Showing posts with label मनोहर भिडे. Show all posts
Showing posts with label मनोहर भिडे. Show all posts

Wednesday, May 6, 2020

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?








रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके

बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० वर्षातली २६० वर्षे या मंडळींना शिवरायांची साधी आठवणसुद्धा का आली नाही? या मंडळींचे शिवरायांबद्दलचे प्रेम पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे अचानकच का उद्भवले? गेल्या ५०/६० वर्षातच ते उतू का जाऊ लागले? संघाचे छ. शिवराय "गोब्राह्मण प्रतिपालक" का? "कुळवाडीभूषण" का नाहीत? ते मुस्लीमद्वेष्टेच का? संघाने महाराजांना अवतारी पुरूष का बनवलेय? संघाचे मनोहर भिडे त्यांचा उल्लेख "शिवप्रभू" असा का करतात? ३२ मण सोन्याचे सिंहासन, खडा पहारा या नावाखाली हजार बाराशे कोटी रूपयांचा " एमबी [मनोहर भिडे] केयर्स फंड" त्यांना का जमवायचा आहे? रायगडावर त्यांना कब्जा का मिळवायचा आहे? यामागे मराठा तरूणांना संमोहित करण्याचा कोणता कट, कोणती कपटनिती आहे?

देवाचे पेटंट भटजीचे- ही तर रोजगार हमी-
यांचे एक वचन आहे. " देव मंत्राधीन आहेत. म्हणजे आधी दगडाची किंवा शाडूची साधी मुर्ती असते. तिच्यात मंत्राद्वारे भटजी प्राण निर्माण करतो. विसर्जनाआधी ते पुन्हा काढून घेतो. मंत्र भटजीच्या ताब्यात असतात. अंतिमत: देवांवर मालकी कोणाची असते तर भटजीची." म्हणून प्रत्येक महापुरूषाचा यांना देव करायचा असतो. त्याचा देव झाला की त्याचे पेटंट यांच्या नावे जमा होते. त्याची रॉयल्टी पिढ्यानुपिढ्या यांना मिळते. म्हणजे मानवनिर्मित देव ही यांची हजारो वर्षांची रोजगार हमी योजना आहे तर!

जातपात नाही मानत मग दलित शंकराचार्य का नाही? दलित सरसंघचालक का नाही?

एरवी बहुजनांच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारे हे लोक भटजीची नियुक्ती मात्र जन्माच्या आरक्षणाद्वारे करण्याबद्दल आग्रही असतात. तिथे का गुणवत्तेवर नियुक्त्या नको असतात? या एकाच जातीला दिलेल्या १०० टक्के आरक्षणाबद्दल सगळेच गप्प कसे असतात? तिथे का सगळ्या हिंदुंना प्रवेश नाही? आजपर्यंत एकही ब्राह्मणेतर शंकराचार्य का झाला नाही? संघ जातपात मानत नाही तर आजपर्यंत किती सरसंघचालक अनुसुचित जातींचे झालेत? किमान एक तरी शूद्र या पदावर का बसला नाही? आजही संघाच्या पहिल्या श्रेणीच्या श्रेष्ठींमध्ये एकही शूद्र किंवा अतिशूद्र का नाही?

भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा, म्हणून मुस्लीमद्वेश-
हिंदु संघटन करायचे तर भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा. यांनी मुस्लीमांना शत्रू ठरवले. सतत मुस्लिम समाजाचा द्वेश करीत बोलायचे. लिहायचे. वागायचे. मुस्लीमद्वेश वगळला तर संघ संपला.
यांचे शिवराय कट्टर मुस्लीमद्वेष्टेच का? याचे उत्तर यात आहे. भारतीय संस्कृती ही मुलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या दोघींच्या एकत्रित पाण्यावर पोसलेली. या देशात हिंदु राजे महाराजे व मुस्लीम नबाब, सुलतान यात संघर्ष झाले, हे खरे आहे. पण ते धर्माचे नव्हे तर सत्तेचे संघर्ष होते. इथली सामान्य हिंदुमुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. गावोगावी हिंदुलोक मुस्लीम पिरांच्या यात्रा करीत होते. पिराच्या पुजा करीत होते. कोकणात मुस्लीम लिगची स्थापना झाली तर ती गावच्या मारूतीला नारळ फोडून. [ संदर्भ- हमीद दलवाई]

