Showing posts with label संभाजी ब्रिगेड. Show all posts
Showing posts with label संभाजी ब्रिगेड. Show all posts

Saturday, March 17, 2018

संभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा !

 
संभाजी महाराजांचा शहिद दिन तारखेनुसार का पाळला जात नाही?
इंग्रजी कालगणनेनुसार येणाऱ्या तारखेला शिवजयंती साजरी करावी, असं म्हणणारी मंडळी संभाजी महाराजांचा मृत्यूदिन मात्र तिथीनं पाळला जावा, असा आग्रह का धरत असावेत?
‘मनुच्या नियमानुसार संभाजींची हत्या झाली’, ‘संभाजींच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या जातात’, ‘गुढीपाडवा बहुजनविरोधी सण आहे’ असा डांगोरा पिटायचा असेल तर याला पर्याय नाही.

1. दसरा आणि होळी या दोन सणांव्यतिरीक्त फार सणवारांचे उल्लेख ऐतिहासीक साधनांमध्ये क्वचितच आढळतात. तरी गुढी पाडव्याचा उल्लेख शिवचरित्रात एकदा सापडतो. शिवाजी राजांच्या निकटवर्तींयापैकी एक निराजीपंत गुढीपाडवा साजरा करण्यासाठी घरी गेले, असा उल्लेख आहे. म्हणजे संभाजीराजांच्या हत्येपुर्वी गुढीपाडवा साजरा होत होता. संतसाहित्यात गुढ्या उभारण्याचे उल्लेख आहेत.

2. संभाजीराजांच्या हत्येसंदर्भांत ‘आलमगीर विजय’ म्हणजेच ‘फुतूहाते आलमगिरी’ या ग्रंथांची साक्ष काढायला हरकत नसावी. याचा लेखक ईश्वरदास नागर हा राहणार मुळचा पाटण, गुजरातचा. औरंगजेबाचा मुख्य न्यायाधीश शेखुल इस्लाम याचा कारकुन होता हा ईश्वरदास. शेखुल इस्लाम नेहमी औरंगजेबासोबत असे. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा,’ या न्यायानं साहजिकच ईश्वरदासही नेहमी त्याच्या धन्याबरोबर असायचा. या ईश्वरादासानं 1696 मध्ये औरंगजेबाची नात सैफुन्निसा हिला ब्रह्मपुरीच्या (ता. मंगळवेढे, जि. सोलापुर) छावणीत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. या कामगिरीबद्दल औरंगजेबानं ईश्वरादासाला मनसब देऊन गौरविलं. थोडक्यात ईश्वरदास हा औरंगजेबाच्या जवळच्या वर्तुळात होता. या ईश्वरदासाच्या ‘फुतूहाते आलमगिरी’ या ग्रंथाच्या हस्तलिखीताची प्रत लंडनच्या ब्रिटीश म्युझियमध्ये आहे. एकूण 339 पानांचा हा ग्रंथ फारसी भाषेत आहे.

3. फारसी भाषेचे तज्ज्ञ सेतुमाधवराव पगडी यांनी या ग्रंथाची नक्कल मिळवली होती. या ग्रंथाचं भाषांतर करताना पगडींनी केलेली नोंद अशी – संभाजीराजांची कैद आणि त्यांची निर्घृण हत्त्या यासंबंधी ईश्वरदासाने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्या अभ्यासकांना नवीन वाटतील. “औरंगजेबासमोर उभे केल्यानंतर संभाजीराजांनी त्याच्यासमोर आपली मान लवविली नाही. इखलासखान आणि हमीदुद्दीनखान यांनी पुष्कळ समजावूनही काही उपयोग झाला नाही. औरंगजेबानं त्याचा बक्षी रुहुल्लाखान याला आदेश केला, की संभाजीला विचार – ‘तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्तीचा ठावठिकाणा कुठं आहे? बादशाही सरदारांपैकी कोण-कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबध ठेवीत होतं?’ संभाजी गर्विष्ठ होता. माहिती देण्याचं नाकारुन त्यानं बादशहासंबंधी घाणेरडे शब्द उच्चारले. त्याची निंदा-नालस्ती केली, असं ईश्वरदास लिहितो. यावर औरंगजेबानं आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून (आंधळा करुन) त्याला नवीन दृष्टी द्यावी (वठणीवर आणावं). त्याप्रमाणं करण्यात आलं. गर्विष्ठ संभाजीनं डोळे काढल्यापासून अन्नत्याग केला. काही दिवस उपास घडल्यावर ही बातमी औरंगजेबाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेनं त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपुरापर्यंत मिरविण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकविण्यात आले,” असं ईश्वरदासनं नमूद केलं आहे.

4. औरंगजेबाची कारकिर्द म्हणजे केवळ राजकारणाचा भाग होता, अशा प्रचाराची आपल्याकडे लोकप्रिय 'फॅशन' आहे. ती अनैतिहासीक आहे. कैद्यांना धर्मांतराच्या अटीवर सोडणं हे इस्लामी व्यवहार-धर्मशास्त्राच्या हनफी परंपरेला धरुन होतं. इनायतुल्लाखान हा औरंगजेबाचा चिटणीस-पत्रलेखक. इनायतउल्लाखानच्या ‘अहकामे आलमगिरी’ (आलमगिरीचा आदेश) या ग्रंथात औरंगजेबाची पत्रं आहेत. हा फारसी ग्रंथाचं हस्तलिखीत उपलब्ध आहे. इच्छुकांनी जरुर त्याचं वाचन करावं. सन 1702 ते 1707 या काळातल्या औरंगजेबाच्या या आज्ञापत्रांमध्ये काफिरांचा (हिंदू) नायनाट, मंदिरांचा विध्वंस, मूर्तिपुजकांची हकालपट्टी, चोर (मराठे), गाव-किल्ल्यांची नामांतरे, धर्मांतरे याचे संदर्भ उदंड आहेत.

5. मुस्लिम राज्यकर्त्यांनी विशेषतः बाबर आणि औरंगजेबानं हनीफ परंपरेचा उपयोग सर्वाधिक करुन घेतला. शिवरायांचे सेनापती प्रतापराव गुजर यांची दोन मुलं औरंगजेबाच्या तावडीत सापडली. तेव्हा इ.स. 1700 च्या 27 मे रोजी औरंगजेबानं निरोप पाठवला. ‘अगर इरादा ये इस्लाम दाश्ताबाशद निज्दे शहाजादा मुहंमद बेदारबख्त महादुर बफिरस्तंद, इल्ला दर कैद दारंद’ (इस्लाम ग्रहणाचा बेत असल्यास राजपुत्र बेदार बख्त बहादुर याजपाशी पाठविण्यात येईल, नाही तर कैदेत ठेवावे.) प्रतापराव गुजर यांच्या खंडोजी व जग्गनाथ या दोन मुलांनी कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केलं. 13 जुलै 1700 रोजी हे दोघं खटाव (सातारा) तालुक्यातल्या औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाले. धर्मांतरानंतर ते ‘खंडूजी अब्दु-रहीम’ आणि ‘जगन्नाथा अब्दु-रहमान’ बनले.

