Friday, November 27, 2015

द्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले


महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग? किती वर्षे आम्ही केवळ आरत्याच ओवाळायच्या? संभाजी ब्रिगेड, बामसेफ यासारख्या स्वत:ला फुले -आंबेडकरवादी म्हणऊन घेणार्‍या संघटना फुले ब्राह्मणद्वेष्टे होते असा सरसकट प्रचार करीत असतात. काही चतुर राजकारणी नित्यनेमाने फुले -आंबेडकरांचा महाराष्ट्र असा जयघोष करून जातीच्या मतब्यांका मजबूत करीत असतात. संभाजी भिडे, सनातनचे जयंत आठवले, सोबतचे बाळ गांगल आदी लोक तर फुले राष्ट्रविरोधी होते असे सांगत, लिहीत असतात.
खरेच फुले होते तरी नेमके कोण?

जोतीरावांनी १८४८ मध्ये स्त्रीशिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची सर्वप्रथम व्यवस्था उभारली. घरातला हौद दलितांसाठी खुला केला. बालविवाहविरोध, विधवाविवाहाला प्रोत्साहन आणि सतीप्रथेला विरोध केला इत्यादी गोष्टी आपण वाचलेल्या असतात. पण आज हे सारे प्रश्न तर सुटलेले आहेत, अशावेळी फुल्यांची प्रस्तुतता काय? असा प्रश्न पडणेही स्वाभाविक होय.

जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले. ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुल्यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.

जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या बारा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांच्याकडे बघताना त्यांचा स्वभाव, सवयी आणि पिंड यांच्यामुळे निर्माण झालेल्या तत्कालीन काही बाबींवर भर द्यायचा की त्यांचा कालातीत वारसा शोधायचा याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या याचा विचार करायला हवा.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुल्यांनी १८७३ साली  [१४२ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुल्यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्याने दिडशे वर्षांपुर्वी विचारांचे जागतिकीकरण केलेले होते.
भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घटना दुरूस्ती करून शिक्षण हक्काचा कायदा २००९ साली केला. जो आपल्याकडे २०१० साली लागू करण्यात आला. मात्र ज्याची पुरेशी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याच्या तक्रारी येत असतात. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी मागणी जोतीरावांनी हंटर शिक्षण आयोगासमोर १९ आक्टोबर १८८२ रोजी लेखी स्वरूपात केलेली होती.
अशी मागणी करणारे ते केवळ देशातीलच नव्हे तर आशिया खंडातीलही पहिले शिक्षणतज्ञ होते. त्यांनी १८५० च्या काळात आपल्या सर्व शाळांमध्ये औद्योगिक शिक्षण आणि शेती शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली होती अशी माहिती ब्रिटीश सरकारच्या शिक्षण खात्याच्या अहवालात सापडली आहे. " Industrial Department should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently." तंत्रशिक्षण आणि शेती शिक्षण सर्व शाळांमध्ये मुलांमुलींना वयाच्या ६ व्या वर्षापासून सक्तीचे करण्यात यावे अशी मागणी त्यांनी अनेकवार केल्याचे दिसते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि कौशल्याधारीत शिक्षण दिले तरच नवी पिढी स्वत:च्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहील आणि मजेत व आनंदाने जगू असे प्रतिपादन त्यांनी सरकारकडे केल्याचे आढळून येते.
शैक्षणिक गळतीचा प्रश्न कसा सोडवायचा याची मांडणी करताना १८५४ साली त्यांनी प्रौढ स्त्री - पुरूषांचे साक्षरता अभियान सुरू केलेले होते. उपस्थिती भत्ता, पोषण आहार, विद्यावेतन या योजना त्यांनी राबवलेल्या होत्या. जोतीराव - सावित्रीबाईंच्या चौथीच्या वर्गातली मुक्ता साळवे मांगामहारांच्या दु:खाविषयी जो १८५५ साली निबंध लिहिते त्यातून दलित साहित्याची पायाभरणी होते. त्यांची विद्यार्थिनी ताराबाई शिंदे, "स्त्रीपुरूष तुलना" हा ग्रंथ लिहून स्त्रीवादी साहित्याचे जागतिक दालन सुरू करते. तान्हुबाई बिर्जे ही पुढे [ १९०६ ते १९१२ या काळात ] पहिली भारतीय महिला संपादक बनते. सावित्रीबाई आणि जोतीराव हे त्यांच्या भिडे, वाळवेकर, गोवंडे, परांजपे, लहुजी साळवे, राणबा महार, गणू शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभार, उस्मान व फातिमा शेख आदी सहकार्‍यांसोबत दोन शिक्षण संस्था स्थापन करून अठरा शाळांमधून ज्ञानसत्तेच्या क्षेत्रात जे काम करीत होते ते समजाऊन घेतले तर आजच्या दुषित शैक्षणिक पर्यावरणाला उर्जा मिळू शकेल इतके मुलभूत काम होते ते.

जोतीराव प्रगतीशील शेतकरी होते. शेतीमालाला उत्पादनखर्च भरून येईल आणि किमान १५ ते २० टक्के नफा मिळेल एव्हढा  बाजारभाव मिळाला पाहिजे, शेतकर्‍यांना पिकांसाठी पुरेसे आणि बारमाही पाणी सिंचनासाठी मिळाले पाहिजे, ते वाया जाऊ नये म्हणून नळाद्वारे देण्यात यावे, आधुनिक पद्धतीच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारने परदेशात पाठवावे यासारख्या त्यांनी  ’शेतकर्‍याचा असूड’ या ग्रंथात १८८३ साली केलेल्या सुचना आजही मार्गदर्शक आहेत. शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडून दाखवतात.
१) उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.
२) शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.
३) शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. शेतकरी सुखी व्हायचा असेल धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत. शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. या घरातून त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केली. शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. १३० वर्षांपुर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे "शेतकर्‍याचा असूड" मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलावतळी,धरणे बांधून शेतीला "नळाद्वारे" पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता. अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.
 त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या ६व्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते.त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुत्र सुचवले. शैक्षणिक गळतीच्या प्रश्नाचे मूळ शोधून त्यावर गरिब मुलांना विद्यावेतन {पगार} देण्याचा उपाय त्यांनी अमलात आणलेला होता.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा  अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.

जोतीरावांनी लिंगभाव, जात आणि वर्ग या पक्षपाताच्या/शोषणाच्या तिन्ही केंद्रावर मारा करणारे क्रांतिकारी लेखन केले. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळी उभारल्या.

जोतीरावांची सामाजिक न्यायाची पंचसुत्रे आजही मार्गदर्शक आहेत. १.जातीनिर्मुलनासाठी आंतरजातीय  विवाह, २.सर्वांना ज्ञानसत्तेची कवाडे खुली करणे, ३. स्त्री-पुरूष समता, ४. संसाधनांचे [जमीन,पाणी, हवा, उर्जा, जंगल ] फेरवाटप करणे, ५. धर्मचिकित्सा.

१८६९ साली त्यांनी सर्वप्रथम मागासांसाठी जातनिहाय आरक्षण मागितले. सत्यशोधक पद्धतीच्या विवाहामध्ये हुंडा, मानपान, डामडौल यांना फाटा देऊन वाचवलेले पैसे शिक्षण संस्थाना दान देण्याची पद्धत पाडली. मंगलाष्टकामध्ये नवरी मुलगी स्वातंत्र्य,समता आणि न्यायाची मागणी करते तेव्हा नवरा मुलगा तिला सर्वांसमोर वचन देतो की, " स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा, अर्पाया न भी मी सर्वस्व माझे कदा."
बायकांचे मानवी अधिकार या विषयावर आपल्याकडे मौलिक चर्चा आणि कृती झालेली असली तरी जोतीराव - सावित्रीबाईंनी या क्षेत्रात केलेले कार्य आजही पथदर्शक ठरणारे आहे.

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिले जाते. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. रायगडावर जाऊन तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत चाफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८० साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत.
१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरे जावे लागले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन टिळक आगरकरांच्या जामिनासाठी मुंबईला पाठविले. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आले. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुराभिलेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणे, तिचे सुशोभिकरण करणे आणि शिवजयंती उत्सव सुरू करणे, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे.
आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक जपानी, फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो. माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते.

पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता. पूर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे. १८४८मध्ये त्यांनी देशातील मुलींची पहिली भारतीय शाळा सहकाऱ्यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई  घराचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकत्या झाल्या. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने सुरू झाले. भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४ मध्ये याच वाड्यात सुरू झाले. रात्रीच्या स्त्री-पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात सुरू झाल्या. विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम (बालहत्या प्रतिबंधक गृह) येथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन ठरले. येथेच जोतिरावांनी १८५५ मध्ये मराठीतील पहिले आधुनिक नाटक 'तृतीय रत्न' लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट येथेच निर्माण झाला. 'शेतकऱ्यांचा असूड' आणि ’सार्वजनिक सत्यधर्माच” क्रांतिकारक तत्त्वज्ञान येथेच साकारले.

जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. जोतीरावांच्या  उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले. ‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे. जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली. जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे. अशी कितीतरी कामे या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

जोतीरावांनी शेयर मार्केटवर अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यातून या धंद्यात काय खबरदारी घ्यावी लागते, हा धंदा करताना कोणकोणती कौशल्ये असायला हवीत अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केलेले आहे. पुणे शहराचे शासननियुक्त आयुक्त म्हणून त्यांनी १८७६ ते १८८३ अशी सात वर्षे काम केले. शहराला बंद नळाद्वारे पाणी मिळावे, रस्ते, बागा, ग्रंथालये, शाळा, दवाखाने उभारले जावेत यासाठी ते झटले. शहराचे आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गव्हर्नर जनरलच्या पुणे भेटीच्या काळात रोषनाई व हारतुरे यावर अवास्तव खर्च न करता तो पैसा शाळा उभारण्यासाठी खर्च करावा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवलेला होता. दारू विक्रीचे परवाने द्यायला त्यांचा विरोध होता.ते लिहितात,  "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा. तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा." दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.

उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!

कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!

लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य!
शेअर्स कागदास पाहून रडती ! शिव्याशाप देती योजी त्यास!
शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग ! होऊन नि:संग मूढा लुटी!
आळशाचा खरा नित्य हाच धंदा! दुरूनच वंदा जोती म्हणे!
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.  

फुले हे लेखक, कवी, आद्य नाटककार तर होतेच पण ते मोठे प्रकाशकही होते. तुकाराम तात्या पडवळ यांच्या ’जातीभेद विवेकसार ’ ह्या ग्रंथासह कितीतरी महत्वाचे त्यांनी प्रकाशित केले होते. त्यांची पुण्यात पुस्तकविक्री, फळे, भाजीपाला, सोन्याचे दागिने बनवण्यासाठीच्या मुशी आदींची दुकाने होती.

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.

१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.

महात्मा जोतीराव फुले हे पर्यायी संस्कृतीचे जनक होते. बहुजन समाजाच्या मानसिकतेचं समग्र परिवर्तन करण्यासाठी त्यांनी विचार मांडले, चळवळी चालवल्या. बहुतांश भारतीय समाज हा देव, धर्म, ईश्‍वर, परमेश्‍वर यावर अपार श्रद्धा असलेला आहे. तो पोकळीत जगू शकत नाही. अशा समाजाला विज्ञाननिष्ठा, साधनशुचिता आणि विवेकाच्या आधारावर उभी केलेली बुद्धिनिष्ठ श्रद्धा देण्याची त्यांची धडपड होती. 33 कोटी देवांवर विसंबून असलेल्या समाजाला परंपरा आणि परिवर्तन यांचा सुवर्णमध्य साधून एक नवा विचार त्यांनी दिला. त्यांनी पारंपरिक देव, ईश्‍वर, परमेश्‍वर, संकल्पना नाकारुन ’निर्मिका' ची संकल्पना विकसित केली. सत्यशोधकाला 33 नियमांची आचारसंहिता घालून देताना ही निर्मिक संकल्पना त्यांनी पायाभूत मानली आहे. लिंगभाव, वर्ग आणि जातीची विषमता संपूर्णपणे नाकारणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित ही संकल्पना ते देऊन जातात.

"अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्या अन्नदान, हेच बा स्मरण निर्मिकाचे !!'' ही आपली निर्मिकपूजेची, आराधनेची संकल्पना ते सांगतात. बुद्ध कबीर येशू, महंमद पैगंबर, संत तुकाराम, टॉमस पेन, मिशनरी वृत्ती आणि अमेरिकन उदारमतवाद यांच्या प्रभावातून त्यांची ही संकल्पना विकसित होताना दिसते. सत्यधर्माची, शोषणविरहित आणि सर्वचिकित्सक मानसिकता वाढीला पूरक ठरणारी ही मांडणी काळाच्या ओघात ओढाताण झाल्यानं बाजूला पडली असली तरी भारतीय समाजमनाला ती एक उत्तम पर्याय देते, ही निश्‍चित.

