Showing posts with label प्रमिती. Show all posts
Showing posts with label प्रमिती. Show all posts

Tuesday, January 12, 2021

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा

 












‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा (प्रमिती नरके) खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; वाचा तिची जीवनकहाणी

मराठी टेलिव्हिजनवर अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे. कमी वेळात त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

ही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रमिती नरके आहे. ही सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

ही प्रमितीची पहीली मालिका नाही. या अगोदरही तिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. प्रमितीने या अगोदर कलर्स मराठीवरील ‘तु माझा सांगाती’ मालिकेत अवलीची भुमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. तिला नेहमीपासूनच अभिनयात रुची होती. त्यामूळे तिने शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तिला या गोष्टीचा तिच्या करिअरमध्ये चांगलाच फायदा झाला.

तिने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुढील करिअरसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिने अनेक दिवस मेहनत केली. या कालावधीमध्ये तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

तिला कलर्स मराठीच्या तु माझा सांगाती मालिकेत अवलीची भुमिका मिळाली. तिने अतिशय उत्तम पद्धतीने अवलीची भुमिका छोट्या पडद्यावर साकारली. तिच्या या भुमिकेचं आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले. आजही या मालिकेतील तिच्या कामाचे कौतूक केले जाते.

या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. आजही लोकं या मालिकेची आठवण काढतात. त्यावेळी अवलीच्या भुमिकेची आठवण काढतात. मालिकेनंतर तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

प्रमितीची अनेक नाटकं हिट झाली आहेत. त्यासोबतच तिने अनेक शॉर्ट फिल्म्स देखील काम केले आहे. ‘डोह ’ या शॉर्टफिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचं ‘रीड मी इन 5D झोनं’ हे नाटकं विशेष गाजलं.

आज प्रमिती कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला देखील लोकांनी खुप पसंत केले आहे. या मालिकेत तिची थोडी नकारात्मक भुमिका आहे. वेगवेगळ्या भुमिका करुन ती तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवत आहे.

BY PRAJAKTA PANDILWAD JANUARY 9, 2021 0 https://mulukhmaidan.com/pramiti-narke-marathi-actress-real-life-story/

https://mulukhmaidan.com/?s=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87


Wednesday, September 25, 2019

फादर फ्रान्सिस दिब्रिटो- महान परंपरेचा गौरव









फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे लेखन अतिशय प्रवाही, रसाळ आणि वाचनीय असते. त्यांच्या धर्मगुरू असण्याचा सगळा गोडवा त्यांच्या शैलीत उतरलेला आहे. अतिशय नम्र, सौजन्यशील आणि मित्रकुलाचे ही त्यांची खरी ओळख. लोण्यासारखा मृदू आणि कमालीचा ऋजू स्वभाव. त्यांच्यामुळे अनेक साहित्यविषयक कार्यक्रमांना वसईला गेलो. त्यांच्या संपादककाळात सुवार्ता मासिक नियमितपणे घरी येत असे. त्यांच्या निवडीमुळे मराठी भाषेला श्रीमंत करणार्‍या फादर स्टीफनसन, आद्य मराठी व्याकरणकार विल्यम कॅरी, पहिले मराठी शब्दकोशकार मोल्सवर्थ, पं. रमाबाई, पहिले मराठी कादंबरीकार बाबा पदमनजी, स्मृतिचित्रे कार लक्ष्मीबाई टिळक, कविवर्य रे. टिळक या महान परंपरेचा गौरव झालेला आहे.

फादर दिब्रिटो सुवार्ता मासिकाचे संपादक असताना खूपदा मला त्या मासिकासाठी लिहिते करीत. माझ्यासारख्या आळशी माणसाकडून लिहून घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. नाही. तेव्हा आम्ही पिंपरीला, अजमेरा कॉलनीत राहत होतो. एकदा दिब्रिटोंना मी घरी घेऊन गेलो. प्रमिती तेव्हा जेमतेम दीडेक वर्षांची होती. तिला त्यांनी उचलून कडेवर घेतलं आणि " काय नाव तुझं बाळ?" असा तिला प्रश्न विचारला. तिनं स्वत:चं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडे बघत राहिली. फादर म्हणाले, " काय झालं? माझं काही चुकलं का? काय बघतेयस?"

त्यावर ती म्हणाली, " काका, तुमच्यात स्वत:चं नाव सांगायची पद्धत नसते काय? मी माझं नाव सांगितलं. आता तुमची पाळी आहे."

फादर दिब्रिटो चमकले, लाजले आणि त्यांनी स्वत:चं नाव सांगितलं. त्यावर ती म्हणाली, " दिब्रिटोचा अर्थ काय?"

त्यांनी त्याचा अर्थ सांगितला. जाताना मला म्हणाले, " यापुढे मी कोणत्याही लहान मुलाला त्याचे नाव विचारण्याआधी माझे नाव सांगत जाईन. इतर प्रश्न विचारीन आणि मगच त्याचे/तिचे नाव विचारीन. सगळेच जण भेटल्याभेटल्या लहान मुलांना पहिला प्रश्न विचारतात, तुझे नाव काय? मुलं किती इरीटेट होत असतील ना? प्रमितीमुळे मला हा धडा शिकायला मिळाला.

- प्रा. हरी नरके,२५ सप्टेंबर २०१९ 

Monday, December 24, 2018

ब्रिलियंट कॉंमेडी, रापचिक म्युझिकल आणि जळजळीत वास्तवाची अनोखी सफर




काल बालगंधर्वला तोडी मिल फॅंटसी चा शुभारंभाचा प्रयोग बघितला. ह्या ब्रिलियंट कॉंमेडी आणि हटके म्युझिकल असलेल्या, तनमनाला प्रसन्न झिणझिण्या आणणार्‍या,गारूड करणार्‍या  अनुभवातून मला अद्यापही बाहेर येता आलेलं नाहीय. आज मराठी रंगभुमीवर पाचकळ विनोदी आणि कृत्रिम मध्यवर्गीय जाणिवांच्या नाटकांची चलती आहे. मात्र खरा विनोद किती धमाल असतो, तो किती खळखळून हसवतो, हसताहसता डोळ्यातून पाणीही काढतो याचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही "तोडी मिल फॅंटसी" हे नवं नाटक बघायलाच हवं. यातलं रापचिक म्युझिक तुम्हाला भन्नाट जगात घेऊन जातं. यातली आजच्या तरूणाईची बोली आणि प्रमाण भाषेचं देखणं मिश्रण करणारी जिवंत भाषा आरपार भिडते. ही सगळीच टीम अवघ्या पंचविशीतली आहे. कलेच्या जगात आज नविन काहीच घडत नाही, सगळं कसं शिळंशिळं आणि घिसंपिटं असतं, आजकालची तरूण मुलं फारशी गंभीर नाहीत असली टिका करणारांनी तर हे नाटक आजिबात चुकवता कामा नये. आजच्या भाकड मालिकांच्या, निर्बुद्ध करमणूकीच्या आणि नटव्या बॉलीवूडच्या जगात अडकलेल्या प्रेक्षकांना इतका पॉवरफुल कंटेट व सादरीकरण आणि अस्सल अभिनय रंगभुमीवर फार क्वचितच पाहायला मिळेल.

