Showing posts with label राजर्षि शाहू. Show all posts
Showing posts with label राजर्षि शाहू. Show all posts

Saturday, June 26, 2021

माझी ११ वर्षांपुर्वीची पोस्ट- Sat June 25, 2011: शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर-


माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले.माणगाव परिषदेत बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सनउत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.

कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्श भेटुन ११ वर्षांपुर्वी दिले.त्यांनी त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ट सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे.त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.

आम्हाला खुप आनंद झाला.

श्री. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ट आय.ए.एस.अधिकारी श्री. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.

पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिक्रुत चरित्रकार लठ्ठे, कीर,जाधव,पवार आदी सर्वांनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खान्डेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.

पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.

या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे.तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ.  रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, डॉ. कणबरकर यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे

Posted by Prof. Hari Narke प्रा. हरी नरके at Saturday, June 25, 2011

https://harinarke.blogspot.com/search/label/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82

Sunday, July 5, 2020

अमेरिका, दिल्ली, मुंबईहून आंबेडकरी विचारवंत, स्कॉलर्स, अधिकारी, नेते लिहितात-








सर , जयभीम !

आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.


आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते.  रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.


शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !

भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.

एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.

शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !

आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले,

१- शुद्धोदन आहेर.

२- संजय गायधनी.

३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)

४ - अशोक अंकुश.

५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.

६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.

७- संदीप हिरे.

८- दिपक गांगुर्डे.


Wednesday, July 1, 2020

मी कृतज्ञ आहे--दिलगिरी

सप्रेम जयभीम. नमो बुद्धाय.
गेल्या ४० वर्षात आंबेडकरी बौद्ध चळवळीतील भावांनी व बहिनींनी मला अमाप प्रेम, आपुलकी, मानसन्मान दिला. त्यांनीच मला मोठे केले.
या प्रबोधनाच्या चळवळीतून मला खूप काही शिकता आले. मी नामांतर आंदोलनात तुरूंगवास भोगला होता याला आता ३८ वर्षे झाली. मी या माझ्या भावंडांचा तसेच वडीलधार्‍यांचा कृतज्ञ आहे.
माझ्या २६ जून २०२० च्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांवरील लेखातील दहाव्या मुद्द्यात मी व्यसनाधिनता, घरेलू महिला कामगारांच्या हिंसाचाराचे दु:ख आणि इतर मुद्दे उपस्थित केले होते.
मी ते सर्व मुद्दे मागे घेत असून माझ्या सर्व प्रिय बौद्ध बांधवांची दिलगिरी व्यक्त करीत आहे.
भवतु सब्ब मंगलम!
- प्रा. हरी नरके

Monday, June 29, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके



" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) ...............................

शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,

Thursday, June 25, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके




" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) .............................................




शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,
२५/६/२०२०

राजर्षि शाहू छत्रपती



राजर्षि शाहू छत्रपतींच्या जन्माला उद्या १४६ वर्षे होतील.

महाराज फार अकाली गेले. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी.

पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल.

गेल्या ९८ वर्षात महाराजांविषयी दर्जेदार लेखन, संशोधन करुन ज्यांनी महाराजांच्या ऎतिहासिक कामगिरीचे दस्तावेजीकरण करून ठेवले त्यात
अण्णासाहेब लठ्ठे,
आमदार पी. बी. साळुंखे,
धनंजय कीर,
कृ. गो. सुर्यवंशी,
डॉ. रमेश जाधव,
प्रा. य. दि. फडके,
प्रा. जयसिंगराव पवार,
प्रा. एस.एस. भोसले,
प्रा. विलास संगवे,
बाबूराव धारवाडे,
कुलगुरु कणबरकर,
कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे,
प्रा. अर्जून जाधव,
मंजूषा पवार आदींना फार मोठे श्रेय जाते.

तुम्ही यातल्या कुणाकुणाचं वाचलंय? कमेंटमध्ये लिहा.