सत्तेसाठी झालेल्या लढाया या धार्मिक लढाया नव्हत्या. म्हणून इंग्रजी राज्य यायच्याआधी या देशात कधीही हिंदुमुस्लीम जातीय दंगली झाल्या नाहीत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते दोघे एकत्रितपणे लढले. इंग्रजांनी त्यांच्यात पद्धतशीरपणे फूट पाडली म्हणून आठशे वर्षांच्या इतिहासात ११ ऑगष्ट १८९३ ला भारतातली पहिली हिंदुमुस्लीम दंगल झाली. पुढे मुस्लीम लिगने घडवलेल्या दंगली व पाकीस्तानची निर्मिती यातनं कटुता वाढत गेली. पाकच्या कारवायांनी तर आता ही कटुता, द्वेशभावना, आकसभावना गु्णाकाराच्या वेगाने वाढते आहे.

गंगाजमुना तहजीब-

इथले संगित, खाणेपिणे, कपडेलत्ते, भाषा, साहित्य, कला, विद्या या सार्‍यांमध्ये सरमिसळ आहे. अगदी रक्तातसुद्धा. भांडारकर नावाच्या शास्त्रज्ञांनी १०० वर्षांपुर्वीच हे सिद्ध केलेले आहे की शुद्ध रक्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. हजारो, लाखो वर्षांच्या मानवी प्रवासात सगळ्यांचे रक्त एकमेकात मिसळलेले आहे. शुद्ध रक्ताच्या निव्वळ थापा आहेत.

एक हिंदू व दोन मुस्लीम सत्ता मिळून मुघलांशी का लढत होते?
आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार अस्तित्वात येण्यामागे ज्या पत्राचे सुत्र आहे, तिकडे आपले लक्ष वेधतो. पत्र शिवाजी राजांचे आहे. मार्च १६७७ मधले आहे. राज्याभिषेकानंतरच्या राजकारणावरचे आहे. मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे. महाराज पत्रात म्हणतात, "संप्रती राजकारण वर्तमान म्हणजे, दक्षिणेचे पातशहा तीन.निजामशाह, आदिलशहा, कुतुबशाहा. त्यातली निजामशाही बुडाली... पठाण [दिल्लीकर मुघल] बळावला म्हणजे एका उपरी एक दक्षिणीयांची घरे बुडविल. कोणास तगो देणार नाही. ऎसे आम्ही समजोन कुतुबशहा यांसी पहिलेपासून रूजुवात राखिली होती... आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. या भेटीत असे ठरले की, "आपली पादशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे."

शिवाजी महाराजांचे हे पत्र हा सज्जड पुरावा आहे की लढाई हिंदुमुस्लीम अशी नव्हती. १ हिंदू आणि २ मुस्लीम सत्ताधिश एकत्र मिळून मुस्लीम असलेल्या मोगलांशी लढत होते. कारण लढाई धर्माची नाही तर सत्तेची होती.
क्रमश:....

प्रा.हरी नरके, ६/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २७१

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1wyrOJM-Z-vA7dsV47JiWtcD0MoB4SNG4ykT0bG9U1akS6hQtPCgm-Ybg

Sunday, May 3, 2020

रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू










रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू : मनू संतांच्या एक पाऊल पुढे, मनोहर भिड्यांनी संतांचा केला अपमान-प्रा.हरी नरके


महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये संतविचारांचा फार मोठा वाटा. न्या.रानडे ते प्रा.गंबा.सरदार यांनी संतसाहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती समाजाऊन सांगितलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीची पुर्वतयारी संतांच्या प्रबोधनपर विचारांनी केली होती हे न्या.म. गो.रानडे यांनी " मराठा सत्तेचा उदय" या ग्रंथात सप्रमाण मांडलेले आहे. संघाचे चेले मनोहर भिडे उठताबसता शिवछत्रपतींचे नाव घेत असतात आणि तरीही ते संतांचा धडधडीत अपमान करतात. दोन वर्षांपुर्वी भिड्यांनी जेव्हा संतांचा अवमान करणारी मुक्ताफळं उधळली तेव्हाच मी भिड्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत पुण्यात तलवारधारी झुंडी घुसवल्या होत्या. वारकरी चळवळ ताब्यात घेण्याचा त्यांच हा डाव वारकर्‍यांनी उधळून लावला.