धर्मवेडापायी धर्मांतरं घडवून आणल्याची कैक उदाहरणं मोगलांच्या राजवटीत आहेत. इनाम, संरक्षण, संपत्ती, जहागिरी किंवा जगण्याच्या मिषानं ही धर्मांतरं झाली आहेत. स्वतः औरंगजेबाला धर्मांतरं घडवण्यात, शरियत कायद्याची अंमलबजावणी करण्यात प्रचंड रस होता. संभाजीपुत्र शाहू कैदेत असताना त्याला मुस्लिम होण्याची सूचना औरंगजेबानं केली होती. (तसा औरंगजेब दरबारच्या बातमीपत्रात स्पष्ट उल्लेख आहे.) मात्र शाहुंनी धर्मांतरास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याचा आदेश औरंगजेबानं दिला.

6. औरंगजेब धर्मवेडा असल्याचं खरं असलं तरीही संभाजी राजांनी धर्मांतर करावं म्हणून औरंगजेबानं त्यांचा छळ केल्याचा उल्लेख मात्र सापडलेला नाही. संभाजीराजांना ठार मारायचे, हा औरंगजेबाचा निर्धार पक्का होता. शिवाजीराजांचा हा पराक्रमी अंश संपवल्यानंतर मराठेशाही नेस्तनाबूत होईल आणि दक्षिण भारतावर कब्जा करता येईल, अशी त्याची धारणा त्यामागं होती. संभाजीराजांना मुसलमान करण्याच्या फंदात औरंगजेब पडल्याचं आढळत नाही.

7. प्रत्यक्षात मात्र धर्मांतर नाकारणाऱ्या संभाजी राजांची ‘धर्मवीर’ अशी प्रतिमा रंगवणाऱ्या अनेक आख्यायिका रुढ झाल्यात. ईश्वरदासाच्या फारसी ग्रंथावरुन असं स्पष्टपणे म्हणता येतं, की संभाजीराजांच्या धर्मांतराचा प्रश्नच उपस्थित झालेला नाही.

8. “औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीत कोणतीही शिक्षा शराला (इस्लामी धर्मशास्त्र) अनुसरल्याशिवाय दिली नाही. केवळ संतापाच्या भरात किंवा बेभान होऊन त्यानं कोणालाही ठार मारण्याची आज्ञा केली नाही,” असं औरंगजेबाच्या अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे. संभाजीराजांनी शरणागती पत्करण्याऐवजी कैदेत असूनही औरंगजेबाचा अपमान केला. त्याची बेईज्जती केली.

शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हां हां म्हणता ताब्यात घेता येईल, या आशेनं आलमगीर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड साधनसामुग्री, सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता. त्याचे हे मनसुबे संभाजीराजांनी पार उधळून लावले. याचा संताप औरंगजेब आणि त्याच्या सरदारांना असणार. यातून संभाजीराजांची क्रुर हत्त्या झाली. त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली गेली ती मराठ्यांवर जरब बसवण्यासाठी.

प्रत्यक्षात यामुळं मराठे आणखी पेटून उठले. संभाजीराजांच्या बलिदानानंतर म्हाताऱ्या आलमगीरला दख्खन जिंकता आलं नाही. तो त्यानंतर 16 वर्षांनी महराष्ट्रातच मेला.

8. संभाजीराजांना "धर्मवीर" ठरवून मुस्लीम द्वेष पसरवणाऱ्या आणि इतिहासात गाडलेल्या औरंगजेबाचं भूत मानगुटीवर बसवून आजच्या भारतीय मुस्लिमांविरोधात उभं ठाकणाऱ्या हिंदूत्त्ववाद्यांनाही सद्बुद्धी मिळो.
Sukrut Karandikar- यांच्या लेखाचा सारांश- @सुकृत करंदीकर,17 मार्च 2018, पुणे.
..........................
लीळाचरित्रात गुढीला हा शब्द येतो.
"सर्वज्ञे म्हणीतले: "हाति गुढीला निका दिसे:"
यातील गुढीला या शब्दाचा अर्थ : वर आच्छादन घातलेला, शृंगारलेला, असा वि.भि.कोलते देतात.
पाहा- लीळाचरित्र, संपा. वि.भि.कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, 2 री आवृत्ती, आक्टोबर, 1982, उत्तरार्ध, 336,पृ. 550