फुले साहित्याचा आपण गेल्या २५ वर्षात हिंदी, तेलगू, बंगाली, कन्नड, तमीळ, उर्दू, पंजाबी, इंग्रजी आदी १३  भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे. त्याला विविध राज्यांमध्ये खूप मोठी मागणी आणि लोकप्रियता मिळते आहे त्याचे कारण या साहित्याची प्रस्तुतता होय.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सामाजिक न्यायाचे सगळे राजकारण याच सुत्राच्या भोवती फिरते आहे.जोतीरावांच्या  राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतीसुत्र समजून घेतले पाहिजे. त्यांचा विरोध शोषणकर्त्या नेतॄत्वाला होता. त्यावेळी हे नेतॄत्व ब्राह्मणांकडे होते.हा समाज त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेच्या सगळ्या किल्ल्या स्वत:च्या कंबरेला बाळगून होता. जोतीराव पर्यायी संस्कृतीचे जनक होते.

आज समग्र सत्ता परिवर्तन झालेले आहे.आता सगळी सुत्रे बहुजनांकडे आलेली आहेत. आज जोतीराव असते तर त्यांनी आसुडाचे  फटके कोणाला मारले असते? "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी!" असे पोटतिडकीने सांगणार्‍या जोतीरावांच्या नावाचा वापर जातीविद्वेष पसरवण्यासाठी केला जावा ही शोकांतिका आहे. सत्ता समग्र बहुजनांपर्यंत झिरपलेली नाही. भटकेविमुक्त, दलित-आदिवासी,ओबीसी,महिला यांची परवड चलू आहे.

देशातील सत्ताधारी वर्गाचे अपयश लपवण्यासाठी आणि वर्ग, जाती, धर्म व लिंगभावाच्या आधारे केले जाणारे शोषण आणि पक्षपात यांच्यावर पांघरूण घालण्यासाठी आज जातीविद्वेषाच्या वणव्याचा सर्रास आधार घेतला जातो आहे. अशावेळी जोतीरावांचा विवेकी वारसा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कालसुसंगत संकल्पचित्राच्या प्रकाशात सामाजिक ऎक्याची चळवळ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला जायला हवा..
.....................

Sunday, October 25, 2015

Top 1% of India's richest now own over 50% of country's wealth:

http://www.ibtimes.co.in/top-1-indias-richest-now-own-over-50-countrys-wealth-credit-suisse-650480
News Economy
Top 1% of India's richest now own over 50% of country's wealth: Credit Suisse
By Besta Shankar | Updated: October 14, 2015 14:03 IST
India's Richest persons
India's richest people in the past 15 years are getting luckier as the top 1% of them now own 53% of the country's wealth, up from 36.8% in 2000, according to a report from a global brokerage firm.

While the top 5% of the richest account for 68.6% of the country's wealth, the top 10% own 76.3%, said Credit Suisse in a global wealth report.

Reflecting a dismal picture of the wealth owned by the poor, the report said that they just possess 4.1% of the nation's wealth.

The top 1% of the richest people in the country saw their share of wealth surpassing the 50% mark in the past three governments, i.e., during the National Democratic Alliance (NDA) government from 2000-04 and two-terms of United Progressive Alliance (UPA) government between 2004 and 2014.

They also witnessed an increase in their wealth during the first year of the Modi government.

"The colour of the government has been no impediment to the steady rise in the riches of the wealthy," Livemint reported.

Further, the gap between the share of wealth held by the top 1% and the top 10% has come down to 23.3% in 2015 from 29.1% in 2000, indicating that the richest 1% have been gaining the wealth owned the top 10%.

"The richest are growing at the expense of the relatively well-off," the report said.

On the other hand, the share of "the poorer half of the population" declined to 4.1% from 5.3% during 2000 and 2015.

Overall, the country's wealth rose by $2.284 trillion during the same period, according to Credit Suisse.

Article Published: October 14, 2015 14:03 IST

जगण्याच्या संवेदना आणि जीवनमूल्यांचा वेध--‘ख्वाडा’

http://www.loksatta.com/manoranjan-news/khwada-marathi-movie-team-in-loksatta-office-1154130/
लोकसत्ता,पुणे,रविवार, दि.२५आक्टो.२०१५
जगण्याच्या संवेदना आणि जीवनमूल्यांचा वेध--‘ख्वाडा’

लंडन महोत्सवात ‘ख्वाडा’ दाखविला गेला. चित्रपट पाहून मुमताज नावाच्या बाई खूप प्रभावित झाल्या.
शब्दांकन- शेखर जोशी | October 25, 2015 04:08 am