महाराष्ट्राला पहिल्यांदा शिवराय सांगितले फुल्यांनी .त्यांना तर भिडे देशद्रोही म्हणतात. १९०६ कुणबी मराठा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी ६०० पृष्ठाचे मौलिक शिवचरित्र लिहिले त्याचा उल्लेखसुद्ध भिडे करीत नाहीत. भिड्यांना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून मराठा-बहुजन मुलांची टाळकी संमोहित करून पेशवाईच्या सावलीत न्यायची आहेत.

भिड्यांचे शिवराय रयतेचे राजे नाहीत, ते शेतकरी, कुणबी, मावळ्यांचे उद्धारकर्ते नाहीत तर ते गोब्राह्मण प्रतिपालक, रात्रंदिन परधर्मद्वेश शिकवणारे, युवकांची माथी भडकावणारे, आधुनिक काळातून पुन्हा विषमतावादी ब्राह्मणी, वैदीक राज्यात नेऊ पाहणारे भिडेवादी शिवराय आहेत. त्यावर सविस्तर लिहिणारच आहे. आज भिड्यांना पुजनीय असणार्‍या मनूची काही मतं बघूयात.

मनू म्हणतो,
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [ अध्याय ९ वा श्लोक १९]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9९/१५]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]
................................

"मनुस्मृती" हा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्यात २६८४ श्लोक आहेत. हा ग्रंथ कधी लिहिला गेला यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मनू एक की अनेक यावरही वाद आहेत. मनू ही व्यक्ती होती की संस्था [मठ/परंपरा] याबद्दलही भिन्न मतं आहेत. इ.स.पुर्व १७५ ते इ.स.१७५ या साडेतीनशे वर्षात हा ग्रंथ विकसीत झाला असावा असे तज्ञ सांगतात. तशा हिंदूंना प्रमाण असलेल्या एकुण स्मृती १३७ असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाच्या चर्चेत संसदेत सांगतात. त्यात सर्वाधिक महत्वाच्या म्हणून मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती या मानल्या जातात. मनुस्मृती ही शेकडो वर्षे भारतीय समाजाची जणू राज्यघटनाच होती. अगदी ब्रिटीश भारतातसुद्धा इंग्रज न्यायालये कौटुंबिक कलहांमध्ये   मनुस्मृतीच्या आधारेच निकाल देत असत. मनुस्मृती हा फक्त धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ होता. त्याला धर्मशास्त्र असेही म्हटले जाई. बाबासाहेब त्याचा धर्मिक व राजकीय प्रभाव सांगताना ते लिगल आणि पिनल कोड होते असे नेमके शब्द वापरतात. 

" सार्थ श्रीमनुस्मृती" हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा ग्रंथ वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा आहे. हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, मराठा, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायलाच हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे. "

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत. ते मी वाचलेले आहेत. पॅट्रीक वोलिव्हेल [ Patrick Olivelle] यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून मनुस्मृतीची प्रमाण [चिकित्सक] आवृ्त्ती तयार केलेली आहे. तिचे नावच "Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra," असे असून हे पुस्तक  Oxford University Press ने प्रकाशित केलेले आहे. भारतरत्न पां.वा.काणे, यांचा पाच खंडांतील, आठ भागांचा, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे 

डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. ते कार्यकर्त्यांनी वाचलेच पाहिजेत.


महामहोपाध्याय बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ ३/११]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ ६/३]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [९/१३]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [९/१५]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [९/१८]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [९/१९]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]

तर संघाच्या मनोहर भिड्यांना मनुस्मृतीचे असे राज्य पुन्हा हवेय. लक्षात ठेवा या राज्यात सर्व स्त्रिया आणि मराठा, माळी, साळी, कुणबी, आग्री, भंडारी, वंजारी, तेली हे सर्व बलुतेदार, शूद्र तसेच अनुसुचित जातींचे लोक यांना गुलामाचे जीवन जगावे लागेल. अंधारीगुहा आणि वेठबिगारी करावी लागेल.हवेय असे राज्य तुम्हाला? या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिताना मनु वा मनोहर भिडे यांच्याबद्दल संसदीय भाषाच वापरावी. शिवीगाळ करण्यामुळे मुद्दे मागे पडतात,त्यातनं आपलंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा.
विशेषत: माझ्या फेसबुक मित्रयादीतील मैत्रिणी, भगिनी, मुली, माता यांची यावर काय मतं आहेत ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0sHk873-gdTIHynAQXFnSMvawoIdspxcQeYgXosgHDQ8gAkqOlEiycF7w


-प्रा.हरी नरके, ४/५/२०२०
[लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखात व्यक्त झालेली मतं लेखकाची व्यक्तीगत मतं आहेत.]


