Showing posts with label आर एस.एस.. Show all posts
Showing posts with label आर एस.एस.. Show all posts

Wednesday, May 6, 2020

रा.स्व.संघ २२/ " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : शिवाजी महाराज








शिवाजी महाराज म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके
"जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." छ. शिवराय

संघवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रेशीमबागेच्या रंगात पुरते बुडवून टाकलेले आहे. त्यांचे पार ब्राह्मणीकरण करून टाकलेले आहे. ही महाराजांची बदनमी आहे. महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजलखानाच्या ब्राह्मण वकीलाची हत्त्या कशी केली? महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर जिवाजी विनायक सुभेदार या ब्राह्मण कारकुनाला गद्दारीबद्दल महाराजांनी शिक्षा कशी केली? ब्राहमण म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही, सवलत मिळणार नाही असे त्याला ठणकावणारे महाराजांचे हे अस्सल पत्र संघवाले का दडवून ठेवतात?

ब्राह्मणाची गय केली जाणार नाही-

पत्र १८ जानेवारी १६७५ चे आहे. अतिशय जळजळीत आणि कठोर आहे. महाराज या ब्राह्मण कारकुनाला नादान म्हणतात. "गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे" या ब्राह्मणाला "हरामखोर" अशी चक्क शिवी देतात. लाचखोरही म्हणतात. तुमच्यासारख्या लाच खाणारांना "ठिकेठाक" केले जाईल असा सज्जड दम भरतात. महाराज या पत्रात म्हणतात, " ऎशा चाकरास ठीकेठाक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?.. याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस, ऎसे जाणून बरा नतिजा तुम्हास पावेल. ताकीद असे." महाराज जर गोब्राहमण प्रतिपालक असते तर म्हणाले असते, " ब्राहमणदेवता, आपण शत्रूचे पैसे खाल्लेत, आमच्याशी गद्दारी केलीत, हरकत नाही, आम्ही आपले धर्माचे चाकर आहोत. आपण आमचे मालक. तेव्हा आपले उत्तम चालूय. असेच पुढे चालू द्या."

ब्राह्मण असलात तरी गर्दन मारली जाईल- 

पण महाराज तर या ब्राह्मणाला चक्क धमकी देतात. बघून घेऊ म्हणतात. ब्राह्मणाला आपला चाकरही म्हणतात, हे कसे काय? बरे इथे ठीकेठाक केले जाईल म्हणजे गर्दन मारली जाईल असे महाराज सांगताहेत! धर्मशास्त्रानुसार ब्रह्महत्त्या वर्ज्य असतानाही महाराज चक्क ब्रह्महत्त्येची धमकी कशी काय देतात? त्याकाळातले काही ब्राह्मण लाचखोर होते, स्वराज्याशी गद्दारी करणारे होते याचे हे पत्र हा खणखणीत पुरावाच आहे. म्हणून तर दडवादडवी चाललेली नाही ना?

एक श्लेष काढायचा तर असे म्हणता येईल की समाजात तोवर ब्राह्मणांना विशेषाधिकार असल्याने ब्राह्मणांच्या लाचखोरीकडे, गद्दारीकडे कानाडोळा केला जात असेल. तसा मुलाहिजा [तशी सवलत ] यापुढे बंद करण्यात आलेली आहे असे महाराज या पत्रांद्वारे सुनावताहेत. मग महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी ब्राह्मणांची ही पुर्वापार चालत आलेली ही सवलत तडकाफडकी बंद कशी काय केली बुवा? दया, कुछ तो गडबड है!

" धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगणे म्हणजे ईश्वरी आज्ञेचा भंग करणे होय." - छ. शिवराय 

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. 




"हिंदवी स्वराज्य"वाली पत्रे बनावट-

महान इतिहासकार द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर आणि ग. ह. खरे यांच्या मते, ज्या पत्रांमध्ये "हिंदवी स्वराज्य" हे शिवाजीराजांचे ध्येय होते असे म्हटलेले आहे ती पत्रे विश्वासार्ह नाहीत. [ पगडी, २६] याचाच अर्थ ती पत्रे बनावट आहेत.

राज्य आणि स्वराज्य या शब्दांचे जे अर्थ आज घेतले जातात, त्याकाळात ते शब्द खूप संकुचित अर्थाने वापरले जात असत. १७ जुलै १६५७ ला चाकणच्या पुजार्‍याला दिलेल्या इनामपत्रात शिवाजीराजे आपल्या जहागिरीला राज्य म्हणतात. १६६० पर्यंत त्यांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे " मोकासा " म्हणजे देणगी मिळालेली जहागिर असाच होता.[ पगडी, २७]


जहाल धर्मांध आणि वंशवादी औरंगजेब- तो हिंदुमुस्लीम अशा सर्व भारतीयांचा द्वेश करी-

याचा अर्थ आजच्या अर्थाने राजे धर्मनिरपेक्ष होते असेही नाही. ते धर्माने हिंदू होते. हिंदू जीवनपद्धतीत वाढलेले होते. धर्मांध औरंगजेबाची वर्तणूक त्यांना अमान्य होती. औरंगजेब वंशवादी होता.

त्याला त्याच्या तुरेनियन वंशाचा गर्व होता. त्याच्या नजरेत सर्वच हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आ्णि मुस्लमान दोघेही तिरस्करणीय होते. तो त्यांचा द्वेश करीत असे. याच्या उलट शिवराय धर्मवेडे नव्हते. ते धर्माचे पालन करणारे, धर्माने सांगितलेले पुजाविधी करणारे राजे होते. त्यांचा संघर्ष राजकीय होता. त्यामुळे धार्मिक अवडंबरापासून राजे दूर राहिले.

दुर्दैवाने त्यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांचा हा संघर्ष धर्मवादी नजरेने पाहिला. पक्षपाती पद्धतीने रेखाटला. परमानंदाने तर त्यांना परमेश्वराचा अवतारच बनवून टाकले. अर्थातच राजांच्या विरोधकांचे चित्रण त्याने राक्षस असे केले. या परमानंदाचे आजचे सगळे संघीय वारसदार महाराजांचा संघर्ष हा हिंदुमुस्लीम धर्माचा संघर्ष म्हणून रंगवतात. त्यात सगळ्या मुस्लीमांच्या वागण्याला ते अतिरंजित स्वरूपात अत्याचार म्हणून पेश करतात.

बाबा याकुत यांच्या आशिर्वादासाठी राजांची धडपड -

पण ते विसरतात की, राजे सहिष्णू होते. विविध धर्म आणि पंथांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. इस्लामी धर्मग्रंथ आणि मशिदी, पिरांची ठाणी यांच्याशी ते सन्मानाने वागत. बाबा याकुत यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी राजे सदैव धडपड करीत. [पगडी, ३२]

छ. शिवराय औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." [ पगडी, १२ ]

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. [ पगडी, ११ ]

असहिष्णुतेमुळे विनाश -

कितीही मोठी असली तरी माणसं आणि संस्था यांचा असहिष्णुतेमुळे विनाश होतो असेही शिवाजीराजे औरंगजेबाला लिहितात. विभिन्न जाती आणि धर्म यांच्याबद्दल सहिष्णुता अवलंबिली तरच मनुष्य जातीला शांतता आणि सुबत्ता लाभेल अशीही ताकीद शिवराय औरंगजेबाला देतात. [ पगडी, १२ ] अशा शिवरायांना स्वार्थासाठी संघाने कडवे हिंदुत्ववादी बनवून टाकलेय.

कवी परमानंद संघाला सोयीचे-

शिवरायांच्या समकालीन लेखकांमध्ये संस्कृत कवी परमानंद, जयराम, हिंदी कवी भूषण, मराठी बखरकार सभासद यांनी शिवाजी राजे हिंदुंचे कैवारी असल्याचे चित्र रंगवले त्याचे कारण त्यांच्यावर [ या चरित्रकारांवर ] असलेला पौराणिक कथांचा पगडा होय.