दोन राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार मिळविलेला ‘ख्वाडा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येवर ‘ख्वाडा’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, सादरकर्ते चंद्रशेखर मोरे आणि चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या शशांक शेंडे, अनिल नगरकर, भाऊसाहेब शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्या गप्पांचा वृत्तान्त..
‘ख्वाडा’ हा चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचे स्वप्न होते. त्यामुळे या चित्रपटाच्या शीर्षकापासून, ते कलाकारांची निवड, चित्रपटांची मांडणी अशा अनेक गोष्टींमागे भाऊरावांचा काही एक विचार आहे हे जाणवल्याशिवाय राहात नाही. ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या शीर्षकापासूनच त्याची सुरुवात होते. ‘ख्वाडा’ म्हणजे काय?, यावर चित्रपटाचे शीर्षक लक्षवेधी असावे आणि त्या शीर्षकातून चित्रपटाचा संपूर्ण गाभा व्यक्त होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन ‘ख्वाडा’ हे नाव चित्रपटाला दिल्याचे भाऊराव यांनी सांगितले. ‘ख्वाडा’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असून मुख्य अर्थ ‘अडथळा’ असा आहे. अन्य अर्थ हे त्या त्या परिस्थितीनुसार समोर येतात, असे ते म्हणाले. या चित्रपटाचा विषय सतत ‘स्थलांतर’ करत राहणाऱ्या लोकांची गोष्ट सांगतो. भटकंती करणाऱ्या समाजाच्या जगण्याच्या संवेदना, त्यांची जीवनमूल्ये, जगण्याचा संघर्ष, मानवी प्रवृत्ती, मनगटशाहीच्या जोरावर करण्यात येणारी पिळवणूक याचा वेध या चित्रपटात घेण्यात आला असल्याची माहिती भाऊरावांनी दिली. एकीकडे इतर दिग्दर्शक शहरी विषयांच्या चित्रपटांकडे वळत असताना संपूर्णपणे ग्रामीण चित्रपट तोही पहिल्याच प्रयत्न करणे यात धोका नाही का वाटला?, या प्रश्नावर बोलताना चित्रपटाचा विषय संपूर्णपणे ग्रामीण आहे. पण, केवळ विषय ग्रामीण आहे म्हणून चित्रपट चालेल की नाही, असा धोका आपल्याला वाटले नसल्याचे भाऊराव यांचे म्हणणे आहे. मुळात, कोणताही चित्रपट करणे यात धोका हा असतोच. ग्रामीण भाषा, जीवन आणि विषय असलेले चित्रपट याआधीही येऊन गेले आहेत. त्यातून लोकांच्या वेगळ्या संवेदना, त्यांचे जगणे हे लोकांसमोर आले. वास्तवाचा वेध घेणारे आणि आपल्या दैनंदिन जीवनाला भिडणारे विषय चित्रपटांतून मांडले तर प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद मिळतो. मग तो चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा बाजूला राहतो, असा मुद्दा भाऊराव यांनी मांडला. शिवाय, जगण्याचा संघर्ष हा काही फक्त ग्रामीण भागांतील लोकांनाच करावा लागतो असे नाही, तर शहरी भागांतील लोकांनाही त्याचा अनुभव येत असतो. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे त्याचाही संदर्भ भाऊराव यांनी यावेळी बोलताना दिला. संघर्षांचे प्रकार परिस्थितीनुरूप बदलतात हे लक्षात घेतले तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना ‘ख्वाडा’ आवडेल, असे भाऊराव क ऱ्हाडेंनी सांगितले. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद आपल्याला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्रपट ही एक कलाकृती असून चित्रपटाकडे कला म्हणून पाहिले जावे. कलात्मक आणि व्यावसायिक अशी दोन्ही टोके चुकीची असून चित्रपटातील आशय हा महत्त्वाचा असतो. तो आशय चित्रपटातून काय ताकदीने पुढे नेला जातो त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.
आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही
लंडन महोत्सवात ‘ख्वाडा’ दाखविला गेला. चित्रपट पाहून मुमताज नावाच्या बाई खूप प्रभावित झाल्या. त्यांना चित्रपट खूप आवडला. मुमताज या मूळच्या इराणच्या, पण गेली काही वर्षे त्या लंडनला स्थायिक झाल्या आहेत. चित्रपटातील ‘मायग्रेशन’चा मुद्दा त्यांना भावला असेल. हा चित्रपट म्हणजे ‘चित्रसंगती’ आहे. भाषेचा कोणताही अडसर न राहता चित्रपटातून भावना, विचार सगळ्यांपर्यंत पोहोचताहेत, हे या निमित्ताने आम्हाला जाणवले असल्याचे शशांक शेंडे म्हणाले.
थक्क करणारा चित्रपट
चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मोठे नाव असलेल्या कंपनीने तो सादर करावा, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. त्यामुळे मीच चित्रपट सादर करावा, असे मला सांगण्यात आले. मी चित्रपट पहिला. तो थक्क करणारा अनुभव होता. प्रेक्षकांनी ‘ख्वाडा’च्या पाठीशी उभे राहावे. चित्रपटाला ग्रामीण भागातील प्रेक्षकांबरोबरच शहरी प्रेक्षकही मिळेल.
चंद्रशेखर मोरे सादरकर्ते
‘ख्वाडा’ हा तर ‘चित्र’पट
‘ख्वाडा’ ची कथा ही पुणे व अहमदनगर जिल्ह्य़ांच्या ग्रामीण सीमेवर घडणारी आहे. ‘ख्वाडा’ संवादाच्या माध्यमातून पुढे जात नाही. तो ‘चित्र’पट आहे. चित्रसंगतीने तो पुढे जातो. शहरी संस्कृतीतून लोप पावलेल्या, लोप पावत जाणाऱ्या अनेक शब्दांचा यात वापर करण्यात आला आहे. मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनातील हे सर्व शब्द आहेत.
शशांक शेंडे -अभिनेते
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये
मी मूळचा शेतकरी कुटुंबातील. पण चित्रपटाकडे व्यवसाय म्हणून वळलो. शेती विकायचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी विरोध केला, पण त्यांना व्यावहारिकपणे सर्व पटवून दिले. मग घरचेही माझ्या पाठी उभे राहिले. शेतकऱ्यांच्या तरुण पिढीने नोकरी किंवा व्यवसायाकडे वळावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये
भाऊराव कऱ्हाडे -दिग्दर्शक
प्रेक्षकांना नक्की आवडेल
हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल. चित्रपटात मी ‘खलनायक’ आहे. मनगटशाहीच्या जोरावर ‘नडला की तोडला’ असा हिशेब असणारी ही व्यक्तिरेखा आहे. मी यापूर्वीही चित्रपटातून ‘खलनायक’ रंगविला आहे. सुमारे २५ चित्रपटांतून मी आत्तापर्यंत लहान-मोठय़ा भूमिका केल्या आहेत.
अनिल नगरकर अभिनेता
‘ख्वाडा’ने खूप आनंद आणि प्रसिद्धी दिली
चित्रपटातील नायकाला कुस्तीची पाश्र्वभूमी असल्याचे दाखविले आहे. मलाही कुस्तीची पाश्र्वभूमी होती. ही व्यक्तिरेखा मला आवडली होती. सुदैवाने मला ती साकारायला मिळाली, याचा आनंद आहे.अर्थात मला स्वत:लाही खूप प्रसिद्धी मिळाली. लोक ओळखायला लागले.
भाऊसाहेब शिंदे – अभिनेता
First Published on October 25, 2015 4:08 am
Web Title: Khwada Marathi Movie Team In Loksatta Office
.........................
http://www.loksatta.com/moviereview-news/marathi-movie-khwada-review-by-lokprabha-1153662/
लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड खोड्यातून सुटण्याची-- सुहास जोशी | October 23, 2015 15:34 pm
साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर
लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड  खोड्यातून सुटण्याची--
चित्रपट सुरु होतो. नदीकिनारी शेळ्या, मेंढय़ा, त्यांची अखंड बे बे बे, धनगराचे विशिष्ट शब्दांनी त्यांना चुचकारणे, धनगराचा तरणाबांड धाकटा दंड बैठका घुमवितोय, मिसरुडावरुन हात फिरवित स्वप्नातदेखील रमतोय, धनगरी बोली भाषेची विशिष्ट लय तुम्हाला सादवतेय, आजूबाजूची मोकळी रानं, क्षितिजापर्यंतचं अवकाश आणि त्यात खुल्या आकाशाखालचा धनगराचा फिरता प्रपंच (वाडा). पुढच्या प्रसंगात चाऱ्याच्या शोधात वाडा स्थलांतरीत करताना धनगरी गीताचे बोल, घोडय़ावरच्या बिऱ्हाडात बसलेलं धनगराचं सहा-सात वर्षांचं पोर, मध्येच येणारा जाणारा रामराम करतोय, एखादा गाडीवाला जरा गुरगुरत जातोय आणि हे सारं पाहताना आपल्याला प्रश्न पडू लागतो की हा चित्रपट आहे की माहीतीपट, धनगरांचं जगणं मांडणारा. पण, धनगरी भाषेचा लहेजा आणि वाडय़ाचे सारे बारकावे टिपत चित्रफीत पुढे सरकू लागते आणि हळूहळू आपणदेखील त्या वाडय़ाबरोबर रानोमाळ भटकू लागतो. त्यांच्या सुख-दु:खात रमू लागतो. कथानकाची पकड बसते आणि त्या वाडय़ाला पडलेला खोडा आपल्यालादेखील जाणवू लागतो. त्या पात्रांची, त्यांच्या भाषेची, त्यांच्या भावनांची, मुक्या शेळ्या, मेंढय़ांची या साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर आदळतो.
चित्रपटीय भाषेची उमज असलेला दिग्दर्शक सक्षम कथानकाला कसा उत्तम न्याय देऊ शकतो त्याचं ‘ख्वाडा’ हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. प्रत्येक फ्रेम न् फ्रेम दिग्दर्शकाच्या डोक्यात इतकी फिट्ट बसलेली आहे की त्याला जे हवं ते सारं काही तुमच्यापर्यंत पोहोचते. दिग्दर्शनाची पाश्र्वभूमी नाही, कसलेले अनुभवी कलाकार नाहीत, स्टुडिओचा रचनाबद्ध अवकाश नाही, सारं काही खुल्या छताखालचं आणि त्याच खुलेपणातून ही कलाकृती आकार येते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कथानकातून साकारलेलं असते. ना कसली तांत्रीक उणीव, की ना अनुनभवी कलाकारांचा बुजरेपणा. कथानक, संवाद, ध्वनी, चित्रीकरण अशा सर्वच बाबींना पुरेसा न्याय देत साकारलेलं अफलातून टिमवर्क म्हणजे ‘ख्वाडा’ म्हणावं लागेल.
आणि हे सर्व साकारतानाच एक सामाजिक भाष्यदेखील अगदी सहजपणे समोर येतं. तेदेखील आमच्यावर किती अन्याय होतोय पहा असा आक्रस्ताळेपणा अजिबात न करता. प्रत्येक पात्राचा एक स्वतंत्र स्वभाव रेखाटला आहे. पिकलेल्या दाढी मिशांबरोबर आलेला विचारातला व्यावहारिकपणा आणि प्रथा परंपरा जोपासणारा कुटुंबप्रमुख. तर नवी पिढी नवी स्वप्न पाहणारी. कधीकधी त्यातच हरवणारी. आणि वेळ पडलीच तर अंगातली रगदेखील दाखविणारी. गावातल्या नवसंरजामी वृत्तीदेखील अगदी सहज मांडली आहे. या साऱ्या भावभावना अगदी साध्या साध्या संवादातून आणि वागणूकीतून अगदी सहजपणे जाणवतात. हीच खरी तर याच्या दिग्दर्शनाची यशाची पावती आहे. तर दुसरीकडे सामाजिक भाष्य करतानादेखील दिग्दर्शक संयमाने, वास्तववादी रचना अकृत्रिमपणे मांडली आहे.
ऑडीओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी ही या चित्रपटाची बलस्थानं. कॅमेरा पॅनिंगदरम्यान काही ठिकाणाचा नवखेपणा सोडला तर एकंदरीतच सारा कॅमेरा बोलका आहे. विशेषत: अशा फिरत्या धनगर वाडय़ावरच रात्रीचं जगणं दाखवतानाचा प्रकाशाचा उपयोग मोजका, नेमका आणि परिणामकारक झाला आहे. शेळ्या, मेंढय़ांना चुचकारणं, हाकारणं, शेळ्या मेंढय़ांचे आवाज आणि हालचाली हे सारं खुल्या रानावरचा अवकाश सांभाळत चित्रपटाची मस्तपैकी ध्वनीप्रतिमाच तयार झाली आहे.
एक-दोन अपवाद सोडले तर बाकी सर्व कलाकारांसाठी चित्रपट माध्यम नवीन आहे. अशा वेळी एक प्रकारचं अवघडलंपण, बोलण्यात कृत्रिमता येऊ शकते. पण, या सर्वाचाच पडद्यावरचा वावर पाहील्यावर दिग्दर्शकाने त्यांच्यावर मेहनत घेतल्याचे स्पष्ट जाणवते. तारुण्यात पदार्पण केलेला बाळू किमान संवादातून पण, त्याच्या हावभावातून अगदी सहज उलगडतो. त्याचं स्वप्नील जग, कुस्तीत रग जिरवणारं जगं, आपल्याच मस्तीत वावरणं आणि त्याचवेळी कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी खंबीरपणे उभं राहणं. त्याला संवाद कमीच आहेत. पण, हे सारं त्यांनी देहबोलीतून समर्थपणे मांडलं आहे.
या सर्वाचा एकसंध परिणाम म्हणजे ‘ख्वाडा’ हा चित्रपट आहे. एखाद्या काल्पनिक गोष्टीत स्वप्नरंजनात रमविण्यापेक्षा दिग्दर्शकाने एक सामाजिक दृष्टी ठेवत चांगली कथा मांडली आहे. आज धनगरांचं आयुष्य असंच आहे का? ते असेच भटकतात का? आजही असा अन्याय होतो का? वगैरे प्रश्न अनेक चिंतातूर जंतूना पडू शकतात. पण, चित्रपटाची मांडणी करताना दिग्दर्शकाने प्रतिकात्मक प्रसंगांचा- कुस्ती, शेळ्या मेंढय़ांच्या हालचाली, गावातला बाजार, संरंजामशाहीकडे झुकत चाललेली नवी समाजरचना – एक अप्रितम कोलाज उभा करत ह्य़ा साऱ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. पण, हे करताना चित्रपट शब्दबंबाळ होऊ दिला नाही. किंबहुना धनगरी भाषेचा पुरेपूर वापर करुन प्रत्येक प्रसंग जिवंत झाला आहे. केवळ प्रयोग म्हणून केलेला, वंचितांची दु:खं मांडणारा म्हणून पाहता येणार नाही. प्रत्येकाची जगण्याची व्याख्या मांडणारा, जगण्याचा आनंद दाखविणारा, जगण्याची दिशा दाखविणारा आणि बदल मांडणारा असा एक परिपूर्ण चित्रपट म्हणावा लागेल. या कथेची झिंग खरे तर हळूहळू आपला ताबा घेत जाते. अशा वेळी मध्यंतर हाच खोडा वाटू लागतो.
खोडा म्हणजे दुसऱ्याला लोळवण्यासाठी घातलेला मोडता, अडथळा. मग तो समाजातल्या एखाद्या वर्गाला घातला असो की कुस्तीतला असो. त्यातून एक हतबलता येते. तो खोडा तोडून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड प्रत्येकालाच असते. कधी ना कधी तरी हा खोडा सोडवावाच लागतो. युक्तीने असो की शक्तीने. भाऊराव कऱ्हाडे यांनी खोडय़ाची संकल्पना वापरुन समाजालाच पडलेल्या खोडय़ाचं अंगावर येणारं चित्रिकरण ‘ख्वाडा’ मधून करुन हा खोडा तोडायचा प्रयत्न केला आहे.
कथासूत्र
रघू कऱ्हे हा धनगर आपल्या कुटुंबकबिल्यासह शेळ्या, मेंढय़ाच्या पोटापाण्याची सोयीसाठी मूळ गावापासून लांबलांबच्या गावात रानोमाळ भटकत असतो. धनगरी आयुष्याचा हा एक अविभाज्य भाग. लग्न झालेला थोरला मुलगा, त्याची बायको, दोन चिल्ली पिल्ली, तारुण्यात पदार्पण केलेला बाळू आणि पन्नास-शंभर शेळ्यामेंढय़ा असा त्याचा रघू कऱ्हेचा वाडा गावोगाव भटकत असतो. रघू तसा नेमस्त. जेथे जाऊ तेथे सर्वाना धरुन राहणारा. समाजाच्या रीतीभाती जोपासणारा. अन्याय झाला तरी पडती बाजू घेणारा. घरच्या पातळीवर प्रतिगामी वाटणारा, पण शेळ्यामेंढय़ांवर जीवापाड प्रेम करणारा. तर तरुण बाळू ही चाकोरी सोडून एका जागी स्थिरावण्याची इच्छा बाळगून असलेला. वयानुसार आलेला रगेलपणा जोपासणारा. गरज पडलीच तर दोन हात करायची खुमखुमी असणारा. पण, तरीदेखील बराच संयमी. एका मुक्कामी गावातल्या सरपंचाच्या मुजोरीचा फटका वाडय़ाला बसतो. त्यातच चाऱ्याचीदेखील कमतरता भासू लागते. बाळूचं लग्नदेखील ठरते. पण, सरपंच वारंवार खोडा घालत असतो. त्यातूनच मग वाडय़ाची तगमग वाढू लागते आणि खोडा सोडविण्यासाठी निर्वाणाची कृती करावी लागते.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत
निर्माता – विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
सहनिर्माता – चंद्रकांत मारूती राऊत
लेखक-दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
छायालेखक – वीरधवल पाटील
संगीत – रोहित नागभिडे
संकलक – रोहन पाटील
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
ध्वनि संयोजक – महावीर सबनवार
कलावंत – भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, सुरेखा, अनिल नगरकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, लक्ष्मण मांढरे, इंद्रभान कऱ्हे, योगेश डिंबळे, वैशाली केंदळे, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण, ढोकळे मामा, रघुनाथ आंबेकर, सचिन मोरे, दीपक ओहळ, तांबे, स्नेहल भांगे, यशराज कऱ्हाडे, जागृती कुलाल, सोमनाथ वाघमोडे व अन्य.
First Published on October 23, 2015 12:51 pm
Web Title: Marathi Movie Khwada Review By Lokprabha
टॅग: Khwada,Marathi-Movies,Movie-Review,National-Award-Winner
.................
http://www.loksatta.com/manoranjan-news/review-of-marathi-movie-khwada-1154121/
मराठी चित्रपटांमध्ये अस्सल मातीतला सिनेमा हे बिरुद मिरविणारा नवा चित्रपट म्हणजे ‘ख्वाडा’ होय. ख्वाडा या शब्दाचा अर्थ ‘अडथळा’ असा आहे. त्याचबरोबर कुस्तीमध्येही खोडा घालतात तोही एक विशिष्ट अर्थ आहे. या दोन्ही अर्थाचे प्रतीक म्हणून या चित्रपटाचे शीर्षक बनले आहे. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. रूढार्थाने प्रत्येक चित्रपटात नायकाची किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा संघर्ष दाखविलेला असतो. या चित्रपटातही तो संघर्ष आहे. मेंढपाळ कुटुंबाचा हा संघर्ष हाच त्यांचा जगण्याचा भाग आहे हे चित्रपट अधोरेखित करतो. अतिशय अल्प संवाद आणि मेंढपाळांच्या बोलीभाषेतील संवादावर भर असलेला हा चित्रपट प्रत्येक चित्रचौकटीतून हळूहळू उलगडत जातो आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांची हळूहळू पकड घेत जातो आणि एका निर्णायक क्षणाला पोहोचतो. खरे तर अस्सल मातीतला सिनेमा असे वर्णन करता येईल.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेली तरीही मेंढपाळ समाजाचे वास्तव असे असू शकते हे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता सहजपणे दाखविण्यात आले आहे हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. चित्रपटातली कऱ्हे कुटुंबाची परिस्थिती आजही असते हे प्रेक्षकाला नव्याने समजते आणि त्यामुळे चित्रपट प्रेक्षकाला अस्वस्थ करतो.
शशांक शेंडे आणि अनिल नगरकर या अभिनेत्यांव्यतिरिक्त बाळू, बाळूची आई, बाळूचा मोठा भाऊ पांडा व अन्य सर्व व्यक्तिरेखांसाठी निवडलेले कलावंत प्रेक्षकांसमोर प्रथमच पडद्यावर आले आहेत. लोकप्रिय कलावंत नसूनही चित्रपटाचे कथानक, संपूर्ण खुल्या आकाशाखाली केलेले छायालेखन, अतिशय उत्कृष्ट ध्वनिसंयोजन, समर्पक संगीत, पाश्र्वसंगीत, वेशभूषा, कला दिग्दर्शन यांतील उत्कृष्टतेची साथ लाभल्याने चित्रपट अपेक्षित परिणाम साधून प्रेक्षकाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवण्यात प्रचंड यशस्वी ठरतो.
रघू कऱ्हे हा मेंढपाळ कुटुंबाचा प्रमुख. चाळीस-पन्नास मेंढय़ा, रघू कऱ्हेची बायको, मोठा मुलगा, त्याची बायकामुले आणि धाकटा मुलगा बाळू असे बिऱ्हाड आहे. वन खात्याने जमीन घेतल्यामुळे कऱ्हे कुटुंबावर मेंढय़ांसाठी चाऱ्याच्या शोधात गावोगाव भटकण्याची वेळ येते. मेंढय़ांचा ‘वाडा’ घेऊन ते या गावातून त्या गावात स्थलांतर करतात. या स्थलांतरादरम्यान निरनिराळ्या गावात, गावाबाहेरच्या माळरानावर खुल्या आकाशाखाली वास्तव्य करतात, चूल मांडतात, मेंढय़ांची खरेदी-विक्री करतात, मेंढय़ांना न्हाऊमाखू, चारा खायला घालतात आणि पुढल्या प्रवासाला निघतात. मेंढपाळांचे जगणे, त्याचे मर्मभेदक चित्रण या चित्रपटात केले आहे.
जमीन वन खात्याने घेतल्यानंतर आता दहा वर्षे उलटून गेली तरी रघू कऱ्हे न्यायालयात खटला लढवितो आहे. मेंढय़ांचे पालनपोषण करणे, त्यांच्यासाठी चारा शोधत िहडणे यात रघू कऱ्हेचा मोठा मुलगा पांडा आणि धाकटा मुलगा बाळू नेहमीच व्यस्त असतात. त्यातच बाळूचे लग्न करण्याचा प्रस्ताव येतो आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो, पसंती होते, तरी काही कारणास्तव लग्न मोडते म्हणजेच अडथळा येतो हा प्रसंग असो की कुस्तीमध्ये जिंकल्यानंतरही बाळूला सरपंचाकडून इनाम मिळण्याऐवजी मार खावा लागतो तो प्रसंग असो की सरपंच अशोक दादा पाटीलच्या गावाबाहेरील शेतात राहायला आल्यानंतर फुकटात चार-दोन मेंढय़ा त्याला द्याव्या लागतात तो प्रसंग असो अशा अनेक छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून अतिशय साधेपणाने परंतु नेमकेपणाने चित्रपटाचे शीर्षक उलगडून सांगितले आहे.
मेंढपाळ कुटुंबाचा प्रमुख रघू कऱ्हे वयोमान आणि अनुभवानुसार अधिक व्यवहारी झाला आहे. स्थलांतर करावे लागत असल्यामुळे त्या त्या गावच्या रितिरिवाजानुसार जपून राहावे, गावांतील थोरामोठय़ांशी संघर्ष टाळून पडती बाजू घेऊन मार्गक्रमणा करावी या मताचा आहे. तर कुस्तीगीर रांगडा तरुण असलेल्या बाळूचे मत याविरुद्ध आहे. कुणी अडीबाजी केली, उगाचच त्रास देत असेल तर त्याला धडा शिकवायला हवा असा त्याचा खाक्या आहे. परंतु वडिलांपुढे बाळू गप्प बसतो. मात्र पाणी डोक्यावरून जाते तेव्हा निर्णायक पाऊल उचलतो.
स्वातंत्र्यानंतर अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागांतील नवीन समाजरचना, नवीन संरजामी वृत्ती आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय असे समाज, त्यातील लोक, त्यांची मानसिकता अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे जगणे संथ परंतु, मर्मभेदी पद्धतीने एकेका चित्रचौकटींतून हळूहळू उलगडून सांगण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
बाळू, रघू कऱ्हे, पांडा, अशोक दादा पाटील अशा सर्व प्रमुख व्यक्तिरेखा या व्यवस्थेचाच भाग आहेत हेच चित्रपट पाहताना प्रेक्षकावर ठसत जाते.
मेंढपाळ कुटुंबातील सर्व व्यक्तिरेखा दाखविताना आणि कथानकातील संघर्ष अधोरेखित करताना सबंध चित्रपटात सारे काही गहन-गंभीर वास्तव प्रसंग दाखविलेले नाहीत. तर बाळू हा ग्रामीण भागात राहणारा मेंढपाळ कुटुंबातील असला तरीही त्याचे लग्न ठरत असताना तो तंद्री लावून स्वप्नाळू बनतो हे सारे अकृत्रिमपणे आणि लाजवाब पद्धतीने प्रेक्षकांसमोर येत राहते.
बाळू, सरपंच अशोक दादा पाटील या दोन्ही व्यक्तिरेखा एकेक प्रवृत्ती दर्शवितात. पहिल्या दृश्यापासून ते अखंड चित्रपट पाहताना दिग्दर्शकाची पकड जाणवेल इतके प्रभावी दिग्दर्शन आहे. हळूहळू चित्रचौकटींतून उलगडत जाणाऱ्या या चित्रपटात मेंढपाळ कुटुंब, खुल्या आकाशाखाली बसलेले रघू कऱ्हेचे कुटुंब, मेंढय़ांचे चरणे, मेंढय़ांना आंघोळ घालणे, त्यांचे औषधपाणी करणे, बाळूचे व्यायाम करणे, नदीत डुबक्या मारणे असे छोटय़ा छोटय़ा प्रसंगांची त्यांच्या अंगभूत संथ लयीप्रमाणे चित्रपटाची लय सांभाळली आहे. त्यामुळे चित्रपट किंचित संथ लयीचा वाटत असला तरी प्रभावी ठरतो.
शशांक शेंडे यांनी रघू कऱ्हे अप्रतिम साकारला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या शहरी तसेच ग्रामीण बाजाच्या भूमिकांपेक्षा सर्वथा निराळ्या छटेची भूमिका करण्याची संधी त्यांना या चित्रपटात मिळाली असून त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. बाळू आणि सरपंच अशोक दादा पाटील यांच्या भूमिकांमधील अनुक्रमे भाऊसाहेब शिंदे आणि अनिल नगरकर यांनीही जीव ओतून काम केले आहे. भाऊसाहेब शिंदे यांचा हा पहिला चित्रपट आहे असे अजिबात प्रेक्षकाला जाणवणार नाही.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत
ख्वाडा
निर्माता – विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
सहनिर्माता – चंद्रकांत मारुती राऊत
लेखक-दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
छायालेखक – वीरधवल पाटील
संगीत – रोहित नागभिडे
संकलक – रोहन पाटील
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
ध्वनिसंयोजक – महावीर साबन्नावर
वेशभूषा – भाऊसाहेब शिंदे
कलावंत – भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, सुरेखा, अनिल नगरकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, लक्ष्मण मांढरे, इंद्रभान कऱ्हे, योगेश डिंबळे, वैशाली केंदळे, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण, ढोकळे मामा, रघुनाथ आंबेकर, सचिन मोरे, दीपक ओहळ, तांबे, स्नेहल भांगे, यशराज कऱ्हाडे, जागृती कुलाल, सोमनाथ वाघमोडे.
सुनील नांदगावकर – sunil.nandgaokar@expressindia.com
First Published on October 25, 2015 3:43 am
Web Title: Review Of Marathi Movie Khwada
टॅग: Khwada,Marathi-Movie-Khwada,National Award Winning Marathi Film Khwada
....................
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-movie-khwada-2-1152155/
‘ख्वाडा’चे प्रदर्शन पाच वेळा स्थगित- भाऊराव कऱ्हाडे
सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे.
प्रतिनिधी, नाशिक | October 20, 2015 08:03 am
सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे. मी मूळ शेतकरी आहे. माझ्या जवळ जमीन ठेवुन आत्महत्या करण्यापेक्षा ती विकून काहीतरी सृजनात्मक निर्मिती करेल या विचाराने आपण बागायती जमीन विकली. त्या रकमेतून ‘ख्वाडा’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिवाळी नंतर दुसऱ्या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगितले.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत आणि भाऊराव कऱ्हाडे लिखीत, दिग्दर्शित १३ विविध पुरस्कारांनी नावाजलेला ख्वाडा मराठी चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात रसिकांच्या भेटीस येत आहे. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शशांक शेंडे, नवोदित कलाकार भाऊसाहेब शिंदे आणि अनिल नगरकर, मोरे यावेळी उपस्थित होते. चित्रपटाला विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्याच कालावधीत वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट पडद्यावर येत होते. त्यामुळे चित्रपटाच्या भाऊगर्दीत आपला चित्रपट नको म्हणून आम्ही चित्रपट प्रदर्शन लांबणीवर टाकले. त्यात निधीही पुरेसा उपलब्ध होऊ शकला नाही तसेच अन्य काही कारणांमुळे पाच वेळा चित्रपट पुढे ढकलला गेला. चित्रपटात सर्व नवखे कलाकार असले तरी मातीत राबणारे आहे. यातील एकाही कलाकाराने रंगभूषा केलेली नाही. कलाकाराला विषय समजावा, भूमिकेचे विविध आयाम लक्षात यावे यासाठी प्रत्यक्ष चित्रीकरण ज्या ठिकाणी करायचे आहे, त्या ठिकाणी जाऊन दोन महिने कार्यशाळा घेतली. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान, बोलीभाषा याचा अभ्यास त्यांना करता आला.
दुसरीकडे आपसूक त्यांची त्वचा काळंवडल्याने वेगळ्या रंगभूषेची गरज पडली नाही. यातील नायक व खलनायक ग्रामीण भागातील असले तरी अभिनेत्री रसिका चव्हाण ही मुंबईची आहे. चित्रपटात तिला एकही संवाद नाही. तिने जो काही संवाद साधला तो डोळे आणि देहबोलीच्या माध्यमातून. एकही संवाद तिच्या तोंडी नसतांना तिची भूमिका लक्षात राहण्यासारखी असल्याचे कऱ्हाडे यांनी सांगितले. शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर सध्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित विविध संकटे उभी असल्याचे सांगितले. त्यातून बाहेर पडतांना आत्महत्येचा अवलंब करण्यापेक्षा मी शेतकरी आहे, मी लढणार असे म्हणून तो स्थलांतराचा पर्याय निवडतो. मात्र स्थलांतराने प्रश्न सुटतात असे नाही तर नव्याने वेगळ्या प्रश्नांची मालिका समोर उभी राहते. याच मालिकेचे प्रतिनिधीत्व करणारे मेंढपाळ कुटूंब चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
चित्रपटात वैष्णवी ढेरे, योगेश डिंबळे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे यांच्यासह अन्य कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
First Published on October 20, 2015 8:03 am
Web Title: Marathi Movie Khwada 2
टॅग: Khwada,Marathi-Movie,Nashik
...............................

