Saturday, May 2, 2020

जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात, रा.स्व.संघ 19

















संघाच्या लबाड्या-४, जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात- प्रा.हरी नरके

मिरज दंगल घडवल्याचे, जोधा अकबर चित्रपटाला सांगलीत हिंसक विरोध केल्याचे आणि भीमा कोरेगाव दंगलीचे सुत्रधार असल्याचे खटले ज्यांच्यावर चालू आहेत ते आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे. रा.स्व.संघाचे १९८० पर्यंत निष्ठावंत स्वयंसेवक असलेले हे भिडे १९८४ पासून श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, ही संस्था चालवतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे वयाने ९० च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर असत्यकथन, सत्यापलाप आणि नागरिकांच्या भावना भडकावणारी वक्तव्ये केल्याचे अनेक गुन्हे आहेत.


सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे ते म्हणतात, आंबे खाल्ले की मुलं होतात. त्यांची आय.बी.एन.लोकमतवर बेधडक या कार्यक्रमात उदय निरगुडकर यांनी १ तासाची मुलाखत घेतली. ती सर्वांनी बघितली. त्यात ते जाहीरपणे म्हणाले, " बाबासाहेब मनुला मानणारे होते. मनुस्मृती वाचूनच आपण भारताची राज्यघटना लिहिली असे ते म्हणत. मनु हा महान कायदेतज्ञ होता असे त्यांनी लिहिले आहे. राजस्थानच्या विधान भवनात मनुचा पुतळा बाबासाहेबांच्या हस्ते बसवण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मनुचा गौरव केला. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते." या मुलाखतीत आणखी बरीच वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केली पण त्यावर नंतर कधीतरी बोलू. आज बाबासाहेब आणि मनुगौरव ्याची झाडाझडती घेऊ.


भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती १-  राजस्थानमध्ये मनुचा पुतळा उच्च न्यायालयाच्या प्रांगणात आहे. विधानभवनात नाही.

भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती २-  हा पुतळा २८ जुलै १९८९ ला बसवण्यात आला. त्याच्या ३३ वर्षे आधी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालेले होते. तर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद या घटनेच्या २६ वर्षे आधी म्हणजे २८ फेब्रुवारी १९६३ ला वारलेले होते. ३३/२६ वर्षे आधी निधन पावलेल्या महापुरूषांना हे भिडे मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजर करतात. हे भिडे इतकं धडधडीत खोटं बोलतात आणि त्याबद्दल त्यांना खंत, खेद वाटत नाही, त्याबद्दल ते माफी मागत नाहीत, उलट मुलाखतकार, आयबीएन लोकमत वाहिनीचे संपादक निरगुडकर नंतर गुपचुप या मुलाखतीतला भिडेंचा खोटेपणाचा पुरावा असणारा भाग गाळून ही मुलाखत यु ट्युबवर ठेवतात. गैरसोयीचे असलेले, लबाडी आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे पुरावे नष्ट करण्याची हिंदुत्ववाद्यांची ही सवय प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती आजही कायमच आहे.


पत्रकार, लेखक, इतिहासकार हा समाजाच्या स्मरणशक्तीचा रखवालदार असतो. हे लोक रखवालदार आहेत की मारेकरी यावर वेगळं बोलायची गरज आहे काय? ही मुलाखत ऎकल्यावर मी स्वत: निरगुडकरांशी बोललो होतो. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली असताना भिडे बाबासाहेबांना मनुचे समर्थक ठरवत असताना तुम्ही त्यांना महाडचा मनुस्मृतीदहनाचा प्रश्न का विचारला नाही असे मी त्यांना विचारले. ते मला म्हणाले, " भिडे आमच्याकडे आले होते ते याच अटीवर की एकही अडचणीचा प्रश्न विचारायचा नाही, प्रतिप्रश्न केला तर मी उठून जाईन, म्हणून मी गप्प बसलो." 