समकालीन पर्शियन बखरकार मुहम्मद कासीम आणि मुस्तेखान तसेच दखनी लेखक नुसरती यांनी महाराजांचे वर्णन नेमके उलटे केलेय.

युरोपियन लेखक आधी महाराजांना बंडखोर ठरवतात, मात्र त्यांची सरशी होऊ लागताच त्यांचे वर्णन उमदा युवराज असे करतात.

शिवराय हिंदूंचे कैवारी होते नी ते मुस्लीमवर्चस्वाविरूद्ध लढत होते ही मांडणी टोकाची, अतिरेकी असल्याचे सेतुमाधवराव पगडी आपल्या ग्रंथात पुराव्यानिशी दाखवून देतात. [ पगडी, १३] पगडी जरी संघाचे नाव घेत नसले तरी त्यांना संघच अभिप्रेत आहे हे स्पष्ट दिसते.

संघपरिवाराचा सततचा आंधळा आणि रक्ताळलेल्या असहिष्णुतेचा त्वेष त्यांनी मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांवर शेंदरासारखा लेपून टाकलाय. हा शेंदूर खरवडायला हवा. तेव्हाच महाराजांचे खरे रूप दिसू शकेल. हे काम धर्माचे चष्मे नसलेल्या सत्यशोधकांनाच करावे लागेल.
क्रमश:....

प्रा. हरी नरके, ७/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: १. सेतुमाधवराव पगडी, छत्रपती शिवाजी, काँन्टीनेंटल प्रकाशन, पुणे, २०१९, पृ. ११, १२, १३, २६, २७,
२. दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २६४/६५

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3iGVCMJEhRtiAUu2-k_xFSJAUkHd_IcieJC_nmxlHjCCU3KBdfHUl67dU

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?








रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके

बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० वर्षातली २६० वर्षे या मंडळींना शिवरायांची साधी आठवणसुद्धा का आली नाही? या मंडळींचे शिवरायांबद्दलचे प्रेम पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे अचानकच का उद्भवले? गेल्या ५०/६० वर्षातच ते उतू का जाऊ लागले? संघाचे छ. शिवराय "गोब्राह्मण प्रतिपालक" का? "कुळवाडीभूषण" का नाहीत? ते मुस्लीमद्वेष्टेच का? संघाने महाराजांना अवतारी पुरूष का बनवलेय? संघाचे मनोहर भिडे त्यांचा उल्लेख "शिवप्रभू" असा का करतात? ३२ मण सोन्याचे सिंहासन, खडा पहारा या नावाखाली हजार बाराशे कोटी रूपयांचा " एमबी [मनोहर भिडे] केयर्स फंड" त्यांना का जमवायचा आहे? रायगडावर त्यांना कब्जा का मिळवायचा आहे? यामागे मराठा तरूणांना संमोहित करण्याचा कोणता कट, कोणती कपटनिती आहे?

देवाचे पेटंट भटजीचे- ही तर रोजगार हमी-
यांचे एक वचन आहे. " देव मंत्राधीन आहेत. म्हणजे आधी दगडाची किंवा शाडूची साधी मुर्ती असते. तिच्यात मंत्राद्वारे भटजी प्राण निर्माण करतो. विसर्जनाआधी ते पुन्हा काढून घेतो. मंत्र भटजीच्या ताब्यात असतात. अंतिमत: देवांवर मालकी कोणाची असते तर भटजीची." म्हणून प्रत्येक महापुरूषाचा यांना देव करायचा असतो. त्याचा देव झाला की त्याचे पेटंट यांच्या नावे जमा होते. त्याची रॉयल्टी पिढ्यानुपिढ्या यांना मिळते. म्हणजे मानवनिर्मित देव ही यांची हजारो वर्षांची रोजगार हमी योजना आहे तर!

जातपात नाही मानत मग दलित शंकराचार्य का नाही? दलित सरसंघचालक का नाही?

एरवी बहुजनांच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारे हे लोक भटजीची नियुक्ती मात्र जन्माच्या आरक्षणाद्वारे करण्याबद्दल आग्रही असतात. तिथे का गुणवत्तेवर नियुक्त्या नको असतात? या एकाच जातीला दिलेल्या १०० टक्के आरक्षणाबद्दल सगळेच गप्प कसे असतात? तिथे का सगळ्या हिंदुंना प्रवेश नाही? आजपर्यंत एकही ब्राह्मणेतर शंकराचार्य का झाला नाही? संघ जातपात मानत नाही तर आजपर्यंत किती सरसंघचालक अनुसुचित जातींचे झालेत? किमान एक तरी शूद्र या पदावर का बसला नाही? आजही संघाच्या पहिल्या श्रेणीच्या श्रेष्ठींमध्ये एकही शूद्र किंवा अतिशूद्र का नाही?

भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा, म्हणून मुस्लीमद्वेश-
हिंदु संघटन करायचे तर भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा. यांनी मुस्लीमांना शत्रू ठरवले. सतत मुस्लिम समाजाचा द्वेश करीत बोलायचे. लिहायचे. वागायचे. मुस्लीमद्वेश वगळला तर संघ संपला.
यांचे शिवराय कट्टर मुस्लीमद्वेष्टेच का? याचे उत्तर यात आहे. भारतीय संस्कृती ही मुलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या दोघींच्या एकत्रित पाण्यावर पोसलेली. या देशात हिंदु राजे महाराजे व मुस्लीम नबाब, सुलतान यात संघर्ष झाले, हे खरे आहे. पण ते धर्माचे नव्हे तर सत्तेचे संघर्ष होते. इथली सामान्य हिंदुमुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. गावोगावी हिंदुलोक मुस्लीम पिरांच्या यात्रा करीत होते. पिराच्या पुजा करीत होते. कोकणात मुस्लीम लिगची स्थापना झाली तर ती गावच्या मारूतीला नारळ फोडून. [ संदर्भ- हमीद दलवाई]

सत्तेसाठी झालेल्या लढाया या धार्मिक लढाया नव्हत्या. म्हणून इंग्रजी राज्य यायच्याआधी या देशात कधीही हिंदुमुस्लीम जातीय दंगली झाल्या नाहीत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते दोघे एकत्रितपणे लढले. इंग्रजांनी त्यांच्यात पद्धतशीरपणे फूट पाडली म्हणून आठशे वर्षांच्या इतिहासात ११ ऑगष्ट १८९३ ला भारतातली पहिली हिंदुमुस्लीम दंगल झाली. पुढे मुस्लीम लिगने घडवलेल्या दंगली व पाकीस्तानची निर्मिती यातनं कटुता वाढत गेली. पाकच्या कारवायांनी तर आता ही कटुता, द्वेशभावना, आकसभावना गु्णाकाराच्या वेगाने वाढते आहे.

गंगाजमुना तहजीब-

इथले संगित, खाणेपिणे, कपडेलत्ते, भाषा, साहित्य, कला, विद्या या सार्‍यांमध्ये सरमिसळ आहे. अगदी रक्तातसुद्धा. भांडारकर नावाच्या शास्त्रज्ञांनी १०० वर्षांपुर्वीच हे सिद्ध केलेले आहे की शुद्ध रक्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. हजारो, लाखो वर्षांच्या मानवी प्रवासात सगळ्यांचे रक्त एकमेकात मिसळलेले आहे. शुद्ध रक्ताच्या निव्वळ थापा आहेत.

एक हिंदू व दोन मुस्लीम सत्ता मिळून मुघलांशी का लढत होते?
आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार अस्तित्वात येण्यामागे ज्या पत्राचे सुत्र आहे, तिकडे आपले लक्ष वेधतो. पत्र शिवाजी राजांचे आहे. मार्च १६७७ मधले आहे. राज्याभिषेकानंतरच्या राजकारणावरचे आहे. मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे. महाराज पत्रात म्हणतात, "संप्रती राजकारण वर्तमान म्हणजे, दक्षिणेचे पातशहा तीन.निजामशाह, आदिलशहा, कुतुबशाहा. त्यातली निजामशाही बुडाली... पठाण [दिल्लीकर मुघल] बळावला म्हणजे एका उपरी एक दक्षिणीयांची घरे बुडविल. कोणास तगो देणार नाही. ऎसे आम्ही समजोन कुतुबशहा यांसी पहिलेपासून रूजुवात राखिली होती... आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. या भेटीत असे ठरले की, "आपली पादशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे."

