Friday, May 20, 2011

ईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे

मित्रांनो, आज आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. त्यांचा डोक्याला सतत ताप होतो. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी,वाढती लोकसंख्या........यादी फ़ार मोठी आहे.आजचा वर्तमान हा उद्याचा ईतिहास आसतो. या सगळ्या प्रश्नांपासून सुटका करून घेण्याचा अतिशय सोप्पा मार्ग हवाय का? चला आपण ईतिहासात घुसू या. कायम त्यातच बुडून जाउ या. ईतिहासात जेवण, ईतिहासात झोप,ईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे, ईतिहासातून बाहेर यायची गरजच काय? मार्क्स म्हणाला होता .. धर्म ही आफ़ूची गोळी आहे. त्याला ईतिहास तर म्हणायाचे नव्हते ना? चला आपण याचे पेटंट घेवू या.महाराष्ट्राला कोणी स्पर्धकच आसू शकत नाही.जय महाराष्ट्र...जय ईतिहास..जय शिवराय..जय............?

निषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा!


(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.)
वाचा आणि क्रुतीशील निषेध करा.

ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श्री. पुरुषोत्त्म खेडेकरांचे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे नावाचं पुस्तक नुकतचं वाचण्यात आलं. त्यात त्यानी ब्रह्मणांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन केलेले लिखान वाचुन मी अवाक झालो. ही लोकं आंबेडकर चळवळीच्या नावाखाली जे काही  लिखान करीत आहेत त्यामुळे लवकरच आंबेडकर चळवळ आपला दर्जा गमावुन बसेल ही काळ्य़ा दगडावरची रेष आहे.  संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघनी आपल्या आंबेडकर चळवळीत घुसखोरी तर केलीच पण आपल्या पवित्र चळवळीत शिरुन जो अश्लिल व अश्लाघ्य प्रकार चालविला आहे ते बघता मराठ्यांची(ब्रिगेडी) मानसिकता किती खालच्या पातळीची आहे हे लक्षात येईलच. आंबेडकर चळवळ नेहमी ब्राह्मणांशी वैचारिक पातळीवर विरोध करीत आली आहे. हक्कासाठी लढत आलेली आहे, समानतेचा अधिकार मागण्यासाठी आजवर झटत आलेली आहे. हे सगळं करताना पदोपदी तेजोभंग केल्या गेला, अत्यंत अमाणुषतेनी वागविले गेले तरी आंबेडकरी जनतेनी संयमानी व शालीनतेनी ही चळ्वळ आजवर पुढे आणली. पण जेंव्हा पासुन ब्रिगेड नावाची टपोरी संघटना आंबेडकरी चळवळीत शिरली तेंव्हापासुन आंबेडकरी चळवळीची शालीनता ढासळते आहे. ब्रिगेडनी जाणीवपुर्वक या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम चालविल्याचे दिसते. त्यानी थेट ब्राह्मण स्त्रियाना अश्लिल भाषेत अगदी खालच्या पातळीवर जाऊन जे काही लिखान चालविले आहे व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविले आहे ते बघता अशा नालायक मराठ्यानी आंबेडकर चळवळीला मलिन करण्याचे रचलेले षडयंत्र आजच ओळखुन यांना लाथा घालून आंबेडकर चळवळीतुन हाकलुन दिले पाहिजे.
ज्या बाबासाहेबानी सदैव संयमानी व मनाचा तोल ढासळु न देता वैचारीक उठाव करुन मनुवादाची तटबंदी फोडुन काढली अशा महामानवाचे नाव घेऊन ब्रिगेडनी आंबेडकरी चळवळीला अश्लिलतेची भाषा देऊन बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलेले दिसते.
पुरुषोत्तम खेडेकरानी त्यांच्या वर उल्लेखीत पुस्तकात काय लिहले आहे त्याची पान मी ईथे टाकलेली आहे ते वाचा.
***********************************************
 ते पुढे लिहतात "सगळे ब्राह्मण पुरुष हे नपुसक असतात, त्यांच्या बायका मात्र टंच असतात. ब्राह्मण पुरुष बायकांची शारिरीक गरज पुर्ण करु शकत नाही म्हणुन त्यांच्या बायका मराठा पुरुषांकडुन आपल्या शरीराची तहान भागवुन घेतात. अनेक ब्राह्मण घरात एकच मराठा-बहुजन पुरुष सासु-सुन-मुलगी अशा तीन पिढ्यातील स्त्रीयांचे लैंगिक समाधान करण्यात गुंतलेले असतात.  परिणामत: ब्राह्मण पुरुष रिकामेच  असतात. त्याना उघड्या डोळ्यानी आपली तरूण सुंदर बायको आपल्याच साक्षिने परपुरुषाच्या बाहुपाशात लैंगिक सुखाचा आनंद उपभोगता असल्याचे पहावे लागे. त्यातल्या त्यात चित्पावन ब्राह्मण पुरुष स्वत:ची आई, बायको, बहिण, मुलगी ह्या सर्वच स्त्रीयाना बजारातील वस्तू म्हणूनच पाहतो. त्यामुळे त्यांचा व्यापार करण्यात ते आजहि पुढे आहेत. ब्राह्मण पुरुष सहजतेने स्वत:ची बायको परपुरुषाच्या बाहुपाशात देतो."