मी त्यांना जयपुरचा पुतळा बाबासाहेब गेल्यानंतर ३३ वर्षांनी बसल्याचे सांगितल्यावर त्यांनी माझा तसा बाईट घेतला. तो त्यांच्या वाहिनीवर दाखवलाही. जयपुरला आयबीएनची टिम पाठवून पुतळ्याचे फुटेज आणले, तेही दाखवले. पण लोक हे सगळे विसरल्यावर भिडेंचा खोटेपणा सांगणारा मुलाखतीतला भाग वगळून टाकला.


हे लिहून उपयोग काय असे काहीजण मला विचारतात. उपयोग हा की लिहून हे पुरावे जपले पाहिजेत नाहीतर हे लोक दिवसाढवळ्या पुरावे नष्ट करतात आणि इतिहासाचे विकृतीकरण / ब्राह्मणीकरण करतात.

३. भिंड्यांचा मी ताबडतोब समाचार घेतला होता.
" भिडेंचं विधान बिनबुडाचं - हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं."


https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html


४. म्हणे बाबासाहेब मनुचे समर्थक होते. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस मनुचे वाभाडॆ काढणार्‍या, मनुस्मृती जाळणार्‍या, राज्यघटनेच्या १३ कलमाद्वारे मनुस्मृती नाकारणार्‍या बाबासाहेबांना मनुवादी म्हणूच शकत नाही. भिडे मात्र म्हणतात. किळसवाणा आणि त्यांच्या वयाला, नेतृत्वाला, संस्कारांना न शोभणारा भाग म्हणजे मनुस्मृती वाचून मी राज्यघटना लिहिली असे बाबासाहेब म्हणायचे असे भिडे सांगतात. मनुस्मृती जाळून मी राज्यघटना लिहिली असे म्हणणारे बाबासाहेब चक्क उलटे करून, विकृत करून भिडे सांगतात, हे सत्यवचन आहे? ही देशभक्ती आहे? हे भिडेंच्या देश, धर्म, देवाला चालते? की हाच त्यांचा धर्म आहे? हीच त्यांची संस्कृती आहे का?

 बुद्ध कुचकामाचा म्हणे!-

५. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले, तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांना मानता का?" यावर होय असे भिडे म्हणाले नाहीत. विषयांतर करून भलतेच बोलत राहिले. यावरून काय ते सिद्धच होते. परदेशात बोलताना मोदींनी बुद्धाचा देश असा उल्लेख केल्याची बातमी आल्यावर भिड्यांनी जाहीरपणे मुलाखत देऊन सांगितले, " बुद्ध काही कामाचा नाही. मोदी चुकीचे बोलले." एकाबाजूला ते मोदींच्या महाआरत्या ओवाळत होते. पुण्यात्मा काय, संत काय, धर्मराजा काय, निष्कलंक काय आणि ऋषीमुनी काय! एकही विशेषण त्यांनी शिल्लक म्हणून ठेवले नाही. इतकी किळसवाणी भाटगिरी! जग भारताला बुद्धाचा देश म्हणूनच ओळखते भिडेमहाशय! तुम्ही कितीही द्वेश करा बुद्धाचा, कितीही आकस बाळगा, कितीही तिरस्कार करा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. हा देश बुद्धाचा होता, आहे, राहिल!

दंगली घडवणं हीच यांची महान देशभक्ती-
६. हिंदुत्ववाद्यांना जागतिक पातळीवरचा सोडा, अ.भा. पातळीवरचाही विचारवंत, प्रज्ञावंत, दार्शनिक घडविता आलेला नाही. म्हणतात ना, वासरात लंगडी गाय शहाणी, तशा अर्धशिक्षित तरूण, बेरोजगार आणि संमोहित बहुजन मुलांची डोकी भडकाऊन त्यांना दंगली करायला लावणं हीच यांची महान देशभक्ती. हिंदुत्वाच्या तयार केलेल्या बाजारगप्पा, बुटक्या लोकांची स्तोत्रं, बकवास त्यागाच्या विक्रमवेताळ कहाण्या आणि परधर्मद्वेश यांच्या जोरावर यांची दुकानं चालतात. विधायक, निरामय, निकोप आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारं एकही काम यांच्या खात्यावर आजवर जमा नाही!