-प्रा.हरी नरके,
२५/६/२०२०

Friday, March 20, 2020

डॉ. आंबेडकर अखिल भारताचे नेते होतील - राजर्षी शाहू छत्रपती


पुढारी, सर्व आवृत्या, संपादकीय पृष्ठ, शनिवार, दि. २१ मार्च २०२०

डॉ. आंबेडकर अखिल भारताचे नेते होतील - राजर्षी शाहू छत्रपती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताचे नेते होतील असे जाहीर भाकीत छ. शाहू महाराजांनी ज्या माणगाव परिषदेत केले होते तिची आज शताब्धी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पीएच. डी. ही पदवी संपादन करणारे भीमराव आंबेडकर हे पहिले भारतीय. भारतात परत आल्यानंतर बडोद्यातील नोकरीत आलेल्या कटू व जातीय बहिष्काराच्या अनुभवांनी भीमरावांना जखमी केलेलं होतं. सिडनेहॅम महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करीत असतानाच साऊथबरो कमिशन भारतात आले. २७ जानेवारी १९१९ ला भीमरावांनी कमिशनला साक्ष दिली. सर्व भारतीयांना मताधिकार मिळाला पाहिजे अशी ऎतिहासिक मागणी त्यांनी कमिशनसमोर केली. एव्हढी क्रांतिकारक मागणी करूनही तत्कालीन ब्राह्मणी वर्तमानपत्रांनी या साक्षीला प्रसिद्धी दिली नाही. आपले स्वत:चे वर्तमानपत्र असावे म्हणून ३१ जानेवारी १९२० ला त्यांनी मूकनायक हा पेपर सुरू केला. त्याला अडीच हजार रूपयांची देणगी देऊन रा. शाहूंनी भीमरावांना भक्कम पाठबळ दिले.

माणगाव परिषद म्हणजे भीमरावांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात मानता येईल. ही दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद, दि. २१ व २२ मार्च १९२० रोजी पार पडली. माणगाव, कोल्हापूर येथे गुढीपाडव्याला झालेल्या या परिषदेचा सविस्तर वृत्तांत १० एप्रिल १९२० च्या मूकनायकमध्ये प्रकाशित करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली होती. परिषदेला दस्तुरखुद्द शाहूराजे उपस्थित होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताचे नेते होतील असे जाहीर भाकीत छ. शाहू महाराजांनी या परिषदेत केले आणि ते खरेही ठरले. भीमरावांना पंडीत ही पदवी देण्यात यावी असेही महाराजांनी सुचवले. महाराजांना माणसांची अचुक पारख होती. भीमराव नवखे असताना त्यांच्याबद्दल असे भविष्य वर्तवणे ह्यातून महाराजांचा द्रष्टेपणाच दिसून येतो.

या परिषदेत अस्पृश्यांसाठीच्या राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी करण्यात आली. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजेत असे भीमरावांनी ठणकावून सांगितले. हीच मागणी त्यांनी पुढे १३ वर्षे लावून धरली. पुणे करारानंतर राखीव जागा मिळवून ते यशस्वी झाले.  छ. शाहूंचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. महात्मा फुले १८८० मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू करतात आणि ४० वर्षांनी १९२० मध्ये बाबासाहेब शाहू जयंती उत्सव सुरू करतात हे महत्वाचे आणि ऎतिहासिक पाऊल होते. मूकनायकचा शाहू जयंती विशेषांक काढण्यासाठी भीमरावांनी महाराजांना जे पत्र लिहिले त्यातून २६ जून ही रा. शाहूंची खरी जन्मतारीख मिळाली. सुमारे नव्वद वर्षे शाहू चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी दिलेली २६ जुलै ही चुकीची तारीख प्रमाण मानली जात होती. दहा वर्षांपुर्वी बाबासाहेबांच्या या दुर्मिळ पत्रामुळे त्यात दुरूस्ती करण्यात आली.  शाहू जयंती सुरू करण्याच्या बाबासाहेबांच्या या प्रेरक कृतीतून उर्जा घेऊन प्रस्तुत लेखकाने २० वर्षांपुर्वी त्यावेळचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करून शासकीय पातळीवर ग्रामपंचायत ते मंत्रालय शाहू जयंती सुरू करायला लावली. त्याकामी अनुकूल अभिप्राय देऊन कोल्हापूरचे सुपुत्र व ख्यातनाम सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी अमूल्य सहकार्य केले.