संदर्भ-
१. सार्थ श्रीमनुस्मृती," मराठी अनुवाद, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट, गजानन बुक डॆपो, कबुतर खाना,दादर,मुंबई, भरत नाट्य मंदीर,पुणे
२. Olivelle, Patrick (translator) (2004), The Law Code of Manu, Oxford World's Classics, Oxford University Press, ISBN 978-0-19-280271-2
३. Olivelle, Patrick (translator) (2005), Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra, Oxford University Press, ISBN 978-0-19-517146-4
४. Olivelle, Patrick (translator) (1999), The Dharmasutras: The Law Codes of Ancient India, Oxford World's Classics, OUP Oxford, ISBN 978-0-19-283882-7
५. भारतरत्न पां.वा.काणे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे
*** डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे            मनुस्मृतीवरचे ग्रंथ
*** मनुस्मृतीवरील मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा चौदा महापंडितांनी केलेल्या चौदा टिका, आठ खंड, भारतीय विद्या भवन, मुंबई

Saturday, May 2, 2020

जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात, रा.स्व.संघ 19

















संघाच्या लबाड्या-४, जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात- प्रा.हरी नरके

मिरज दंगल घडवल्याचे, जोधा अकबर चित्रपटाला सांगलीत हिंसक विरोध केल्याचे आणि भीमा कोरेगाव दंगलीचे सुत्रधार असल्याचे खटले ज्यांच्यावर चालू आहेत ते आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे. रा.स्व.संघाचे १९८० पर्यंत निष्ठावंत स्वयंसेवक असलेले हे भिडे १९८४ पासून श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, ही संस्था चालवतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे वयाने ९० च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर असत्यकथन, सत्यापलाप आणि नागरिकांच्या भावना भडकावणारी वक्तव्ये केल्याचे अनेक गुन्हे आहेत.


सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे ते म्हणतात, आंबे खाल्ले की मुलं होतात. त्यांची आय.बी.एन.लोकमतवर बेधडक या कार्यक्रमात उदय निरगुडकर यांनी १ तासाची मुलाखत घेतली. ती सर्वांनी बघितली. त्यात ते जाहीरपणे म्हणाले, " बाबासाहेब मनुला मानणारे होते. मनुस्मृती वाचूनच आपण भारताची राज्यघटना लिहिली असे ते म्हणत. मनु हा महान कायदेतज्ञ होता असे त्यांनी लिहिले आहे. राजस्थानच्या विधान भवनात मनुचा पुतळा बाबासाहेबांच्या हस्ते बसवण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मनुचा गौरव केला. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते." या मुलाखतीत आणखी बरीच वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केली पण त्यावर नंतर कधीतरी बोलू. आज बाबासाहेब आणि मनुगौरव ्याची झाडाझडती घेऊ.


भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती १-  राजस्थानमध्ये मनुचा पुतळा उच्च न्यायालयाच्या प्रांगणात आहे. विधानभवनात नाही.

भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती २-  हा पुतळा २८ जुलै १९८९ ला बसवण्यात आला. त्याच्या ३३ वर्षे आधी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालेले होते. तर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद या घटनेच्या २६ वर्षे आधी म्हणजे २८ फेब्रुवारी १९६३ ला वारलेले होते. ३३/२६ वर्षे आधी निधन पावलेल्या महापुरूषांना हे भिडे मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजर करतात. हे भिडे इतकं धडधडीत खोटं बोलतात आणि त्याबद्दल त्यांना खंत, खेद वाटत नाही, त्याबद्दल ते माफी मागत नाहीत, उलट मुलाखतकार, आयबीएन लोकमत वाहिनीचे संपादक निरगुडकर नंतर गुपचुप या मुलाखतीतला भिडेंचा खोटेपणाचा पुरावा असणारा भाग गाळून ही मुलाखत यु ट्युबवर ठेवतात. गैरसोयीचे असलेले, लबाडी आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे पुरावे नष्ट करण्याची हिंदुत्ववाद्यांची ही सवय प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती आजही कायमच आहे.