************************************************

या पुढे जाऊन ते लिहतात, "ब्राह्मण स्त्रिया प्रजोत्पादनापेक्षा शारीरिक लैंगिक गरजेला जास्त महत्व देतात. तसेच सर्व ब्राह्मण स्त्रियांना कृतुकालात पुरुषसंबंध ठेवणे अवघड असते. याच मानसिक विकृतीतून ब्राह्मण पुरुष सतत दारु पिऊन नशेत असतात. बहुजन भांडवलदार चित्पावन स्त्रियांवर पैसे उधळतात. ब्राह्मण पुरुष मुळात थंड रक्ताचे असतात व नपुसक असतात. याउलट स्त्रीया अत्यंत कामुक व मदमस्त असतात." अशा प्रकारे स्त्रीयांवर शिंतोळे उडविणे म्हणजे चळवळीचा भाग आहे असा समज असणा-या या ब्रिगेडशी आंबेडकरी चळवळीने संधान बांधणे कितपत योग्य आहे हे ठरविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जी आंबेडकरी चळवळ नेहमी नीतिमुल्ये जपुन आपल्या हक्कासाठी लढत आलेली आहे त्या चळवळीचा सोबती म्हणुन ब्रिगेड व मराठा सेवा संघ शेजारी उभं राहण्याच्याही लायकीचा नाही हे वरील उता-यावरुन सिद्ध होते. बाबासाहेबानी व्यक्ती विरोध कधीच केला नाही. त्यांचा विरोध होता विचारसरणीला. पण आज आमचा सोबती म्हणुन मांडिला मांडी लावुन बसणारा हा मराठा सोबती तर आंबेडकर चळवळीच्या खांद्यावर बंदुक ठेवुन ब्राह्मण स्त्रियांवर व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविण्यातच धन्यता मानत आहे. या कृत्यामुळे त्यांच्या सोबत आपली प्रतिमा मलीन होणार याचं कुणाला काही देणं घेणं नाही.
 **********************************************

दंगली करण्याची प्रेरणा: खेडेकरानी ब्राह्मण स्त्रियांच्या चारित्र्यावर यथेच्च शिंतोळे उडविल्यावर तरुणाना दंगली करण्याची प्रेरणा देणार लिखान केले आहे. ते लिहतात, "अशा अवस्थेत सुबुद्ध व प्रशिक्षित मराठा युवकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी जाणिवपुर्वक मराठा समाजाला धार्मिक व जातीय दंगल घडवून आणावी लागेल. अशी सुनियोजीत धार्मिक व जातीय दंगल घडवुन आणण्यासाठी मराठा समाजाने इतर बहुजन समाजाला विश्वासात घेऊन काम फत्ते करावे.  ब्राह्मण हाच एकमेव मानसिक, बौद्धिक व सामाजिक शत्रु असल्याचे मांडावे लागेल. हिटलरशाहीप्रमाणे मराठा व बहुजनांच्या मनावर ब्राह्मण हाच्व  शत्रु व अतो नेस्तेनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा करावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापुन वा जाळून मारावेच लागतील. हि दंगल केवळ ब्राह्मण पुरुषा विरोधात राबविली जाईल. भारत देश निब्राह्मणी करावा लागेल. मराठा समाजाने अशा दंगलींचे नेतृत्व केल्यास इतर समाजही त्याना सर्वत्र सहभाग देईल. ते सामाजीक व कायदेशीर मराठा कर्तव्य आहे" आत्ता बोला, अशी विचारधारा असणारा, जो लादेनलाहि लाजवेल अशी योजना आखणारा खेडेकर व त्यांची मराठा सेवा संघ अन ब्रिगेड हे खरेच आंबेडकरी चळवळीच्या सोबतीने चालण्याच्या लायकीचे आहेत का? बाबासाहेबांची पोरं म्हणवुन घेणा-या आमच्या दलित नेत्याना अशा लोकांची सोबत करताना लाज कशी वाटत नाही. हा खेडेकर नावाचा माणुस दंगली घडविण्याच्या बाता करतो, चक्क तसे करण्यासाठी पुस्तक लिहुन काढतोय तरी आंबेडकरी चळवळ आज त्यांच्या सोबत आहे हे मला न उलगडलेलं कोळं आहे.

वरील पुस्तक वाचुन मलातरी ईतकं कळलय की मागे पुढे हि संघटना नुसती दहशत माजवीत फिरणार आहे. कत्तली करण्याची तयारी चालु आहे हे तर लिखीतच दिलं आहे. दंगे घडविण्याच्या प्राथमिक स्वरुपात असलेली ही संघटना कधी दंगली पुर्णत्वास नेईल माहीत नाही. पण अगदी नजिकच्या काळात हे झाल्यास त्यांच्या सोबत चालणारी आंबेडकरी चळवळ मलीन होईल हे मात्र निश्चीत. आंबेडकरी चळवळ हक्कासाठी लढा देणारी, समतेची मुल्ये जपणारी व सत्याग्रहाच्या मार्गानी प्रश्न निकाली काढणारी संघटना आहे. अगदी याच्या उलट ब्रिगेड व मसेसं कापा कापीची भाषा बोलणारी, मारझोड करणारी, दंगली घडविण्यासाठी तरुणाना प्रशिक्षीत करण्याचे मनसुबे रचणारी भविष्य काळात लवरच दहशतवादी संघटना म्हणुन नावा रुपाला येईल यातं तिळमात्र शंका नाही. 
भविष्यातील या दहशतवादी संघटनेशी वेळीच फारकत घेतली नाही तर उद्या आंबेडकर चळवळीवर सुद्धा हाच ठपका बसेल.

महाराष्ट्र सरकारला निवेदन:
मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा श्री. खेडेकरांचे "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" नावाचं पुस्तक नुकतच वाचलो. त्या पुस्तकातील एकंदरीत विचार, ब्राह्मण स्त्रियांवर उडविलेले शिंतोळे व पुरुषांवर वयक्तिक पातळीवर केलेली टीका, अपमानास्पद वाक्यं अत्यंत निंदणीय आहेत. त्यानी पुस्तकात वापरलेली अश्लाघ्य भाषा ही चळवळीच्या पुस्तकाला न शोभणारी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं हे की नजीकच्या काळात दंगली घडविण्याचे कटकारस्तान ब्रिगेड रचत आहे या बद्दल त्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आलेला आहे. या संघटनेवर वेळीच बंदी न घातल्यास उदया महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील व त्यास जबाबदार असेल आजचे निष्क्रिय सरकार... म्हणुन माझी प्राथमिक मागणी अशी आहे की आजच या संघटनेवर बंदी घालावे अन महाराष्ट्राला रक्तपातापासुन वाचवावे.
आजच जागे व्हा, अन ब्रिगेडला फाटा दया.
---------------------
प्रकाशक
जीजाऊ प्रकाशन
५८४, नारायणपेठ,
कन्याशाळा बसस्टॉप जवळ
पुणे-४११०३०
दु.: ०२०-२४४७६५३९

http://www.jijaiprakashan.com/contact.html

Saturday, May 14, 2011

मराठी भाषा सल्लागार समिती

मराठी भाषा समितीने ठराविक कालावधीने अंतरिम अहवाल द्यावा - मुख्यमंत्री
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

मराठी भाषा समितीने नियमितपणे ठराविक कालावधीने अंतरिम अहवाल शासनाला द्यावेत. त्यामुळे समितीच्या विविध सूचनांवर गतीने कार्यवाही करणे शक्य होईल. मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी शासनाने स्वतंत्र मराठी विभाग, मराठी भाषा समिती, सांस्कृतिक धोरण अशा अनेक उपायांची अंमलबजावणी केली आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे सोपे होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केली.