गुणवत्ता जन्माने मिळत नाही. ती संधी मिळण्यावर अवलंबून असते, अस्पृश्यांना व ब्राह्मणेतरांना कायम संधी नाकारून उच्चवर्णियांनी आपली तथाकथित गुणवत्ता [ ! ] संपादन केलेली आहे हे खडे बोल भीमरावांनी या परिषदेत सुनावले. सर्वांन समान संधी, ज्यांना पिढ्यानुपिढ्या संधी नाकारली गेली त्यांना विशेष संधी हे तत्वज्ञान महाराजांनी कोल्हापूर राज्यापुरते १९०२ सालापासून स्विकारलेले होते. योग्य नेता नसेल तर त्या समाजाची प्रगती होत नसते असे महाराज या परिषदेत म्हणाले. भीमरावांच्या रूपाने अस्पृश्यांना सुयोग्य नेता मिळाल्याचा आनंद महाराजांनी व्यक्त केला.

मृत जनावराचे मांस खाणे हा गुन्हा मानावा, अस्पृश्यांनी मेलेली जनावरे ओढू नयेत, मुलांमुलींना सहशिक्षण असावे, स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक असावे, सार्वजनिक रस्ते, विहीरी, तलाव, शाळा, धर्मशाळा, भोजनगृहे, वाहने, करमणुकीच्या जागा अस्पृश्यांना खुल्या असाव्यात. अस्पृश्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क असावा,पडीक जमिनी अस्पृश्यांना कसायला द्याव्यात अश मागण्या माणगाव परिषदेत करण्यात आल्या. याच परिषदेत बाबासाहेबांनी विचारार्थ मांडलेल्या २ मुद्द्यांची पुर्तता शंभर वर्षांनंतरही अद्याप झालेली नाही. धार्मिक कार्ये स्वहस्ते करण्याचा अधिकार सर्व जातीतील सुशिक्षितांना असावा, यासाठी शासनाने विद्यापीठाच्या पातळीवर परीक्षा घेऊन पुजारी, धर्माधिकारी, शंकराचार्य यांच्या नियुक्त्या कराव्यात. एकाच जातीतील लोकांना जन्माने हा अधिकार मिळण्याऎवजी सर्व हिंदुंना ह्या जागा मिळाव्यात ही क्रांतिकारक मागणी आजही पुर्ण झालेली नाही. एरवी गुणवत्तेच्या गप्पा मारणार्‍या, आरक्षणाला नाकं मुरडणार्‍या वर्गाने या जागा गुणवत्तेवर भराव्यात आणि एका जातीला केवळ जन्माने मिळालेले १००% आरक्षण रद्द करावे यासाठी कधीही पाऊल उचललेले नाही. आजही सर्व शंकराचार्य एकाच जातीचे का? याला सुयोग्य उत्तर मिळालेले नाही. अस्पृश्यांनी परंपरागत कामे सोडून शेतीकडे वळावे, सहकारी बॅंका स्थापन कराव्यात हा बाबासाहेबांचा सल्ला आजही गंभीरपणे घेण्यात आलेला दिसत नाही.

बाबासाहेबांनी नोकरी करावी हे आपल्याला पसंत नसल्याचे महाराज म्हणाले. महाराजांचा सल्ला भीमरावांनी ताबडतोब मानला आणि तिथल्यातिथे सिडनेहॅम महाविद्यालाचा राजीनामा दिला. महाराजांनी रजपूतवाडीच्या कॅंपवर भोजनाला येण्याचे भीमरावांना निमंत्रण दिले. ते भीमरावांनी सहर्ष स्विकारले.

माणगाव परिषदेतूनच प्रेरणा घेऊन सव्वादोन महिन्यात ३१ मेला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये दुसरी परिषद घेण्यात आली. महाराजांच्या कन्येची तब्बेत बरी नसतानाही महाराज नागपूर परिषदेला हजर राहिले. अस्पृश्यांच्या परिषदेला शाहूराजे नागपूरला येणार तेव्हा त्यांचे स्वागत करायला नको म्हणून नागपूरकर भोसले शिकारीला निघून गेले. शाहूमहाराज माणगाव परिषदेला हजर राहण्यासाठी शिकारीहून मुद्दाम परत आलेले होते. हा फरक असतो जातपात मानणारे आणि तिचे निर्मुलन करणारे यांच्यात.

