Monday, June 29, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके



" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) ...............................

शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,

Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )

Thursday, June 25, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके




" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) .............................................




शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,
२५/६/२०२०

राजर्षि शाहू छत्रपती



राजर्षि शाहू छत्रपतींच्या जन्माला उद्या १४६ वर्षे होतील.

महाराज फार अकाली गेले. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी.

पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल.

गेल्या ९८ वर्षात महाराजांविषयी दर्जेदार लेखन, संशोधन करुन ज्यांनी महाराजांच्या ऎतिहासिक कामगिरीचे दस्तावेजीकरण करून ठेवले त्यात
अण्णासाहेब लठ्ठे,
आमदार पी. बी. साळुंखे,
धनंजय कीर,
कृ. गो. सुर्यवंशी,
डॉ. रमेश जाधव,
प्रा. य. दि. फडके,
प्रा. जयसिंगराव पवार,
प्रा. एस.एस. भोसले,
प्रा. विलास संगवे,
बाबूराव धारवाडे,
कुलगुरु कणबरकर,
कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे,
प्रा. अर्जून जाधव,
मंजूषा पवार आदींना फार मोठे श्रेय जाते.

तुम्ही यातल्या कुणाकुणाचं वाचलंय? कमेंटमध्ये लिहा.

-प्रा.हरी नरके,
२५/६/२०२०

Wednesday, June 24, 2020

एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत?

Pi Vitthal यांची खालील पोस्ट पाहावी.
" काही लोकांचे आपल्याविषयीचे पूर्वग्रह इतके पक्के असतात की, आपल्या कोणत्याच दखलपात्र कृतीला, सर्जनशील निर्मितीला प्रतिसाद देण्याची त्यांची इच्छा नसते. म्हणजे फेसबुकच्याच भाषेत सांगायचं तर 'कॉमेंट' वगैरे तर सोडाच ; पण साधं 'लाईक' करण्याचं सौजन्यही ते दाखवत नाहीत. आणि आपण तर त्यांना वर्षानुवर्ष जवळचं समजत राहतो. (इतरांविषयीचा एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत? )
दुर्दैवाने अशी माणसं आपल्या भोवतालात खूप असतात. त्यात आपल्या जवळचे 'मित्र' असतात. काही 'आदरणीय' ज्येष्ठ असतात. काही तथाकथित 'थोर' असतात.
तर असो. सर्वांचं भलं होवो. !
तुमचं मत यापेक्षा वेगळं आहे? 😊 - पी. विठ्ठल "

.......

मी त्यांच्या भिंतीवर दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
पि.विठ्ठल: तुमची पोस्ट आणि त्यावरच्या बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या.
दोनतीन वर्षांपुर्वी मीही अशीच खंत मांडणारी पोस्ट केली होती, तेव्हा असे लक्षात आले की * एकुणच दाद देण्याच्या बाबतीत पंजाबी लोक, उत्तरेतले लोक आघाडीवर आहेत. मराठी फारच कद्रू आणि कंजूष लेकाचे.


१) काही अभिरूचीसंपन्न मित्रमैत्रिणी जरी लाईक/कमेंट देत नसले तरी ते वाचत असतात. त्यांच्या लक्षातही असते. भेटल्यावर सांगतातही.

२) तुमच्या पोस्टवर व्यक्त झालेले, या भावनेशी सहमत असलेले यांची संख्या कितीतरी मोठी आहे. ( ४९३ लाईक/३१४ कमेंट ) मग त्यांची हीच तक्रार असूनही ते तरी एरवी का बरं इतरांना लाईक/कमेंट देत नसतील?


३) वाचलेले आवडले की उत्स्फुर्तपणे दाद देणे हा माणसाचा सहज भाव आहे. ती दाबणारे मला तरी निरामय/निकोप मनाचे वाटत नाहीत. अशी दाद दाबून ठेवण्यासाठी या मंडळींना फार मोठी मानसिक तयारी करावी लागत असेल. दाद देण्याची कळ दाबून ठेवायचा त्रासही होत असेल. त्यांच्या या त्रासाचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा.

४) माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझ्या एका मित्राने त्याच्या शंभर प्रती विविध नामवंतांना पाठवल्या होत्या. ज्यांना हे भेट पुस्तक मिळाले त्यातल्या पाचदहा जणांनीही दाद सोडा साधी पोचही दिली नाव्हती. पण पुढे हे पुस्तक गाजले.त्याला अनेक पुरस्कार मिळाले, नामवंतांनी लिहिलेली परीक्षणे आली, त्यानंतर मात्र त्याच्याकडे बघण्याचा याच लोकांचा दृष्टीकोन बदलला.


५) मात्र दुसरीकडे माझा लेख वाचून तू यावर पुस्तक लिही असे कळवणारे पु.ल.होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुस्तकावर इतकं भरभरून बोलले की त्या कार्यक्रमात पुस्तकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या. पुढे पुरस्कार आणि परीक्षणांमुळे महिनादीड महिन्यात तीन हजारांची आवृत्ती संपली. मी जयवंत दळवींना पुस्तक द्यायला गेलो तर त्यांनी ते आधीच विकत घेऊन वाचलेले होते, असेही सुखद अनुभव आहेतच.


६) विश्राम बेडेकरांची रणांगण प्रकाशित झाल्यानंतर ती बरी आहे असे म्हणणारा कोणीही नव्हता. अशी २०/२५ वर्षे गेली. मग पहिला निघाला. दुसरा..तिसरा.. निघत गेले. आज रणांगण किती उंचीवर आहे बघा.


७)सार्वजनिक जीवनातली बधीरता,संवेदनहिनता खरंच वाढतेय की तशी फक्त तक्रार वाढतेय, शोधावं लागेल.


८) आणखी खूप लिहिता येईल. पण त्यातले बरेच मुद्दे येऊन गेलेत. खरंच चांगलं लिहिलंय अनेकांनी. ते मुद्दे रिपिट न करता त्यांना पाठींबा देतो.


* उलट मी फारच जास्त लोकांना भरभरून दाद देतो अशी तक्रार माझे काही मित्र करत असत. आजही करतात. मी म्हणे सर्वांनाच चांगले म्हणतो, त्यामुळे तुझी दाद सवंग आहे असं एक जवळचा समीक्षक-ग्रंथविक्रेतामित्र मला म्हणतो. असेलही.


मित्रवर्य अशोक नायगावकरांच्या एका किश्याने समारोप करतो. रस्त्यावर एकजण पकडा पकडा असं ओरडत असतो. पळणाराला लोक पकडतात. कायरे काय चोरलंस म्हणुन विचारतात. तो म्हणतो, मी काहीच चोरलं नाहीय, मागचा धापा टाकत पोचतो. लोक म्हणतात, हा तर चोरी केलीच नाही म्हणतोय. धापा टाकणारा म्हणाला खरंय. चोरलं नाही पण त्याची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता लेकाचा! कविमित्रांनो, किस्सा माझा नाही,कवी अशोक नायगावकरांचा आहे. तेव्हा रागावू नका.

-प्रा. हरी नरके,
२४/६/२०२०

Tuesday, June 23, 2020

"बाबासाहेब आणि चीन" या लेखावरची एका चीनप्रेमीची पोटदुखी आणि जळफळाट - प्रा. हरी नरके


१. हरी नरके यांच्या "बाबासाहेब आणि चीन" या लेखाला एव्हढी भरमसाठ प्रसिद्धी कशाला? सध्या त्याचीच सगळीकडे धूम आहे. मोबाइलवर ओव्हरसबस्क्राईड.

२. लेख वाचण्यापुर्वीच मला तो लेख खोटा असणार अशी शंका होती. एका मित्राने मला विचारले, " हे खरे आहे काय?" मी तेव्हाच म्हणालो, "वाटत नाही."

कारण ५४ ला चीन केवळ पाच वर्षाचा होता. १९४९ ला चीनला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यावर कशाला बाबासाहेब बोलतील? हरी नरके खोटे लिहित असणार.

३. हरी नरकेंनी ज्याच्या आधारे लिहिलेय तो "बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचा खंड १५ वा" मी वाचलेला नाही.

४. पण मी एका लेखकाचे दुसरे पुस्तक वाचलेय.

५. त्यानुसार बाबासाहेबांनी त्या भाषणात रशियाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. चीनचा कमी वेळा केलाय. मग हरी नरके रशियावर का लिहित नाहीत?

६. बाबासाहेब चीन, माओ, कम्युनिझमवर बोललेत. पण कमी बोललेत.

७. परिस्थितीजन्य हंगाम येतात, जातात, प्रसिद्धि येते, अन जातेही.

८. हरी नरकेंना एव्हढी जास्त प्रसिद्धी मिळतेच कशी? काहीतरी लबाडी असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? आम्ही इतके दिवस लिहितोय, आमचे लेखन का गाजत नाही? आम्हाला प्रसिद्धी का मिळत नाही? हरी नरकेचे का गाजते? कारण वाचक मुर्ख आहेत आणि हरी नरके खोटे लिहितात म्हणून ते गाजते. जे गाजते ते खोटेच असते.

९. हरी नरकेचा हा लेख वाचू नका. तो चीनवर आहे. त्याला सांगा रशियावर लिही. चीन मला आवडतो.


-प्रा. हरी नरके,
२३/६/२०२०

टीप- बाबासाहेबांचे संसदेतले २६ ऑगस्ट १९५४ चे ते भाषण २ तासांचे प्रदीर्घ, अभ्यासपुर्ण आणि द्रष्टे विचार मांडणारे मौलिक भाषण आहे. त्यात जागतिक प्रश्नांवरचे चिंतन आहे. चीन, रशियापासून अगदी पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोवा, निजामाच्या ताब्यातील विदर्भ  असे अनेक विषय त्यात आहेत. एकुण छापील १३ पानांचा मजकूर आहे. मला एका पानाचा लेख लिहायचा होता. पुस्तक नव्हते लिहायचे.
माझा मुद्दा हा आहे की कोरोना कुठून आला? भारतावर हल्ला कुणी केलाय? चीन. सध्या चर्चेचा मुद्दा कोणता आहे? चीन. म्हणून मी जर चीन, कम्युनिझम आणि बाबासाहेब हा विषय प्रासंगिक विषय निवडलेला आहे. मी त्या लेखात आणखी याच्यावर का लिहिले नाही, त्याच्यावर का लिहिले नाही असले प्रश्न अनावश्यक आहेत - प्रा. हरी नरके

Monday, June 22, 2020

China is a Forestfire for democracy : Threat of Chinese aggression to India - Prof. Hari Narke











China is a Forestfire for democracy : Threat of Chinese aggression to India - Prof. Hari Narke

Communism is like a forest fire; it goes on burning and consuming anything and everything that comes in its way. Stay away from China.Even if not today, Danger of invading India by China will about to occur in the future, Dr. Babasaheb Ambedkar had warned Nehru on 26th August 1954 while speaking in Parliament.

