Saturday, April 25, 2020

No ‘ideological synergy’ between Ambedkar and RSS, rss7




No ‘ideological synergy’ between Ambedkar and RSS, Rajiv Tuli can read my book for facts
There is no evidence to support the claims that Ambedkar visited an RSS workshop or that Thengadi was Ambedkar’s election agent in 1954 Bhandara bypoll.


HARI NARKE 25 April, 2020 11:42 am IST


Rajiv Tuli has made imaginary, baseless and fabricated claims.


Tuli, in his article, echoes Arun Anand by reiterating that Dr Ambedkar appointed Dattopant Thengadi as the secretary of the Scheduled Castes Federartion. He also claims that Thengadi, allegedly Ambedkar’s most trusted person, was also appointed as an election agent in the1954 Bhandara Lok Sabha bypoll in Maharashtra. But Tuli has not provided any authentic evidence to support this claim. He must know that a polling representative is not appointed orally; a letter is submitted to the election officials in this regard.


Tuli should submit any written document in connection with the appointment of Thengadi by Ambedkar, instead of building castles in the air.


Far from Tuli’s claim, Ambedkar had appointed P. N. Rajbhoj, General Secretary of All India Scheduled Castes Federation, and Babu Haridas Avle, Secretary of Scheduled Castes Federation of Madhya Pradesh as the chief election agents The evidence of this can be found in my book, Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, DBAWS, Vol.18, Part 3.

As per the constitution of Scheduled Castes Federation, appointment of non-SC person as a member or office bearer was illegal and unconstitutional. In the same fashion, induction of a person in Scheduled Castes Federation who happens to be a member of any other party or organisation was “unconstitutional”. (DBAWS, Vol. 17, Part Two, pp. 459).


Thengadi was a non-SC and a Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) man and a Bharatiya Jana Sangh office bearer of Madhya Pradesh. Therefore, his appointment as the secretary of SCF was highly impossible.


Moreover, election was at Bhandara and Thengadi did not belong to that constituency. He was from Arvi district, Wardha. Logically speaking, there was no point in appointing an incongruous person like Thengadi as the election agent at Bhandara.


Claims without evidence


Bhandara by-election happened between 2 to 5 May 1954 (Dr. Dhananjay Keer, Dr. Babasaheb Ambedkar, Biography, first edition 1966, 9th Edi. 2014, Mumbai, pp.630).


The Scheduled Castes Federation activities during this election — campaign, meetings, rallies, speeches etc. —were comprehensively and frequently reported in Janata by Ambedkar in April and May 1954. All the leaders who participated and addressed the rallies have been listed in the Janata reports.


If Thengadi was a trusted associate of Ambedkar, then how come he was absent from all the meetings and rallies of the Scheduled Castes Federation? Thengadi finds no mention, either as the speaker or as the guest of honour, in the election coverage done in Janata by Ambedkar.


Communist Party of India (CPI) and many others had supported Ambedkar in Bhandara by-election. A. B. Bardhan of the CPI participated in the campaign rallies of SCF (DBAWS, Vol. 18, Part Three,pp.374). Does Tuli want to suggest that the CPI and the Jana Sangh were in coalition in this election?


Tuli indicates a one-year interval between Ambedkar’s statement about the RSS and the 1952 elections and states that anything was possible in politics during the span of one year.


But, the fact was that the manifesto of Scheduled Castes Federation pertaining to the rejection of the possibility of an alliance with the Hindu Mahasabha and the RSS was for the Lok Sabha elections, which took place on 4 January 1952.


It was not decided one year earlier as Tuli puts, but in October 1951 only. It is quite natural that the manifesto for the election to be held on 4 January 1952 would be drafted at least three months before, i.e. in October 1951.


But, Tuli counts this three-month duration as one whole year. Perhaps, he does not know the facts or doesn’t want to accept them. Either way, he should refer to my book on Ambedkar’s writings and speeches. (DBAWS, Vol. 17, Part One, dated 3 Oct. 1951, pp. 402).


Ambedkar called RSS ‘poisonous’

Tuli further says, “His views on Partition and radicalism in Islam also reflect clear ideological synergy between the two.” He, very enthusiastically refers, for this cunning inference, Dr. Ambedkar’s Pakistan or Partition of India. But he conveniently forgets Ambedkar’s scathing remarks on the RSS in the same book. As a matter of fact, there was not an iota of ideological resemblance between Ambedkar and the RSS.


