Tuesday, March 24, 2020

तर ३० कोटी भारतीयांच्या जिवाला धोका पोचू शकतो? प्रा.हरी नरके


१. रुपये १५ हजार कोटीची कोरोना उपचार व प्रतिबंध यासाठीची तरतूद अपुरी तरिही स्वागतार्ह पाऊल.


२. मार्च २२ ला संध्याकाळी झुंडींनी रस्त्यांवर उतरून जो जल्लोश केला, कोरोनासंसर्गाद्वारे कोरोनाबाधीत वाढवले त्याबद्दल नाराजीही नाही, उलट शाबासकी याचा अर्थ यांनाही तेच हवे होते.

३. २१ दिवस देश दरवाजाच्या आत हे पाऊल उशीरा उचलले असले तरी आवश्यकच.

४. ज्यांचे हातावर पोट आहे अशा कोट्यावधींच्या जगण्याची तरतूद करण्यात सरकार अपयशी. त्यांचा साधा विचारसुद्धा आजच्या भाषणात नव्हता.

५. अन्यथा देश २१ वर्षे मागे जाईल याचा अर्थ कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्यास आजच्या १३७ कोटीवरून आपली लोकसंख्या थेट २००० सालच्या १०५ कोटीवर जाण्याची भिती. ही धोक्याची घंटा भयंकर आहे. तीस ते ३२ कोटी भारतीयांच्या जिवाला धोका होऊ शकतो ह्या भयावह कल्पनेने जिवाचा थरकाप उडतो.काळजी घ्यायलाच हवी.


६. गेली सहा वर्षे सतत महासत्तेची भाबडी स्वप्नं विकणारांची आज स्पष्ट कबुली, आरोग्यव्यवस्थेत आपण अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झरलंड, इटलीच्या खूप मागे. हे उशीर सुचलेले शहाणपण कायम ठेवा आणि आरोग्यव्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष केंद्रीत करा.

- प्रा.हरी नरके, २४ मार्च २०२०

No comments:

Post a Comment