Showing posts with label डॅा. रखमाबाई सावे - राऊत. Show all posts
Showing posts with label डॅा. रखमाबाई सावे - राऊत. Show all posts

Tuesday, July 9, 2019

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची उपेक्षा का?






दररोज एका नवीन डूडलच्या माध्यमातून लोकांचा सन्मान करणाऱ्या गुगलनं १ जुलै २०१८ च्या बुधवारी मराठी मनाला एक सुखद धक्का दिला. ते होतं डॉक्टर्स डेचं डूडल रखमाबाई (सावे) राऊत यांच्या सन्मानार्थ. कोण होत्या रखमाबाई? आणि त्यांच कार्य काय होते?
गुगलनं रखमाबाईंवर डूडल बनवलं आणि अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. त्या भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
१८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.
 त्याकाळी त्यांनी नवऱ्याकडे जायला नाही म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती.
त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.
त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन राऊत हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.
तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.
बालविवाहाविरुद्ध लढा
रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.
ब्रिटीश न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या विरूद्ध निकाल दिला. त्यावर त्या तुरूंगात जायला तयार झाल्या. लंडनमध्ये महिलांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांनी निधी जमवून रखमाबाईंच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. शेवटी दादाजी भिकाजी यांनी पैसे देऊन कोर्टाबाहेर तडजोड करण्यात आली.
या निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.
रखमाबाईंनी  'द हिंदू लेडी' या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले.
एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. परत आल्यावर त्यांनी मुंबईचे कामा हास्पीटल, तसेच सुरत आणि राजकोटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्यभर काम केले. वयाच्या नव्वदीतही त्या रूग्णसेवा करीत राहिल्या.
तरीही उपेक्षा?
असं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही?
तसं पाहिलं तर स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं.
दोन्ही चळवळींमध्ये मोठमोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं.
रखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं का?
अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंवर चित्रपट बनवला आहे. महादेवन सांगतात, "मुळात आपल्याकडे पुरुषांनाच हिरो बनवायची पद्धत आहे. त्यांचाच उदोउदो करा. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून पटकथा रचल्या जातात. त्यामुळे स्त्रियांचं काम मागे पडतं. त्यांना इतिहासात अनुल्लेखानं मारलं जातं."
"म्हणूनच मी त्यांच्या कामावर, त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. रखमाबाई या पहिल्या स्त्री बंडखोर होत्या. नवऱ्याला सोडण्यासाठी कोर्टात गेलेली पहिली भारतीय बाई असेल ती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो खूप प्रेरणादायी आहे," असं अनंत महादेवन म्हणाले.
पण आजही कित्येक जणांना रखमाबाईंच्या कार्याविषयी माहिती नाही हे आपलं दुर्दैव आहे, असं महादेवन यांना वाटतं.
"मी चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप लोकांना विचारलं की, तुम्हाला माहिती आहे भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? उत्तर आलं, आनंदीबाई जोशी. तेव्हा खूप वाईट वाटलं."
"आनंदीबाईंचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्या प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. त्यांना अकाली मरण आलं. हा मान खऱ्या अर्थानं रखमाबाईंकडे जातो."
- अनघा पाठक, बीबीसी मराठी, या लेखाचा सारांश
https://www.bbc.com/marathi/india-42076214?SThisFB&fbclid=IwAR2fUS_w_skX0FwiTUFy-nfipy6PmIi7ngPFtxCX5MV3B7bS2WNrJrxYtU0
बीबीसी मराठी Related Topics जीवन इतिहास भारत महिला हक्क महिला १ जुलै २०१९ 

Saturday, March 31, 2018

पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश -


डॅा. आनंदीबाई गोपाळ जोशी - डॅा. रखमाबाई सावे - राऊत

आनंदीबाई गोपाळ जोशी यांची आज 153 वी जयंती.

