के पिता ने तय किया कि वे मुंबई में जाकर बसेंगे. मुंबई ने बाबा साहब को आत्मविश्वास दिया ,अपनापन दिया. जातिवाद का दंश वहां कम था. गांव में अन्य जातियों के बच्चे भीम और उसके भाई के साथ खेलना पसंद नहीं करते थे. मुंबई में बच्चे उन्हें घर आकर बुलाकर ले जाते. तभी तो बाद में बाबा साहब ने दलितों से आव्हान किया किया था कि उनके पास तो जमीने नहीं हैं. इसलिए जातिवाद के अड्डे गांवों को छोड़कर शहरों में जाकर बसें. उसके बाद से महाराष्ट्र में गांवों में बहुत कम दलित रह गए हैं. उन्होंने शहरों में रहकर काफी तरक्की भी की है.

बाबा साहब ने मां को बचपन में ही खो दिया था. मां की कमी वह हमेशा महसूस करते थे. उनके पिता ने दूसरी शादी करने का फैसला किया मगर भीम को दूसरी मां का आना नहीं सुहाया, उन्हें लगता था कि कोई उसकी मां की जगह नहीं ले सकता. पिता का उनके जीवन पर अमिट प्रभाव था. उनके पिता की इच्छा थी कि भीम पढ़ लिख कर बड़ा बने, जिसके लिए उन्होंने उनकी पढ़ाई पर काफी ध्यान दिया. परिवार को जातीय भेदभाव से बचाने के लिए सरनेम सकपाल से बदल कर आंबेडकर किया. मुंबई में आने के बाद तो वे भीम के होमवर्क पर भी नजर रखते थे. जब उन्होंने देखा कि भीम का होमवर्क ठीक तरीके से जांचा नहीं जाता तो उन्होंने उसका बेहतर स्कूल में भर्ती कराया.

मुंबई में जातीय का दंश इतना तीखा नहीं था, मगर था तो सही जब वहां बाकी छात्रों को पता चलता है कि वह दलित है तो वे उससे कट जाते है. स्कूल में मास्टरजी सबसे एक सवाल पूछते है जिसका जवाब बाकी छात्र नहीं दे. पाते मगर भीम देता है. तो मास्टरजी कहते है तुमने अछूत होकर भी इतनी पढ़ाई की है. वह बाकी बच्चों से कहते है भीम अछूत होकर भी आपसे पढ़ने में आगे है.

इस सीरियल की खासियत यह है शोधकार्य पर पूरा ध्यान दिया गया है. पटकथा और संवाद भी चुस्त है. हर पात्र को बहुत सोचसमझकर चुना गया है. इसलिए वह कालखंड आंखों के सामने है. पूरी तरह से उभर कर ता है.
निर्माण और लेखन के मूल्यों पर यह सीरियल इतना दमदार है कि मराठी में धूम मचा रहा है. बार-बार लगता है कि इसे हिन्दी में से डब किया जाना चाहिए ताकि डा, आंबेडकर की गौरवगाथा हिन्दीभाषियों तक भी पहुंच सके.
(लेखक दैनिक जनसत्ता मुंबई में समाचार संपादक और दिल्ली जनसत्ता में डिप्टी ब्यूरो चीफ रह चुके हैं. पुस्तक आईएसआईएस और इस्लाम में सिविल वॉर के लेखक भी हैं )

सतीश पेडणेकर Updated: 10 July, 2019 4:27 am IST

https://hindi.theprint.in/opinion/babasaheb-ambedkars-serial-is-running-in-maharashtra-on-star-pravah/73263/

Tuesday, July 9, 2019

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची उपेक्षा का?






दररोज एका नवीन डूडलच्या माध्यमातून लोकांचा सन्मान करणाऱ्या गुगलनं १ जुलै २०१८ च्या बुधवारी मराठी मनाला एक सुखद धक्का दिला. ते होतं डॉक्टर्स डेचं डूडल रखमाबाई (सावे) राऊत यांच्या सन्मानार्थ. कोण होत्या रखमाबाई? आणि त्यांच कार्य काय होते?
गुगलनं रखमाबाईंवर डूडल बनवलं आणि अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. त्या भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
१८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.
 त्याकाळी त्यांनी नवऱ्याकडे जायला नाही म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती.
त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.
त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन राऊत हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.
तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.
बालविवाहाविरुद्ध लढा
रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.
ब्रिटीश न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या विरूद्ध निकाल दिला. त्यावर त्या तुरूंगात जायला तयार झाल्या. लंडनमध्ये महिलांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांनी निधी जमवून रखमाबाईंच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. शेवटी दादाजी भिकाजी यांनी पैसे देऊन कोर्टाबाहेर तडजोड करण्यात आली.
या निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.
रखमाबाईंनी  'द हिंदू लेडी' या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले.
एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. परत आल्यावर त्यांनी मुंबईचे कामा हास्पीटल, तसेच सुरत आणि राजकोटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्यभर काम केले. वयाच्या नव्वदीतही त्या रूग्णसेवा करीत राहिल्या.
तरीही उपेक्षा?
असं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही?
तसं पाहिलं तर स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं.
दोन्ही चळवळींमध्ये मोठमोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं.
रखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं का?
अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंवर चित्रपट बनवला आहे. महादेवन सांगतात, "मुळात आपल्याकडे पुरुषांनाच हिरो बनवायची पद्धत आहे. त्यांचाच उदोउदो करा. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून पटकथा रचल्या जातात. त्यामुळे स्त्रियांचं काम मागे पडतं. त्यांना इतिहासात अनुल्लेखानं मारलं जातं."
"म्हणूनच मी त्यांच्या कामावर, त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. रखमाबाई या पहिल्या स्त्री बंडखोर होत्या. नवऱ्याला सोडण्यासाठी कोर्टात गेलेली पहिली भारतीय बाई असेल ती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो खूप प्रेरणादायी आहे," असं अनंत महादेवन म्हणाले.
पण आजही कित्येक जणांना रखमाबाईंच्या कार्याविषयी माहिती नाही हे आपलं दुर्दैव आहे, असं महादेवन यांना वाटतं.
"मी चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप लोकांना विचारलं की, तुम्हाला माहिती आहे भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? उत्तर आलं, आनंदीबाई जोशी. तेव्हा खूप वाईट वाटलं."
"आनंदीबाईंचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्या प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. त्यांना अकाली मरण आलं. हा मान खऱ्या अर्थानं रखमाबाईंकडे जातो."
- अनघा पाठक, बीबीसी मराठी, या लेखाचा सारांश
https://www.bbc.com/marathi/india-42076214?SThisFB&fbclid=IwAR2fUS_w_skX0FwiTUFy-nfipy6PmIi7ngPFtxCX5MV3B7bS2WNrJrxYtU0
बीबीसी मराठी Related Topics जीवन इतिहास भारत महिला हक्क महिला १ जुलै २०१९ 