Dr.Ambedkar words became true , In 1962, China invaded India and swallowed up a large territory. China has taken the lives of 20 our brave soldiers by raising the same issue of the Galwan Valley from which China invaded in 1962. The foreign minister said ,” all troops on border duty always carry arms, especially when leaving the post. Those at Galwan on June 15 also did so.But there is a long-standing practice not to use firearms during face-offs.” Even if it is a crime under law to kill someone but it is forgivable to kill someone in self-defense , when Chinese soldiers throwing stones and sharp weapons on our soldiers then our soldiers were able to shoot their soldiers in self-defense , there is no answer who stopped them. At the beginning of article , I have given the remarks made by Dr.Babasaheb Ambedkar while speaking on foreign policy in the RajyaSabha . Prime Minister Nehru was listening to Babasaheb’s speech carefully. The president upbraid the member when he interrupted Babasaheb’s speech.

Today, Corona virus has spread from China to the rest of the world. Speaking in the language of Babasaheb Ambedkar , the whole world is in turmoil and the whole world, including India, is being punished for China’s wrongdoing. There are allegations whether the virus originated in nature or was developed by China in a laboratory and spread in whole world. This biological war imposed by China has engulfed the whole world

It has been proven many times that China’s Ruler are very ambitious, dictatorial and aggressive. Needless to say, the Chinese rulers are brutal and barbaric, crushed millions of peace-loving young people under tanks. Today, it has been proven once again that China which has moved forward to occupy the Galwan Valley is a vicious imperialist. Today, China’s , the market economy used to persecute other countries, and China’s veto in the United Nations all prove that China can attack its neighbors. These fierce aggressors can do anything for power.

Today, all the developed nations of the world have fallen victim to the Chinese virus. It could also be China’s systematic strategy.

Dr. Babasaheb Ambedkar’s vision is the woke India up six and a half decades ago. Communists love democracy. They don’t even want righteousness.

Mao’s inhumane treatment of Buddhists in China ,Seeing that, it is obvious that he is a ruler who is trampling on the Panchsheel. Dr Babasaheb Ambedkar said that India should not be friend with China ,India should make friends with democratic nations. Speaking as a Rajya Sabha member, Babasaheb Ambedkar further said ,”Communism and democracy can never go together. Neighbors of communist countries must be constantly vigilant. It is unfortunate that India help the Chinese to bring their border down to the Indian border. This mistake could cost India dearly. China habit of committing aggression. Although Mao recognized Panchsheel and non-aggression in the Tibetan Treaty, Mao did not believe in Panchsheel.There are two principles of Chinese politics. First, their politics are constantly changing. Secondly, there is no place for any morality in their world. There is no morality. Today’s morality is not tomorrow’s morality.”

When Babasaheb resigned as law minister from the Nehru government in 1951, he gave five reasons for his resignation:

One of them was that he did not agree with the Nehru government’s poor foreign policy. While friendly relations with neighboring nations may seem appropriate at first glance, the idea of ​​trade and potential dangers should not be overlooked.

Babasaheb sincerely thought that China and Pakistan, two neighboring countries, would betray India. He had warned that India has danger from both countries in the future. Which later came true very soon. It was these two countries that imposed all the wars on post-independence India. It is because of these two countries that India has to spend heavily on defense. Dr.Babasaheb Ambedkar had also expressed concern over this.

Babasaheb was also upset over the Chinese crackdown on Buddhist-majority Tibet. In fact, both China and India have a great heritage of ancient history and culture. We have had trade relations with China for centuries. Russia had captured ten neighboring countries after World War II. Babasaheb says the aggressive nature points applies to both Russia and China.

While pursuing higher studies in economics in the United States and England, Babasaheb came in contact with many top Marxist thinkers. During that time he studied Marxism in depth. In later times, as he began to study the Buddha and explore , he moved away from Marxism which was based on a violent path. In the meantime , Democracy in China and Russia was brutally murdered , that why the true democrat Babasaheb moved away from communism.

In Mumbai in 1954, Babasaheb openly stated that he was leaving Marx, saying, “We will never leave Mahatma Phule.”

Babasaheb founded the Independent Labor Party in 1936. He was close to some communist friends at the time; However, later these Marxist groups taken away some of Babasaheb’s associates and activists.

In the 1952 LokSabha elections; But defeat Babasaheb, this betrayal by the communist leader Shripad Amrit Dange became Babasaheb’s jewel.

This communist ideology remained silent on the caste issue and also women’s issues were not their priority either.

At the World Dhamma Conference in Kathmandu, Nepal, Babasaheb asked, ‘Buddha or Marx?’ On this question he openly declared that ‘not Marx, but the Buddha is our guide’.Babasaheb has done analysis of Marxism in his writings. Even after his Mahaparinirvana, there has been a lot of discussion on this issue. Although the issue remains a hotly debated , his warning that communist China is a dangerous country so India and Indians should be

In Babasaheb’s view, the country was first. No one will support the Chinese behavior of this violent and authoritarian attitude.

@- Prof. Hari Narke


(The author, Prof. Hari Narke is a researcher in sociology and was the editor of the ‘Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches’ Volumes, published by Govt of Maharashtra)




(Ref- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886)


TIMES OF REPUBLIC
Fourth Pillar of Democracy… Get stories of Justice, Liberty, Equality & Fraternity

Disclaimer : Article captured from Prof. Hari Narke blog , Article originally is in Marathi translated to English by TOR

https://www.timesofrepublic.com/2020/06/china-is-a-burning-fire-for-democracy-threat-of-chinese-aggression-to-india/

Last Updated on June 22, 2020 at 2:55 am

गौतम वाव्हळ यांच्या भिंतीवरून साभार-


प्रा. हरी नरके सर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले या सूर्याची किरणं प्राशन केलेला, क्रांतीज्योती सावित्रीच्या कुशीत जन्मलेला, छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली वाढलेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी हाती धरून समाजातील जातीभेद, विषमता यावर आसूड ओढणारा एक व्यासंगी लेखक, वक्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंडाचे संपादन करण्यामध्ये मोलाची कामगिरी पार पाडणारा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य व विचार यांचा इत्यंभूत शोध घेऊन, संशोधन करून ते ग्रंथबद्ध करून ही शिदोरी आम्हां बहुजनांच्या पुढ्यात मांडणारा एक सच्चा फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारा खंदा कार्यकर्ता आज आपल्यामध्ये आहे. त्यांच्याबद्दल काही नाठाळ व उपटसुंभ लोक सोसियल मीडियावर गरळ ओकताना दिसतात, त्यांचे लेख चोरून शेअर करून वरून शिरजोरी करून त्यांना असभ्य भाषा वापरताना दिसतात. ही अंडफळ आम्ही फोडून काढू. बावळटांनो थोडी तरी अक्कल शाबूत राहुद्यात. आपण कोणाशी बोलतोय ? काय बोलतोय ? आपली लायकी काय ? पंधरा ओळींचा निबंध लिहिताना गांडीला घाम फुटत असेल, सोसियल मीडियावर स्वतः ला तत्त्ववेत्ते म्हणऊन घ्यायचेच असेल तर प्रथमतः पुरेपूर शिक्षण घ्या, चौफेर वाचन वाढवा, व्यासंगी बना, लेखक बना, विचारवंत बना. कोणाचेही विचार वा लेखन कॉपी करा, शेअर करा परंतु ते त्याच्या नावानिशी करा. त्याचे विचार शेअर करावे तर वाटतात मग त्याचा नावाचा तिटकारा का असतो. ही नकारात्मक पिल्लावळ तयार करणारे खेटरखाऊ केडर बंद पाडली पाहिजेत. हे असले आडमुठे, मुजोर आणि शिवराळ व गावंढळ डोळ्यावर ढापणे लावलेले बैलांचे अंड मला चांगले ठेसता येतात. आदरणीय नरके दादा तुम्ही तर तुमच्या शब्दांनीच या नीचांना योग्य रस्ता दाखवलेला आहे उरला सुरला आम्ही त्यांना ठेसून दाखवू.
- गौतम वाव्हळ
https://www.facebook.com/profile.php?id=100049258984302&__xts__[0]=68.ARC02QOeUyYqPYTq7FSQL1tOWEJco5LPKPOK46JM_82Y3aG-qEXfNqfKPQ3hDMCaXSIytNftYQO__HNF6ap5v2MK_7JvEP2M58uryMGEjlOquQY_tcVb0heT1bBGa-ouIIZ5l5nAGtqoZjkkh4Af9z_K1aq7JRt8L54tEQobqFFHCk_aMhz8TKb0jj8QGkocn3uwJT0DCO0fdsl3flXnF3qEmqAG75urxqphFqKt4Kqe67XYjnvWoZhb7fzPH06xHTtGSEPL8gIrlVjxryXKpEF2Vza021-6P7Ka2UYHb6wzSRgoG2B-cneLr9wi5S2m89Ln8Q&__tn__=HH-R-R

Sunday, June 21, 2020

फेसबुकवरील वाड्मयचौर्य - प्रा. हरी नरके












फेसबुकपोस्टच्या चोर्‍यामार्‍यांचे प्रमाण अलिकडे फारच वाढल्याचे आढळते. मित्रमैत्रिणींच्या चांगल्या पोस्ट ढापायच्या आणि स्वत:च्या नावाने स्वत:च्या भिंतीवर चिकटवायच्या हा प्रकार बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. याचे काही उपप्रकारही आढळतात.
उदा.

१ ) मूळ लेखकाचे नाव डिलीट करायचे आणि त्यात किरकोळ फेरबदल करून लेख स्वत:च्या नावावर खपवायचा.

२) मूळ लेखकाचे नाव काढून टाकून लेख आपल्या भिंतीवर प्रकाशित करायचा. मूळ लेखकाचे नाव नसल्याने व लेख तुमच्या भिंतीवर प्रकाशित झाल्याने सामान्य वाचकांचा असाच समज होतो की लेख तुमचाच आहे. मग लोक तुमच्या कौतुकाच्या कमेंट करतात, त्यांना लाईक मारायचे. जर कुणी मूळ लेखकाचे नाव कमेंटमध्ये लिहिलेच तर त्या उडवायच्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे.


३) यदाकदाचित चोरी पकडली गेलीच, माझा लेख माझे नाव गाळून का प्रकाशित केला अशी मूळ लेखकाकडुन विचारणा झालीच तर मला हा लेख मला बिननावाचाच मिळाला होता अशी सारवासरव करून आपली लबाडी झाकायची. समजा तुम्हाला हा लेख बिननावाचा मिळाला होता तर तुम्ही तो लेख आपल्या भिंतीवर टाकताना "लेखक अज्ञात, किंवा लेखक माहित नाही" असे का लिहिले नाही?

कपिल सरोदे नावाचे एक वकील आहेत. त्यांनी माझा " डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि करोना" हा लेख स्वत:च्या भिंतीवर माझे नाव वगळून टाकला. हा लेख भीमजयंतीच्या निमित्ताने मी १४ एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता व तो महाराष्ट्र टाइम्स, सामना, बहुजन शासक या व इतर अनेक दैनिकांनी प्रकाशित केलेला होता. आंबेडकरी डॉट कॉम व इतर काही वेबसाईटवरही तो आलेला होता. शिवाय माझ्या तिन्ही फेबु खात्यांवर, पेजवर व ब्लॉगवर ही तो टाकलेला होता. ही दोनच महिन्यापुर्वीची ताजी घटना आहे. वकील असल्यामुळे सरोदे यांना असे करणे हा बौद्धिक सम्पदा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे माहित आहे.