मराठी भाषा सल्लागार समितीची पहिली बैठक मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी समितीचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, सदस्य सर्वश्री सदानंद मोरे, वसंत आबाजी डहाके, प्रा. हरी नरके, प्रा. विश्वनाथ शिंदे, प्रा. प्रल्हाद लुलेकर, सतीश काळसेकर, लक्ष्मण गायकवाड, डॉ. संजय गवाण, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ. विलास खोले, डॉ. प्रमोद गोविंदराव मुनघाटे, डॉ. राजन गवस, डॉ. श्रीकांत तिडके, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव महेश पाठक, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक एम. आर. कदम, धन्वंतरी हर्डीकर, भाषा संचालक गौतम शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठी भाषा समितीकडून आम्हाला विशेष अपेक्षा आहेत. यामुळेच या समितीच्या कामकाजासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या समितीवरील सदस्यांमधून तीन ते चार उपसमित्या नियुक्त करुन ज्या सदस्यांना ज्या विषयात विशेष रस आहे त्या व्यक्तींची या उपसमित्यांवर नियुक्ती केल्यास धोरणात्मक निर्णय घेताना ते अधिक सुलभ होईल. जशा जशा सूचना प्राप्त होतील, त्याप्रमाणे समितीने दर तीन महिन्यांनी किंवा ठराविक कालावधीने अंतरिम अहवाल सादर करावा म्हणजे त्यावर कार्यवाही करणे सोपे होईल. राज्य सरकारने अलिकडेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. या धोरणातील कोणत्या बाबी प्राधान्याने हाताळल्या पाहिजेत, याबाबत समितीने चर्चा करावी व हा प्राधान्यक्रम निश्चित करण्यास सरकारला मदत करावी, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

या समितीची कार्यकक्षा आणि जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे समितीच्या सदस्यांना काही माहिती हवी असल्यास किंवा विविध शासकीय विभागांचे सहकार्य हवे असल्यास आवश्यक ती चर्चा करण्याचे आदेश सचिव स्तरावर निर्गमित केले जातील, असे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले. माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मराठीचे महत्त्व वाढविण्यासाठी युनिकोडचा वापर, किबोर्डमधील समानता यादृष्टीने समितीने सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याबाबतचा विषय समितीने प्राधान्याने हाताळावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मराठीची इंग्रजी भाषेशी स्पर्धा नाही. मराठी ही राज्यभाषा व लोकभाषा आहे. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे. यामुळे मराठी-इंग्रजीच्या कथित स्पर्धेबाबतही समितीने विधायक भूमिका घ्यावी व हा विषय सकारात्मक पद्धतीने हाताळावा, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

पहिलीपासून इंग्रजी हे धोरण गेली दहा-अकरा वर्षे आपण स्वीकारले असल्याने या धोरणाचा कोणता फायदा झाला याबाबत आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेचे मार्केटींग होणे अत्यंत आवश्यक आहे. भाषा संग्रहालय, भाषा ग्रंथालय, भाषा प्रयोगशाळा निर्माण व्हाव्यात. त्याचप्रमाणे मराठी भाषेला दर्जा मिळावा या मागण्या सदस्यांनी या बैठकीत मांडल्या.

राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने निवडक पन्नास मराठी पुस्तकांचा अनुवाद प्रमुख २२ भाषांमध्ये केल्यास मराठीची ताकद सर्वांना कळेल, अशी सूचना हरी नरके यांनी केली.

ग्रामीण भागात अहिराणी, वर्‍हाडी, खानदेशी अशा विविध बोलीभाषा बोलल्या जातात. तेथील स्थानिक मुलांना मराठी भाषेतील पुस्तके समजणे कठीण जाते. अशावेळी त्यांच्या बोलीभाषेत प्राथमिक स्तरावरील पाठ्यपुस्तके तयार झाल्यास ती मुले शिक्षणापासून दूर जाणार नाहीत, असा विचार या बैठकीत मांडण्यात आला. यावेळी शासनातर्फे या बाबीवर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन प्रधान सचिव (शालेय शिक्षण) संजयकुमार यांनी यावेळी दिले.


मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सर्वसमावेशक सांस्कृतिक धोरण आणि मराठी भाषा विभागाची निर्मिती या दोन निर्णयांबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. ते यावेळी म्हणाले की, मराठी भाषेची गळचेपी होण्याचा अनुभव मराठवाडय़ाने निजामकाळापासून घेतला असल्यामुळे या भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी राहून मराठी भाषेची सेवा करता येईल हा अनुभव अधिक आनंददायी आहे.