पत्रकार, लेखक, इतिहासकार हा समाजाच्या स्मरणशक्तीचा रखवालदार असतो. हे लोक रखवालदार आहेत की मारेकरी यावर वेगळं बोलायची गरज आहे काय? ही मुलाखत ऎकल्यावर मी स्वत: निरगुडकरांशी बोललो होतो. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली असताना भिडे बाबासाहेबांना मनुचे समर्थक ठरवत असताना तुम्ही त्यांना महाडचा मनुस्मृतीदहनाचा प्रश्न का विचारला नाही असे मी त्यांना विचारले. ते मला म्हणाले, " भिडे आमच्याकडे आले होते ते याच अटीवर की एकही अडचणीचा प्रश्न विचारायचा नाही, प्रतिप्रश्न केला तर मी उठून जाईन, म्हणून मी गप्प बसलो." 


मी त्यांना जयपुरचा पुतळा बाबासाहेब गेल्यानंतर ३३ वर्षांनी बसल्याचे सांगितल्यावर त्यांनी माझा तसा बाईट घेतला. तो त्यांच्या वाहिनीवर दाखवलाही. जयपुरला आयबीएनची टिम पाठवून पुतळ्याचे फुटेज आणले, तेही दाखवले. पण लोक हे सगळे विसरल्यावर भिडेंचा खोटेपणा सांगणारा मुलाखतीतला भाग वगळून टाकला.


हे लिहून उपयोग काय असे काहीजण मला विचारतात. उपयोग हा की लिहून हे पुरावे जपले पाहिजेत नाहीतर हे लोक दिवसाढवळ्या पुरावे नष्ट करतात आणि इतिहासाचे विकृतीकरण / ब्राह्मणीकरण करतात.

३. भिंड्यांचा मी ताबडतोब समाचार घेतला होता.
" भिडेंचं विधान बिनबुडाचं - हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं."


https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html


४. म्हणे बाबासाहेब मनुचे समर्थक होते. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस मनुचे वाभाडॆ काढणार्‍या, मनुस्मृती जाळणार्‍या, राज्यघटनेच्या १३ कलमाद्वारे मनुस्मृती नाकारणार्‍या बाबासाहेबांना मनुवादी म्हणूच शकत नाही. भिडे मात्र म्हणतात. किळसवाणा आणि त्यांच्या वयाला, नेतृत्वाला, संस्कारांना न शोभणारा भाग म्हणजे मनुस्मृती वाचून मी राज्यघटना लिहिली असे बाबासाहेब म्हणायचे असे भिडे सांगतात. मनुस्मृती जाळून मी राज्यघटना लिहिली असे म्हणणारे बाबासाहेब चक्क उलटे करून, विकृत करून भिडे सांगतात, हे सत्यवचन आहे? ही देशभक्ती आहे? हे भिडेंच्या देश, धर्म, देवाला चालते? की हाच त्यांचा धर्म आहे? हीच त्यांची संस्कृती आहे का?

 बुद्ध कुचकामाचा म्हणे!-

५. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले, तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांना मानता का?" यावर होय असे भिडे म्हणाले नाहीत. विषयांतर करून भलतेच बोलत राहिले. यावरून काय ते सिद्धच होते. परदेशात बोलताना मोदींनी बुद्धाचा देश असा उल्लेख केल्याची बातमी आल्यावर भिड्यांनी जाहीरपणे मुलाखत देऊन सांगितले, " बुद्ध काही कामाचा नाही. मोदी चुकीचे बोलले." एकाबाजूला ते मोदींच्या महाआरत्या ओवाळत होते. पुण्यात्मा काय, संत काय, धर्मराजा काय, निष्कलंक काय आणि ऋषीमुनी काय! एकही विशेषण त्यांनी शिल्लक म्हणून ठेवले नाही. इतकी किळसवाणी भाटगिरी! जग भारताला बुद्धाचा देश म्हणूनच ओळखते भिडेमहाशय! तुम्ही कितीही द्वेश करा बुद्धाचा, कितीही आकस बाळगा, कितीही तिरस्कार करा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. हा देश बुद्धाचा होता, आहे, राहिल!

दंगली घडवणं हीच यांची महान देशभक्ती-
६. हिंदुत्ववाद्यांना जागतिक पातळीवरचा सोडा, अ.भा. पातळीवरचाही विचारवंत, प्रज्ञावंत, दार्शनिक घडविता आलेला नाही. म्हणतात ना, वासरात लंगडी गाय शहाणी, तशा अर्धशिक्षित तरूण, बेरोजगार आणि संमोहित बहुजन मुलांची डोकी भडकाऊन त्यांना दंगली करायला लावणं हीच यांची महान देशभक्ती. हिंदुत्वाच्या तयार केलेल्या बाजारगप्पा, बुटक्या लोकांची स्तोत्रं, बकवास त्यागाच्या विक्रमवेताळ कहाण्या आणि परधर्मद्वेश यांच्या जोरावर यांची दुकानं चालतात. विधायक, निरामय, निकोप आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारं एकही काम यांच्या खात्यावर आजवर जमा नाही!

