Showing posts with label साहित्य-संस्कृती. Show all posts
Showing posts with label साहित्य-संस्कृती. Show all posts

Wednesday, June 24, 2020

एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत?

Pi Vitthal यांची खालील पोस्ट पाहावी.
" काही लोकांचे आपल्याविषयीचे पूर्वग्रह इतके पक्के असतात की, आपल्या कोणत्याच दखलपात्र कृतीला, सर्जनशील निर्मितीला प्रतिसाद देण्याची त्यांची इच्छा नसते. म्हणजे फेसबुकच्याच भाषेत सांगायचं तर 'कॉमेंट' वगैरे तर सोडाच ; पण साधं 'लाईक' करण्याचं सौजन्यही ते दाखवत नाहीत. आणि आपण तर त्यांना वर्षानुवर्ष जवळचं समजत राहतो. (इतरांविषयीचा एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत? )
दुर्दैवाने अशी माणसं आपल्या भोवतालात खूप असतात. त्यात आपल्या जवळचे 'मित्र' असतात. काही 'आदरणीय' ज्येष्ठ असतात. काही तथाकथित 'थोर' असतात.
तर असो. सर्वांचं भलं होवो. !
तुमचं मत यापेक्षा वेगळं आहे? 😊 - पी. विठ्ठल "

.......

मी त्यांच्या भिंतीवर दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
पि.विठ्ठल: तुमची पोस्ट आणि त्यावरच्या बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या.
दोनतीन वर्षांपुर्वी मीही अशीच खंत मांडणारी पोस्ट केली होती, तेव्हा असे लक्षात आले की * एकुणच दाद देण्याच्या बाबतीत पंजाबी लोक, उत्तरेतले लोक आघाडीवर आहेत. मराठी फारच कद्रू आणि कंजूष लेकाचे.


१) काही अभिरूचीसंपन्न मित्रमैत्रिणी जरी लाईक/कमेंट देत नसले तरी ते वाचत असतात. त्यांच्या लक्षातही असते. भेटल्यावर सांगतातही.

२) तुमच्या पोस्टवर व्यक्त झालेले, या भावनेशी सहमत असलेले यांची संख्या कितीतरी मोठी आहे. ( ४९३ लाईक/३१४ कमेंट ) मग त्यांची हीच तक्रार असूनही ते तरी एरवी का बरं इतरांना लाईक/कमेंट देत नसतील?


३) वाचलेले आवडले की उत्स्फुर्तपणे दाद देणे हा माणसाचा सहज भाव आहे. ती दाबणारे मला तरी निरामय/निकोप मनाचे वाटत नाहीत. अशी दाद दाबून ठेवण्यासाठी या मंडळींना फार मोठी मानसिक तयारी करावी लागत असेल. दाद देण्याची कळ दाबून ठेवायचा त्रासही होत असेल. त्यांच्या या त्रासाचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा.

४) माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझ्या एका मित्राने त्याच्या शंभर प्रती विविध नामवंतांना पाठवल्या होत्या. ज्यांना हे भेट पुस्तक मिळाले त्यातल्या पाचदहा जणांनीही दाद सोडा साधी पोचही दिली नाव्हती. पण पुढे हे पुस्तक गाजले.त्याला अनेक पुरस्कार मिळाले, नामवंतांनी लिहिलेली परीक्षणे आली, त्यानंतर मात्र त्याच्याकडे बघण्याचा याच लोकांचा दृष्टीकोन बदलला.


५) मात्र दुसरीकडे माझा लेख वाचून तू यावर पुस्तक लिही असे कळवणारे पु.ल.होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुस्तकावर इतकं भरभरून बोलले की त्या कार्यक्रमात पुस्तकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या. पुढे पुरस्कार आणि परीक्षणांमुळे महिनादीड महिन्यात तीन हजारांची आवृत्ती संपली. मी जयवंत दळवींना पुस्तक द्यायला गेलो तर त्यांनी ते आधीच विकत घेऊन वाचलेले होते, असेही सुखद अनुभव आहेतच.


६) विश्राम बेडेकरांची रणांगण प्रकाशित झाल्यानंतर ती बरी आहे असे म्हणणारा कोणीही नव्हता. अशी २०/२५ वर्षे गेली. मग पहिला निघाला. दुसरा..तिसरा.. निघत गेले. आज रणांगण किती उंचीवर आहे बघा.


७)सार्वजनिक जीवनातली बधीरता,संवेदनहिनता खरंच वाढतेय की तशी फक्त तक्रार वाढतेय, शोधावं लागेल.


८) आणखी खूप लिहिता येईल. पण त्यातले बरेच मुद्दे येऊन गेलेत. खरंच चांगलं लिहिलंय अनेकांनी. ते मुद्दे रिपिट न करता त्यांना पाठींबा देतो.


* उलट मी फारच जास्त लोकांना भरभरून दाद देतो अशी तक्रार माझे काही मित्र करत असत. आजही करतात. मी म्हणे सर्वांनाच चांगले म्हणतो, त्यामुळे तुझी दाद सवंग आहे असं एक जवळचा समीक्षक-ग्रंथविक्रेतामित्र मला म्हणतो. असेलही.


मित्रवर्य अशोक नायगावकरांच्या एका किश्याने समारोप करतो. रस्त्यावर एकजण पकडा पकडा असं ओरडत असतो. पळणाराला लोक पकडतात. कायरे काय चोरलंस म्हणुन विचारतात. तो म्हणतो, मी काहीच चोरलं नाहीय, मागचा धापा टाकत पोचतो. लोक म्हणतात, हा तर चोरी केलीच नाही म्हणतोय. धापा टाकणारा म्हणाला खरंय. चोरलं नाही पण त्याची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता लेकाचा! कविमित्रांनो, किस्सा माझा नाही,कवी अशोक नायगावकरांचा आहे. तेव्हा रागावू नका.

-प्रा. हरी नरके,
२४/६/२०२०

Saturday, May 30, 2020

रसाळ आणि लोभस ग. प्र. प्रधान --प्रा. हरी नरके


महाराष्ट्र विद्यालयात शिकत असताना लिहिलेला पुणे दर्शन हा प्रबंध दाखवायला मी प्रा. ग. प्र. प्रधान यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. तेव्हा ते विधान परिषदेवर आमदार होते. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अतिशय मायेनं स्वागत केलं. पाणी, सरबत आणि सोबत एक केळी त्यांनी माझ्या समोर आणून ठेवली. माझा प्रबंध आस्थेवाईकपणे चाळला. २ दिवसांसाठी माझ्याकडे ठेव मी वाचून त्यावर तुला अभिप्राय देतो असं म्हणाले.


मी २ दिवसांनी गेलो तेव्हा त्यांनी २०० पृष्ठांचा प्रबंध वाचून त्याच्यावर अभिप्राय लिहून ठेवलेला होता. एका शाळकरी विद्यार्थ्याने केलेल्या या संशोधनपर लेखनाचे त्यांनी अभिप्रायात मनापासून कौतुक केलेले होते.


त्यांचे हाजीपूर हे युद्धकथांचे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. माझी माहिती घेतली आणि मी एका कबरस्थानात काम करुन शाळा शिकतो हे ऎकल्यावर ते म्हणाले, "कसलीही मदत लागली तर संकोच न करता मला सांगायला ये. तुला दरवर्षी वह्या-पुस्तकांची मदत करायला मी माझ्या घराशेजारच्या मंडई मंडळाला सांगतो." त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना माझ्यासमोरच तसा फोनही केला.


त्यानंतर अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. त्यांचे बोलणे अतिशय रसाळ आणि लोभस होते. दरवेळी एक नविन पुस्तक ते मला द्यायचेच.


नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत तुरूंगात मला राहायला मिळाले. सगळेच त्यांना मास्तर म्हणायचे. मास्तर चहाचे शौकीन होते. मात्र इतर कसलेही व्यसन त्यांना नव्हते. आजकाल कार्पोरेटरसुद्धा किती भाव खातात. मास्तर मात्र आमदार असूनसुद्धा इतके साधे, प्रेमळ आणि विनयी होते की ते आमदार आहेत यावर विश्वासच बसू नये. ते साधनेचे संपादक असताना त्यांनी माझ्याकडून काही लेख लिहून घेतले. ते ठळकपणे छापले. ‘मी भोळाभाबडा, प्रसंगी काहीसा बावळट आहे असे लोकांना वाटते. खरं तर त्यांचा हा समज कायम ठेवण्यात फायदा समजलेला मी एक धूर्त माणूस आहे’ असे ते म्हणत. वाचन, लेखन आणि वाचलेल्यातील जे आवडले ते इतरांना सांगणे, हा मास्तरांचा परिपाठ होता.


त्यांना मी महात्मा फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करायला सांगितले. त्यांनी त्या कविता (अखंड) परत वाचल्या आणि मला भेटायला बोलावले. मला म्हणाले, " अरे ह्या कविता म्हणजे आग आहे आग. मला त्यांचा अनुवाद करायला मिळणे हा माझा सन्मान आहे. मात्र माझा पिंड मवाळ आहे. समन्वयवादी आहे. मी या जहाल कवितांना न्याय देऊ शकणार नाही. मुळात मला ही आग झेपणार नाही. त्यासाठी तसाच कणखर माणूस हवा." त्यांनी मला त्यासाठी एक नावही सुचवले. मी त्यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांना वेळ नसल्याने ते अनुवाद करू शकले नाहीत. त्यानंतर मी भालचंद्र नेमाडे सरांना ह्याकामी विनंती केली.


आपल्या भाषांतरविषयक मर्यादा इतक्या नेमकेपणाने समजलेले किती लोक असतात? प्रधानमास्तर म्हणजे नितांत सोज्वळ, पवित्र आणि सौम्य प्रकृती. साक्षात शुचिता, आस्था आणि करूणेचं प्रतिकच! दहा वर्षांपुर्वी मास्तर गेले. २९ मे २०१० रोजी त्यांचे निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते.






-प्रा. हरी नरके, ३०/५/२०२०

Wednesday, May 27, 2020

भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन- प्रा. हरी नरके














भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन- प्रा. हरी नरके
शाळकरी वयात कोसला वाचली. खोलवर भिडली कोसला. लागोपाठ तीनदा वाचली. कोसलानं केलेलं गारूड त्यानंतर तिची कितीतरी वाचनं झाली तरी आजही उतरलेलं नाही. जी पुस्तकं, जे लेखक त्या वयात खूप आवडले होते त्यातले बरेचसे आता आवडत नाहीत. फार थोडे लेखक याला अपवाद आहेत. तेव्हाही आवडले, आजही आवडतात या यादीत नेमाडे अव्वल आहेत.


खरं तर मी नेमाडे वाचणार नव्हतो. कारण त्याकाळात पुल हे माझे दैवत होते. नेमाडे त्यांच्यावर टिका करतात म्हणून मी नेमाडेंवर फुली मारलेली होती. एकदा पुलंशी तावातावाने बोलताना मी नेमाडेंबद्दल काहीतरी बोलून गेलो. भाई म्हणाले, " हरी, तू नेमाडेंची कोसला वाचलीयस का?" मी म्हटलं, "नाही वाचली आणि वाचणारही नाही." ते म्हणाले, "असं का?"  मी त्यांना कारण सांगताच ते हसायला लागले. त्यांनी कपाटातून कोसला काढली आणि माझ्या हातात ठेवली. म्हणाले, " ही आधी वाच नंतर आपण बोलू नेमाडेंवर."


मी कोसला वाचली आणि नेमाडेंच्या प्रेमात पडलो. माझा भाई ( पु.ल. देशपांडे ) बद्दलचा आदर वाढला. भाई म्हणाले, "त्यांनी माझ्यावर किंवा आणखी कोणावरही टिका केली तरी त्यांची कोसला ही मराठीतली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे हे माझं मत कधीही बदलणार नाही. तुझ्या पुढच्या पिढीने आमच्या वादात पडू नये. हे वाद तात्कालिक असतात. काळाच्या रेट्यापुढे ते आपोआप मोडीत निघतात. टिकतं ते फक्त श्रेष्ठ साहित्य!"