In fact, Golwalkar Guruji’s Bunch of Thoughts is the Bible for the RSS. Guruji believes in Chaturvarna syatem. He prefers protection and promotion of Sanatan Sanskriti and construction of a Hindu Rashtra. Dr. Ambedkar says, “If Hindu Raj does become a fact, it will, no doubt, be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality, and fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.” (Pakistan or The Partition of India, 1946, pp. 358. DBAWS, Vol. 8, 1990, 358)


On 07 September 1949, Golwalkar Guruji met Law Minister Ambedkar in Delhi. He sought Ambedkar’s help to curb Marathas. Ambedkar said at that time, “RSS is a poisonous tree. RSS is dreaming of Peshwa rule. It is not possible to be with you. I can’t support you.”


A detailed report of this visit has been published in Ambedkar’s Janata on 10 September 1949. Moreover, Sohanlal Shastri, chief of Delhi Bauddh Mahasabha — founded by Ambedkar — and a well-known scholar, was present at the moment. He has elaborated this meeting in his book- Babasahab Dr. Ambedkar ke Sampark mein 25 warsha, Bhartiya Bauddha Mahasabha, Delhi Pradesh, (New Delhi, pp. 54-55).


During the same period, RSS was obstructing the constitution being written by Ambedkar. RSS was against the Hindu Code Bill. and its members had broken into the auditorium gallery to drive away the constitution assembly; the incident is reported in the parliamentary records. (Contitutional Assembly Debates, Govt. of India Publication, New Delhi, Vol. 7 p. 1233, Dated, 4 January 1949).


Documentary sources are counted as more authentic than the oral narratives. And moreover, Thengadi and Observer belong to RSS, hence there is no authenticity and validity of their claims.


Thengadi wrote the book several years after Ambedkar’s demise. Thengadi, Arun Anand or Tuli have not given any evidence from Ambedkar’s time.


Even Ambedkar’s visit to the RSS workshop is imaginary. No evidences, such as photos, correspondence or the news published in contemporary papers have been provided by the RSS.


Has RSS abandoned ‘Ramrajya’?

Ambedkar burned Manusmriti, renounced Hindu religion, refuted Hinduism and embraced Buddhism. While embracing Buddhism he took 22 pledges, of which, eight are:-

1. I shall have no faith in Brahma, Vishnu, Mahesh nor shall I worship them.
2. I shall have no faith in Ram and Krishna nor shall I worship them.
3. I shall have no faith in Gauri, Ganapati and other Gods and Goddesses of Hindu religion nor shall I worship them.
4. I do not believe in the theory of incarnation of Gods.
5. I do not and shall not believe that the Lord Buddha was the incarnation of Vishnu. I believe this to be, mischievous and false propaganda.
6. I shall not perform “shraaddha” nor shall I give “pind dan”.
7. I shall not perform any ceremony through Brahmins.
8. I hereby embrace Buddhism by renouncing my old Hindu religion, which is detrimental to the prosperity of the humankind and discriminate human beings and treat them low. (DBAWS, vol.17, part Three, pp.531).


If so, then, whether RSS has abandoned the idea of Ramrajya is an interesting question. Does RSS advocate Ambedkar’s books — Riddles in Hinduism, Riddles of Ram and Krishna and Revolution and Counter Revolution? RSS wants merging (samarasata), while Ambedkar wants Annihilation of Caste, which is his basic ideological position.


In a nutshell, even if viewed microscopically, there is no resemblance between Ambedkar and the ideologies of the RSS. They are shrewdly attempting to hijack Ambedkar who has been globally accepted and recognised as the most crucial philosopher leader of the oppressed, while the image of RSS is that of a fascist.


The author is the Editor of Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 17 to 22, published by the Government of Maharashtra.

Views are personal.

https://theprint.in/opinion/no-ideological-synergy-between-ambedkar-and-rss-rajiv-tuli-can-read-my-book-for-facts/408612/


TAGS alliance Ambedkar Bhandara Evidence ideology RSS Scheduled Castes Federation

Friday, April 24, 2020

डॉ. आंबेडकर म्हणतात,"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!"-@प्रा.हरी नरके, रा.स्व.संघ 6



संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी श्री. राजीव तुली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संघाच्या जवळकीचे दि प्रिंटमध्ये २३ एप्रिल २०२० रोजी केलेले सर्व दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आर.एस.एस. हा तर विषवृक्ष आहे! ते पुढे असेही म्हणतात की, हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे! काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला जवळ करणेच शक्य नाही.