स्वातंत्र्याच्या चळवळीत हे नुस्तेच गैरहजर नव्हते, तर यांचे बापाजादे त्यावेळी ब्रिटीशांच्या पोटार्थी चाकर्‍या करीत होते. जनरल डायरच्या सोबत निष्पाप भारतीयांवर गोळीबार करायला आघाडीवर होते.रावसाहेब, रावबहादूर असल्या पदव्या मिळवण्यासाठी ब्रिटीशांचे बूट चाटत होते. ते आता आम्हाला देशभक्ती शिकवताहेत! देश म्हणजे काल्पनिक देवीचा फोटो नसतो. हाडामासाची माणसं म्हण्जे देश असतो. यांची देश, देव आणि धर्माची भाषा म्हणजे निव्वळ पोपटपंची. बासुंदीकथा. मनाचे श्लोक. आंबाभुर्जी. स्त्रिया, बहुजन आणि कष्टकर्‍यांना उपाशी ठेऊन दक्षिणेत मिळवलेली.

https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1xwd0NiWLH3HilVmmEWcY7kyAdb6DIOAVZ31TTZj69mXHwkO0M3OB8q5E

-प्रा. हरी नरके, ०३/०५/२०२०

संदर्भासाठी पाहा:

१. https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/saransh/dr-br-ambedkar-many-and-sambhaji-bhide/
बाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे!, July 17, 2018, विजय चोरमारे in सारांश | राजकारण, history
..............................................................

२. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
लोकसत्ता ऑनलाइन | July 17, 2018 06:55 am
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
विशिष्ट आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता,अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधानं करुन सतत चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.

या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. याशिवाय, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावरही संभाजी भिडे गुरूजी ठाम राहिले, गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असंही ते म्हणाले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/
....................................


३. भिडेंचं विधान बिनबुडाचं -हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं.
https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html
...................................................
४. https://www.sarkarnama.in/dr-babasaheb-ambedkar-never-praised-manu-hari-narke-critisizes-bhide-guruji-26176
..................................................
५. News18 Lokmat
Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar On Bhima Koregaon violence आय बी एन लोकमत
https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60  Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar
..................................................................................

६. https://www.bbc.com/hindi/india-48720079
'मोदी के गुरु' संभाजी भिड़े के नासा विज्ञानी होने का सच
फ़ैक्ट चेक टीम, बीबीसी न्यूज़ 22 जून 2019

दावाः संभाजी भिड़े नासा की सलाहकार समिति में काम करते थे और उन्हें विज्ञान के क्षेत्र में 100 से ज़्यादा सम्मान मिल चुके हैं. संभाजी भिड़े एटॉमिक फिजिक्स में गोल्ड मेडलिस्ट हैं.

इतना ही नहीं, उनके बारे में यह भी कहा जा रहा है कि वो नासा की सलाहकार समिति में काम करते थे, 67 डॉक्टरेट और पोस्ट डॉक्टरेट रिसर्च में गाइड रहे थे, अब महाराष्ट्र में समाज सेवा कर रहे हैं और उनके 10 लाख से भी ज़्यादा फॉलोअर्स हैं.

फ़ैक्ट चेक:बीबीसी ने सोशल मीडिया पर फैलाई जा रही इस ख़बर की पड़ताल की. संभाजी भिड़े के संगठन के प्रवक्ता नितिन चौगुले ने इन दावों को ग़लत बताया है. पुणे यूनिवर्सिटी ने भी उनसे संबद्ध एक कॉलेज में भिड़े के प्रोफ़ेसर या स्टूडेंट होने की जानकारी न होने की बात कही

..............................................
7. https://www.youtube.com/watch?v=85g4AlFOLIo

#SambhajiBhide #GujaratiNews #TV9News
Buddha is of no use to the world: Sambhaji Bhide sparks yet another controversy| TV9News

https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60

.................................................