माझ्या काही मित्रांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आणून दिली. मी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर दिलगिरी राहिली बाजूला त्यांनी माझ्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या. कपिल सरोदेंचा अजब खुलासा पुढीलप्रमाणे "किती मरता नावासाठी. मला नावच जर टाकायचे असते तर मि माझे नाव नसते का टाकले, तुमच्या सारखे नावसाठी मारणारे लोकच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वतःच्या नावाने छापतात तेव्हा बरे वाटते का तूम्हाला, माझी प्रतेक पोस्ट चेक करा मि माझे नाव टाकल्याशिवय शेर करत नाही, आणि जी पोस्ट मि शेर केली जी तुमही तुमची आहे असे बोलता, त्यात 90 % विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. मग तुम्हीं इतके विद्वान झाले का बाबसाहेबांचे विचार स्वतःच्या नावाने खपवायला?" ते पुढे असेही म्हणतात, " आपला काही तरि गैरसमज होतोय, पहिला विषय तर तो लेख मला जसा मिळाला तसा मि माझ्या वॉलवर टाकला आहे, त्यात तुमचे नाव नव्हते. मला तो लेख तुमच्या नावाविनाच मिळाला होता, यातील दूसरा विषय, म्हणजे तुमच वाङ्गमय वैगेरे हे तुमच्या ठिकाणी राहुदया मला तो लेख माझ्या नावाने टाकायचा असता तर मि त्यात माझे नाव स्पष्ठ शब्दात टाकले असते. मि तुमच्या सारखा नावसाठी हापापलेला नाही. आणि हो मा. नरके आपन त्या लेखात जे विचार लिहिले आहेत ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुमच्याकडे मकतेदारी कुणी दिली?" त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, " अरे रे रे नरके तुमच्या बुद्धिची कीव येते राव! "


त्यांचा खुलासा अजिबात पटण्याजोगा यासाठी नाही की त्यांच्या कमेंटमध्ये त्यांना Sandip Khillare, योगेश वाघमारे, Kunal Gajghate, Sachin Kalambe, Atul Gawali, Mangesh Sasane, Kuldeep Ramteke अशा अनेकांनी लिहिले होते की हा लेख प्रा. हरी नरके यांचा आहे, तुम्ही मान्य करा आणि विषय संपवा, पण तरिही त्यांनी तशी दुरुस्ती केली नाही, की मान्य केले नाही. उलट त्यांनी तिकडे साफ दुर्लक्षच केले. त्यांना तेव्हाच आजचा खुलासा करता आला असता.

माझे नाव वगळुन टाकल्यामुळे लेख त्यांचा स्वत:चा असल्याचा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. हे कायद्यात बसते?


हा लेख चांगला आहे, कुणाचा आहे अशी काहींनी त्यांचाकडे कमेंटमध्ये विचारणा केली तेव्हाही ते गप्प बसले. अनेकांनी त्या लेखाबद्दल सरोदेंचे कौतुक केले त्यांना सरोदेंनी लाइकही केले.


शेवटी मीच त्यांना हा लेख माझा आहे असे लिहिल्यावर मात्र त्यांचे उत्तर आले. दिलगिरी सोडा उलट अरेरावी आणि मूळ लेखकावरच / माझ्यावरच त्यांनी दोषारोप केले. आताही एव्हढे सगळे खुलासे-प्रतिखुलासे झाल्यावर अजूनही त्यांनी लेखावर माझे नाव टाकलेलेच नाही.


असे बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्य करणार्‍या लोकांना खंतखेद तर वाटतच नाही, ते नैतिकतेवरची प्रवचने चालूच ठेवतात हे जास्त त्रासदायक आहे.


आपले काही मित्रही या कृत्याचा निषेध करण्याऎवजी दुर्लक्ष करा हो, असा आपल्यालाच सल्ला देतात हे तर जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे. काय दुर्लक्ष करा? समोर माणूस वाड्मयचौर्य करतोय आणि तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा असे सांगताय म्हणजे तुम्ही चोरीला मदत करताय, प्रोत्साहन देताय असे वाटत नाही तुम्हाला?


-प्रा. हरी नरके,
२१/६/२०२०


Ref: कपिल सरोदे - https://www.facebook.com/Kapil-Sarode-112733103738395/ 

Friday, June 19, 2020

चीन हा लोकशाही जाळणारा वणवा : भारताला चीनच्या आक्रमणाचा धोका- प्रा. हरी नरके












साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे, असा परखड इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी दिला होता.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. १९६२ साली ज्या गलवान खोर्‍यावरून चीनने आक्रमण केले होते तोच मुद्दा पुढे करून चीनने आपल्या २० बहादूर जवानांचे लाखमोलाचे जीव घेतलेले आहेत. सीमेवर पेट्रोलिंग करताना शस्त्र सोबत असले तरी फायरिंग करायची नाही म्हणुन आपल्या जवानांनी गोळीबार केला नाही असे परराष्ट्रमंत्री म्हणतात. कुणाचा जीव घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर तो क्षम्य असतो, मग चीनचे जवान आपल्या सैनिकांवर दगडगोटे, तीक्ष्ण हत्त्यारे, यांचा मारा करीत असताना त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करता आला असता, मग त्यांना कोणी रोखले याचे उत्तर मिळालेले नाही. राज्यसभेत परराष्ट्रनीतीवर बोलत असताना बाबासाहेबांनी काढलेले उद्गार सुरूवातीला मी दिलेले आहेत. पंतप्रधान नेहरू बाबासाहेबांचे भाषण काळजीपूर्वक ऐकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.


आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर गेला आहे. बाबासाहेबांची भाषा वापरून सांगायचे, तर या वणव्यात सारे जग होरपळत असून, चीनच्या चुकीची शिक्षा भारतासह साऱ्या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला, की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला, यावर आरोपप्रत्यारोप होत आहेत. चीनने लादलेल्या या जैविक महायुद्धामुळे सारे जग पोळून निघाले आहे.


चीनचे लालभाई सत्ताधीश अतिमहत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीश क्रूरकर्मा आणि रानटी आहेत, हे वेगळे सांगायला नको. आज गलवान खोर्‍यावर कब्जा करायला पुढे सरसावलेला चीन अतिदुष्ट साम्राज्यवादी आहे हे अनेकवार सिद्ध झालेले आहे. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार (व्हेटो), हे सारे बघितले की चीन शेजारी देशांवर आक्रमण करू शकतो हे सिद्ध होते. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात.


जगातील सगळी प्रगत राष्ट्रे आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीतीही असू शकते.


डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा, की त्यांनी साडेसहा दशकांपूर्वीच भारताला याबाबत जागे केले. 'साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नीतीमत्ताही नको असते.


माओ हा चीनमध्ये तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, ती पाहता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच दिसते. भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी,' असेही बाबासाहेब म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, 'साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

चिनी राजनीतीची दोन तत्त्वे आहेत. पहिले, त्यांची राजनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे, त्यांच्या जगात कोणत्याही नीतीला मुळी जागाच नसते. आजची नीती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झाला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात, त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे.'

नेहरू सरकारमधील कायदेमंत्रिपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली,

त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले, तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये.

बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते, की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून धोका आहे, असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकर खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च करावा लागतो आहे. याबाबतही बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षण धोरणात भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौद्धबहुल तिबेटची जी ससेहोलपट केली, त्यावरही बाबासाहेब अतिशय नाराज होते. खरे तर चीन व भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे. चीनशी आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध आहेत. रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो, असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले उच्च शिक्षण घेताना, बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले, तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्या करण्यात आली, त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.


१९५४ साली मुंबईत 'आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही,' असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले.

बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची १९३६ साली स्थापना केली. त्यावेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती; मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२च्या लोकसभा निवडणुकीत मते कुजवा; पण बाबासाहेबांना पराभूत करा, हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला.
कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातिप्रश्नावर मात्र मौन बाळगत असे. स्त्रीप्रश्न हाही त्यांना अग्रक्रमाचा नव्हता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी 'बुद्ध की मार्क्स?' या प्रश्नावर जाहीरपणे 'मार्क्स नाही, तर बुद्धच आपला मार्गदाता' असल्याचे घोषित केले.
मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झाली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला, तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने आणि भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे, हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.
बाबासाहेबांच्या दृष्टीने देश सर्वप्रथम होता. या  हिंसक आणि हुकूमशाही वृत्तीच्या चिनीच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)

Thursday, June 18, 2020

विवेकवादी गोपाळ गणेश आगरकरांचा १२५ वा स्मृतीदिन : प्रा. हरी नरके









वयाच्या अवघ्या ३९ व्या  वर्षी  अकाली वारलेल्या गोपाळराव आगरकरांना जाऊन काल १२५ वर्षे झाली.          (जन्म, टेंभू, सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, १७ जून १८९५)  कोरोना आणि एकुणच मराठी समाजाचा आगरकरांबद्दलचा थंडपणा यामुळे त्यांचे स्मरण फारसे कोणाला झाले नाही. हेही आपल्या रितीला धरूनच झाले म्हणा! आगरकरांनी ज्या मध्यमवर्गीयांच्या सुधारणेसाठी आपली हयात घालवली त्यांनी आगरकरांचा विचार स्विकारला, त्यानुसार उच्चशिक्षण घेतले, आधुनिक राहणीमान, जीवनमान स्विकारले पण आगरकारांचं नाव मात्र टाकून दिलं. विचारसुद्धा सगळा नाही घेतला. सोयीचा तेव्हढा घेतला. त्यांचा ध्येयवाद, त्यांचे समर्पण नाही घेतले. त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवाद नाही घेतला. त्यांच्या विवेकनिष्ठेऎवजी त्यांच्या विरोधकांचा धार्मिक उन्माद आणि तुच्छतावाद मात्र आवर्जून घेतला. विज्ञाननिष्ठा नाकारली आणि पुरोहितशाहीची  मानसिकता घेतली.

अशा आप्पलपोट्यांसाठी आगरकर हकनाकच गेले म्हणायचे. आगरकर विवेकवादी होते. ते गरिबीतून कष्टाने शिकले. उत्तम सरकारी नोकरी आणि छान कमाई झाली असती तर तिच्यावर पाणी सोडून मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात, स्त्रियांनी आधुनिक केशभुषा, वेशभुशा स्विकारावी, भरपूर शिकावे, कर्तबगारी गाजवावी, बालविवाह करू नयेत, विधवांचे पुनर्विवाह सन्मानाने व्हावेत, विधवांचे केशवपन करू नये, सती जाण्याची गरज नाही हे विचार लेखनाद्वारे मांडीत राहिले.  त्यावरून टिळकांशी मतभेद झाल्यावर आपला स्वत:चा "सुधारक" हा पेपर काढून विचारकलहाला घाबरू नका, चर्चेमुळे, वादविवादामुळे समाज समृद्ध होतो, मराठी माणूस हा मुलत: कलहशील आहे. कळवंड करणारा, भांडकुदळ आहे, त्याला चेतवित राहिले. जागवित राहिले.