ठेंगडींची नियुक्ती ह्या निव्वळ हवेतल्या बाता-

१. तुलींनी दावा केला आहे की संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून डॉ. आंबेडकरांनी नियुक्ती केली होती. तुली यांचा असाही दावा आहे की ठेंगडी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी १९५४ मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत त्यांना आपला निवडणूक प्रतिनिधी नेमले होते. असेच दावे याआधी अरूण आनंद यांनी केले होते. ते मी पुराव्यानिशी फेटाळले होते. पण संघाचा खोटारडेपणा असा की खोटे दावे पुन्हापुन्हा करीत राहायचे. पण ठेंगडींच्या ह्या नियुक्तीचा लेखी पुरावा तुलींनी सादर केलेला नाही. निवडणूक प्रतिनिधी तोंडी नेमला जात नाही. निवडणूक अधिकार्‍यांना तसे लेखी कळवावे लागते. तुली यांनी ठेंगडींच्या नियुक्तीच्या कपोलकल्पित कहाण्या सांगणे, तोंडी दावे करणे आणि हवेत महाल बांधणे सोडून ठेंगडींच्या नियुक्तीचे लेखीपत्र सादर करावे. विषय संपला.

शेकाफेचे महासचिव राजभोज तर म.प्र.सचिव आवळे- ठेंगडी नव्हेत-

२. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून शेकाफेचे अ.भा. जनरल सेक्रेटरी पां. ना. राजभोज व मध्यप्रदेश शेकाफेचे सेक्रेटरी बाबू हरिदास आवळे यांची नियुक्ती डॉ. आंबेडकरांनी केलेली होती. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड,१८ वा, भाग ३ रा ]

३. शेकाफेच्या घटनेनुसार नॉन श्येड्युल्ड कास्ट व्यक्तीची सदस्य वा पदाधिकारी म्हणून जशी नियुक्ती शक्य नव्हती तशीच जी व्यक्ती इतर संघटनेची वा पक्षाची सदस्य असेल तर तिचीही नियुक्ती करता येत नव्हती. ठेंगडी हे नॉन शेड्युल्ड कास्ट असल्याने व ते आर.एस.एस. RSS तसेच भारतीय जनसंघाचे मध्यप्रदेशचे पदाधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती शेकाफेचे सचिव म्हणून होऊ शकत नव्हती. शेकाफेच्या घटनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, Any person belonging to the scheduld castes and Who is not a member of any other political or any social or religious organisatoin can be become a member of SCF. { डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग दुसरा, पृ. 459}

 निवडणूक भंडार्‍याला ठेंगडी वर्ध्याचे- आणि नवखे-

४. शिवाय निवडणूक भंडार्‍याला होती आणि ठेंगडी त्या मतदार संघातले मतदार नव्हते. ते वर्ध्याचे आर्वीचे होते. अशा अपरिचित व्यक्तीच्या इलेक्शन एजंट म्हणून केलेल्या नियुक्तीचा निवडणुकीत काय फायदा? ठेंगडी तेव्हा अगदी नवखे होते.

५. तुली एकुण दोन वेगवेगळ्या निवडणुकांबद्दल एकत्र बोलत आहेत. पहिली १९५२ सालची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि दुसरी भंडार्‍याची १९५४ सालची ची पोटनिवडणूक. भंडारा येथील लोकसभा पोटनिवडणूक २ ते ५ मे १९५४ रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेले प्रचार दौरे, भाषणे आणि निवडणुकीची वार्तापत्रे एप्रिल आणि मे १९५४ च्या जनता या डॉ. आंबेडकरांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात सविस्तरपणे अनेकदा प्रकाशित झालेली आहेत. जनताचे अंक पुराव्यासाठी आजही उपलब्ध आहेत. या सर्व सभांना उपस्थित असलेले नेते, सभेत भाषणे केलेले नेते यांच्या नावांची मोठी यादी जनतामध्ये आलेली आहे. भंडार्‍याच्या एकाही प्रचार सभेला ठेंगडी हजर नव्हते. ते जर डॉ. आंबेडकरांचे विश्वासू असे निवडणुक प्रतिनिधी होते तर मग ते सर्वच प्रचारसभांना गैरहजर का होते? याचे उत्तर संघ देत नाही. ठेंगडींचा प्रचार सभांमध्ये वक्ता वा मंचावर उपस्थित सदस्य असा साधा उल्लेखसुद्धा जनता या डॉ. आंबेडकारांच्या वर्तमानपत्रामध्ये नाही.
यावरूनच सिद्ध होते ठेंगडी बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रतिनिधी नव्हते.

काय जनसंघ- कम्युनिस्टांची युती होती?

६. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षासह इतर अनेक पक्ष,संघटनांनी स्वत:हून डॉ. आंबेडकरांना पाठींबा दिलेला होता. कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्री ए. बी. वर्धन हे भंडार्‍याच्या प्रचारसभांना हजर असत. या निवडणुकीत कम्युनिस्ट आणि जनसंघ यांची युती होती व ते एकत्र काम करीत होते असे तुलींना म्हणायचे आहे काय?