आज आजूबाजूला अनेक किडके साहित्यिक आणि समीक्षक बघतो तेव्हा पुलंच्या मनाच्या मोठेपणाची आठवण येते.


पुढे मी बिढार, जरिला, झूल, हुल याही कादंबर्‍या वाचल्या. मनापासून आवडल्या. त्या सुनिताताईंना फारशा आवडलेल्या नव्हत्या. मला मात्र आवडल्या. भिडल्या. महत्वाच्या वाटल्या.

महाराष्ट्रातील जातीजमातींच्या ताब्यातील शिक्षणसंस्था आणि तिथलं ओंगळवाणं राजकारण यांचा नेमाडेंनी घेतलेला वेध स्तिमित करतो. जातीयता, प्रादेशिकता, शिक्षणाचा बाजार आणि मराठीच्या विविध बोलींची रसरशीत रूपं यांचा जो गोफ या कादंबर्‍यांमध्ये नेमाडॆंनी विणलाय तसं इंद्रधनुष्य मराठीतल्या अन्य लेखकांना क्वचितच जमलंय.


नेमाडे हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. माझ्या दृष्टीने ते थोर आहेत कारण त्यांना अनंत पैलू आहेत.


पहिलं, नेमाडे आजचे लेखक आहेत. अतिशय दणकट लेखक आहेत. पाचदहा वर्षात लेखक मागे पडतात, विसरले जातात. आज ५७ वर्षे होऊनही नेमाडेंची कादंबरी शिळी होत नाही. लोकप्रियता आणि विद्वतमान्यता असे दोन्हीही साध्य केलेले लेखक मराठीत चारपाचसुद्धा नाहीत. नेमाडे त्यात अग्रभागी आहेत.


दुसरं, जातीव्यवस्थेवर टिका करणारे मोजके का होईना लेखक मराठीत आहेत. पण जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारे आणि स्वत:च्या जातीचीही सालटी काढणारे एक महात्मा जोतीराव फुले आणि त्याच जातकुळीचे दुसरे नेमाडे आहेत. ही यादी आणखी वाढवायची झाली तर रंगनाथ पठारे सोडले तर आज तरी मला पहिल्या श्रेणीतले कुणी दिसत नाहीत.


स्वत:च्या जातीवर टिका करायला फार मोठे धैर्य आणि नैतिकबळ असावे लागते, ते नेमाडेंमध्ये जबरदस्त आहे. असे बळ असलेले काही लोक आजूबाजूला जरूर आहेत पण ते प्रथम श्रेणीचे ललित लेखक नाहीत.


तिसरे कारण नेमाडे द्रष्टे आहेत. त्यांचा आवाका लांब पल्ल्याचा आहे. त्यांची जातीव्यवस्थेबद्दलची मांडणी वादग्रस्त आहे. त्यांची इतर बरीच मतं अनेकांना पटत नाहीत. पण ती मांडण्याचं धाडस नेमाडेंमध्ये ठासून भरलेलं आहे. याविषयावर स्वतंत्रपणे केव्हातरी लिहायला हवे.


आजची भारतीय जातीव्यवस्था नेमाडेंना जितकी आरपार समजलीय तितकी समजलेले विचारवंत क्वचितच दिसतात.


माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर नेमाडेसरांचे पोस्टकार्ड मला आले. आपल्या आवडत्या लेखकाने आपले पुस्तक वाचावे आणि त्याबद्दलचा अभिप्राय पत्राद्वारे कळवावा याचा आनंद अपार असतो. त्याच महिन्यात कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या सेमिनारमध्ये नेमाडेसरांची भेट झाली.


मी त्यांना भेटलो. माझी ओळख सांगितली. मी त्यांच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी मला मिठी मारली. त्या भेटीत नेमाडेसरांचे रसायन नेमके काय आहे ते थोडेथोडे उलगडायला लागले. गेली ३१ वर्षे त्या केमिस्ट्रीचे नवनवे पदर उलगडतोच आहे. आजही हे काम पुर्ण झालेले नाही.


दरम्यान टिकास्वयंवर आले. त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. लोकसत्ताकार अरूण टिकेकरांनी छाछू वादाला पुरस्कार नावाचा अग्रलेख लिहून त्यावर टिकेची झोड उठवली. टिकेकरसरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असूनही मी या अग्रलेखावर खरपूस टिका केली. टिकेकरांशी तावातावाने वादही घातला. त्यातनं टिकेकरांची नाराजीही ओढवून घेतली.


बहुप्रतिक्षित हिंदू आली आणि तुफान गाजली. मला हिंदूही आवडली. त्यानंतर सरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

नेमाडॆंवर जळणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. खरंतर अशा भरपूर जळाऊ लाकडाच्या वखारीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. माझा एक मित्र तर दर महिन्या दोन महिन्याला काहीही बादरायणी संबंध जोडून नेमाडॆंवर फेसबुकवर बरसत असतो. नेमाडॆंनाही वादविवाद आवडतात. तेही सुरसुरी आल्यासारखे त्यात भाग घेतात. नेमाडॆंमध्ये अफाट उर्जा आहे.

मध्यंतरी आम्ही त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार दिला. तो स्विकारायला ते प्रतिभाताईंसमवेत सहकुटूंब सवड काढून आले. सलग तीन दिवस सरांचा सहवास लाभला. मोकळ्याढाकळ्या गप्पा हा सरांचा विशेष.



मी त्या उभयतांना फुलेवाडा दाखवला. सुमारे तासभर सर त्यात रमून गेले.


कार्यक्रमाच्या स्टेजवर चढताना माझे पत्रकारमित्र अद्वैत मेहता यांनी सरांची पुरस्काराबाबतची भुमिका आम्हाला हवीय, तेव्हढी घेऊन देण्याची मला गळ घातली. नेमाडेसर मिडीयापासून दहा हात दूर असतात. मी त्यांना बाईट देण्याची विनंती करताच त्यांनी ती ताबडतोब फेटाळून लावली.


मला म्हणाले, तुला कल्पना नाही, हे पत्रकार लोक फार चावट असतात. त्यांना तिसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीत रस असतो. पुरस्काराबाबबतची भुमिका हा फक्त त्यांचा बहाणा आहे. या डॅंबीश लोकांना मी कधीच जवळ करीत नाही.

अद्वैतच्या भरोश्यावर त्यांना मी पुन्हापुन्हा विनवत राहिलो. शेवटी सरांना माझी कणव आली. ते वाहिन्यांशी बोलायला तयार झाले. पण मला म्हणाले, त्यांना सांग, मी प्रत्येकाशी वेगवेगळे बोलणार नाही, सगळ्यांना एकच बाईट देईन.

सगळे तयार झाले. सर महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्या विचारातील क्रांतिसुत्रे यावर भरभरून  बोलले. बाईट संपला. आम्ही जायला वळलो. चार पावले गेलो. इतक्यात जाताजाता एकाने विचारले, " सर, साहित्य संमेलन तोंडावर आलेय, जाणार का?" नेमाडेसर उसळले आणि चिडून म्हणाले, मी असल्या रिकामटेकड्यांच्या उद्योगाकडे फिरकत नसतो."

पुरस्कार वितरण समारंभ अप्रतिम झाला. सरांचे समाजशास्त्रज्ञ महात्मा फुलेंवर अफलातून भाषण झाले. पण त्यातले अवाक्षरही कुणी दाखवले नाही. बहुतेक सगळ्या वाहिन्यांनी साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग यावर दिवसभर दळण दळले.


असा काही वाद रंगवला की त्यावर मग आजचा सवाल आणि बेधडक, आणि कायकाय कार्यक्रम घेतले गेले. नेमाडॆसर अशा चर्चांना वाहिन्यांवर जात नाहीत म्हणून मग गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसे मला बोलावले गेले. अर्थातच मी वाहिन्यांवर गेलो नाही.

पण माझ्यामुळे सरांवर हा प्रसंग ओढवल्याने मला फार अपराधी वाटले. सर मजेत होते. मला म्हणाले, "सोड रे, काय घेऊन बसलास? कोण बघतो या  ****ट  वाहिन्या. तुला सांगतो, म्हणूनच मी बोलत नव्हतो. तर तुला त्यांचा फार पुळका. एक सांगतो. पत्रकार हा कधीही कोणाचाही मित्र नसतो. तो फक्त पत्रकार असतो, हे यापुढे कायम लक्षात ठेव."


मराठीला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे हा माझा लेख लोकराज्यमध्ये प्रकाशित झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिव विजय नहाटा आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.

मी नेमाडेसरांना भेटलो. त्यांचा प्रमाण मराठीला ( पुणेरी) अभिजात दर्जा मिळायला विरोध होता. मी माझी भुमिका सांगितली. मी वर्‍हाडी, खानदेशी ( अहिराणी ) कोकणी, मराठवाडी आदी ५२ बोलीभाषा हीच खरी मराठी असे सांगताच सर खुलले. त्यांनी सगळे सहकार्य देऊ केले. पुढे आमचे अध्यक्ष पठारेसरही त्यांचे निकटवर्तीय असल्याने आम्ही नेमाडेसरांना याबाबतीत भरपूर त्रास दिला. खूपदा भेटलो. चर्चा केल्या.


तासनतास सरांसोबत बैठका झाल्या. नेमाडेसरांची मराठीनिष्ठा इतकी बावन्नकशी आहे की, ते प्रत्येक बैठकीला येताना आमचा अभिजातचा मसुदा वाचून त्यावर टिपणं काढून मगच बैठकीला यायचे. त्यांच्या सुचना अत्यंत मौलिक, नेमक्या आणि शास्त्रशुद्ध असायच्या.

आम्हाला आमच्या मसुद्याचे त्याबरहुकुम फेरलेखन करावे लागायचे. हे करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. एव्हढे सगळे करूनही आभारात त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नको अशी नेमाडेसरांनी आम्हाला तंबी दिली. त्यामुळे आमचाही नाईलाज झाला. आमच्या अभिजात मराठी प्रकल्पाला सर्वाधिक मदत, मार्गदर्शन आणि अचुकता येण्यासाठीचे सहकार्य जर कोणी केले असेल तर ते नेमाडेसरांनी केले.


पण त्यांनी आमच्याकडून आधीच कबूल करून घेतल्याने आम्ही त्यांचा साधा आभारातही उल्लेख करू शकलो नाही. पुढे हा अहवाल आम्ही राज्य शासनामार्फत भारत सरकारला सादर केला. तो छाननीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला गेला. तिथे नेमाडेसरांनी मराठीची बाजू इतक्या जोरकसपणे मांडली की या अकादमीच्या भाषा समितीने एकमताने हा अहवाल स्विकारला आणि मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी एकमताची शिफारस लेखी शिफारस केंद्र सरकारला केली.


नेमाडेसरांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करावे यासाठी मी त्यांना अनेकदा भेटून गळ घालत असे. फुले त्यांचेही आवडते असल्याने तेही विचार करायचे.

पण त्या काळात सर अनेक व्यापांमध्ये बुडालेले होते. मुख्य म्हणजे त्यांना निवृत्तीनंतरचे पेन्शन मिळत नसल्याने त्याचा पाठपुरावा करताकरता ते मेटाकुटीला आलेले होते. एकदा त्यांना तुमचे पेन्शनचे काम माझ्यावर सोपवा, तुम्ही भाषांतराला वेळ द्या अशी मी योजना सुचवली.

ती त्यांनी मान्य केली. प्राध्यापकाच्या नोकरीत सरांनी ब्रेक घेतलेला होता. म्हणजे ते महाराष्ट्राबाहेर गोव्याला काही वर्षे गेलेले होते, त्यामुळे त्यांना सलग सेवेअभावी पेन्शन मिळत नव्हते. मी आमचे उच्च शिक्षण खात्याचे तत्कालीन सचिव जे. डी. जाधव यांना भेटलो. त्यांनी आत्मियतेने केसमध्ये लक्ष घातले. आणि जादूची कांडी फिरावी तसे घडले. फाईल मार्गी लागली. जेडीसर म्हणाले, नेमाडॆंनी माझे एक काम केले तरच मी त्यांच्या फाईलवर अंतिम सही करीन.