8. http://thewirehindi.com/60305/rajasthan-high-court-statue-of-manu/
मनु की प्रतिमा को हाईकोर्ट परिसर से हटाने की याचिकाएं वर्ष 1989 से लंबित हैं, जिन पर 2015 के बाद से सुनवाई नहीं हुई है. सोमवार को औरंगाबाद की दो महिलाओं के प्रतिमा पर कालिख पोतने के बाद मामला फिर गर्मा गया है.

इस घटना के बाद पिछले 29 साल से चल रहा विवाद फिर से ताज़ा हो गया है. गौरतलब है कि राजस्थान हाईकोर्ट में मनु की प्रतिमा की स्थापना 28 जुलाई, 1989 को हुई थी. इसे राजस्थान उच्च न्यायिक सेवा एसोसिएशन ने लॉयन्स क्लब के आर्थिक सहयोग से लगवाया था.

उस समय इसका खूब विरोध हुआ. हाईकोर्ट ने एक प्रशासनिक निर्णय के तहत इसे न्यायालय परिसर से हटाने का निर्देश भी दिया, लेकिन विश्व हिंदू परिषद के नेता आचार्य धर्मेंद्र ने इस फैसले को चुनौती देते हुए याचिका दायर कर दी.

इस पर सुनवाई करते हुए हाईकोर्ट के तत्कालीन न्यायाधीश महेंद्र भूषण ने प्रतिमा हटाने पर अंतरिम रोक लगा दी. उन्होंने मामले को वृहद पीठ को भेजते हुआ कहा कि अंतिम फैसला आने तक प्रतिमा हटाने पर लगी रोक बरक़रार रहेगी.

हैरत की बात है कि वृहद पीठ ने इस मामले का निपटारा करने की बजाय इसे ठंडे बस्ते में डाल दिया. इस दौरान प्रतिमा के पक्ष और विपक्ष में कई याचिकाएं ज़रूर दायर हुईं.

2015 में तत्कालीन मुख्य न्यायाधीश सुनील अंबवानी ने पहली बार इस मामले में रुचि ली. उनकी अगुवाई में वृहद पीठ ने 13 अगस्त, 2015 को मामले की सुनवाई की, जो इतनी हंगामेदार रही कि इसके बाद आज तक इस पर जिरह नहीं हो पाई है.

हुआ यूं कि प्रतिमा के विरोध में याचिका दायर करने वाले पीएल मीमरोठ की ओर से अधिवक्ता अजय कुमार जैन ने जैसे ही हाईकोर्ट परिसर में मनु की प्रतिमा पर सवालिया निशान लगाना शुरू किया, बड़ी संख्या में वकीलों ने उनकी मुखालफत शुरू कर दी. इनमें से कई जोर-जोर से चिल्लाने लगे.

न्यायाधीश सुनील अंबवानी ने वकीलों को शांत करने के काफी प्रयास किए, लेकिन उन्हें इसमें कामयाबी नहीं मिली. अंत में वे उठकर चले गए. इस दिन के बाद इस मामले में आज तक सुनवाई नहीं हुई है. हाईकोर्ट के वरिष्ठ वकीलों की मानें तो यह मामला मधुमक्खी के छत्ते जैसा है, जिसमें शायद ही कोई न्यायाधीश हाथ डाले.

याचिकाकर्ता पीएल मीमरोठ कोर्ट के इस रवैये से परेशान हैं. वे कहते हैं, ‘न्याय में देरी एक तरह से अन्याय होता है. इस मामले को कोर्ट में चलते हुए 29 साल हो गए हैं. कोर्ट न्याय करने की बजाय कहता है कि जब इस विषय पर किसी प्रकार का जनाक्रोश नहीं परिलक्षित होता है तो बेवजह गड़े मुर्दे क्यों उखाड़े जा रहे हैं.’






......................

Tuesday, April 28, 2020

महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?, रा.स्व.संघ 13














महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?- प्रा. हरी नरके

२००७ साली मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकले. सनातन प्रभातमध्ये बातमी आली की महात्मा फुले हे देशद्रोही होते असे भिडे म्हणाले. ही मुक्ताफळे प्रकाशित झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. ओबीसी म्हणजे तमाम थंड आणि बत्थड लोक. कोणाचीच काहीही प्रतिक्रिया दिसली नाही.