शिवाजी महाराजांचे हे पत्र हा सज्जड पुरावा आहे की लढाई हिंदुमुस्लीम अशी नव्हती. १ हिंदू आणि २ मुस्लीम सत्ताधिश एकत्र मिळून मुस्लीम असलेल्या मोगलांशी लढत होते. कारण लढाई धर्माची नाही तर सत्तेची होती.
क्रमश:....

प्रा.हरी नरके, ६/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २७१

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1wyrOJM-Z-vA7dsV47JiWtcD0MoB4SNG4ykT0bG9U1akS6hQtPCgm-Ybg

Sunday, May 3, 2020

रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू










रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू : मनू संतांच्या एक पाऊल पुढे, मनोहर भिड्यांनी संतांचा केला अपमान-प्रा.हरी नरके


महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये संतविचारांचा फार मोठा वाटा. न्या.रानडे ते प्रा.गंबा.सरदार यांनी संतसाहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती समाजाऊन सांगितलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीची पुर्वतयारी संतांच्या प्रबोधनपर विचारांनी केली होती हे न्या.म. गो.रानडे यांनी " मराठा सत्तेचा उदय" या ग्रंथात सप्रमाण मांडलेले आहे. संघाचे चेले मनोहर भिडे उठताबसता शिवछत्रपतींचे नाव घेत असतात आणि तरीही ते संतांचा धडधडीत अपमान करतात. दोन वर्षांपुर्वी भिड्यांनी जेव्हा संतांचा अवमान करणारी मुक्ताफळं उधळली तेव्हाच मी भिड्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत पुण्यात तलवारधारी झुंडी घुसवल्या होत्या. वारकरी चळवळ ताब्यात घेण्याचा त्यांच हा डाव वारकर्‍यांनी उधळून लावला.

महाराष्ट्राला पहिल्यांदा शिवराय सांगितले फुल्यांनी .त्यांना तर भिडे देशद्रोही म्हणतात. १९०६ कुणबी मराठा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी ६०० पृष्ठाचे मौलिक शिवचरित्र लिहिले त्याचा उल्लेखसुद्ध भिडे करीत नाहीत. भिड्यांना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून मराठा-बहुजन मुलांची टाळकी संमोहित करून पेशवाईच्या सावलीत न्यायची आहेत.

भिड्यांचे शिवराय रयतेचे राजे नाहीत, ते शेतकरी, कुणबी, मावळ्यांचे उद्धारकर्ते नाहीत तर ते गोब्राह्मण प्रतिपालक, रात्रंदिन परधर्मद्वेश शिकवणारे, युवकांची माथी भडकावणारे, आधुनिक काळातून पुन्हा विषमतावादी ब्राह्मणी, वैदीक राज्यात नेऊ पाहणारे भिडेवादी शिवराय आहेत. त्यावर सविस्तर लिहिणारच आहे. आज भिड्यांना पुजनीय असणार्‍या मनूची काही मतं बघूयात.

मनू म्हणतो,
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [ अध्याय ९ वा श्लोक १९]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9९/१५]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]
................................

"मनुस्मृती" हा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्यात २६८४ श्लोक आहेत. हा ग्रंथ कधी लिहिला गेला यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मनू एक की अनेक यावरही वाद आहेत. मनू ही व्यक्ती होती की संस्था [मठ/परंपरा] याबद्दलही भिन्न मतं आहेत. इ.स.पुर्व १७५ ते इ.स.१७५ या साडेतीनशे वर्षात हा ग्रंथ विकसीत झाला असावा असे तज्ञ सांगतात. तशा हिंदूंना प्रमाण असलेल्या एकुण स्मृती १३७ असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाच्या चर्चेत संसदेत सांगतात. त्यात सर्वाधिक महत्वाच्या म्हणून मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती या मानल्या जातात. मनुस्मृती ही शेकडो वर्षे भारतीय समाजाची जणू राज्यघटनाच होती. अगदी ब्रिटीश भारतातसुद्धा इंग्रज न्यायालये कौटुंबिक कलहांमध्ये   मनुस्मृतीच्या आधारेच निकाल देत असत. मनुस्मृती हा फक्त धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ होता. त्याला धर्मशास्त्र असेही म्हटले जाई. बाबासाहेब त्याचा धर्मिक व राजकीय प्रभाव सांगताना ते लिगल आणि पिनल कोड होते असे नेमके शब्द वापरतात. 

" सार्थ श्रीमनुस्मृती" हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा ग्रंथ वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा आहे. हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, मराठा, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायलाच हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे. "

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत. ते मी वाचलेले आहेत. पॅट्रीक वोलिव्हेल [ Patrick Olivelle] यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून मनुस्मृतीची प्रमाण [चिकित्सक] आवृ्त्ती तयार केलेली आहे. तिचे नावच "Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra," असे असून हे पुस्तक  Oxford University Press ने प्रकाशित केलेले आहे. भारतरत्न पां.वा.काणे, यांचा पाच खंडांतील, आठ भागांचा, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे 

डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. ते कार्यकर्त्यांनी वाचलेच पाहिजेत.


महामहोपाध्याय बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ ३/११]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ ६/३]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [९/१३]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [९/१५]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [९/१८]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [९/१९]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]

तर संघाच्या मनोहर भिड्यांना मनुस्मृतीचे असे राज्य पुन्हा हवेय. लक्षात ठेवा या राज्यात सर्व स्त्रिया आणि मराठा, माळी, साळी, कुणबी, आग्री, भंडारी, वंजारी, तेली हे सर्व बलुतेदार, शूद्र तसेच अनुसुचित जातींचे लोक यांना गुलामाचे जीवन जगावे लागेल. अंधारीगुहा आणि वेठबिगारी करावी लागेल.हवेय असे राज्य तुम्हाला? या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिताना मनु वा मनोहर भिडे यांच्याबद्दल संसदीय भाषाच वापरावी. शिवीगाळ करण्यामुळे मुद्दे मागे पडतात,त्यातनं आपलंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा.
विशेषत: माझ्या फेसबुक मित्रयादीतील मैत्रिणी, भगिनी, मुली, माता यांची यावर काय मतं आहेत ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0sHk873-gdTIHynAQXFnSMvawoIdspxcQeYgXosgHDQ8gAkqOlEiycF7w


-प्रा.हरी नरके, ४/५/२०२०
[लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखात व्यक्त झालेली मतं लेखकाची व्यक्तीगत मतं आहेत.]


संदर्भ-
१. सार्थ श्रीमनुस्मृती," मराठी अनुवाद, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट, गजानन बुक डॆपो, कबुतर खाना,दादर,मुंबई, भरत नाट्य मंदीर,पुणे
२. Olivelle, Patrick (translator) (2004), The Law Code of Manu, Oxford World's Classics, Oxford University Press, ISBN 978-0-19-280271-2
३. Olivelle, Patrick (translator) (2005), Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra, Oxford University Press, ISBN 978-0-19-517146-4
४. Olivelle, Patrick (translator) (1999), The Dharmasutras: The Law Codes of Ancient India, Oxford World's Classics, OUP Oxford, ISBN 978-0-19-283882-7
५. भारतरत्न पां.वा.काणे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे
*** डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे            मनुस्मृतीवरचे ग्रंथ
*** मनुस्मृतीवरील मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा चौदा महापंडितांनी केलेल्या चौदा टिका, आठ खंड, भारतीय विद्या भवन, मुंबई

Saturday, May 2, 2020

जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात, रा.स्व.संघ 19

















संघाच्या लबाड्या-४, जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात- प्रा.हरी नरके

मिरज दंगल घडवल्याचे, जोधा अकबर चित्रपटाला सांगलीत हिंसक विरोध केल्याचे आणि भीमा कोरेगाव दंगलीचे सुत्रधार असल्याचे खटले ज्यांच्यावर चालू आहेत ते आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे. रा.स्व.संघाचे १९८० पर्यंत निष्ठावंत स्वयंसेवक असलेले हे भिडे १९८४ पासून श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, ही संस्था चालवतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे वयाने ९० च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर असत्यकथन, सत्यापलाप आणि नागरिकांच्या भावना भडकावणारी वक्तव्ये केल्याचे अनेक गुन्हे आहेत.


सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे ते म्हणतात, आंबे खाल्ले की मुलं होतात. त्यांची आय.बी.एन.लोकमतवर बेधडक या कार्यक्रमात उदय निरगुडकर यांनी १ तासाची मुलाखत घेतली. ती सर्वांनी बघितली. त्यात ते जाहीरपणे म्हणाले, " बाबासाहेब मनुला मानणारे होते. मनुस्मृती वाचूनच आपण भारताची राज्यघटना लिहिली असे ते म्हणत. मनु हा महान कायदेतज्ञ होता असे त्यांनी लिहिले आहे. राजस्थानच्या विधान भवनात मनुचा पुतळा बाबासाहेबांच्या हस्ते बसवण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मनुचा गौरव केला. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते." या मुलाखतीत आणखी बरीच वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केली पण त्यावर नंतर कधीतरी बोलू. आज बाबासाहेब आणि मनुगौरव ्याची झाडाझडती घेऊ.


भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती १-  राजस्थानमध्ये मनुचा पुतळा उच्च न्यायालयाच्या प्रांगणात आहे. विधानभवनात नाही.

भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती २-  हा पुतळा २८ जुलै १९८९ ला बसवण्यात आला. त्याच्या ३३ वर्षे आधी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालेले होते. तर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद या घटनेच्या २६ वर्षे आधी म्हणजे २८ फेब्रुवारी १९६३ ला वारलेले होते. ३३/२६ वर्षे आधी निधन पावलेल्या महापुरूषांना हे भिडे मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजर करतात. हे भिडे इतकं धडधडीत खोटं बोलतात आणि त्याबद्दल त्यांना खंत, खेद वाटत नाही, त्याबद्दल ते माफी मागत नाहीत, उलट मुलाखतकार, आयबीएन लोकमत वाहिनीचे संपादक निरगुडकर नंतर गुपचुप या मुलाखतीतला भिडेंचा खोटेपणाचा पुरावा असणारा भाग गाळून ही मुलाखत यु ट्युबवर ठेवतात. गैरसोयीचे असलेले, लबाडी आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे पुरावे नष्ट करण्याची हिंदुत्ववाद्यांची ही सवय प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती आजही कायमच आहे.


पत्रकार, लेखक, इतिहासकार हा समाजाच्या स्मरणशक्तीचा रखवालदार असतो. हे लोक रखवालदार आहेत की मारेकरी यावर वेगळं बोलायची गरज आहे काय? ही मुलाखत ऎकल्यावर मी स्वत: निरगुडकरांशी बोललो होतो. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली असताना भिडे बाबासाहेबांना मनुचे समर्थक ठरवत असताना तुम्ही त्यांना महाडचा मनुस्मृतीदहनाचा प्रश्न का विचारला नाही असे मी त्यांना विचारले. ते मला म्हणाले, " भिडे आमच्याकडे आले होते ते याच अटीवर की एकही अडचणीचा प्रश्न विचारायचा नाही, प्रतिप्रश्न केला तर मी उठून जाईन, म्हणून मी गप्प बसलो." 


मी त्यांना जयपुरचा पुतळा बाबासाहेब गेल्यानंतर ३३ वर्षांनी बसल्याचे सांगितल्यावर त्यांनी माझा तसा बाईट घेतला. तो त्यांच्या वाहिनीवर दाखवलाही. जयपुरला आयबीएनची टिम पाठवून पुतळ्याचे फुटेज आणले, तेही दाखवले. पण लोक हे सगळे विसरल्यावर भिडेंचा खोटेपणा सांगणारा मुलाखतीतला भाग वगळून टाकला.


हे लिहून उपयोग काय असे काहीजण मला विचारतात. उपयोग हा की लिहून हे पुरावे जपले पाहिजेत नाहीतर हे लोक दिवसाढवळ्या पुरावे नष्ट करतात आणि इतिहासाचे विकृतीकरण / ब्राह्मणीकरण करतात.

३. भिंड्यांचा मी ताबडतोब समाचार घेतला होता.
" भिडेंचं विधान बिनबुडाचं - हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं."


https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html


४. म्हणे बाबासाहेब मनुचे समर्थक होते. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस मनुचे वाभाडॆ काढणार्‍या, मनुस्मृती जाळणार्‍या, राज्यघटनेच्या १३ कलमाद्वारे मनुस्मृती नाकारणार्‍या बाबासाहेबांना मनुवादी म्हणूच शकत नाही. भिडे मात्र म्हणतात. किळसवाणा आणि त्यांच्या वयाला, नेतृत्वाला, संस्कारांना न शोभणारा भाग म्हणजे मनुस्मृती वाचून मी राज्यघटना लिहिली असे बाबासाहेब म्हणायचे असे भिडे सांगतात. मनुस्मृती जाळून मी राज्यघटना लिहिली असे म्हणणारे बाबासाहेब चक्क उलटे करून, विकृत करून भिडे सांगतात, हे सत्यवचन आहे? ही देशभक्ती आहे? हे भिडेंच्या देश, धर्म, देवाला चालते? की हाच त्यांचा धर्म आहे? हीच त्यांची संस्कृती आहे का?

 बुद्ध कुचकामाचा म्हणे!-

५. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले, तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांना मानता का?" यावर होय असे भिडे म्हणाले नाहीत. विषयांतर करून भलतेच बोलत राहिले. यावरून काय ते सिद्धच होते. परदेशात बोलताना मोदींनी बुद्धाचा देश असा उल्लेख केल्याची बातमी आल्यावर भिड्यांनी जाहीरपणे मुलाखत देऊन सांगितले, " बुद्ध काही कामाचा नाही. मोदी चुकीचे बोलले." एकाबाजूला ते मोदींच्या महाआरत्या ओवाळत होते. पुण्यात्मा काय, संत काय, धर्मराजा काय, निष्कलंक काय आणि ऋषीमुनी काय! एकही विशेषण त्यांनी शिल्लक म्हणून ठेवले नाही. इतकी किळसवाणी भाटगिरी! जग भारताला बुद्धाचा देश म्हणूनच ओळखते भिडेमहाशय! तुम्ही कितीही द्वेश करा बुद्धाचा, कितीही आकस बाळगा, कितीही तिरस्कार करा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. हा देश बुद्धाचा होता, आहे, राहिल!

दंगली घडवणं हीच यांची महान देशभक्ती-
६. हिंदुत्ववाद्यांना जागतिक पातळीवरचा सोडा, अ.भा. पातळीवरचाही विचारवंत, प्रज्ञावंत, दार्शनिक घडविता आलेला नाही. म्हणतात ना, वासरात लंगडी गाय शहाणी, तशा अर्धशिक्षित तरूण, बेरोजगार आणि संमोहित बहुजन मुलांची डोकी भडकाऊन त्यांना दंगली करायला लावणं हीच यांची महान देशभक्ती. हिंदुत्वाच्या तयार केलेल्या बाजारगप्पा, बुटक्या लोकांची स्तोत्रं, बकवास त्यागाच्या विक्रमवेताळ कहाण्या आणि परधर्मद्वेश यांच्या जोरावर यांची दुकानं चालतात. विधायक, निरामय, निकोप आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारं एकही काम यांच्या खात्यावर आजवर जमा नाही!

