Monday, April 3, 2017

एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गवर्नर असताना त्याचा एक ब्रिटीश मित्र त्याला भेटायला गेला. संध्याकाळची वेळ होती.
मित्राची अपेक्षा होती की एल्फिन्सटन आपल्याला पेयपान देईल. पण तसं काही झालं नाही. एल्फिन्सटन लेखन करण्यात व्यस्त होता.
मित्रानं विचारलं, " एव्हढं काय लिहितोयस?"
"पाठयपुस्तकं लिहितोय, भारतीय मुलांसाठी." एल्फिन्स्टन म्हणाला.
मित्र नाराज झाला. "भारतीय लोक रानटी आहेत. त्यांना अजिबात शिकवू नये. तसं केल्यास ते जागृत होतील आणि स्वातंत्र्य मागतील. आपल्याला हा देश सोडून जावं लागेल."
एल्फिन्स्टन म्हणाला, " तुझं खरंय."
"अरे मग कशाला शिकवायचं आपण त्यांना? आहेत तसेच अज्ञानी आणि गुलामीत राहू देत सडत."
एल्फिन्स्टन म्हणाला, "मित्रा, स्वातंत्र्य हे असं मूल्य आहे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस स्वातंत्र्य मागणारच. फरक एव्हढाच आहे की शिकला तर माणूस लवकर स्वातंत्र्य मागेल. अर्थात नाही शिकला तरी एक ना एक दिवस उशीरा का होईना पण माणूस स्वातंत्र्य मागणारच."
एल्फिन्स्टन पुढं म्हणाला, "आपण भारतीयांना शिकवतोय त्यात आपलाच फायदा आहे. माणसं अडाणी असतील तर त्यांच्यावर जास्त काळ राज्य करता येईल, पण जेव्हा ती उठाव करतील तेव्हा ती तुझ्यामाझ्या वंशजांना तलवारीनं कापून काढतील आणि आपण त्यांना शिकवलं तर ते जा म्हणून नक्कीच सांगतील पण ते तोंडानं आपल्या वंशजांना चले जाव म्हणून सांगतील."
.................

No comments:

Post a Comment