संभाजी ब्रिगेड व हरि नरके: प्रा. श्रावण देवरे



संभाजी ब्रिगेड,दादू कोंडदेव व हरि नरके
बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर सांस्कृतिक क्षितिजावर बरीच वर्षे शांतता होती. 1988 नंतर फुले बदनामी प्रकरणापासून ब्राह्मणी- अब्राह्मणी छावणीमध्ये पुन्हा सांस्कृतिक युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर रिडल्स, जेम्स लेन, भांडारकर व आता दादू कोंडदेव अशा चकमकी वारंवार झडायला लागल्या आहेत. जातीअंताचा लढा जसजसा तीव्र होत जाईल तसतशी या सांस्कृतिक लढ्याची गती व तीव्रता वाढत जाणार आहे. या लढ्यात अनेकांच्या कसोट्या लागणार आहेत.पुण्यात दादू कोंडदेव (दादूजी, कृष्णाजी हा `जी' कशासाठी?) पुतळा रातोरात काढून फेकल्यानंतर वादळ उठणे स्वाभाविक होते. दादू कोंडदेव पुतळा प्रकरणात प्रथमच राजकीय पक्ष उघडपणे आकमक झालेले आपण पाहतो आहोत. हे प्रकरण सत्ताधारी जातीशी सरळ जात-संबंधात येत असल्याने सत्तेचा वापर-गैरवापर होणेही स्वाभाविक होते. दोन्ही छावणीतील राजकारणी, अभ्यासक व विचारवंतांशी आपापली शस्त्रे (लेखण्या वगैरे) पाजळली आहेत. जातीव्यवस्था अंताचा लढा हा असा मुख्यत लोकशाही मार्गाने व अंशत ठोकशाही मार्गाने पुढे जात राहणार आहे.साप्ताहिक लोकप्रभाने या विषयावर दोन्ही बाजूने चर्चा सुरू केली व जनप्रबोधनात आघाडी मारली. याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. या सर्व लेखात प्रा. हरी नरके यांचा लेख जितका वैचारिक तेव्हढाच परखडही आहे. स्वपक्षातल्या सदस्यांशी मतभेद असले तर ते फारसे गंभीर नसतात. कारण हे मतभेद गाभ्यातील भूमिका कायम ठेवून पक्षविभाजनापर्यंतही जाऊ शकतात. या मतभेदाच्या परिणामी डाव्या व दलित संघटनांचे अनेक तुकडे झालेत तरीपण त्यांच्या गाभ्यातील इझमवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. परंतु आपल्या पक्षातील सभासद जर शत्रूपक्षातील सदस्यांशी अगदी जवळून नाते-संबंधात, मित्र-संबंधात अथवा हित-संबंधात आला तर मात्र गाभ्यालाच तडा गेल्याची तक्रार होऊ शकते. अशी तक्रार आता हरी नरकेंबाबत व्हायला लागली आहे. याबाबतीत चर्चा काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. हरी नरके यांनी फुले-आंबेडकरी चळवळीसाठी जे कष्ट घेतलेले आहेत, ते पाहता त्यांच्यावर मुळ फुले-समन्वयाचा काळ अवतरला नसल्याने त्यांचे उदाहरण येथे देता येत नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण अवश्य देता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला शत्रू मानले, त्या काँग्रेसच्या मंत्रीमंडळात त्यांना सामील व्हावे लागले. परंतु त्याचवेळी ते आपल्या अनुयायांना इशारा देतात की, मी आपल्या सामाजिक भुमिकेबाबत खंबीर असल्याने माझ्यात काही एक परिवर्तन होणार नाही. परंतु तुम्ही काँग्रेसच्या या पाण्यात मातीच्या ढेकळासारखे विरघळून जाल.' थोड्याच दिवसांत काँग्रेसच्या मंत्रीपदाला लाथ मारून बाबासाहेबांनी आपला खंबीरपणा व समाजापती आपली निष्ठा सिद्धही केली.हरी नरके व डॉ. साळुंखे यांना ब्राह्मणी छावणीच्या भांडारकर संशोधन संस्थेने संशोधक म्हणून संचालक पदावर घेतले असल्याचे कळाले. याबाबत हरी नरकेंवर बरीच टीका झाल्याचेही कळाले. सोलापूरच्या सत्यशोधक गोलमेज परिषदेत आम्ही जाहीर भाषणातच नरपेंच्या पाठीशी उभे रहात सांगितले की, `नरके कोणत्या संस्थेत वा स्टेजवर जातात हे महत्त्वाचे नसून ते तेथे कोणती भूमिका घेऊन काम करतात हे महत्त्वाचे आहे.'ते भांडारकर संस्थेत गेल्यावर त्यांचा पहिलाच संशोधनपर (?) लेखक म्हणून लोकप्रभाचा दादू कोंडदेववरचा लेख वाचावयासा मिळाला. आता या लेखाचा आधार घेऊन त्यांना काही लेख शत्रूला फितूर झाल्याचा आरोप करीत पिंजऱयात उभे करीत आहेत. शत्रूपक्षांच्या विभाजन रेषेच्या एका बाजूने उभे राहून लढणे तसे सोपे असते. परंतु ही विभाजन रेषा नेहमीच सरळ असेल असे नाही.  कारण या विभाजन रेषेच्या एका बाजूने लढताना आपल्या छावणीच्या प्रस्थापित सिद्धांतांचा आधार घेऊन लढले तरी क्रांतीकारक म्हणून मान्यता मिळते. जुनीच शस्त्रे थोडीशी परजली तरी लढण्याचा आनंद मिळतो. काही महाभाग तर परजण्याचाही त्रास घेत नाहीत. परंतु शत्रूपक्षाच्या समन्वयात आल्यावर मात्र काही प्रस्थापित समज-गैरसमज लक्षात येतात. शत्रू पक्षाशी समन्वय म्हणजे शरण जाणे, अथवा गद्दारी करणे नव्हे. समन्वयांतर्गतही संघर्ष सुरूच असतो. परंतु अशा संघर्षात कमजोर छावणीचा पराभव निश्चित असतो. हरी नरकेंना आपल्या तात्त्चि निष्ठेचा हिरा `न भंगण्याची' खात्री असेल तर त्यांनी भांडारकरी ब्रह्मकोंदणात जरूर बसावे. हरी नरके यांना भांडारकर संशोधन पेंद्रात गेल्यावर तेथील बहुलकर वगैरे मंडळी फारच पुरोगामी अथवा निर्दोष वाटली असतील तर त्यात त्यांचा फारसा दोष नाही. त्यासाठी त्यांनी लेखणीही झिजवली. याबाबत एवढेच म्हटले पाहिजे की, बहुलकर जर खरोखर पुरोगामी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी लेखणी झिजवण्याची जबाबदारी डॉ.आ.ह. साळुंखे यांची आहे, नरकेंची नव्हे. भांडारकर संस्थेशी लढाईचा संबंध जेवढा साळुंखेचा येतो तेव्हढा नरकेंचा येत नाही.