Sunday, July 7, 2019

दुसर्‍या जागतिक सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षपद एका भारतीयाने, मराठी माणसाने भुषवले होते - प्रा.हरी नरके










स्वामी विवेकानंदांचे ११ ते १६ सप्टेंबर १८९३ च्या शिकागोच्या पहिल्या जागतिक सर्व धर्म परिषदेतले भाषण खूप गाजले. विवेकानंद निधी उभारणीसाठी अमेरिकेत गेले असताना एका मिशनर्‍याने त्यांना परिषदेत सहभागी व्हायला सुचवले. पण विवेकानंद गाढे विद्वान असूनही त्यांच्या जातीमुळे एकाही शंकराचार्यांनी त्यांना तशी परवानगी दिली नाही. शेवटी बौद्ध प्रतिनिधी अनागरिक धम्मपाल व जैन प्रतिनिधी विरचंद गांधी यांच्या शिफारसीमुळे विवेकानंदांना बोलण्याची परवानगी मिळाली. त्यांचे भाषण गाजल्यावर मात्र ज्यांनी आधी परवानगी नाकारली होती तेच त्याचे श्रेय घेऊ लागले. त्याचे सोहळे करू लागले.

दुसरी जागतिक सर्व धर्म परिषद १९३३ साली अमेरिकेत शिकागोला झाली होती. तिचे अध्यक्षपद एका भारतीयाने भुषवले होते. एका मराठी माणसाला मिळालेला हा बहुमान आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय असायला हवा.

१९३३ च्या या अध्यक्षांचे भाषण जगभर गाजले.

हे भाषण प्रकाशित झालेले असून ते आता उपलब्ध आहे.

या परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हर्बट हुअर. या परिषदेला जगातीला ११ धर्मांचे ५० देशातील विद्वान उपस्थित होते. या परिषदेला जगभरातून एकुण २६००० प्रतिनिधी आलेले होते.

"जगातील सर्व धर्मांच्या मुळाशी मानवता आणि बंधुभाव ही मूल्ये असल्याचे प्रतिपादन अध्यक्षांनी केले होते."
ते अध्यक्ष होते बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड.

[ पाहा- महाराजा सयाजीराव: गौरवगाथा युगपुरूषाची, संपा. बाबा भांड, उच्च शिक्षण विभाग, महा. शासन, २०१७, पृ.६३/६४]

मात्र हा इतिहास फारसा सांगितला जात नाही. मग साजरा कोठून होणार?
त्यानिमित्ताने https://en.wikipedia.org/wiki/Parliament_of_the_World%27s_Religions या संबंधित वेबसाईटवर शोध घेतला असता १९३३ ला भरलेल्या या दुसर्‍या परिषदेची माहिती आढळली नाही.

- प्रा.हरी नरके, ०७ जुलै २०१९

Saturday, July 6, 2019

पुस्तकं महाग करून मोदी सरकारने लावला वाचन संस्कृतीला हातभार





परदेशातून येणार्‍या पुस्तकांवर मोदी सरकारने ५ टक्के सीमाशुल्क लागू केले आहे. त्यामुळे यापुर्वी २ किंवा तीन हजार रूपयांना मिळणारे पुस्तक शंभर ते दीडशे रूपयांनी आता महाग होईल. त्यामुळे पुस्तक खरेदीत वाढ होईल. वाचन संस्कृतीचा विकास होईल. आजवर न वाचणारे, ग्रंथ खरेदी न करणारे तमाम भारतीय प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकत घेऊ लागतील. महारष्ट्रासारख्या अतिप्रगत राज्यात ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये वैचारिक-साहित्यविषयक पुस्तकांचे एकही  दुकान नाही. १६ महानगरपालिका क्षेत्रात असे ग्रंथ मिळण्याची सोयच नाही. आता आहेत तीही दुकाने बंद होतील.
या मेहरबानीबद्दल पंप्र, "ग्रंथप्रेमी" नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री, "वाचन विरांगना" निर्मला सितारामन यांना धन्यवाद.
नाहीतरी पुस्तकं वाचणारे लोक डेंजरस असतात. ते विचार करतात. प्रश्न विचारतात. देशाला निबुद्धीकरणाची लस टोचायची असेल तर याहून जालीम उपाय करायला हवा. ५ टक्क्यांवरून हे सीमाशुल्क किमान ५०० टक्क्यांएव्हढे वाढवणे गरजेचे आहे. आदेशसंस्कृतीला वाचन संस्कृती बाधक असल्याने तिच्यावर खरं म्हणजे कडक कायदे करून बंदीच आणायला हवी. पुस्तकांना जीएसटीही लावा. प्रकाशकांकडून २०० टक्के अबकारी कर घ्या. पुस्तकविक्री केंद्रांवर बंदी घाला. यापुढे ज्यांच्या घरात पुस्तकं सापडतील त्यांना देशातून थेट तडीपारच करा.
- प्रा.हरी नरके, ६ जुलै २०१९

