Thursday, December 8, 2016

छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि अनैतिहासिक वक्तव्ये

सौजन्य - श्री Dinanath Manohar
October 8, 2013 ·
काल फेसबुक वर डॉ. विकास आमटे ह्यांनी एक एक पोस्ट टाकली होती. ह्या पोस्टमध्ये कॉम्रेड हो ची मिन्ह ह्यांनी पत्रकाराला आपण गनिमी काव्याचे तंत्र श्री शिवाजी महाराजांकडून घेतले हे, '' देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला...अशा अर्थाच्या शब्दात सांगितले असं म्हटलं आहे, शिवाय पुढे ''काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त झाला" असं लिहून ठेवलंय.... असंही विधान केलंय. (Fwd frm Dr Ashok N. Digras) ह्या प्रस्तावनेत कॉ. हो ची मिन्ह ह्यांच्े नाव न घेता, केवळ राष््ट्राध्यक्ष असा उल्लेख आहे. एकूणच कॉ. हो ची मिन्ह ्हयांच्या तोंडी ज्या प्रकारची विधान टाकली आहेत ती वाचल्यावर मनात शंका येणं अटळ होतं. त्याप्रमाणे काही जणांनी शंका व्यक्त केल्याही. त्यावर प्रशांत जगताप ह्यांनी चक्क सकाळ टाईम्समधील लिंक देऊन असं झाल्याचा पुरावा म्हणून storHiain recalls Shivaji’s war tactics historian recalls Shivaji's war tactics अशा हेडींगने आलेली बातमीच दाखवली. ह्या पोस्ट्च्या सत्यतेबद्दल मी ही, ''आश्चर्य म्हणजे प्रस्तावनेत कॉम्रेड हो ची मिन्ह ह्याचं नाव का घेतलं गेलेलं नाही, ते कम्युनिस्ट होते ह्याचा उल्लेख नाही. व्व्हििएतनामच्या कुठल्या मंत्री येथे आल्या होत्या, कधी आल्या होत्या त्याचा खुलासा नाही. एतनामचा संघर्ष आणि हा लढ्याचा काळ भारत स्वतंत्र झाल्यवरचा. भारताचे त्यावेळच्या नेहरू सरकारचा ह्या जनसंघरषाला पाठींबा होता शिवाय येथील कम्युनिस्ट पार्टीचाही पाठींबा होता. एसं असून एवढ्या दीर्घ काळात ही कहाणी अंधारात कशी राहिली हा प्रश्न पडणं सहाजिक आहे.'' अशा शब्दात शंका व्यक्त केली होती. त्यामुळे मी प्रशांत जगताप ह्यांना लिंक दिल्याबद्दल लाईकवर क्लिक केलं. तरीही माझ्या मनात शंका होती, म्हणून थोडा शोध घेतला. लिंकमधील बातमीत ''he (हो ची मिन्ह) told the then Planning Commission Deputy Chairman Mohan Dharia that they had studied and used Shivaji's guerrilla warfare techniques to fight the American army,” said Bedekar.'' असा स्पष्ट मजकूर होता.. ह्याचा अर्थ मोहन धारीया प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना हो ची मिन्ह त्यांना असं म्हणाले होते. हो चि मिन्ह ह्यांनी भारताला भेट दिली ते साल होते १९५८ (यु ट्यूब वर क्लीप उपलब्ध) त्यावेळी श्री. मोहन धारिया पुणे म्युन्सिपल कार्पोरेशनचे सदस्य होते (१९५७- ६०) मूळात ते राज्यसभेत गेले ६४ आणि ७० साली. आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये होते दोन वेळा होते जोन वेळा , एका मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग मे १९७१ ते आक्टो. ७४ आणि त्यानंतर डेप्युटी चेअरमन ऑफ प्लॅनींग कमिशन (डिसे. ९० ते जून ९१) कॉ. हो ची मिन्ह ह्यांचा मृत्यू १९६९ मध्ये झाला. मूळात मोहन धारीया राज्यसभेत गेले ते ६४ आणि ७० साली. ह्या सर्व माहितीच्या आधारे मुळात श्री मोहन धारीया कॉम्रेड हो ची मिन्ह ह्यांना भेटल्याची संभवनियताच दिसत नाही. कॉ. हो ची मिन्ह ह्यांनी ५८ नंतर भारताला भेट दिली होती का ह्याबद्दल मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तशी भेट झाल्याचे दिसत नाही. आता प्रश्न हा पडतो, की कोण खोटं बोलतोय मोहन धारिया की बेडेकर? श्री मोहन धारीयानी अशी थाप मारली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणी नेत्यांना बिनधास्त असली विधानं करण्याची सवंय असते. परंतु श्री बेडेकर इतिहासतद्न्य म्हणून ओळखले जातात, त्यांनी ह्या विधानाची सत्यासत्यता तपासून बघायला हवी असं कोणीही अपेक्षा करेल. ह्याशिवाय श्री शिवाजी महाराज ह्यांची महानता, त्यांचे युद्धकौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना पुरेशा बोलक्या आहेत. असं असताना हे कॉ. हो ची मिन्ह सारख्या नेत्यांना वेठीस धरण्याची गरजच काय होती? हा ही प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं ह्यातून निष्कर्श एवढाच काढता येईल की जे स्वत:ला इतिहास तद्न्य म्हणवतात अशांनी केलेल्या विधानावरही अंधविश्वास ठेवणं चूकीचं आहे. पण मग सामान्य वाचकानं विश्वास ठेवायचा तरी कुणावर?