स्वातंत्र्याच्या चळवळीत हे नुस्तेच गैरहजर नव्हते, तर यांचे बापाजादे त्यावेळी ब्रिटीशांच्या पोटार्थी चाकर्‍या करीत होते. जनरल डायरच्या सोबत निष्पाप भारतीयांवर गोळीबार करायला आघाडीवर होते.रावसाहेब, रावबहादूर असल्या पदव्या मिळवण्यासाठी ब्रिटीशांचे बूट चाटत होते. ते आता आम्हाला देशभक्ती शिकवताहेत! देश म्हणजे काल्पनिक देवीचा फोटो नसतो. हाडामासाची माणसं म्हण्जे देश असतो. यांची देश, देव आणि धर्माची भाषा म्हणजे निव्वळ पोपटपंची. बासुंदीकथा. मनाचे श्लोक. आंबाभुर्जी. स्त्रिया, बहुजन आणि कष्टकर्‍यांना उपाशी ठेऊन दक्षिणेत मिळवलेली.

https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1xwd0NiWLH3HilVmmEWcY7kyAdb6DIOAVZ31TTZj69mXHwkO0M3OB8q5E

-प्रा. हरी नरके, ०३/०५/२०२०

संदर्भासाठी पाहा:

१. https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/saransh/dr-br-ambedkar-many-and-sambhaji-bhide/
बाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे!, July 17, 2018, विजय चोरमारे in सारांश | राजकारण, history
..............................................................

२. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
लोकसत्ता ऑनलाइन | July 17, 2018 06:55 am
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
विशिष्ट आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता,अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधानं करुन सतत चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.

या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. याशिवाय, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावरही संभाजी भिडे गुरूजी ठाम राहिले, गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असंही ते म्हणाले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/
....................................


३. भिडेंचं विधान बिनबुडाचं -हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं.
https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html
...................................................
४. https://www.sarkarnama.in/dr-babasaheb-ambedkar-never-praised-manu-hari-narke-critisizes-bhide-guruji-26176
..................................................
५. News18 Lokmat
Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar On Bhima Koregaon violence आय बी एन लोकमत
https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60  Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar
..................................................................................

६. https://www.bbc.com/hindi/india-48720079
'मोदी के गुरु' संभाजी भिड़े के नासा विज्ञानी होने का सच
फ़ैक्ट चेक टीम, बीबीसी न्यूज़ 22 जून 2019

दावाः संभाजी भिड़े नासा की सलाहकार समिति में काम करते थे और उन्हें विज्ञान के क्षेत्र में 100 से ज़्यादा सम्मान मिल चुके हैं. संभाजी भिड़े एटॉमिक फिजिक्स में गोल्ड मेडलिस्ट हैं.

इतना ही नहीं, उनके बारे में यह भी कहा जा रहा है कि वो नासा की सलाहकार समिति में काम करते थे, 67 डॉक्टरेट और पोस्ट डॉक्टरेट रिसर्च में गाइड रहे थे, अब महाराष्ट्र में समाज सेवा कर रहे हैं और उनके 10 लाख से भी ज़्यादा फॉलोअर्स हैं.

फ़ैक्ट चेक:बीबीसी ने सोशल मीडिया पर फैलाई जा रही इस ख़बर की पड़ताल की. संभाजी भिड़े के संगठन के प्रवक्ता नितिन चौगुले ने इन दावों को ग़लत बताया है. पुणे यूनिवर्सिटी ने भी उनसे संबद्ध एक कॉलेज में भिड़े के प्रोफ़ेसर या स्टूडेंट होने की जानकारी न होने की बात कही

..............................................
7. https://www.youtube.com/watch?v=85g4AlFOLIo

#SambhajiBhide #GujaratiNews #TV9News
Buddha is of no use to the world: Sambhaji Bhide sparks yet another controversy| TV9News

https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60

.................................................

8. http://thewirehindi.com/60305/rajasthan-high-court-statue-of-manu/
मनु की प्रतिमा को हाईकोर्ट परिसर से हटाने की याचिकाएं वर्ष 1989 से लंबित हैं, जिन पर 2015 के बाद से सुनवाई नहीं हुई है. सोमवार को औरंगाबाद की दो महिलाओं के प्रतिमा पर कालिख पोतने के बाद मामला फिर गर्मा गया है.

इस घटना के बाद पिछले 29 साल से चल रहा विवाद फिर से ताज़ा हो गया है. गौरतलब है कि राजस्थान हाईकोर्ट में मनु की प्रतिमा की स्थापना 28 जुलाई, 1989 को हुई थी. इसे राजस्थान उच्च न्यायिक सेवा एसोसिएशन ने लॉयन्स क्लब के आर्थिक सहयोग से लगवाया था.

उस समय इसका खूब विरोध हुआ. हाईकोर्ट ने एक प्रशासनिक निर्णय के तहत इसे न्यायालय परिसर से हटाने का निर्देश भी दिया, लेकिन विश्व हिंदू परिषद के नेता आचार्य धर्मेंद्र ने इस फैसले को चुनौती देते हुए याचिका दायर कर दी.

इस पर सुनवाई करते हुए हाईकोर्ट के तत्कालीन न्यायाधीश महेंद्र भूषण ने प्रतिमा हटाने पर अंतरिम रोक लगा दी. उन्होंने मामले को वृहद पीठ को भेजते हुआ कहा कि अंतिम फैसला आने तक प्रतिमा हटाने पर लगी रोक बरक़रार रहेगी.

हैरत की बात है कि वृहद पीठ ने इस मामले का निपटारा करने की बजाय इसे ठंडे बस्ते में डाल दिया. इस दौरान प्रतिमा के पक्ष और विपक्ष में कई याचिकाएं ज़रूर दायर हुईं.

2015 में तत्कालीन मुख्य न्यायाधीश सुनील अंबवानी ने पहली बार इस मामले में रुचि ली. उनकी अगुवाई में वृहद पीठ ने 13 अगस्त, 2015 को मामले की सुनवाई की, जो इतनी हंगामेदार रही कि इसके बाद आज तक इस पर जिरह नहीं हो पाई है.

हुआ यूं कि प्रतिमा के विरोध में याचिका दायर करने वाले पीएल मीमरोठ की ओर से अधिवक्ता अजय कुमार जैन ने जैसे ही हाईकोर्ट परिसर में मनु की प्रतिमा पर सवालिया निशान लगाना शुरू किया, बड़ी संख्या में वकीलों ने उनकी मुखालफत शुरू कर दी. इनमें से कई जोर-जोर से चिल्लाने लगे.

न्यायाधीश सुनील अंबवानी ने वकीलों को शांत करने के काफी प्रयास किए, लेकिन उन्हें इसमें कामयाबी नहीं मिली. अंत में वे उठकर चले गए. इस दिन के बाद इस मामले में आज तक सुनवाई नहीं हुई है. हाईकोर्ट के वरिष्ठ वकीलों की मानें तो यह मामला मधुमक्खी के छत्ते जैसा है, जिसमें शायद ही कोई न्यायाधीश हाथ डाले.

याचिकाकर्ता पीएल मीमरोठ कोर्ट के इस रवैये से परेशान हैं. वे कहते हैं, ‘न्याय में देरी एक तरह से अन्याय होता है. इस मामले को कोर्ट में चलते हुए 29 साल हो गए हैं. कोर्ट न्याय करने की बजाय कहता है कि जब इस विषय पर किसी प्रकार का जनाक्रोश नहीं परिलक्षित होता है तो बेवजह गड़े मुर्दे क्यों उखाड़े जा रहे हैं.’






......................

No comments:

Post a Comment