लेखाच्या सुरूवातीसच त्यांनी दादू कोंडदेव प्रकरणी पुणे विभागले गेल्याचे सांगितले व हा सामाजिक कलह असल्याचे म्हटले आहे. केवळ पुणेच का, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशच ब्राह्मणी-अब्राह्मणी छावणीत विभागला पाहिजे. ब्राह्मणी-अब्राह्मणी छावणीची लढाई अशा वैचारिक विभागणीवरच तर चालू आहे. याच पहिल्या पॅरिग्राफमध्ये हरी नरके यांनी संभाजी ब्रिगेडवर दहशतवादाचा आरोप केलेला आहे. संभाजी ब्रिगेड हिच्या नावातच दहशतार्थी शब्द सामावलेला आहे. परंतु ही दहशत शत्रूपक्षाला वाटली पाहिजे, स्वपक्षातील कार्यकर्त्यांना नव्हे. मी संभाजी ब्रिगेडच्या विरोधात व एकूणच मराठा सेवा संघाच्या `मराठा आरक्षणवादी' भूमिकेच्या विरोधात तर राज्यभर परिषदा घेतल्या व पुस्तकही लिहिले. हे पुस्तक सुगावा प्रकाशनने पुण्यातच छापले. परंतु मला दहशतीचा फोन न येता पुस्तकावर सविस्तर चर्चा करणारे फोन या संघटनेकडून आले. सातारा जिह्यातील एक ओबीसी प्राध्यापक वगळता आणखी कोणावर दहशतीचा वापर ब्रिगेडने केला असल्याचे मला तरी माहिती नाही. परंतु हरी नरकेंना अशा धमक्यांचे फोन येत किंबहुना ती त्यांची जबाबदारीच आहे. ज्या दिवशी संभाजी ब्रिगेड स्वतच्याच छावणीवर दहशतीचा वापर करेल, त्या दिवसापासूनच तिच्या संपण्याची प्रक्रियाही सुरू होईल. तिचे बाब फुले-शाहू-आंबेडकरवादी म्हणविणाऱया साप्ताहिक-दैनिकांची! पुण्यातले एक आंबेडकरवादी म्हणविणारे दैनिक आपल्याच छावणीच्या कार्यकर्त्यांवर अत्यंत कमरेखालची भाषा वापरत टीका करते, असे पुण्यातल्याच काही कार्यकर्त्यांनी मला सांगितले. कमरेखालच्या शिव्या वापरून चळवळ चालविण्याइतके वाईट दिवस अजून तरी आंबेडकरी चळवळीला आलेले नाहीत. बाबासाहेबांनी दिलेली वैचारिक शस्त्रे अजूनही इतकी प्रभावी आहेत की, शत्रूंशी लढण्यासाठी शिव्यांचे शस्त्र उचलण्याची गरजच नाही आणि तरीही ज्यांना आंबेडकरी वैचारिक शस्त्रे निकामी झालेली वाटत असतील, त्यांनी आपल्या आंबेडकरी बुद्धीचा वापर करून नवी वैचारिक हत्यारे शोधून काढावीत. कमरेखालच्या गोष्टी करण्यासाठी डोके वापरावे लागत नाही. कमरे वरच्या गोष्टी (हृदय, मन, मेंदू) वापरण्यासाठी डोके लागते. डोक्याचा वापर माणूस करायला लागला म्हणूनच त्याला माणूसपण प्राप्त झाले. ज्या दिवशी एखादा माणूस वा माणसांचा गट डोके वापरणे बंद करेल, त्यादिवशी ते माणसातून म्हणजे चळवळीतून बाद होतील. ज्यांना आपल्या छावणीतील आपली माणसं ओळखता येत नाहीत, त्यांचा पराभव त्यांनी स्वतच ठरवून टाकलेला असतो. हरी नरके यांनी या लेखात दादू कोंडदेव प्रकरणात मराठा जातीय वळण लागल्याचे म्हटले आहे, तेही चुकीचेच आहे. फुले बदनामीप्रकरणी हरी नरके यांनी पोटतिडकीने पुस्तक लिहिणे व रिडल्स व आंबेडकर बदनामी करणाऱया शौरी प्रकरणी आंबेडकरी जनतेने मोर्चे काढणे जेवढे स्वाभाविक आहे. तेव्हढेच स्वाभाविक शिव-जिजाऊ बदनामी प्रकरणी मराठा सेवा संघाने व संभाजी ब्रिगेडने आक्रमक होणे आहे. हरी नरके तक्रार करतात की, दादू कोंडदेव प्रकरणी स्थापन झालेल्या संशोधकांच्या समितीत फक्त मराठा व ब्राह्मणच होते. त्यांची ही तकार रास्त असली तरी मराठा सेवा संघ व त्यांची संभाजी ब्रिगेड हे काही जातीअंतवादी नाहीत. ते जात्योन्नतीवादी असल्याने ते स्वत ओबीसी, आदिवासी व भटक्या जातीजमातीतून संशोधक प्रतिनिधी घेणार नाहीत. नरकेंनी दादू कोंडदेवांचा पुतळा रातोरात काढला गेला त्यावर आक्षेप घेतला असून चर्चा करून हा निर्णय घेता आला असता, असेही सुचविले आहे. पुतळा रात्रीच का काढावा लागला कारण ही कृती ज्यांच्याविरोधात करावयाची होती तो मनुवादी वर्ग सतत जागृत व सतर्प आहे. त्यामुळे तो  दिवसा काढणे अशक्यच आहे. तसे केले असते तर मनुवाद्यांनी पुतळा काढण्याआधीच दंगल घडवून आणली असती. कारण दंगली घडवून आणण्यात मनुवादी वर्ग माहीर आहे.  दादूंचा पुतळा दिवसा का बसविण्यात आला, कारण समस्त बहुजन सामाजिक-वैचारिकदृष्ट्या झोपलेला आहे. तो जागृत असता तर मनुवाद्यांची दिवसा-ढवळ्या पुतळा बसविण्याची हिंमत झाली असती काय?     मनसेच्या राज ठाकरेंनेही प्रश्न विचारला आहे की, `इतिहासाच्या पानावर काय लिहिले पाहिजे हे पुण्याच्या नगरसेवकांनी ठरवायचे का?' या प्रकरणातील  राजकीय हस्तक्षेप अपरिहार्य आहे. इतिहासाची पाने  बुद्धिजीवीवर्गच लिहित असतो. त्याची अंमलबजावणी मात्र राजकीय सत्ताधाऱयांनाच करावी लागते. दादृ शिवराय व जिजाऊ यांच्या संबंधांबाबत बदनामीच्या इतिहासाची पाने लिहिणारी मंडळी बुद्धिजीवीच होती. मात्र ती दादू कोंडदेवांसाठी बुद्धी पणाला लावणारी होती.  या पानांचा आधार घेऊन दादूंचा पुतळा जिजाऊंच्या शेजारी उभे करण्याचे काम पुणे महानगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱयांनांच करावे लागले. त्याचप्रमाणे आता हा भांडारकरी इतिहास खोटा ठरविणाऱया इतिहासाची पाने सत्यशोधक बुद्धिजीवींनी लिहिली व त्याचा आधार घेऊन आजच्या मनपातील सत्ताधाऱयांनीच दादूंचा पुतळा काढून टाकला. हे सर्व जे घडले आहे ते सामाजिक लोकशाही मार्गानेच घडते आहे. त्यासाठी राजकीय विरोधकांनी तोडफोड केली तर ते चूकच.ब्राह्मणी छावणीशी मैत्री करण्याची किंमत किती मोजावी याचे भान नरकेंना असायला हवे. ते त्यांना नाही हेच या लेखावरून स्पष्ट होते. भांडारकर संशोधन पेंद्रातील भटांचा गुन्हा केवळ शिव-जिजाऊ बदनामी वा दादू कोंडदेव प्रकरणापूरता मर्यादित नाही, हे आधी नरकेंनी लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यांची वकीली व बचाव करण्यासाठी कोणी कितीही लेखणी झिजवली तरी ती मान्य होण्यासारखी नाही.  