Wednesday, March 15, 2017

नाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना


श्री Mahendra Gadre यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना संक्षिप्त उत्तर :-
तुम्ही म्हणताय, "उत्तरं देणं सोपं नाही." याचा अर्थ उत्तरं नाहीतच असं तुम्ही गृहीतच धरलंय का? की तुमचे प्रश्न इतके बिनतोड आहेत की त्यांची उत्तरेच असू शकत नाहीत? अहो, दुसरी बाजूही असते. ती समजाऊन घेण्यासाठी जागा ठेवत चला.
1. खरं म्हणजे तुम्हाला चर्चेत मुळात रस आहे का?
2. चर्चेसाठी जो खुलेपणा लागतो, तोच मुळात ब्रिगेडच्या नेते/कार्यकर्ते यांच्याकडे आहे का? निदान माझा अनुभव तरी याबाबतीत प्रतिकूलच आहे.
ब्रिगेड मुळात आदेश, शिविगाळ, भावना भडकावणं आणि तोडफोड यावरची शिखर संस्था आहे. चर्चा करायची होती तर ती आधी व्हायला हवी होती. तुम्ही तुमच्या कृतीचं समर्थनच करीत राहणार तर चर्चेचा उपयोग काय? ब्रिगेडच्या या कृतीचा सर्वदूर निषेध झाल्यानं आता चर्चेचं सुचलं काय?
3. तुम्ही वैचारिक मांडणी केली असती तर चर्चा झाली असती. तुम्ही पुतळा तोडल्यानंतर आता चर्चेसाठी अवकाश ठेवलाय कुठे तुम्ही?
4. नाटक, कादंबरी, कथा अशा ललित साहित्यातील निर्मिती कशी वाचायची असते त्याची आधी माहिती घ्या. याची जाण असलेला एक तरी तज्ञ ब्रिगेडमध्ये आहे काय?
5. गडकर्‍यांचे राजसंन्यास हे नाटक 1917 सालचे आहे. ते वाचताना तो काळ, तोवरचं इतिहास संशोधन समजून घेणं गरजेचं आहे.1917 च्या आधी जी ऎतिहासिक मांडणी संभाजीराजे व शिवराय यांच्याबद्दल कृ.अ.केळुसकरांसकट सगळ्या बहुजन इतिहासकारांनी / लेखकांनी केलीय ती वाचा. तुमचे तुम्हाला उत्तर मिळेल.
6. तुम्हाला 21 अपेक्षित प्रश्नांची 21 अपेक्षित उत्तरे द्यायचा मुळात उपयोग काय? आणि मुळात मी नवनीत गाईडवाला नाही.
7. ब्रिगेडने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पुतळा तोडला. कृती केल्यानंतर आता चर्चेत काय ठेवलेय?
8. 1917 सालच्या नाटकात खलनायकाच्या तोंडी असलेल्या संवादाद्वारे गडकरी बदनामी करतात असे म्हणायचे असेल तर अशी सुटी वाक्ये [संदर्भ सोडून ] वाचणं योग्य असतं का?
9. गडकरींचे लेखन चिकित्सेसाठी गेले 100 वर्षे उपलब्ध होते/आहे. लिहा ना त्याच्याविरोधात. तुम्हाला कोणी रोखलेय?
10. मला ब्रिगेड सोडून महाराष्ट्रातला असा किमान एकतरी मोठा
ललितलेखक [ नाटककार, कादंबरीकार ] दाखवा ज्यांना गडकरींचा हा मजकूर बदनामीकारक वाटतोय? निदान ब्रिगेडचे डा.आ.ह.साळुंखे, डा.सदानंद मोरे,डा.जयसिंगराव पवार, यांना तरी या नाटकाबद्दल लिहायला सांगा. महाराष्ट्र नक्की दखल घेईल.
11. युगपुरूष मा. मा. मा. पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांच्या लेखणीची कुवत लोकांना कळून चुकलीय. गडकरींचा प्रतिवाद करता येतो. ब्रिगेड आणि खेडेकर महोदयांचा नाही.
....................... .........
Mahendra Gadre यांनी उपस्थित केलेले मुद्दे :-
प्रश्न : >>>"नरके सर संभाजी ब्रिगेड गडकर्यांचा पुतळा फोडला. निषेध व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धतीचं समर्थन कोणीही करणार नाही.परंतू त्याच्या संतापाची वैचारीक पातळीवर विचारवंतांनी काहीही दखल घेतली नाही.त्यांच्या कृतीला अतिरेकी,झुंडशाही वगैरे म्हणून त्यांचा सर्वांनी निषेध करून गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी प्रस्थापीत करण्याचीच विचारवंतांपपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांची धडपड तेवढी दिसली परंतू मुळ जो प्रश्न आहे गडकरींच्या नााटकातील संभाजी विषयीचं लिखान.
ते चुकीचं की बरोबर यावर सविस्तर,खोलवर चर्चा कोणी केलीच नाही.अद्ृाप हे कळलं नाही की गडकरींनी केलेलं लिखान हे आक्षेपार्ह्य आहे की नाही.या प्रकरणात संभाजी ब्रीगेडच्या तरूनाच्या भावनेचीही दखल घेणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी वैचारीक व सामाजिक सौहार्दासाठी जरूरी आहे की नाही. यावर नरके सर आपलं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं ते मार्गदर्शन अत्यंत संतुलीतपणे आपणच कराल असा माझा विशंवास आहे.
संभाजी ब्रीगेडच्या तरूणांना त्याच्या आंदोलनाच्या पद्धतीवरून एकसारखं सर्व विचारवंतानी धोपटत राहनं हे फार सोपं असतं.त्यांच्या आक्षेपांना अचूक उतर देनं तेवढं सोपं नाही. असेलच ते सोपं तर खरंच द्या सामाजीक धार्मीक वैचारीक तान त्याने कमी होईल."<<<
.......................

Monday, January 9, 2017

महाराष्ट्र माझा निजला! -- संजय राऊत

http://www.saamana.com/ram-ganesh-gadkari/
दै.सामना, रविवार, दि.8 जाने.2017, रोखठोक: महाराष्ट्र माझा निजला! -- संजय राऊत
January 8, 2017, rautsanjay61@gmail.com
प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी यांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटवण्यात आला. दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत तेच घडले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे हे एका जातीचे नव्हते. शौर्य एका जातीची मक्तेदारी नव्हती. जनरल अरुणकुमार वैद्य, चिंतामणराव देशमुख यांची जात कुणी विचारेल काय? पण शिवाजी महाराजांनी २०० लढाया ज्या स्वकीयांविरुद्ध लढल्या ते कोण होते? संभाजीराजे मोगलांच्या तावडीत असताना घाईघाईत राज्याभिषेक उरकून घेणारे कोण होते? या सगळय़ांनीच छत्रपतींचा अपमान केलाय. त्यांच्यावर नवे ‘राजसंन्यास’ लिहायचे काय?

‘‘कीर्ती आणि निंदा यांचा गडकऱयांना एकाच वेळी लाभ होत गेला, पण गडकऱयांचे कर्तृत्व ज्यावेळी लोकांना कळून आले त्यावेळी त्यांचे शरीर काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावलेले होते.’’’ – आचार्य प्र. के. अत्रे

गडकऱयांच्या बाबतीत हे विधान आजही तंतोतंत लागू पडते. राम गणेश गडकरी यांच्या पुण्यातील पुतळय़ास पन्नास वर्षे होऊन गेली (१९६२), त्यावेळी पुण्याच्या संभाजी बागेत आचार्य अत्रे यांच्या हस्ते गडकरी यांच्या पुतळय़ाचे अनावरण झाले. हा अर्धपुतळा त्यांच्या निंदकांनी रात्रीच्या अंधारात हटवला, पण त्यामुळे शंभर वर्षांनंतर गडकरी पुन्हा चर्चेत आले व लोकप्रिय ठरले.

हे सर्व लोक स्वतःला शिवाजीराजांचे भक्त व संभाजीराजांचे मावळे मानतात, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते? गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील जातीय ऊरबडव्यांनी जो उच्छाद मांडला आहे त्याचे शेवटचे टोक म्हणजे पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा अंधारात हटविला हे होय. शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा मध्यरात्री हटवला. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्य होते व या झुंडशाहीचा निषेध करण्यात जे ‘बुद्धिमंत’ आघाडीवर होते तेच पांढरपेशे आज महाराष्ट्रात सत्तेवर आहेत. म्हणजे सत्ताधारी बदलले तरी शिवरायांच्या नावाने सुरू असलेली जातीय झुंडशाही कायम आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला व सहिष्णुतेला कलंक लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. समर्थ रामदास व शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसही या लोकांनी सोडले नाही. राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा ज्यांनी पाडला त्यांनी हे कृत्य रात्रीच्या अंधारात केले. ‘राजसंन्यास’ नाटक गेल्या शंभरेक वर्षांपासून मराठी साहित्यात अर्धवट अवस्थेत आहे. संभाजीराजे यांच्याविषयी काही आक्षेपार्ह प्रसंग व स्वगते ‘राजसंन्यास’मध्ये आहेत हे कळायला शंभर वर्षे लागली, हे वैचारिक दुर्बलतेचे लक्षण मानले पाहिजे. राम गणेश गडकरी हे शब्दप्रभू, प्रतिभेचे सम्राट होते. ते कुणी राजकारणी किंवा टाटा, बिर्ला, अंबानी नव्हते. ते गरीब बिच्चारे लेखक होते. महाराष्ट्राच्या पिढय़ान्पिढय़ा त्यांच्या नाटकांनी पोसल्या. मराठी काव्य, नाटय़, भाषा त्यांनी समृद्ध केली. त्यांच्या पुतळय़ावर काल ज्यांनी घणाचे घाव घातले त्यांनी यापुढे महाराष्ट्राचे नाव घेऊ नये.