................................
31 You, Sunil Tambe, Satish Tambe and 28 others
..........................
5 shares
15 Comments
..................................
Sunil Tambe आगापिछा नसलेली माहिती विकास आमटेंसारख्या व्यक्तींनी प्रसृत करू नये. ह्या माहितीचा शोध घेतल्याबद्दल धन्यवाद.See Translation
Atul Patankar हिटलरने अशीच काही विधाने सुभाषचंद्र बोसंशी बोलताना केली, अशी एक विनोदी पोस्ट बऱ्याच वेळा वाचली आहे. सोबत पुरावा म्हणून त्यांच्या दोघांच्या भेटीचा फोटो! पण हिटलर किंवा सुभाषचंद्र यांच्या कुठल्या चरित्रात याचा उल्लेख आहे; शिवाजी चरित्र तेव्हा जर्मन भाषेत...See MoreSee Translation
Bharat Patankar very fitting responce, ...appreciated.
Dinanath Manohar ह्या पोस्टमध्ये मी पोस्ट टाकणाऱ्या आणि चर्चेत सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा उल्लेख केला आहे, ह्या व्यक्तीं ह्यात दोषी आहेत, असं विलकूल म्हणायच नाही. उलट प्रशांत जगताप ह्यांनी मूळ बातमीची लिंक दिली असा मी मुद्दामून उल्लेख केला. तरीही फेसबूकवर ह्या चर्चेत सहभागी झालेल्यापैकी कुणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.See Translation
Shyam Ranjankar याच सारखा एक प्रकार, सुभाषचंद्र बोस म्हणे , स्वातंत्रयवीर सावरकरांचा सल्ला घेण्यासाठी रत्नागीरीत ये त्यांच्या गुप्त बैठका होत, ते सावबकरांचे आशिर्वाद घेउन पुढील कार्यक्रम आखीत.. कुणी याचा उलगडा करुन सावरकांचं कर्तुत्व जास्त प्रकाशात आणेल काSee Translation
Dinanath Manohar SR- हे हिटलरबद्दल सांगितलं जातं. तो पाणबुडीतून कोकण किनाऱ्याला येऊन सावरकरांना भेटून गेला होता म्हणे..See Translation
Suresh Karale मंत्रालय - विधिमंडऴ वार्ताहर संघाच्या विद्वान अध्यक्षानी असाच पोष्ट whatsup वर टाकली होती. या गृहस्थाना हो ची मिन्ह हे नाव ही माहित नाही.See Translation
Vishnu Dhoble well done ,thanks.
Vidyadhar Date http://books.google.co.in/books?id=n-KUICFfA00C&pg=PA432.... this link gives an idea of how an intellectual is pilloried for simply questioning, not criticising Shivaji. the late ranade was my mama.
Vilas Salunkhe मोहन धारीया हे तत्वनीष्ट, समाजवादी विचासरणीचे नेते होते, ते असे काहीही बिनबुडाचे सांगतील हे पटण्यास जरा अवघड आहे. बेडेकर हे इतिहासाचा अभ्यास/संशोधन करताना सापडेल तो इतिहास सनातनी हिंदूत्ववाद्यांना कसा अनुकूलपद्धतीने पुढे आणता येईल याकडेच जास्त लक्ष देत असत, याच बेडेकरांनी शिवाजी महाराजांना दैवत्व बहाल करण्यासाठी शिवरायांचे अष्टभुजाधारी रुपातले चित्र तयार करवून घेतले होते.
Prakash Zaware Patil सर ! आपण दिलेला मोहन धारीयाजींच्या कर्तृत्वकालाचा आलेख अचूक. विएटनामचे युध्दपर्वात मराठी वृत्तपत्रांत जाणकारांचे लेख येत आणि भाषणेही होत. व्हिएटनामचे युध्द " शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढले जात आहे " असे उल्लेख होत. त्यावरुन असा " ढगात गोळीबार " सुरु होऊ शकतो. डॉ.विकास आमटे सर..इतिहासाचे वाचक किंवा श्रोते असू शकतात. परंतू तो त्यांचा अभ्यास विषय नाही. सबब सार्वत्रिक लोकभ्रमाचा सहज आधार घेतला असावा.
Vilas Salunkhe या थापेबाजीचा कळस म्हणजे हो चि मिन्ह हे रायगडावर येऊन शिवसमाधीच्या पाया पडले होते व त्यांनी समाधीजवळची माती एका संदुकीत भरुन नेली होती आणि मुख्य म्हणजे त्यांनी हे सर्व भारत सरकारला न कळवता गनीमी काव्याने रायगड दर्शन केले होते म्हणे.
Anil Mokal भावनेच्या आणि उत्साहाच्या भारत ,इतिहासाचा आधार नसलेली आणि अशी कालविसंगत विधाने केली जातात .इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाने अशी विधाने तपासून घेणे श्रेयस्कर . आता शिवाजी महाराज आणि कॉम्रेड हो ची मिन्ह हे दोघेही मोठे धोरणी आणि लढवय्ये नेते होते हे निःसंशय ..
21 hrsLike2
Arun Thakur नवा इतिहास पुन्हा घडवू!
9 hrsUnlike2
राजु चांदे नेपोलियन कॅस्ट्रो अशा अनेक लोकांच्या बाबतीत शिवरायांचं नाव घेऊन असल्या खोटारड्या स्टोऱ्या तयार केल्या जातात ,