भांडारकरातील भटांना व एकूणच देशातील सर्व ब्राह्मणांना स्वतचा बचाव करण्यासाठी जर प्रायश्चित घ्यायचे असेल तर एकच मार्ग शिल्लक आहे. देशातील सर्व सत्तास्थाने, साधने, संस्था या सर्वांचे लोकशाहीकरण जात्यातीत करणे हाच एकमेव मार्ग आहे. केवळ एखाद्या भांडारकरमध्ये नरके-साळुंखेंची भरती केल्याने व त्यांचा वापर केल्याने ब्राह्मणांचा प्रश्न सुटणार नाही. जातीअंतानेच ब्राह्मणांचाही प्रश्न सुटणार आहे. सत्ता, साधने व संस्थांचे लोकशाहीकरण म्हणजे त्यात जास्तीत जास्त जातींचे प्रतिनिधी असणे. परंतु हे प्रतिनिधी केवळ उचलेगिरींतून (को-ऑप) आलेले नसावेत. असे प्रतिनिधी कितीही हुशार असले तरी ते काँग्रेस-राष्ट्रवादीमधल्या `हरिजनांइतकेच' विश्वासार्ह असतात.कम्युनिस्ट चळवळीच्या राजकीय प्रभावातून सुखदेव थोरात, मुणगेकर व रेणके आदी दलित तज्ञ व विचारवंत  देशाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वोच्च पदावर गेले आहेत. दलित ओबीसींची चळवळ अजून एवढी प्रभावी नाही की, ज्याच्यामुळे निर्णायक पदांवर व संस्थांवर त्यांचे प्रतिनिधी जाऊ शकतील. नरकेंची भांडारकरवरील नियुक्ती कोणत्या ओबीसी चळवळीच्या कोणत्या राजकीय शक्तीमुळे झाली आहे? समता परिषदेच्या प्रभावातून झाली असेल. तर मग भांडारकरातील भटांच्या बचावासाठी लेखणी कशासाठी झिजवायची?नरपेंनी `ब्राह्मण व क्षत्रिय युतीचा व त्यात दलित-आदिवासी-ओबीसी भरडला जाण्याचा' रास्त सिद्धांत मांडला आहे. ब्राह्मण हे क्षत्रियांशी दोस्ती करत नाहीत. तर ते जागृत असलेल्या वर्ण-जातीशी दोस्ती करतात. वर्णजाती व्यवस्थेच्या काळात त्यांचा दोस्त क्षत्रिय होता. वर्ग व्यवस्थेच्या काळात त्यांनी भांडवलदार-कारखानदारांशी म्हणजे वैश्यांशी दोस्ती केलेली आहे. राजकीय वर्चस्वापोटी क्षत्रियांशी असलेली दोस्ती कायम आहेच. त्यात दलित-ओबीसी भरडले जातात हे खरेच आहे. परंतु आता हेच ब्राह्मण मायावतीपासून नामदेव ढसाळपर्यंतच्या दलितांशीही दोस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्राह्मण जसे मित्र बदलत आहेत तसे क्षत्रियही मित्र बदलत आहेत. मराठा सेवा संघ व बामसेफ यांची मैत्री याच प्रकारातील होय. परंतु हे सर्व मैत्रीचे प्रकार म्हणजे व्यक्ती-उन्नती व जात्योन्नतीसाठी चाललेले उद्योग आहेत, जातीअंतासाठी नाहीत.नरके-साळुंखेंची भांडारकरी मैत्री चांगल्या हेतूसाठी आहे, असे जरी म्हटले तरी तसे स्पष्ट दिसले पाहिजे.  राजकीय, सरकारी व ब्राह्मणी संस्थांवर घेतलेले बहुजन प्रतिनिधी चळवळ मोठी करण्यासाठी काम करतात की, व्यक्तिगत मोठे होण्यासाठी चळवळीला मारण्याचे काम करतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजकारणात मोठे झालेल्या दलित व ओबीसी- भटक्यांच्या नेत्यांनी हे सिद्ध केलेलेच आहे. आता वैचारिक व संशोधनाच्या क्षेत्रातील मोठे झालेल्या लोकांनी चळवळीचे काय करायचे ठरविले आहे? भांडारकरसारख्या संस्थांचा उपयोग फुले-आंबेडकरी चळवळीच्या मुलभूत संशोधनासाठी कसा होईल, त्याला भांडारकरच्या माध्यमातून जगभर मान्यता कशी मिळेल, तेथून सरस्वतीचा पुतळा हटविता आला नाही, तरी क्रांतीज्योती  सावित्रीमाई फुले यांचाही पुतळा कसा बसविता येईल, फुले-आंबेडकरी विचारांची बहुसंख्य पुस्तके तेथे कशी ठेवता येतील व बहुजनातून नवे संशोधक निर्माण करण्यासाठी त्यांना भांडारकरी प्रोत्साहन कसे मिळवून देता येईल, अशा काही मोजक्या गोष्टी जरी करता आल्यात तरी खूप मोठे काम साळुंखे-नरकेंनी केले असे म्हटले जाईल. कमिशनच्या सल्लागारपदावरही त्यांनी बरेच समाधानकारक काम केलेले आहे. देशाच्या इतिहासात नरके हे पहिले ओबीसी विचारवंत आहेत की जे सर्वोच्च आर्थिक सत्ता असलेल्या प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार झालेत. ओबीसी चळवळीसाठी ही गर्वाची बाब आहे.  फुले व आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे कामही त्यांनी चोखपणे चालविले आहे. मध्यंतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंड प्रकाशनाचे काम बरेच वर्षे बंद पडले होते. नरकेंच्या प्रयत्नांनी ते पुन्हा सुरू झाले ही आनंदाची बाब आहे. त्यात काही चूका होतही असतील, परंतु त्या दुरूस्त करता येऊ शकतात. प्रस्थापित शासनाच्या सर्व अडचणींवर मात करून त्यांना हे काम करावे लागते, हे आपण सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. भांडारकरमध्येही ते असेच काम करतील अशी अपेक्षा करूया!महाराष्ट्रभर नरकेंचा फॅन असलेला मोठा वर्ग आहे. यात सर्व जाती-धर्माचे, सर्व थराचे लोक आहेत. लोकप्रभामधील नरकेंच्या या लेखाने अनेक कार्यकर्ते, मित्र व हितचिंतक चकीत व दुःखी झाले आहेत. मला व्यक्तिश असे वाटते की, त्यांची लिखित भुमिका काहीही असली तरी त्यांची प्रत्यक्ष कृतीशिल भूमिका काय असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. ते भांडारकर संस्थेत काही बदल करून चळवळीला मोठे करतात की, स्वतला मोठे करण्यासाठी (आणखीन वरच्या पदाच्या शिड्या चढण्यासाठी) भांडारकरचा उपयोग करतात, ते येता काळ सांगेल. अर्थात त्यांनी मोठे व्हावेच, परंतु आपण फुले-आंबेडकरी चळवळीमुळे मोठा होतो आहे, भांडारकरी भटांमुळे नाही, याचे भान त्यांनी कायम ठेवले पाहिजे.
प्रा. श्रावण देवरे
महासचिवओबीसी सेवा संघ
9422788546

