Thursday, December 31, 2020

सावित्रीजोतीरावांनी सहजीवनाचे व्याकरण लिहिले-प्रा.हरी नरके



#सावित्रीउत्सव

जोतीरावांनी लग्नानंतर सावित्रीबाईंना शिकवले. त्या पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणतज्ञ बनल्या. त्या १ जानेवारी १८४८ ला शिक्षिका बनल्या तेव्हा त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. तर भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली तेव्हा जोतीराव अवघे २० वर्षांचे होते. सावित्रीबाई पुढची ५० वर्षे स्त्रिया, मुलं, बहुजन-वंचित समाजासाठी राबत राहिल्या. १८९७ च्या प्लेगमध्ये पेशंट्सवर उपचार करताकरता त्या गेल्या.

आयुष्यभर त्यांनी जोतीरावांना साथ दिली. स्वत: जोतीरावांनी लिहून ठेवल्याप्रमाणे--

(१) ब्राह्मण विधवांसाठी चालवलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची चळवळ,

(२) सत्यशोधक विवाह चळवळ,

(३) १८७२ ते ७६ या सलग चार वर्षे पडलेल्या दुष्काळात शेतकरी- कष्टकर्‍यांच्या १००० मुला-मुलींचे पालनपोषन करण्याची चळवळ,

(४) ब्राह्मण विधवांचे सक्तीने होणारे केशवपन थांबवण्यसाठी नाभिक बांधवांचा घडवून आणलेला संप,

या चारही चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले. जोतीरावांनी त्यांना सम्पुर्ण साथ दिली.

अनेकदा जोतीराव नेते होते, सावित्रीबाई साथीला होत्या, तर या चार प्रसंगी सावित्रीबाई नेत्या होत्या. जोतीराव सोबत होते. हे होते आदर्श सहजीवन. आदर्श सहजीवनाचे व्याकरण लिहिणार्‍या सावित्री-जोतींना विनम्र अभिवादन,.

-प्रा. हरी नरके, 

No comments:

Post a Comment