या परिषदेने अस्पृश्य व ब्राह्मणेतर यांच्या सहकार्याच्या वाटचालीला सुरूवात झाली. ही एका नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात होती. ही एका अभिनव सामाजिक अभियांत्रिकीच्या राजकारणाची पायाभरणी होती. ती कायम टिकली असती तर सनातनी आणि जातीयवादी शक्तींचा पराभव अटळ होता. पण तसे व्हायचे नव्हते. माणगाव परिषदेनंतर अवघ्या अडीच महिन्यांनी भीमराव आपले अपुरे राहिलेले उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. ते तिकडे डॉक्टर ऑफ सायन्स आणि बॅरिस्टर या सर्वोच्च पदव्यांचे शिक्षण घेत असतानाच ६ मे १९२२ ला महाराजांचे अकाली निधन झाले.
माणगाव परिषदेची शताब्धी साजरी करीत असताना विषयपत्रिका व सामाजिक समिकरणावर आधारित राजकारणाची व समाजकारणाची प्रेरणा आपण घेणार असू तरच या शताब्धीला अर्थ असेल.

प्रा. हरी नरके, २१ मार्च २०२०

http://newspaper.pudhari.co.in/viewpage.php?edn=Kolhapur&date=2020-03-21&edid=PUDHARI_KOL&pid=PUDHARI_KOL&pn=6#Article/PUDHARI_KOL_20200321_06_3/415px/1349075

Wednesday, June 26, 2019

राजर्षी शाहू महाराजांची जयंती सुरू करणारे विलासराव देशमुख-






१९९९ सालची गोष्ट. विलासराव देशमुख नुकतेच मुख्यमंत्री झालेले होते. आधी ते शिक्षणमंत्री असताना त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलेले असल्यानं चांगला परिचय होता. माझ्या अर्जावर त्यांनी एक नजर टाकली आणि ते म्हणाले, "कसं शक्यय? अहो, आजवर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले कितीतरी मुख्यमंत्री झालेले असतानाही शाहू महाराजांची जयंती शासनातर्फे होतच नाहीये? यशवंतराव चव्हाणसाहेब, वसंतदादा, शरदराव पवार शाहूंना विसरले असणं शक्य नाही वाटत. ज्याअर्थी त्यांनी शासकीय पातळीवर शाहू जयंती सुरू केलेली नाहीये त्याअर्थी त्याच्यामागे काहीतरी महत्वाचे कारण असेल. गंभीर अडचण असेल. शाहूजयंती सुरू केली तर जोरदार टिका होण्याची भिती असेल. मला मराठवाड्यातल्या माणसाला कशाला अडचणीत आणताय हरी?"

मी म्हणालो, "सर, मला असं वाटत नाही. राहून गेलं असणार. वेळ मिळाला नसणार. तसंही शाहूंना त्यांच्या जातीच्या भिंती नसल्यानं ते दुर्लक्षितच आहेत. त्यांना जात वाली नाहीये.  तुम्ही जयंती सुरू करा. टिका होणार नाही, हा कदाचित स्वागत मात्र होणार नाही. तुम्ही माझ्या अर्जावर मंजुरी द्या. मी जी.आर.निघेल असा पाठपुरावा करतो."
ते सावधपणे म्हणाले, " थोडं थांबा. मी याबाबतचा अहवाल मागवतो. मग बघू."

त्यांनी त्यांचे उपसचिव श्री.भूषण गगराणी यांना बोलावलं. शाहू जयंती शासनातर्फे ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवर सुरू करण्याच्या माझ्या अर्जाबाबत सविस्तर अहवाल द्यायला सांगितलं.

गगराणींचा अनुकूल अहवाल आला. त्यानुसार २५ जुलैला रात्री उशीरा जी.आर. आला. २६ ला तो मंत्रालयातही कुठे पोचला नव्हता मग जयंती कशी होणार? जी.आर. काढणार्‍या बाईंनी खोडसाळपणा करून फक्त त्या वर्षांपुरता जी.आर. काढलेला होता. मला पुन्हा सी.एम.ना भेटावं लागलं. पुन्हा सगळी उस्तवारी करावी लागली. दरवर्षी शाहू जयंती करण्यात यावी असा नवा शासनादेश निघेपर्यंत पाठपुरावा करावा लागला.

पुढे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित करावा म्हणून केलेल्या खटपटीला यश आलं. याकाळात दरवर्षी मी शाहूंवर लोकराज्यमध्ये लेख लिहित असे.
महाराजांवर ५०० व्याख्यानं द्यायचं मी ठरवलं. ५०० वं व्याख्यान कोल्हापूर दरबारात झालं.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पत्रामुळे शाहू महाराजांची जयंती २६ जुलैला नसून २६ जूनला असल्याचं कळलं. आमचे मित्र खांडेकर यांच्यामुळं त्याबाबतचा अस्सल पुरावा शोधता आला. शासन दरबारी पुन्हा प्रयत्न करून २६ जुलै ऎवजी २६ जूनचा जी.आर. काढता आला.