एक वर्ष नाही अवघे तीन महिने-

७. राजकारणात एका वर्षात काहीही होऊ शकते असे विधान करून डॉ. आंबेडकरांचे आर.एस.एस. ही प्रतिगामी व विघटनवादी असल्याबाबतचे विधान व लोकसभा निवडणूक यात वर्षाचे अंतर होते असे तुली सांगतात. वस्तुस्थिती अशी आहे इथे तुली १९५२ च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलत आहेत. " हिंदु महासभा व आर.एस.एस.बरोबर शेकाफेची निवडणुक युती होऊ शकत नाही हा शेकाफेचा बाबासाहेबांनी स्वत: लिहिलेला निवडणूक जाहीरनामा ४ जाने १९५२ रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचाच आहे. तुली म्हणतात तसा तो एक वर्षे आधीचा नसून ऑक्टोबर १९५१ चा आहे. जाहीरनामा लेखन, प्रकाशन, प्रदीर्घ, देशव्यापी प्रचारमोहीम आणि अनेक आठवड्यांमध्ये पार पडलेली निवडणूक या तीन महिन्याच्या काळातील सलग गोष्टी आहेत. १९५१ च्या शेवटी जाहीरनामा व निवडणूक प्रचार झाला व ४ जानेवारी १९५२ ला मतदान झाले असा हा एकत्र कार्यक्रम होता. त्यात १९५१ आणि १९५२ असे वर्षाचे वर्षाचे अंतर नव्हते. [ डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग पहिला, दि. 3 ऑक्टोबर 1951, पृ. 402]

हिंदूराष्ट्र हे महाभयानक संकट-

८. देशाची फाळणी व इस्लाम याबाबतची डॉ. आंबेडकरांची व संघाची मतं यात खूप साम्य असल्याचा दावा तुली करतात. यासाठी डॉ. आंबेडकरांच्या ज्या "पाकीस्तान किंवा भारताची फाळणी "या पुस्तकाचा हवाला ते देतात, त्याच पुस्तकात आर.एस.एस.बद्दल आंबेडकरांनी संतप्त उद्गार काढलेले आहेत. त्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की आर.एस.एस.आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेत काडीचेही साम्य नव्हते. गोळवलकरगुरूजींचे "बंच ऑफ थॉट" हे आर.एस.एस.चे बायबल आहे. गुरूजी चातुर्वर्ण्य मानतात. सनातन संस्कृती रक्षण, हिंदुराष्ट्राची स्थापना ह्याला प्राधान्य देतात.

संघ म्हणजे मान न मान मैं तेरा मेहमान-

आंबेडकर म्हणतात, " हिंदु राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये." { पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८, डॉ. बा.आं.ले.भा. खंड 8 वा, 1990, पृ. 358} या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आणि हिंदू राष्ट्रवाला संघ यांच्यात कसलेच साम्य नव्हते. हे म्हणजे " मान न मान मैं तेरा मेहमान" असला लोचट गळेपडूपणा संघाने चालवलेला आहे.

मराठाविरोधी गोळवलकरगुरूजी- संघ हा विषवृक्ष-

९.]  ७ सप्टेंबर १९४९ ला आर.एस.एस.सुप्रिमो गोळवलकरगुरूजी कायदामंत्री डॉ. आंबेडकरांना दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडॆ मदत मागितली. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, " आर.एस.एस. हा विषवृक्ष आहे. आर.एस.एस.ला पेशवाईची स्वप्नं पडत आहेत. माझे तुमच्याशी जमूच शकत नाही. मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही."  या भेटीची विस्तृत बातमी तिसर्‍या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या जनताने १० सप्टेंबर १९४९ ला दिलेली आहे. शिवाय या दोघांच्या भेटीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोहनलाल शास्त्री प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे. { पाहा: बाबासाहेब डॉ. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली,पृ. ५४/५५}


संविधान आणि हिंदु कोड बिलाला संघाचा विरोध-

१०. याच काळात डॉ. आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर.एस.एस. विरोध करीत होती. हिंदु कोड बिलालाही संघाचा विरोध होता. घटना सभेचे कामकाज उधळण्यासाठी आर.एस.एस.चे सदस्य संसदेच्या सभागृहाच्या गॅलरीत घुसले होते अशी नोंद पार्लमेंटच्या दप्तरात आहे. [ पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७ वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९, CAD7/1233 ]


हवेतल्या गप्पा मारू नका लेखी  पुरावे द्या-

११. लिखित दस्तावेज आणि तोंडी माहिती यात लिखितला प्रथम दर्जाचा पुरावा मानले जाते तर तोंडीला दुय्यम महत्व असते. संघाकडे त्याकाळातला एकही लेखी पुरावा नाही तर आम्ही आंबेडकरवादी ठोस, सबळ, लेखी आणि त्याकाळातल्या पुराव्यांच्या आधारे बोलत आहोत. शिवाय ठेंगडी आणि ऑर्गनायझर हे आर.एस.एस.चे असल्याने त्यांना फारशी विश्वासार्हता नाही. ते या घटनेचे लाभार्थी असल्याने त्यांचा नंतरच्या काळातला आणि तोही तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.

ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा-

१२. ठेंगडीचे पुस्तक डॉ. आंबेडकर हयात असताना  लिहिलेले नसून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कितीतरी वर्षांनी लिहिलेले आहे. समकालीन एकही लेखी दस्तावेज ठेंगडी, आनंद वा तुलींनी सादर केलेला नाही. त्यामुळे ही तोंडी माहिती कल्पित आणि नंतर रचलेली आहे. बनावट आणि सांगोवांगी असल्याने ती टिकू शकत नाही.

बाबासाहेबांची संघशिबिराला भेट? नाही, हीही थापच-

१३. डॉ. आंबेडकरांच्या संघ शिबिराच्या भेटीची १९३९ ची कहाणीही अशीच कपोलकल्पित आहे. बनावट आहे. तिचे त्याकाळातले लिखित पुरावे, फोटो, संघ व बाबासाहेब यांच्यातील भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे पुरावे संघ देऊ शकलेला नाही. ते दिल्याशिवाय त्यांच्या म्हणण्यावर चर्चासुद्ध शक्य नाही. विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

बाबासाहेब आणि संघ, तत्वज्ञानात १८० डिग्रीचा फरक-

१४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला परमप्रिय असलेली मनुस्मृती जाळतात, संघ ज्या डोलार्‍यावर उभा आहे तो हिंदू धर्म ते सोडतात, हिंदुत्व सपशेल नाकारतात, बौद्ध धर्म स्विकारताना आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ते लाखोंच्या जनसमुदायाला २२ प्रतिज्ञा देतात, त्यात हिंदूंच्या देवता राम, कृष्ण यांना मी मानणार नाही अशा प्रतिज्ञा आहेत.

आर.एस.एस.ने रामराज्याची कल्पना सोडून दिलेली आहे काय? "रिडल्स ऑफ हिंदुइझम,"  "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" "रेव्होल्युशन अ‍ॅण्ड काऊंटर रेव्होल्युशन" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे ग्रंथ आर.एस.एस.ला मान्य आणि प्रिय आहेत काय?

"अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुलभूत तत्वज्ञान आहे. तर आर.एस.एस.ला समरसता हवीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती नष्ट करा म्हणतात, तर जाती टिकवा आणि त्यांचातले भेद कमी करून समरसता निर्माण करा असे संघीय म्हणतात.

या संपुर्ण विरूद्ध दिशा आहेत.

फॅसिस्ट संघाचा बाबासाहेबांच्या अपहरणाचा डाव-

थोडक्यात आर.एस.एस. आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीत काडीचेही साम्य नाही. डॉ. आंबेडकराना हायजॅक करण्यासाठी संघ हे प्रयत्न करीत आहे. डॉ. आंबेडकरांना आज सारे जग महान विद्वान, घटनाकार, जगभरच्या उपेक्षित वंचितांचा मसिहा म्हणून वंदन करते तर संघ हा फॅसिस्ट म्हणून कुविख्यात आहे. म्हणून संघाला आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तसेच आंबेडकरांना मानणार्‍या व्होटबॅंकेला भुलवण्यासाठी ही पळवापळवी करायची आहे. आम्ही जागृत आंबेडकरवादी संघाला त्यात कदापिही यशस्वी होऊ देणार नाही!

- प्रा. हरी नरके,
२३/४/२०२०
[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत]

Wednesday, April 22, 2020

धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र ब्राह्मणांना तरी परवडेल काय?-प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 5







स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्‍या या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.

परधर्मियांविषयी सतत द्वेशपुर्ण अफवा पसरवून हिंदुराष्ट्राची सोनेरी स्वप्नं बहुजनांच्या मनावर कोरली जातात. हे मनाचे श्लोक वाचून आणि ऎकून मूळ धर्मग्रंथ न वाचलेली बहुजन खिल्लारं चेकाळतात. बहुजानांना धर्मशास्त्रात काडीचाही अधिकार नाही. ते फक्त गुलाम आहेत. तरिही सर्व जातीतील हिंदू स्त्रिया, अनु. जाती, जमाती, भटके, विमुक्त आणि ओबीसी यांना हिंदूराष्ट्राचा अतोनात गर्व असतो. या हिंदूराष्ट्रात त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त वेठबिगारीच येईल. बहुजनांचे अज्ञान हेच आंबाभुर्जीतील रेशीमकिड्यांचे भांडवल असते. माता भगिनी आणि बहुजनहो, तुम्ही मूळ ग्रंथ वाचू लागाल त्याक्षणी परधर्मद्वेशावर म्हणजे शेणाच्या पोहावर उभारलेला हा हिंदूराष्ट्राच्या पत्त्यांचा बंगला ढासळेल. पण तुर्तास ते राहू द्या.