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय- हरी नरके

नाशिक, दि.२३ (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात कमालीची घसरण सुरू असून, याच काळात नेमका शालेय स्तरावर परीक्षाच न घेण्याचा निर्णय अत्यंत घातक ठरणारा आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय असून, परीक्षाच बंद झाल्याने नजीकच्या भविष्यात शाळा आहे, शिक्षक आहेत; पण शिक्षणच नाही अशी परिस्थिती उदभण्याची भीती असल्याचे प्रख्यात विचारवंत हरी नरके यांनी सांगितले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अभीष्टचितन सोहळ्यात ते बोलत होते.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा अभीष्टचितन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नरके यांनी शिक्षण जोपर्यंत तळमळीने दिले जाणार नाही, तोपर्यंत ते तळागाळापर्यंत पोहोचणार नसल्याचे सांगितले. १८८२ साली महात्मा फुले यांनी केलेली शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्तिक करण्याची मागणी पूर्ण होण्यास २०१० साल उजाडावे लागले हे दुर्दैव असल्याचे सांगितले. पूर्वीच्या चातुर्वर्ण्य पध्दतीप्रमाणे आता शिक्षण क्षेत्रातही इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेले, कॉन्व्हेंट व इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे, मनपा-जि.प. शाळांमध्ये शिकणारे आणि आश्रमशाळांमध्ये शिकणारे असे चार वर्ण निर्माण होण्याची स्थिती असल्याचेही नरके यांनी नमूद केले.
सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मी केवळ अपघातामुळे राजकारणात आल्याचे सांगितले; मात्र या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्यांचे हित एवढेच ध्येय नजरेसमोर ठेवून कार्य केल्याचे सांगितले. सगळ्यांचे प्रेम आणि आदर हीच आयुष्यातील जमेची बाजू असल्याचेही दिघोळे यांनी नमूद केले. यावेळी उद्योजक अशोक कटारिया, आमदार डॉ. सुधीर तांबे आदिनीदेखील दिघोळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर सौ. आशा दिघोळे, बाळासाहेब बोडके, शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम शाहू व सयाजीराजांनी शिक्षण सक्तीचे केले: हरी नरके

