Sunday, October 25, 2020

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी

संगिता नरके-

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी- लक्ष्मण गायकवाड

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि भटक्याविमुक्तांचे ख्यातनाम नेते लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या "




उचल्यानंतर" या आत्मकथनात रेणके आयोगाचे वाभाडे काढलेले आहेत. " या आयोगाचा अहवाल चेयरमन बाळकृष्ण रेणके यांनी मुद्दामहून उशीरा दिल्याने व तो घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने केंद्र सरकारने तो कचर्‍याच्या डब्यात टाकल्याचा " घणाघाती आरोप त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. या खळबळजनक पुस्तकात गायकवाड पुढे म्हणतात, " गुळाला मुंगळे चिकटावेत तसे रेणके अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून राहिले आणि त्यांनी वेळोवेळी फक्त आपला कार्यकाल तेव्हढा वाढवून घेतला. त्यांच्याकडे शासनाने सोपवलेले काम न करता रेणके लाल दिव्याच्या गाडीतून सहली करीत फिरत राहिले. आपणच या आयोगाचे मालक आहोत अशा हटवादी भुमिकेतून रेणकेंनी समाजाची फसवणूक केली. रेणके प्रतिष्ठीत जातीचे असल्याने त्यांना विमुक्तभटक्यांचे प्रश्नच कळले नाहीत. दुराग्रही रेणके आपल्या व्हीआयपीच्या लाल दिव्याच्या गाडीत मजा करीत राहिले आणि त्यांनी मसणजोगी, नंदीबैलवाले अशा वंचितांची फसवणूक केली. आयोगाच्या अध्यक्षपदी रेणकेंऎवजी दुसरी कुणीही व्यक्ती असती तर विमुक्तभटक्यांची अशी फसवणूक झालीच नसती. पंतप्रधान मनमोहन सिंग विमुक्त भटक्यांचे कल्याण करू इच्छित होते, परंतू उशीरा आलेला रेणके अहवाल घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने तेही नाराज झाले. आधीच अनुसुचित जाती व अनु. जमातीचे आरक्षण असलेल्यांना तिथून बाहेर काढा ही रेणकेंची शिफारस देशभर फेटाळली गेली. यापुढे रेणकेंनी चळवळीतून निवृत्ती घ्यावी आणि विमुक्त भटक्यांच्या चळवळीपासून दूर राहावे" असा सल्लाही गायकवाड यांनी रेणकेंना दिलेला आहे. गायकवाड यांच्या या टिकेचे स्वागत केले जात असून या भुमिकेला विमुक्तभटक्यांचा फार मोठा पाठींबा मिळत आहे. या पुस्तकाद्वारे रेणकेंच्या आजवरच्या वाटचालीचा बुरखा फाडण्याचे धाडस गायकवाड यांनी केल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. या टिकेबद्द्ल आजवर मौन धारण केलेल्या रेणकेंच्या प्रत्युत्तराकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 

-  संगिता नरके

पाहा - ( उचल्यानंतर, लक्ष्मण गायकवाड, ( पृष्ठे २७ ते ३० ) संधीकाल प्रकाशन, भाईंदर, ( पुर्व )  ४०१ ११५, प्रथमावृत्ती -आक्टोबर २०२०, पृष्ठे १९२, किंमत रूपये २५०/- )

..................................

पुस्तकासाठी संपर्क- फोन- ९८२०५ ९५२८२, 

लक्ष्मण गायकवाड यांच फोन-९८७०४ ५२४१०


No comments:

Post a Comment