गाव तेथे गडकरी

राम गणेश गडकरी यांच्या नावाचा रस्ता नाही, त्यांच्या नावाचा चौक नाही व त्यांच्या नावाचे रंगमंदिर नाही असा एकही जिल्हा किंवा शहर महाराष्ट्रात नसेल. गेली ८५ वर्षे महाराष्ट्र गडकऱयांची पूजा करतोय. मराठी भाषेत, साहित्यात राम गणेश गडकरी यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी या शतकातील फारच थोडय़ा मराठी लेखकांच्या वाटय़ास आली असेल.

आचार्य अत्रे हे गडकऱयांच्या सहवासात आले व भक्त झाले. संभाजी उद्यानातील जो पुतळा विकृतांनी पाडला त्या पुतळय़ाचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी १९६२ साली केले. अत्रे गडकरींविषयी लिहितात-

‘‘जो कवी असतो, तो कदाचित नाटककारही असू शकेल, पण तो विनोदकार असू शकणार नाही आणि जो विनोदाचा निर्माता असतो, तो नाटककार होऊ शकेल, पण उत्तम कवी असू शकणार नाही. मोलिअर नि शेक्सपीअर हे दोघेही महान नाटककार होऊन गेले. मोलिअरने हास्य निर्माण केले आणि शेक्सपीअरने काव्य निर्माण केले, पण मोलिअर हा कवी नव्हता नि शेक्सपीअर हा हास्यकार नव्हता. पण गडकऱयांनी मोलिअर आणि शेक्सपीअरवरसुद्धा मात केली. काव्य, नाटय़ आणि विनोद या परस्परविरोधी तिन्ही क्षेत्रांत ते सारख्याच वैभवाने आणि दिमाखाने तळपले. त्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात जरी ते वावरले असते तरी त्यांनी तेवढेच यश मिळविले असते, पण साहित्यामधल्या अत्यंत बिकट म्हणून समजल्या जाणाऱया या तिन्ही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळविले आणि अलौकिक यश संपादन केले! म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाभोवती नि व्यक्तिमत्त्वाभोवती अद्भुततेचे रोमहर्षक वलय निर्माण झाले आणि त्यांच्या ओठातून आणि बोटातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरा-अक्षराने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले.

अन् एवढा सारा दिग्विजय अवघ्या चौतीस वर्षांच्या वयात मिळवून ते निघून गेले. त्यांच्या अमर लेखनाचा नि कर्तृत्वाचा काळ अवघा सहा-सात वर्षांचा होता. 1911 पासून तो 1918 पर्यंत! एवढय़ा थोडय़ा काळात त्यांनी मराठी साहित्यात आपले जे क्रांतिकारक युग निर्माण केले ते अद्यापि चालूच आहे. त्यांची सद्दी अजून संपली नाही.’’ गडकरींना जाऊन शतक होत आले तरी त्यांची कीर्ती पहिल्याइतकीच प्रफुल्लित आणि टवटवीत आहे. किंबहुना त्यांच्या अवसानानंतर जशी जशी अधिकाधिक वर्षे लोटताहेत, तसा तसा त्यांचा लौकिक नि आकर्षण जास्त जास्तच वाढत चालले आहे.’’

प्रखर शिवभक्त

गडकरी त्यांच्या शब्दप्रभुत्वाने चिरंजीव होतेच, पण पुण्यातील त्यांचा पुतळा तोडल्यावर ते अजरामर झाले आहेत. ज्या ‘राजसंन्यास’वरून पुण्यात त्यांच्या पुतळय़ावर हल्ले झाले ते ‘नाटक’ त्यांनी कुणाला अर्पण करावे? तर छत्रपती शिवाजीराजांच्या चितेत आत्मार्पण करणाऱया त्यांच्या आवडत्या इमानी कुत्र्याला. ही हृदयस्पर्शी कल्पना फक्त गडकऱयांनाच सुचू शकते. गडकरी हे शिवाजी महाराजांवर ऊठसूट प्रवचने देत नव्हते, पण त्यांच्या शिवभक्तीची तऱहाच वेगळी होती.

शिवछत्रपतींच्या चरित्राबद्दल आणि इतिहासाबद्दल त्यांना पराकाष्ठsचे प्रेम नि कमालीचा जिव्हाळा वाटत होता. रायगड पाहावयाला जाण्याचा एकदा काही मित्रांनी त्यांना आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, ‘‘रायगडच्या पहिल्या पायरीवर पाय टाकताच मी बेशुद्ध होऊन पडेन!’’ त्या त्यांच्या उद्गारातली ज्वलंत भावना कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. पुण्यापासून सिंहगड इतका जवळ असताना तो पाहण्यासाठी ते एकदाही गेले नाहीत. का? तर ते म्हणत, ‘‘सिंहगडाच्या पठारावर एकदा का मी उभा राहिलो तर ‘इंडियन पिनल कोड’ची 124 (अ) नि (ब) ही कलमे मला खाली ओढून आणायला असमर्थ ठरतील!’’ हे सर्व त्यांचे परमभक्त अत्र्यांच्या लेखनात आले आहे.

विनोदी आणि गमतीदार

गडकरी हे गमतीदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावावर जितके विनोद खपवले तेवढे पुलंच्या नावावरही खपवले नसतील. ते स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मास आले व त्याच काळात मरण पावले. त्यामुळे आज किरकोळ लोकांना सरकारी इतमाम वगैरे मिळतो तसा त्यांना मिळाला नाही. किर्लोस्कर नाटक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज किंवा रँग्लर परांजपे यांच्याविषयी गडकऱयांची भक्ती अगदी पराकोटीची होती. त्यामुळे या संस्थांवर टीका केली की गडकरी त्यांच्यावर तुटून पडत. रँग्लर परांजपे हे त्यांच्या मिश्यांचे आकडे वळवितात म्हणून त्यांच्यावर कोणीतरी टीका करताच, ‘‘रँग्लरांच्या मिश्या टोचल्याची तुमच्या घरातून तक्रार आली आहे काय?’’ असा सरळ प्रश्न विचारून गडकऱयांनी त्या टीकाकारास आडवे केले. गडकरी आजाराला भीत व डॉक्टरांचे अजिबात ऐकत नसत. डॉक्टरांनी त्यांना दात काढून कवळी बसवायला सांगितली, पण गडकरी मुळीच ऐकेनात. दातांचा आणि बुद्धीचा निकट संबंध आहे असे त्यांनी कुठेतरी वाचले होते. ते म्हणाले, ‘‘मी बुद्धिजीवी माणूस आहे. दात काढून माझ्या बुद्धीला अपाय झाला तर मी जगणार कसा?’’