स्वातंत्र्याच्या चळवळीत हे नुस्तेच गैरहजर नव्हते, तर यांचे बापाजादे त्यावेळी ब्रिटीशांच्या पोटार्थी चाकर्‍या करीत होते. जनरल डायरच्या सोबत निष्पाप भारतीयांवर गोळीबार करायला आघाडीवर होते.रावसाहेब, रावबहादूर असल्या पदव्या मिळवण्यासाठी ब्रिटीशांचे बूट चाटत होते. ते आता आम्हाला देशभक्ती शिकवताहेत! देश म्हणजे काल्पनिक देवीचा फोटो नसतो. हाडामासाची माणसं म्हण्जे देश असतो. यांची देश, देव आणि धर्माची भाषा म्हणजे निव्वळ पोपटपंची. बासुंदीकथा. मनाचे श्लोक. आंबाभुर्जी. स्त्रिया, बहुजन आणि कष्टकर्‍यांना उपाशी ठेऊन दक्षिणेत मिळवलेली.

https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1xwd0NiWLH3HilVmmEWcY7kyAdb6DIOAVZ31TTZj69mXHwkO0M3OB8q5E

-प्रा. हरी नरके, ०३/०५/२०२०

संदर्भासाठी पाहा:

१. https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/saransh/dr-br-ambedkar-many-and-sambhaji-bhide/
बाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे!, July 17, 2018, विजय चोरमारे in सारांश | राजकारण, history
..............................................................

२. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
लोकसत्ता ऑनलाइन | July 17, 2018 06:55 am
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
विशिष्ट आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता,अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधानं करुन सतत चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.

या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. याशिवाय, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावरही संभाजी भिडे गुरूजी ठाम राहिले, गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असंही ते म्हणाले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/
....................................


३. भिडेंचं विधान बिनबुडाचं -हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं.
https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html
...................................................
४. https://www.sarkarnama.in/dr-babasaheb-ambedkar-never-praised-manu-hari-narke-critisizes-bhide-guruji-26176
..................................................
५. News18 Lokmat
Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar On Bhima Koregaon violence आय बी एन लोकमत
https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60  Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar
..................................................................................

६. https://www.bbc.com/hindi/india-48720079
'मोदी के गुरु' संभाजी भिड़े के नासा विज्ञानी होने का सच
फ़ैक्ट चेक टीम, बीबीसी न्यूज़ 22 जून 2019

दावाः संभाजी भिड़े नासा की सलाहकार समिति में काम करते थे और उन्हें विज्ञान के क्षेत्र में 100 से ज़्यादा सम्मान मिल चुके हैं. संभाजी भिड़े एटॉमिक फिजिक्स में गोल्ड मेडलिस्ट हैं.

इतना ही नहीं, उनके बारे में यह भी कहा जा रहा है कि वो नासा की सलाहकार समिति में काम करते थे, 67 डॉक्टरेट और पोस्ट डॉक्टरेट रिसर्च में गाइड रहे थे, अब महाराष्ट्र में समाज सेवा कर रहे हैं और उनके 10 लाख से भी ज़्यादा फॉलोअर्स हैं.

फ़ैक्ट चेक:बीबीसी ने सोशल मीडिया पर फैलाई जा रही इस ख़बर की पड़ताल की. संभाजी भिड़े के संगठन के प्रवक्ता नितिन चौगुले ने इन दावों को ग़लत बताया है. पुणे यूनिवर्सिटी ने भी उनसे संबद्ध एक कॉलेज में भिड़े के प्रोफ़ेसर या स्टूडेंट होने की जानकारी न होने की बात कही

..............................................
7. https://www.youtube.com/watch?v=85g4AlFOLIo

#SambhajiBhide #GujaratiNews #TV9News
Buddha is of no use to the world: Sambhaji Bhide sparks yet another controversy| TV9News

https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60

.................................................

8. http://thewirehindi.com/60305/rajasthan-high-court-statue-of-manu/
मनु की प्रतिमा को हाईकोर्ट परिसर से हटाने की याचिकाएं वर्ष 1989 से लंबित हैं, जिन पर 2015 के बाद से सुनवाई नहीं हुई है. सोमवार को औरंगाबाद की दो महिलाओं के प्रतिमा पर कालिख पोतने के बाद मामला फिर गर्मा गया है.

इस घटना के बाद पिछले 29 साल से चल रहा विवाद फिर से ताज़ा हो गया है. गौरतलब है कि राजस्थान हाईकोर्ट में मनु की प्रतिमा की स्थापना 28 जुलाई, 1989 को हुई थी. इसे राजस्थान उच्च न्यायिक सेवा एसोसिएशन ने लॉयन्स क्लब के आर्थिक सहयोग से लगवाया था.

उस समय इसका खूब विरोध हुआ. हाईकोर्ट ने एक प्रशासनिक निर्णय के तहत इसे न्यायालय परिसर से हटाने का निर्देश भी दिया, लेकिन विश्व हिंदू परिषद के नेता आचार्य धर्मेंद्र ने इस फैसले को चुनौती देते हुए याचिका दायर कर दी.

इस पर सुनवाई करते हुए हाईकोर्ट के तत्कालीन न्यायाधीश महेंद्र भूषण ने प्रतिमा हटाने पर अंतरिम रोक लगा दी. उन्होंने मामले को वृहद पीठ को भेजते हुआ कहा कि अंतिम फैसला आने तक प्रतिमा हटाने पर लगी रोक बरक़रार रहेगी.

हैरत की बात है कि वृहद पीठ ने इस मामले का निपटारा करने की बजाय इसे ठंडे बस्ते में डाल दिया. इस दौरान प्रतिमा के पक्ष और विपक्ष में कई याचिकाएं ज़रूर दायर हुईं.

2015 में तत्कालीन मुख्य न्यायाधीश सुनील अंबवानी ने पहली बार इस मामले में रुचि ली. उनकी अगुवाई में वृहद पीठ ने 13 अगस्त, 2015 को मामले की सुनवाई की, जो इतनी हंगामेदार रही कि इसके बाद आज तक इस पर जिरह नहीं हो पाई है.

हुआ यूं कि प्रतिमा के विरोध में याचिका दायर करने वाले पीएल मीमरोठ की ओर से अधिवक्ता अजय कुमार जैन ने जैसे ही हाईकोर्ट परिसर में मनु की प्रतिमा पर सवालिया निशान लगाना शुरू किया, बड़ी संख्या में वकीलों ने उनकी मुखालफत शुरू कर दी. इनमें से कई जोर-जोर से चिल्लाने लगे.

न्यायाधीश सुनील अंबवानी ने वकीलों को शांत करने के काफी प्रयास किए, लेकिन उन्हें इसमें कामयाबी नहीं मिली. अंत में वे उठकर चले गए. इस दिन के बाद इस मामले में आज तक सुनवाई नहीं हुई है. हाईकोर्ट के वरिष्ठ वकीलों की मानें तो यह मामला मधुमक्खी के छत्ते जैसा है, जिसमें शायद ही कोई न्यायाधीश हाथ डाले.

याचिकाकर्ता पीएल मीमरोठ कोर्ट के इस रवैये से परेशान हैं. वे कहते हैं, ‘न्याय में देरी एक तरह से अन्याय होता है. इस मामले को कोर्ट में चलते हुए 29 साल हो गए हैं. कोर्ट न्याय करने की बजाय कहता है कि जब इस विषय पर किसी प्रकार का जनाक्रोश नहीं परिलक्षित होता है तो बेवजह गड़े मुर्दे क्यों उखाड़े जा रहे हैं.’






......................