हाकारा- सीमारेषांना प्रश्नांकित करणारं ‘तृतीय रत्न’-






हल्लीच्या ‘कसे आहात?’, ‘मजेत!’ अशा आनंदी चेहेऱ्याच्या संभाषिताच्या काळवेळात, बंधनं आणि सीमारेषांचे अर्थही हलकेफुलके लागतात. त्यात हळूच काहीतरी करून नामानिराळे राहण्याची मजा दडलेली असते. “खरंतर तसं चालत नसतं, पण आम्ही केलं”, या प्रकारचा आनंद लपलेला असतो. वैयक्तिक आयुष्यात लहानमोठ्या सीमारेषांना उल्लंघण्याची मजा अनेकजणांनी कधी उघड तर कधी गुपचूप अनुभवलेली असते. तो अनुभव गंमतीखातर असेल किंवा पोळून काढणारा असेल, पण त्या सीमारेषा कुणी आखलेल्या असतात, का आखलेल्या असतात, आणि कुणासाठी आखलेल्या असतात? वैयक्तिक वाटल्या तरी खरंच वैयक्तिक असतात का? सांस्कृतिक वाटल्या तरी राजकीय अर्थाच्या असतात का? त्यात कसलं सामाजिक सत्ताकारण दडलेलं असतं? या प्रश्नांचा उहापोह करण्याच्या नादी कुणी लागत नाही. बारकाईने पाहिलं तर सीमारेषा परस्परांना जोडलेल्या असतात. त्या ओलांडण्याची कृती धाडसी असतेच पण एक नवी ओळख प्रदान करते. जीवनात एक सीमारेषा धुडकावून लावली की इतर अनेक सीमारेषांना न जुमानण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते, याचंही भान अनेकांना असतंच असं नाही. सीमारेषा, हद्द, बंधन, लक्ष्मणरेखा काहीही नाव दिलं, आणि कोणत्याही बाबतीत उल्लंघन असलं तरी वैयक्तिक अनुभव प्रातिनिधिक रूपात सार्वजनिक म्हणून बघता येतो. व्यष्टीचा संबंध समष्टीशी पोचतोच.

एका व्यापक नजरेनं पाहिलं तर इतिहासाला कूस बदलायला लावणारी काही धाडसी व्यक्तींची महान कृत्ये सीमारेषा ओलांडण्याशी संबंधित असल्याचं दिसतं. ज्यांच्या निर्णयांना आणि कृतींना आपण आजही मार्गदर्शक मानतो, अशा विविध क्षेत्रांतील सन्माननीय व्यक्तींची मूळ ओळख ‘बंधनं झुगारणाऱ्या आणि त्याची पडेल ती किंमत मोजणाऱ्या व्यक्ती’ अशी जाणवते. महात्मा जोतीराव फुले (१८२७-१८९०) यांच्यासारख्या एकोणिसाव्या शतकातल्या ब्रिटीश आमदनीतल्या क्रांतीच्या उद्गात्यांच्या संदर्भात तर वेगवेगळ्या सीमारेषा उल्लंघणं हे त्यांच्या आधुनिकतेचं लक्षण ठरतं. त्यांनी केलेली धर्म चिकित्सा, स्त्रीवादी लिखाणाचं प्रकाशन, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक विषमतेची पोलखोल, खुले केलेले पाणी साठे, विधवा केशवपनाला केलेला विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, या आणि अशा अन्य अनेक कृतींमधून कित्येक दमनकारी लक्ष्मणरेषांना त्यांनी ओलांडलं. कष्टकरी जनतेच्या दृष्टीनं अन्यायकारक असं सर्वकाही ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ या बाण्यानं उलथून टाकणं आणि जीवनमान सुधारणाऱ्या नव्या गोष्टींना अंगिकारणं हा त्यांच्या दृष्टीने आधुनिकतेचा अर्थ होता. प्रभुत्ववादी वर्गाने पूर्वापार चालत आलेल्या रिवाजरूपी हद्दींना, किंवा घालून दिलेल्या सामाजिक लक्ष्मणरेषांना ओलांडून, विषमतेच्या इतिहासाशी पक्की काडीमोड घेऊन, मुक्तीची दिशा सर्वांसाठी शोधणं ही त्यांची क्रांती होती. ती त्यांच्या नाटक लिहिण्यासारख्या अथवा ग्रंथकार सभेस पत्र लिहिण्यासारख्या ललित कृतींमधून आणि कलाभिव्यक्तीमधूनदेखील सळसळून उसळत होती. त्यांचा आशय विषमतेच्या पायावर उभ्या असणाऱ्या शोषणाला आव्हान देणारा होता, आणि समानतेचा आग्रह धरणारा होता. त्यामुळे वरवर पाहता खाजगी निर्णय/कृती असं जरी त्यांचं स्वरूप दिसलं, तरी अगदी नाटक लिहिणं या हद्दींचं अस्तित्व धुडकावून लावणाऱ्या सामाजिक कृती होत्या.

जोतिबांचं ‘तृतीय रत्न’ हे नाटक, शंभर वर्षांहून अधिक काळ प्रयोग न होता किंवा पुस्तक रूपाने प्रसिद्ध न होता दुर्लक्षित राहिलेलं, आणि अनेक अर्थाने वेगळं असलेलं नाटक आहे. ते १८५५ साली लिहिलं गेलं पण १९७९ साली फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ पाटील यांच्या खाजगी संग्रहात मिळाल्यावर पुरोगामी सत्यशोधक या मासिकाच्या पाचव्या खंडाच्या दुसऱ्या अंकात प्रसिद्ध झालं. नुसत्या रंगभूमीच्या संदर्भात नव्हे तर भारतीय सामाजिक गरजांच्या दृष्टीने एकंदर कलेचा सामाजिकतेशी कसा संबंध असू शकतो, याविषयी एकाच वेळी अनेक हद्दी ओलांडण्याचं किंवा पुनर्व्याख्यीत करण्याचं कार्य हे नाटक करतं, आणि त्यामुळे ते एक अद्वितीय उदाहरण आहे. त्याची एक पातळी नाटकाचं स्वरूप तत्कालीन मराठी रंगभूमीच्या विकासाशी ताडून पाहिल्यावर समजते; तर दुसरी पातळी, मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीने काही प्रमाणात तर दलित रंगभूमीने जास्त प्रमाणात पुढच्या शतकात समाजाच्या सुखदुःखाशी जशी नाळ जोडली, त्याच्याशी या नाटकाची तुलना केल्यानं कळते.