सहज विनोद!

गडकऱयांच्या विनोदाची मौज ही होती की, तो अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त असे. त्यांच्या प्रतिभेचा झपाटाच वेगळा. त्यांच्या विनोदी वचनांची आणि सुभाषितांची कित्येक उदाहरणे देता येतील.

जगण्यासारखे जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे.

मरणाने माणसाला मोल येते.

लाखात एखादा हात खरा असतो.

पाणी चंचल आहे, पण मन पाण्याहून चंचल आहे.

रामाशी मन रमल्यावर माकडाशी मिठय़ा मारण्यात काय अर्थ आहे?

पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे, तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे.

पाय मोडल्यावर मैना कसली!

गळा दाबल्यावर कोयल कसली!

दात पाडल्यावर नागीण नाही!

डोळे फोडल्यावर वाघीण नाही.

पतिक्रतांची पुण्याई पातकी पुरुषालाही परमेश्वराच्या पदवीला पोचविते आणि नरपशूला नारायणस्वरूप बनविते. पतिक्रतेच्या पुण्याईपुढे पाप पांगळे पडून तिच्या पायाशी लोळण घेते!

‘‘जा, बाप, भाऊ, माझे जगात कोणी नाही. पतिक्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते. देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवऱयाची ती बायको असते!

‘एकच प्याल्या’तील मद्याच्या दुष्परिणामांवरील त्यांचे हे ज्वलंत संवाद वाचा. नशाबंदीवर सरकार कोटय़वधी रुपये ‘रिकाम्या’ ग्लासात वाया घालवते. त्याऐवजी गडकऱयांचे हे ज्वलंत ‘संवाद’ प्रसिद्ध केले तरी लोक नशामुक्त होतील. गडकरी लिहितात,

‘‘आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसतं तुला? काबाडकष्ट उपसून आलेला थकवा घालविण्यासाठी दारू पिणाऱया मजुरांच्या या पहा झोपडय़ा! निरुद्योगाची वेळ घालविण्यासाठी म्हणून दारू पिणाऱया श्रीमंतांच्या या पहा हवेल्या! प्रतिष्ठतपणाचे लक्षण म्हणून चोचल्याने दारू प्यायला शिकलेल्या पढतमूर्खांचा हा पहा तांडा! उद्योगी-गरीब, आळशी-श्रीमंत, साक्षर-पढतमूर्ख, निरक्षर-व्यवहारी या सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पहा एकच प्याला! दारूबाज नवऱयाच्या बायकांची ही पहा पांढरी फटफटीत कपाळे, दारूबाजाच्या पोरक्या पोरांच्या उपासमारीच्या ऐका या किंकाळय़ा! स्त्री जातीला नटवण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितके मोती बाहेर निघाले, त्याच्या दसपट आसवांचे मोती दारूमुळे स्त्री जातीने या एकाच प्याल्यात टाकले आहेत. जगावर अंमल चालविणारा सिकंदर दारूच्या अमलाखाली मारेकरी बनून तो पहा आपल्या जिवलग मित्राचा खून करीत आहे! मेलेल्यांना सजीव करणारा दैत्यगुरू शुक्राचार्य, तो पहा आपल्या त्या संजीवनीसह या एकच प्याल्यात स्वतःच मरून पडलेला आहे! जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे हे पहा छप्पन्न कोटी यादव वीर दारूच्या एकच प्याल्यात बुडून अधःपात भोगीत आहेत!’’

काही धाडसी प्रश्न

‘गोविंदाग्रज’ या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. ते खऱया अर्थाने ‘महाराष्ट्र शाहीर’ होते.

महाराष्ट्र गीत

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंडय़ाच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।१।।

असे महाराष्ट्र देशाचे स्तवन त्यांनी गायले. गडकऱयांविषयी असे सांगतात की, त्यांनी ज्याला आपला म्हटले त्याच्यासाठी ते जिवाचे रान करावयाला तयार असत. चिंतामणराव कोल्हटकर यांच्याविरुद्ध एकाने त्यांना काही सांगितले, त्याबरोबर ‘‘मी चिंतामणरावांबरोबर नरकात जाईन, पण तुमच्याबरोबर स्वर्गात येणार नाही!’’ असे खाड्कन गडकऱयांनी त्यांना बजावून सांगितले. ज्या काळात केवळ लेखनावर उपजीविका करणे अशक्य होते, त्या काळात केवळ लेखनासाठी आणि लेखनावर जगण्याचा प्रयत्न गडकऱयांनी केला. दारिद्रय़ाशी आणि लोकनिंदेशी त्यांना मरेपर्यंत झगडावे लागले. छगन भुजबळांसारख्या नेत्याच्या सुटकेसाठी समाज रस्त्यावर येतो, पण छत्रपती शिवाजीराजांची तलवार तोडल्यावरही जो समाज डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवून बसतो तोच समाज राम गणेश गडकरींचा पुतळा तोडल्यावरही षंढासारखा गप्प बसतो. शिवाजी महाराजांपासून राम गणेशांपर्यंत सगळय़ांना जातीची लेबले लावून आपण जणू राजकीय बाजार भरवला आहे. ज्यांनी पुतळय़ांवर हातोडे मारले त्यांच्यासाठी सोशल मीडियावर विचारलेले दोन प्रश्न देतो व विषय संपवतो.

हरी नरके धाडसाने विचारतात, ‘‘छत्रपती संभाजीराजांना पकडून देणारे, त्यांची साथ सोडून पळून जाणारे आणि शंभूराजे शत्रूच्या कैदेत असताना त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अवघ्या आठवडाभरात स्वतःला राज्याभिषेक करणारे नेमके कोण होते? हे ऐतिहासिक ‘सातबारे’ कोणाकडे मागायचे?’’

‘झी’ मराठीचे ‘बिझनेस हेड’ दीपक राजाध्यक्ष यांनी जोरकसपणे विचारले आहे, ‘‘हत्या करून, पुतळे फोडून, संशोधन संस्थांची राखरांगोळी करून अद्यापि पुरेसे समाधान झालेले नसताना कशाला हवेत नवे पुतळे…
नवी स्मारके…

नव्या संशोधन संस्था…

शिल्लक असलेलं सगळं आधी नष्ट होऊन जाऊ दे. मग नव्याने सगळे पुन्हा उभारता येईलच. निर्मितीपेक्षा नष्ट करण्याची झिंग वाढत चालली आहे काय?’’