सांप्रत काळी आपण हे तथाकथित हिंदुराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडणार आहे काय याचा थोडा धांडोळा घेऊ.

धर्मशास्त्र सांगते, " वेदाध्ययन न करणारे किंवा अग्निहोत्र न ठेवणारे ब्राह्मण शूद्रासमान होत. वेद न जाणणारा, व्यापारावर उपजीविका करणारा, नटाचा धंदा करणारा, दुसर्‍याच्या वित्ताचे चोराप्रमाणे हरण करणारा अथवा वैद्यकीचा [ म्हणजे आजच्या भाषेत डॉक्टर चा ] धंदा करून उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण हा " ब्राह्मण" ह्या संज्ञेस अपात्र आहे." असे वसिष्ठऋषींचे वचन आहे. वसिष्ठऋषी हे तर श्रीरामांचे गुरू. आधुनिक रामराज्यात त्यांची आज्ञा मानावीच लागणार नाही का? वसिष्ठऋषी पुढे म्हणतात, " व्याजबट्ट्याचा धंदा करणे हा ब्रह्महत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे. "


गौतमऋषींच्या मते अशा प्रकारच्या पतितांशी व्यवहार करणारे तेही पतितच होतात. अर्थात वरिल सर्व नियम पाळायचे झाले तर पतित नसलेले किती ब्राह्मण सापडतील?


अहो, सगळे डॉक्टर, अभिनेते, [ नटश्रेष्ठ शरद पोंक्षे, सौरभ गोखले, केतकी चितळे, इ. इ. ] गायक, व्यापार करणारे [ चितळे बंधूंसारखे सगळेच ] व्याज घेणारे म्हणजे बॅंकींग उद्योगातले सगळे, हे "पतित" ठरणार. ते "ब्राह्मण" राहणार नाहीत. पतिताचं वर्तन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक की हो डोक्यावर! आता मला सांगा हे सगळे पतित वगळले की केवळ वेदाध्ययन करणारे महाराष्ट्रासारख्या टिळक-आगरकर-राजवाडे-केतकरांच्या राज्यात दहावीस तरी उरतील काहो? म्हणजे उरलेल्यांमध्ये [ पतितांमध्ये ] खुद्द आपला जन्मदाता पिता जरी असला तरी खर्‍या धार्मिक माणसाने त्याचाही त्याग केला पाहिजे असे असे गौतम स्मृती सांगते. बौधायनाने आर्यावर्ताबाहेर जाणारांना कठोर प्रायश्चित सांगितले आहे. अगदी बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये जाणारांनाही हाच नियम लागू होतो. शूद्रांना शिकवणारे सारे ब्राह्मण दुषित होत. पतित होत असे धर्मशास्त्र सांगते.


ज्या धर्मशास्त्राच्या आधारे चांडाल जातीचे अस्तित्व सिद्ध होते त्याच स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्‍या या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.


असे सनातन धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय?

संदर्भ- विविध वृत, २२ जानेवारी, १९३३


प्रा.हरी नरके, २२/०४/२०२०

{लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखातील मतं वैयक्तिक आहेत.}



तोंड ओळख करून घेण्यासाठी पाहा-

गौतम धर्मसूत्र अब तक उपलब्ध धर्मसूत्रों में प्राचीनतम है। https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
https://en.wikipedia.org/wiki/Gautama_Dharmasutra


https://en.wikipedia.org/wiki/Vasishtha
Vashishtha (Sanskrit: वशिष्ठ, IAST: vaśiṣṭha) is one of the oldest and most revered Vedic rishis
https://en.wikipedia.org/wiki/Baudhayana_sutras
The Baudhāyana sūtras are a group of Vedic Sanskrit texts which cover dharma, daily ritual, mathematics, etc. They belong to the Taittiriya branch


बौधायन के सूत्र वैदिक संस्कृत में हैं तथा धर्म, दैनिक कर्मकाण्ड, गणित आदि से सम्बन्धित हैं। वे कृष्ण यजुर्वेद के तैत्तिरीय शाखा से सम्बन्धित हैं। सूत्र ग्रन्थों में सम्भवतः ये प्राचीनतम ग्रन्थ हैं। इनकी रचना सम्भवतः ८वीं-७वीं शताब्दी ईसापूर्व हुई थी।

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8


अधिक संदर्भांसाठी वाचा- भारतरत्न म.म. पां.वा काणे लिखित, धर्मशास्त्राचा इतिहास, एकुण ५ खंड, आठ भाग, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे, १९३०-६२

The History of Dharmaśāstra, with subtitle Ancient and Medieval Religious and Civil Law in India, is a monumental five-volume work consisting of around 6,500 pages. It was written by Bharat Ratna Pandurang Vaman Kane, an Indologist. The first volume of the work was published in 1930 and the last one in 1962.