Friday, May 1, 2020

निवडणूक आयोगानुसार दत्तोपंत ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा- रा.स्व.संघ 18











संघाच्या लबाड्या ३: निवडणूक आयोगानुसार दत्तोपंत ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा- प्रा. हरी नरके

संघाचे वरिष्ठ नेते, समरसता मंचाचे संस्थापक दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेले पुस्तक म्हणजे निव्वळ थापा असल्याचे एव्हाना आम्ही वेगवेगळे पुरावे देऊन सिद्ध केलेले आहेच. ते पुरावे खुद्द बाबासाहेबांच्या साहित्यातले असल्याने त्यांची विश्वासार्हता १००% आहे. १९५२ च्या निवडणुकीत जनसंघाबरोबर बाबासाहेबांच्या शेकाफे पक्षाची युती होती असा दावा दत्तोपंत /संघ करतात. त्यासाठी दत्तोपंत ठेंगडी यांच्या या पुस्तकाची साक्ष काढली जाते. संघाचे दत्तोपंत यांचे हवाले म्हणजे निव्वळ हवेतल्या बाता असल्याचे पुरावे खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातून आणि संसदेच्या दस्तऎवजांमधून आपण दिलेले असून ते यापुर्वीच्या लेखांमधून आपण बघितलेलेच आहे..
याशिवाय आता आणखी एक नवा पुरावा पुढे आलेला आहे. निवडणूक आयोगाकडची १९५२ च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी सांगते की या जनसंघ आणि बाबासाहेबांचा शेकाफे हा पक्ष या दोन पक्षात निवडणूक युती नव्हती.


जेव्हा दोन पक्षात युती असते तेव्हा प्रत्येक मतदारसंघात दोघांपैकी एकाचाच उमेदवार उभा असतो. म्हणजे त्यावेळच्या मध्यप्रांतात प्रत्येक मतदार संघात एकतर जनसंघाचा उमेदवार हवा किंवा शेकाफेचा. यालाच युती म्हणतात ना?

पण मध्यप्रदेशात असे असंख्य मतदारसंघ होते की जिथे जनसंघ व शेकाफे दोघांचेही उमेदवार उभे होते. याला युती म्हणत नाहीत.

या निवडणुकीत उदा. काटोल, ब्रह्मपुरी, हिंगना, कम्पति, नागपुर-१ आणि महासमुंद आदी विधानसभा जागांवर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि भारतीय जनसंघ दोघांचेही उमेदवार एकमेकांविरूद्ध उभे होते. दोघांनाही मतं पडली असे निवडणुक आयोगाचे दप्तर सांगते. हे निवडणूक आयोगाचे आकडे असल्याने त्यावर सर्वांना विश्वास ठेवणे भागच आहे. बरं १९५२ साली इव्हीएम मशिन्स नव्हत्या बरं का!



संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3MpmLYDr8JaKOvKzdrTvyl-ZW-FFGn3lr9VY9OA_3BlbqVT20NEOqkO04

प्रा.हरी नरके, २ मे २०२०

[संदर्भासाठी पाहा- अरविंद कुमार, https://hindi.theprint.in/opinion/the-election-commission-data-exposes-the-alleged-proximity-of-ambedkar-and-the-rss/134455/?fbclid=IwAR3aa7-C8dlLF7sFlBjPifZ2pnj_BzYq3mugktqanT7LTDMNYx1yvFqbu_o ]

Thursday, April 30, 2020

डॉ. बाबासाहेबांना वैदीक धर्माचे समर्थक बनवले- प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 17



संघाची लबाडी २ - डॉ. बाबासाहेबांना वैदीक धर्माचे समर्थक बनवले- प्रा. हरी नरके


रा.स्व.संघाचे जे मोजके श्रेष्ठी आहेत त्यात मोहन भागवत, मनमोहन वैद्य यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो कृष्ण गोपाल शर्मा  यांचा. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील तत्ज्ञ म्हणून लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने व्याख्यानाला बोलावले होते. केंद्राची आणि युपीची सत्ता भाजपा-संघाच्या ताब्यात असल्याने विद्यापीठेही त्यांच्याच कब्ज्यात आहेत. 

ज्यांचा बाबासाहेबांच्या जीवन-कार्य-विचारांचा अभ्यास नाही अशा व्यक्तीला भाषणाला ही विद्यापीठे बोलावतातच कशी? बाबासाहेबांच्या नावावर शर्मांनी चक्क विरोधी विचार ठोकून दिले. त्यांना बाबासाहेबांना शंकराचा अवतार घोषित करायचे असणार. त्यांच्या भाषणांच्या मोठमोठ्या बातम्या दिल्या गेल्या. लोकांमध्ये त्या वक्त्यांची आंबेडकरांवरील अधिकारी विद्वान अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना आहे, साडेतीन वर्षांपु्र्वीची.

संघाचे सरसचिव मनमोहन वैद्य यांनी आरक्षणविरोधी वक्तव्यं केल्यानंतर आता संघाचे दुसरे श्रेष्ठी वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. संघाचे सह सरसचिव कृष्ण गोपाल शर्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत डॉ. आंबेडकर विद्यापीठात, लखनौमध्ये बोलत होते.

ते म्हणाले, " १. बाबासाहेबांनी कधीही वैदीक [ब्राह्मणी] धर्माला विरोध केलेला नाही.

२. बाबासाहेबांना वैदीक [ब्राह्मणी] धर्म प्रिय होता. ते त्याचे समर्थक होते. त्यांचा विरोध फक्त त्यात नंतर घुसवण्यात आलेल्या वाईट गोष्टींना होता. ते मूळ वैदीक विचारांच्या बाजूचे होते. 

३. भाषेच्या आधारावर राज्यं बनवायला आंबेडकरांचा विरोध होता.

४. आंबेडकरांचा कितीही अपमान झाला, त्यांना छळले गेले तरी त्यांनी ते विष [हालाहल] शंकर भगवानांप्रमाणे पचवले. [सुचन- बाबासाहेब शंकराचे अवतार होते]"

भाषण दीड तासांचे होते त्यात पाल्हाळच जास्त होते. मुद्दे एव्हढेच होते. पण ते लबाडीचे आणि घातक होते. बाबासाहेबांना वैदीकांच्या बाजूने उभे करण्याचे हे षडयंत्र होते.


हे भाषण विद्यापीठातले असल्याने ते विद्यापीठ पुस्तकरूपाने छापणार, मग ते अभ्यासक्रमाला लावले जाणार आणि इतिहास म्हणून रुजवले जाणार, अशी ही लबाडी होती.






मी कृष्ण गोपाल शर्मांना ताबडतोब उत्तर दिले आणि शर्मांचे वक्तव्य खोडून काढले. 

त्यांना सणसणीत भीमटोला देताना मी म्हटले, " १. संघाचे कृष्ण गोपाल शर्मा बाबासाहेबांच्या विचारांचा विपर्यास करीत आहेत. बाबासाहेबांनी १९३६ साली लिहिलेल्या "जाती संस्थेचे उच्चाटण" या ग्रंथात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणार्‍या वैदीक विचारधारेला संपुर्ण नकार दिलेला आहे. कठोर धर्मचिकित्सा करून बाबासाहेबांनी वैदीक विचारधारेवर आसूड ओढलेले आहेत. अशा स्थितीत त्यांना सनातनी ब्राह्मणी धर्माचे समर्थक म्हणून पेश करणे अन्यायकारक आहे. बाबासाहेबांची टोकदार मांडणी बोथट करण्याची संघाची ही साजिश आहे. संघाला बाबासाहेबांना शंकराचा अवतार बनवायचा असून त्यांचे क्रांतिकारक विचार लपवायचे आहेत.

२. बौद्ध धर्म स्विकारताना त्यांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञांपैकी आठ प्रतिज्ञा वैदीक विचारधारा नाकारणार्‍या आहेत. अशा बाबासाहेबांना वैदीक तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणून सादर करणे ही शर्मांची आणि पर्यायाने संघाची लबाडी आहे.