गडकरी यांची जात शोधून हल्लेखोरांनी त्यांचा पुतळा फोडला. महाराष्ट्राच्या इभ्रतीला व पुरोगामित्वाला लावलेली ही चूड आहे. जातीय तळीरामांनी मराठी संस्कृतीवर टाकलेल्या या दारूच्या गुळण्या आहेत. असे जातीय द्वेषाचे व विध्वंसाचे काही घडले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पवार-पाटील, भोसल्यांवर टीकेची झोड उडविणाऱयांचे आज महाराष्ट्रात राज्य आहे. सर्व जातीधर्माच्या मराठी माणसांनी निषेध करावा असा हा प्रकार आहे. जोपर्यंत अशा विकृत विचारसरणीवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यात एकही साहित्य संमेलन, नाटय़संमेलन आयोजित करण्यात येणार नाही अशी भूमिका घेऊन उभे राहायलाच हवे. कर्नाटकातील लेखक एम. एम. कलबुर्गी व महाराष्ट्रातील गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जे लेखक व चळवळे रस्त्यावर उतरले ते सर्वजण राम गणेश गडकरी यांच्या पुतळय़ावरील हल्ल्यानंतर गप्प बसून आहेत.

‘राजहंस माझा निजला’ हे शोकगीत राम गणेशांनी म्हणजे गोविंदाग्रजांनी लिहिले होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही शोकगीतच झाले आहे.

‘‘महाराष्ट्र माझा निजला!’’ त्याला कुणी जागे करील काय?
....................
टॅग pune ram ganesh gadkari
......................

Wednesday, January 4, 2017

राम गणेश गडकरी तुम्हारा तो चुक्याच....


सावित्रीबाईंची जयंती 3 जाने. हाच मुहुर्त का निवडला असेल बरे?
2019 ला पुढचा नंबर कोणाचा?
.......................
प्राथमिक शाळेत आम्हाला अरण्य नावाचे एक गडकरीभक्त शिक्षक होते. त्यांनी बालवयात गडकर्‍यांची गोडी लावली. बालपण तसे अत्यंत काटेरी आणि खडतर होते.
त्या करपलेल्या वातावरणात ज्यांनी अमाप आनंदाचे झरे खोदले त्यातलं सर्वात लाडकं व्यक्तीमत्व म्हणजे राम गणेश गडकरी.
काय गारूड केलेलं या  भाषाप्रभुनं! सारं बालपण गडकर्‍यांच्या झाडानं झपाटलेलं!
मी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धांची शेकडो बक्षिसं शाळेपासून महाविद्यालयापर्यंत मिळवली. अनेक विषयांमध्ये पंचेस साठी गडकरी मदतीला धावून यायचे.
राम गणेश गडकरी यांच्या अवतरणांबद्दल त्यांना स्वामित्वधन द्यायचं ठरलं असतं तर त्या काळात मिळवलेल्या पारितोषिकांमधून काही हजार रूपये नक्कीच द्यावे लागले असते.
शाळकरी वयात मी पुस्तकं विकत घ्यायला सुरूवात केल्यानंतर एका लेखकाच्या सर्व पुस्तकांचा पहिला संच खरेदी केला तो गडकर्‍यांचा होता.
त्यावेळी मला स्मशानातील नोकरीचा महिन्याचा पगार मिळायचा 20 रूपये. पुण्याच्या रम्यकथा प्रकाशन, 392 नारायण पेठ च्या वा.ग.मेहेंदळे यांनी प्रकाशित केलेला हा संच 1970 च्या दशकात अवघ्या 25 रूपयांना मिळाला. मला वर्षाचा पगार वाचवून वाचवून साठवलेले हे पैसे त्यासाठी उपयोगी आले.
महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असताना प्र.ना.परांजपे सर एकदा एका स्पर्धेला मला परिक्षक होते.  रा.ग. गडकरी यांच्या संमोहनातून त्यांनी माझी काही प्रमाणात सुटका केली.
अर्थात आजही गडकरी पुर्वी  इतके नसले तरी आवडतातच.
तेव्हा आम्हाला गडकर्‍यांची जात माहित नव्हती. यापुढे कोणताही ललित लेखक [ कथाकार,कादंबरीकार, नाटककार ] वाचायला घेताना आधी त्यांची जात बघून घेतलेली बरी. यापुढे प्रत्येक  पुस्तक दुकानात लेखकांच्या जातींचा तक्ता ठेवण्याची सक्ती करायला हवी. किंवा पुस्तकाच्या नावासमोरच लेखकाच्या जातीची नोंद अनिवार्य करण्यात यावी.
विशेषत: त्यानं जर शिवकाळाबद्दल काही लिहिलं असलं तर त्यांनी "ए" किंबा "बी" ग्रेडी प्रमाणपत्र घेतले होते किंवा कसे याचा तपास काढायला हवा. कदाचित उद्या लेखक संपले तर वाचक,संग्राहक,प्रकाशक यांच्यावरही मालकांची खप्पा मर्जी व्हायची.
मराठीतले आद्य पोवाडाकार महात्मा फुले आणि दुसरे लेखक म.मो.कुंटे यांचा सुद्धा लवकरच नंबर लागणार हे निश्चित.
गडकरी तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात तिला शिवराय,शंभुराजे ही पवित्र नावं उच्चारण्याचा अधिकार तरी होता काय?
100 वर्षांपुर्वीच्या तुमच्या गुन्ह्याला माफी नाही.
पुतळा झाला. आता गडकरी यांच्या अस्थीसुद्धा आम्ही सोडणार नाही.
3 जानेवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. यापुढे लोकांचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हावे आणि राम गणेश पुतळा दिनाचा इतिहास रचला जावा यासाठी तर हा मुहुर्त काढण्यात आला नाही ना?
नाटककार गडकरी, कवी गडकरी, विनोदकार गडकरी यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
ते इतिहासकार नव्हते.
पण त्या काळातले ख्यातनाम इतिहासकार कृष्णाजी अर्जून केळुस्कर यांचे शिवचरित्र वरदा प्रकाशनाच्या भावे आणि साकेत च्या बाबा भांडांनी अलिकडे पुन्हा एकदा प्रकाशित केलय.
आता केळुसकर पडले मराठा.
2019 च्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचाही नंबर लागणार काय? गेल्या 12 वर्षात दर निवडणुकीआधी एक याप्रमाणे भांडारकर झाले, दादोजी कोंडदेव झाले, वाघ्या कुत्राही सुटला नाही. आता राम गणेशानंतर नंबर कोणाचा?
.......................