हे नाटक जिथे घडतं ती जागा युनिक आहे. आजवर कोणत्याही सिनेमा-नाटकात या स्थळावर नाटक घडताना मी तरी बघितलेलं नाही. मुळात तिथं नाटक घडू शकतं असा विचारच एकदम भारीय. तो सादर करताना त्यातलं नाट्य कमालतर विकसित केलंय. त्यासाठी वापरलेलं नेपथ्य, लाईट्स, म्युझिक सारंच कल्पक, अस्सल नी अफलातून आहे. मुलत: आजच्या बदलत्या जगावरचं ते एक व्यंग आहे. त्यातला जळजळीत उपरोध आणि जादूई वास्तववाद काळजाला भिडणारा आहे. आजच्या पिढीचं आजचं नाटक. एकदम हटके.

आजची ही पंचविशीतली महानगरी क्रियेटिव्ह तरूणाई स्टार्टअप इंडीयाची बघत असलेली स्वप्नं, त्यांचा ओरिजिनल असा धगधगता जिवनानुभव फॅंटसीच्या अंगाने आपल्या अंगावर अक्षरश: कोसळतो.

मुंबईच्या कापडगिरण्या गेल्या आणि त्या जागांवर प्रचंड मोठे टॅावर्स उभे राहिले. चाळी तोडून, झोपडपट्ट्या हटवून प्रचंड माँल्स उभे राहिले. स्काय वॉकवर झोपणारा पण टुरिझम बिझनेसची टोलेजंग स्वप्नं बघणारा नायक "घंट्या" हा जेव्हा हाय प्रोफाईल जगातल्या मॉडेलला भेटतो, तेव्हा नेमकी कोणती फॅंटसी घडते हा सस्पेन्स तसाच राहायला हवा. ती प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती सांगण्यात नाही.


या नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा प्रतिभावान मुलगा आहे. जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, या अकादमी विजेत्या कलाकृतीची आठवण करून देणारी पण कॉपी नसलेली एकदम ओरिजिनल आयडिया आणि तिचा स्वाभाविक विकास आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. विनायक प्रभात कोळवणकर हा अफाट ताकदीचा अतिशय गुणी दिग्दर्शक आहे. ब्रिलियंट. जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे आणि नागराज मंजुळे यांच्या झेप, उर्जा आणि प्रतिभेच्या जगातला. पण या कुणाचीही नक्कल न करणारा, अस्सल जीवनानुभव आपल्या चिमटीत पकडून ताकदीने मांडणारा. संपुर्ण ओरिजिनल. त्याची नाटकं प्रायोगिकतेच्या दुर्बोध चौकटीत न अडकता नवं, प्रवाही, सहज संवादी, अस्सल देणारी आणि मनाला आरपार भिडणारी. सतत नव्याच्या शोधात असलेला. संहिता, सादरीकरण, जाहीरातीपासून याची प्रत्येक गोष्ट वेगळी आणि स्वत:ची मुद्रा असलेली .

तोडी मिल फॅंटसी ची रंगमंच आपल्या खांद्यावर सहज पेलणारी कलाकार, संगितकार आणि बॅकस्टेजची टीमही एकदम तगडी आहे. झपाटलेली. काहीतरी वेगळं, भन्नाट करून दाखवणारी.

या नाटकातला दणकट, कधी हळुवार तर कधी स्वप्नरंजनात रमलेला सर्व टिमचा म्युझिकल आणि अभिजात अभिनय एकदम पॉवरफुल. जब्राटच. शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके,कपिल रेडेकर,सुरज कोकरे, जयदीप मराठे यांचा परफॉर्मन्स केवळ अफलातून. ही पोरं अफाट क्षमता आणि स्वत:ची झेप असलेली तगडी मुलंयत. आजउद्याची रंगभुमी आपल्या दणकट खांद्यांवर पेलण्याची अपार गुणवत्ता त्यांच्यात आहे. चैतन्य देशपांडे, अनामिका डांगरे, अगस्ती परब,प्रज्वल खेडेकर, अमेय अडिवरेकर, आशिष मंडलू यांनीही उत्तम साथ दिलीय.

नाटकात असं सगळंच रसायन जमून येणं ही फार दुर्मिळ चीज. थिएटर फ्लेमिंगो आणि भारत कला केंद्र निर्मित तोडी मिल फॅंटसी हे स्वत:चा रिदम सापडलेलं, कलदार मुद्रा उमटवणारं नाटक तुफान गाजणार. जबरदस्त चालणार असा मला विश्वास वाटतो.
अभिनंदन आणि शुभेच्छा टीम तोडी मिल फॅंटसी. #तोडीमिलफँटसी #TodiMillFantasy #natak #drama#theatre #marathitheatre Music : @desiriff_official @kapil_redekar Theatre Flamingo आणि @desiriff_official निर्मित 'तोडी मिल Fantasy'

-प्रा.हरी नरके, २४ डिसेंबर २०१८

Thursday, August 9, 2018

A mélange of narratives-Read Me in 5D Zone-

A mélange of narratives-Read Me in 5D Zone-Vikram Phukan, The Hindu

Continuing a burgeoning trend in contemporary performing arts in India, a new immersive theatre experience will be staged in Mumbai every weekend in August, with provision for more shows to be added on demand. A presentation by Pune-based mobile theatre company Theatre Flamingo, Read Me in 5D Zone — a title which evokes a whiff of millennial existentialism — will perform for limited audiences of just seven members at a time, and will take place at an arts aficionado’s well-appointed private residence at Dahanukar Wadi in Kandivli. The company was set up only last year by a bunch of intrepid twenty-somethings, all alumni of the University of Pune’s Lalit Kala Kendra. After making their professional debut at the Sudarshan Rangmanch with three one-act plays, the troupe embarked on a gruelling two-week tour of the interiors of Maharashtra — cast, crew and props crammed into a single soon-to-be weather-beaten Scorpio — taking theatre to rural communities in the almost 800-km stretch from Amravati to Sindhudurg, and discovering themselves along the way.

Road tripping

This new project will be helmed by 25-year-old Vinayak Kolwankar who graduated from the university last year. “We are constantly looking to upgrade the medium of theatre which, in my opinion, is lagging behind,” he says, alluding to old-school proscenium theatre. They spent seven odd months working on the immersive idiom, and have staged ten shows of the play in Pune to invited audiences of focus groups from Pune’s cultural scene, like Mohit Takalkar and Umesh Vinayak Kulkarni, whose feedback was then taken into active consideration. A multi-lingual venture in Hindi, Marathi and English, the play is a mélange of narratives in which multiple locations — an Andheri complex, a sheesha lounge, suburban middle-class households — are brought together under one roof, with spectators following the action in the manner of a film camera. “It won’t be interactive, because we still haven’t broken the form, but audiences can watch and move around,” says Kolwankar.

At his alma mater, Kolwankar had mounted a site-specific staging of Vilas Sarang’s story ‘Ardhya Murdhya’, in which a murderer is interviewed live in a conference hall. This was his first taste of an immersive experience and the impact it might have on an audience. Their rural tours, particularly, have also enabled them to explore different modalities of engagement with audiences. “We have performed in places with no tradition of theatre, appropriated spaces like the village square, performed under banyan trees, and in the houses in which kirtans were traditionally performed,” recounts Kolwankar. They decided to explore these inherently immersive spaces in their own ways. For instance, Kolwankar’s production of Mahesh Elkunchwar’s Wasanani Jeernani employed a ‘box set’ modelled on a bungalow they had discovered in a village. Later, as an experiment, the troupe travelled to the actual venue and performed the play right there. “Usually, actors make the mise en scène come alive with their actions. Here, the house was already breathing with its own history long before we stepped on stage,” he elaborates. Even an actor’s performance is transformed in authentic settings, where the world she might otherwise visualise in her head is actually present with far greater immediacy.

New experiences

Kolwankar and his cohorts, in their attempt to break new ground in their chosen field, are now completely sold on the idea of immersive plays as a trend that might win over fresh demographics for experimental theatre, and stem the tide of dwindling audiences. “In a proscenium play, perhaps only those in the front row might catch an actor’s eyes or his emotions. The impact of performance rapidly weakens as we walk away from the stage,” he explains. In contrast, in an immersive production, an actor can be fully present in one’s consciousness with “his eyes, his pulse, his pace of breath, his beating heart.” The work on Read Me in 5D Zone has allowed Kolwankar to do away with expository text, since audiences in thrall to an experience they are included within, need no hand-holding.

The Kandivli residence in which the play will be performed fortuitously and conveniently possessed all the ‘found’ characteristics that were required for the production, so the troupe cane asily travel in from Pune on the morning of a performance itself. “The play is an intense experience, and the actors are put through a wringer, which is why we will only perform a single show in one day,” says Kolwankar judiciously. This is likely to make Read Me in 5D Zone quite the hot ticket in the coming weeks
.
https://www.thehindu.com/entertainment/theatre/a-mlange-of-narratives/article24633935.ece
THEATRE AUGUST 08, 2018 18:22 IST
UPDATED: AUGUST 08, 2018 18:22 IST
Bookings for August are currently open for Read Me in 5D Zone. For more details contact 9503575464 or check out the Theatre Flamingo page on Facebook.

Sunday, June 10, 2018

नाटक! आणि घरात!!- प्रमिती नरके, म.टा.संवाद



पुण्यातील काही तरुण रंगकर्मींनी नुकताच पुण्यात 'रीड मी इन 5D झोन' या नाटकाचा एक अफलातून प्रयोग केला. बंगल्यात मोजक्याच प्रेक्षकांसमोर व्हारांडा, परसदार, गच्ची, घरातली एखादी खोली यांनाच स्टेज करून, वेगवेगळ्या पातळ्यांवर सादर झालेल्या या नाविण्यपूर्ण प्रयोगाविषयी...
......................
'…शेवटी नाटक जिवंत राहिलं पाहिजे', असं अनेक रंगकर्मींना म्हणताना आपण ऐकलं असेल. परंतु एखादी कला, एखादं माध्यम किंवा एखादी जीवनशैली टिकून राहण्यासाठी बदलत्या काळाच्या गरजांनुसार रूढ अर्थाने प्रचलित असणाऱ्या त्याच्या अस्तित्वामध्ये सातत्याने काही बदल घडवणं, आणखी पैलू पडताळून पाहणं आणि शक्यता शोधणं आवश्यक आहे, असं आम्हाला - थिएटर फ्लेमिंगो आणि बडे मुछवाले - मंडळींना वाटतं. आजपर्यंत नाटक करत असताना विषय, मांडणी, फॉर्म, अभिनय शैली या सगळ्याचा वरील संदर्भात विचार करत असतानाच 'How about performing space?' असा एक विचार मनात आला... आणि विनायक कोळवणकर या आमच्या कन्सेप्ट डिझायनर आणि एडिटरने लगेच कामाला सुरुवात केली. आमचा मित्र आणि 'बडे मुछवाले' संस्थेचा संस्थापक अभिनव काफरे याच्या घरी, सिंहगड रोड, पुणे इथे एका दुमजली रो-हाऊसमध्ये, या घराचाच रंगमंच म्हणून वापर करता येईल का असा विचार सुरू झाला.

मग सिंहगड रोडवरची ती सन सिटी सोसायटी, तिथे राहणाऱ्या लोकांचं सोशिओ-इकोनॉमिकल स्टेटस, राहणीमान, जाणिवा काय असतील इथून प्रवास सुरू झाला. या सगळ्याचा अभ्यास करून विनायकने वीस-पंचवीस लहान लहान गोष्टी डेव्हलप केल्या. त्यातल्या निवडक चार गोष्टींमधून मग नाटकाचं कथानक उभं राहिलं. संवाद लिखाणाचं काम अक्षय संतने केलं. त्यानंतर अॅक्टर्स 'इन' झाले.

अॅक्टर म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे सगळं फारच मजेशीर आणि सोपं वाटलं. ना खोटं वय प्ले करायचं होतं, ना कुठला 'कॅरेक्टर रिसर्च' नावाचा घाट घालायचा होता. वाचनाला सुरुवात झाली तेव्हाच ठरलं की जितकं जास्त नैसर्गिक पद्धतीने बोलता येईल, तसंच आणि तेवढंच बोलायचं-वागायचं. माझ्या पात्राचं नाव जसप्रीत होतं. ही दिल्लीची पंजाबी मुलगी शिक्षणासाठी गेली काही वर्षं पुण्यात स्थायिक असलेली. हिंदी ही माझी जिव्हाळ्याची भाषा असल्यामुळे तोडकं-मोडकं मराठी बोलणारं हे पात्र साकारताना मला फारच जास्त मज्जा आली. पहिला सीन घडतो हॉलमध्ये. त्या घराच्या हॉलची आम्ही अॅक्टर्सनी स्वत:च आमच्या 'बॅचलर्स फ्लॅट'ची लिव्हिंग रूम बनवली. अभिनव नाटकाचं नेपथ्य सांभाळत होता. त्याने आम्हाला हवी तशी त्याच्या घरातल्या फर्निचरची फेरफार - अॅडीशन - सबस्ट्रॅक्शन करू दिली. भिंतीवर ती टिपिकल फेअरी लाइटसची माळ आणि रेड बोर्डवर जसप्रीत आणि नंदिनीच्या आप्तेष्टांचे फोटोग्राफ्स आले. सगळ्यात भन्नाट पार्ट होता या नाटकाचं मंचन आणि आवाज. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी डोक्यात होती की आपण आपल्या घरात ज्या आवाजात बोलतो, जसे वावरतो तसंच सगळं करायचं होतं. वरकरणी पाहता जरी हे सोपं वाटत असलं, तरी आजवर शिकलेल्या, केलेल्या नाटकाच्या सगळ्या नियमांची पाटी स्वच्छ कोरी करून नवीन धडे गिरवायचे होते. 'माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाईल का, माझी पाठ दिसतेय का, माझा अभिनय पोहोचतोय का' हे मुद्देच गायब झाले होते. नवीन चॅलेंज असं होतं की, 'मी फूटभर अंतरावरून 'प्रमिती' न वाटता खरी 'जसप्रीत' वाटतेय का, हे माझं घर वाटतंय का?' अॅक्टरसाठी अवघड गोष्ट असते की अभिनयाच्या मोहाला आवर घालणं आणि तेच आम्हाला एक हजार टक्के करायचं होतं. एक मिनीटसं एक्स्प्रेशन जरी कमी-जास्त झालं तरी ते दिसणार होतं सहज. सो आता 'टू अॅक्ट' विसरून 'टू बी'चा प्रवास सुरू झाला. या फक्त असण्याच्या प्रक्रियेमध्ये साहजिकच संवादांची लीलया मोडतोड झाली. दिग्दर्शकाने तशी पूर्ण मुभा देऊनच ठेवलेली होती. घरातला वावरही प्रत्येक तालमीत वेगळा होऊ लागला आणि डेलीबरेटली तो शेवटपर्यंत कधीच 'ब्लॉक' नाही झाला.

अशाच प्रकारे पुढचे किचनमध्ये, बॅकयार्डमध्ये, जिन्याने वर जाऊन बेडरूममध्ये आणि शेवटी गच्चीवर असे सगळे प्रसंग उभे राहिले.

आणखी एक गंमत अशी की हे सगळं रीयल टाइममध्ये घडत होतं. त्यामुळे पहिल्या सीनमधल्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ तिसऱ्या सीनमध्ये किंवा चौथ्या सीनचा धागा घेऊन शेवटचा सीन घडायचा असं काहीसं स्ट्रक्चर तयार झालं. त्यात जेव्हा प्रेक्षक 'इन' झाले तेव्हा तर आणखीनच मजा. बऱ्याचदा असं होई की एक-दोन प्रेक्षक तिसऱ्याच सीनमध्ये रमलेत आणि पुढे रीयल टाइमनुसार चौथा सीन सुरू झालाय. ही सगळी गंमत बाहेरून बघताना विनायक, अभिनव आणि मधुराची पण धांदल उडत असणार. मधुरा संपूर्ण नाटकाचं व्यवस्थापन पाहत होती.

तालमींपासून ते प्रयोगांदरम्यान अजूनही काही गोष्टी बदलत होत्या. त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिन्यासमोर लावलेलं एक भलं मोठ्ठं पेंटिंग. सहा बाय नऊच्या पिवळ्या रंगवलेल्या कॅनव्हासवर काही चित्रं, काही गोष्टी रंगवलेल्या, अडकवलेल्या आणि चिकटवलेल्या होत्या. त्यात एक चप्पल, एक अंडं, तीन-चार पक्ष्यांच्या नक्षी असलेल्या फ्रुट-फोर्कच्या रंगीत काड्या, तारेनं बनवलेलं घरटं, चावी, कात्री, कबुतराचं पीस, पेनाचं टोपण, आणखी काही अशाच गोष्टी होत्या. रोज गेल्यावर त्यात काहीतरी बदल झालेला असायचा. रसास्वादाच्या दृष्टीने त्यातून प्रत्येकजण आपला आपला अर्थ घेऊन जात असणार. एक दिवस तर चक्क त्या जागी एक राजा-राणी शृंगार करत बसलेत असं पेंटिंग होतं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी अनामिका आणि सचिन - ज्यांचा तिथे सीन घडायचा - त्यांना खूप भरभरून चिडवलं. पण गमतीचा भाग वगळता, खरंच या प्रोसेस दरम्यान दिग्दर्शकाने अशा काही गोष्टी पेरल्या होत्या की ज्यामुळे त्या दिवशीच्या प्रयोगाला एक वेगळीच दिशा प्राप्त होई. एका प्रयोगात तर सीनमध्ये भांडण सुरू असताना खुद्द विनायक दारुड्याचा अवतार करून आमच्यात आला. याची काहीच पूर्वकल्पना नसणारे आम्ही गोंधळून, गलका करून त्या तमाशा करणाऱ्या पात्राला हाकलून लावलं. हे सगळं इतक्या वेगात आणि अविश्वसनीय पद्धतीने घडलं की प्रेक्षकांना तो तालीम केलेला नाटकाचाच भाग असल्यासारखं वाटलं. एका प्रयोगात अचानक दिवे गेले आणि आम्ही मोबाइलचे टॉर्च ऑन करून सीन केला. पाच मिनिटांत लाइटस आले तेव्हा पुन्हा बंद केला आणि सीन सुरू राहिला अगदी तसाच, जसं आपल्या घरात दिवे गेल्यावर जगणं सुरू राहतं तसं. प्रेक्षकांना तोही प्लॅन्ड एलिमेंट वाटला. एका प्रसंगात अचानक वरून पाणी पडतं आणि अनेकदा त्याचे शिंतोडे प्रेक्षकांच्या अंगावर उडत. याचीही सगळ्यांना गंमत वाटे. मुळात आमचा, इथे खरंच हे प्रसंग घडत आहेत असं भासवण्याचा हेतू साध्य होई.

प्रेक्षकांना बसायला आम्ही कुठलीच वेगळी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे अनेकदा आमच्या मागे, पुढे, शेजारी कुठेही प्रेक्षक बसलेले किंवा उभे असत. त्यानुसार ठरलेल्या (पण कधीच पक्क्या न ठरलेल्या) गोष्टी बदलत जात. याला आम्ही 'Read me in 5D zone' असं नाव देण्यामागची कल्पना हीच होती की आपण सिनेमागृहात 3D, 4D सिनेमे पाहतो. पण त्याहीपुढे जाऊन प्रेक्षकांना जेव्हा गंध, स्पर्श आणि स्वत: मूव्ह होत प्रसंग अनुभवण्याचा डायमेंशन मिळतो, तेव्हा ते आम्हाला कसं वाचतील...…

नाटकाचा सूत्रधार - अक्षय - प्रेक्षकांना बाजूच्या चौकातल्या एका हॉटेलमध्ये भेटायचा. तिथे तुम्ही आता कशा प्रकारे गोष्टी अनुभवणार आहात याबद्दल त्यांना एक हलकीशी कल्पना दिली जायची आणि मग त्यांना घेऊन तो घरात म्हणजेच आमच्या 'रंगमंचीय अवकाशात' प्रवेश करे. इथून पुढचा खेळ प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या जागी उभं राहून, बसून, झोपून पाहण्याची गंमत अनुभवता येई. बऱ्याचदा प्रेक्षकांना आपण चोरून बाजूच्या घरात डोकावून पाहतोय की काय असा थ्रिलिंग फील येई, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही एक प्रकारे या फॉर्मला मिळालेली पावतीच होती.

या क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना आम्ही प्रयोगासाठी बोलावलं होतं. सर्वांनी या नावीन्यपूर्ण प्रयोगाचं स्वागत आणि कौतुक केलं. चांगले-वाईट मुद्दे सांगितले. निसटलेले क्षण मिळवून दिले, त्यानुसार आम्ही प्रयोग-दरप्रयोग बदल करत गेलो. त्यामध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मोहीत टाकळकर, उमेश कुलकर्णी असे अनेक मान्यवर होते. एक 'गोड रंगाचे' नाट्य-सिने दिग्दर्शक असं म्हणाले की- 'आमच्या काळात आम्ही नाटक करायचो, तेव्हा अगदी शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत आमची देहबोली आणि आवाज पोहोचतोय की नाही हे बघायचो. तुम्ही आताची पोरं असं खुसुरपुसुर नाटक करताय, पण करा. तुम्हाला काय कोणी स्पर्धक नाही. तुम्ही करत राहा.' मुळात आजच्या प्रेक्षकालाच त्या तथाकथित 'शेवटच्या' रांगेत बसून नाटक बघायचंय का, हा आमचा मुद्दा आहे. रूढ पद्धतीने नाटक करण्यावर आमचं मुळातच प्रेम आहे. हा सगळा घाट जो घातला गेला तो 'अॅमेझॉन' आणि 'नेटफ्लिक्स'च्या प्ले-पॉझ-प्ले खेळणाऱ्या, नवीन जाणिवा, नवीन हुशारीने जगणाऱ्या प्रेक्षकाची नाटकाकडे ओढ निर्माण व्हावी, किंवा टिकून राहावी (जिवंत रहावी) यासाठी! त्यासाठी यातील विषयही तसेच आजच्या जाणिवेचे, बदलत्या पिढीच्या रोजच्या जगण्यातलेच तरीही दुर्लक्षिले जाणारे असे निवडले आणि आमची अशीच इच्छा आहे की हा एवढा प्रचंड रिस्पॉन्स बघता, लवकरात लवकर असे अजून अनेक प्रयोग व्हावेत आणि आम्हाला यातही स्पर्धा निर्माण होऊन आणखी नवीन काहीतरी शोधण्याचं बळ मिळावं! - प्रमिती नरके
Jun 10, 2018, 10:34AM IST Maharashtra Times
म.टा.संवाद, रविवार, दि. 10 जून 2018, पृ. 3
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/drama-and-the-house/articleshow/64515067.cms

Saturday, March 3, 2018

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी

आंतर राष्ट्रीय महिला दिना निमित्त- पिढी तुझी - माझी
संगिता नरके आणि प्रमिती नरके
सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक चणचण हातात हात घालून असतात. पण इच्छाशक्ती,बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर त्यावरही मात करता येते. संगिता ही त्या पिढीची प्रतिनिधी. या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड असेल तर पुढच्या पिढीचा पाया सर्वार्थाने भक्कम होतो, तिला भरारी घ्यायला बळ देतो, जसं प्रमितीला मिळालं. वाचा या मायलेकींच्याच शब्दात-

--संगिता
माझं बालपण मुंबईत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच लग्न झालं. आमचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यानं खूप विरोध झाला. माझं माहेर भटक्या-विमुक्त समाजातलं. हा समाज म्हणजे निरक्षरता, कुपोषण, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज. पोटासाठी चोर्‍यामार्‍या करण्याचा वारसा लाभलेला समाज. आई-वडीलांनी मुंबईच्या फूटपाथवरून त्यांच्या आयुष्याची सुरूवात केलेली. वडील सामाजिक चळवळीत काम करीत असूनही मुलगाच हवा या हट्टापायी आम्हा ५ बहिणांना जन्म दिला गेला. त्यामुळं कोणतीही हौसमौज आमच्या वाट्याला आलीच नाही. आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळालंच नाही ते सगळंही त्यांना मिळायलाच हवं अशी खूणगाठ मी कळत्या वयात मनात बांधलेली.

वडील कधी घरी नसायचेच. घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळं काही झालं तरी कार्यकर्त्याशी लग्न करायचं नाही असा मी ठाम निश्चय केलेला होता. विद्यापीठ नामांतर आंदोलनात हरीची भेट झाली. तेव्हा तो टेल्कोत रात्रपाळीची पूर्णवेळ नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यानं चळवळीलाही संपुर्ण वाहून घेतलेलं होतं. त्यामुळं त्यानं जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला चक्क नकार दिला.

पुढं आम्ही "झोळ्या जाळा-बेड्या तोडा" परिषदेला औरंगाबादला भेटलो. त्यानंतर अजिंठा - वेरूळचा एकत्र प्रवास झाला. महाडच्या चवदार तळ्यावरील स्त्रीमुक्ती परिषदेनंतर रायगड-प्रतापगड-महाबळेश्वर सहल झाली. आपला जोडीदार शिकलेला हवा. स्त्री-पुरूष समानता मानणारा हवा. व्यसनी नी अंधश्रद्धाळू नसावा. जात, दिसणं, सांपत्तिक स्थिती या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत हे मात्र माझ्या मनात पक्कं होतं. साडेसतरा नळीच्या झोपडीवजा घरात हरी राहायचा. तिकडे "होल वावर इज अवर-गो एनी व्हेअर" अशी पद्धत असल्यानं स्वच्छतागृहाची सोयही नव्हती. तिथल्या मंडळींना त्याची गरजही वाटत नव्हती.

लग्नात मानसिक, शारिरिक, वैचारिक, अनुरूपतेच्या बाबी भक्कमपणे जुळायला हव्यात असं मला वाटे. मुख्य म्हणजे दोघात बलदंड प्रेम हवं. या प्रेमामुळंच शेवटी माझा कार्यकर्त्याशी लग्न न करण्याचा निर्धार ढासळला. आम्ही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण पुढं चालू राहिलं. फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून आम्ही दोन निर्णय घेऊन टाकलेले होते.

उच्चशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचं नाही. नी मुलगा होवो की मुलगी एका अपत्यावर कुटुंबनियोजन करायचं.
लग्नाआधीच हरीनं पिंपरीत छोटी सदनिका घेतली होती. माझ्या सासरी तेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा, पण हरीनं शाळेत असतानाच गॅस बुक केलेला होता. त्यानं वयाच्या ५ व्या वर्षापासून स्मशानात नोकरी करीत पुणे मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं.

त्याच्या घरात पिढ्यानपिढ्या शेतमजुरीची परंपरा असल्यानं त्याला कष्टाची गोडी होती. मात्र भीक, लाचारी आणि चोरीची प्रचंड नफरत होती. त्याचे वडील तो लहान असताना औषेधपाण्याविना अकाली गेले होते. त्यामुळे आणि प्रचंड गरिबीमुळे काटकसर त्याच्या नको इतकी हाडीमाशी मुरली होती. त्याचा कधीकधी अतिरेक झाला की मला त्रास होई. पण तरिही आम्ही उमेदीचे दिवस पोटाला चिमटे घेऊन अतिशय काटकसरीने काढले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमच्या गरजा अतिशय मर्यादित राहिल्या.

फक्त पुस्तकं विकत घेण्याचं व्यसन वगळता आम्हाला दुसरं कोणतंही व्यसन नाही. भिकेचा आणि लाचारीचा तिटकारा पण चांगल्या जीवनमानाची ओढ यामुळे आम्ही आधी झोपडी, मग दोन खोल्यांची छोटी सदनिका आणि पुढे कोथरूडला दोन बेडरूमचं घर असा प्रवास केला.
सध्या मी लोणकर माध्यमिक विद्यालयात मुंढवा, पुणे इथं काम करते.

प्रमिती ३ महिन्यांची असतानाच मला मोठा अपघात झाला. तिचे खूप हाल झाले. तिला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून आम्ही पिंपरीहून कोथरूडला राहायला आलो. तिला मराठी माध्यमात घालायचं आमचं ठरलेलं होतं. अभिनव विद्यालयाचे प्रमुख चिं.स.लाटकर अण्णा यांनी तिला प्रवेश द्यायचं मान्य केलेलं होतं. मात्र आम्हाला तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे असं ते गृहीत धरून चाललेले.
अभिनव मराठी माध्यमाची शाळा सुरूही झाली तरी इंग्रजी शाळेचे प्रवेश उशीरा असल्यानं ते निवांत होते. आम्ही हादरलो. तिला मराठी शाळेत घालून आम्ही तिचं नुकसान करू नये असं अण्णांना मनापासून वाटत होतं. शेवटी आमच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि तिला मराठी शाळेत प्रवेश दिला.

हरी एकतर फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशनांच्या कामासाठी मुंबईला मंत्रालयात किंवा व्याख्यानांच्या दौर्‍यांवर सतत घराबाहेर असायचा. मी मुंढव्याच्या लोणकर विद्यालयातली माझी नोकरी सांभाळून प्रमितीच्या अभ्यासाचं बघायचे. प्रमितीच्या शाळेतील कार्यक्रमांना मीच उपस्थित असायचे. प्रमिती अभ्यासात हुशार होती. परंतु तिनं पहिला-दुसरा क्रमांक मिळविण्याऎवजी अभ्यासेतर उपक्रमातही भाग घ्यावा असं मला वाटत असे. बालवाडीपासूनच मी तिला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. ती कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य यात सहभागी व्हायची. बक्षीस घ्यायला व्यासपीठावर जायला मात्र बुजायची. ती चित्रकला व गायनाच्या क्लासलाही जायची. पण तिला त्यात फारशी रुची निर्माण झाली नाही. मात्र पोहणे तिने मनापासून एन्जॉय केले. पोहण्याचे सर्व प्रकार तिने आत्मसात केले.