Tuesday, April 21, 2020

घटनासभेचे कामकाज बंद पाडणारी आर.एस.एस. घटनाप्रेमी कशी?- रा.स्व.संघ 4







रा.स्व. संघ ही शिस्तबद्ध संघटना असल्याचे ढोल वाजवले जातात,
मग संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत का घुसले होते?
शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? ह्यालाच हे संविधानाचा सन्मान म्हणतात का?

वाचा- " संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच.सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात."

पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९,

#RSS_की_पोलखोल

-प्रा.हरी नरके, २१/०४/२०२०

Monday, April 20, 2020

आरएसएस सुप्रिमो गोळवलकर बाबासाहेबांना का भेटले होते?-प्रा.हरी नरके, रा.स्व.संघ 3




मराठ्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा या त्यांच्या मागणीवर बाबासाहेब म्हणाले, रा.स्व. संघ हा तर विषवृक्ष आहे!

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. " पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मणराज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही." अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब - गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जातयेत असत.

गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, " हे ब्राहमण गृहस्थ आहेत हिंदूंचे पोप. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!"

आणि संघवाले या भेटीबद्दल धादांत खोट्या अफवा पसरवतात. बाबासाहेब म्हणाले म्हणे, " संघाचे काम वाढवा, मी तुमच्या कामावर खूश आहे." चातुर्वर्ण्याची प्रस्थापना करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील?

दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषयपत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

- प्रा. हरी नरके, २० एप्रिल २०२०

{ पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५}

Sunday, April 19, 2020

No, Ambedkar was not impressed by RSS- Prof Hari Narke, rss 2



No, Ambedkar was not impressed by RSS or in an alliance with it. Arun Anand is wrong
Arun Anand claimed Ambedkar was impressed by RSS and his party formed a pre-poll alliance with Bharatiya Jana Sangh before 1952 Madhya Pradesh elections.

- HARI NARKE 19 April, 2020 4:45 pm IST

The claims made by Arun Anand in his article Why RSS considers Ambedkar as one of its own icons in ThePrint are not correct, historically and factually. I was the editor of Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches — a multi-volume project published by the government of Maharashtra. And so, I want to bring some documentary evidence and facts to refute Anand’s claims.

The RSS was clearly circulating false articles and videos on the occasion of B.R. Ambedkar’s 129th birth anniversary. Arun Anand, CEO of Indraprastha Vishwa Samvad Kendra, an RSS affiliate, makes three claims in his video and article:

Claim 1
Ambedkar was ‘impressed’ by the RSS.

Fact: On 14 May 1951, Ambedkar had made very scathing remarks regarding the RSS, which are available in the records of Parliament. He said: “May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very dangerous associations.”

(Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 15, edited by Vasant Moon, Govt. of Maharashtra, Mumbai, 1997, pp. 560), (Parliamentary Debates, Vol. 11, Part Two, 14 May 1951, pp. 8,687-90).

This remark of Ambedkar, made in Parliament, irrefragably proves that he was very acerbic about the ideology of the RSS. So, Anand’s claims are not just surprising, but demonstrates the shrewd politics of the RSS.

Claim 2
Ambedkar’s Scheduled Caste Federation and Bharatiya Jana Sangh formed a ‘pre-poll alliance’ in 1952 Madhya Pradesh election.

Fact: This is what Ambedkar said before the 1952 elections in the Scheduled Caste Federation’s manifesto: “As regards other Political Parties, the Scheduled Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as Hindu Mahasabha or the RSS.”

(Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 17, Part One, edited by Prof Hari Narke, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp. 402).
Dr. Ambedkar’s statement shows he strongly opposed the RSS and the Hindu Mahasabha. Still, Anand, with utmost confidence, quotes Dattopant Thengadi to say that Ambedkar had a pre-poll alliance with the RSS in Madhya Pradesh elections.

Claim 3
Dattopant Thengadi was appointed as secretary of Scheduled Caste Federation when Ambedkar was chairman.

Fact: Only a Scheduled Caste person could be appointed as a member of the Federation, this was the rule. And Dattopant Thengadi was not an SC. So, how come Ambedkar allowed Thengadi to be appointed as the secretary of the party?

