Thursday, October 22, 2020

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-



सुप्रसिद्ध लेखक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आय.ए.एस. अधिकारी (निवृत्त) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-

हरी नरके जी, ही मालिका मी पूर्ण एकही भाग न चुकवता पाहिली.. कारण ती जवळपास परिपूर्ण- near perfect होती. बाबासाहेबांचे वैयक्तिक जीवन खूपच भावस्पर्शी पद्धतीने दाखवले, पण मला महत्वाचे वाटले ते या मालिकेने डॉ आंबेडकरांचे वैचारिक व्यक्तीमत्व, सामाजिक, राजकीय व संसदीय कार्य, त्यांचा संघर्ष आणि अखंड अभ्यास हे पैलू फारच सामर्थ्याने दाखवले आहेत. मुख्य म्हणजे या अलौकिक महापुरुषांची मालिका कुठेही प्रचारकी होत नाही,तरिही रंजक राहते .बाबाबासाहेबांचे व रमाई चे काम सागर देशमुख व शिवानी रांगोळे यांनी जणू परकाय प्रवेश करून काम केले व त्यांना पडद्यावर जिवंत केले. त्यांच्यापर्यंत माझे अभिनंदन कळवा. तुम्ही मालिकेचे संशोधक- सल्लागार असल्यामुळे कोणतीही ऐतिहासिक चूक हुडकली तरी सापडणार नाही, हे फार मोठे अवघड काम हरी जी तुम्ही समर्थपणे पार पाडले,त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

आता मालिका संपली, काय नवीन एवढेच सुंदर पहायचे हा प्रश्न आहे. आणि या प्रशनातच मालिकेचे यश दडलेले आहे!

- Laxmikant Deshmukh लक्ष्मीकांत देशामुख

No comments:

Post a Comment