आता आली का पंचायत?

नेमाडेसर तसे अतिश्य वल्ली आहेत. किंचित विक्षिप्त म्हटले तरी चालेल. मला भिती होती की ते म्हणतील, "उडत गेली पेन्शन, मला जेडींची अट मान्य नाही." मी त्यामुळे जेडींचे काय काम आहे ते विचारायचे टाळत होतो. पण एकदा भीड रेटून त्यांना त्यांची अट/काम मी विचारले. त्यांनी काय सांगावे?

तर ते म्हणाले, "नेमाडे माझी आवडते लेखक आहेत, त्यांनी एकदा माझ्याकडे चहाला यायला हवे!"
हत्ततेरीकी! एव्हढेच ना?

नेमाडॆसर मंत्रालयात चहाला आनंदाने आले. मोठा चहासोहळाच झाला तो. त्यांनी चहासाठी दहा मिनिटे दिलेली होती. प्रत्यक्षात गप्पा इतक्या रंगल्या की तीन वेळा चहा झाला.

-प्रा. हरी नरके, २७/५/२०२०




Wednesday, May 20, 2020

सर्व धर्मिय मंदिरसंपत्ती देशाची, धर्मसत्ता ही मुलत: अर्थसत्ता आणि राजसत्ता - प्रा.हरी नरके







१९९० मध्ये आम्ही अर्थनिती पंचायत भरवायला सुरूवात केली. देशाचा अर्थसंकल्प, विकास दर, महागाई, देशातील श्रीमंती आणि गरिबी, दारिद्र्य रेषा, नैसर्गिक संसाधने, मंदिर संपत्ती अशा विषयांवर आम्ही त्यात चर्चा सुरू केली. मित्रवर्य शुद्धोधन आहेर आणि टिम यांनी ह्या परिषदा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली. 

आमची मांडणी प्रस्थापितांना अडचणीची असल्याने कार्यक्रमाच्या बातम्या मुख्य धारेतील वर्तमानपत्रे देणार नाहीत याची आम्हाला जाणीव होती. तसेही बातम्यांमुळे चतुर विरोधक / बलदंड वर्गशत्रू जागे होतात, ज्यांच्यासाठी आपण काम करीत असतो ते समाजघटक या बातम्या वाचतातच असे नव्हे.

त्यामुळे अशा बातम्या म्हणजे शत्रूला आपण टोचत असलेली लस असते. त्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमता वाढते. आपल्या लोकांना या बातम्यांचा काहीच उपयोग नसतो. वर्षानुवर्षे शांतपणे, चिकाटीने तळात प्रबोधन, संघटन, प्रशिक्षण करावे लागेल, तेव्हा कुठे त्याचे परिणाम/निकाल दिसू लागतील यावर आमचा विश्वास होता, आहे. हे काम आजही चालूच आहे. 


परळ, गोवंडी, विक्रोळी, कल्याण, कुर्ला, वरळी, पुणे, अहमदनगर, चेंबूरला अनेक परिषदा झाल्या. आज त्यातून या किचकट विषयांवर बोलणार्‍या २५ वक्त्यांचा संच तयार झालाय. किमान २५० वक्त्यांची टिम तयार करण्याचे आपले उद्दीष्ट आहे. नजिकच्या भविष्यात ते आपण गाठू शकू. या परिषदांना आम्ही  कंच्या इलय्या, दया पवार, मा.म.देशमुख, शरद पाटील, अर्जुन डांगळे, विष्णू सूर्य वाघ आदी मान्यवरांना बोलवत असू. मला आठवते, दयाकाका आपल्या भाषणात म्हणाले होते, "हरी, हे आपले विषय नाहीत. हे मलबारहिलवाल्यांचे प्रश्न आहेत. सध्या तरी अन्यायाचा प्रतिकार, अत्याचार विरोध, अनुदान आणि आरक्षण एव्हढेच आपले प्रश्न आहेत." त्यांची चूक नव्हती. आजही वंचित अनु. जाती, जमाती, बौद्ध, बहुजनांना हे विषय जवळचे वाटत नाहीत. त्यांना त्यात रसच नाही. (यालाही अपवाद आहेत, असतात..) त्यामुळेच बाबासाहेब हे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ असूनही आंबेडकरोत्तर सामाजिक चळवळीत आर्थिक विषयांवर अर्थनिती पंचायत नी (SEM.) वगळता फारसे काम झालेले नाही.

तर मुद्दा आहे मंदिर सम्पत्तीचा-


तर मुद्दा होता, मंदिर सम्पत्तीचा. फुले-शाहू-आंबेडकरी अर्थनितीनुसार संपत्तीची निर्मिती श्रमातून आणि बौद्धिक परिश्रमातून होते. तिचे आणि निसर्गाने दिलेल्या संसाधनांचे समान वाटप होण्यासाठी साध्याच माणसांचा एल्गार उभा करावा लागेल.छ.शाहू आणि पंजाबराव देशमुख यांनी मंदिर संपत्ती सामान्यांचे शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार यासाठी वापरा अशी सर्वप्रथम भुमिक घेतली होती. ९० च्या दशकात आपण ती चर्चाविषय बनवली. छोट्यामोठ्या आंबेडकरी पेपरात त्याच्या बातम्या येत असत. पुणे-मुंबई वगळता, परगावी बोललो तर तिकडच्या मुख्य धारेतील वृत्तपत्रातही बातम्या येत. कारण तिकडचे पत्रकार बहुजन असत. असतात. एके दिवशी मला नरूभाऊंचा फोन आला. (डॉ. नरेंद्र दाभोळकर ) ते बातमी वाचून परेशान झालेले. त्यांनी विचारलं, " हरी, तू मंदिर संपत्तीचा जो ८० हजार कोटी रूपयांचा आकडा सांगतोयस तो मला तरी अतिशयोक्त वाटतोय. मला वाटतं फार तर ८०० कोटी रूपयांची मंदिर संपत्ती असेल." एका कार्यक्रमात निळूभाऊ, डॉ. लागू, अमरापूरकर यांच्या उपस्थितीत मी हे बोललो. ते तिघेही सॉलिड प्रभावित झाले. परत नरूभाऊ म्हणाले, " हरी अतिशयोक्ती करतोय." त्यांना प्रामाणिकपणे असं वाटायचं की एव्हढी कुठली आलीय मंदिर संपत्ती?  

त्याचं कारण त्यांच्या बालपणात दडलेलं होतं. ते म्हणायचे, " हरी, असं बघ, आपल्या प्रत्येक गोष्टीची सुरूवात कशी असते? एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक गरिब ब्राह्मण राहात होता. ब्राह्मण म्हटलं की तो गरिबच असणार! त्याच्याकडे कुठला आलाय एव्हढा पैसा?" नरूभाऊंचं बरोबर होतं. पुर्वीच्या काळी कित्येक ब्राह्मण गरिब असत. त्यांची मुलं वार लावून, भिक्षुकी करून शिक्षण घेत असत. पण त्याच वेळी बहुतेक सर्व बडे जमिनदार, सावकार, अगदी पेशव्यांनाही कर्ज देणारे ब्राह्मणच असत.

आटपाट नगरात फक्त ब्राह्मणच गरिब कसे?-

ब्राह्मण जातीचा हा गुणधर्मच आहे की श्रीमंती ठेवावी झाकून आणि गरिबी सांगावी ओरडून. बघा ना, एकतरी गोष्ट अशी आहे का? की एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक गरिब मराठा, माळी, आग्री, वंजारी, तेली, कोळी, सुतार, नाव्ही, मातंग, चर्मकार, (पुर्वाश्रमीचा) महार किंवा कैकाडी राहात होता? नाही.का? काय हे सगळे लोक त्याकाळात श्रीमंत होते? नाही. मग तशा गोष्टी का नाहीत?  

२ कारणे असावीत असे मला वाटते, 

एक गोष्टींचे सगळे लेखक ब्राह्मण होते, 

दुसरे, ब्राह्मणांची गरिबीची व्याख्याच वेगळी होती. 

म्हणजे असं बघा की, "अमक्यातमक्याला दूध नव्हतं म्हणून त्याच्या आईनं पिठात पाणी कालवून तेच दूध म्हणून पाजलं, अमक्यातमक्याच्या चपलेचा अंगठा तुटला तर तो शिवायला पैसेच नव्हते."  

बहुजनांचं मुदलात असंय की पिठात पाणी कालवायचं तर पिठच नाही, आणि चपलेचा अंगठा तुटायला चप्पलच नाही. पण ही गारिबी कथासाहित्याचा विषय कधीही झाली नाही. कारण त्यावेळी बहुजनांची दु:खं मांडणारे फुले, बाबासाहेब, अण्णाभाऊ, बागूल, दया पवार, ढसाळही नव्हते आणि सानेगुरूजी, श्री.म.माटे, व्यंकटेश माडगूळकर, अनिल अवचटही नव्हते. 



तेव्हा नोंदी महत्वाच्या, अनुभव नव्हे-

तेव्हा गरिबी असली नसली तरी ती साहित्य, चित्रपट, नाटकात, कथा. कादंबरी, कवितेत ती येणं अधिक महत्वाचं. बहुजनांनी ब्राह्मणांकडून आणखी एक गोष्ट शिकायला हवी. ते फुगीरी करीत नाहीत. कितीही पैसा (श्रीमंती) असली तरी ते तिचे प्रदर्शन मांडीत नाहीत. बहुजनांचं म्हणजे असण्यापेक्षा तिचा बाजार मांडण्यातच जास्त रस. 
मला सांगा तुम्हाला एक तरी ब्राह्मण असा माहितीय की ज्याने किलोकिलो सोने अंगावर मिरवलेय? 

आपल्याकडे बघा, गोल्डमन वांजळे, लांडे, दादा, काका, अप्पा, मामा आणि अमूकतमूक झाटूमल. आमच्या सगळ्यांना मिरवायची हौस. भयंकर दाखवेगिरी, फुगिरी आणि बाजारू मानसिकता. 

ब्राह्मण पैसे निगुतीने खर्च करतील, योग्य ठिकाणी गुंतवतील, बारमध्ये ऎय्याशी करीत बाराबालांवर उडवणार नाहीत.


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "७६ लाख कोटी रूपयांचं सोनं मंदिरांमध्ये पडून आहे. कोरोनामुळे देश अडचणीत आहे तर ते २ टक्के व्याजाने सरकारने कर्जाऊ ताब्यात घ्यावे. हिंदुत्ववादी किती पिसाळले. त्यांनी बहुजनांमधले अनेक पोपट पाळलेले आहेत. त्यांना त्यांनी चव्हाणांवर सोडले. लागले हे बहुजन दलाल बोलायला. गुलाम साले. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ. ज्यांना गुलामीच्या बेड्या हेच अलंकार वाटतात अशा बहुजन, ओबीसी, अनु. जाती, जमातीच्या हिंदुत्ववादी चमच्यांबद्दल काय बोलावे?


माझे रोकडे ४ मुद्दे स्पष्ट करतो...

१) मंदिर संपत्ती म्हणजे सर्व धर्मिय उपासना स्थळांमधली संपत्ती मला अभिप्रेत आहे... त्यात मंदिरं, गुरूद्वारे, चर्च, मशिदी, अग्यारी, विहारं, मठ सारं सारं आलं. त्रावणकोरच्या (केरळ)
 तिरूअंनतपुरममधल्या एकट्या पद्मनाभ मंदिरात काही लाख कोटी रूपयांची ($22 billion) संपत्ती सापडलेली आहे. ती केरळच्या बजेटच्या हजारोपट जास्त आहे. 

एकट्या कर्नाटकात ४० हजार श्रीमंत मठ आहेत. देशात अंदाजे दहा लाख मंदिरं आहेत. 