ह्या असल्या स्टोर्यात कसलीही सत्यता नाही
9 hrsLike1
Vidyadhar Date this is an old fraud and has been exposed before.
2 hrsUnlike1
Dinanath Manohar बेडेकरांच्या पोस्टमध्ये एक व्हिएतनामच्या स्त्री अॅम्बॅसॅडरचीही कहाणी दिली होती. ही लाल किल्ल्याची भेट नाकारून रायगडावर आली होती, आणि महाराजांच्या समाधीजवळील ओंजळभर माती आपल्या पर्समध्ये घेतली अशी कथा होती. कुणीतरी व्हिएतनामच्या अॅॅम्बेसीकडे चौकशी केली आणि त्यांनी भारतात आमची कधीही स्त्री अॅम्बॅसॅडर नव्हती असं लेखी उत्तर दिले होते, ते ही फेबुवर आले होते.
1 hrEditedUnlike4
Mahendra Singh Sengar Mohan Dhariya himself was a fraud why no one saying this? Moreover he was in congress..
1 hrLike
Dinanath Manohar आणखी एक माहिती य़ेथे देणे अवाजवी होणार नाही. इसवीसन पूर्व ५व्या शतकात चीनमध्ये सन त्सू नावाच्या माणसाने आर्ट ऑफ वॉर नावाचे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकात मुख्यतः प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळून, शत्रुच्या तुलनेत परिस्थितीवर आपले नियंत्रण कसे ठेवायचे ह्याचे तंत्र वर्णन केले आहे. ह्या पुस्तकाची अनेक भाषात रूपांतरे झाली आहेत, आणि जगातील युद्धशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक अभ्यासायलाच हवे असे पुस्तक आहे. माओ आणि दुसऱ्या महायुद्धात स्टॅलीननेही ह्याचा उपयोग केला आहे. शिवाजी महाराजांचे हीच युद्धनिती होती, त्यांनी मोगलांशी सरळ सामना करण्याचे टाळले, तशी वेळ आल्यावर तह केला, पण औरंगजेबाला महाराष्ट्रात नियंत्रण अखेरपर्यन्त मिळवू दिले नाही. चीन आणि ह्विएचनाम ह्याचे ऐतिहासिक संबंध लक्षात घेता, हो चि मिन्ह ह्यांनी (जर त्यांना पुस्तकाची गरज वाटलीच असेल तर) ह्या ट्रीटीचा उपयोग केला असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र सन त्सू दोन हजार वर्षे आधी होऊन गेला, महाराज पाचशे वर्षापूर्वी मोगल सत्तेशी लढत होते, म्हणून ह्याचा अर्थ त्यांनी सन त्सू चे तंत्र आत्मसात केले आणि उपयोगात आणले असे हास्या्स्पद विधान कोणी करू शकेल का?
1 hrEditedLike
Madhav Gole This is not by mistake. It is deliberately done. To spread rumours the teqnic is mastered by R. S. S. There r many examples like Sheikh Abdulla was half brother of Pandit Nehru etc.
54 minsLike1
Sharad Ramchandra Gokhale <<श्री शिवाजी महाराज ह्यांची महानता, त्यांचे युद्धकौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना पुरेशा बोलक्या आहेत. असं असताना हे कॉ. हो ची मिन्ह सारख्या नेत्यांना वेठीस धरण्याची गरजच काय होती? >> शत-प्रतिशत सहमत !!
37 minsEditedLike2


No comments:

Post a Comment