Friday, October 23, 2015

अन्नाची नासाडी -- रतन टाटा

  From: Ulhas H. Joshi
18 hrs
अन्नाची नासाडी
उल्हास हरी जोशी, मोः- 9226846631
नुकताच रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर माझ्याकडे आला. मुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे.
जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल.
मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत. तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना?
पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या.
आम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या स्थानीक प्रतिनिधीने थोड्या जास्त डिशेस ऑर्डर केल्या. जेवण संपवून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही ऑर्डर केलेल्या अन्नापैकी बरेचसे अन्न तसेच उरले होते.
आम्ही जेव्हा निघालो तेव्हा कांही वृद्ध महिला आमच्याशी इंग्लीशमधे बोलू लागल्या. आम्ही बरेचसे अन्न टाकून निघालो होतो हे त्यांना आवडले नव्हते.
‘हे पहा! आम्ही हॉटेलचे पुर्ण बिल दिले आहे. त्यामूळे आम्ही किती अन्न मागे ठेवले याचे तुम्हाला काही देणे घेणे नाही!’ माझ्या सहकार्या्ने सांगीतले. त्यातील एक महिला फारच चिडली. तिने लगेच तिच्या पर्समधून सेल फोन काढला व कोणालातरी फोन केला. काही वेळातच सोशल सिक्युरिटीचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस तेथे आला. आम्ही अन्न तसेच टाकून जात आहोत हे कळल्यावर त्याने आम्हाला तेथल्या तेथे 50 युरो ( अंदाजे 3800 रुपये) दंड केला व म्हणाला ‘जेवढे अन्न तुम्ही खाऊ शकत असाल तेवढ्याच अन्नाची ऑर्डर देत चला. पैसे जरी तुमचे असले तरी हे अन्न बनवायला जी साधन सामग्री लागते ते आमच्या सोसायटीची म्हणजे समाजाची आहे. जगात अनेक लोक असे आहेत कि त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. तेथे साधनांची कमतरता आहे. साधन सामग्री वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधीकार नाही.’
एका श्रिमंत देशामधील लोकांची मानसिकता बघून आम्हाला आमच्या मानसिकतेची लाज वाटली. आपण अशा देशामधून आलेलो आहोत की जेथे साधनांची कमतरता आहे. असे असताना सुद्धा आपण पुष्कळ अन्न मागवतो व वाया घालवतो.
अमेरिकेमधे सुद्धा मला हाच अनुभव आला. तेथील अमेरिकन, थाई, चायनीज, मेक्सिकन हॉटेल्समधे अन्न टाकणे किंवा अन्नाची नासाडी करणे निषीद्ध समजले जाते. काही अन्न शिल्लक राहिल्यास थर्मोकेलच्या बॉक्सेस देण्यात येतात. त्यामधे उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जायचे असा रिवाज आहे. बुफेमधे सुद्धा लोक जेवढे पचेल तेवढेच अन्न प्लेटमधे घेतात.
आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिती आहे. लग्न, मुंज, पार्टी, जेवणावळी, हॉटेल्स यामधे कितीतरी अन्न रोज वाया जात असते. बुफेमधे सुद्धा लोक प्लेटी भरभरून घेत असतात व त्यातले बरेच पदार्थ फेकून देत असतात.
आपण सुद्धा आता अन्न कसे वाया जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटते?

Wednesday, October 7, 2015

हत्याओं की इस श्रृंखला से फासीवाद की पदध्वनि साफ सुनाई दे रही है: - उदय प्रकाश


http://kindlemag.in/dabholkar-pansare-aur-ab-kalburgi/?utm_source=Pritha+contacts&utm_campaign=18a411aeed-kindle_copy_01_6_23_2014&utm_medium=email&utm_term=0_eea597a188-18a411aeed-104632665&ct=t%28kindle_copy_01_6_23_2014%29

Ganesh Visputay
[ गणेश विसपुते धन्यवाद मित्रा.]

उदयप्रकाश यांची किंडलमॅगच्या साईटवर अरुण आणि सरला माहेश्वरींनी घेतलेली मुलाखत दिसली.

...............................

हत्याओं की इस श्रृंखला से फासीवाद की पदध्वनि साफ सुनाई दे रही है: उदय प्रकाश
......................................