त्यावर पोसले जाणारे  लाखो भिक्षुक हे देव, धर्म, देश यांचे नाव घेत बहुजनांना भ्रमित करीत असतात. संमोहित केलेले हे तथाकथित मराठा, माळी, आग्री, वंजारी, तेली, कोळी, सुतार, नाव्ही, मातंग, चर्मकार किंवा कैकाडी पोपट चूटपूट स्वार्थासाठी मालकांचे हितसंबंध सांभाळीत स्वकीयांचे बळी घेत असतात. हे विकले गेलेले दलाल म्हणजे किरकोळ सन्मान किंवा चार आठ आण्यात वेठबिगारी करणारे भुक्कड लोक असतात. काही तर यातले फुकट फौजदारी करीत असतात. बहुतांश बहुजन म्हणजे "बिन पगारी फुल अधिकारी. गर्वसे कहो, घंटा हिलाओ, तुम मुझे क्या खरिदोगे, मै तो यहा मुफ्त में उपलब्ध हूं!" आपली लढाई ब्राहमण पुजारी, वा बडव्यांशी नाही, खरी लढाई या बहुजन गुडघ्यांशी/ भ्रमिष्ठांशी आहे. 


म्हणूनच ती जास्त अवघड आहे.

२) मध्यंतरी मी भोपाळला गेलो होतो. तिथल्या एका संस्थेने आपल्या नावात बदल करून संस्था या शब्दाऎवजी मंदिर असे परिवर्तन केलेले होते. चौकशीत असे समजले की त्या संस्थेला ( प्रॉपर्टी टॅक्स) म्हणुन भोपाळ मनपाला काही लाख रूपये दरवर्षी द्यावे लागत असत. संस्थेच्या नावात मंदिर शब्द जोडल्याबरोबर मनपाला कर तर द्यावाच लागत नाही, उलट सरकारकडून अनुदान मिळते.
सगळ्या शासकीय सुविधा मोफत किंवा अल्प दरात मिळतात. त्यामुळे मंदिरात देव-धर्म  नाही तर आर्थिक हितसंबंध गुंतलेले नाहीत काय?

३) महात्मा फुले यांनी आमची लग्ने आम्ही लावू, भटजीला बोलावणार नाही म्हटल्यावर धर्म बुडाला असा कांगावा करीत ओतुरचे जोशी-कुलकर्णी कोर्टात गेले. बुडाला म्हणले धर्म, भरपाई मागितली रू.६/- म्हणजे भाषा धर्माची पण व्यवहार रोकडा पैशाचा हे खरे नाही  काय?

बाबासाहेब म्हणायचे, "धर्मसत्ता ही मुलत: अर्थसत्ता आणि राजसत्ता आहे" याचे आकलन व्हायला बहुजनांच्या आणखी किती पिढ्या जायला लागतील?


४) पुजारी, धर्माधिकारी जर "हिंदु धर्माचे" आहेत, तर मग "सर्व हिंदुंना" शंकराचार्यपदी का बसू दिले जात नाही? का नियुक्त केले जात नाही? गुणवत्तेवर ह्या सर्व नियुक्त्या का केल्या जात नाहीत? 
त्यासाठी सर्वांना खुली असलेली परीक्षा का ठेवली जात नाही? आजही पुण्यातल्या वेदभवनची जाहीरात काय असते? फक्त ब्राह्मण मुलांना प्रवेश मिळेल. का ब्राह्मण मुलींना का नाही? इतर हिंदुंनी काय पाप केलेय? त्यांना का प्रवेश नाही? ठेवा गुणवत्तेवर प्रवेश. 

का ब्राह्मणांचा गुणवत्तेवर भरोसा नाही काय? होऊ द्याना, एखादा मराठा, माळी, आग्री, वंजारी, तेली, कोळी, सुतार, नाव्ही, मातंग, चर्मकार किंवा कैकाडी शंकराचार्य. होऊ द्याना त्यांना जगन्नाथ पुरी, पद्मनाभ,शबरीमाला, तिरूपतीचे प्रमुख पुजारी. 


मला सातारा जिल्ह्यातले एक असे मंदिर माहित आहे की जिथे ३५५ दिवस पुजारी गावातला गुरव असतो. फक्त दहा दिवस हा अधिकार गावच्या ब्राह्मणाला असतो. ( यातली लबाडी अशी की वर्षातले ३५५ दिवस मंदिराला किरकोळ उत्पन्न असते. तेव्हा गुरव राबतो. मात्र नवरात्रात इकडे लाखो भाविक येतात. त्याकाळात निदान रू. २५ लाखांचे उत्पन्न मिळते. नेमके तेच दहा दिवस ब्राह्मणाच्या ताब्यात असतात.)

हिंदू धर्माच्या ठेकेदारहो, तुम्ही जर अहोरात्र, देव, धर्म, देशाचे ढोल वाजवता तर मग आज कोरोनामध्ये देश आणि सामान्य माणसं अडचणीत असताना मंदिर संपत्ती २ टक्के दराने सरकारला कर्जाऊ द्यायला तुम्ही का तयार नाही? तुम्ही देशद्रोही आहात आहात काय? 

तुमचे देशप्रेम हा निव्वळ देखावा आहे काय? नाही ना? मग चला, सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी आलीय, व्हा तय्यार. व्हा खरे देशभक्त!


-प्रा.हरी नरके, २०/५/२०२०


संदर्भासाठी पाहा-

https://www.ndtv.com/photos/news/who-should-control-kerala-temples-22-billion-treasure--10860#photo-135723

Who should control Kerala temple's $22 billion treasure?    Updated: July 05, 2011 18:12 ISTThe centuries-old Sree Pasmanabhaswamy temple in Thiruvananthapuram in Kerala on its way to become the richest shrine in India. Ornaments and valuables reportedly worth a whopping Rs. one lakh crore have already been recovered from the secret cellars of the temple. Now the big questions is, who should control all this wealth.
Inventory of the treasure
The Supreme Court of India had ordered an amicus curiae appointed by it to prepare an inventory of the treasure. Full details of the inventory have not been revealed. However, newspaper reports gave an indication of some of the possible contents of the vaults.[4] About 40 groups of objects were retrieved from Vault E and Vault F. Another 1469 groups of objects found in Vault C and 617 in Vault D. Over 1.02 lakh (102,000) groups of objects (referred to as articles collectively) were recovered from Vault A alone.

According to confirmed news reports some of the items found include:

A 4-foot (1.2 m) high and 3-foot (0.91 m) wide solid pure-golden idol of Mahavishnu studded with diamonds and other fully precious stones.[7]
A solid pure-golden throne, studded with hundreds of diamonds and precious stones, meant for the 18-foot (5.5 m) idol of deity
Ceremonial attire for adorning the deity in the form of 16-part gold anki weighing almost 30 kilograms (66 lb)
An 18-foot (5.5 m) long pure-gold chain among thousands of pure-gold chains
A pure-gold sheaf weighing 500 kilograms (1,100 lb)
A 36-kilogram (79 lb) golden veil
1200 'Sarappalli' pure-gold coin-chains encrusted with precious stones weighing between 3.5 kg and 10.5 kg
Several sacks filled with golden artifacts, necklaces, diadems, diamonds, rubies, sapphires, emeralds, gemstones, and objects made of other precious metals
Gold coconut shells studded with rubies and emeralds
Several 18th-century Napoleonic-era coins
Hundreds of thousands of gold coins of the Roman Empire
An 800-kilogram (1,800 lb) hoard of gold coins dating to around 200 BC[7]
According to varying reports, at least three if not many more, solid gold crowns all studded with

diamonds and other precious stones
Hundreds of pure gold chairs
Thousands of gold pots
A 600-kg cache of gold coins from the medieval period

While the above list is on the basis of reports describing the July 2011 opening (and later) of Vaults A, C, D, E and F, a 1930s report from The Hindu mentions a granary-sized structure (within either Vault C or Vault D or Vault E or Vault F) almost filled with mostly gold and some silver coins.[8]
..................................

https://en.wikipedia.org/wiki/Padmanabhaswamy_Temple

The Padmanabhaswamy temple is a Hindu temple located in Thiruvananthapuram, the state capital of Kerala, India. The name of the city of Thiruvananthapuram in Malayalam translates to "The City of Lord Ananta",[1] referring to the deity of the Padmanabhaswamy temple. The temple is built in an intricate fusion of the Chera style and the Dravidian style of architecture, featuring high walls, and a 16th-century gopura.[2][3] While the Ananthapura temple in Kumbla is considered the original seat of the deity ("Moolasthanam"), architecturally to some extent, the temple is a replica of the Adikesava Perumal temple in Thiruvattar.[4]

The principal deity Padmanabhaswamy (Vishnu) is enshrined in the "Anantha Shayana" posture, the eternal yogic sleep on the serpent Adi Shesha.[5] Padmanabhaswamy is the tutelary deity of the royal family of Travancore. The titular Maharaja of Travancore, Moolam Thirunal Rama Varma, is the trustee of the temple.

Temple assets


Hidden treasure worth billions of dollars discovered in Indian temple

The temple and its assets belong to Lord Padmanabhaswamy, and were for a long time controlled by a trust, headed by the Travancore royal family. However, for the present, the Supreme Court of India has divested the Travancore Royal Family from leading the management of the temple.[29][30][31][32] T P Sundararajan's litigations changed the way the world looked at the Temple.

In June 2011, the Supreme Court directed the authorities from the archaeology department and the fire services, to open the secret chambers of the temple for inspection of the items kept inside.[33] The temple has six hitherto known vaults (nilavaras), labelled as A to F, for book keeping purpose by the Court (Since, however, an Amicus Curie Report by Justice Gopal Subramaniam, in April 2014, has reportedly found two more further subterranean vaults that have been named G and H). While vault B has been unopened over centuries, A was possibly opened in the 1930s, and vaults C to F have been opened from time to time over recent years. The two priests of the temple, the 'Periya Nambi' and the 'Thekkedathu Nambi', are the custodians of the four vaults, C to F, which are opened periodically. The Supreme Court had directed that "the existing practices, procedures, and rituals" of the temple be followed while opening vaults C to F and using the articles inside, while Vaults A and B would be opened only for the purpose of making an inventory of the articles and then closed. The review of the temple's underground vaults was undertaken by a seven-member panel appointed by the Supreme Court of India to generate an inventory, leading to the enumeration of a vast collection of articles that are traditionally kept under lock and key. A detailed inventory of the temple assets, consisting of gold, jewels, and other valuables is yet to be made.

While vault B remains unopened, vaults A, C, D, E and F were opened along with some of their antechambers. Among the reported findings, are a three-and-a-half feet tall solid pure golden idol of Mahavishnu, studded with hundreds of diamonds and rubies and other precious stones.[34] Also found were an 18-foot-long pure gold chain, a gold sheaf weighing 500 kg (1,100 lb), a 36 kg (79 lb) golden veil, 1200 'Sarappalli' gold coin-chains that are encrusted with precious stones, and several sacks filled with golden artefacts, necklaces, diadems, diamonds, rubies, sapphires, emeralds, gemstones, and objects made of other precious metals.[35][36][37][38] Ceremonial attire for adorning the deity in the form of 16-part gold anki weighing almost 30 kilograms (66 lb), gold coconut shells studded with rubies and emeralds, and several 18th century Napoleonic era coins were found amongst many other objects.[3] In early 2012, an expert committee had been appointed to investigate these objects, which include lakhs of golden coins of the Roman Empire, that were found in Kottayam, in Kannur District.[39][40] According to Vinod Rai, the former Comptroller-and-Auditor-General(CAG) of India, who had audited some of the Temple records from 1990, in August 2014, in the already opened vault A, there is an 800 kg (1,800 lb) hoard of gold coins dating to around 200 BCE, each coin priced at over ₹2.7 crore (US$380,000).[41] Also found was a pure Golden Throne, studded with hundreds of diamonds and other fully precious stones, meant for the 18-foot-long Deity. As per one of the men, who was among those that went inside this Vault A, several of the largest diamonds were as large as a full-grown man's thumb.[42] According to varying reports, at least three, if not more, of solid gold crowns have been found, studded with diamonds and other precious stones.[43][44][45] Some other media reports also mention hundreds of pure gold chairs, thousands of gold pots and jars, among the articles recovered from Vault A and its antechambers.[46]

This revelation has solidified the status of the Padmanabhaswamy Temple as the wealthiest place of worship in the world.[47]





Monday, May 18, 2020

रत्नाकर मतकरींची भेट राहूनच गेली- प्रा. हरी नरके









शाळकरी वयात रत्नाकर मतकरींचे "अश्वमेध" नाटक बघून मी खूप भारावून गेलो होतो. त्यांचे "लोककथा ७८" हे जबरदस्त नाट्यानुभव देणारे, हादरवणारे, समकालीन नाटक होते.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला त्यांचा चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, मला आवडला होता. मतकरी १९५५ पासून गेली ६५ वर्षे सातत्याने लिहित होते.

