Monday, April 3, 2017

कुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ

केंद्रात ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय कशला? - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1. जो ओबीसी आयोग स्थापन करण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर, 1992 ला दिले आणि ज्याची स्वतंत्र कायद्याद्वारे स्थापना 1993 साली नरसिंहराव सरकारने केली तो आपणच स्थापन केल्याचा नरेंद्र मोदींचा दावा.
2. गुजरातमध्ये मोदींनी स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्वत:ची घांची [ आपल्याकडची तेली ] ही जात ओबीसीत घालायला लावली, हे तेल बनवणारे तेली नाहीत तर ते तेल विकणारे व्यापारी आहेत.
3. ज्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात "आयुष" नावाचे नवे मंत्रालय स्थापन केले तेच म्हणताहेत मंत्रालये आधीच जास्त आहेत, आता नविन कशाला?
4. ज्या परिवाराचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध होता त्यांचाच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला विरोध.
5. अनु.जाती, अनु.जमाती नंतर ज्या ओबीसी या तिसर्‍या घटकाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली त्यांच्यासाठी वेगळे मंत्रालय ही 1992 पासूनची मागणी आहे.
6. आपण ओबीसी आहोत याचे निवडणुकीत भांडवल करणारेच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला विरोध करतात! ही तर केवळ कळसुत्री बाहुली!

No comments:

Post a Comment