"सुधारक" या पेपरला ब्राह्मणवाद्यांचा किती विरोध असावा? पुढे फाशी गेलेल्या चाफेकर बंधूंनी सुधारकाच्या संपादकाला अंधारात गाठून मारहाण करण्यासाठी तरूण हवेत अशी जाहीरातच वर्तमानपत्रात दिलेली होती.

ते आधी केसरी, मराठाचे व नंतर सुधारकाचे संपादक असताना लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकरंजन हे सुत्र उराशी बाळगून लिहित राहिले. कोल्हापूरच्या शिवाजीराजांना ब्राह्मण दिवाण बर्वे त्रास देत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. बर्व्यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. ब्रिटीश कोर्टाने दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. त्याकाळचे (१८८०-८१) दहा हजार रुपये म्हणजे आजचे सुमारे दहा कोटी रुपये. अशा संकटाच्या घडीला त्यांनी रात्री अकरा वाजता तार केली. मदत मागितली. महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावले. सत्यशोधक समाजाचे खजिनदार रा. बा. उरवणे यांनी रोख दहा हजार रुपये मुंबईला कोर्टात पोचते केले. पुढे टिळक-आगरकरांना न्यायालयाने साडेतीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ते सुटले तेव्हा जोतीरावांच्या सुचनेवरून सत्यशोधकांनी डोंगरीच्या तुरूंगाबाहेर जल्लोश केला. एका रथातून त्यांची मिरवणूक काढली. त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. हे सगळे खुद्द टिळकांनीच पुढे केसरीत लिहिलेय. तिथूनच मी हे उद्धृत करतोय. (पाहा: केसरी, ३ ऑक्टोबर १८८२)

जोतीरावांनी त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद असतानाही कायम त्यांना पाठींबा दिला, सहकार्य केले. विवेकवादी असूनही आगरकरांची वैचारिक भुमिका  ही होती की, "जे काही करणे ते मूळ आर्यत्व न सांडता करावे," याच्याउलट फुले आर्यत्वाचे कणखर विरोधक होते.

लोकहितवदी, न्या.रानडे, आगरकर, कर्वे ही भलीच माणसं होती. पण महापुरूषांनाही मर्यादा असतातच. काही काळाच्या, काही स्वत:च्या. आगरकरांनी ज्या कुटुंबसुधारणेचा ध्यास घेतला होता ती आता बर्‍यापैकी साध्य झालेली आहे. लोकहितवादी आयुष्यभर लोकहितार्थ झटले. पण त्यांची लोकांची कल्पना बघितली तर ती सर्वसमावेशक दिसत नाही. ती लोक म्हणजे अभिजन अशी मर्यादित दिसते, अशी टिका ख्यातनाम इतिहासकार अरविंद देशपांडे यांनी केलेली आहे. (पाहा: महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, १९९८, पृ. ५ ) न्या. रानडे प्रकांडपंडीत होते. सुधारक होते. पण व्यक्तीगत जीवनात सुधारणा करताना पाय मागे घेणारे होते असे त्यांचे चरित्रकार न.र.फाटक सांगतात. ( पहिली बायको वारल्यावर विधवेशी लग्न करण्याऎवजी ९ वर्षांच्या मुलीशी जिल्हा न्यायाधिश असलेल्या ३२ वर्षांच्या रानड्यांनी लग्न केले.) कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी काम केले पण फक्त ब्राह्मण विधवांसाठीच ते काम करीत राहिले.

या पार्श्वभुमीवर जोतीराव फुले यांची समाजक्रांतीची भुमिका या समकालिनांना पेलवली नाही. या विवेकी माणसाने जोतीराव वारले तेव्हा ती बातमीही दिली नाही. टिळकांनी दिली नाहीच पण आगरकरांनीही सुधारकात ती दिली नाही याबद्दल इतिहासकार य. दि. फडके यांनी खेद व्यक्त केलेला आहे. जोतीराव धर्मांतर करून कधीही ख्रिस्ती झाले नाहीत. त्यांनी "सत्यधर्मा"ची मांडणी केली. तरिही आगरकर त्यांना "रेव्हरंड जोतिबा" असे हिनवतात. आगरकरांचे भावविश्व शहरी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात शेती, शेतकी, शेतकरीजगत यावर फारसे काही लिहिलेले आढळत नाही.


सामाजिक समता, स्त्री-पुरुषसमता आणि विज्ञान‌निष्ठा‌ ही आगरकरांची जीवनमुल्ये होती.  ते बाळ गंगाधर टिळकांचे समकालीन, आधी मित्र आणि नंतर कट्टर विरोधकही. ते केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टिळक व आगरकर एकत्र आले. दिनांक १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. आगरकर १८८१ मध्ये एम.ए. झाल्यावर या शाळेत शिकवू लागले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे  टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

ते थोर प्रबोधनकार होते. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मुल्यांवर आधारलेला मराठी समाज उभा राहावा यासाठी ते झुंजले. महाराष्ट्रसमाजाला समाजपरिवर्तन, विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देण्यासाठी ते बोलत-लिहित राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळावी या कारणे त्यांनी देह झिजवला. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगु नये असा प्रचार ते करीत राहिले. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, आधुनिक पादत्राणे वापरली पाहिजेत, स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करावे हे आज सहज स्विकारले गेलेले विचार ज्याकाळात समाज नाकारीत होता तेव्हा आगरकर भांडत होते. ज्यांच्यासाठी ते भांडत होते त्यातल्या ९९ टक्क्यांना मात्र याची आज जाणीवसुद्धा नाही. आठवणीचा मुद्दाच नाही.

आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा? या वादात ते आधी समाजसुधारणा या मताचे होते. त्यांचे सुधारक हे वर्तमानपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काहीकाळ ना. गो.कृ. गोखले यांनी सांभाळली होती.

बुद्धीला जे पटेल ते बोलणार व शक्य ते आचरणात आणणार हा त्यांचा बाणा होता. " विचारकलह" हा समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्याचे ते पुरस्कर्ते होते. त्यावेळी सनातनी आजच्यासारखेच आक्रमक होते. संघटित होते. हिंसकही होते. ब्रिटीश राज्य असले तरी सामाजिक जीवनात अजूनही पेशवाईच होती. त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांनी सर्व सुधारकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी आगरकर गेले.

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात १९३४ मध्ये आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

आज त्यांच्या नावे काही पुरस्कारही दिले जातात. साहित्य संस्कृती मंडळाने तीन खंडात आगरकर-वाङ्मय प्रकाशित केलेले आहे. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह प्रा. ग.प्र. प्रधान यांनी संपादित केलेला असून त्याचे प्रकाशन साहित्य अकादमीतर्फे झालेले आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे य.दि.फडके यांचे पुस्तक व विश्राम बेडेकरांचे "टिळक-आगरकर" हे नाटक प्रसिद्ध आहे. "डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस", हे आगरकरांचे स्वत:चे अनुभवकथन व त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत केलेले भाषांतर ’विकार विलसित’ वाचनीय आहे.

या विवेकपुरूषाला विनम्र आदरांजली.

- प्रा. हरी नरके, १८/६/२०२०



Wednesday, June 17, 2020

तुम्ही बघितलाय असा माणूस कधी?

आत्महत्त्या हा भेकडपणा आहे, सुशांतसिंग तू हरलास, अशा आशयाच्या बर्‍याच पोस्ट पाहिल्या. आत्महत्त्या करणाराला डरपोक, भित्रा, भेकड ठरवणारे शून्य मिनिटात निकाल सुनावून मोकळे होतात. जो गेला त्याच्या मनात त्यावेळी किती कोलाहल माजलेला असेल! अशा टोकाच्या निर्णयाला माणूस गंमत म्हणून तर नक्कीच येत नसणार. तुम्ही बघितलाय असा माणूस कधी? मी बघितलाय. तुमच्या वाट्याला असे लढाईचे प्रसंग आलेयत वारंवार? ज्यांना सुखही टोचतं त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये.

" दि ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी" ही नोबेल पुरस्कारविजेती कादंबरी लिहिणार्‍या अर्नेस्ट हेमिंग्वेने आत्महत्त्या केली होती. या कादंबरीत जगण्याचा अतुलनीय संघर्ष चित्रित करणारा हा प्रतिभावंत कादंबरीचा शेवट आशावादी करतो, मात्र व्यक्तीगत जीवनात त्याला जगणे संपवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. हे त्याच्यासाठी किती यातनादायी, गुदमरवणारे असेल.
जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे मातृहृदयाचे साने गुरुजी आत्महत्त्या करतात ती फक्त हारजीत या मोजपट्टीत बसवता येईल? अस्पृश्यांच्या पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी आयुष्य पणाला लावणारे लढवय्ये गुरुजी भेकड असतील?
दुरितांचे तिमिर जाओ जो जे वांछिल तो ते लाहो अशी प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्वर, लहान वयात जग आणि जगणे यांच्याबद्दलची अतुलनीय समज असणारे तत्वज्ञ, इतक्या कोवळ्या वयात समाधी घेतात म्हणजे जगणे थांबवतातच ना? बालपणी सामाजिक छळाला सामोरे जाणारे योद्धे ज्ञानोबा आयुष्याच्या प्रारंभालाच थांबायचा निर्णय घेतात तो घाबरून असेल?

काय आणि किती घालमेल असेल ना? सगळेच निरर्थक वाटायला लागणे हा डरपोकपणा आहे की जगण्याच्या नजरेला नजर भिडवणं? किती घनघोर लढाई केली असेल त्यांनी मनामेंदूत.
मी आत्महत्त्येचं समर्थन करत नाहीये. आत्महत्या हे उत्तर नव्हे हे मलाही मान्यच आहे. मात्र जेव्हा जीवनरसच आटतो, तेव्हाची उलघाल,घुसमट समजून घ्यायचा प्रयत्न तर कराल? इतक्या असंवेदनशीलपणे निकाल सांगून मोकळे होऊ नका, थोडं त्यांनाही समजून घ्या इतकंच मला म्हणायचं आहे. जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणं काय असतं, सलग तीनवर्षांचे दुष्काळ, नापिकी, कर्जापोटी होणारी मानहानी, वाट्याला आलेली लाचारी, कुटुंबाचे होणारे हाल ह्या सगळ्या जगण्याला भिडणं, ते चिमटीत पकडणं हे येरागबाळ्याचं काम आहे काय?

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं संत तुकाराम सांगूनच गेलेत. जीवनात सुख जवापडे, दु:ख पर्वताएव्हढे हेही खरेच आहे. मात्र ज्यांच्या वाट्याला जवाएव्हढेही सुख येत नाही, जे सततच्या लढायांनी दमून जातात, थकून गलितगात्र होतात, परिस्थितीचं पाणी ज्यांच्या नाकातोंडात जातं त्यांना पाण्याबाहेरच्यांनी, "तुम और लडो", असं कोरडं, पुस्तकी सांगायला काय जातं? जीवनेच्छा/जगण्याची प्रेरणा ही सर्वात चिवट असते. तिच्यावरही मात करणारांकडे करूणेने पाहायला नको? त्यांच्याकडे सखोलपणे, चौफेरपणे बघायला हवे, त्यांच्यासाठी आणखी थोडी सहानभुतीची भावना मनी वसू द्यावी इतकेच..

-प्रा. हरी नरके, १६/६/२०२०

Monday, June 15, 2020

प्रयोगशील शिक्षणव्रती : लीलाताई पाटील - प्रा. हरी नरके











कोल्हापूरला शिक्षणाच्या क्षेत्रातील सृजन आनंद हा मौलिक प्रयोग साकारणार्‍या लीलाताई पाटील यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. लिलाताई या महत्वाच्या आणि कृतीशील शिक्षणतज्ञ होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे भाचे बापूसाहेब पाटील आणि लिलाताई हे जोडपे म्हणजे धडपडणारे, प्रयोगशील आणि निष्ठावंत दाम्पत्य. सारे आयुष्य त्यांनी सामाजिक कार्याला आणि शिक्षणाला वाहिलेले होते. बापूसाहेब स्वभावाने मृदू तर लिलाताई कडक, करारी आणि स्पष्टवक्त्या. सृजन-आनंद ही महाराष्ट्रातली प्रयोगशील शाळांची सुरूवात होय. सुमारे ४० वर्षांपूर्वी लीलाताईंनी आनंददायी शिक्षणाचा हा प्रयोग सुरू केला, त्यापासून प्रेरणा घेऊन पुढं राज्यभरात असे काही प्रयोग झाले.


मी वयाच्या विशीत असताना त्यांची माझी ओळख झाली. कोरगावकर ट्रस्टच्या सहकार्याने विषमता निर्मुलन शिबीर कोल्हापूरला घेण्यात आलेले होते. एका सत्राच्या अध्यक्षा लिलाताई होत्या. त्या नामवंत महिला प्राचार्या म्हणुन त्यांचा फार दबदबा होता. मी तेव्हा अतिशय भाबडा आणि भावनाशील होतो. चळवळीबद्दल कमालीचा संवेदनशील. जात, वर्ग, लिंगभाव याबाबतची माझी मतं निव्वळ पुस्तकी, ऎकीव आणि बावळट अशी होती.


मी  एक नवखा वक्ता होतो. मी काय बडबडावं? " स्त्रिया जर सरकारी नोकरीत आल्या तर भ्रष्टाचार कमी होईल, त्या गोरगरिबांना मदत करतील, त्या पुरूषांपेक्षा जास्त तास काम करतील. त्या कामचुकारपणा करणार नाहीत, खोटं बोलणार  नाहीत. इ..इ." मला त्याकाळात मागासवर्गीय, स्त्रिया, वंचित समाजघटक, विशेषत: भटके विमुक्त यांच्याबद्दल अतिव कळवळा होता. माझी त्यांच्याबद्दलची मतं अनुभवावर आधारलेली नव्हती. पुस्तकी आणि अव्यावहारिक होती. हे अर्थात खूप नंतर कळत गेलं.


आजच एका मित्राने शेयर केलेली एक पोस्ट वाचली. लग्नाच्या मेळाव्यात मुली कशा खर्‍या आणि प्रामाणिक बोलणार्‍या होत्या तर मुले कशी लबाड, खोटी आणि बेगडी होती, वगैरे. एका तथाकथित स्त्रीमुक्तीवादी बाईंची ती पोस्ट होती. सरसकटीकरण, भाबडेपणा आणि भंपकपणा यांचा अस्सल नमुना.


तर तेव्हा माझी अशीच मतं असायची. अध्यक्ष म्हणुन बोलताना लिलाताईंनी माझी चांगलीच सालटी काढली. "तुम्हाला कुणी सांगितलं की बायका भ्रष्टाचार करणार नाहीत? बायका कामचुकार नसतात हे कशाच्या आधारे तुम्ही ठरवलं? मी एक स्त्री आहे आणि माझा अनुभव आणि अभ्यास सांगतो की कामचुकारपणा, लबाड्या, भ्रष्टाचार यात कशातच बायका पुरूषांना हार जाणार्‍या नाहीत. तुम्ही लहान आहात म्हणून ठीकाय. तुमची मतं मी खोडून काढते आणि ती निराधार व बालीश असल्याचे स्पष्ट करते."

बाप रे! जाहीरपणे मला त्यापुर्वी कुणी असं सटकावलेलं नव्हतं.


बापूसाहेब माझ्या शेजारीच बसलेले होते. त्यांचा चेहरा गोरामोरा झालेला. माझा हात हातात घेऊन ते मला म्हणाले, " आमची लिला अतिच फटकळ आहे. तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मनानं ती चांगली आहे. तिच्या स्वभावातला हा काटेरीपणा सदाशिवपेठी, फडकेमठाचा आहे."


तेव्हा मला कळले की लिलाताई ह्या सुप्रसिद्ध कादंबरीकार ना.सी.फडके यांच्या कन्या होत्या. ना.सी. फडके यांच्या पहिल्या पत्नीची लिलाताई ही मोठी मुलगी. ना.सी.फडके यांनी दुसरा विवाह केल्यानंतर लिलाताई आणि त्यांच्या आईची परवड झाली. मी ना. सी.फडक्यांचा त्या वयात चाहता होतो. माझ्या शाळेशेजारीच त्यांचा बंगला होता. मी त्यांच्याकडे जात येत असे. ते मला खूप मायेने वागवायचे. तेव्हा शाळकरी वयात माझे अतिशय आवडते कादंबरीकार असलेले ना. सी. फडके आज मला दुय्यम दर्जाचे कादंबरीकार वाटतात. कालबाह्य. कारागीर. तर असो.


बापूसाहेब व लिलाताईंचा  आंतरजातीय विवाह होता. कार्यक्रम संपल्यावर लिलाताई माझ्याजवळ आल्या नी मला म्हणाल्या, " आज संध्याकाळी आमच्या घरी चहाला या. तुमचा भाबडेपणा तुम्हाला एक दिवस गोत्यात आणेल." लिलाताईंनी वर्तवलेले हे भविष्य पुढे तंतोतंत खरे ठरले. बापूसाहेबांनीपण मला चहाला येण्याचा आग्रह केला.


संध्याकाळी मी घरी गेल्यावर लिलाताईंनी माझे बौद्धिक घेतले. त्यांचे म्हणणे मला तेव्हा फारसे पटले नसले तरी पुढे मंत्रालयात काम करताना लिलाताईच कशा बरोबर होत्या त्याचे प्रत्यंतर मिळत गेले.


पुढे सामाजिक जीवनात वावरताना मागासवर्गियांचे काही नेते किती धंदेवाईक व क्रूर असतात याचे धडे मिळत गेले. त्यांच्या गुन्हेगारी वर्तनाचे जबरदस्त चटके बसले. त्यांच्या आईतखाऊपणाने खूपच पोळलो. जवळच्या म्हणवणारांनी चळवळीच्या नावावर सरळ विश्वासघात केला. इतके सराईतपणे लुटले, केसाने गळा नी खिसा कापून वर कांगावा असा केला की तेच ऋषीमुनी! चळवळ आणि व्यक्तीगत जगणे यातला रसच संपावा अशी ती वेळ होती. सगळा जीवनरस करपवणारा तो अनुभव कधीही विसरणं शक्य नाही. वैचारिक सामाजिक भुमिका जरी फारशी बदलली नाही तरी तिच्यातला "सब घोडे बारा टक्केवाला सरसकटीकरणाचा" आंधळेपणा निघून गेला.


केस टू केस मेरिटवरच ठरवावं लागतं कोणतंही प्रकरण. त्यामुळे आधी शोध घेतल्याशिवाय मत बनवणं हा मुर्खपणा असतो हे कळत गेलं. स्त्रिया, मागासवर्गिय हे सगळेच मुळात माणूस असल्याने तेही माणसासारखेच बनेल, लबाड आणि क्रूर असू शकतात. काकणभर सरसच असतात हेही कळत गेले. शेवटी सगळी माणसंच आहेत हेच एकमेव अंतिम सत्य. त्याचा पहिला धडा चाळीस वर्षांपुर्वी लिलाताईंनी दिला.


 वीस वर्षांपुर्वी प्रा. रामकृष्ण मोरे यांनी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी लागू केले. मी ज्या परिवारात होतो, आहे तिकडचे बहुतेक सगळेच या निर्णयाच्या विरोधात होते. खूप आक्रमक टिका झाली. मी टेल्कोत असल्याने इंग्रजीअभावी कार्पोरेटमध्ये बहुजन मुलांचे कसे आणि किती हाल होतात ते बघत होतो.


मी मोरेसरांसोबत राहिलो. त्याकाळात मी पहिलीपासून इंग्रजीच्या बाजूने १४० सभा घेतल्या. सगळं राज्य पिंजून काढलं. कोल्हापूरची सभा कुडीत्रे येथे रात्री २.३० वाजता झाली होती. साधनाच्या अंकातली मोरेसरांची मुलाखत मी घेतलेली होती. खरं म्हणजे तिचं सगळं ड्राफ्टींगच माझं होतं.


त्या माझ्या भुमिकेवर लिलाताई संतापल्या. पुण्यातल्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली. त्या माझ्यावर इतक्या चिडल्या होत्या की त्यांना बोलायला शब्दच सुचेनात. त्या रागाच्या भरात मला खूप टाकून बोलल्या. शिक्षणक्षेत्रातील त्या अधिकारी व्यक्ती होत्या. दुर्बलांचे शिक्षण हा त्यांचा ध्यास होता. "अंग्रेजी हटाव" हा लोहियांचा नारा समाजवाद्यांना प्रिय होता. त्यांचे बोलणे तळमळीचे होते. मला पटले नाही म्हणून काय झाले? त्यांना सरकारवर नी माझ्यावरही टिका करण्याचा अधिकार होता. त्यामुळे मी ते बोलणे मनाला लावून घेतले नाही. कारण २० वर्षापुर्वीचे त्यांचे सल्ले मला एव्हाना पटायला लागले होते. त्या आईच्या मायेनं संतप्त होऊन बोलत असाव्यात असेच मी मानले.


त्यांच्या मते " मंत्री मुर्ख असतात, मोरेसरांचा सगळा थिंकटॅंक तू आहेस. तू त्यांना चुकीचा सल्ला दिलायस." हे मात्र खरे नव्हते. मी सरांच्या जवळ असलो तरी तो निर्णय त्यांचाच होता.