त्याच दिवशी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकरांचा निवृत्तीसमारंभ होता.त्यांनी आग्रहाने बोलावले म्हणून मी गेलो. पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके, [काँग्रेस] राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, [राष्ट्रवादी] भाजपाचे पांडुरंग फुंडकर, आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील असे अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. माझ्या भाषणात मी मनोहर भिड्यांच्या महात्मा फुले विषयक संतापजनक वक्तव्याचा ती बातमी सर्वांना दाखवून जाहीर निषेध केला. मात्र निरोपाच्या जल्लोशात त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये कोणीही नव्हते.

मी नंतरही अनेकांशी बोललो. उपयोग झाला नाही. एकहाती लिहित राहिलो. बोलत सुटलो. ज्यांच्या विरोधात बोलत-लिहित होतो त्या भिड्यांनी मात्र खुन्नस ठेवली.

बहुजन समाजाचं एकूण खूप कठीण प्रकरण आहे. जिथं जोतीराव-सावित्रीबाईंची सून [दत्तक पुत्र यशवंतची बायको] पुण्यात खडक माळ आळीत बेवारस म्हणून मेली. तिची मयत पुणे नगरपालिकेने केली. हाकेच्या अंतरावर जेधे मॅन्शन म्हणजे महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचे पुढे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर झाले होते, त्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे यांचे निवासस्थान तसेच कार्यालय होते. तेव्हा १९३० साली चळवळ जोरात होती.

त्यांनी तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले असेल असे मी म्हणणार नाही. नसेल आले लक्षात. तीही भिक मागून जगली. विनातक्रार मरून गेली. तिच्या पोटच्या लग्न झालेल्या मु्लीनं जिथं आईच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली नव्हती, तिथं इतर कुणी का मदतीला यावं ना? बहुजन समाज बिचारा आपापले संसार, देवदेव, बायकामुलांचे वाढदिवस आणि कशाकशात बिझी असतो. त्याला तरी काय दोष देणार ना? सगळे लोक रोजीरोटीच्या शोधात, संपुर्ण थंड, आत्ममग्न, स्वत:चा इतिहास माहित नसलेला, कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला, मुर्दाड समाज. बहुजन हा या पृथ्वीतलावरचा विलक्षण प्राणी आहे.

त्यांच्या मेंदूत निसर्गाने मेमरी इरेज [ डिलीट] केलेले सॉफ्टवेअर बसवलेले असल्याने त्यांना विस्मरणाचे अतोनात वरदान लाभलेले असते.

या देशात जे स्वत:ची जात सोडून राबतात, त्यांच्या मदतीला लोक येतात का? की घर का न घाट का अशी त्यांची अवस्था होते? फुल्यांचा किंवा शिंद्यांचा विषय निघाला की लोक म्हणतात, बघतील त्यांचे समाज. बघा ना महर्षि वि.रा.शिंदे यांना आपण किती सहज विसरलो. राजर्षि शाहू छत्रपतीही पंधरावीस वर्षांपुर्वीपर्यंत दु्र्लक्षितच तर होते.

फुलेही बाबासाहेबांनी जवळ केले म्हणून आज जे काही दिसतात, अन्यथा आजवर आपला समाज फुल्यांन ठार विसरूनसुद्धा गेला असता. लोकांचंही काय चुकतंय? फुल्यांनी काय माळी महासंघ काढला होता? नाही ना! उलट माळी म्हणतात, त्यांनी आमच्यासाठी कुठं काय केलं? हे खरंय की फुल्यांनी एकट्या माळ्यांसाठी काहीच केलं नाही. कधीकधी वाटतं फुले तुम्हारा तो चुक्याच.

माणसानं कसं आपापल्या जातीपुरतं बघावं. खरंतर स्वत:पुरत बघावं. आपलं घर, आपला संसार. बायकापोरं. बाकी सगळं झूट. समाज, कृतज्ञता, भविष्य,... गये भाडमें.













तर हेच आंबापुत्र, मनुसमर्थक मनोहर भिडे मोदी-फडणविसांना परमवंदनीय आहेत. फडणवीस-मोदी पाच वर्षे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायचं गाजर दाखवित राहिले. २०१९ च्या निवडणुकीआधी फडणवीस सरकारनं म्हणे केंद्राला शिफारस केली, महात्मा फुले नी स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून. द्यायचं नव्हतंच. फक्त निवडणूक स्टंट करायचा होता. आजच एक मित्र सांगत होता, कोणा संघोट्या उपाध्यायनं म्हणे त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. एकट्या सावरकरांना भारतरत्न द्या. तो देशद्रोही फुले त्यांच्या सोबत नको.


प्रा.हरी नरके, २९/४/२०२०