त्यांची साहित्यसंपदा अफाट आहे. त्यांनी मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, तसेच अनेक एकांकिका लिहिल्या. त्यांचे वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह प्रकाशित झालेत. आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा लेखाजोखा मांडणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ महत्वाचा आहे. त्यांची "खेकडा" ही गूढकथा वाचताना आजही अंगावर काटा येतो. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मतकरी प्रतिभावंत लेखक होते.

माझे मित्र आनंद अवधानी हे त्यांचे निकटवर्तीय. मला मतकरींना भेटायची तीव्र इच्छा होती. आनंद त्यांच्याशी बोलला. त्यांनी तात्काळ भेटीचा दिवस, वेळ कळवला. आम्हाला त्यांच्या घरी जेवायलाच बोलावले. चारपाच तास काढूनच या असे ते म्हणाले.

त्यांनी माझं वाचलेलं होतं असं ते आनंदकडे म्हणाले, तेव्हा माझा विश्वास बसू नये इतका आनंद मला झाला. आम्ही तिघे मिळून एक वेगळा, हटके असा ग्रंथसंस्कृती, वाचनवेड वाढवणारा उपक्रम करणार होतो. त्याचं लेखन मतकरीसर करणार होते. कल्पना आनंदची आणि सादर मी करणार असं ठरलं होतं.

आता तो हटके उपक्रम बहुधा कधीच व्हायचा नाही. ज्या दिवशी आम्ही भेटणार होतो त्याचदिवशी मुंबईत तुफान पाऊस झाला. सारी मुंबई तुंबई झाली. गाड्याघोड्या बंद पडल्या. प्रवास करणेच शक्य नव्हते. मी फक्त त्यांना भेटायलाच मुद्दाम मुंबईला जाणार होतो. ते म्हणाले, हरकत नाही, आपण दुसरा दिवस लवकरच ठरवू.

यंदा पावसाळा बराच लांबला. त्यानंतर माझ्या आणखी तीन सिरियलची कामं सुरू झाली. फुल धावपळ. धावतं भेटायचं नाही, किमान पाचतास हवेत असं ठरवल्यानं भेट लांबत गेली. मार्चमध्ये कोरोना आला. आणि आज मतकरी गेले. आता भेट होणे नाही. मतकरी वयाच्या ८१ व्या वर्षी गेले पण चटका लावून गेले. त्यांचा मुलगा गणेश माझा मित्र आहे. मतकरी कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

मराठीतला एक श्रेष्ठ, बहुप्रसवा आणि सामाजिक चळवळींबद्दल विलक्षण आस्था असणारा दुर्मिळ लेखक होते मतकरी! विनम्र आदरांजली.
-प्रा. हरी नरके, १८/५/२०२०


राजन खान, संजय आवटे यांना आचार्य अत्रे पुरस्कार- प्रा. हरी नरके








लेखक राजन खान, संपादक संजय आवटे आणि कलावंत भाऊ कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार- प्रा. हरी नरके 

मित्रवर्य राजन खान, संजय आवटे आणि भाऊ कदम यांचे आचार्य अत्रे पुरस्कारासाठी मन:पुर्वक अभिनंदन. राजन खान हे मराठीतले दणकट लिहिते लेखक आहेत. संजय आवटे हे सव्यसाची पत्रकार-संपादक आहेत. "चला हवा येऊ द्या" या अफाट लोकप्रिय मालिकेद्वारा तुफान लोकप्रियता मिळवलेले भाऊ कदम हे टिव्ही व चित्रपट क्षेत्रातील गुणी कलावंत आहेत.

राजन खान यांनी कादंबरी आणि कथेच्या प्रांतात दमदार योगदान दिलेले आहे. अक्षर मानव या अनेक क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणार्‍या संस्थेचे ते संस्थापक आहेत. धडपड्या तरूणांचा फार मोठा संच त्यांनी अक्षर मानवच्या माध्यमातून उभा केलेला आहे. राजनसर अतिशय कल्पक आहेत. उत्तम संघटक आहेत. बोलायला कमालीचे स्पष्टवक्ते. पण फटकळ नाहीत. अध्यक्ष किंवा नियोजित कार्यक्रम पत्रिका नसलेले अभिनव साहित्य संमेलन ते गेली विसेक वर्षे घेत असतात. पुर्वी ते पाचगणीजवळच्या खिंगरला होत असे. भर पावसाळ्यात या संमेलनात धमाल येई. मी खूपदा ह्या संमेलनाला गेलोय. आता हे संमेलन फिरते असते. गेल्या वर्षीचे संमेलन भंडारदर्‍याला झाले. पाऊस इतका जास्त होता की संमेलनस्थळी गुडघ्याएव्हढे पाणी साठलेले. 

वळवाच्या पावसासारखा मुसळधार पाऊस तीन दिवस पडत होता. निवासाच्या सर्व खोल्यांमध्ये रांजन रांजण पाणी. तरिही संमेलन झाले. गाजले. दिवसाचे १२ ते १४ तास एकदम कडक, ताजी टवटवीत चर्चासत्रे झडतात. संमेलनाला आलेल्या सर्वांना बोलावे लागते. त्यामुळे नव्या लोकांचे ऎकण्याची ही संधी दुर्मिळ असते. मोलाची असते. रात्रभर राजनसरांशी रसरशीत गप्पा होतात. ते रात्र जागवतात. जुलै २०१९ च्या भंडारदरा संमेलनात राजनसरांसोबत रवींद्र पोखरकर,Ravindra Pokharkar,  राजेंद्र गलांडे, Adv. Rajendra Galande, सतीश इंदापूरकर, satish indapurkar, आळेफाट्याचे शिरिष भोर Shirish Bhor आणि मी सलग तीन रात्री गप्पांच्या पावसात भन्नाट भिजलो.

अफाट वाचन, श्रीमंत अभिरूची, स्वच्छ, साक्षेपी वैचारिक स्पष्टता, आणि कमालीचे तारतम्य यामुळे राजन सर आमचे हिरो आहेत. नेते आहेत. अक्षर मानवतर्फे त्यांनी शेकडो उत्तम पुस्तकं प्रकाशित केलीयत. अक्षर मानवचे इतके भन्नाट उपक्रम चालू असतात की एव्हढी क्रियाशील असलेली राज्यातली किंबहुना देशातली दुसरी संघटना, संस्था मला तरी माहित नाही.

इंदापूरला राजन सरांनी एका लेखकाच्या सोबत तीन दिवस हा उपक्रम केला. त्यासाठी माझी निवड केली. सलग तीन दिवस मी निवडक पण चोखंदळ साहित्यप्रेमींशी बोलत होतो. राजनसरांबद्दल आपुलकी नी आदर तर मुबलक आहेच. पण त्यांची नजर चोखंदळ असल्याने त्यांचा दराराही वाटतो. काही चुकलं तर सर सटकावायला बिलकूल कमी करणार नाहीत याची खात्री आहे. 

मित्रवर्य संजय आवटेंनी सकाळ, लोकसत्ता, लोकमत अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार, संपादक म्हणून दमदार कामगिरी केलीय. कृषीवल, पुढारी, मुंबई सकाळ, साम टिव्ही आणि आता दिव्य मराठीचे ते राज्य संपादक आहेत. त्यांनी अनेक नवोदितांना लिहिते केले. नवोन्मेशशाली प्रतिभांना वर्तमानपत्राचे व्यासपीठ पुरवले. त्यांच्या आग्रहामुळे मी कृषीवलमध्ये साप्ताहिक कॉलम लिहीला. या दिलदार संपादकाने अनेकदा माझा कॉलममधला लेख चक्क अग्रलेख म्हणून छापला आणि अतिथी संपादकीय लिहिण्याचा सन्मान माझ्यासारख्याला दिला. 

आवटे तुफान वक्ते आहेत. सोनाई व्याख्यानमालेला ते आलेले आहेत. तेव्हाचे त्यांचे घणाघाती भाषण आजही तळेगाव-शिक्रापूरचे श्रोते विसरलेले नाहीत. जे उत्तम वक्ते असतात ते चांगले लेखक असतातच असे नाही. दणकट लेखक अनेकदा फुसके वक्ते असतात. संजय आवटेंचा एक विशेष हा आहे की ते एकाचवेळी लोकप्रिय वक्ते आहेत आणि उत्तम लेखकही आहेत. त्यांचे अकरावे पुस्तक वाचायला मी उत्सुक आहे. आवटे उपक्रमशील संपादक आहेत. 

त्यांनी स्तंभ विचार परिषदांचा पाया घातला. कॉलमलेखकांच्या निवडक लेखांची पुस्तके काढली. स्तंभ विचार परिषदा आयोजित करणं हे खरं तर अवघड काम. पण अलिबाग, तारा, पुणे येथे त्यांनी मोजक्या सहकार्‍यांच्या मदतीने ह्या परिषदांचे झकास आयोजन केले.

विश्व मराठी साहित्य संमेलन कॅप्टन निलेश गायकवाड यांनी २०१६ ला भुतानला आयोजित केले होते. आवटेंमुळे मला या संमेलनाच्या उद्घाटनाचा सन्मान मिळाला. त्यांच्यासोबत केलेला सहकुटुंब 
भुतान दौरा केवळ अविस्मरणीय. संजय आणि अर्चना हे आमचे कौटुंबिक मित्र, सोयरे, सल्लागार आणि हितचिंतक आहेत. कोणत्याही अडीअडचणीला ते दोघेही धावून येतात. माझी पत्नी संगिता, मुलगी प्रमिती यांच्याशी त्या दोघांची दोस्ती माझ्यापेक्षा अधिक आहे. अर्चना नृत्यगुरू आहेत. उत्तम वाचक आहेत. अनेक पुस्तकं त्या आधी वाचतात आणि संजयला त्यातला निवडक भाग ब्रिफ करतात. त्यामुळे या दोघांचे सहवाचन आमच्यासाठी पथदर्शक ठरते.

२००६ साली संजय अकोल्याला लोकमतचे संपादक होते. तेव्हा त्यांनी एका परिषदेला अकोल्याला आलेल्या मला व आ. ह. साळुंखेसरांना लोकमत कार्यालयात निमंत्रित केले. स्टाफबरोबर गप्पा घडवून आणल्या. हाच पायंडा त्यांनी माझ्याबाबतीत कृषीवल, पुढारी, साम आणि दिव्य मराठीत कायम ठेवला. त्यांनी साम टिव्ही नावारूपाला आणला. त्यापुर्वी असे काही चॅनल असल्याचे लोकांना माहितच नव्हते.  संजय आवटॆंमुळे आधीचा " सामसुम टिव्ही" चक्क आघाडीचा चॅनल बनला. संजय प्रतिभावंत कॉपीरायटरही आहेत. सकाळची " उदय भविष्यपत्राचा " ही जाहिरात संजयने लिहिलेली आहे.