त्यांचा बालविवाह. नवरा विधूर.वयाने मोठा. विक्षिप्त. बायकोला शिकवण्याचा अट्टाहास असलेला. आनंदीला वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी मुलगा झाला होता. तो लगेच वारला. वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॅाक्टर व्हायचं या जिद्दीने त्या पेनसिल्व्हानियाला गेल्या. त्यांनी 2 वर्षीय वैद्यकीय पदवी घेतली. तो दिवस होता11 मार्च 1886.

त्यांना कोल्हापूर दरबारने लगेच नोकरी दिली. परतीसाठी तिकीटाची व्यवस्था केली.
बाई भारतात आल्या त्याच गंभीर आजारी असलेल्या अवस्थेत.
कल्याण त्यांचं माहेर.

टिबीनं ग्रस्त असताना त्या एका वैद्याकडून उपचार घेण्यासाठी पुण्यात आल्या.
बाईंवर गंडे-दोरे-ताईत-अंगारे-धुपारे- मांत्रिकाचे उपचार केले गेले.

एकही पेशंट न तपासता अवघ्या साडेतीन महिन्यात बाई 27 फेब्रूवारी 1887 ला गेल्या तेव्हा त्या 22 वर्षांच्या होत्या.
तांत्रिकदृष्ट्या त्या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर असल्या तरी एकही पेशंट न तपासता गेलेल्या.

त्यांच्या मृत्यूनंतर पुण्यातल्या एका वर्तमानपत्राने बाई डॅाक्टर झालेल्याच नव्हत्या असे लिहिले. त्यांच्या पदवीवर शंका घेतली. यथावकाश खुलासा झाला. आजचासारखा चारपाच वर्षांचा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केलेला नव्हता. तसे त्यांचे रितसर शिक्षणही फारसे झालेले नव्हते. त्या मॅट्रीकही नव्हत्या. मात्र त्यांनी 2 वर्षीय वैद्यकीय पदवी/पदविका घेतलेली होती.

रखमाबाई सावे - राऊत यांचा जन्म आनंदीबाईंच्या आधीचा. 22 नोव्हेंबर 1864 चा.

त्यांचंही लग्न बालपणी झालं. वडील वारल्यानं त्यांच्या आईनं पुनर्विविवाह केलेला होता. सावत्र वडील जे. जे. हॉस्पीटलमध्ये नामवंत डॅाक्टर होते. त्यांचे अनेक वैद्यकीय ग्रंथ अभ्यासक्रमाला लावण्यात आलेले होते.
नवर्‍याने त्यांना नांदायला बोलावले. त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे होते. डॅाक्टर व्हायचे होते.

त्यांनी नांदायला जायला नकार दिला. नवरा दादाजी कोर्टात गेला. ब्रिटीश कोर्टाने मनुस्मृतीच्या आधारे निकाल दिला. बाई नांदायला जा. नाहीतर तुरूंगात पाठवू. बाई म्हणाल्या, मी तुरूंगात जाते, निदान सुटल्यावर डॅाक्टर होता येईल.

रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्याची केस भारतभर तर गाजलीच पण पाश्चात्त्य जगही हादरले. लंडनला महिलांनी रखमाच्या पाठींब्याच्या सभा घेतल्या.

शेवटी कोर्टाबाहेर समझोता झाला. दादाजीने पैसे घेऊन घटस्फोट दिला.

बाई शिकायला ब्रिटनला गेल्या. आक्टोबर 1890 मध्ये त्यांनी लंडन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. 5 वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण केला. स्कॉटलंडमधून वैद्यकीय पदवी घेतली.

7 सप्टेंबर 1895 ला त्या भारतात परत आल्या.

मुंबईच्या कामा हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करू लागल्या. पुढे सुरत, राजकोट येथेही त्यांनी समर्पितपणे काम केले.

लग्न न करता वयाच्या 91 व्या वर्षापर्यंत त्या वैद्यकीय सेवा करीत राहिल्या.
25 डिसेंबर 1955 ला त्या गेल्या.

दोघींची जिद्द, परिश्रम, ज्ञानलालसा यांना तोड नाही. दोघीही महानच होत्या.