मोरेसर अतिशय बुद्धीमान होते.पहिलीपासून इंग्रजीची कल्पना त्यांचीच होती. हे खरेय की मी आणि त्यावेळचे शिक्षण सचिव रमेशचंद्र कानडे आम्ही तासनतास मोरेसरांसोबत बसून त्या धोरणाचे तपशील ठरवलेले होते. आम्हाला त्यावेळी सहकार्य करणार्‍या शिक्षणतज्ञ मीनाताई चंदावरकर यांचा अपवाद वगळता तमाम समाजवादी, शिक्षणतज्ञ ही सगळीच जमात या निर्णयाच्या विरूद्ध होती.


आज २० वर्षांनंतर कोण चुकले, कोण बरोबर होते याचे मूल्यमापन व्हायला हरकत नसावी.

विनम्र आदरांजली!!

- प्रा.हरी नरके,
१५/६/२०२०



अधिक वाचनासाठी-

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांचे निधन

प्रयोगशील, नाविन्यपूर्ण शिक्षण चळवळीच्या प्रणेत्या आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक लीलाताई पाटील यांचे कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. स्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कन्या असलेल्या लीला ताईंचा २८ मे १९२७ ला जन्म झाला. त्या राष्ट्र सेवा दल आणि १९४२ च्या चले जाव या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पाटील यांच्याशी त्यांनी त्या काळामध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला.
त्यांनी कला शाखेत शिक्षण घेऊन १९४९ साली शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. पुढे त्यांनी शिक्षण शास्त्रामध्ये शिक्षण घेऊन १९५६ साली कोल्हापूर येथेच शासकीय अध्यापक विद्यालयात नोकरी सुरू केली.
त्यांनी कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी, या ठिकाणी शासकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले. पुढे त्या शिक्षण सहसंचालक झाल्या. १९८५ साली त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी ‘बीएड' व ‘एमएड' अभ्यासक्रमासाठी पुस्तकांचे लेखन केले. लिलाताईंची 'शिक्षण देता- घेता' आणि 'ऐलमा पैलमा शिक्षण देवा' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

शिवाजी विद्यापीठातर्फे उत्कृष्ट ग्रंथासाठी त्यांच्या तीन पुस्तकांची निवड झाली. १९८८ साली त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. शिक्षण पध्दती सुधारणांसाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे आणि शोध निबंधांचे लिखाण केले. त्यांच्या दोन शोधनिबंधांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. निवृत्ती नंतर १९८५ साली त्यांनी कोल्हापूर येथे ‘सृजन आनंद विद्यालय’ व ‘सृजन आनंद शिक्षण केंद्र’ या शैक्षणिक उपक्रमाची सुरवात केली. याला राज्यभर प्रसिद्धी मिळाली. यामुळेच त्यांना आनंददायी, सुजनशील शिक्षणाच्या प्रणेत्या म्हंटले गेले. त्यांना महाराष्ट्र फौंडेशन, डॉ. गोवर्धनदास पारिख पुरस्कार, कोरगावकर ट्रस्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार, आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

२ री यादी- We Two आम्ही दोघे नांदतो सुखाने : आंतरजातीय विवाहीत-प्रा.हरी नरके

आंतरजातीय विवाह या विषयावरील माझ्या पोस्टला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातून (माझ्या तीन फेबु खात्यांवर, फेबु पेजवर व ट्विटरवर मिळून) ५०० पेक्षा अधिक जोडप्यांची नावे पुढे आली. मी पहिल्या यादीत ज्यांची नावे लिहिलेली होती, त्यातले जे लोक फेसबुकवर आहेत त्यातल्या ९०% + लोकांनी ही पोस्ट अद्याप वाचलेली दिसत नाही. त्यांच्याकडून प्रतिसादाच्या स्वरूपात त्यांच्या माहितीतली आणखी नावे यायला हवी होती. ती आलेली आढळत नाहीत. ते फार मोठे लोक आहेत (सेलिब्रिटी आहेत.) बहुधा त्यांचा असल्या किरकोळ गोष्टीतला रस संपल्याने अथवा हा विषय त्यांच्या दृष्टीने कालबाह्य झालेला असल्याने त्यांनी प्रतिसाद दिलेला नसावा. कदाचित ते इतर महत्वाच्या कामात व्यग्र असतील. पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ते ही पोस्ट वाचतील व नावांची भर घालतील अशी आशाय. असो... ज्यांनी स्वत:ची वा माहितीतली नावे कळवून बहुमोल प्रतिसाद दिला त्यांचे मन:पुर्वक आभार. ज्यांनीज्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे, त्यांच्यामध्ये आपण एकटे नाही, आजूबाजूला आपले "सगेसोयरे"  बरेच आहेत याची जाणीव होऊन सुरक्षिततेची भावना या उपक्रमामुळे वाढेल.

बरेच लोक निवांतपणे रिअ‍ॅक्ट होतात. त्यांच्याकडची नावे १५ दिवसांनी येतील.

आलेली सर्व नावे आपण माझ्या पोस्टच्य कमेंट्समध्ये बघू शकता. विशेष म्हणजे यातले काही विवाह घरच्यांच्या संमतीने झालेले आहेत. बरेच प्रेमविवाह आहेत तर काही ठरवून केलेले आंतरजातीय विवाहही आहेत. काही कुंटुंबात दुसरी किंवा तिसरी पिढीही आंतरजातीय विवाह करायला पुढे आलेली दिसते. बदल होतोय. सनातन्यांनो, तुम्ही खुशाल तुमचं कोंबडं झाकून ठेवा, समतेचा सुर्य उगवणारच. जातींचा अंधार हटणारच.
काही लोकांना क्रांतीची घाई झालेली असल्याने त्यांनी जाती टाकल्या आता धर्म कधी टाकता, अमूक कधी करता, तमूक कधी करता असल्या प्रश्नांची तोफ ढागलीय. ( स्वत: काहीच न करणारे आणि फक्त उंटावरून सल्ल्यांच्या शेळ्या हाकणारे बरेच असतात.) हजारो वर्षांचे सामाजिक निर्बंध उठवून जातीबाहेर पडण्याचे बंड करणे, जातीच्या सीमा ओलांडणे हे काम सोपे नाही. कृपाकरून एकाच पिढीत त्यांच्याकडून सगळ्या भिंती तोडायची अपेक्षा करू नका. काही लोकांचा आंतरजातीय विवाहांना नानाविध कारणांनी विरोध आहे. असू द्या. लोक त्यांना जुमानण्याच्या मन:स्थितीत नाहीत.


*** जगात ८०० कोटी लोक आहेत. याचा अर्थ प्रत्येक युवक-युवतीला निवडीला ४०० कोटीमधून वाव आहे. फक्त भारताचा जरी विचार केला तरी १४० कोटी लोकसंख्या म्हणजे ७० कोटीमधून निवड करण्याऎवजी एखादी जात म्हणजे काही लाख किंवा हजारातून निवड करण्याची सक्ती स्विकारून तुम्ही आपला चॉईस कमी का करून घेताय? द्या झुगारून बंधनं आणि करा मोठ्या संख्येच्या जगातून निवड. जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश, गरिब-श्रीमंत हे काही खरं नव्हे. मानव तितुका एकच आहे गड्यांनो!


( सिनेमजगत, क्रिकेट, राजकारण, अशा वलयांकित क्षेत्रातील कित्येक नावे आली असली तरी त्यातली प्रातिनिधिक तेव्हढीच इथे घेतलीत. ) सेलिब्रिटींपेक्षा सामान्य माणसांनी हे धाडस करणे मला जास्त महत्वाचे वाटते. ज्या गोष्टीसाठी आजही निर्घृण हत्त्या होतात, सामाजिक छळ, बहिष्कार वाट्याला येतो, त्याला न घाबरता ५०० लोकांनी आपली नावे जाहीर करणे हेच एक धाडशी पाऊल आहे असे मी मानतो.... मित्र गणेश कनाटे यांनी जातीनिर्मुलनासाठी काही महत्वाच्या सुचना केलेल्या आहेत. ( Ganesh Kanate अत्यंत प्रभावी कृती म्हणून तीन गोष्टी सगळ्या जातींतल्या मुला-मुलींनी केल्यास दोन-तीन पावलं पुढे पडतील, अशी एक आशा वाटते.
१) ठरवून आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह
२) मुलांच्या जन्मानंतरच्या पहिल्या प्रमाणपत्रापासून त्यावर जातीचा आणि धर्माचा रकाना रिकामा ठेवणे
आणि
३) मुलांना आडनावं न देणे.)

धन्यवाद गणेश.

नावांमध्ये लिहिताना काही चुका झालेल्या असतील तर नजरेला आणून द्याव्यात. दुरूस्त करू.

आलेल्यातली काही व माझ्याकडची आणखी काही नावे पुढीलप्रमाणे-


(१) पु. ल. देशपांडे-सुनिता ठाकूर, (२) व्यंकटेश माडगूळकर, (३) राजेंद्र बहाळकर- वंदना वैद्य (४) जयंत गायकवाड,  (५) तिस्ता सेटलवाड जावेद आनंद, (६) प्रेमानंद रुपवते-स्नेहजा रुपवते, (७) दीनानाथ मनोहर, (८) बालाजी सुतार,  (९)निला लिमये - भीम रासकर,  (१०)सुवर्णा भुजबळ- सुरेश सावंत,  (११) गायत्री अमदाबादकर-गणेश कनाटे, (१२) शिवाजी सावंत, (१३) मिलिंद आवाड,  (१४) डॉ. प्रदीप गोखले,  (१५) अरूण टिकेकर, (१६) नागराज मंजुळे, (१७) रणजित देसाई- माधवी पेंढारकर,  (१८) अर्जुन कोकाटे-सुधा जोशी,  (१९) मंगेश पाडगांवकर,  (२०) समर खडस



(२१) सी. डी. देशमुख  (२२) सुनिल दत्त-नर्गिस  (२३) संजय अपरांती   (२४) करण थापर-निशा मेनेसेस  (२५) मोहम्मद अझरुद्दीन (२६ ) उर्मिला मार्तोडकर (२७ ) प्रियंका चोप्रा (२८ ) डॉ. पंजाबराव देशमुख  (२९) भक्ती बर्वे-शफी इनामदार (३० ) शंकर महादेवन  (३१) प्रगती बाणखेले- संतोष कोल्हे, (३२) मोहन गुंजाळ, (३३) मुकुल वासनिक-रविना खुराणा  (३४) सचिन पायलट   (३५) विलास सोनावणे, चिंचवड, (३६) विक्रम गायकवाड-सुवर्णा चव्हाण, नाशिक (३७) विजय मांडके- शकुंतला मांडके (३८ ) समता माने- बोराटे, (३९) आशा भोसले,    (४०) स्मिता पाटील- राज बब्बर,