ऐक्य समूह
Sunday, February 27, 2011 AT 11:48 PM (IST)
Tags: news
सातारा, दि.27 : वसतिगृह शिक्षणातून जाती-पाती आपोआप नष्ट होऊन "मानव हीच एक जात' निर्माण करण्यास मदत होत असल्याने कर्मवीरअण्णांनी अशा प्रयोगाचा पहिल्यांदा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन प्रा. आर. के. शिंदे यांनी केले.
येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित केलेल्या 16 व्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी व परिसंवादाच्या सातव्या सत्रात "कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण व श्रमसंस्कृतीचा दृष्टिकोण' या विषयावर प्रा. आर. के. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड. केशवराव पाटील होते. यावेळी प्रा. डॉ. हरी नरके, आ. शशिकांत शिंदे व दीपक जगताप उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, भविष्यकाळात विद्यार्थी आदर्श नागरिक बनण्यासाठी जातीव्यवस्था अडथळा निर्माण करत होत्या. त्यामधून समाजाची सुटका व्हावी, तसेच समाजाचे आपण काहीतरी देणं लागत असल्याने कर्मवीर अण्णांनी वसतिगृह शिक्षण योजना राबविण्यास सुरूवात केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: काम करून शिक्षणासाठी लागणारा पैसा स्वत: कमवून शिक्षण घेण्याचा पहिल्यांदा वेगळा उपक्रम राबविला.
प्रा. डॉ. हरी नरके म्हणाले, महात्मा फुले यांनी 1882 मध्ये हंटर कमिशन समोर पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत व्हावे, ही मागणी केली होती. त्यानंतर बडोद्याचे सयाजीराजे गायकवाड, कोल्हापूरचे छ. शाहू महाराज आदींनी याबाबतचे कायदे बनवून घेतले. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यासाठी अण्णांनी सरकारी सेवा ज्या ठिकाणी पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी शाळा काढल्या. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचे भविष्य प्राथमिक शाळेच्या खोलीत घडवले जाते. सध्या महाराष्ट्र राज्यात 72 हजार 53 प्राथमिक शाळा, 20 हजार 339 माध्यमिक विद्यालय सुरू आहेत. या माध्यमातून केरळ राज्याच्या लोकसंख्येपेक्षा मोठ्या राज्यात महाराष्ट्रात शिक्षणाचा चांगला प्रसार व प्रभाव दिसून येतो.  नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात लोकसंख्येच्या 77 टक्के लोक साक्षर असणारे राज्य म्हणून ओळखले जाते. 
प्रा. डॉ. नरके म्हणाले, मोठ्या राज्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेल्या राज्याचा विकास महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे झाला आहे. कर्मवीर अण्णांनी मोफत शिक्षणाची मागणी केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 45 व्या कलमात त्याची तरतूद केली. अलीकडेच शिक्षणाचे धोरण बदलत आहे. त्यात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत परीक्षा घ्यायची नसल्याचे धोरण आहे. यामुळे भविष्यकाळात शिक्षण  क्षेत्रावर खूप मोठा विपरीत परिणाम होणार आहे. अलीकडेच शिक्षण संस्था काढणे, त्यातून फायदा मिळवणे हा शिक्षण सम्राटांचा हेतू दिसून येत आहे. वाळू माफिया, तेल माफिया, भूखंड माफिया असेच माफिया दिसून येत होते परंतु अलीकडेच शिक्षण संस्था चालक शिक्षण माफिया झाल्याचे आपणास दिसून येत आहेत.
ऍड. केशवराव पाटील म्हणाले, शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने झपाटून निघालेल्या अण्णांनी स्वत:चे शिक्षण किती आहे यापेक्षा बहुजन समाजातील लोकांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा स्वावलंबी व स्वाभिमानी शिक्षणाच्या कार्याबद्दल सखोल माहिती दिली. अण्णांनी महात्मा गांधींजींच्या नावाने 101 माध्यमिक शाळा सुरू केल्या. महात्मा गांधी विद्यापीठ काढण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिल्याची माहिती ऍड. पाटील यांनी दिली.
परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भागातील नवोदितांचे कविसंमेलन भरवण्यात आले होते. आठव्या सत्रात "चला यशस्वी होऊ या !' या विषयावर विवेक म्हेत्रे यांचा कार्यक्रम झाला. नवव्या सत्रात प्रा. डॉ. श्रीकांत तिडके यांच्या अध्यक्षतेखाली व ऍड. गणेश हलकारे, दिलीप सोळंकी व अरूणा सबाणे यांच्या उपस्थितीत संत गाडगे महाराजांच्या विचारातून अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. दहाव्या सत्रात कवी प्रसाद कुलकर्णी यांचा आनंदयात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला.

शिवरायांच्या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्या -डॉ. हरी नरके

http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=137343:2011-02-18-18-06-37&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59

औरंगाबाद, १८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधीशेतकऱ्यांची गरज बघून त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफीदेखील द्यावी, असा निर्णय छत्रपती शिवाजी यांनी आपल्या कार्यकाळात घेतला होता. छत्रपती शिवरायांच्या नावाने जयजयकार करणाऱ्या नेत्यांनी या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. हरी नरके यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातर्फे ‘छत्रपती शिवाजी व शिवकाल’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. नरके यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे हे अध्यक्षस्थानी होते. या चर्चासत्रात सव्वाशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवराय आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळ या विषयावर डॉ. हरी नरके यांचे भाषण झाले. स्वराज्याचे म्हणजेच स्वदेश स्वातंत्र्याचे संकल्पचित्र रेखाटणारे आणि त्याला मूर्त स्वरूप शिवराय यांनी दिले. शिवरायांच्या अनेक पैलूंची आठवण आजही आपल्याला त्यांच्या द्रष्टेपणाची जाणीव देऊन जाते. आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शिवरायांचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोण काय होता, या संदर्भात शोध घेणे उद्बोधक ठरणार आहे, असे डॉ. नरके म्हणाले. राजांनी प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना लिहिलेले ५ सप्टेंबर १६७६ चे पत्र आजही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे पत्र द्यावे. पीक आल्यावर त्यांच्याकडून मुद्दल तेवढे घ्यावे, व्याज घेऊ नये. यासाठी सरकारी खजिन्यातून दोन लाखांपर्यंत रक्कम खर्च पडली तरी हरकत नाही. शेतकऱ्याला जर मुद्दलही फेडणे शक्य नसेल तर त्याला तेही माफ करावे, असे शिवाजी महाराजांनी पत्रात म्हटले होते. याचा अर्थ शेतकऱ्यांची गरज बघून त्याला शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफी द्यावी, असा हुकूम शिवाजी महाराजांनी केला होता. महाराजांचा जयजयकार करताना त्यांच्या या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन डॉ. नरके यांनी केले.
इतिहासाकडे केवळ शैक्षणिक दृष्टिकोणाकडून न पाहता नव्या दृष्टीने विचार करता आला पाहिजे. महापुरुषांचे कार्य हे कुठल्याही चौकटीत न अडकविता देशाच्या हितासाठी असते. इतिहासाचे विकृतीकरण करता कामा नये, असे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे म्हणाले. यावेळी कुलसचिव डॉ. मानवेंद्र काचोळे यांचे भाषण झाले. प्रारंभी संचालक डॉ. नीरज साळुंके यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात पहिल्या दिवशी डॉ. सर्जेराव भामरे, अ‍ॅड. अनंत धारवाडकर, डॉ. जिगर मोहंमद, डॉ. रामभाऊ मुटकुळे, डॉ. संजयनाथ शर्मा, डॉ. इमारतवाले यांनी मार्गदर्शन केले.