पदवी/पदविका, 2 वर्षांचा कोर्स, 5 वर्षांचा कोर्स यांच्या तपशीलात न जाता जिद्दीनं शिकलेल्या आनंदीबाई आणि रखमाबाई या दोघींनाही पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सचा मान मिळायला हवा.

-प्रा.हरी नरके

Wednesday, November 22, 2017

Dr Rakhmabai Save-Raut Googl's Tributes

Sincere Tributes to Dr. Rukhmabai Raut,
India's first practicing woman Doctor.
Rukhmabai had studied in London School of Medicine in 1889.Today is her 153rd Birth Anniversary.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत,रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
यांना 153 व्या जयंतीनिमित्त गुगलची आदरांजली-
जन्म-22नोव्हेंबर1864  - मृत्यू-25डिसेंबर1955

आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर - डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती
-भारत ज्यांना विसरलेला आहे.
सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

What an incredible lady


Prerna Tambay - Anandi Gopal Joshi qualify as first Indian lady doctor. However, she never practised medicine due to her premature death just after returning back from America. Rukhmabai Save-Raut was a child bride who wanted to study and she refused to stay with her husband. She was sharply aware that if she went to her in-laws she would not be able to study. Her husband, Dadaji filled petition against her. She agreed to go to jail but refused to give up her dream. At the age of 25 she went to England to do her MD. She practised medicine in Mumbai and in Surat, till the end of her life. What an incredible lady, she deserves her due and loads of respect. Today we celebrate her 153 birth anniversary.- प्रेरणा तांबे-लंडन

Saturday, November 18, 2017

22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-


आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती- आज भारत त्यांना विसरलेला आहे.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
जन्म- 22 नोव्हेंबर, 1864 मृत्यू- 25 डिसेंबर, 1955

सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

Thursday, November 9, 2017

फेसबुकमुळे निघाली दुर्मिळ पुस्तकाची नवी आवृत्ती


"डॉ.रखमाबाई : एक आर्त" या पुस्तकाबद्दल दोन महिन्यांपुर्वी मी टाकलेल्या एक पोस्टने बघताबघता ग्रंथ चळवळीचे रूप घेतले नी त्याचे थेट फलित आज वाचकांच्या हातात पडले आहे.
1982 सालचे हे चरित्र गेली तीन दशके उपलब्ध नव्हते. डॉ.रखमाबाई सावे या देशातील पहिल्या महिला डॅाक्टर ज्यांनी वयाच्या 91 वर्षांपर्यंत रूग्णसेवा केली. डॉ.रखमाबाईंपुर्वी आनंदीबाई जोशी डॅाक्टर झाल्या होत्या खर्‍या परंतु त्या भारतात परत आल्या नी आजारी पडल्या व त्यांचे लगेच अकाली निधन झाले.त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत. त्यांना वैद्यकीय सेवाच करता आली नाही.
वैद्यक क्षेत्रातील आणि विशेषत: महिला डॅाक्टर्सना या पुस्तकामुळे एक नवी उर्जा मिळेल.
पुस्तकाचे मूळ प्रकाशक असलेल्या पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनं अस्मिता मोहिते फे.बु.पोस्ट वाचून त्वरीत पुढे आल्या नी 350 प्रती आगावू नोंदल्या गेल्यास आपण या ग्रंथाची विशेष आवृत्ती काढू अशी त्यांनी घोषणा केली.
आगावू नोंदणीचे आवाहन करताच कवी अजय कांडर यांनी पहिली प्रत नोंदवली. कमलताई विचारे, विजय मराठे आणि इतर अनेकजण पुढे आले नी प्रत्येकाने 1 ते 100 अशा संख्येने पुस्तकांचे पैसे भरून नोंदणी केली गेली.
ज्यांनी ज्यांनी आगाऊ नोंदणी केलीय त्यांना आजपासून घरपोच प्रती मिळायला सुरूवात झालीय. मूळ 375 रूपये किमतीचे हे पुस्तक पोस्टेज खर्चासह रूपये तीनशेला आगाऊ नोंदणी करणारांना मिळतेय.
काही मोजक्या प्रतीच उपलब्ध आहेत. जे त्वरित पैसे भरतील त्यांना त्या मिळू शकतील.
काही मित्रांनी बॅंकेत पैसे तर भरलेत मात्र प्रकाशन संस्थेचे श्री गोपीनाथ मयेकर यांना आपला नाव - पत्ता कळवलेला नाही, त्यांनी तो त्वरीत कळवावा ही विनंती. म्हणजे त्यांना प्रती घरपोच मिळतील.
-प्रा.हरी नरके
बुकींगसाठी खालील बॅंकखात्यावर आपण एका प्रतीचे पोस्टेजसह 300 रूपये पाठवू शकता.
POPULAR PRAKASHAN PVT. LTD.
Axis Bank, Fort Branch, Mumbai
Current Account number 004010300021933
Type of account : OCC
IFSC : UTIB0000004
पैसे जमा केल्यावर ☎ 022-23530303 / 09029893938 (Contact person : Gopinath Mayekar) वर फोन करून आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर कळवावा म्हणजे प्रती पाठवणं सोईचं होईल.
'पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.' नावाने चेकसुद्धा पाठवू शकता.
पत्ता :
पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.
३०१ महालक्ष्मी चेंबर्स
२२ भुलाभाई देसाई रोड
मुंबई ४०००२६