(४१ ) अशोक चव्हाण- अमिता,  (४२) जयंत पवार (जेपी) (४३) अभिजीत पवार (सकाळ) (४४ ) ज्योत्स्ना निगम- हरिश सपकाळे  (४५) इंदिरा गांधी, (४६ ) सोनिया गांधी, (४७)  मनेका- संजय गांधी (४८) प्रियंका गांधी - रॉबर्ट वाड्रा (४९)   इरफान खान - सुतापा सिकदर (५०) अ‍ॅड. सयाजी शिंदे, (५१) पन्नालाल सुराणा - वीणा (५२) बंडू गोरे- मृणाल गोरे, (५३) डॉ . राम गायकवाड  (५४) अ‍ॅड. तथागत कांबळे- अ‍ॅड. सुष्मिता दौंड, (५५) अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते- अ‍ॅड. जयश्री पाटील  (५६) डॉ. हर्षदीप कांबळे (५७) एकेडी जाधव- राणी जाधव, (५८) प्राजक्ता लवंगारे वर्मा (५९) प्रविण परदेशी (६०) प्रविण दराडे- डॉ. पल्लवी दराडे, गेडाम


(६१) चित्कला झुत्शी (६२) डि. के. शंकरन- डॉ. जॉयस शंकरन (६३)  डॉ. अभय बंग- डॉ. राणी बंग (६४) सुलभा जोर्वेकर-उल्हास पाटील (६५ ) अजित सरदार-वसुधा (करमरकर) सरदार (६६)  डॉ समाधान इंगळे अमरजीत बाहेती  (६७) हनुमंत पवार - सपना कंदले  (६८) योगेश काणे-पुजा (६९) शर्मिष्ठा भोसले - सदानंद घायाळ ( ७०) सलीम शेख-विजया जाधव (७१) शितल साठे-सचिन माळी,  (७२)राजश्री चव्हाण- प्रवीण दामले,   (७३) जॅकलिन डोळस - अविनाश डोळस (७४) चंदु जगताप-श्रद्धा जोशी  (७५) मोहन गुंजाळ,   (७६) विजय तरवडे शोभा राऊत  (७७) Dr Prashant rokade- Sujun hade (७८) Mahendra Mahagaonkar (७९) टीना दाबी- अथर खान (८०) रणजित परदेशी-सरोज कांबळे,


(८१) उमेश बगाडे-तिलोतमा झाडे (८२) रवींद्र साळवे - नीता चांदेकर (८३) Varsha Kale- Ankush Deshpande (८४) प्रशांत पवार - सविता ठाकूर (८५) अमृता सुभाष  (८६) रतन दादाभाई टाटा  (८७) डॉ. कैलास गौड - डॉ मेधा (८८) प्रा.संध्या रंगारी - श्री. रमेश कदम (८९) लिलाताई पाटील बापूसाहेब पाटील  (९०) प्रधान सुशील-साधना रेडकर (९१) कॉ. स्मिता पानसरे - कॉ. बन्सी सातपुते (९२) अॅड अभय टाकसाळ , (९३) कृष्णात स्वाती - स्वाती कृष्णात  (९४) अक्षय इंडिकर - तेजश्री कांबळे (९५ ) मुक्ता चैतन्य (९६) संघराज रुपवते  (९७) सुलभा जोर्वेकर-उल्हास पाटील (९८) विष्णू श्रीमंगले - कीर्ती बडवे (९९) सम्यक विमल मसू - अर्चना कुलकर्णी (१००) प्रफुल्ल शशिकांत - शिल्पा प्रफुल्ल


(१०१) अमृत बंग - आरती बंग (१०२) आरजु तांबोळी - विशाल पोखरकर (१०३) सतीश देशपांडे - अश्विनी फुंदे (१०४) संदीप शिंदे - अर्चना पिंपळकर (१०५) कुणाल शिरसाठे - तेजल कांबळे (१०६) अनिल जायभाये - मयुरी सामंत  (१०७ )प्रियंका माने - समाधान पाबळे (१०८) रणजित आचार्य - विद्या हतोलकर (१०९) विशाल लामतुरे - वर्षा कांबळे  (११०) राजन दांडेकर - क्रांती पोतदार (१११) परमेश्वर जाधव - मनीषा जाधव (११२) जितू लोकायत - कल्याणी लोकायत (११३) किशोर खोबरे - निकिता चांडक (११४) आरती नाईक - महेंद्र नाईक (११५) इब्राहिम शेख - श्रुती पानसे (११६) प्रणाली सिसोदिया - अद्वैत दंडवते (११७) पूजा देवगडे - विक्रम पटेल (११८) नंदू देवगडे - श्यामला देवगडे (११९) अमृता कुलकर्णी - विशाल गुरव (१२०) सुनीता गांधी - महेंद्र इंदुलकर


(१२१) अतुल शर्मा - सुषमा पद्मावार (१२२) गोपाळ गुणाले - कीर्ती मठकरी (१२३) पूनम पाचंगे - सतीश जाधव (१२४) सागर पाटील - ऋतुगंधा देशमुख (१२५) श्वेता वानखेडे - महेश लाडे  (१२६) रवी केसकर- भाग्यश्री वाघामारे (१२७) संतोष बुरंगे- रेखा बुरंगे (१२८) संध्या फुलपगार- महेश अचिंतलवार (१२९ ) आश्विन भालेराव - कांचन दुर्गकर (१३०) शारदा भालेराव - राहूल दिवांग (१३१) सुमित कारंडे - मोनिका मोरे (१३२) राजेश खन्ना- डिंपल कपाडीया  (१३३)  बाळू चोपडे-कुलगुरू  (१३४)  संजय मोने - सुकन्या कुलकर्णी (१३५)  आनंद शिंदे-गायक  (१३६)  मनोज वाजपेयी  (१३७)  हृतिक रोशन  (१३८)  ओमर अब्दुल्ला  (१३९)  शनवाज हुसेन  (१४०) मुक्तार अब्बास नक्वी


( १४१) अजित आगरकर (१४२)  झहीर खान-सागरिका घाटगे (१४३)  सचिन तेंडुलकर-अंजली मेहता (१४४) मोहम्मद कैफ (१४५)  सुहासिनी हैदर (१४६)  शर्मिला टागोर-पतौडी  (१४७) सोहा अली खान-कुणाल खेमु (१४८) विद्या बालन  (१४९) भाग्यश्री पटवर्धन, (१५०) मस्तानी-बाजीराव, (१५१) तुकोजीराजे होळकर, (१५२) जुही चावला, (१५३) किशोरकुमार - मधुबाला, (१५४)  सुनिल गावस्कर, (१५५) डॉ विकास महात्मे (१५६) Prasad Chougule (१५७) राजेंद्र कांबळे - कल्पना कांबळे इजंतकर (१५८)  अविनाश गाडे - धनश्री मेटकरी (१५९)  प्रमोद गोसावी - विद्या कांबळे (१६०) डॉ. राकेश गावतुरे - डॉ. अभिलाषा बेहेरे


( १६१) Manisha Prabhu (१६२) प्रशांत वाघमारे -नीलम साळुंखे (१६३) बेबी लांडे-कॉ.सुभाष लांडे. (१६४) शहनाज(शर्मिला)-सुनील गोसावी (१६५) सुधीर नरके - मीरा (१६६) Ravindra Medhe  (१६७  )  उपेंद्र टण्णू  (१६८) विजय वावरे- शबाना; (१६९) उत्कर्षा रूपवते- प्रशांत सलियान,   (१७०) Sagar Shaila Raghunath (१७१) पुष्पा क्षीरसागर (१७२) शितल माकर - आशिष चव्हाण (१७३)  संजय गायकवाड - मंगला भुजबळ,               (१७४) सतीश देशपांडे- अश्वीनी फुंदे( १७५) अॅड आरती राव -Mahesh Shirtode (१७६) गणेश भांगरे -  शमीम शेख, (१७७) रजत अवसक - अश्विनी  (१७८) ऋषाली आरोटे - सुतार, (१७९) माया मंडलिक - महेश, (१८०) नवले - गुजर,


(१८१) प्रतीक हुळवळे, (१८२) प्रा. वीणा- उदय जोशी, (१८३) प्रा. अविनाश कांदेकर- प्रा. स्मिता, (१८४) प्रकाश पोळ - प्रा. अनुराधा परदेशी, (१८५) प्रदीप बच्छाव, (१८६) किशोर सोनवणे,  (१८७) Nitin Gore (१८८) दिव्या भारती-साजिद नाडीयलवाला (१८९) अमोल आडसुळे - मिरा मल्लिक (१९०) राजू देसले- सुवर्णा, (१९१) adv राजपाल शिंदे- चित्रा, (१९२) नीतीश डावरे- कल्याणी (१९३) सुप्रिया गीते-सुरेश जोर्वेकर (१९४) माया लखवानी-विनोद भोईर (१९५) बेबी बेल्हेकर-भास्कर जगताप (१९६) विद्या पाटील-गिरीश चौक (१९७) सुनिता राठी-अनिल पाठक(१९८) निलेश कुलकर्णी - सुरेखा भालेराव, (१९९) प्रमोद वागदरीकर-कुमुद साळवे (२००) मेघना दगडे-प्रीतम कोटकर


(२०१) संध्या पवार-मिलिंद खेडेकर (२०२) Satish Makasare    (२०३) रुपराव नाटेकर- रोशनी आत्राम (२०४) सत्यवान हरी टण्णू (२०५) अजय सीताराम टण्णू (२०६) मिलींद सीताराम टण्णू (२०७) चारूशिला ज्ञानेश्वर टण्णू ( २०८) हर्षल अजित टण्णू (२०९) प्रशांत सातपुते  (२१०) कमलेश खरे- कंचन  (२११) Santosh Adsule- Megha Gaikwad  ( २१२) नरेंद्र चावरे- वर्षाराणी वाघमारे (२१३) लीना डुबल - लीना प्रशांत कहार  (२१४) Nishant - Vijaya Bhaskar Jadhav (२१५) Priyanka Revansiddha Chaudhary- Hitesh Suresh Ramwani (२१६) मधुरा तांबे  (२१७) कृतिका चव्हाण - सावंत (२१८) अविनाश महातेकर - अलका दामले (२१९) शिवाजी लांडे - मंदा दाणी (२२०)  कतुषा लांडे - चंद्रवदन गायकवाड


(२२१) अजय लांडे- सोनाली कमोद (२२२) राहुल नाईक - नेहा मोगरे (२२३) सुभाष लांडे- बेबी शिंदे, (२२४) हमीद शेख- लता काळे (२२५) लालासो पाटील-शकिला शेख, सांगोला (२२६) प्रकाश पोळ-अनुराधा परदेशी (२२७) शोभा चव्हाण  (२२८) अमित चंद्रमोरे (२२९) महेश चव्हाण (२३०) रुपाली रोटे-सोनावणे (२३१) राहुल यशवंते (२३२) अनिता बधान-जयवंत हिरे (२३३)  (२३४)  असिफ शेख( २३५) फिरोज खान (२३६) अनिल मोरे- रामेश्वरी शिंदे (२३७) मिलिंद शिंदे (२३८) संदिप शार्दुल (२३९) विलास रुपवते (२४०)  संजय जाधव-संगीता


(२४१) नितिन जाधव (२४२) विपुल हिरे-सुगंधा (२४३) फकिरा आहिरे (२४४) अशोक ससाणे-सुनंदा एळींजे (२४५) प्रणालि एळींजे- परमित वाघ (२४६) सुमित कारंडे - मोनिका मोरे (२४७) सागर झोलेकर, (२४८) संघराज रुपवते - जीना,  (२४९) सुबोध मोरे (२५०) किर्ति ढोले-सरमळकर  (२५१) सुनील सरदारे-निशी सरदारे (२५२) चित्रा एळींजे (२५३) सखु एळींजे-दास (२५४) दीपाली वाघ-शंतनु कांबळे (२५५)  सारिका-किशोर कर्डक( २५६) आनंद हरीभाऊ हिरे (२५७) संतोष गौतम कांबळे(२५८) प्रविण संदानशीव (२५९) गजानन भगत (२६०) प्रा.रमेश कांबळे


( २६१)  सुरेंद्र अ बनसोडे-शुभांगी जोशी ( २६२) डॉ. राहुल नेत्रगावकर - शिवनंदा पाटील (२६३) नवीन देशमुख - मधुरिमा (२६४) Vimaltai mundada- Nandakishor (२६५) Ashish Chandanshive - पूजा सावंत (२६६) अमोल सावंत-- बीकी राऊळ (२६७) सागर सावंत -- हर्षा (२६८) दिक्षा गावंडे (२६९) सागर कांबळे (२७०) शीला गांगुर्डे--देविदास कंजे (२७१) दर्शना साळवे-- नितीन निचळ (२७२) Ajit Agarkar (२७३) Dhiraaj Deshmukh (२७४) Amit Deshmukh (२७५) उषा- प्रकाश रोकडे (२७६) तुषार- तृप्ती मराठे (२७७) पिंकी मोडक- शेख (२७८) दिव्या मोहकर- मयुर बेलवले (२७९) रमेश कोष्टी (२८०) उमेशचंद्र मेश्राम,


(२८१) अमित गोसावी, (२८२) रुपेश नाईक, (२८३) बनसोड (२८४) अभिजीत हिरप - मनिषा मेश्राम (२८५) प्रभाकर बारहाते - अरुणा खरात (२८६) मनोज टाक - नीलिमा पाका (२८७) किरण कांबळे - सविता भईरट (२८८) किरण दीक्षित - प्रसाद खेकाळे (२८९) संतोष पवार - शालिनी राऊत (२९०) स्मिता पाटील - संतोष अवसरमोल (२९१) हेमंत कारले - संगीता कुलकर्णी (२९२) दिनेश भोयर - प्रज्ञा मनवर (२९३)Satish Panpatte (२९४) Renuka Tammalwar -Harshad Ravikar (२९५) वैशाली सौन्दनकर- महेश क्षीरसागर (२९६) धनश्री सौन्दनकर- चंद्रशेखर आदमाने (२९७) अमित वेल्हेकर- नेहा मार्वे (२९८) ऍड. महेंद्र सन्दनशिव - ऍड अंजली (२९९) कल्पना सुर्यवंशी - खिजेंद्र गेडाम (३००) स्वप्नील इंगळे- निशा सिरसाट


(३०१) धनंजय बनसोड - रोशनी  (३०२)  (३०३) लौकिक माने - डॉ. हर्षद आढाव (३०४) प्रकाश सांगवीकर - अंजली कुलकर्णी (३०५) ॲड. डॉ. सुभाषचंद्र पाटणकर - डॉ. प्रतिभा सुभाषचंद्र पाटणकर (सुनिता सावरकर)  (३०६) Sanjay Vishnu Sathe (३०७) कॉम्रेड राम बाहेती (३०८) डॉ.स्मिता अवचार (३०९) Pooja Natu Gaikwad -Yogesh Gaikwad (३१०) सोहम गायकवाड - अमृता सुरवसे (३११) शुभांगी त्रिभुवन - रोहन खैरे (३१२) रहीम सौदागर - गुड्डी भिंगारे (३१३) Dr Narendra Jadhav - Vasundhara (३१४) दिलीप चव्हाण-सुप्रिया गायकवाड (३१५)किशोर ढमाले-प्रतिमा परदेशी (३१६) राजू जाधव-संगीता ठोसर (३१७) किशोर जाधव-शुभांगी कुलकर्णी (३१८) मयुरी सामंत-अनिल जायभाय (३१९) Deepraj Gaikwad - Babasaheb Ghodke (३२०) Pankaj Gaikwad - Nikita

(३२१)Tejas M - Swati Mahajan, (३२२) Ashutosh Bankhele- Vrushali Shardul (३२३) Sneha Dive (३२४) Abhijeet valhe - Shital Yelve (३२५) रोशन गजभिये-सारिका (३२६) डॉ. सुरभी गजभिये-डॉ.पवन, ( ३२७) प्रतीक गजभिये -सोनाली, (३२८) प्रदीप रामटेके - संगीता, (३२९) रणजीत रामटेके - शोभना (३३०) अशोक मेश्राम-सविता घोडे, (३३१) गायत्री जवरकर-सुनील सातपुते, (३३२) रुपाली तेलतुंबडे, (३३३) कैलाश वाघमारे - मीनाक्षी राठोड (३३४) मारोती खंदारे-सरिता शर्मा (३३५) स्नेहा गिरी- सोनू अग्रवाल (३३६) अमृता कदम - सौरभ मेहता (३३७) आश्लेषा कदम - सुयश सिंग (३३८) Rajani Bhagat (३३९) श्रीराम गावंडे (पाटील) - उषा लोडाया (३४०) दुर्वेश जावळकर - रुद्राणी मिश्रा


(३४१) राहुल खोना- अभिलाषा पंत  (३४२) अॅड. राधिका इंगोले (पाटील) - चिराग ठक्कर (३४३) आदित्य दामले - रोहिणी (ऋजुता) गायकवाड  (३४४) Gautam Jadhav - सरोज नाईक (३४५) मृणालिनी आहेर -अजित गाढवे (३४६) अजय नवले -वैशाली मंडलिक (३४७) सचिन रोकडे - मनीषा प्रभू (३४८) मीनल पिंपळे-निकुंज बन्सल (३४९) जितेंद्र बनसोडे -पूजा पवार (३५०) वनिता ताठे -आनंद त्रिपाठी  (३५१) वैशाली घोरपङे- सुजीत रासकर (३५२) Mayur Chandorkar (३५३) Sanjay Navgire (३५४) Ujwal Kadam - Pinto  (३५५) देविदास पोळके - सरोज जगताप (३५६) सुहास फरांदे- देवयानी फरांदे, (३५७) नवनीत कौर- रवी राणा, (३५८) दीपाली कोतवाल-दुर्वास पाटील (३५९) प्रभाकर सांगळे-स्मिता दफ्तरदार (३६०) विजय सांगळे- गीता कुमठा


(३६१) बिपीन सांगळे- नीलम जैन (३६२) अभिजित सांगळे- प्रिया दळवी (३६३) डॉ. प्रीती सांगळे- डॉ. अश्विन गर्ग (३६४) डॉ. राहुल सांगळे-डॉ. वंदना जैन (३६५) रमेश जाधव -सोनल देशमुख. (३६६) प्रा.शैलेश बनसोडे (३६७) प्रा.व्यास (३६८) चंद्रकांत शिंदे, (३६९) प्राचार्य सीताराम गोसावी- प्रा.सीमा नाईक (३७०) आल्हाद काशीकर- स्वाती कोहे (३७१) रोहिणी गोसावी - अभिजीत देवकर (३७२) माया गोसावी - सुरज भुजबळ  (३७३) Dr Supriya Pandit Dr Amit Pedgaonkar (३७४) Santosh Parad (३७५) पंकज वाहोकार- उमा माने (३७६) सुनील इंगोले - जया भारती (३७७)  गुलाब वाघमोडे,   (३७८) परीत्याग रुपवते - अर्चना (३७९) बंधमुक्ता प्रेमानंद रुपवते - अर्शद खान , (३८०) ऊत्कर्षा प्रेमानंद रुपवते - प्रशांत सालियन


(३८१) चिरंतन संघराज रुपवते  (३८२) अपूर्व संग्राम रुपवते (३८३) दिक्षा मिलिंद गायकवाड (३८४) डॉ. गुड्डी कोळगे (३८५) युगांतर बळ्ळाल (३८६) स्वराज मिलिंद गायकवाड (३८७) Krushna More  (३८८) निलेश शिंदे - कल्याणी पवार  (३८९) प्रशांत महाले - डॉ. शीतलप्रभा मोरे  (३९०) भारती खरटमल - सतिश वानखेडे  (३९१) पद्मावती अर्धापुरे - बालाजी दमकोंडवार  (३९२) चारुशीला महाजन - दिपक संदानशिव  (३९३) गौरव कांबळे -वासंती पाटील  (३९४) Kundlik Khetri  (३९५) Adv Sunil Rathod (३९६) Kishor Ughade  (३९७)  (३९८) जगदिश सोनवणे  (३९९) सतिश कांबळे -शेख  (४००) निमिष लिमये-वर्षा गायकवाड


(४०१) विवेक कुलकर्णी- रेश्मा चव्हाण (४०२) उज्ज्वला - अनंत जोग,  (४०३) गणेश भवरे - काजल  (४०५) रंजित लष्करे - प्रियंका  (४०६) आश्विन भालेराव- कांचन दुर्गकर  (४०७) शारदा भालेराव - राहूल दिवांग  (४०८) चंद्रकांत भालेराव-तृप्ती महाडीक  (४०९) लता भालेराव- भट  (४१०)  मनिषा भालेराव - संदिप कांबळे  (४११) किशोर वाघ  (४१२) अनिल खराडे (बीड)   (४१३) हसन पठाण (बीड)   (४१४) रुपाली निंबर्ते- मंगेश भुताडे (अमरावती)  (४१५) गणेश फुले - ज्योती घोगरे (४१६) रोहन जोशी -अश्विनी नेमाड (४१७) डॉ.  प्रसाद डोके - डॉ.  स्नेहा बागडे  (४१८) रुबिना दलवाईं  (४१९) इला दलवाईं (४२०) स्मृती शिंदे



(४२१) जोधा-अकबर  (४२२) क्षिती जोग - हेमंत ढोमे,  (४२३) नरेश शिर्के - मेघना शिर्के  (४२४) विकास तांबे - कुंजल पटेल ( ४२५) Adv. Pruthviraj Jadhav- निशा धारप (४२६) Gaurav Zurunge (४२७) प्रशांत सागरे - प्रतिभा  जोशी  (४२८) Sameer Dhumal (४२९) योगेंद्र यादव- मधुलिका बॅनर्जी, (४३०) सुभाष लोमटे - निलिमा  (४३१) मिलन चव्हाण- नयना पटेल (४३२) शैला - द्वारकादास लोहिया (४३३) श्रीराम जाधव- शोभा शिराढोणकर (४३४) इंदुमती जोंधळे-महावीर जोंधळे (४३५) प्रा. डॉ.रविंद्र मेढे- शीतल कोटकर
(४३६) निलेश कुलकर्णी - सुरेखा भालेराव (४३७) Swapnil Malwande (४३८) शुभम पवार - आरती शिंदे


- प्रा. हरी नरके, १५/६/२०२०