कन्नड़ लेखक एम. एम. कलबुर्गी की हत्या के प्रतिवाद में हिंदी के रचनाकार उदय प्रकाश ने अपना साहित्य अकादमी का पुरस्कार लौटा देने की घोषणा की है। इस घोषणा के चंद दिनों बाद ही उदय प्रकाश कोलकाता आए थे। इस पूरी घटना के संदर्भ में अरुण माहेश्वरी और सरला माहेश्वरी से उनकी कोलकाता में लंबी बातचीत हुई। उस बातचीत को हम यहां प्रकाशित कर रहे हैं।
अरुण माहेश्वरी: आज की पूरी सामाजिक-आर्थिक स्थितियों को आप देख रहे हैं। जो परिस्थिति है, वह क्रमश: खास तौर पर साहित्यकारों और संस्कृतिकर्मियों के लिये असहनीय सी हो रही है। सत्ताधारी पार्टी के नेता जिस जुबान में आम तौर पर बात करते हुए पाए जाते हैं, उसी से पता चलता है कि नीचे समाज में क्या हो रहा है। बुद्धिजीवियों और लेखकों को तो सीधे तौर पर शारिरिक हिंसा का शिकार बनाया जा रहा है। एम.एम.कलबुर्गी की हत्या को लेकर आपने जिसप्रकार अपना तीव्र प्रतिवाद दर्ज किया है उसका बड़े पैमाने पर रचनाकर्मियों ने स्वागत किया है। उसीसे पता चलता है कि अभी की परिस्थिति पर आम रचनाकर्मियों में कितना गुस्सा है। एकाध व्यक्ति ने इस कदम का मजाक भी उड़ाया है। हमारा आपसे सवाल है कि मौजूदा परिदृश्य की ऐसी कौन सी बातें है, जिनकी वजह से आपने एक इतना बड़ा कदम उठाना जरूरी समझा? हांलाकि सारी दुनिया में ऐसे अनेक उदाहरण मौजूद है। हमें तो लगता है कि जैसे कुछ पुरस्कारों की तो महत्ता ही इस बात में हैं कि उन्हें सही समय में परिस्थितियों की मांग के अनुसार लौटाया जाएं या ठुकराया जाएं। इस बारे में आपका क्या कहना है?

पहली बात तो यह है कि मैंने यह कदम बहुत सोच-समझ कर, इसके राजनीतिक परिणामों को मद्देनजर रखते हुए नहीं उठाया है। पिछले दिनों लगातार जो घटनाएं घट रही है उन्हें आप देख ही रहे हैं। यह सिलसिला लगभग दो सालों से चल रहा है। यू आर अनंतमूर्ति के घर को घेरा गया, उन्हें पाकिस्तान जाने का टिकट भेजा गया, उनपर पत्थर फेंके गये। इसके पहले ए. के. रामानुजन को लीजिए। उन्हें कौन नहीं जानता। ‘थ्री हंड्रेड रामायनाज’ के लेखक। उनके इस लेख को दिल्ली विश्वविद्यालय के एकेडमिक कौंसिल ने भारी बहुमत से पाठ्य पुस्तक से निकालने का निर्णय लिया। ग्यारह लोगों ने उसके खिलाफ मतदान किया। पेनगुइन की तरह का प्रकाशक, जो लेखकों की अभिव्यक्ति की स्वतंत्रता के लिए बाकायदा सभी न्यायिक चुनौतियों का सामना करता रहा है, लेडी चैटरलीज लवर, लोलिता जैसी विवादास्पद किताबों के लिए जिसने लंबी कानूनी लड़ाइयां लड़ी, उन्हें प्रतिबंधित होने से बचाया। उसी पेनगुइन ने दीनानाथ बत्रा नामके एक सनकी आदमी से डर कर, जिसके पास कोई शैक्षणिक योग्यता नहीं है, वेंडी डोनिगर की ‘एन अल्टरनेटिव हिस्ट्री ऑफ हिंदुइज्म’ को पल्प कर दिया। मेरी किताब ‘द गर्ल विद द गोल्डेन पैरासोल’ को पल्प आउट कर दिया क्योंकि वह जाति व्यवस्था के खिलाफ थी।

इस प्रकार, कहीं न कहीं यह प्रक्रिया पहले से ही शुरू होगई थी, लेकिन ऐसा नहीं लगता था कि यह प्रक्रिया शारिरिक हिंसा में बदल जायेगी। लेखकों की पिटाई ही नहीं, उनकी हत्याएं होने लगेगी। ये सब हत्याएं एक श्रृंखला में हुई हैं। पहले डाभोलकर, फिर पानसारे और अब कलबुर्गी। ये सब हत्याएं इस बात का भी संकेत देती है कि समस्या सिर्फ हिदुत्व और इस्लाम की नहीं है। खुद हिंदुत्व के अंदर हिंसक झगड़े चल रहे हैं। पाकिस्तान में भी यही हो रहा है। इस पूरे उपमहादेश में इस प्रकार की असहिष्णुता कि कब किसकी भावना आहत हो जाए, पता नहीं चलता है। और किसकी भावनाएं! जो भावनाएं आहत हो रही हैं, वे आहत होने लायक ही हैं। इसके बिना आप एक कदम भी आगे नहीं बढ़ सकते। जब तक आप इन भावनाओं को आहत नहीं करेंगे, तो जिसे लोकतांत्रिक सहिष्णुता कहते हैं, उसे कभी नहीं ला पायेंगे। यह करना ही पड़ेगा। उनके साथ कानून और व्यवस्था के आधार पर, आईपीसी के आधार पर, न्यायिक व्यवस्था के जरिये भी निपटने की जरूरत है। इनके जरिये उनके खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए।

सरकार का काम है लेखकों को बचाना। लेखक तो अकेला होता है। बाबाओं, साधुओं को जेड सिक्यूरिटी दी जाती है। ऐसे लोगों की एक पूरी फसल तैयार हो गई है। ये बलात्कार करें, धोखेबाजी करें, इनको कोई नहीं मारता। ये भले अपने अपराधों की वजह से कभी पकड़े गये तो पकड़े गये। लेकिन उनपर सामाजिक तौर पर हिंदू समाज की ओर से कोई आक्रमण नहीं होता। क्या हम यह मान ले कि कलबुर्गी, पानसारे, अनंतमूर्ति से तो उनकी भावनाएं आहत होती है और राधे मां, आशाराम बापू, जो बलात्कार करते हैं, उनसे उनकी भावनाएं आहत नहीं होती है। कई बार मन में यह सवाल पैदा होता है और मन में डर भी लगने लगता है, क्योंकि जब हम देखते हैं कि कहीं कोई कार्रवाई नहीं हो रही है, कोई हत्यारा पकड़ा नहीं जाता है, न कोई गिरफ्तारी हो रही है।

क्या हम यह मान ले कि कलबुर्गी, पानसारे, अनंतमूर्ति से तो उनकी भावनाएं आहत होती है और राधे मां, आशाराम बापू, जो बलात्कार करते हैं, उनसे उनकी भावनाएं आहत नहीं होती है। कई बार मन में यह सवाल पैदा होता है और मन में डर भी लगने लगता है, क्योंकि जब हम देखते हैं कि कहीं कोई कार्रवाई नहीं हो रही है, कोई हत्यारा पकड़ा नहीं जाता है, न कोई गिरफ्तारी हो रही है।
हम राकेश शर्मा की डाक्यूमेंट्री ‘फाइनल सोल्यूशन’ देखते हैं जिसमें 2002 के गुजरात के जनसंहार का पूरा डाक्यूमेंटेशन है। उसमें सारे अपराधी खुल कर बता रहे हैं कि कैसे उन्होंने कत्लेआम किया। इसका विजुअल डाक्यूमेंटेशन है। बाद में अदालतों में भी वे सब प्रमाणित हुए हैं। बाबू बजरंगी, माया कोडनानी आदि सबको उम्र कैद, फांसी की सजाएं हुई है। फिर भी उनको छोड़ दिया जा रहा है। ऐसा क्यों हो रहा है! अपराधी छोड़े जा रहे हैं, हत्यारे छोड़े जा रहे हैं और लेखक मारे जा रहे हैं।

सरला माहेश्वरी: प्रतिवाद का कोई स्वर नहीं दिखाई देता। सरकार के किसी कोने से इसके खिलाफ एक आवाज तक नहीं आती!

कलबुर्गी को मेरी ही तरह साहित्य अकादमी पुरस्कार मिला था। साहित्य अकादमी जिनको पुरस्कृत करती है, उनके प्रति उसकी जरा भी जवाबदेही नहीं है। कलबुर्गी की हत्या पर अकादमी की ओर से एक छोटा सा शोकसंदेश तक नहीं आया। उनका भी परिवार है, बच्चे हैं। दुख सबको होता हैं। सांत्वना का एक शब्द भी नहीं। किसी रेल दुर्घटना में जब लोग मारे जाते हैं तो खुद रेल मंत्री उन्हें देखने के लिए जाते हैं, मृतकों के प्रति शोक व्यक्त करते हैं, मुआवजों की घोषणा की जाती है। लेकिन साहित्य अकादमी ने क्या किया। एक प्रतिक्रिया तक नहीं। ऐसी असंवेदनशीलता! जब किसी को साहित्य अकादमी अवार्ड दिया जाता है उसे तय करने के लिए एक निर्णायक-मंडल बनता है, ज्यूरी। हर कोई जानता है कि पुरस्कार कैसे दिये जाते हैं। फिर भी एक काल की सर्वोत्कृष्ट मानी जाने वाली कृति को पुरस्कार दिया जाता है। जिसको आपने सम्मानित किया, उन्हीं विचारों की हत्या कर दी जाए और खामोशी से देखते रहें।

इसीलिये मेरे निर्णय के पीछे कोई राजनीति नहीं है। आप जानते हैं मेरी कोई राजनीति नहीं है। मैं किसी राजनीतिक पार्टी से नहीं जुड़ा हूं। लेखक तो वैसे ही प्रकृति से स्वतंत्र होता है। उसका समय उससे लिखवाता है। लेकिन दिक्कत यह है कि जो अपने समय को सच्चाई से लिखता है उससे सारी राजनीतिक सत्ताएं नाराज ही रहती है। इन्हीं तमाम कारणों से मुझे लगा कि इस पुरस्कार को लौटा दिया जाना चाहिए।

इसीलिये मेरे निर्णय के पीछे कोई राजनीति नहीं है। आप जानते हैं मेरी कोई राजनीति नहीं है। मैं किसी राजनीतिक पार्टी से नहीं जुड़ा हूं। लेखक तो वैसे ही प्रकृति से स्वतंत्र होता है। उसका समय उससे लिखवाता है। लेकिन दिक्कत यह है कि जो अपने समय को सच्चाई से लिखता है उससे सारी राजनीतिक सत्ताएं नाराज ही रहती है। इन्हीं तमाम कारणों से मुझे लगा कि इस पुरस्कार को लौटा दिया जाना चाहिए।

अरुण माहेश्वरी: बिल्कुल सही कहा आपने। हाल में फ्रांस की सरकार ने वहां के अर्थशास्त्री थामस पिकेटी को नोबेलजयी अर्थशास्त्री के साथ ही फ्रांस के सर्वोच्च पुरस्कार से नवाजने की कोशिश की थी तो पिकेटी ने यह कह कर उस सम्मान को स्वीकारने से इंकार कर दिया कि सरकार का काम यह तय करना नहीं है कि समाज में कौन सम्मानित होगा और कौन नहीं। सरकार का काम है अर्थ-व्यवस्था को सुधारना और यदि आप अर्थ-व्यवस्था को संभालने में विफल होते हैं तो मेरे लिये आपका कोई महत्व नहीं है। जो सरकार अपने नागरिकों को, लेखकों और साहित्यकारों को न्यूनतम सुरक्षा प्रदान नहीं कर सकती उस सरकार के दिये किसी भी सम्मान का कोई मूल्य नहीं है। और, मेरे अनुसार तो ऐसे पुरस्कारों को सही समय पर लौटाना ही अपनी प्रतिवाद के दर्ज कराने का एक सही तरीका है।

हां, कुछ लोग टाइमिंग की बात उठाते हैं। टाइमिंग का क्या। वह तो कभी भी हो सकती है। अभी शायद यह एक ऐसा समय था जब परिस्थिति सबसे ज्यादा सघन, इंटेन्सीफाई हो गयी है। यह फासिज्म की ओर बढ़ने के लक्षण है। अभी-अभी मैं म्यूनिख से लौटा हूं। मैंने वहां वो संग्रहालय देखा है जिससे पता चलता है फासिज्म कैसे पैदा हुआ। जब कारपोरेट, मीडिया, मोनोलॉग अर्थात रेह्टोरिक एक हो जाते हैं तभी फासिज्म आता है। और इस समय यहां सब एक हो रहे हैं। रिलीजन, कारपोरेट और कारपोरेट से शक्ति प्राप्त मीडिया इन सबने एक उन्माद पैदा किया। एक प्रकार का राष्ट्रवादी उन्माद।