Thursday, December 8, 2016

छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि अनैतिहासिक वक्तव्ये

सौजन्य - श्री Dinanath Manohar
October 8, 2013 ·
काल फेसबुक वर डॉ. विकास आमटे ह्यांनी एक एक पोस्ट टाकली होती. ह्या पोस्टमध्ये कॉम्रेड हो ची मिन्ह ह्यांनी पत्रकाराला आपण गनिमी काव्याचे तंत्र श्री शिवाजी महाराजांकडून घेतले हे, '' देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला...अशा अर्थाच्या शब्दात सांगितले असं म्हटलं आहे, शिवाय पुढे ''काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त झाला" असं लिहून ठेवलंय.... असंही विधान केलंय. (Fwd frm Dr Ashok N. Digras) ह्या प्रस्तावनेत कॉ. हो ची मिन्ह ह्यांच्े नाव न घेता, केवळ राष््ट्राध्यक्ष असा उल्लेख आहे. एकूणच कॉ. हो ची मिन्ह ्हयांच्या तोंडी ज्या प्रकारची विधान टाकली आहेत ती वाचल्यावर मनात शंका येणं अटळ होतं. त्याप्रमाणे काही जणांनी शंका व्यक्त केल्याही. त्यावर प्रशांत जगताप ह्यांनी चक्क सकाळ टाईम्समधील लिंक देऊन असं झाल्याचा पुरावा म्हणून storHiain recalls Shivaji’s war tactics historian recalls Shivaji's war tactics अशा हेडींगने आलेली बातमीच दाखवली. ह्या पोस्ट्च्या सत्यतेबद्दल मी ही, ''आश्चर्य म्हणजे प्रस्तावनेत कॉम्रेड हो ची मिन्ह ह्याचं नाव का घेतलं गेलेलं नाही, ते कम्युनिस्ट होते ह्याचा उल्लेख नाही. व्व्हििएतनामच्या कुठल्या मंत्री येथे आल्या होत्या, कधी आल्या होत्या त्याचा खुलासा नाही. एतनामचा संघर्ष आणि हा लढ्याचा काळ भारत स्वतंत्र झाल्यवरचा. भारताचे त्यावेळच्या नेहरू सरकारचा ह्या जनसंघरषाला पाठींबा होता शिवाय येथील कम्युनिस्ट पार्टीचाही पाठींबा होता. एसं असून एवढ्या दीर्घ काळात ही कहाणी अंधारात कशी राहिली हा प्रश्न पडणं सहाजिक आहे.'' अशा शब्दात शंका व्यक्त केली होती. त्यामुळे मी प्रशांत जगताप ह्यांना लिंक दिल्याबद्दल लाईकवर क्लिक केलं. तरीही माझ्या मनात शंका होती, म्हणून थोडा शोध घेतला. लिंकमधील बातमीत ''he (हो ची मिन्ह) told the then Planning Commission Deputy Chairman Mohan Dharia that they had studied and used Shivaji's guerrilla warfare techniques to fight the American army,” said Bedekar.'' असा स्पष्ट मजकूर होता.. ह्याचा अर्थ मोहन धारीया प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना हो ची मिन्ह त्यांना असं म्हणाले होते. हो चि मिन्ह ह्यांनी भारताला भेट दिली ते साल होते १९५८ (यु ट्यूब वर क्लीप उपलब्ध) त्यावेळी श्री. मोहन धारिया पुणे म्युन्सिपल कार्पोरेशनचे सदस्य होते (१९५७- ६०) मूळात ते राज्यसभेत गेले ६४ आणि ७० साली. आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये होते दोन वेळा होते जोन वेळा , एका मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग मे १९७१ ते आक्टो. ७४ आणि त्यानंतर डेप्युटी चेअरमन ऑफ प्लॅनींग कमिशन (डिसे. ९० ते जून ९१) कॉ. हो ची मिन्ह ह्यांचा मृत्यू १९६९ मध्ये झाला. मूळात मोहन धारीया राज्यसभेत गेले ते ६४ आणि ७० साली. ह्या सर्व माहितीच्या आधारे मुळात श्री मोहन धारीया कॉम्रेड हो ची मिन्ह ह्यांना भेटल्याची संभवनियताच दिसत नाही. कॉ. हो ची मिन्ह ह्यांनी ५८ नंतर भारताला भेट दिली होती का ह्याबद्दल मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तशी भेट झाल्याचे दिसत नाही. आता प्रश्न हा पडतो, की कोण खोटं बोलतोय मोहन धारिया की बेडेकर? श्री मोहन धारीयानी अशी थाप मारली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणी नेत्यांना बिनधास्त असली विधानं करण्याची सवंय असते. परंतु श्री बेडेकर इतिहासतद्न्य म्हणून ओळखले जातात, त्यांनी ह्या विधानाची सत्यासत्यता तपासून बघायला हवी असं कोणीही अपेक्षा करेल. ह्याशिवाय श्री शिवाजी महाराज ह्यांची महानता, त्यांचे युद्धकौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना पुरेशा बोलक्या आहेत. असं असताना हे कॉ. हो ची मिन्ह सारख्या नेत्यांना वेठीस धरण्याची गरजच काय होती? हा ही प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं ह्यातून निष्कर्श एवढाच काढता येईल की जे स्वत:ला इतिहास तद्न्य म्हणवतात अशांनी केलेल्या विधानावरही अंधविश्वास ठेवणं चूकीचं आहे. पण मग सामान्य वाचकानं विश्वास ठेवायचा तरी कुणावर?
................................
31 You, Sunil Tambe, Satish Tambe and 28 others
..........................
5 shares
15 Comments
..................................
Sunil Tambe आगापिछा नसलेली माहिती विकास आमटेंसारख्या व्यक्तींनी प्रसृत करू नये. ह्या माहितीचा शोध घेतल्याबद्दल धन्यवाद.See Translation
Atul Patankar हिटलरने अशीच काही विधाने सुभाषचंद्र बोसंशी बोलताना केली, अशी एक विनोदी पोस्ट बऱ्याच वेळा वाचली आहे. सोबत पुरावा म्हणून त्यांच्या दोघांच्या भेटीचा फोटो! पण हिटलर किंवा सुभाषचंद्र यांच्या कुठल्या चरित्रात याचा उल्लेख आहे; शिवाजी चरित्र तेव्हा जर्मन भाषेत...See MoreSee Translation
Bharat Patankar very fitting responce, ...appreciated.
Dinanath Manohar ह्या पोस्टमध्ये मी पोस्ट टाकणाऱ्या आणि चर्चेत सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा उल्लेख केला आहे, ह्या व्यक्तीं ह्यात दोषी आहेत, असं विलकूल म्हणायच नाही. उलट प्रशांत जगताप ह्यांनी मूळ बातमीची लिंक दिली असा मी मुद्दामून उल्लेख केला. तरीही फेसबूकवर ह्या चर्चेत सहभागी झालेल्यापैकी कुणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.See Translation
Shyam Ranjankar याच सारखा एक प्रकार, सुभाषचंद्र बोस म्हणे , स्वातंत्रयवीर सावरकरांचा सल्ला घेण्यासाठी रत्नागीरीत ये त्यांच्या गुप्त बैठका होत, ते सावबकरांचे आशिर्वाद घेउन पुढील कार्यक्रम आखीत.. कुणी याचा उलगडा करुन सावरकांचं कर्तुत्व जास्त प्रकाशात आणेल काSee Translation
Dinanath Manohar SR- हे हिटलरबद्दल सांगितलं जातं. तो पाणबुडीतून कोकण किनाऱ्याला येऊन सावरकरांना भेटून गेला होता म्हणे..See Translation
Suresh Karale मंत्रालय - विधिमंडऴ वार्ताहर संघाच्या विद्वान अध्यक्षानी असाच पोष्ट whatsup वर टाकली होती. या गृहस्थाना हो ची मिन्ह हे नाव ही माहित नाही.See Translation
Vishnu Dhoble well done ,thanks.
Vidyadhar Date http://books.google.co.in/books?id=n-KUICFfA00C&pg=PA432.... this link gives an idea of how an intellectual is pilloried for simply questioning, not criticising Shivaji. the late ranade was my mama.
Vilas Salunkhe मोहन धारीया हे तत्वनीष्ट, समाजवादी विचासरणीचे नेते होते, ते असे काहीही बिनबुडाचे सांगतील हे पटण्यास जरा अवघड आहे. बेडेकर हे इतिहासाचा अभ्यास/संशोधन करताना सापडेल तो इतिहास सनातनी हिंदूत्ववाद्यांना कसा अनुकूलपद्धतीने पुढे आणता येईल याकडेच जास्त लक्ष देत असत, याच बेडेकरांनी शिवाजी महाराजांना दैवत्व बहाल करण्यासाठी शिवरायांचे अष्टभुजाधारी रुपातले चित्र तयार करवून घेतले होते.
Prakash Zaware Patil सर ! आपण दिलेला मोहन धारीयाजींच्या कर्तृत्वकालाचा आलेख अचूक. विएटनामचे युध्दपर्वात मराठी वृत्तपत्रांत जाणकारांचे लेख येत आणि भाषणेही होत. व्हिएटनामचे युध्द " शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढले जात आहे " असे उल्लेख होत. त्यावरुन असा " ढगात गोळीबार " सुरु होऊ शकतो. डॉ.विकास आमटे सर..इतिहासाचे वाचक किंवा श्रोते असू शकतात. परंतू तो त्यांचा अभ्यास विषय नाही. सबब सार्वत्रिक लोकभ्रमाचा सहज आधार घेतला असावा.
Vilas Salunkhe या थापेबाजीचा कळस म्हणजे हो चि मिन्ह हे रायगडावर येऊन शिवसमाधीच्या पाया पडले होते व त्यांनी समाधीजवळची माती एका संदुकीत भरुन नेली होती आणि मुख्य म्हणजे त्यांनी हे सर्व भारत सरकारला न कळवता गनीमी काव्याने रायगड दर्शन केले होते म्हणे.
Anil Mokal भावनेच्या आणि उत्साहाच्या भारत ,इतिहासाचा आधार नसलेली आणि अशी कालविसंगत विधाने केली जातात .इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाने अशी विधाने तपासून घेणे श्रेयस्कर . आता शिवाजी महाराज आणि कॉम्रेड हो ची मिन्ह हे दोघेही मोठे धोरणी आणि लढवय्ये नेते होते हे निःसंशय ..
21 hrsLike2
Arun Thakur नवा इतिहास पुन्हा घडवू!
9 hrsUnlike2
राजु चांदे नेपोलियन कॅस्ट्रो अशा अनेक लोकांच्या बाबतीत शिवरायांचं नाव घेऊन असल्या खोटारड्या स्टोऱ्या तयार केल्या जातात ,