आम्ही तिला भरपूर बालनाट्यं दाखविली. तिला त्याची इतकी गोडी लागली की अनेकदा ती एकट्यानं जायची. काही नाटकं तिनं अनेकवेळा पाहिली. तिला कविता करायला आवडतं. त्या ती मला आवर्जुन वाचून दाखवते. त्या बाबाला दाखव म्हटलं की मात्र ती आपल्या दोघीतलीच गंमत आहे असं म्हणते. सुट्ट्यांमध्ये ट्रेक, ओरीगामी, सुदर्शन रंगमंच यात ती गर्क असायची. सहावीत असताना तिनं एकटीनं हिमाचल, पंजाबचा प्रवास केलेला होता.
चारित्र्य प्रतिष्ठानचा आंतरशालेय आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तिला मेधा पाटकरांच्या हस्ते टिळक स्मारकला मिळाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती," आमच्या घरात हजारो पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो."

राष्ट्र सेवा दलाची वार्षिक शिबिरं ती चुकवायची नाही. तिथं एका वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे तिला भेटले. त्यांनी तिची अभिनय क्षमता हेरली. त्यांनी तिची "सत्यशोधक" या नाटकातील सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी निवड केली. तिनं तालमीही केल्या. मात्र पुढं ललित कलाच्या वर्गांमुळं तिला ते नाटक सोडणं भाग पडलं. सत्यशोधक खूप गाजलं. पर्ण पेठेनं तो रोल उत्तम केला. परंतु तिच्या उच्च महाविद्यालयीन शिक्षणामुळं तिही पुढील प्रयोगांसाठी वेळ देऊ शकत नव्हती.
हा प्रयोग पाहिल्यावर सतिश आळेकरांनी पेठेंना या रोलसाठी प्रमितीचं नाव सुचविलं, तेव्हा या योगायोगाची मला गंमत वाटली.
दहावीनंतर पुढं काय करावं याबाबत प्रमितीचा निर्णय होत नव्हता. तिचा निर्णय तिनंच घ्यावा असं आम्ही तिला सांगितलं होतं. अभिनयात तिला रस होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चितता व अफाट स्पर्धा बघता जोडीला आणखी एखादा आधार असावा असं तिलाही वाटत होतं. त्यासाठी ती जर्मन, मानसशास्त्र, मासकॉम यांचाही विचार करित होती. हरीनं भारतीय प्रशासन सेवेचं क्षेत्रही सुचवुन ठेवलं होतं. तिनं फर्ग्युसनला अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला.

दरम्यान बारावीतच तिचा ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाला होता.
हरी आरक्षण धोरणाचा समर्थक असला तरी आमच्या मुलीनं मात्र ललितकलाला खुल्या गटातूनच प्रवेश घ्यावा यासाठी तो आग्रही होता. प्रवेश परिक्षेत जर यश आलं नाही तर १ वर्ष थांबून पुन्हा प्रवेश परिक्षा द्यायची पण ललितलाच जायचं यावर प्रमिती ठाम होती.

तिनं कसून तयारी केली. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या नामवंत परिक्षकांनी तिची ललितला निवड केली. गेल्या ३ वर्षात या क्षेत्राचा ध्यास घेऊन ती करीत असलेला अभ्यास, सकाळी ८ ते रात्री १ किंवा २ वाजेपर्यंत तिच्या चालणार्‍या वर्ग, तालमी यात ती आरपार बुडालेली असते. ललितला जातानाची प्रमिती आणि आजची प्रमिती यात खुपच फरक पडलाय. तिचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय.

तिला कष्टाचं महत्व कळावं, घामाचे पैसे मिळवताना काय वाटतं, हा अनुभव यावा यासाठी तिनं विद्यापिठाच्या "कमवा आणि शिका" योजनेत भाग घेतला. सुट्टीत बिग बझार आणि इतर अनेक ठिकाणी काम करून अर्थार्जन करीत तिनं स्वत:चं शिक्षण घेतलं.

मितुची पिढी अतिशय प्रॅक्टीकल आहे. बोल्ड आहे. जेंडर सेंसेटिव्ह आणि अर्थातच न्यायासाठी आग्रही आहे.
ती जिथं जाईल तिथं तिनं आपली स्पेस मोठी करण्यासाठी झटावं एव्हढीच आमची अपेक्षा आहे.

हरीला सामाजिक चळवळीत आणि लेखन-संशोधनात रस होता, आहे.
मला स्वत:ला अभिनयाची आवड होती. मी तिकडं जावं असं मी एकदा माझ्या पालकांना बोलून दाखवलं तेव्हा ते उखडले होते. ते तसा विचारही करू शकत नव्हते. माझ्या मुलीनं हे क्षेत्र निवडलं याचा मला आनंद आहे. तिचं आवडीचं क्षेत्र तिनंच निवडलं हे महत्वाचं आहे.

तिच्यात कोणताही भाबडेपणा नाही. कठोर परिश्रमांची तिची तयारी आहे. तिनं स्वाभिमानी, निर्भीड, कष्टाळू, संवेदनशील असावं. कितीही स्पर्धा असली तरी ती तिची मुद्रा नक्की उमटविल असा मला विश्वास आहे.
तिचा जोडीदार निवडताना तिनं जात, धर्म, वर्ण, वंश, प्रांत, भाषा असला कोणताही संकुचित विचार करून तिचं निवडीचं क्षेत्र छोटं करू नये असं आम्ही तिला सांगितलेलं आहे. ती जे ठरविल त्याला आमचा संपुर्ण पाठिंबा असेल.
तिनं चांगला माणूस बनावं एव्हढीच आमची अपेक्षा राहणार. तसे संस्कार आम्ही तिच्यावर केलेले आहेत.
..............................
प्रमिती--

माझी लहानपणीची पहिली आठवण म्हणजे बालवाडीत असताना शाळेच्या छोट्याशा सभागृहात पन्नास एक वर्गमित्र-मैत्रिणी आणि पाच-सहा शिक्षकांच्या समोर मी घाबरत घाबरत केलेलं वक्तृत्व स्पर्धेतलं बिरसा मुंडावरचं पहिलं छोटसं भाषण. पण त्या भाषणाच्या आधिचा आणि नंतरचा तासभर माझं अंग आणि मन ज्या गतीनं, ज्या प्रकारे थरथर कापलं होतं ते म्हणजे काही विचारता सोय नाही. त्यानंतर प्रत्येकच स्पर्धेच्यावेळी एन्गझायटीच्या परमोच्च बिंदूशी गाठ पडणं काही चुकत नव्हतं. परंतु तरीही बक्षिसं मिळवणंही चुकत नसल्यानं वारंवार स्पर्धेत उतरतच होतेच.

