Tuesday, March 28, 2017

हम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 2 :-
हम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा ---
भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की," The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India."
माझ्या माहितीप्रमाणे गोव्यात पोर्तुगिज सरकारने असा uniform civil code केलेला आहे आणि तो तिथल्या मुस्लीमांनी मान्य केलाय. इंग्रज सरकारने 1939 साली शरियत कायद्यात बदल केलेले चालतात पण भारत सरकारने केलेले चालत नाहीत हे मला तरी अनाकलनीय आहे. माझ्या माहितीप्रमाणे खुद्द इस्लामिक देशांमध्येही तोंडाने तीन वेळा तलाक म्हटले की झाला घट:स्फोट ही जुबानी तलाक पद्धत नाही. भारतात मात्र ती आजही आहे. याच्या विरोधासाठी मुस्लीम स्त्रियांनी उभे राहायला हवे.
मुस्लीमांमध्ये एकाचवेळी चार बायका करण्याची असलेली पद्धत ही सुद्धा मुस्लीम स्त्रियांवर अन्याय करणारीच आहे.
हिंदू पुरूष मात्र जणू काही त्यामुळे हिंदू पुरूषांवरच अन्याय होतो अशा पद्धतीने बोलतात, "त्यांना चारचार बायका करायची परवानगी आणि आम्हाला मात्र..." ही तक्रार चुकीचीच आहे.
मुस्लीमांमध्ये केरळ राज्यात शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या चांगल्या सोयी असल्यानं तिथले मुस्लीम कुटुंब नियोजनात खुप पुढे आहेत. मात्र अन्यत्र मुस्लीम समाज गरीबी, निरक्षरता, अनारोग्य आणि बेरोजगारी यांनी पिडलेला असल्यानं आणि जन्माला येणारं प्रत्येक मुल हे कमावणारे हात असल्यानं मुस्लीम समाजात कुटुंब नियोजन कमी होते. परिणामी मुस्लीमांची लोकसंख्या इतर समाजांच्या तुलनेने वाढते हे खरेय. 2001 आणि 2011 या जनगणनांमध्ये हिंदूंचे जन्म दर वाढीचे प्रमाण 16.8% आहे तर मुस्लीमांचा याचकाळात तो 24.6% आहे. मुस्लीमांनीही कुटुंब नियोजन करायला हवे हे मान्यच आहे.
मात्र ते चार बायका करतात आणि म्हणून "हम दो हमारे दो" तर ते "म्हणजे हम पांच हमारे पच्चीस" अशाप्रकारे भरमसाठ [पाचपट वाढतात ] लोकसंख्या वाढते असे जे अवाजवी चित्र रंगवले जाते ते मात्र खरे नाही.
मी चार शादीया करण्याचा समर्थक नाही. मात्र चार लग्नांमुळे मुस्लीमांची लोकसंख्या वाढत नाही तर ती गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी आणि कुटुंब नियोजनाबाबतची योग्य ती जागृती नसणं यातून वाढते हे समजून घेतलं पाहिजे.
लोकसंख्या शिक्षणाचा हा मुद्दा आपण जरा नीट समजाऊन घेऊया.
हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजात 1000 पुरूषांमागे 922 स्त्रिया आहेत. समजा त्या 1000 आहेत असे गृहीत धरूया.
एक हजार स्त्रियांनी एक हजार पुरूषांशी विवाह केले आणि त्यांना प्रत्येकीला पाच मुलं झाली असं समजलं तर लोकसंख्या पाच हजारानं वाढणार.
आता असं समजा की प्रत्येक मुस्लीम पुरूषानं चार बायका केल्या तर 250 च पुरूषांची लग्नं होणार. त्या मुस्लीम पुरूषाला प्रत्येक बायकोपासून पाच मुलं झाली तर त्याला वीस मुलं होतील. परंतु प्रत्यक्षात 250 च पुरूषांची लग्नं झालेली असल्यानं 20* 250= 5000 एव्हढीच लोकसंख्या वाढणार आहे.
काही मुस्लीम पुरूष एकापेक्षा जास्त बायका करतात हे खरं असलं तरी सरसकट सगळे मुस्लीम पुरूष चार बायका करतात हे खरं नाही. तेव्हढ्या स्त्रियाच नसल्यानं ते शक्यही नाही. मात्र तरीही एक पुरूष : एक स्त्री हेच सुत्र न्यायाचं आहे यात शंका नाही.
क्रमश:---

No comments:

Post a Comment