आज ही मेरे फेसबुक वाल पर किसी और ने लिख दिया कि हिंदी एक कृत्रिम भाषा है। उसपर तत्काल एक कमेंट आया—जो हिंदी को कृत्रिम भाषा कहता है वह भारतीय, नस्ल का ही नहीं है। अब इन्होंने एक और नई नस्ल भी पैदा कर ली है। इंडियन रेस। क्या कभी आपने ऐसी कोई नस्ल के बारे में सुना है। दुनिया में कोई ऐसी किसी नस्ल की बात नहीं करता, कोई पुरातात्विक नहीं कहता। हर कोई जानता रेसेस के बारे में। मोंगोलाइट्स, प्रोटो आस्ट्रोलाइट्स, नाइजेरिस्ट, द्रविड़, आर्य सुनते आए हैं। इनके बीच सदियों में लगातार इंटरेक्शन होता रहा है। जेनेटिक अध्ययन बताते हैं कि 87 प्रतिशत तक का जेनेटिक इंटरेक्शन हो चुका है। और ये शुद्ध नस्ल का दावा करते हैं। हमारा डीएनए, पाकिस्तान में रहने वालों, हड़प्पा सम्यता के लोगों का डीएनए एक है।

सरला माहेश्वरी: इस विषय पर मुकेश कुमार की एक कविता याद आ रही है। ‘हां, हरामजादे हैं।’ वे कहते हैं:

पुरखों की कसम खाकर कहता हूं
कि हम सब हरामजादे हैं
आर्य, शक, हूण, मंगोल, मुगल, अंग्रेज,
द्रविड़, आदिवासी, गिरिजन, सुर-असुर
जाने किस-किस का रक्त
प्रवाहित हो रहा है हमारी शिराओं में
उसी मिश्रित रक्त से संचरित है हमारी काया
हां हम सब वर्णसंकर हैं।

सचमुच, भारत के मुसलमान, ईसाई सब एक ही नस्ल के हैं।

शमशेर सम्मान, केदारनाथ अग्रवाल सम्मान। लेकिन हालत यह है कि केदारनाथ अग्रवाल के घर को बिकने से नहीं बचाया जा सका। वह तहस-नहस होगया था। दुष्यंत स्मृति सम्मान अढ़ाई लाख का पुरस्कार है। अभी दुष्यंत के घर को बड़ी मुश्किल से बचाना संभव हुआ है। सचमुच यह सवाल है कि ये कौन लोग हैं, पुरस्कार देने वाले।

अरुण माहेश्वरी: यह सही है। लेकिन हिंदी की एक और खास स्थिति है। हिंदी में अभी पुरस्कारों की बाढ़ आई हुई है। ‘वागर्थ’ जैसी पत्रिकाओं को हम देखते हैं तो उसमें लिखने वाला शायद ही कोई ऐसा लेखक होगा जो अपने सिर पर चार-पांच पुरस्कारों की कलंगी न लगाए हुए हो। इस तुलना में हिंदी साहित्य समाज में बेहद अप्रासंगिक सा दिखाई देता है। सवाल उठता है कि तब वे कौन लोग है जो ये सारे पुरस्कार दे रहे हैं? अगर समाज में लेखकों का सचमुच मान होता तो साहित्य की बिक्री की यह दशा नहीं होती। लेखक की तो कोई पहचान नहीं है, और उसे नाना पुरस्कारों से लाद दिया जा रहा है!

यह एक बहुत दुखदायी स्थिति है। यह सारा उपक्रम बेहद अवमाननापूर्ण है। मैंने एक कमेंट किया था कि साल में 365 दिन होते हैं और इन 365 दिनों में रोज के हिसाब से दस-दस पुरस्कार दिये जा रहे हैं। हजारों पुरस्कार! इनके शुरू में पुरस्कार किसी न किसी बड़े साहित्यकार के नाम पर दिये जाते थे। प्रतिष्ठित और प्रगतिशील साहित्यकारों के नाम पर। शमशेर सम्मान, केदारनाथ अग्रवाल सम्मान। लेकिन हालत यह है कि केदारनाथ अग्रवाल के घर को बिकने से नहीं बचाया जा सका। वह तहस-नहस होगया था। दुष्यंत स्मृति सम्मान अढ़ाई लाख का पुरस्कार है। अभी दुष्यंत के घर को बड़ी मुश्किल से बचाना संभव हुआ है। सचमुच यह सवाल है कि ये कौन लोग हैं, पुरस्कार देने वाले। प्रेमचंद के लमही की स्थिति से आप अच्छी तरह वाकिफ हैं। गालिब की मजार को किसी तरह से हल्ला-गुल्ला करके उसका पुनरुद्धार किया जा सका है। शर्मनाक है कि इन लोगों के नाम से सम्मान देना और खुद ही सम्मानित हो जाना। यह एक प्रकार का ‘शामिल बैंडबाजा’ है। एक-दूसरे को सम्मानित करेंगे। समीक्षाएं मैनुफैक्चर्ड होगी। आप उनको पढ़ कर देखिये, वे किसी लायक नहीं होती।

सरला माहेश्वरी: वो मुक्तिबोध की कविता है ना:

सफलता की आंख से
दुनिया को निहारती फैली है
पूनो की चांदनी . . .
मनुष्य के लिए नहीं फैली यह
सफलता की, भद्रता की,
कीर्ति-यश-रेशम की पूनो की चांदनी
मुझको डर लगता है,
मैं भी तो सफलता के चन्द्र की छाया में
घुग्घू या सियार या
भूत नहीं कहीं बन जाऊं!

अरुण माहेश्वरी: संपादक अक्सर यह कहते हुए पाए जाते हैं कि हमें तो लेखक लोग समीक्षाएं भिजवाते हैं, तभी वे छपती है। अपनी ओर से समीक्षाएं लिखवाने का हमारे पास कोई तरीका नहीं है। कहने का मतलब यह है कि इस पूरे परिदृश्य में कहीं न कहीं हिंदी के नाम पर चलने वाली जो असंख्य संस्थाएं हैं, और उनमें बैठे हुए लोग है, वे सब इसके लिए कम जिम्मेदार नहीं है। हिंदी के नाम पर भारत सरकार और विभिन्न सरकारों की ओर से अरबों रुपये खर्च किये जाते हैं, क्या यह कोरी बंदरबांट नहीं है?

नहीं, इसे मुहावरों की भाषा में कहना विषय को हल्का करना होगा। यह सरासर लूट है। इसे शुद्ध फिनेंशियल टम्‍​र्स में देखा जाना चाहिए। हजारों, लाखों करोड़ के जो इतने सारे स्कैम्स हो रहे हैं, यह भी एक स्कैम हैं। इसी दृष्टि से इसे देखा जाना चाहिए। भाषा का उद्योग, खास तौर पर हिंदी भाषा का, उसके जेनेसिस में आप जायेंगे तो पता चलेगा कि किस प्रकार 19वीं सदी से ही, मध्यकाल से सुनियोजित ढंग से हिंदी को एक धर्म के साथ जोड़ने की कोशिश चल रही है। और यह बढ़ते-बढ़ते अब यह यहां तक चला गया है कि इसे जाति विशेष के साथ जोड़ दिया जा रहा है। Identified with certain castes. इस बीच जब वी पी सिंह ने मंडल आयोग को लागू किया तो ’90 के बाद आरक्षण में एक नया पहलू जुड़ गया। आरक्षण की मांग और जातियां भी करने लगी। ऐसी स्थिति में अब पहले की तरह सिर्फ एक ही जाति के लोगों की नियुक्ति नहीं हो सकती है। तो इससे एक नई चुनौती पैदा हुई है। मैंने जब ‘पीली छतरी वाली लड़की’ लिखा, वह दरअसल एक प्रकार का भाषा विमर्श ही था। हिंदी विभाग में आकर वह कैप्सूल्ड हुआ था, जहां वह प्रेमकथा चल रही थी। जैसा कि एंगेल्स ने कहा हैं, “Language is the practical consciousness of man.” यह हमारी व्यवहारिक चेतना है। तो  आप इसे जितना सब्जूगेट करेंगे, गुलाम बनायेंगे, मैनुपुलेट करेंगे, उतना ही चेतना पर उसका असर आयेगा। आप सोचिये, इस भाषा में हमारी सदियां गुजर गई है। इसमें तरह-तरह की धारणाएं, मिथ आदि भरे गए हैं। आज तक बहुत बड़ा समुदाय उन्हें अपनाए हुए हैं। प्रवचनकारी बाबाओं की जो जमात है, वे जो भाषण देते हैं, वह और क्या है, भाषा का ही तो खेल है। इन प्रवचनकारियों का एक और लक्ष्य होता है ब्लैक मनि को व्हाइट करना। ये कोलोनाइज करते हैं, भू-माफियाओं की तरह काम करते हैं। यह एक पूरा उद्योग है।

फिर टेलिविजन आ गया। उत्तर आधुनिकता ने हमें यह तो बताया ही है कि आगे स्पीच-सेन्ट्रिक एज होगा। वाक्-केन्द्रित सभ्यता। और सबसे ज्याद निवेश भाषा पर ही होगा। तो भाषा कोई मामूली चीज नहीं है। आप तो बहुत पढ़ते हैं। अंबर्तो इको ने ही अपने ट्रैवल इन हाइपरियल्टीज में कहा है कि कोई भी समाज में कौन सा वर्ग भाषा को कितना शेयर करता है, उससे समाज में उस समुदाय की स्थिति का पता चलता है। जैसे साहित्यकार होता है। आप याद करें विक्टर ह्यूगो का समय। उस समय लेखक आथोरिटी था। उनके उपन्यास धारावाहिक प्रकाशित होते थे और हर परिवार में उसके पाठक होते थे। उसके चरित्रों पर बहस होती थी, अगले दिन क्या होगा, इसके भी कयास लगाये जाते थे। ऑथर की भाषा पर आथोरिटी थी। इसी से ऑथर शब्द बना। आज उसकी यह ऑथोरिटी छीन ली गई है। अब नेतागण भाषण-प्रवचन देते रहते हैं, बाबाओं ने भाषा पर कब्जा जमा रखा है।

भाषा का उद्योग, खास तौर पर हिंदी भाषा का, उसके जेनेसिस में आप जायेंगे तो पता चलेगा कि किस प्रकार 19वीं सदी से ही, मध्यकाल से सुनियोजित ढंग से हिंदी को एक धर्म के साथ जोड़ने की कोशिश चल रही है। और यह बढ़ते-बढ़ते अब यह यहां तक चला गया है कि इसे जाति विशेष के साथ जोड़ दिया जा रहा है। Identified with certain castes.
दरअसल, साहित्यकार के लिए भाषा उसकी आजीविका है। वह उसी में जीता है, मरता है, सांस लेता है, उसी में रहता है। आज उसकी स्थिति क्या है। क्रिकेट में देखिये, किसी ने जरा सा बल्ला चला दिया, उसके लिये दुनिया के सारे विशेषण, महानता और नायकत्व की सारी बातें कही जाने लगती है। अब टैगोर बनाना असंभव है। अब किसी साहित्यकार को कभी भारत-रत्न नहीं मिल सकता। क्रिकेटर को मिल सकता है, बॉलीवुड के एक्टर को मिल सकता है। व्यवसायी को तो यह सब मिलता ही है। लेकिन साहित्यकार को देखिये। उसकी स्थिति कमजोर होती जा रही है। दरअसल, वह भाषा को बहुत कम शेयर कर पाता है। भाषा के प्रमुख शेयरहोल्डर्स अब दूसरे लोग हो गये हैं। मेरी नजर में हिंदी के साहित्यकार के पास एक प्रतिशत भी भाषा नहीं बची है। मोदी से ज्यादा भाषा पर कौन कब्जा जमाए हुए हैं। विज्ञापनों को देखिए, टीवी एंकर्स को देखिए, क्रिकेट को देखिए। ग्लैमर वल्‍​र्ड, क्राइम इन्फारमेशन – भाषा पर इन अन्यों का कब्जा है। तो साहित्यकार कहां बचेगा।

मेरे गुरू ताद्युश रोज़ेविच की कविताओं का एक संकलन है, 2007 में आया था, उसका शीर्षक है ‘वर्ड्स’—शब्द। उसमें सारी कविताएं शब्द पर है। एक कविता मुझे याद आती है, जिसकी थीम है कि शब्द जो है वे राजनीतिज्ञों के दांतों को चमकाने और कुल्ला करने के काम आते हैं। शब्द जो है खूबसूरत होठों में जो च्विंगम चबा रहे हैं, उसके बैलून बनाने का काम कर रहे हैं। और वह कहता है, शब्द कन्टेमिनेट हो रहे हैं, शब्द खत्म हो रहे हैं, जो अखबारों की रद्दी के टुकड़ों की तरह फेंक दिये गये हैं, सड़ रहे हैं। ये शब्द वही थे जिन्हें हम देते थे उसे जिससे बहुत गहराई से प्यार करते हैं। शब्द वे थे जो हमारे घावों पर मलहम का काम किया करते थे। लेकिन फिर वे अंत में कहते हैं – शब्द में अब भी शक्ति है। किसी बम की तरह वे कभी भी विस्फोट कर सकते हैं।

उनकी कविताएं कुछ इस प्रकार है: एक कविता है ‘मैं क्यों लिखता हूं’।

कभी-कभी ‘जीवन’ उसे छिपाता है
जो जीवन से ज़्यादा बड़ा है
कभी-कभी पहाड़ उस सबको छुपाते हैं
जो पहाडों के पार है

इसीलिए पहाडों को खिसकाया जाना चाहिए
लेकिन पहाडों को खिसकाने लायक
न तो मेरे पास तकनीकी साधन हैं
न ताकत
न भरोसा
इसलिए मैं जानता हूँ कि आप उन्हें इसी जगह देखते रहेंगे