३. वैदीक धर्मग्रंथ हे बहिष्कृततेच्या तत्वाचे पुरस्कर्ते असल्याने या धर्मामुळे स्त्रिया, शूद्र [ओबीसी] आणि अतिशूद्र [अनुसुचित जाती] यांना अतोनात छळ सोसावा लागला. त्यांची उच्चवर्णियांनी ह्याच ग्रंथांच्या आधारे लूट केली असेही बाबासाहेबांनी सिद्ध केलेले आहे.

४. धर्माच्या आणि धर्मग्रंथांच्या नावावर स्त्री-शूद्रांवर शताकानुशतके अपार जुलूम करण्यात आला. ही तत्वं नुसती धार्मिक नसून ती कायदा आणि निर्बंध म्हणून राजसत्तेनं शेकडो वर्षे राजदंडाच्या जोरावर राबवलेली. त्यामुळे त्याला कायद्याचे, संविधानाचे रूप आलेले होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून तसेच राज्यघटनेच्या कलम १३ मध्ये हे विषमतावादी कायदे रद्द केलेले असताना त्यांना या वैदीक विचारधारेचा समर्थक ठरवणं हे आम्हाला मान्य नाही. 

५. गौतम बुद्धांनी वेद नाकारले. वैदीक विचारधारा फेटाळली. ब्राह्मणी कर्मकांड नाकारले. पुनर्जन्म आणि कर्मविपाकाचा सिद्धांत ठोकरला. श्रेणीबद्ध विषमता लादणारी वैदीक व्यवस्था बुद्धांनी उधळून लावल्याचे बाबासाहेबांनी सप्रमाण दाखउन दिले. बुद्ध गुणवत्ता आणि आचरणावर माणसाची पारख करीत होते, जन्मावर नाही हेही बाबासाहेबांनी सप्रमाण मांडले.

६. पुणे करारात बाबासाहेबांनी दुबळ्या, मागास समाजघटकांना आरक्षणाद्वारे न्याय मिळऊन दिला. संघाचा आरक्षणाला विरोध असल्याने बाबासाहेबांचे हे योगदान संघाला पुसायचे [ नष्ट करायचे ] आहे."

हे उत्तर यासाठी आवश्यक होते की हे लोक बाबासाहेबांना भगवान शंकराचा अवतार बनऊन मोकळे व्हायचे.

तेव्हा बोलणारी व्यक्ती कितीही मोठ्या पदावरील असली, शक्तीमान असली तरी उत्तर देणे भाग होते. 

संघ वर्तुळात या उत्तराने संतापाची लाट उसळली. त्यांचा खूप जळफळाट झाला. 

केलेल्या कामाचे ढोल वाजवण्याची आपली पद्धत नाही.पण बहुजन समाजाला सांगितल्याशिवाय कळतही नाही, त्याला काय करावे?

त्यावेळी टाइम्स समुहाने माझे म्हणणे ठळकपणे छापले होते. ते सोबत जोडले आहे.

संघ खडे टाकून अजमावतो. विरोध झाला नाहीतर सुसाट सुटतो. विरोध झाला तर दोन पावले मागे येतो. थांबतो. मात्र थोड्या दिवसांनी पुन्हा प्रचार सुरू करतो. अफवातंत्र, खिशात असलेले पत्रकार आणि मालक यांच्या जोरावर धडधडीत खोट्या गोष्टी इतिहास म्हणून लोकांच्या गळी उतरवतो. म्हणून वेळीच विरोध करावा लागतो.


प्रा. हरी नरके, 01/05/2020

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2fJwHv5DhnuAJvbAx_ab_ANshKPSE6eReuGzIQasl6DoBGcMrCDllpVkY


परिशिष्ट-१-

How Babasaheb rejected and criticised the Vedas?

इकॉनॉमिक्स टाईम्स, Jan 24, 2017, वैभव पुरंदरे

First eight of the 22 vows that Ambedkar administered to his followers on the day he embraced Buddhism involved an open repudiation of the Vedic religion.

By Vaibhav Purandare, TNN| Jan 24, 2017 

MUMBAI: Contrary to RSS official Krishna Gopal's claim that Dr Babasaheb Ambedkar had immense faith in the Vedic religion, the framer of India's Constitution not only never believed in the Vedas or Vedic faith but severely criticised it several times, once going to the extent of writing, in his canonical work 'Annihiliation of Caste', that “you have got to apply the dynamite to the Vedas and the shastras, which deny any part to reason; to the Vedas and shastras, which deny any part to morality .“

The first eight of the 22 vows that Ambedkar administered to his followers on the day he embraced Buddhism in Nagpur on October 14, 1956, were also an open repudiation of the Vedic religion, said scholar Hari Narke, who edited volumes 17 to 22 of Ambedkar's writings and speeches, published by the Maharashtra government.


In 1936, Ambedkar wrote, “The Hindu religion, as contained in the Vedas and the Smritis, is nothing but a mass of sacrificial, social, political and sanitary rules and regulations, all mixed up. What is called religion by the Hindus is nothing but a multitude of commands and prohibitions.“

Offering a radical solution to the problem of too many scriptures in Hinduism, he said the “Vedas, Shastras and Puranas, which are treated as sacred and authoritative, must by law cease to be so and the preaching of any doctrine, religious or social contained in these books should be penalised.“ Describing the great work of the Buddha, Ambedkar stated that the founder of Buddhism had “repudiated the authority of the Vedas“.When Buddha condemned “karma kanda“ (rituals) and Yagnas, Ambedkar stated, the “counter-revolutionaries“ opposed him saying these things “were ordained by the Vedas, the Vedas were infallible.“


But, he wrote, “People who had accepted the gospel of social equality and who were remaking society on the basis of each one according to his merits--how could they accept the Chaturvarnya theory of gradation and separation of man based on birth simply because the Vedas say so?“ 

In at least four of his works in addition to the controversial `Riddles in Hinduism -Caste in India' (1916), 'Annihilation of Caste' (1936), `Who were the Shudras' (1946) and `The Untouchables' (1948) -Ambedkar offered a strong indictment of the earliest known Hindu texts.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/how-babasaheb-rejected-and-criticised-the-vedas/articleshow/56750772.cms?from=mdr
......................................................

Wednesday, April 29, 2020

संघाची लबाडी - संघाने उभे केले महात्मा फुले यांचे नकली / डमी वंशज- प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 14












सुमारे साडेचार वर्षांपुर्वी संघाने पुण्याजवळ एक मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. तेव्हा गोदीमिडीयाला हाताशी धरून खोट्या बातम्यांचा पाऊस पाडण्यात आला. त्यातली एक फुसकी म्हणजे अर्धी चड्डी घातलेल्या काही बनावट लोकांचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्यात आले. ते महात्मा फुल्यांचे वंशज असल्याची दवंडी पिटण्यात आली. स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच असे लिहून ठेवले होते की " हे लोक आपले वारस नाहीत, " अशांच्याच पुढच्या पिढ्यांना भजनी लावून ते जोतीरावांचे वारस असल्याची प्रसिद्धी संघ देत आहे. महात्मा फुल्यांचे अपहरण करण्याचा हा बनाव साडेचार वर्षांपुर्वी मी उधळून लावला होता.


पुण्याचे एक पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना यासाठी हाताशी धरण्यात आले. ते आमच्याशी खाजगीत बोलताना संघाची टर उडवायचे. वर्षानुवर्षांची ओळख. पण त्यांनी कधी कळूच दिले नाही की ते संघवाले आहेत. जशी मोदीफडणविसांची सत्ता आली तसे यांचे खरे रूप उघडे पडले. परांजपे चक्क संघाची तळी उचलून धरायला लागले.