ह्या असल्या स्टोर्यात कसलीही सत्यता नाही
9 hrsLike1
Vidyadhar Date this is an old fraud and has been exposed before.
2 hrsUnlike1
Dinanath Manohar बेडेकरांच्या पोस्टमध्ये एक व्हिएतनामच्या स्त्री अॅम्बॅसॅडरचीही कहाणी दिली होती. ही लाल किल्ल्याची भेट नाकारून रायगडावर आली होती, आणि महाराजांच्या समाधीजवळील ओंजळभर माती आपल्या पर्समध्ये घेतली अशी कथा होती. कुणीतरी व्हिएतनामच्या अॅॅम्बेसीकडे चौकशी केली आणि त्यांनी भारतात आमची कधीही स्त्री अॅम्बॅसॅडर नव्हती असं लेखी उत्तर दिले होते, ते ही फेबुवर आले होते.
1 hrEditedUnlike4
Mahendra Singh Sengar Mohan Dhariya himself was a fraud why no one saying this? Moreover he was in congress..
1 hrLike
Dinanath Manohar आणखी एक माहिती य़ेथे देणे अवाजवी होणार नाही. इसवीसन पूर्व ५व्या शतकात चीनमध्ये सन त्सू नावाच्या माणसाने आर्ट ऑफ वॉर नावाचे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकात मुख्यतः प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळून, शत्रुच्या तुलनेत परिस्थितीवर आपले नियंत्रण कसे ठेवायचे ह्याचे तंत्र वर्णन केले आहे. ह्या पुस्तकाची अनेक भाषात रूपांतरे झाली आहेत, आणि जगातील युद्धशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक अभ्यासायलाच हवे असे पुस्तक आहे. माओ आणि दुसऱ्या महायुद्धात स्टॅलीननेही ह्याचा उपयोग केला आहे. शिवाजी महाराजांचे हीच युद्धनिती होती, त्यांनी मोगलांशी सरळ सामना करण्याचे टाळले, तशी वेळ आल्यावर तह केला, पण औरंगजेबाला महाराष्ट्रात नियंत्रण अखेरपर्यन्त मिळवू दिले नाही. चीन आणि ह्विएचनाम ह्याचे ऐतिहासिक संबंध लक्षात घेता, हो चि मिन्ह ह्यांनी (जर त्यांना पुस्तकाची गरज वाटलीच असेल तर) ह्या ट्रीटीचा उपयोग केला असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र सन त्सू दोन हजार वर्षे आधी होऊन गेला, महाराज पाचशे वर्षापूर्वी मोगल सत्तेशी लढत होते, म्हणून ह्याचा अर्थ त्यांनी सन त्सू चे तंत्र आत्मसात केले आणि उपयोगात आणले असे हास्या्स्पद विधान कोणी करू शकेल का?
1 hrEditedLike
Madhav Gole This is not by mistake. It is deliberately done. To spread rumours the teqnic is mastered by R. S. S. There r many examples like Sheikh Abdulla was half brother of Pandit Nehru etc.
54 minsLike1
Sharad Ramchandra Gokhale <<श्री शिवाजी महाराज ह्यांची महानता, त्यांचे युद्धकौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना पुरेशा बोलक्या आहेत. असं असताना हे कॉ. हो ची मिन्ह सारख्या नेत्यांना वेठीस धरण्याची गरजच काय होती? >> शत-प्रतिशत सहमत !!
37 minsEditedLike2