और यही वजह है कि
मैं लिखता हूँ ।

एक कविता है ‘सफेद’।

सफ़ेद न तो उदास है
न प्रसन्न
बस सफ़ेद है

मैं लगातार कहता रहता हूँ
यह सफ़ेद है
लेकिन सफ़ेद सुनता नहीं
वह अंधा है
और बहरा है
वह बिल्कुल मुकम्मल है
धीरे-धीरे
वह और सफ़ेद होता जाता है ।

‘शब्द’ कविता का पूरा पाठ कुछ इस प्रकार है:

शब्दों का इस्तेमाल किया जा चुका है
चुइंगम की तरह उन्हें चबाया जा चुका है
सुन्दर जवान होठों द्वारा
सफ़ेद फुग्गों बुल्लों में बदला जा चुका है
राजनीतिकों द्वारा घिसे-रगड़े गए
उनका इस्तेमाल दांत चमकाने और मुँह की सफाई के लिए
कुल्ले-गरारे में किया गया

मेरे बचपन के दिनों में
शब्दों को मरहम की तरह
घावों पर लगाया जा सकता था

शब्द दिए जा सकते थे उसे
जिसे तुम प्यार करते थे

घिसे-बुझे
अखबार मे लिपटे
शब्द अभी भी संक्रामक हैं . . .
अभी भी उनसे भाप उठती है
अभी तक उनमे गंध है
वे अभी भी चोट पहुँचाते हैं

माथे के भीतर छुपे हुए
छुपे हुए हृदय के भीतर
छुपे हुए सुन्दर जवान लड़कियों के कपडों के अन्दर
पवित्र पुस्तकों में छुपे हुए
वे अचानक फूट पड़ते हैं
और मार डालते हैं।

यही एक विश्वास है शब्दों के प्रति, जो हम लोगों में बचा हुआ है। वर्ना शब्दों की जो तबाही हो रही है, हम देख ही रहे हैं। महान शब्द को देखिये। कितना दुरुपयोग होता है इसका। हर कोई महान होता है। कोई एक लूट-लाट कर बिजनेस खड़ा कर लेता है और जेल चला जाता है, वह भी महान होता है। यह जो पूरी इकॉनमी है, पूंजी की भूमिका, incoming technology, इसने सिर्फ दुनिया को नहीं बदला है, पूरी भाषा को छिन्न-भिन्न कर दिया है। क्षतिग्रस्त किया है।

अब टैगोर बनाना असंभव है। अब किसी साहित्यकार को कभी भारत-रत्न नहीं मिल सकता। क्रिकेटर को मिल सकता है, बॉलीवुड के एक्टर को मिल सकता है। व्यवसायी को तो यह सब मिलता ही है। लेकिन साहित्यकार को देखिये। उसकी स्थिति कमजोर होती जा रही है। दरअसल, वह भाषा को बहुत कम शेयर कर पाता है। भाषा के प्रमुख शेयरहोल्डर्स अब दूसरे लोग हो गये हैं।
मुझे जो साहित्य अकादमी का अवार्ड दिया गया, कलबुर्गी को दिया गया, पता नहीं आज तक किन-किन को दिया गया। आप पायेंगे कि सब कहीं न कहीं कुछ रखते हैं। इस बारे में अरुंधती राय के उस वक्तव्य को पढ़ा जाना चाहिए जो उन्होंने साहित्य अकादमी पुरस्कार ठुकराते हुए दिया था।

ऐसा नहीं है कि सिर्फ उद्योग विभाग ही भ्रष्ट होता है, या वित्त विभाग या निजी पूंजीपति ही भ्रष्ट होते हैं। ये साहित्यिक-सांस्कृतिक संस्थाएं, ये किसी से कम भ्रष्ट है क्या?

हंटिंगटन ने, जिसने Clash of Civilizations लिखा था, उसने कहा था कि आने वाले समय में सबसे ज्यादा खर्च संस्किृति पर होगा। संस्कृति अभी केंद्र में है। इतिहास से लेकर संस्कृति के जो तमाम रूप है, पुरानी भाषा का इस्तेमाल करें तो जो अधिरचना की चीजें हैं, सबसे ज्याद हमले उन्हीं पर हो रहे हैं। यह एक आपातकाल, Dark Age है। और जो लोग यह नहीं समझ पा रहे हैं, वे उदयप्रकाश और पता नहीं किस-किस टम्‍​र्स में सोच रहे हैं। यह बिल्कुल गलत है, भले उनमें लेफ्ट ही क्यों न हो। ऐसा बिल्कुल नहीं है।

अरुण माहेश्वरी: अभी जो विश्व हिंदी सम्मेलन भोपाल में चल रहा है और जिसमें छत पर चढ़ कर चिल्ला-चिल्ल कर कहा जा रहा है कि हिंदी बाजार को जीतेगी। नरेन्द्र मोदी कहते हैं कि दुनिया में सिर्फ तीन भाषाएं बचेगी, अंग्रेजी, चीनी और हिंदी। यह जो अवधारणा है कि भाषा बाजार के जरिये बचेगी, कायम रहेगी, इसपर आपका क्या विचार है। हमारे अनुसार तो भाषा बाजार से जीवित नहीं रह सकती। बाजार सच कहा जाए तो भाषा के नाश की जगह है। शेयर बाजार, फाटका बाजार में तो सब कुछ इशारों पर होता है। अभी तो बाजार की भाषा एप्स है। क्या ऐसा नहीं है कि जो हिंदी की बाजार पर विजय का उन्माद पैदा कर रहे हैं, वे प्रकारांतर से यह कह रहे हैं कि दुनिया के बाजार पर हिंदी वालों का वर्चस्व होगा। आज मुकेश अंबानी या कोई भी अन्य अगर अपना वाणिज्य फैलाता है तो वह हिंदी की सेवा नहीं करेगा। क्या यह भाषा के जरिये भी एक प्रकार के अंधराष्ट्रवाद को हवा देने की कोशिश नहीं है?

अरुण जी, देखिये, आज बाजार यदि कोई है तो वह ग्लोबल बाजार है। किसी देश का निजी बाजार नहीं बचा है। कोई अगर यह कहे कि यह अपना, स्वदेशी बाजार है, खादी ग्रामोद्योग की तरह का, तो यह कोरा धोखा है। सबकुछ ग्लोबल है। यह माना जाता है कि भारत दुनिया का तीसरा सबसे बड़ा बाजार है। यूरोप की पूरी आबादी से बड़ा। अब इस बाजार में जिस हिंदी की बात की जा रही है, वह तो है ही नहीं। ग्लोबल मार्केट की भाषा अभी अंग्रेजी है। चाइनीज भी नहीं है। आप पता कीजिए, चीन में, फ्रांस में, जर्मनी में भी, सब जगह इंग्लिश-स्पीकिंग के कोर्स जोरों पर चल रहे हैं। तो बाजार की भाषा तो अंग्रेजी ही है।

ऐसा नहीं है कि सिर्फ उद्योग विभाग ही भ्रष्ट होता है, या वित्त विभाग या निजी पूंजीपति ही भ्रष्ट होते हैं। ये साहित्यिक-सांस्कृतिक संस्थाएं, ये किसी से कम भ्रष्ट है क्या ?
मोदी जी जो कहते हैं कि मैंने चाय बेचते-बेचते यूपी के भैयों से हिंदी सीखी, तो यूपी के लोगों की हिंदी में ही पिछले दस सालों में जो परिवर्तन हुए है, इसका किसी को अंदाज है। अभी कुछ साल पहले से ही प्रभु जोशी ने हिंदी के क्रेयोलीकरण का सवाल उठाना शुरू किया है। हिंदी की वोकबलरी में, शब्द भंडार में, हिंदी के मूल शब्द कितने बचे हुए हैं? आप ही देखिये चौरासी वैष्णवन की वार्ता की भाषा, लाला श्रीनिवास दास की परीक्षा गुरू या सुदर्शन की कहानियों की भाषा। कामायनी को ही याद कीजिए। और फिर आज की भाषा को देखिए। अखबारों की हेडलाइन्स, दैनन्दिन व्यवहार की भाषा। आपने एप्स की चर्चा की। एप्स ही क्यों, एसएमएस, इंटरनेट, मोबाइल, उनसे जो भाषा बन रही है, इनके जरिये हमारे शब्द भंडार में ऐसे शब्द आरहे हैं जो पूरी तरह से एलियन शब्द है। जो कभी नहीं थे और स्थिति यह है कि उन्हें कभी हटाया या बदला भी नहीं जा सकता है। पहले जैसे हम पैंट को पतलून कर लेते थे, प्लेटो को अफलातून या सोक्रेटीज को सुकरात बना लेते थे, अपने ढांचे में, अपनी मिट्टी में उनको गढ़ने, बनाने, उन्हें नया कलेवर देने की जो कोशिश रहती थी, अब तो वैसी कोई इच्छा शक्ति भी नहीं बची है। मोबाइल रिचार्ज अब मोबाइल रिचार्ज ही रहेगा। दिल मांगे मोर। यह जो परिवर्तन हो रहे हैं, होते चले जा रहे हैं, मोदी किस हिंदी की बात कह रहे हैं। बाजार में जो हिंदी बची रहेगी, वह कैसी हिंदी होगी? क्या वह राजभाषा वाली हिंदी होगी? या ऐसी बाजार वाली?

और वैसे कहा जाए तो हिंदी बनी ही है बाजार के लिए, एक संपर्क भाषा के तौर पर। साहित्य की भाषा, सृजनात्मकता की भाषा हिंदी थी ही नहीं। ब्रज भाषा, अवधि, और दूसरी भाषाएं थी। अब मार्केट के लिए आपने एक भाषा बनाई। संपर्क के लिए। और फिर धीरे-धीरे, बड़ी चतुराई से उसमें संस्कृत के शब्दों को लाकर इसके शब्द भंडार को एक पवित्र सा रूप दे दिया। बहुत सारे लोग तो आज भी उसमें अपनी अभिव्यक्ति नहीं कर पाते हैं। उनके लिए यह असंभव सी है। नाजिम हिकमत कहते हैं न कि जब मैं टर्किस में लिखना चाहता हूं इंकलाब, तो उसका अर्थ निकलता है जेहाद। इसप्रकार, जो शब्द आते हैं, वे अपने साथ पूरी अर्थ-स्मृति लेकर आते हैं।

आपने पाली को छोड़ा, बौद्ध बाहर चले गए। एक इतना उदारवादी दर्शन, जो जातिप्रथा को नहीं मानता, पुनर्जन्म को नहीं मानता, जिसमें रेशनलिटी थी। वह हमसे छूट गया। आपने प्राकृत को छोड़ दिया तो महावीर बाहर होगये। सोरसैनी, अपभ्रंश, जो स्थानीय जनपदीय भाषाएं हैं, उनके शब्दों को छोड़ दिया। एक फ्लाईओवर बनाया, सीधे संस्कृत से और गढ़ ली गई हिंदी। उस हिंदी को सब लोगों पर थोप दिया गया। अब आप बताइयें, यह हिंदी कैसे बचेगी? हिंदी नहीं बचेगी, वही हिंदी बचेगी जो जीवित है, जो जनता द्वारा, मनुष्यों द्वारा, जीवित लोगों द्वारा व्यवहृत है। व्यवहार में लाई जा रही है। उस हिंदी पर कोई संकट नहीं है। मैं नहीं मानता कि हिंदी पर कोई संकट है। दुनिया में बहुत सी छोटी-छोटी भाषाएं बची हुई है और बड़ी-बड़ी भाषाएं लुप्त हो चुकी है। गणेश दैवी भी जो अपने भाषा सर्वेक्षण में कहते हैं। अफ्रीका की भी छोटी भाषाएं बची हुई है। और जो प्रमुख भाषाएं हैं, वे गायब हो चुकी है। यह एक दूसरे स्तर पर चलने वाली परिघटना है। बाजार ही नहीं, इसमें और भी ढेर सारी चीजें सम्मिलित है। जैसे एक बहुत बड़ा उदाहरण है आइजक बेसाविस सिंगर का। उसने एक ऐसी भाषा में अपना साहित्य लिखा जो डेड, मृत भाषा थी। उसे कोई नहीं बोलता था। लोगों ने जब उनसे पूछा कि आप ऐसी भाषा में क्यों लिख रहे हैं जो मुर्दों की भाषा है तो उसने कहा कि इसलिए ताकि उसे सिर्फ प्रेत ही पढ़ें। तो यह जरूरी नहीं कि साहित्य बहुत प्रभावशाली भाषा में ही लिखा जाए। आप तो रूस के बहुत सारे लेखकों को जानते हैं। रसूल हमजातोव। किरगीज भाषा में उन्होंने लिखा। उसे बोलने वाले बमुश्किल तीन-चार लाख लोग थे। लेकिन वे एक महान लेखक बन गये, विश्व के श्रेष्ठतम साहित्य में उनका स्थान है। तो भाषा कोई मैटर नहीं करती है। बाजार उसका इस्तेमाल कर रहा है या नहीं, यह भी मैटर नहीं करता। साहित्य या किसी भी सृजनात्मक कर्म का इससे कोई संबंध नहीं होता। मार्क्स ने भी कहा था कि जो highest forms of art है उसमें संगीत आता है। सर्वोत्कृष्ट कला-रूप। जिसका भौतिक विज्ञान में जन्म हुआ उसका सर्वोच्च रूप मैथ्स, गणित है, जहां सब कुछ एब्सर्ड हो जाता है। संगीत में भाषा नहीं, स्वर होते हैं।

पहले जैसे हम पैंट को पतलून कर लेते थे, प्लेटो को अफलातून या सोक्रेटीज को सुकरात बना लेते थे, अपने ढांचे में, अपनी मिट्टी में उनको गढ़ने, बनाने, उन्हें नया कलेवर देने की जो कोशिश रहती थी, अब तो वैसी कोई इच्छा शक्ति भी नहीं बची है। मोबाइल रिचार्ज अब मोबाइल रिचार्ज ही रहेगा। दिल मांगे मोर। यह जो परिवर्तन हो रहे हैं, होते चले जा रहे हैं, मोदी किस हिंदी की बात कह रहे हैं। बाजार में जो हिंदी बची रहेगी, वह कैसी हिंदी होगी? क्या वह राजभाषा वाली हिंदी होगी? या ऐसी बाजार वाली?