Wednesday, August 2, 2017

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली-- डॉ. रखमाबाई जनार्दन सावे


नाही चिरा नाही पणती....
ब्रिटीश काळात भारतीय महिलांच्या आरोग्याचं चित्र काय होतं?

एका बकरीचं बाळंतपण हॉस्पीटलमध्ये करण्यात आलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आणल्या गेल्या.  का?

एकदा देवीची महाभयंकर साथ आल्यानं हजारो महिला आजारी पडल्या. त्यांना औषधं कोण आणि कशी द्यायचं माहित आहे?

आजारी महिलेला पडद्याआड बसवलं जायचं. पुरूष डॉक्टर दुसर्‍या पडद्यामागे असायचा. त्याच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची. आजारी बाई पडद्याआडून आपला एक हात बाहेर काढायची. पडद्याआडून पुरूष डॉक्टर तो हात तपासायचा आणि इंजेक्शन द्यायचा. या कामावर देखरेख करायला चार हिजडे नेमलेले असायचे.

बाळंतपणात लाखो महिला मरायच्या. डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी महिलांनी दवाखाण्यात येऊन बाळंत व्हावे म्हणून परोपरीनं  लोकांना विनवलं. पण हॉस्पीटलमध्ये  भुतबाधा होईल अशा अंधश्रद्धेमुळे एकही गरोदर महिला बाळंतपण करायला तयार नसायची.
त्या काळात बाळंत झालेल्या महिलेला 40 दिवस हॉस्पीटलमध्ये  देखरेख आणि औषधोपचार यांच्यासाठी ठेवलं जायचं.

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी हॉस्पीटलमध्ये पहिलं बाळंतपण कसं केलं असेल?

तर त्यांनी एका बकरीचं बाळंतपण या हॉस्पीटलमध्ये केलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आणल्यावर महिलांची भीती कमी झाली. काही पारशी बायकांची अतिशय निगुतीनं बाळंतपणं त्यांनी केल्यावर मग हळूहळू हिंदू, मुस्लीम आणि इतर समाजातल्या गरोदर महिला या हॉस्पीटलमध्ये येऊ लागल्या.