माझे मंत्रालयातील मित्र शुद्धोधन आहेर यांनी मंत्रालयात शाहू जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला. माझेच व्याख्यान ठेवले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी शाहूंबद्दल आकस असलेले होते. जी.आर. असल्यानं त्यांचा नाईलाज होता. पण तरीही डुख धरून आहेर यांच्या पदोन्नतीत खोडा घालण्यात आला. त्यांच्यावरील हा अन्याय दूर व्हायला पुढे दहा वर्षे प्रयत्न करावे लागले. हा अन्याय झाला नसता तर आज ते सहसचिव असते.

दिलीप वळसेपाटील उच्च शिक्षण मंत्री असताना शासनानं शाहूंची भाषणे, पत्रं, शासनादेश प्रकाशित करावेत म्हणून शाहू साहित्य समिती स्थापनेत यश आलं. त्यावेळी संचालक असलेल्या डॉ. एस.एन. पठाण यांनी या कामात खूप सहकार्य केलं.

आज दिवंगत विलासराव देशमुख, सनदी अधिकारी भूषण गगराणी, शुद्धोधन आहेर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. एस.एन. पठाण आदींचं हे सारं काम आता विस्मरणातच
जाणार!

-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९

शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले. माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सण उत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे डॉ. बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.
कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्ष भेटुन १९ वर्षांपुर्वी दिले. त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे. त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.
आम्हाला खुप आनंद झाला.
श्री. सुशिलकुमार शिंदे, मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ठ आय.ए.एस.अधिकारी डॉ. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे उपसचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.
पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, डॉ. बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिकृत चरित्रकार आण्णासाहेब लठ्ठे, धनंजय कीर,रमेश जाधव,जयसिंगराव पवार, य.दि.फडके, कृ.गो.सूर्यवंशी, आदींनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खांडेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.
पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन त्यानुसार आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.
या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे. तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, कणबरकरसर, विजय चोरमारे, श्रीराम पचिंद्रे, यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ॠणनिर्देश केला पाहिजे.
-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९

Monday, June 26, 2017

आणि राजर्षी शाहू महाराजांची जयंती सुरू झाली...


1999 ची गोष्ट. विलासराव देशमुख नुकतेच मुख्यमंत्री झालेले होते. आधी ते शिक्षणमंत्री असताना त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलेले असल्यानं चांगला परिचय होता. माझ्या अर्जावर त्यांनी एक नजर टाकली आणि ते म्हणाले, "कसं शक्यय? अहो, आजवर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले कितीतरी मुख्यमंत्री झालेले असतानाही शाहू महाराजांची जयंती शासनातर्फे होतच नाहीये? यशवंतराव चव्हाणसाहेब, वसंतदादा, शरदराव पवार शाहूंना विसरले असणं शक्य नाही वाटत. ज्याअर्थी त्यांनी शासकीय पातळीवर शाहू जयंती सुरू केलेली नाहीये त्याअर्थी त्याच्यामागे काहीतरी महत्वाचे कारण असेल. गंभीर अडचण असेल. शाहूजयंती सुरू केली तर जोरदार टिका होण्याची भिती असेल. मला मराठवाड्यातल्या माणसाला कशाला अडचणीत आणताय हरी?"

मी म्हणालो, "सर, मला असं वाटत नाही. राहून गेलं असणार. वेळ मिळाला नसणार. तसंही शाहूंना त्यांच्या जातीच्या भिंती नसल्यानं ते दुर्लक्षितच आहेत. त्यांना जात वाली नाहीये.  तुम्ही जयंती सुरू करा. टिका होणार नाही, हा कदाचित स्वागत मात्र होणार नाही. तुम्ही माझ्या अर्जावर मंजुरी द्या. मी जी.आर.निघेल असा पाठपुरावा करतो."
ते सावधपणे म्हणाले, " थोडं थांबा. मी याबाबतचा अहवाला मागवतो. मग बघू."