एकीकडे नाटकांची नाटकांशी तुलना करता ‘तृतीय रत्न’ हे नाटक काळाच्या अनेक ऐतिहासिक मर्यादांना, त्या पडत असतांनाच ओलांडून जातं, किंवा भारतीय सामाजिक परिस्थितीसंदर्भात नाटकांचे विशेष काय असू शकतात याच्या पाऊलखुणा, रंगभूमीच्या विकासाचा तो टप्पा येण्याआधीच मांडतं. ‘तृतीय रत्न’च्या जन्माच्या काळात मराठी रंगभूमी बाल्यावस्थेत होती. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या आख्यानात्मक नाटकाचा १८४३ साली जो खेळ मुंबईला केला तिथून पारंपरिक अर्थानं मराठी रंगभूमीची सुरुवात झाल्याचं मानलं जातं. तेव्हा ब्रिटीश अधिकारी, शिपाई यांच्यासाठी आणि इतर भारतीय प्रतिष्ठित आणि धनिकांच्या मनोरंजनार्थ मुंबईत रंगभूमीवर इंग्रजी आणि उर्दू भाषेतून नाटकं सादर व्हायची. ती पाहून, आपणही असा प्रयोग का सादर करू नये, या विचारातून भाव्यांनी ‘सीता स्वयंवर’ सादर केले. म्हणजे भाव्यांचं श्रेय अधिक करून, तिकीट लावून कुठल्याही धार्मिक अनुष्ठानाशिवाय, निव्वळ मनोरंजनासाठी प्रयोग सादर करण्याचं आहे. इंग्रजीमध्ये ज्याला प्रोफेशनल सेक्युलर थिएटर म्हणतात, ते मराठी भाषेत सुरू करण्याचं आहे. त्यांच्या नाटकांच्या खेळात रंगमंचावर आख्याने किंवा नाट्यकविता सादर व्हायच्या. गणपती आणि सरस्वतीचं नृत्य व्हायचं, राक्षस आणि देवांच्या कचेऱ्या व्हायच्या, अल डूरर्र अशा डरकाळ्या फोडत राक्षसांचे प्रवेश व्हायचे, तेव्हा फुल्यांनी भट-ब्राह्मणांच्या हातून कुणबी शेतकरी काबाडकष्ट करणाऱ्या जनतेची कशी पिळवणूक होते ते उलगडून दाखवणारं संवादरूपी नाटक लिहिलं. समकालीन आख्यानपर नाटकाची कुठलीही लक्षणं या नाटकात नव्हती. संगीत नव्हते. नाच नव्हता. लोककला प्रकारांचा अंतर्भाव नव्हता. मात्र पुढे जाऊन संगीत रंगभूमीची आवड ओसरल्यावर जी मराठी रंगभूमीची वाढ झाली, जे नाट्यगुण लोकांच्या पसंतीस उतरले आणि स्वातंत्र्योत्तर काळात मराठी नाटकांनी, विशेषतः प्रायोगिक नाटकांनी जी आधुनिक गद्य रंगभूमीची कास धरली, त्या अवस्थेची सर्व लक्षणं ‘तृतीय रत्न’मध्ये दृगोच्चर होती. इथे पात्रे आहेत, प्रवेश आहेत, लिखित संवाद आहेत, संघर्ष आहे, सामाजिक आशय आहे, परिवर्तनाची आस आहे. एका अर्थाने नाटक म्हणून तृतीय रत्नाने काळाच्या दृष्टीने मोठी उडी मारली होती, हे आज आपल्याला मागे वळून पाहतांना दिसते. मराठी नाटकाच्या अतिबाल्यावस्थेत अलडूरर्र डरकाळ्या आणि तागडथोम बोलांनी आसमंत दुमदुमून गेलेला असतांना आणि नंतर संगीत नाटकांच्या सुवर्णकाळात रात्र रात्र शंभराहूनही अधिक पदे गायली जात असतांना, तसंच विद्यापीठ शिक्षण घेतलेल्या नवसुशिक्षितांचं नाटकांकडे अजून लक्ष गेलेलं नसतांना, हे नाटक मांडणी आणि आशयाच्या दृष्टीनं परिपक्व होऊनच आलं, आधुनिक गद्य नाटकाची बहुतांश लक्षणं घेऊन आलं.

ललित कलाकृती असूनही, गंभीर सामाजिक बदलाची पावलं ओळखण्याची कुवत या नाटकानं दाखवली. मराठी अभिजन अस्मितेची रंगभूमी ही सांस्कृतिक ओळख पूर्णतः तयार होण्याअगोदर या नाटकाने वंचितांचे प्रश्न मांडले. इतकी ताकद असणारं हे नाटक त्याकाळी ना सादर झालं, ना प्रकाशित झालं हे आपलं दुर्दैव, अन्यथा रंगभूमीचा इतिहास बदलून गेला असता. नाट्यसमीक्षेलाही या नाटकानं अप्रत्यक्ष योगदान दिलं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी नाटकाच्या समीक्षेचाही विकास रंगभूमीच्या विकासाबरोबरच झाला आहे. जर ‘तृतीय रत्न’ रंगमंचावर आलं असतं, तर समीक्षेचीही जातकुळी बदलून गेली असती, कारण या नाटकाच्या आंतरिक सामर्थ्यासह आणि प्रयोगगुणांसह नाटककार जोतीबांची समाजसुधारक म्हणून असणारी बुलंद ओळख, त्यांचे समाजकारण, इतर गद्यपद्य लेखन, त्यांचा भाषेचा वापर, एतद्देशीय नाट्यरचना, मिशनऱ्यांचे हेतू आणि कार्य, वासहतिक कालखंडातील सामाजिक बदल, अशा अनेक नाट्यबाह्य संदर्भांची जी मांदियाळी आज लक्षात घ्यावी लागते, ती आधीच घेतली गेली असती.

गोपु देशपांडे यांनी मराठी रंगभूमी आणि नाटकाच्या आरंभिक काळाविषयी त्यांच्या ‘मराठी नाटक: एका सामाजिकतेचा प्रवास’ या निबंधात (‘नाटकी निबंध’, लोकवांग्मयगृह, १९९५) एक विधान केलं आहे. ते लिहितात की मराठी नाटकाचा प्रारंभ म्हणजे राजकीय सत्ता हातून गेल्यानंतर, एका नव्या क्षेत्रात ओळख हुडकण्याचा प्रयत्न होता. इथे त्यांना ब्राह्मणी मराठी रंगभूमी गृहीत असावी किंवा आहे. नाटककार फुले यांच्या बाबतीत हे विधान बरोबर उलट करून पहावं लागतं. इतिहासाचं अवलोकन करता आपण आज म्हणू शकतो की त्यांनी नाटक लिहिलं ते शोषितांना राजकीय सत्ता मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून. खुद्द फुल्यांनी आपण हे नाटक का लिहिलं याविषयी काही म्हटल्याचं आपल्याला माहित नाही. ‘तृतीय रत्ना’पलीकडे जोतिबांनी दुसरं कुठलं नाटक लिहिलं होतं का तेदेखील आपल्याला ठाऊक नाही. हे नाटक लिहितांना त्याच्या प्रयोगाविषयी त्यांनी काही विचार केला होता तेही आपण जाणत नाही. तेव्हा जोतिबांची भूमिका, नाटकाच्या आशयांतर्गत आणि त्यांच्या इतर लेखनाशी व कृतींशी या नाटकाचे जे आशयरूपी नातं आहे त्यात शोधावी लागते. उदा. जी ए उगले (२००४, क्यांडीड प्रकाशन वर्धा, पृ. ५०-५१) यांच्या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे, अहमदनगरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानोदय’संदर्भात अनेक उल्लेख ‘तृतीय रत्ना’मध्ये येतात. या पत्राशी फुल्यांचा वैचारिक सांधा जुळला होता. नाटकातल्या ख्रिश्चन पाद्र्याच्या तोंडी ‘ज्ञानोदयात काही कोणाचे भय न धरिता छापून प्रकट करीन’ असा संवाद येतो. नंतर नाटकात अन्य ठिकाणी ‘ज्ञानोदयकर्ते नेहेमी ब्राह्मणांचे वंदन करीत’ असा उल्लेख विदुषकाच्या तोंडी येतो.

गोपु देशपांडे यांच्या मते व्यवस्था प्रवर्तक फुल्यांच्या विचारव्यूहाला समजावून घ्यायचे असेल तर त्यांनी कला आणि प्रयोगकलांच्या संदर्भात काय भूमिका घेतली हे पाहावं लागेल. ते जोतीराव फुल्यांना आणि गांधींना system builder म्हणतात. चिकित्सेतून व्यवस्था उभी करणारे. त्यांच्या मते, दोघांनाही लोकांशी संवाद साधण्याची गरज जाणवली. त्यांचा हा संवाद अनुक्रमे ‘तृतीय रत्न’ नाटकात आणि ‘हिंद स्वराज्य’ पुस्तकात दिसतो, असं ते लिहितात. हा संवाद महत्त्वाचा आहे कारण त्यात व्यवस्थेची चिकित्सा अंतर्भूत आहे. म्हणजे फुल्यांच्या संदर्भात बोलतांना चित्र असं दिसतं की व्यवस्थेची चिकित्सा त्यांनी कलेमार्फत, म्हणजे नाटकाच्या माध्यमातून केली आणि नाटकाला चिकित्सेचं माध्यम बनवलं. हे त्यांनी मराठी रंगभूमीच्या अत्यंत सुरुवातीच्या काळात केले ही बाब अर्थपूर्ण आहे. पण प्रतिकात्मकरीत्यासुद्धा हे नाटक रंगभूमीवर त्याकाळी आले नाही हा देखील दुसरा, त्याकाळच्या सामाजिक सत्ताकारणाने घडवून आणलेला अर्थपूर्ण योगायोग मानला पाहिजे. जोतिबांनी हे नाटक दक्षिणा प्राईझ कमिटीला विचारार्थ सादर केलं होतं, पण ब्राह्मणी व्यवस्थेचा विरोध करण्याच्या उघड कारणांसाठी ते नाकारण्यात आलं आणि त्यानंतर ते अंधारात गेलं.

नाविन्य हे जोतिबांच्या इतर लिखाण आणि कृतीबरोबर ‘तृतीय रत्न’ नाटकाचंही ठळक वैशिष्ट्य आहे. नाविन्याचे अर्थ अनेक परीने लावता येतात. केवळ चूस आणि आकर्षण म्हणून, किंवा एक प्रयोग म्हणून नाविन्य असू शकतं आणि चालत आलेल्या गोष्टी सोडून देऊन कोरी करकरीत नवीन सुरुवात करण्याची आसदेखील नाविन्यापाठीमागे पाहता येते. ही आस म्हणजे विचारपूर्वक आणि जबाबदारीने केलेली कृती असते. जोतिबांच्या नाटकाचे नाविन्य या दुसऱ्या प्रकारचं आहे. एकंदरच संस्कृतीकडे जोतिबांनी नव्या दृष्टीकोनातून पाहिलं. समाजातील वेगवेगळ्या जातवर्णांमध्ये असलेला फरक हा विषमता आणि शोषणाला प्रभुत्वाचे साधन बनवणाऱ्या संस्कृतीचा आहे, हे त्यांनी जाणलं. कष्टकरी जातीमध्ये असणाऱ्यांची संस्कृती वेगळी असते हे त्यांनी जाणलं, असे भारत पाटणकर ‘महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष’ या पुस्तिकेत सांगतात. सांस्कृतिक अंतर्विरोधावर बोट ठेवून मग ब्राह्मणी जातवर्चस्वावर जोतिबांनी प्रहार केले असं पाटणकरांचे प्रतिपादन आहे. त्याचा उत्तम नमुना ‘तृतीय रत्न’ मध्ये मिळतो. नाटकासारख्या कलाकृतींनी समाजाच्या परिवर्तनाच्या काळात काय करावे याची जणू नवी सीमारेषा जोतिबांनी आखून दिली. शेतकऱ्यांचा असूड ग्रंथातही “.. पिढीजात अज्ञानी शेतकऱ्यांचे द्रव्याची व वेळेची भटब्राह्मणांकडून [..] हानी होते” असं जोतिबांचे म्हणणे आले आहेच. शोषणाचा हा धागा त्यांच्या विविध प्रकारच्या लिखाणात विखुरला आहे. ही सांस्कृतिक समीक्षा, अन्यायग्रस्तांच्या नजरेतून जाणून घेऊन समर्थपणे मांडणे, हे जोतिबांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आहे आणि तो नवा प्रदेश आखून घेण्याचा प्रयत्न आहे. या अर्थाने त्यांना मराठी रंगभूमीचे पहिले प्रायोगिक नाटककार म्हणण्यासदेखील प्रत्यवाय नसावा.

विष्णुदास भावेंसारख्या मराठी रंगभूमीची सुरुवात करून देणाऱ्या नाट्यकर्मींची नाटकामागील प्रेरणा आणि जोतीबांची ‘तृतीय रत्न’ लिहिण्यामागची प्रेरणा यात अर्थातच फार फरक होता. रंगभूमीशी जोतिबांचा परिचय होता की नाही हे आपण जाणत नाही पण नाटक हे जोतिबांचे ध्येय नव्हतं. ते एक साधन होतं. त्यामुळे विधींना जोडून उभ्या राहणाऱ्या लोककलांचा जसा रंगमंचीय आनंदाविष्कारासाठी इतरांनी प्रारंभिक काळात वापर केला तसा जोतिबांनी लोककला प्रकारांचा उपयोग नाटकात करून घेतला नाही. कदाचित ज्या अज्ञानाचा निःपात करण्याची त्यांची धारणा होती, त्या अज्ञानाचं अंधश्रद्धाळू रूप त्यांना लोककलांमध्ये जाणवलं असावं. पण लोकधर्मी नाही तर नाट्यधर्मी रचनेचा त्यांनी अवश्य उपयोग केला आहे. तृतीय रत्न नाटकात विदुषकाचे पात्र आहे, ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. विदुषकाचं पात्र साधारणतः विनोद निर्मितीसाठी आहे, असं मानलं जातं. पण संस्कृत नाटकांत आढळणारा विदूषक निव्वळ विनोद निर्मितीच करतो असं नव्हे. विदूषक म्हणजे राजाचं दुसरं मन, असं मत गोडबोले त्यांच्या लेखात मांडतात. (गोडबोले, १९७८)

‘तृतीय रत्न’ नाटकाची एक विशेष बाब म्हणजे त्यातल्या दिशादिग्दर्शक रंगसूचना. या त्याकाळी इतर मराठी खेळांत नव्हत्या. तसं हे नाटक अंक किंवा प्रवेशात विभागणी केलेलं जरी नसलं तरी रंगसूचनांचे अस्तित्व, नाटक प्रयोग होण्यासाठी लिहिलं गेलंय असं मानण्यास आधार देते. या नाटकात काही ठिकाणी त्या विस्तृत, वर्णनपर आहेत, तर काही ठिकाणी तोकड्या. काही वेळा पात्रांच्या हालचाली आणि भावभावना त्या सांगतात, तर काही वेळा अनेक घटनांचा किंवा हालचालींचा चटकन आढावा घेऊन रंगमंचीय कृती त्या पुढे नेतात. उदा. “हसल्यासारखा करून”, “मान हालवून”, “हळूच डोळे मिचकावून”, “मोठी शर्मी होऊन”, “मोठ्या आनंदाने टाळ्या पिटून म्हणाली”, अशा छोट्या कृती किंवा वाचिक अभिनयदर्शक रंगसूचना काही ठिकाणी येतात. तर जिथे त्या विस्तृत आहेत तिथे एका परीने प्रवेश बदलाचे काम करतात. उदा. एक रंगसूचना अशी आहे: “पुढे लागलेच चारपांच दिवसांत जोगाईला जामीन व आपण कूळ होऊन कर्ज रोख लिहून देऊन, रुपये काढून, घरी घेऊन आले; आणि जोशास बोलावणे आपणच स्वतः त्याचा घराचा शोध करीत जाऊन, घरी घेऊन आला. नंतर बुवाजीस उभयतांनी रुपये खळखळ वाजवून, त्यास दाखवून, असे म्हणालें आता जलदी करा महाराज?” (महात्मा फुले: समग्र वांगडमय, पृष्ठ १३) क्वचित स्वतंत्र संवादसुद्धा रंगसूचनेत बंदिस्त होतो. उदा – “इतक्यात एक मुसलमान हे सर्व बोलणे ऐकत उभा होता त्याने पुढे हात करून म्हणाला-क्यूं पाद्री साहेब पिच्छले दिनोमे हमारे बादशहावोने हिंदूके बड बुतोंकू फोड डालेसो अच्छा किया; ये सब लोग उन्होंके नामसे ताने मार-मारकर रोतें हैं; ये बडा आबसोस हैं.”

नाटकाची भाषा अभिनयाचं अंग असतं असं ‘नाट्यानुभव’ या पुस्तकात प्रख्यात हिंदी नाट्यसमीक्षक नंदकिशोर म्हणतात. भाषासुद्धा अभिनय करते, अभिनयाला पोषकता देते, किंवा भाषा स्वतः सादरीकरण करते असे त्यांच्या विधानाचे अनेक अर्थ आहेत. फुल्यांचा स्वभाव, त्यांचा काळ, त्यांचं स्वयंभूपण किंवा त्यांना एकंदरच नसलेली पूर्वसुरींची परंपरा, त्यांनी अंगीकारलेले कार्य आणि त्यातल्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार त्यांच्या भाषेविषयी निरीक्षणे नोंदवतांना करणे आवश्यक आहे. त्यांच्या शिवराळ भाषेबद्दल लिहिले गेलेले आहे (उदा. रा ना चव्हाण) पण नाटकात ती तशी प्रत्ययाला येत नाही. उलट जोशाच्या पात्रासाठी लागू पडणारी शिष्ट भाषा, विदुषकाची प्रमाण वाटावी अशी भाषा, आणि रंगसूचनांमध्ये वापरलेली बोलले भाषा (उदा. ‘गिनगिनवाणी तिष्ठत बसली’, पृ. १९, समग्र वांग्मय) यांनी नाटक खुलतं.

शेवटी नाटककार होण्याची मनीषा न बाळगलेल्या पण उत्तम नाटककार ठरलेल्या जोतिबांचा विचार अजून एका नव्या सीमारेषेबद्दल करता येतो. ती प्रस्तुत-अप्रस्तुततेची सीमारेषा आहे. कलाक्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या पण मुळात दुसऱ्या क्षेत्रात अतुलनीय उंची गाठलेल्या व्यक्तीची कलाभिव्यक्ती कशी समजावून घ्यावी? या नाटकाच्या प्रयोगात्मकतेचा विचार आजच्या काळात कसा करायचा? एकच नाटक लिहिलेल्या जोतिबांचे नाटककार म्हणून कौशल्य आपल्याला जोखता येईल का? जोतिबांचं समाजसुधारक म्हणून स्थान आणि मोलाचं कार्य पाहता ते प्रस्तुत आहे काय? मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाने जोतीबांची वाट अजिबात चोखाळलेली नसतांना जोतीबांची तुलना कुणाशी आणि कशाशी करणार? या नाटकाची कूस पकडून जर मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखन चाललं असतं तर आज चित्र काय दिसलं असतं? ह्या विचारातला जरतरचा फोलपणा जरी उघड असला तरी तो ‘तृतीय रत्न’ नाटकाचे एक फार मोठे शक्तिस्थान लक्षात आणून देतो, ते म्हणजे ‘तृतीय रत्न’ सामाजिक सत्ताकारणाची चिकित्सा करते. काही अपवाद वगळता ही चिकित्सा प्रवाहपतित मराठी रंगभूमीने आजतागायत जोरकसपणे केलेली नाही आहे. म्हणून मराठी रंगभूमीच्या इतिहासात या नाटकाची सांगड फक्त दलित रंगभूमीशी एक प्रेरणास्त्रोत म्हणून जी घातली जाते, ती कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या वासाहतिक विद्यापीठीय शिक्षणाने गद्य नाटकाची गोडी सुशिक्षितांना लावली, त्यांच्यापुढे इंग्रजी नाटकांचे उत्तमोत्तम नमुने उभे केले, विनायक जनार्दन कीर्तने यांच्यासारख्या नवशिक्षण घेतलेल्या तरुणाला थोरले माधवराव पेशवे यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तीवर गद्य नाटक लिहून राष्ट्रवादी इतिहास जागवावा वाटला, त्या विद्यापीठीय शिक्षणाला पारखे राहूनसुद्धा फुल्यांनी सामाजिकदृष्ट्या अधिक उपयुक्त, शोषितांची बाजू घेणारं, शिक्षणाची महती सांगणारं नाटक लिहिलं, हे जास्त महत्त्वाचं. नवसुशिक्षितांनी केलेल्या बुकीश नाटकाच्या निर्मितीने मराठी रंगभूमीच्या इतिहासात जे बरेच बदल घडून आले, उदा. लिहिलेले संवाद बरोबर म्हणणे ही अभिनयाची कसोटी झाली, किंवा लिखित संहितेनं नाटककाराचं महत्त्व कायमस्वरूपी प्रस्थापित केलं, इ., ते बदल घडवण्याचे श्रेय फुल्यांना मिळाले असते. श्रेय-अपश्रेयाची सीमारेषादेखील इतिहासात इकडे-तिकडे सरकली असती.

‘तृतीय रत्न’ नाटकाची ओळख ही अशी सीमारेषांच्या बाहेर जाऊन करून घ्यावी लागते. नाटक कसं होतं, कसं असावं, नाटकानं काय करावं, नाटकात काय असावं, नाटक सादरच झालं नाही तर त्याचं आयुष्य कसं आणि किती मानावं – अशा अनेक शंकांच्या सीमारेषा! ही ललित कृती सीमारेषांना असणारी स्थळ-काळाची बंधनंही प्रश्नांकित करते. त्यांच्या संदर्भांनाही बदलून टाकते. आणि यात आश्चर्य कशाचं? कारण शेवटी या विचारयात्रेत आपण एक ‘प्रदेश साकल्याचा’ बघत आहोत, हे भान सोडून कसं चालेल?
- माधुरी दीक्षित,

संदर्भ सूची -
१. कीर, मालशे आणि य. दि. फडके : ‘महात्मा फुले: समग्र वाङ्मय’, महाराष्ट्र राज्य संस्कृती आणि साहित्य मंडळ, मुंबई, १९६९
२. कुलकर्णी, अ. वा.: ‘विस्मरणात गेलेली नाटके’, पद्मगंधा, पुणे, २००४
३. देशपांडे, गो. पु.: ‘नाटकी निबंध’, लोकवांग्मयगृह, १९९५
४. उगले, जी. ए.: ‘ज्ञानोदय’, कॅंडीड प्रकाशन, वर्धा, २००४
५. पाटणकर, भारत: ‘महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष’, लोकवाङ्मय, मुंबई, १९९१
६. Godbole, G. H: “The Role of Humour in Classical Sanskrit Plays.” Indian Literature, vol. 21, no. 3, 1978, pp. 101–113. JSTOR, www.jstor.org/stable/23334395
७. भोळे, भा. ल.: ‘भारतीय साहित्याचे निर्माते: महात्मा जोतीराव फुले’, साहित्य अकादमी, दिल्ली, १९९६
८. ऑम्वेट, गेल: ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’, १९७६
http://www.hakara.in/madhuri-dixit-2/?fbclid=IwAR3d_KQU5dIhdYSCDCLg3hzE3GpZhXErrUyzr2Vy0fgjQkYvww-SeJsAn6M
माधुरी दीक्षित या प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्या सामाजिक, सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक असून मराठी नाटकावर त्यांनी संशोधक केले आहे.



Thursday, July 4, 2019

बाबासाहेबांचे घर मुंबईत नेमकं कुठं होतं? आहे ?






"डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा" या मालिकेत बाबासाहेबांचं कुटूंब मुंबईला स्थलांतरीत होत असल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटूंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. पण तुम्हाला ठाऊक आहे का हे घर म्हणजे नेमकं मुंबईत कुठे होते? ते आजही आहे का? काय आहे त्या घरांचा इतिहास? सुभेदार रामजीबाबांनी पूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे परळच्या ज्या बीआयटी चाळीतल्या खोलीत काढली. त्यांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धगधगत्या आठवणी ज्या वास्तुशी निगडित आहेत. बाबासाहेबांचे पिता सुभेदार रामजी यांनी या चाळीत ५० व ५१ नंबरच्या दोन खोल्या विकत घेतल्या होत्या. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. बीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बी. ए. पूर्ण केले. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीमुळे नंतर बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू बाबासाहेबांना शोधत शोधत याच चाळीत भेटायला आले होते.

बाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले, सार्वजिनक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास या वास्तूस लाभला. त्यांच्या पत्नी रमाबाई यांचं पूर्ण आयुष्य या वास्तूत गेलं. या चाळीतून बाबासाहेब १९३४ ला दादरच्या नव्यानं बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५० नंबरची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी तर ५१ नंबरची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक.

सहा डिसेंबरला या खोल्या पाहायला लोक येतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय सर्वांना घरात घेतात, विचारपूस करतात आणि विचाराल ती माहितीपण देतात. आधीमधी बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात.

भागुराम खैरे यांनी या ५१ नंबरच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. अगदी तेच दार, तोच कडीकोयंडा, खिडकीसुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंट कोबा आहे.

परळच्या बीआयटी चाळीनी २०१२ मध्ये शंभरी पार केली आहे. आजूबाजूच्या इमारती पाडून इथं पन्नास मजली टॉवर उभे राहत आहेत. उद्या या चाळीच्या नशिबीही हेच येणार आणि महामानवाच्या सहवासानं पुनीत झालेली ही वास्तू कायमची पडद्याआड जाणार.

घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कॉलनी, दादर येथील राजगृह हे निवासस्थान सर्वांना परिचित आहे. पण त्याअगोदर बाबासाहेब
परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसर्‍या माळ्यावर खोली क्र. 50, 51 या ठिकाणी वास्तव्यास होते. 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्षे ते येथेच राहायचे. या ऐतिहासिक स्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची खंत येथे भेट देणारे नागरिक व्यक्‍त करतात.

जगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथे काही काळ घालवला तेथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत दोन्ही कुटुंबीयांनी भावना व्यक्‍त केली. खोली क्र. 50 मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र.51 स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केले.

गेल्या महिन्यातच अमेरिका, कोलंबिया येथून 20 जणांचे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेले. जर्मनीहून एक वयोवृद्ध महिला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा भागूराम खैरे यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी जर्मन महिला चक्क शुद्ध हिंदी भाषेत म्हणाल्या, "बाबासाहेबांनी नमस्कार करायला नाही तर गळाभेट घ्यायला शिकवलं आहे. आपण सर्व त्यांचे अनुयायी आहोत कोणी मोठे छोटे नाही."
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही खोल्यांमधील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ बांधले आहे.
सौजन्य- Dr. Babasaheb Ambedkar
#DrBabasahebAmbedkar #BabasahebOnStarPravah #StarPravah #बाबासाहेबस्टारप्रवाहवर #JaiBhim #Ambedkar #Bhimrao

सामाजिक विषमतेचा दाहक अनुभव-आर्टीकल १५








आर्टीकल १५ हा चित्रपट मुख्य धारेतला आजचा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे हा अनुबोधपट किंवा भाषण नाही. एक क्राईम थ्रिलर वाटणारा हा चित्रपट आजच्या भारतातील जातीभेदातून येणार्‍या पक्षपात, भेदभाव शोषण आणि हिंसा यांचा जळजळीत अनुभव देतो. अनुभव सिन्हांसारखा मुख्य धारेतले मुल्कसारखे संवेदनशील विषयावरील चित्रपट बनवणारा दिग्दर्शक हा चित्रपट बनवतो आणि तरूण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर तो पहायला गर्दी करतात हे महत्वाचे आहे.

दिग्दर्शन, अभिनय, संवाद, पटकथा, चित्रानुभव आणि परिणामकारकता यांच्याबाबतीत हा चित्रपट खूपच सरस आहे.
एक सरळमार्गी आयपीएस अधिकारी अयान रंजन [ आयुष्मान खुराणा] याची ग्रामीण भागात बदली होते. तीन दलित मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते. पोलीस तिच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. एकेदिवशी त्यातल्या दोघींची प्रेते एका झाडाला लटकावलेली सापडतात. पोलीस अधिकारी सांगतात की त्या मुलींचे आपापसात लैंगिक संबंध असल्यानं त्यांच्या वडीलांनीच त्यांची हत्त्या केलेली आहे. त्या दृष्टीने तपास करून दोघींच्या वडिलांना अटक केली जाते, त्यांच्याकडून तसा जबाबही मिळवला जातो. तिसर्‍या बेपत्ता मुलीचा तपास करण्याची गरजही या अधिकार्‍यांना वाटत नाही. अयान रंजन मात्र याच्या तपशीलात जातो तेव्हा वास्तव काही वेगळेच असल्याचे त्याला आढळते.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सामुहीक बलात्कार आणि निर्घृण हत्त्या झाले असल्याचे आढळते.
हा रिपोर्ट बदलला जातो. सखोल तपासात रस घेणार्‍या अयान रंजनकडून ही केस काढून घेतली जाते आणि ती सीबीआयकडे सोपवली जाते. अयानला निलंबित केले जाते.

त्या तिसर्‍या मुलीचे काय होते? अयान तिचा शोध घेण्यात यशस्वी होतो का? हा अत्त्याचार दाबला जातो की त्याला वाचा फुटते? राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होते का?
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही राज्यघटनेनुसार समतावादी आणि मनानं जातीयवादी असलेल्या भारताचा भयावह चेहरा हा चित्रपट आपल्यापुढे उघडा करतो.

महत्वाचं म्हणजे आयुष्मान खुराणा, मनोज पाहवा, इशा तलवार, कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता आणि मोहम्मद झीशान अयुब यांचा अभिनय हा अफलातून अनुभव देणारा आहे. निषाद ह्या बंडखोर दलित नेत्याच्या छोट्याशा भुमिकेत मोहम्मद झीशान अयुब याने तर कमाल केलीय.

आरपार अस्वस्थ करणारा, मुळातून हलवणारा जब्राट समकालीन अनुभव हा चित्रपट देतो.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट बनवून एक फार मोठे सामाजिक काम केलेले आहे. त्यांना मन:पुर्वक सलाम. जयभीम. जयहिंद.

- प्रा.हरी नरके, ४ जुलै २०१९