त्यांनी डी.एन.ए.मध्ये ही बातमी दिली. मी तात्काळ खुलासा केला, बातमी खोटी आहे. महात्मा फुल्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता. त्याला मुलगा झाला नाही. त्यामुळे फुले आडनावाचे कोणीही फुले वंशज शिल्लकच नाहीत. केवळ आडनाव हा पुरावा मानायचा तर प्रत्येक भोसले आडनावाचा माणूस छत्रपती शिवरायांचा वंशज मानावा लागेल. महात्मा फुले यांच्या हयातीतच काही भाऊबंद, फुले मंडळी, जमिन आणि घरदाराच्या लोभाने, पिढीजात वादांमुळे किंवा सनातन्यांचे हस्तक म्हणून जोतीराव -सावित्रीबाईंच्या विरोधात गेलेले होते. क्रांतिकारक विचार पेलायला काळीजही मोठे लागते. छटाकभर काळजाचे लोक सनातन्यांचे हस्तक बनू शकतात. क्रांतिकारक नाही. त्यातल्या काही बुटक्या लोकांना हाताशी धरून संघ हाच फुले विचार चालवतो असं वदवणं हे किळसवाणं होतं. ज्यांनी महात्मा फुले वाचले नाहीत, त्यांचे पुस्तकही हातात धरलेले नाही असे लोक टिव्हीवर येऊन फुलेविचार आणि संघ किती जवळचे आहेत यावर पोपटपंची करीत होते.  पढवलेले सुमार लोक दुसरं काय करणार?

स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट केलेले आहे, की आपले कोणीही भाऊबंद हे आपले वारस नाहीत, अशांच्याच पुढच्या पिढ्यांना संघ फुलेवारस म्हणून प्रसिद्ध देत होता. आजही हे कारस्थान चालूच आहे.

डी.एन.ए.चे संपादक उदय निरगुडकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझा खुलासा संपादित स्वरूपात प्रकाशित केला. [पाहा-परिशिष्ट १]

अशाच खोट्या बातम्या लोकमत दैनिकातही झळकळ्या होत्या. लोकमतचे मुख्य संपादक दिनकर रायकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर लोकमतनेही माझा खुलासा छापला. [पाहा-परिशिष्ट २]

ह्याच खोडसाळ बातम्या ए.बी.पी. माझा वाहिनीवरही देण्यात आल्या होत्या. तिकडेही संपादक श्री राजीव खांडेकर यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझ्या खुलाशाचा बाईट बातम्यांमध्ये दाखवला. मात्र तो ऑनलाईनवर ठेवण्यात आला नसल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही.

त्यावेळी आय.बी.एन. लोकमतवर यानिमित्ताने संपादक मंदार फणसे यांनी एक "बेधडक" चर्चा घेतली होती. तिच्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो. त्या चर्चेत मी संघाचा खोटेपणा सप्रमाण उघडा पाडला होता. [ पाहा- परिशिष्ट ३]

यावेळी संघाची असत्यकथन, सत्यापलाप आणि खोटा इतिहास रचण्याची साखळी उघडी पाडणारा ब्लॉगही मी लिहिला होता. [ पाहा-परिशिष्ट-४ ]

" Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage " असा लेख मुंबई मिरर [ दि. 12 january 2016, mumbai mirror] या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यात मिररच्या प्रतिनिधी अलका धुपकर यांनी माझा दावा नोंदवला होता. [ पाहा परिशिष्ट-५] 


लोकमतने माझे म्हणणे विस्ताराने छापले होते, " राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:

१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.

४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.

५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.

६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, 

" स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे सच्चे वैचारिक वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव, ना.मे.लोखंडे आणि केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत हे हास्यास्पद आहे. रा.स्व.संघाला अशा बनावट आणि तकलादू मना्च्या श्लोकांची रचना करावी लागावी हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे. 

विद्यमान फुले मंडळींनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. ते महात्मा फुल्यांचे वारसदार असल्याचा नकली दावा करीत आहेत. फुलेविचारांच्या बोगस प्रमाणपत्रांचे वाटप ते करू शकत नाहीत. तो नैतिक अधिकार महात्मा फुले व सावित्रीबाईंचा ध्येयवाद सच्चेपणाने पुढे नेणारांनाच आहे. इतर लांडग्यांना नाही.

संघाच्या घृणास्पद वर्तनाचे असे कितीतरी पुरावे देता येतील. 
तेव्हा बलाढ्य रा.स्व. संघाला माझ्यामुळे [मी त्यांचा खोटापणा सिद्ध केल्याने] माघार घ्यावी लागल्याने संघ संतापणे स्वाभाविक आहे. संघ तोंडघशी पडला तो माझ्यामुळे नाही,त्यांच्या लबाडीमुळे. असत्याचा सहारा  घेतल्याने. महात्मा फुले सत्यमेव जयते चे पुरस्कर्ते होते. संघाने तेव्हापासून आपल्या चेल्याचपाट्यांकरवी अफवा पसरावायला सुरूवात केली. तेच ते त्यांचे गेल्य ९५ वर्षांचे जन्मापासूनचे अफवातंत्र. 

अहो, कळलं का, हरी नरके तर आमचेच आहेत. अरे लबाडांनो, मी तुमचा होतो म्हणून तुमचा खोटारडेपणा जगाच्या वेशीवर टांगला काय? जो सज्जड पुराव्यांनिशी तुम्हाला उघडं पाडतो, तुम्हाला जाहीरपणे चॅलेंज करतो तो तुमचा असतो म्हणून काय? मी संघाला गेल्या ३२ वर्षात अनेकवेळा उघडं पाडलं पण संघाच्या लबाड्या काही थांबत नाहीत. उद्या संघाच्या आणखी एका लबाडीबद्दल वाचा- 

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/


प्रा. हरी नरके, ३०/४/२०२०



....................................
परिशिष्ट १-

Thursday, January 21, 2016
Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
http://www.dnaindia.com/mumbai/report-morally-improper-to-call-rajaram-s-descendants-as-mahatma-phule-s-prof-hari-narke-2167460
DNA,Online, 21 Jan.2016

Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3.
Researcher on Mahatma Phule's life and works prof Hari Narke has said it is not morally proper to project the Rajaram Phule's descendants as those of Mahatma Phule as the latter gave importance to ideological inclination than biological lineage. Narke pointed out that Mahatma Phule himself had disowned his elder brother Rajaram by registering his will.

dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3. Narke said the report headline said three members of the Phule family, who are descendants of Mahatma Phule, had attended the event, which is far from reality as, Narke said, they are in no way descendants of Mahatma Phule.

He added that Mahatma Phule and his wife Savitribai had adopted the son of a Brahmin widow, who went on to become a doctor. While adopting the boy, Phule had put the condition that if the boy did not adhere to Satyashodhak Samaj principles, his wife should look for another one to adopt, Narke said, reiterating the fact that Mahatma Phule gave importance to ideological inclination rather than biological lineage.
The professor also said that Mahatma Phule's will had clearly mentioned that neither his elder brother Rajaram nor his son Ganpat could have any share in his property. "So when Mahatma Phule himself had disowned his brother, how can his brother's descendants claim to be Mahatma Phule's?" he asked.

Morally Improper To Call Rajaram's Descendants As Mahatma Phule's: Prof Hari Narke...
.............................................

परिशिष्ट -२
Monday, January 18, 2016
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच

http://m.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11284626
ऑनलाइन लोकमत, सोमवार, दि.18 जानेवारी, 2016.First Published: 18-January-2016 : 13:25:00
Last Updated at: 18-January-2016 : 13:54:11
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच - हरी नरके
पुणे, दि १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.
४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.
५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.
६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

uesday, January 12, 2016
ते फुल्यांचे वारस नव्हेत!....
............................................

परिशिष्ट ३
आय.बी.एन.लोकमतवरील बेधडक कार्यक्रमाची लिंक-
https://www.youtube.com/watch?v=NjL7LqCqBzE
bedhadak 12 Jan 16 on Mahatma Phule family's 4th, 5th generation and RSS show
News18 Lokmat
23 K views 4 years ago

......................................................................

परिशिष्ट-४
माझा त्यावेळी लिहिलेला ब्लॉग-
1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.

त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.
.......................................

परिशिष्ट -५
मुंबई मिरर मधील लेख-
Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage
12 january 2016 mumbai mirror

Read more at:

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppsthttps://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms
................................................