संजय अतिशय हरहुन्नरी आहे. त्यांचा स्वभाव अतिशय लाघवी आहे. ते गुणी संपादक, भन्नाट वक्ता आणि खमक्या विचारवंत आहेत. असा संजय आमचा सोयरा आहे याचा मला अभिमान वाटतो.

आचार्य अत्रे हे मराठीतले अफाट व्यक्तीमत्व. अत्र्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वावर स्वतंत्रपणे लिहायला हवे. सासवडचे मित्रवर्य विजय कोलते आणि रावसाहेब पवार त्यांच्या नावाने गेली अनेक वर्षे हा पुरस्कार देत असतात. दहाएक वर्षांपुर्वी हा पुरस्कार मला मिळालेला आहे. तेव्हा माझ्या एका ऑस्ट्रेलियन मित्राने मला फोन करून एका बामणाच्या नावाचा पुरस्कार तू कसा काय स्विकारलास? असा मला जाब विचारला होता. त्याला मी सटकावले होते. अत्रेंनी महात्मा फुले हा राष्ट्रपती पुरस्कार विजेता चित्रपट काढला. त्याचा चित्रीकरण प्रारंभ बाबासाहेबांच्या हस्ते ३१ जाने १९५४ ला करवला. त्याला कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, केशवराव जेधे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट त्यावेळी फारसा चालला नाही.

कारण " महात्मा फुले यांच्या जीवनावरचा म्हणून ब्राह्मणांनी बघितला नाही आणि एका ब्राह्मणाचा चित्रपट म्हणून बहुजनांनीही बघितला नाही," असे आचार्य अत्रे म्हणत असत. अत्र्यांचा शामची आई हा चित्रपट देशातल्या पहिल्या राष्ट्रपती सुवर्ण कमळ पदकाचा मानकरी ठरलेला. अत्र्यांनी पुणे नगरपालिकेत काम करताना पुण्याच्या रे मार्केटचे नामांतर महात्मा फुले मंडई असे केले. १९४१ साली बाबासाहेबांच्या वयाला ५० वर्षे झाली म्हणून अत्र्यांनी त्यांच्या नवयुगचा आंबेडकर विशेषांक काढला. ज्याकाळात सगळी मध्यवर्ती पत्रकारिता बाबासाहेबांना खलनायक म्हणून वाळीत टाकून होती, तेव्हा अत्र्यांनी केलेली ही कामगिरी मोलाची आहे. अत्र्यांचे बाबासाहेबांवरच्या मृत्यूलेखांचे आपले बाबा हे पुस्तक वाचनीय आहे.

अशा अत्र्यांचा नावाचा पुरस्कार मी मोलाचा मानतो.

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1X8BbmdkIc29QHNGeQhTBeoUUwE48xrLT_hKC-RL6zUAELRlkywFEehSA

-प्रा.हरी नरके, १८/५/२०२०

Sunday, April 12, 2020

महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता आणि संपादक प्रा.हरी नरके








महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता- प्रा. केदार काळवणे

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे समताकेंद्री आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. ते सामाजिक क्रांतिकारक,समाजशिक्षक,सर्जनशील लेखक आणि कृतिशील विचारवंत होते.प्रस्थापित परंपरागत व्यवस्थेविरूध्द रचनात्मक विद्रोही भूमिका घेणारे आणि सनातनशास्र मोडीत काढत नव्या समाजव्यवस्थेची मागणी करणारे थोर समाजसुधारक म्हणून त्यांचे कार्य अक्षर ठरलेले आहे.शोषित समूहांचे नायक म्हणून त्यांनी लढलेले सामाजिक युध्द समानतेचे मूल्य रूजवण्यासाठी मोलाचे ठरले आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेल्या आजच्या सर्व प्रकारच्या लोकशाहीची बीजभूमी ही एकोणिसाव्या शतकातील महात्मा फुले यांचे ऐतिहासिक क्रांतिकार्य हीच आहे.

या क्रांतिकार्याला अनेकविध पैलू आहेत.जातवर्णवर्गस्रीदास्यमुक्तीसाठीचा संघर्ष,धर्मचिकित्सेतून नवधर्मतत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी आणि पर्यायी संस्कृती निर्माणाची पायाभरणी करणारे इहवादी समाजचिंतक म्हणून हे कार्य मानवतेचा परीघ व्यापक करणारे ठरलेले आहेत.त्यांचे जीवन,कार्य आणि साहित्य यात कमालीची एकवाक्यता-एकरूपता होती.म्हणूनच हे लेखन महत्त्वाचे ठरलेले आहे. सार्वकालिक जीवनतत्त्वे आणि वैश्विक मूल्यांचे प्रकटीकरण,समकालीन सामाजिक वास्तवाची जनकेंद्री अभिव्यक्ती,तत्कालीन शोषणाची सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्षात परखड मीमांसा,इतिहास व वर्तमानाचा विवेकवादी अन्वयार्थ,वाचकांवर वैचारिकतेचा सखोल संस्कार करणारे,लेखक व वाचकांना प्रेरक ठरणारे,लेखन परंपरा निर्मिणारे आणि बहुसंख्यांच्या लोकभाषेचा माध्यम म्हणून वापर या कारणांनी हे लेखन अभिजात ठरलेले आहे.त्यांचे सर्व लेखन‘महात्मा फुले समग्र वाड्मय’या ग्रंथात उपलब्ध आहे.

महात्मा फुले यांच्या समग्र वाड्मयाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे १९६९ साली प्रथम प्रकाशन झाले होते.धनंजय कीर व स.गं.मालशे त्याचे संपादक होते.मंडळाच्या वतीने सहा आवृत्त्या प्रसिध्द झालेल्या आहेत.या संपादनात य.दि.फडके यांचाही मोलाचा वाटा आहे.’तृतीय रत्न ‘(१८५५)हे मराठीतले पहिले आधुनिक नाटक,‘पवाडा:छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा’ (१८६९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले बहुजनवादी मराठी काव्यचरित्र,सांस्कृतिक शोषणाची मीमांसा करणारे ब्राम्हणांचे कसब(१८६९) व गुलामगिरी (१८७३) हे गद्यलेखन;भारतीय शेतकर्यांचा आक्रोश प्रथमच मांडणारा‘शेतकर्याचा असूड’(१८८३) हा कथा-निबंधात्मक ग्रंथ आणि सत्य व नितीवर आधारलेल्या वैश्विक धर्माचे तत्त्वज्ञान विशद करणारा‘सार्वजनिक सत्यधर्म’ (प्रकाशन:१८९१)या तत्त्वज्ञान ग्रंथासह अखंडात्मक काव्यरचना व इतर उपलब्ध लेखनाचा अंतर्भाव या समग्र वाड्मयात केलेला आहे.

हे वाड्मय मराठी साहित्यातले अक्षर साहित्य आहे.बहुजनांचे क्रांतिविज्ञान त्यातून साकार झाले आहे.भारतीय शोषित समूहाच्या आवाजाचे अनेकविध स्वर नि स्तर-अस्तर त्यामधून उजागर झाले आहे.जागतिक वाड्मयातही या लेखनाचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित झाले आहे.गेल्या पन्नास वर्षात या ग्रंथाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या.१९९१ साली महात्मा फुले स्मृतीशताब्दी निमित्ताने काढलेली य.दि.फडके संपादित आवृत्ती विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.त्यावेळी पु.ल.देशपांडे, गोविंद तळवलकर,राम बापट,डाॅ.श्रीराम लागू, ना.धो.महानोर,शंकरराव खरात,रा.चिं.ढेरे यांनी रांगेत उभे राहून हा ग्रंथ विकत घेतला होता.२००६ साली निघालेली आवृत्तीही हातोहात संपली.या ग्रंथाची मागणी होत होती.ती मागणी १२ वर्षानंतर २०१८ साली पूर्ण झाली.

महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या समग्र वाड्मयाची सुधारित आवृत्ती २०१८ साली प्रसिध्द झालेली आहे.ही समितीची प्रथमावृत्ती आहे.८६२ पृष्ठांच्या या आवृत्तीचे साक्षेपी संपादन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या लेखन-विचाराचे अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी केलेले आहे.ही आवृत्ती अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे.जवळपास दोनशे पृष्ठांचा अलक्षित व दुर्मिळ मजकूराचा समावेश या आवृत्तीत केलेला आहे.तो फुले अभ्यासक-वाचकाला उपयुक्त ठरणारा आहे.

यात यशवंत फुले यांनी लिहिलेले महात्मा फुले यांचे आद्य चरित्र,त्यांची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी कमिशनर म्हणून केलेले काम, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज,महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार,विश्राम रामजी घोले,केशवस्वामी व्यंकय्या अय्यावरू,रत्नाम्माबाई अय्यावरू यांनी महात्मा फुले यांच्या लेखन आणि कार्यासंबंधी दिलेले अभिप्राय,त्यांच्या मूळ लेखनाच्या प्रस्तावना आदी लेखन समाविष्ट केलेले आहे.या ग्रंथाला प्रा.हरी नरके यांनी एकतीस पृष्ठांचे चिकित्सक संपादकीय लिहिलेली आहे.महात्मा फुले यांच्या समग्र कार्य आणि लेखनाचा अर्करूपी गाभी तीमधून विशद झाला आहे.महात्मा फुले यांचे कार्य समजून घेताना हे संपादकीय मोलाचे ठरते.महात्मा फुले यांच्या कार्याची महत्ता तीमधून ध्वनित झालेली आहे.

प्रा. नरके पहिल्या आवृत्तीपासून या ग्रंथाशी संबंधीत आहे.तसेच त्यांनी महात्मा फुले यांच्या संबंधीचे मौलिक संशोधनही केलेले आहे.त्यामुळे ही आवृत्ती त्यांनी अधिक परिपूर्ण करत अद्यावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.महात्मा फुले यांचे आजपावेतो उपलब्ध असणारे ललित-वैचारिक समग्र लेखन,महत्त्वाचा पत्रव्यवहार, त्यांच्या कार्यासंबंधीची विविध कागदपत्रे,विविध ग्रंथाच्या प्रस्तावना,मूळ छायाचित्रे, तत्कालीन वर्तमानपत्रातील बातम्या, महात्मा फुले यांचा जीवनपट, संदर्भ टीपा,निवडक शब्दांचा कोश आणि संदर्भ सूची यांचा समावेश या ग्रंथात असल्याने हा ग्रंथ परिपूर्ण वाटतो.

महात्मा फुले समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व साहित्य या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे.ही सामग्री विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना साह्यभूत ठरणारी आहे.हा ग्रंथ इतिहास लेखनाचे विश्वसनीय साधन आहे.या आवृत्तीत समाविष्ट केलेला ऐवज ऐतिहासिक दस्तावेज आहे.प्रा.नरके यांनीच महात्मा फुले यांची खरी जन्मतारीख आणि खरे छायाचित्र शोधून काढलेले आहे.महात्मा फुले यांच्या कार्य-लेखनाचा प्रचार-प्रसार मागील तीस वर्षात त्यांनी सातत्याने केलेला आहे.त्यांच्याच प्रयत्नातून महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय  इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, उर्दू, गुजराती अशा तेरा भाषेत अनुवाद  झालेले आहे.इतर नऊ भाषेतील अनुवादाचे काम सुरू आहे.म्हणून त्यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत आवृत्तीला मूल्य प्राप्त झालेले आहे.
   

महात्मा फुले यांचे समग्र लेखन हे विषमतामुक्त समाजनिर्मितीचे तत्त्वज्ञान आहे.‘माणूस’आणि त्याच्या लौकिक सुखाचा शोध या लेखनाने घेतलेला आहे.मानवमुक्तीचा जाहिरनामा म्हणून हे लेखन महत्त्वाचे आहे. श्रेष्ठ मानवी मूल्यांचा जागर या लेखनाने घडविलेला आहे.समकालीन सामाजिक वास्तव आणि इतिहासगत सांस्कृतिक संघर्ष या लेखनातून समोर आलेला आहे.सामाजिक समताविचार हे या लेखनाचे केंद्रसूत्र आहे.शेती,उद्योग,शिक्षण,समाज-संस्कृती, इतिहास, धर्म, साहित्य,भाषा आदी व्यवस्थासंबंधीचे मूलगामी आणि व्यवस्था परिवर्तनाचे मूल्ये असलेले मानवतावादी चिंतन यातून प्रकट झालेले आहे. सामाजिक समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,सत्य,निती,प्रेम आदी वैश्विक मूल्यांचा अविष्कार या लेखनातून झालेला आहे.