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे   [ जन्म 22 नोव्हेंबर 1864, मृत्यू 25 डिसेंबर 1955]
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली--

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई गोपाळ जोशी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं धैर्य, त्यांचा त्याग आणि त्यांचं वैद्यकिय शिक्षण मोलाचंच. दु:खाची गोष्ट अशी की डॉक्टर होऊन परदेशातून भारतात परत येतानाच डॉ. आनंदीबाई आजारी पडल्या. भारतात येऊन एकही पेशंट त्या तपासू शकल्या नाहीत. 3 महिन्यातच वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं. [डॉ. आनंदीबाई जोशी, जन्म 31 मार्च 1865- निधन 27 फेब्रुवारी 1887]

1889 मध्ये इंग्लंडला जाऊन वैद्यक शास्त्रातील एम.डी. ही पदवी घेऊन 1894 मध्ये भारतात आलेल्या मुळच्या मुंबईच्या असलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी मुंबईच्या कामा हॉस्पीटलमध्ये आणि सुरत व काठेवाडमध्ये आयुष्यभर रूग्णसेवा केली. असंख्य अडचणींना तोंड देत वैद्यकिय शिक्षण घेऊन  त्या ज्ञानाचा उपयोग भारतीयांना आयुष्यभर करून देणार्‍या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना आपण सारे का बरं विसरलो?

त्या आयुष्यभर प्रॅक्टीस करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर असूनही सरकार आणि समाज यांच्यालेखी नाही चिरा नाही पणती....

अगदी महिला चळवळीलासुद्धा त्यांचा विसर का पडावा ?

"डा.रखमाबाई :एक आर्त" नावाचं एक मौलिक पुस्तक त्यांच्यावर निघालं आणि त्याचीही फक्त पहिली आवृत्ती 1982 साली प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या पुढच्या आवृत्त्या निघाल्या नाहीत. असं का?
डा. रखमाबाईंच्या एक नातेवाईक प्रा. मोहिनी वर्दे यांनी खुप मेहनत घेऊन हे संदर्भ पुस्तक लिहिलं. 222+16+[10 आर्टप्लेटसचं] पृष्ठांचं हे पुस्तक. किंमत रूपये 24 मात्र. पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
प्रकाशकांना, वैद्यक विश्वाला किंवा स्त्रीमुक्ती चळवळीला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढावी असं का वाटलं नाही? आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या किती महिलांनी आणि पुरूषांनी हे पुस्तक वाचलंय? हे पुस्तक आज फारसं कु्ठंच का मिळत नाही?

सुमारे दिडशे वर्षांपुर्वी मुंबईत जन्माला आलेल्या आणि 91 वर्षांचं दिर्घायुष्य लाभलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना सरकार आणि समाज म्हणून आपण चक्क विसरून गेलो.

रखमाबाईंचा बालविवाह झालेला होता. वयात आल्यावर त्यांनी मला उच्च शिक्षण घ्यायचंय म्हणून मी नांदायला जाणार नाही अशी भुमिका घेतली.
नवरा दादाजी न्यायालयात गेला. रखमाबाई केस हरल्या.

उच्च न्यायालयात अपिल करण्यात  आल्यावरही त्या परत हरल्या.
न्यायालयाने त्यांना नांदायला जा नाहीतर न्यायालयाची बेआदबी केली म्हणून तुरूंगात जा असा कडक पवित्रा घेतला. त्या तुरूंगात जायला तयार झाल्या.

पुढे न्यायालयाबाहेर तडजोड झाली.

त्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या.

स्त्रीहक्कांच्या इतिहासात हा खटला जगभर गाजला. आणि तरिही आजची स्त्री चळवळ  आणि वैद्यकविश्व  डॉ. रखमाबाई जनार्दन सावेंना विसरून गेले.....

भारतात ज्यांच्यामागे त्यांची जात उभी नसते त्यांना कोणीच वाली नसतं का?

पाचकळशी [माळी] समाजानं डॉ. रखमाबाई नवर्‍याकडं नांदायला गेल्या नाहीत म्हणून त्यांना माळी जातीतून बहिष्कृत केलं.

डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे डॉ. रखमाबाईचे सावत्र पिता. त्यांचे जन्मदाते वडील जनार्दन सावे हे डॉ. रखमाबाई लहान असतानाच वारल्यानं त्यांच्या आईनं डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला. डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांनी वैद्यक शास्त्रावर 6 मौलिक ग्रंथ लिहिलेले आहेत.
- प्रा.हरी नरके
................................