सरला माहेश्वरी: रवीन्द्रनाथ का ही उदाहरण लें। एक प्रांतीय, बांग्ला भाषा के इस कवि ने किस प्रकार सारी दुनिया के, विश्व कवि बन गये।

देखिये, विश्व हिंदी सम्मेलन में उन्होंने किनको आमंत्रित किया। अमिताभ बच्चन को। मैंने एक छोटा सा बयान दिया। अमिताभ बच्चन तो उत्तर-छायावादी कवि हरिवंश राय बच्चन के पुत्र हैं।

उनको तो हिंदी साहित्य की काफी जानकारियां होगी। नरेंद्र शर्मा, अंचल भी उसी काल के थे। हमारे बहुत सारे गीतकार। उसी काल में प्रगतिवाद भी शुरू होता हैं। त्रिलोचन और अमरकांतजी भी इलाहाबाद के ही थे। उनको तो इन सबके बारे में काफी जानकारी होगी। विश्व हिंदी सम्मेलन में सिर्फ बाजार की बात हुई। चाय वाली बात पर मोदी ने काफी तालियां पिटवाई। लेकिन साथ ही यह भी कहा कि मेरी मातृभाषा गुजराती है। हिंदी भी एक नहीं है। कई हिंदिया है। राष्ट्रभाषा की बात करते हैंं। खुद हिंदुस्तान अभी तक राष्ट्र नहीं बना तो राष्ट्रभाषा क्या बनेगी। और अगर हम मान लेते हैं कि राष्ट्रभाषा बनेगी तो राष्ट्रभाषा को तो दूसरी भारतीय भाषाओं की ज्यादा परवाह करनी चाहिए। कन्नड़ का लेखक मार दिया जाता है, तमिल के लेखक मुरुगन से उसकी कलम छीन ली जाती है। बंगालियों पर हमले हो रहे हैं। और हिंदी वाले विश्व सम्मेलन में जाकर बाबाओं आदि के जरिये धर्म-कांडों में लगे हुए हैं! बाजार के सबसे बुरे लोग, बाबा, साधू – ये सब ही इकट्ठे हो रहे हैं। हिंदी को प्रचारित करने में बॉलिवुड वालों का बड़ा योगदान है। लेकिन बॉलिवुड के भी लेखकों को भोपाल में नहीं बुलाया गया। अमिताभ बच्चन को बुला रहे हैं जिनको इन सब बातों की जरा भी चिंता नहीं है। न मोदी को है कि दूसरी भारतीय भाषाओं के साथ अभी क्या हो रहा है।

अभी तो खाने-पीने, पहनने-ओढ़ने के मामलों तक में डिक्टेट किया जा रहा है। चार दिन तक कोई मांसाहार नहीं करेगा। रामदेव ने भी कह दिया है।

ये सब साफ तौर पर फासीवाद के लक्षण है। और इसके खिलाफ आवाज उठाने के लिए जरूरत सिर्फ इस बात की है कि आप लोकतांत्रिक हो। फासीवाद के खिलाफ लड़ाई में लोर्का एक प्रतीक बन गये थे। वे कोई कम्युनिस्ट या वामपंथी नहीं थे। लोकतांत्रिक थे। साहित्य अकादमी के दिये पुरस्कार को आज लौटा कर मैंने इसी भयानक परिस्थिति के खिलाफ अपनी प्रतिवाद की छोटी सी आवाज उठाई है। इससे ज्यादा और कुछ नहीं समझा जाना चाहिए।
..............................................
Share EmailPrintMore
Arun Maheshwari
Hindi Marxist critic and political commentator and columnist. Author of books : Sahitya mein Yathartha : Siddhanta aur Vyavahaar ; Pablo Neruda : Ek Kaidi ki Khuli Duniya ; RSS aur uski Vichardhaara ; Paschim Bangal mein Maun Kranti ; Nai Aarthik Niti Kitni Nayee ; Ek aur Brahmaand ; Sirhane Gramsci
...................................

Tuesday, September 22, 2015

आरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय?



गेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे.
विद्यमान आरक्षणाचे पुनरावलोकन करावे अशा आशयाचे सरसंघचालक श्री.मोहन भागवत यांच्या मुलाखतीतील विधान काल प्रकाशित झाल्यापासून या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आही.
आपल्यापैकी ज्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वाटते त्यांच्यासमोर याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.
१. २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते घटनाविरोधी ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय?
२. पुन्हा असे आर्थिक आधारावर आरक्षण दिले तर ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्तीही केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही.
३. कारण आरक्षण हा गरिबीहटावचा कार्यक्रम नाही. तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. ज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधीत्व डावलले गेलेले आहे त्यांना ते प्रतिनिधित्व विशेष संधीद्वारे देण्याचा हा कार्यक्रम आहे.
४. सर्वच समाजातील गरिबांना न्याय मिळायलाच हवा.पण त्यासाठी आरक्षण हा उपाय नाही. त्यासाठी संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. "बीपीएल" अर्थात दारिद्र्य रेषेखालील सर्व गरिबांना सरकारने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, असे संरक्षण द्यायलाच हवे. पण ते देण्याचा / मागण्याचा मार्ग आरक्षण हा नाही. या गोष्टी न मागता त्यांना आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असली गत होईल.
५. घटना परिषदेत आरक्षण देताना सामाजिकच निकष का लावायचे आणि आर्थिक निकष का लावायचा नाही यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. [पाहा : संविधान सभा वृत्तांत, खंड, १ ते १२, ईंग्रजी/हिंदी, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार.]
६. आपल्या भारतीय समाजात जात, लिंगभाव, वर्ग ही तीन पक्षपाताची आणि शोषणाची केंद्रे आहेत. त्यावर समग्र उपाययोजना करायची असेल तर ती केवळ आर्थिक आधारावर विसंबून करता येणार नाही.
७. आजच्या तीन प्रकारच्या राखीव जागांचा सम्यक विचार केला तर त्यातली राजकीय प्रतिनिधित्व देणार्‍या {ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण ] आरक्षणाला घटनेने कलम ३३४ द्वारे  दहा वर्षांची मुदत दिलेली आहे.ती वाढवित नेत आत्ता ती सत्तर वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केलेली आहे.मात्र घटनेत शिक्षण आणि नोकर्‍यातील आरक्षणाला ही मुदत लागू केलेली नाही. याचा अर्थ हे आरक्षणे कायमस्वरूपी आहे काय? तर नाही. ते तात्पुरतेच आहे. मात्र ते कधी संपेल तर ज्या दिवशी या सामाजिक घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवशी आरक्षण संपेल. याचा अर्थ देशात जितक्या लवकर आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करू तितक्या लवकर आरक्षण संपेल.
८. जातीचे सदस्यत्व जन्माने मिळते. जातीवरून दलित,आदिवासी आणि ओबीसींना काही शतके जर डावलले गेले असेल तर जातीच्या आधारेच हा पक्षपात दूर करावा लागेल. काट्याने काटा काढणे, ही न्यायाची रिती येथे वापरलेली आहे. असे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त असता कामा नये असे डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेला बजावले होते याचा विसर पडता कामा नये. [ पाहा: संविधान सभा वृत्तांत, खंड सातवा, पृ. ७४१-४२]
९. उत्पन्न दरवर्षी बदलू शकते. जात मात्र कधीही बदलता येत नाही.
१०. आज देशातील आयकर कायदे धाब्यावर बसऊन सुमारे ३५ कोटी लोक आयकर बुडवतात. अवघे ५ कोटी २९ लाख लोक आयकर देतात. लक्षात ठेवा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर हे आयकर भरणारे ५ कोटी २९ लाख वगळता उरलेल्या १२३ कोटींची आरक्षण घेण्यासाठी रांग लागेल आणि अशा रांगेत खर्‍या गरजू, होतकरू आणि वंचितांना जागाच मिळणार नाही.
११. आज ज्यांना आरक्षण मिळते त्यांनाही अंतर्गत आचारसंहिता लावली पाहिजे असे माझे मत आहे. एकाच कुंटुंबाने किती पिढ्या आरक्षण घ्यावे यावर बंधने असली पाहिजेत. तरच इतर दुबळ्यांना न्याय मिळेल.
१२. खाजगीकरणाद्वारे आरक्षण संपतेच आहे. अवघी पंधरा ते वीस वर्षे थांबा. कल्याणकारी राज्य मोडीत काढून पोलीस व सैन्य वगळता बाकी सारी सरकारी खाती खाजगीकरणात जातील. सैन्यात आरक्षण नाहीच.
१३. जात वडीलांची मिळते. आज आपण पालकांचे उत्पन्न विचारात घेतो म्हणून अतिश्रीमंतांच्या मुलांमुलींना शासकीय लाभ
मिळत नाहीत. मात्र उद्या आर्थिक आधारावर आरक्षण दिले आणि अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला, प्रेमजी, मुर्ती आदींच्या मुलांनी जर उत्पन्न पालकांचे आहे. आम्ही शिकतोय.आम्हाला स्वत:चे उत्पन्न कुठेय असे विचारले तर त्यांनाही या राखीव जागा द्याव्या लागतील.
[ क्रमश:---]

Sunday, September 20, 2015

धनगरांचा गौरवशाली इतिहास









धनगरांचा गौरवशाली इतिहास,’ संजय सोनवणींचे नवे मौलिक संशोधन -एक हजार प्रती हातोहात संपल्या.

”ख्वाडा’ चे प्रतिभावंत दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडेंना यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान-

पुणे, दि.२० सप्टें.: आज सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयाचे सभागृह तुडुंब भरलेले होते. तरूणांची एव्हढी हाऊसफुल्ल गर्दी पुण्यात तरी मी प्रथमच पाहात होतो.
निमित्त होते इतिहासकार संजय सोनवणी यांच्या ८५ व्या पुस्तकाचे प्रकाशन व ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांना यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान करण्याचे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.स.प.चे अध्यक्ष आमदार महादेव जानकर होते.
याप्रसंगी संजय सोनवणींनी पुस्तकलेखनामागील भुमिका मांडली. "आम्हाला नव्या जगातील महापुरूष घडवायचे आहेत. त्याचे भान देण्यासाठी हे लेखन आहे.केवळ इतिहासात रमण्यासाठी किंवा गमजा मारण्यासाठी नाही. इतिहास लेखन व ज्ञानविज्ञान संशोधनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करायला हव्यात’ असे ते म्हणाले.
भाऊराव कर्‍हाडे यांनी ख्वाडाच्या निर्मितीमागच्या प्रेरणा, हालअपेष्टा आणि खडतर वाटा यांचे प्रांजळ कथन केले. त्यांच्या सच्चेपणाने उपस्थित भाराऊन गेले.
नागपूरचे होमेश भुजाडे यांनी सोनवणींच्या इतिहासलेखनाची सामर्थ्ये उलगडऊन दाखवली.
महादेव जानकर यांनी सोनवणी व कर्‍हाडे यांच्या पाठीशी सगळे बळ उभे करू असे सांगितले.
हरी नरके यांनी "मराठी चित्रपटात स्थलांतरितांची व्यथा चित्रभाषेत ज्या ताकदीने कर्‍हाडेंनी चिमटीत पकडून मांडली आहे, ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. पथेर पांचालीच्या तोडीची श्रेष्ठ दर्ज्याची कलाकृती निर्माण करून आजच्या काळाचा सत्यजित रे होण्याची क्षमता भाऊंरावांमध्ये असल्याचे त्यांनी दाखऊन दिले आहे.या मुलाने अशीच मेहनत घेतली तर फार लवकर तो जागतिक किर्तीचा दिग्दर्शक होऊ शकेल. समकालीन सामाजिक आणि राजकिय वास्तवाचा उभा छेद ज्या धाडसाने आणि कलात्मक ताकदीने हा चित्रपट घेतो असे काम आजवर कोणताही मराठी चित्रपट करू शकला नव्हता" असे सांगितले.
नरकेंनी संजय सोनवणींच्या संशोधन आणि लेखनाचे असंख्य पुरावे श्रोत्यांपुढे ठेऊन पुस्तकाची पहिली आवृत्ती एका दिवसात संपल्याबद्दलच्या प्रतिसादाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून मान्यवर लोक आले होते. सोनवलकर यांनी सुत्रसंचालन केले. उपस्थितांनी पुस्तकाची एव्हढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली की एक हजार प्रती हातोहात संपल्या.
एक अतिशय देखणा आणि वैचारिक समृद्धता निर्माण करणारा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश खाडे यांना धन्यवाद.