त्यांनी त्यांचे उपसचिव श्री.भूषण गगराणी यांना बोलावलं. माझ्या शाहू जयंती शासनातर्फे ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवर सुरू करण्याच्या अर्जाबाबत सविस्तर अहवाल द्यायला सांगितला.

गगराणींचा अनुकूल अहवाल आला. त्यानुसार 25 तारखेला रात्री उशीरा जी.आर. आला. 26 ला तो मंत्रालयातही कुठे पोचला नव्हता मग जयंती कशी होणार? जी.आर. काढणार्‍या बाईंनी खोडसाळपणा करून फक्त त्या वर्षांपुरता जी.आर. काढलेला होता. मला पुन्हा सी.एम.ना भेटावं लागलं. पुन्हा सगळी उस्तवारी करावी लागली. दरवर्षी शाहू जयंती करण्यात यावी असा नवा शासनादेश निघेपर्यंत पाठपुरावा करावा लागला.

पुढे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित करावा म्हणून केलेल्या खटपटीला यश आलं. याकाळात दरवर्षी मी शाहूंवर लोकराज्यमध्ये लेख लिहित असे.
महाराजांवर 500 व्याख्यानं द्यायचं मी ठरवलं. 500 वं व्याख्यान कोल्हापूर दरबारात झालं.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पत्रामुळे शाहू महाराजांची जयंती 26 जुलैला नसून 26 जूनला असल्याचं कळलं. आमचे मित्र खांडेकर यांच्यामुळं त्याबाबतचा अस्सल पुरावा शोधता आला. शासन दरबारी पुन्हा प्रयत्न करून 26 जुलै ऎवजी 26 जूनचा जी.आर. काढता आला.

माझे मंत्रालयातील मित्र शुद्धोधन आहेर यांनी मंत्रालयात शाहू जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला. माझेच व्याख्यान ठेवले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी शाहूंबद्दल आकस असलेले होते. जी.आर. असल्यानं त्यांचा नाईलाज होता. पण तरीही डुख धरून आहेर यांच्या पदोन्नतीत खोडा घालण्यात आला. त्यांच्यावरील हा अन्याय दूर व्हायला पुढे दहा वर्षे प्रयत्न करावे लागले. हा अन्याय झाला नसता तर आज ते सहसचिव असते.

दिलीप वळसेपाटील उच्च शिक्षण मंत्री असताना शासनानं शाहूंची भाषणे, पत्रं, शासनादेश प्रकाशित करावेत म्हणून शाहू साहित्य समिती स्थापनेत यश आलं. त्यावेळी संचालक असलेल्या डॉ. एस.एन. पठाण यांनी या कामात खूप सहकार्य केलं. वळसे पाटलांनी त्या शासकीय समितीवर प्रमुख म्हणून एका मोठ्या साहित्यिकांची नियुक्ती केली. पुढे तीन वर्षे झाली तरी ते साहित्यिक कामावर रूजूच झाले नाहीत.
कदाचित एव्हढ्या कमी मानधनावर काम करायला ते तयार नसावेत.

अलिकडेच शासनानं एका विशिष्ट समाजाचा अभ्यास करण्यासाठी शाहूंच्या नावानं आणखी एक समिती नेमली. त्या पदाला उत्तम मानधन आणि इतर सर्व शासकीय सुविधा आहेत. हे बडे साहित्यिक त्या समितीवर पहिल्याच दिवशी रूजू झाले. तुकोबाच सांगून गेलेत ना, "तेथे पाहिजे जातीचे!"

आज दिवंगत विलासराव देशमुख, सनदी अधिकारी भूषण गगराणी, शुद्धोधन आहेर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. एस.एन. पठाण आदींचं आमचं हे सारं काम आता विस्मरणातच गेलेलं बरं. इतिहासाचं पुनर्लेखन सुरू झालेलं असताना यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही.
.....................

Saturday, June 25, 2011

शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर


शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले.माणगाव परिषदेत बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सनउत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.


कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्श भेटुन ११ वर्षांपुर्वी दिले.त्यांनी त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ट सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे.त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.


आम्हाला खुप आनंद झाला.

श्री. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ट आय.ए.एस.अधिकारी श्री. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.


पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिक्रुत चरित्रकार लठ्ठे, कीर,जाधव,पवार आदी सर्वांनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खान्डेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.

पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.

या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे.तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ.  रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, डॉ. कणबरकर यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे