Thursday, May 7, 2020

गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके








गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके

१* १९०८ जाने. - भीमरावांचा मॅट्रीक परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार झाला. त्यावेळी कृ. अ. केळुसकर [ कुणबी ] लिखित बुद्ध चरित्र भीमरावांना भेट मिळाले.
हे पुस्तक वाचून आपण बुद्धाकडे वळलो. प्रेरित आणि प्रभावित झालो असे बाबासाहेब " बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या प्रस्तावनेत म्हणतात. " I read this book with great interest and was greatly impressed and mooved by it.
२* २७ मे १९२४ बार्शी- नामांतर की धर्मांतर या विषयावर बाबासाहेबांचे भाषण.
३* १३ सप्टें. १९३३- बाबासाहेब लंडनवरून सुभेदार विश्राम गंगाराम सुभेदार यांना पत्र लिहितात. त्यात ते म्हणतात, " माझा कल बुद्धधर्माकडे आहे."
४* १९३४, दादर, मुंबई, बाबासाहेबांनी बांधलेल्या बंगल्याला राजगृह हे बौद्ध नाव दिले.
५* १३ ऑक्टोबर १९३५ - येवला परिषद. बाबासाहेबांची घोषणा, " मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही."


६* १२/१३ जाने. १९३६- पुणे, अहिल्याश्रम- धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
७* ३०, ३१ मे व १जून जाने. १९३६- मुंबई, दादर, धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
८* २४ सप्टें. १९४४ - मद्रास येथे रॅशनॅलिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या सभेत ब्रिटीश सरकारमधील केंद्रीय मंत्री म्हणून बोलताना ते म्हणाले, "बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म " यात बुद्धीवादी बौद्ध धर्मच श्रेष्ठ आहे."
९* ८ जुलै १९४५, मुंबई, पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिला " प्रज्ञा, शील, करूणा " हे ब्रिदवाक्य दिले.

१०* २० जून १९४६-  सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून बुद्ध भवन व आनंदभवन अशी सभागृहाची नामकरणे केली.
११* २ मे १९५०- दिल्लीतील बुद्ध जयंती समारंभामध्ये बाबासाहेबांचे भाषण, " बुद्धधर्म हा नीतिधर्म आहे."
१२* ५ मे १९५० मुंबई, जनता पत्राला मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले, "आपण बौद्ध धर्म स्विकारणार आहोत."

१३* २६ मे १९५० - कॅण्डी, येथे पत्रकार परिषदेत आपण बौद्ध समारंभ व विधींचा अभ्यास करण्यासाठी येथे आल्याचा उल्लेख केला. जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बाबासाहेबांचे भाषण.
१४* मे १९५०- महाबोधी सोसायटीच्या बुद्ध जयंती विशेषांकात बाबासाहेबांनी लेख लिहून बुद्ध धम्माचे भवितव्य उज्वल असल्याचे नमूद केले.
१५* ६ जून १९५०, कोलंबो, श्रीलंका, जागतिक प्रतिनिधींसमोर बाबासाहेबांचे " भारतातील बुद्ध धम्माचा उदय आणि र्‍हास" यावर भाषण

१६* जुलै १९५१, बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध संघाची स्थापना केली. " बौद्ध उपासना पाठ" ही पुस्तिका प्रकाशित केली.
१७* नोव्हेंबर १९५१, "बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या लेखनाला प्रारंभ केला. फेब्रुवारी १९५६ ला पुर्ण करून त्याच्या ८० प्रती विद्वानांना अभिप्रायार्थ पाठवल्या.

१८* १६ मे १९५४, बाबासाहेब रंगून, ब्रह्मदेशातील बुद्ध जयंती समारंभाला उपस्थित.
१९* २८ ऑक्टोबर १९५४ - मुंबई पुरंदरे स्टेडीयम, जाहीर सभेत बाबासाहेब म्हणाले, "बुद्ध, कबीर व महात्मा फुले हे आपले तीन गुरू आहेत."

२०* १९५४, बाबासाहेबांनी "दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीया" ची स्थापना केली. ४ मे १९५५ ला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

२१* २५ डिसेंबर १९५४, देहूरोड, बुद्ध मुर्तीची बाबासाहेबांच्या हस्ते विहारात स्थापना.
२२* १९५५, जनता पेपरचे " प्रबुद्ध भारत" असे नामकरण केले.

२३* १४ ऑक्टोबर १९५६, नागपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला. लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
२४* २० नोव्हेंबर १९५६, नेपाळ, काठमांडूला बाबासाहेबांचे जागतिक बौध्द परिषदेत भाषण.
२५* २५ नोव्हेंबर १९५६, सारनाथ, जिथे भगवान बुद्धांनी धम्म चक्र परिवर्तन सुत्त कथन केले तिथे बसून बाबासाहेबांचे आयुष्यातील शेवटचे भाषण, "चलो बुद्ध की ओर" ची जगाला हाक दिली.

-प्रा. हरी नरके, बौद्ध पौर्णिमा, ०७/०५/२०२०
.................................................

No comments:

Post a Comment