परकीय अभिजनांनी(आर्य)येथील मूलनिवासी बहुजनांना अज्ञानी ठेवून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक गुलाम केले.त्यांचे ‘माणूस’म्हणून अस्तित्त्व नाकारून आपले वर्चस्व प्रस्थापित करत शोषण केले.याची परखड आणि चिकित्सक मीमांसा आधुनिक काळात प्रथमच महात्मा जोतीराव फुले यांनी केली.त्यांचे हे समग्र लेखन अभिजनांचा बुरखा फाडणारे आणि बहुजनांना सत्याची जाणीव करून देणारे असे आहे.म्हणूनच आपल्या सांस्कृतिक परंपरेकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे हे लेखन महत्वाचे आहे.महात्मा फुले यांच्या लेखनाची ही समग्रता कोणत्याही काळातील समाजपुनर्रचनेसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

- केदार काळवणे,सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि. उस्मानाबाद. पिन:४१३५०७, ईमेल: kedar.kalwane.28@gmail.com          मो: ७०२०६३४५०२

‘आपलं महानगर’या वर्तमानपत्रातील ‘सारांश’पुरवणीतील आजचा लेख.
••••••••••••••••••••••••••

Monday, April 6, 2020

इतिहास सत्ताधिशांच्या बाजूने असणारांचा असतो की विवेकाच्या?

१. एसेम अण्णा एकदा आम्हाला सांगत होते, " १९४२ चे दिवस होते. महात्मा गांधीजी ९ ऑगष्टला "चले जाव" चा नारा देणार होते. त्या दिवशी इंग्रजांनो चालते व्हा असे सांगणारा मोर्चा पुण्यात काढण्याचे आम्ही ठरवलं.
मोर्च्याच्या पुर्वतयारीसाठी बैठक झाली. नऊ तारखेचा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून आम्ही कंबर कसली. ९ तारिख असल्याने मोर्च्याला किमान ९ तरी पुणेकर यायला हवेत असा आमचा प्रयत्न होता. नोंदणी केली तेव्हा लक्षात आले, आकडा आठच्या पुढे जात नव्हता. शेवटी एका मोलकरणीला विनंती करून तिला सहभागी करून घेतले तेव्हा आकडा नऊवर गेला. तेव्हा बाकी सगळे पुणेकर इंग्रजांना घाबरून मोर्च्यापासून दूर राहिले होते, अंधाराची पुजा करीत."

पुढे इतिहास लिहिताना मात्र सारा भारत चले जावच्या आंदोलनात सहभागी झाला होता असेच लिहिले गेले.
२. विश्राम बेडेकरांची अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाली तेव्हा मी त्यांची पुणे विद्यापीठाच्या [ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ] मराठी विभागात मुलाखत ठेवली होती.
मी त्यांना विचारले "सर, तुमचे "एक झाड दोन पक्षी" हे आत्मचरित्र मला खूप आवडलेय. मात्र एक प्रश्न पडतो, तो हा की त्याकाळात देशभर स्वातंत्र्य चळवळींने उसळी घेतलेली असताना तुमच्या अत्मचरित्रात त्याचा पुसटसाही उल्लेख येत नाही असे कसे?"  ते शांतपणे म्हणाले, " बाळ, आम्ही महागांडू मध्यमवर्गीय बुद्धीजिवी लोक. आम्ही त्यावेळी दारंखिडक्या लावून इंग्रजांना घाबरून शेपटं घालून बसलेलो होतो. होय आम्ही सत्ताधिशांसोबत होतो. कसलं डोंबलाचं वर्णन करणार स्वातंत्र्यचळवळीचं?"

३. १९४२ च्या ९ ऑगष्टला कोल्हापूरजवळच्या कामेरीच्या विष्णू भाऊ बारप्टे या तरूणाने मोर्चा काढला. एस.पी. ब्रिटीश होता. क्रूर जनरल डायरच्या कुळातला. त्याने विष्णूला थेट कपाळात गोळी घातली. तो जागेवरच ठार झाला. त्याचं बालवयात लग्नं झालेलं होतं. बायको गरोदर होती. पोलीसांनी तिचा अतोनात छळ मांडला. ती गाव सोडून परागंदा झाली. पुढे मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी गावोगावी हुतात्मा स्मारकं बांधायची ठरवलं. कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू झालं.
एक आजारी म्हातारी मजूर म्हणून तिकडे काम करीत होती. अंगात खूप जास्त ताप असल्याने तिचा तोल जात होता. ती कामावर जखमी झाली तर आपल्याला ताप नको म्हणून कंत्राटदारानं तिला कामावरून घरी जायला सांगितलं.
ती म्हणाली, "मी आज काम केलं नाही तर माझी चूल पेटणार नाही. लेकरा मला काम करू दे."
तो चिडला आणि त्यानं तिला हाकललं. तिनं त्याचे पाय धरले आणि त्याला म्हणाली, "बाळा, हे स्मारक ज्याच्या नावानं बांधताय ना त्याची मी विधवा बायको आहे रे!"
या घटनेची कोल्हापूर सकाळने मोठी बातमी दिली.

इतिहास सत्ताधिशांच्या बाजूने असणारांचा असतो की विवेकाच्या? गुलामीच्या चाहत्यांचा असतो की स्वातंत्र्याच्या? इतिहास अंधाराच्या उपासकांचा असतो की उजेडाच्या? इतिहास ब्लॅक आऊटवाल्यांचा असतो की प्रकाशाच्या बाजूने असलेल्यांचा? बहुमत बहुधा दिवे विझवणारांचच राहत आलंय. प्रकाशपुजकांचं नाही. मित्रांनो, निराश नका होऊ!

-प्रा.हरी नरके, ०६/०४/२०२०

Wednesday, April 1, 2020

सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?






सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?- सुरेश सावंत,
सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाने लोकसत्ता लाईव्हमधील मुलाखतीत ‘मराठी मालिकांत मुख्य भूमिकेसाठी ब्राम्हण अभिनेत्रींनाच संधी दिली जात असल्याचा’ आरोप केला आणि अपेक्षेप्रमाणे टीके-प्रतिटीकेची बरीच राळ उडाली. खुद्द सुजय डहाके तसेच मराठी मालिका यांविषयी मत देण्याइतका त्यांचा परिचय मला नाही. त्यामुळे सुजय डहाकेचा आरोप मराठी मालिकांबाबत खरा की खोटा, हे मी सांगू शकत नाही. पण व्यापक सामाजिक-आर्थिक स्थिती, माध्यमांतले त्याचे प्रतिबिंब यांविषयी जे अभ्यास व निरीक्षणे मांडली जातात, त्यांचा परिचय मला आहे. सामाजिक-राजकीय चळवळीतला वावरही काही बाबी मला लक्षात आणून देत असतो. त्याआधारे सुजय डहाकेच्या आक्षेपाचा आणि त्यावरच्या टीकेचा संदर्भ पाहता येतो. सुजय डहाकेचे व्यक्तित्व उथळ की गंभीर किंवा त्याचे टीकाकार किती प्रांजळ हा माझा प्रश्न नाही. ज्या संदर्भात हा आक्षेप व त्यावरची टीका आली आहे, तो संदर्भ निश्चित गंभीर आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
सुजयच्या आरोपानंतर त्याच्या विरोधात पहिली तोफ डागली अभिनेता शशांक केतकर याने. तो म्हणतो - “माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे.” पुढे तो म्हणतो, “कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?”
ब्राम्हणी वर्चस्वाच्या विरोधात बोलणाऱ्या सुजयने त्याला संधी असताना अब्राम्हण अभिनेत्रींची निवड का केली नाही? ...हा प्रश्न वकिली युक्तिवादासाठी बरोबर आहे. त्याचे उत्तर सुजयने जरुर द्यावे. वैयक्तिक वागणूक बोले तैसा चाले नसेल तर नैतिक अधिकारही कमी होतो हे खरे. पण वैयक्तिक वागणुकीवर त्या व्यक्तीने विचारलेल्या सामाजिक महत्वाच्या प्रश्नाचे महत्व कमी ठरत नाही. तो प्रश्न नाहीच म्हणून बाजूला सारता येत नाही. एखादा थोर बेवडा दारुच्या दुष्परिणामांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देत असेल, तर ती माहिती चुकीची ठरत नाही. ‘बेवडा सांगतोय...पण खरं बोलतोय’ असेच आपण म्हणू. म्हणायला हवे. तीच बाब सुजय कामाकडे लक्ष देतो की नाही यालाही लागू आहे. तो आता काहीही करत नसेल. चकाट्या पिटत असेल. त्याचे चित्रपट चालत नसतील. तरीही त्याने केलेल्या विधानाची किंमत तो खूप काम करत असताना, चित्रपट चालत असताना केलेल्या विधानापेक्षा कमी होत नाही.
शशांकचे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. एक, ‘आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे.’ दुसरे, ‘साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?’
शशांक केतकरने या दोन मुद्द्यांतून सांगितलेला निष्कर्ष हा कि, मराठी मालिका वा सिनेमा क्षेत्रात जातीला थारा नाही. तिथे गुणवत्ता पाहिली जाते. मंजुळे गुणवान आहे. या गुणवत्तेला सानेंनी जोखले, साथ दिली आणि उत्तम कलाकृती जन्मास आल्या.
शशांक मग सुजयला दिलेल्या उत्तरात पुढे असे का म्हणतो? - “कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.”
साने, केतकर, मंजुळे, कांबळे यांत काहीही फरक तो मानत नाही. गुणवत्तेलाच त्याच्या क्षेत्रात किंमत आहे. कांबळे, छल्लारे, पवार हे गुणवान आहेत. अशा गुणवानांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा त्याला अभिमान आहे. ...असे साधे सरळ त्याला म्हणायचे आहे का?
नाही. सुजयच्या जातिवादाच्या आक्षेपाला तो उत्तर देतो आहे. कांबळे, छल्लारे व पवार हे अब्राम्हण किंवा कथित खालच्या जातीचे असतानाही माझ्यासारखा ब्राम्हण त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजेच मी जातिभेद मानत नाही. त्यातून येणारी श्रेणी मी मानत नाही. केवळ गुणवत्ता मानतो, हे तो यातून सांगतो आहे.
समाजात अन्यत्र असा जातिभेद केला जातो, जातींवरुन माणसाच्या श्रेणी ठरवल्या जातात, हे त्यास बहुधा कबूल आहे. मी मात्र ते मानत नाही आणि आमच्या क्षेत्रात असे काही होत नाही, यावर तो ठाम आहे.
शशांक स्वतः भेदभावाच्या या अमानवी प्रथेपासून पूर्ण अलिप्त आहे, याची ग्वाही देतो आहे. ते खरे असू शकते. पण तेवढेच. त्याच्या क्षेत्रात असा भेदभाव होत नाही, फक्त गुणवत्ताच महत्वाची मानली जाते, हे विधान त्यातून सिद्ध होत नाही. त्यासाठी कथित तळच्या, मधल्या जातींच्या कलावंतांच्या साक्षी आवश्यक आहेत. अर्थात केवळ त्याही पुरेशा नाहीत. त्यांच्यावर हेत्वारोप होऊ शकतात. एक पद्धतशीर समाजशास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे.
तेजश्री प्रधान हिनेही “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्षं माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?” अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या क्षेत्रात गुणवत्तेलाच महत्व दिले जाते. ती स्वतः अब्राम्हण असूनही तिला काही त्रास होत नाही, हा तिचाही निष्कर्ष आहे.
ब्राम्हण विरुद्ध सीकेपी हा तीव्र ऐतिहासिक झगडा आहे. मात्र तो जातीय उतरंडीच्या वरच्या भागातल्या जातींच्या स्पर्धेचा आहे. सीकेपी ही मागास जात नव्हे, हे इथे जाता जाता लक्षात ठेवूया. मागास विरुद्ध वरच्या जाती या संघर्षात छावण्या कशा पडतात, ते पहावे लागते.
सौरभ गोखले यानेही सुजयची लायकी काढून त्याला कडक समज दिली आहे- “पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.”
त्याचे क्षेत्र किती नितळ, निर्मळ आहे आणि आजूबाजूची घाण इथे कशी घुसडू नये हे सौरभ इथे बजावून सांगतो आहे. श्रीमुखात भडकवण्याची भाषा हा सुजयच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला वगैरे मानूया नको. सुजयच्या त्याच्या क्षेत्रातल्या मित्राचा तो सात्विक संताप आहे, असेच तूर्त गृहीत धरुया.
या सगळ्याबाबत गिरीश दातारांची एक वेगळी प्रतिक्रिया आहे. दातार नावावरुन कळते त्याप्रमाणे ब्राम्हण असावेत. ते स्वतःला ब्राम्हण वा कुठल्याही जातीचे मानतही नसतील. पण जन्म कथित ब्राम्हण घरात झालेला असावा. ते स्वतः माध्यम क्षेत्रातलेच दिसतात. ते त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात-
“माझ्या मते सुजय डहाके कलाक्षेत्रातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादाबद्दल त्याची सल व्यक्त करतोय. आणि जे अतिशय योग्य असेच आहे. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकलावंताला अशी सल का वाटतीये, याचा 'किमान विचारही' न करता, त्याच्या बोलण्यात तात्विक पातळीवर खरंच काही सत्य आहे का (मी तात्विक म्हणतोय. सांख्यिकी नाही. त्यामुळे मूर्खासारखे कोणत्या सिरीयल आणि सिनेमांमध्ये किती ब्राह्मणेतर कलाकारांनी कामे केलीयेत याची उदाहरणे देत बसू नये) हे तपासून पाहण्याची, त्याच्यावर मूर्खासारखी टीका करणाऱ्यांना गरजही वाटत नाही - हीच खरी सांस्कृतिक वंचना आहे.”
ब्राम्हणी वर्चस्व म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण करताना ते पुढे नोंदवतात – “काही अपवाद सोडल्यास, ब्राह्मणी चालीरीती, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी सणवार, ब्राह्मणी पोशाख - हाच काय जणू epitome of ideal and standard culture अर्थात - भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक आदर्शाचा अत्युच्च नमुना आहे - अश्याच प्रकारे - ब्राह्मणांनी आपले सौंदर्य निकष बहुजनांवर लादणे चालवले आहे. म्हणूनच सिरीयल, सिनेमांमध्येही बहुजन पात्रेही ब्राह्मणी चालीरीती आचरताना दिसतात. (काही मोजके अपवाद वगळता).”
त्यांच्या या कलाक्षेत्रात सहकलाकारांशी व्यवहार करताना हे ब्राम्हणी वर्चस्व कसे काम करते, याचे वर्णन ते असे करतात- “ब्राह्मणी वर्चस्ववाद म्हणजे केवळ ब्राह्मण कलाकार संख्येने अधिक असणे, किंवा ब्राह्मणेतर कलाकारांची कलेच्या क्षेत्रात कमी संख्या असणे नव्हे, तर याहून अधिक व्यापक स्वरूपात याचा विचार व्हायला पाहिजे. 'न' आणि 'ण' मधल्या फरकाने आपल्या सोबत काम करणाऱ्याला हीन लेखणे, ज्यांना तसे बोलता येत नाही म्हणून - त्यांना अत्यंत कळकळीने मराठीतले मोठे कवी तू कसे वाचले पाहिजेस, ज्यामुळे तुझी भाषा कशी सुधारेल (हे सांगणे)... हे ध्यानात घेतले तर आपणही नकळत याचे वाहक कसे होत असतो, हे ध्यानात येईल.”
आपल्या सहकाऱ्याची टीका संवेदनशीलतेने ऐकून तपासण्याची गरज तसेच गुणवत्ता कशाला म्हणायचे, ब्राम्हणी वर्चस्व हे केवळ संख्येवर अवलंबून नाही तर तो धाक निर्माण करणारा एक सांस्कृतिक मापदंड असतो, असे नमूद करुन या चर्चेला प्रगल्भ आयाम दातारांनी दिले आहेत. सुजय डहाकेच्या हेतूंना वा त्याच्या मूर्खपणाला तपासण्यात वेळ घालवण्याऐवजी दातारांनी मांडलेल्या या मुद्द्यांची चर्चा शशांक, तेजश्री, सौरभ यांनी करणे गरजेचे आहे.
सांस्कृतिक वर्चस्व संख्येवर अवलंबून नसले तरी प्रत्यक्ष संख्येची अवस्था माध्यम आणि आर्थिक क्षेत्रात काय आहे आणि जातींच्या उतरंडीचा त्याच्याशी संबंध कसा आहे, हे पाहणे कमी उद्बोधक नाही. ही अवस्था स्वातंत्र्याचे आयुर्मान पाऊणशे व्हायला येत असताना असणे हे खूप गंभीर आहे.
७-८ महिन्यांपूर्वी जाहीर झालेला हा अभ्यास. ऑक्सफॅम आणि न्यूजलाँड्री यांनी केलेला. त्यात त्यांनी जातींची उतरंड माध्यमांतल्या विविध क्षेत्रात कशी आजही कायम आहे, याचे आकडे दिले आहेत. असा अभ्यास याही आधी योगेंद्र यादव वगैरे मंडळींनी केलेला आहे. त्यांचेही निष्कर्ष तेच आहेत. हे आकडे ताजे आहेत, म्हणून ते घेतले आहेत.
आधी देशातल्या लोकसंख्येची सामाजिक विभागणी कशी आहे ती पाहू.
टक्के
विभाग
२२.८
सर्वसाधारण (ब्राम्हण, कायस्थ, क्षत्रिय, बनिया आदि उच्चवर्णीय)
५२
ओबीसी (शूद्र जाती)
१६.६
अनुसूचित जाती (दलित जाती)
८.६
अनुसूचित जमाती (आदिवासी जाती)
आता माध्यमांतल्या नेतृत्वस्थानी असणाऱ्यांचे प्रमाण पाहू.
माध्यम
सर्वसाधारण (२२.८ टक्के)
ओबीसी (५२ टक्के)
अनु. जाती (१६.६ टक्के)
अनु. जमाती (८.६ टक्के)
इंग्रजी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
८९.३ टक्के
हिंदी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
१०० टक्के
इंग्रजी वर्तमानपत्रे
९१.७ टक्के
हिंदी वर्तमानपत्रे
८७.५ टक्के
डिजिटल मीडिया
८४.२ टक्के
५.३ टक्के
नियतकालिके
७२.७ टक्के
१३.६ टक्के
याचा अर्थ काय?
लोकसंख्येत २२.८ टक्के असलेल्या उच्चवर्णीयांचे जवळपास एकहाती नेतृत्व कसे काय? फक्त दोन ठिकाणी मामुली प्रमाणात ओबीसी दिसतात. दलित-आदिवासींचा तर पत्ताच नाही. (अधिक तपशीलात गेल्यास उच्चवर्णीयांतल्या श्रेणीचेही दर्शन इथे घडते.)
गुणवत्ता केवळ उच्चवर्णीयांत आहे का? ती जन्मजात आहे का? याला शशांक, सौरभ किंवा तेजश्री यांचे उत्तर नाही असेच असेल. मग आमच्या क्षेत्रात फक्त टॅलेंट पाहिले जाते, हे विधान कसे कबूल करायचे? मराठी टीव्ही किंवा मराठी सिनेमा याला अपवाद आहे का? समजा जास्त उच्चवर्णीयच प्रमुख भूमिकांत किंवा उच्च स्थानांवर असले आणि ते खरोखरच टॅलेंटमुळेच तिथे असले तरी त्यांच्यातल्याच बहुसंख्यांमध्ये हे टॅलेंट का? ...या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ व्हायला नको का? शशांकने उल्लेखिलेल्या दोन नावांबाबतच बोलायचे तर साने व मंजुळे यांपैकी किती मंजुळे सानेंच्या जागी आहेत? नसतील तर का नाहीत? या प्रश्नाने त्रास व्हायला नको का? टॅलेंट जन्मजात नाही हे कबूल असेल तर तथाकथित खालच्या जातींचे टॅलेंट पुढे न यायला काहीतरी अडथळे आहेत आणि ते शोधून दूर करायला हवेत, ही आपली भावना व खटपट असायला हवी की नको?
पैसे-संपत्ती कमाविण्याची अक्कलपण उच्चवर्णीयांतच जास्त कशी? ...योगायोगाने? अलिकडच्याच एका अभ्यासाने मांडलेली ही खालील आकडेवारी पहा.
जात/समाज विभाग
संपत्तीतला वाटा (%)
हिंदू उच्चवर्णीय
४१
हिंदू ओबीसी
३०.७
अन्य

मुस्लिम

हिंदू अनु. जाती
७.६
हिंदू अनु. जमाती
३.७
हिंदू समाजातली सामाजिक/जातीची उतरंड जशीच्या तशी आर्थिक बाबतीत दिसते. व्यवसायांतही त्याचा पडताळा येतो. सफाई कामात शतप्रतिशत दलित कसे? लोकसंख्येतले जातनिहाय प्रमाण सफाई कामगारांत का दिसत नाही?
सुजय डहाकेने हे सर्व प्रश्न विचारलेले नाहीत. पण त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे सर्व मुद्दे येतात. त्याने विचारलेल्या प्रश्नाला गैरलागू ठरवताना हे प्रश्न गैरलागू कसे ठरवणार? ते ढळढळीत समोर उभे आहेत. त्यांची उत्तरे द्यावीत लागतील.
स्वतंत्र भारतात विकास जरुर झाला. नव्या आर्थिक धोरणाने काही काळ आर्थिक उन्नतीला गती आली. पण हा विकास वा उन्नती कोणाच्या, किती व काय प्रकारे वाट्याला आली? त्याचा परिणाम काय झाला? ...हा हिशेब करायचा नाही का? प्रत्येक जातीत काहीजण सुळक्यासारखे वर आलेले दिसतात. पण त्यावर त्या जातीचे मोजमाप करुन चालणार नाही. त्याचे जातीतले प्रमाण किती ते पहावेच लागेल. नव्या आर्थिक धोरणानंतरच्या संपत्ती वितरणात दिवसेंदिवस विषमता वाढत चालली आहे, असे अभ्यासक नोंदवत आहेत. त्यावर उपाय नाही झाला तर तो असंतोष समाजात अन्य मार्गांनी उफाळून येतो. तो आपण अनुभवत आहोत. संविधानातली मानवी प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक न्याय, समता या मूल्यांच्या रुजवातीशिवाय समाजाचा निरामय विकास संभवनीय नाही, हे आपण समजून घ्यायला अजून किती उशीर करणार आहोत?
शशांक, तेजश्री, सौरभ यांच्यात जरुर टॅलेंट आहे. पण या टॅलेंटला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा वर्ग व जात यांचे कोंदण लाभलेले आहे. त्यांची इच्छा असो वा नसो. ते मागोत वा न मागोत. त्यांना ते मदत करतच असते. हे कोंदण गळून पडून खऱ्या टॅलेंटची निःपक्षपाती निवड होण्यासाठी आजची भयावह होत चाललेली सामाजिक-आर्थिक विषमता आपल्याला कमी करत न्यावी लागेल.
हे आकळले व त्याप्रति कृतिशील संवेदना जागी झाली तर शशांक, सौरभ, तेजश्री आणि सुजय या लढ्यात बहुधा एकत्रच दिसतील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, एप्रिल २०२०)