Arun Anand is playing a heinous game to stigmatise Ambedkar. This is the usual dirty politics of the RSS. I strongly condemn Arun Anand’s defamation of Ambedkar.

The author is the Editor of Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 17 to 22, published by the Government of Maharashtra. Views are personal.
Opinion
https://theprint.in/opinion/ambedkar-was-not-impressed-by-rss-or-in-alliance-with-it/404770/
विशेष आभार-कुमार केतकर,निखिल वागळे,नितीन ब्रह्मे,नितीन वैद्य,आनंद उबाळे

Friday, April 17, 2020

आर.एस.एस.ही अत्यंत धोकादायक आणि प्रतिक्रियावादी संघटना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा.स्व.संघ 1








डॉ. बाबासाहेब आणि आर.एस.एस.ची विचारधारा एकसारखी असल्याचा दावा धादांत खोटा- प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब म्हणतात, " आर.एस.एस.ही अत्यंत धोकादायक आणि प्रतिक्रियावादी संघटना. तिच्याबरोबर समझोता होऊच शकत नाही."

डॉ. बाबासाहेब   यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आर.एस.एस. तर्फे खोटारडे व्हीडीओ प्रसृत करण्यात आले. त्यातला एक दि.प्रिंट च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला असून तो आता यू.ट्यूबवरही उपलब्ध आहे.  " Ambedkar's links with RSS & how their ideologies were similar" आर.एस.एस.चे श्री. अरूण आनंद यांच्या या व्हीडीओत ३ दावे करण्यात आलेले आहेत.

दावा क्रमांक १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर एस.एस.चे कौतुक वाटत असे.

दावा क्रमांक २. १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात बाबासाहेबांनी [ आर.एस.एस. ] जनसंघाबरोबर युती केली होती.

दावा क्रमांक ३. आर.एस.एस.चे नेते आणि प्रमुख प्रचारक श्री दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांनी श्येड्य़ूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी नेमले होते.

हे तिन्हीही दावे धादांत खोटे, सम्पुर्ण निराधार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणारे आहेत.
माझ्या विधानांना अस्सल पुरावे काय आहेत ते देतोच पण तत्पुर्वी एक सांगतो श्री अरूण आनंद यांनी केलेल्या या दाव्यांचे लिखित पुरावे सादर करावेत. ते पुरावे सादर करूच शकणार नाहीत, कारण ते खोटे बोलताहेत.

दावा क्रमांक १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर एस.एस.चे कौतुक वाटत असे.

वस्तुस्थिती- बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
" May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. "[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]

" मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत."  हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले उद्गार आहेत बाबासाहेबांचे. हे कौतुक आहे आर.एस.एस.चे?

दावा क्रमांक २. १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात बाबासाहेबांनी [ आर.एस.एस. ] जनसंघाबरोबर युती केली होती.

वस्तुस्थिती- १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-

" 54. As regards other Political Parties, the Scheduld Caste Federation's attitude can be easily defined. The Scheduld Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S." [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]

५४. " इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही."

आणि आनंद महाशय रेटून खोटं बोलताहेत की बाबासाहेबांनी मध्यप्रदेशात आर.एस.एस. [जनसंघाबरोबर] निवडणुक युती केली होती.

दावा क्रमांक ३. आर.एस.एस.चे नेते आणि प्रमुख प्रचारक श्री दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांनी श्येड्य़ूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी नेमले होते.

वस्तुस्थिती- शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ह्या पक्षाचे सभासद किंवा पदाधिकारी त्याच व्यक्तीला होता येत होते जी अनुसुचित जातीची सदस्य आहे. जे दत्तोपंत ठेंगडी अनुसुचित जातीचे नव्हतेच त्यांना डॉ. बाबासाहेब सेक्रेटरी कसे नेमतील?

किती सराईतपणे असत्यकथन करणारा खोटारडा इसम आहे हा आर.एस.एस.चा अरूण आनंद! याच्यावर डॉ. बाबसाहेबांची बदनामी केल्याबद्दल बाबासाहेबांच्या कायदेशीर वारसदारांनी खटला भरायला हवा. असा खटला फक्त कायदेशीर वारसदारांनाच भरता येतो.

डॉ. बाबासाहेबांच्या बदनामीबद्दल दि प्रिंटचा निषेध. आर.एस.एस. प्रचारक [सी.इ.ओ] श्री अरूण आनंद यांचा तीव्र धि:क्कार!

प्रा.हरी नरके, १७/४/२०२०

https://www.youtube.com/watch?v=QkrR6P0Apn4&feature=youtu.be&fbclid=IwAR3ve-Medshfen2GCqGvEvDqZ22g-eBPRzn3UykB4MTW-GAxqSOr2L1Ts40