Monday, April 3, 2017

त्याग

नदीला पूर आल्यानं नदीकाठची घरं पाण्यात बुडाली होती. सर्व रहिवाशांना शेजारच्या शाळेत हलवण्यात आलं होतं.
तीनचार मजली इमारतीत वरच्या मजल्यावर काही ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते.
शाळकरी मुलांचा एक ग्रुप पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पहाटेपासून राबत होता.
चौथ्या मजल्यावर अडकलेल्या आजींना मुलांनी खालून विचारलं, " आजी काही मदत हवी क?"
आजी म्हणाल्या, " अरे घरातलं दूध संपलय. त्यामुळं सकाळपासून चहा घेता आला नाही, दूध आणता का?"
मुलांनी स्वत:च्या पैशांनी दुधाच्या 2 पिशव्या विकत आणल्या.
आजींनी दोरीला बांधून एक कापडी पिशवी खाली सोडली. मुलांनी त्यात दुधाच्या पिशव्या टाकल्या. आजींनी त्या वर खेचून घेतल्या.
मुलं म्हणाली, " आजी, ठीकाय ना? आणखी काही लागलं तर सांगा."
आजी म्हणाल्या, " हात मेल्यांनो, हे कसलं दूध घेऊन आलात? चितळेचं का नाही आणलंत? मी चितळे सोडून दुसर्‍या दुधाला हातसुद्धा लावीत नाही! ठीकय आजचा दिवस चालवून घेते आता."

No comments:

Post a Comment