या सगळ्यात शालेय जिवनातच कधीतरी कलेची, अभिनयाची, नाटकाची गोडी लागली. घरातून आईचा मिळणारा संपूर्ण पाठींबा आणि बाबाचा असलेला आदर्श याचीही खूप मदत झाली. हे सगळं करत असताना तेव्हा गंभीरपणे करीयर म्हणून अभिनयाचा तसा विचार केला नव्हता. पण मनातल्या मनात मी अभिनेत्री व्हायची स्वप्नं नेहमीच रंगवत होते. पण गुप्तपणे. उघडपणे नाही. कारण, एक म्हणजे बाबाची मी आय.ए.एस. व्हावं ही अपेक्षा आणि दुसरं म्हणजे " ज्यांना दुसरं काही जमत नाही, ते पूर्णवेळ अभिनय करतात " हा शाळेत, आपल्या समाजात तेव्हा असलेला गैरसमज.

त्यात मी दिसायला तशी चारचौघींसारखी. त्यामुळं अभिनेत्री व्हायचं असं म्हटल्यावर वर्गातली चार टाळकी फिदीफिदी हसणार याची खात्री होती. पण तरी धीर करून एकदा, "सुंदर दिसण्याचा अभिनयाशी काहीही संबंध नाही" यावरून शाळेतल्या बाईंशी मी वाद घातल्याचं मला आठवतं. तेव्हापासूनच माझी "उद्धट" म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती.

शाळा संपली. पण पुढं काय करायचं हे माझं काही ठरत नव्हतं. माझं "गुप्त स्वप्न" तर मला पूर्णत्वास न्यायचंच होतं. पण कसं? हा प्रश्न होताच.

बाबाच्या अपेक्षा अन माझ्या मनाचा कल पाहता आईनं हुशारीनं एक मध्यममार्ग सुचवला. तो म्हणजे मासकॉम. जेणेकरून "इलेक्ट्रॉनिक माध्यमातली पत्रकारिता" म्हणून बाबाही खूश होणार होता आणि "अभिनयाच्या जवळपास जाणारंच हे क्षेत्र आहे" ही तात्पुरती गोळी मलाही पुरणार होती.

त्यानुसार मी ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून थेट फर्ग्युसन मधल्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या क्राऊडशी मॅचअप करताना आधी नाकी नऊ आलेले. अभ्यासात मन रमेना अन आर्ट सर्कल मधल्या अंतर्गत राजकारणामुळं तिथंही घुसता येईना. हा काळ म्हणजे माझ्यासाठी करीअरच्या दृष्टीनं अगदीच अंधूक आणि घाबरवून सोडणारा होता. पण त्याचा उलट परिणाम असा झाला, की अनेक पर्याय चाचपडल्यानंतर मी आपल्याला काय करायचं नाहीये, ते पक्कं करून टाकलं.

या सर्व घडामोडींची सर्वात जवळची साक्षीदार म्हणजे माझी मम्मा. माझा कलाक्षेत्राकडे १२०, १३० वरून थेट १८० अंशात वळलेला कल पटवून देऊन बाबाचं मन वळवण्यात ती सफल झाली. आणि मी १२ वी नंतर पूर्णवेळ नाट्यशास्त्राला ललितकला केंद्रात प्रवेश घ्यायचा निर्णय झाला. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता.

निर्णय तर झाला. पण प्रवेश प्रक्रीया सोपी नव्हती. लेखी परीक्षा आणि मग शॉर्टलिस्टेड मुलांची प्रत्यक्ष मुलाखत अन परफॉरमन्स टेस्ट व्हायची होती. त्यात लिमिटेड सीटस - फक्त दहा. आता पूर्वीसारखा थरकाप उडत नसला तरी टेन्शन खूप आलं होतं.

दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आमच्या पिताश्रींनी ओबीसी कोट्यातून प्रवेश न घेता ओपन कॅटेगरीतूनच प्रवेश मिळवायचा असं आपलं धोरण जाहीर केलं होतं. बरं त्यामागं भक्कम विचारसरणी असल्यानं मला काही बोलताही येईना. झपाटून तयारी केली आणि प्रवेश परिक्षेत ओपनमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले.

ललितला आल्यानंतर अभिनयाकडं, नाटकाकडं बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला मिळाली. ललित हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा म्हणावा लागेल.

सतिश आळेकरसर, प्रविण भोळेसर, समर नखातेसर, राजीव नाईकसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही समृद्ध झाल्याचं मला जाणवतं.

शालेय जिवनातही मी नाटकात कामं केली. पण इथं आल्यावर मी " जाणीवपूर्वक ’ नाटक करायला शिकले.

याकाळात मी माझ्या स्वत:च्या चार संहिताही लिहिल्या. फर्ग्युसनच्या सुरुवातीच्या दिवसांत मला नेहमी खंत वाटत असे, की माझ्या पालकांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही.

पण आता मात्र मला याच गोष्टीचा प्रचंड फायदा होत आहे. माझ्याच वर्गातील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना जी नाटकाची भाषा दुर्बोध व त्यामुळं कंटाळवाणी वाटते ती मी अगदी सहज समजून घेऊ शकते. माझं मराठी साहित्य मला जवळचं वाटतं. संहिता समजून घेणं, संदर्भ जुळवणी, शैलीचा अभ्यास यासाठी लागणारी समज मराठी माध्यमामुळं प्रगल्भ होत गेली.

अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करत असताना मी शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि अ मिडसमर नाईटस ड्रीम, मॅक्झीम गॉर्कीचं द लोअर डेप्थ, विजय तेंडुलकरांचं मित्राची गोष्ट, बर्टोल्ट ब्रेक्थचं दी कॉकेशिअन चॉक सर्कल इ. नाटकांत कामं केली. दी कॉकेशिअन चॉक सर्कलचे मुंबईला पृथ्वी थिएटर, दिल्लीला आंतरराष्ट्रीय भारतरंग महोत्सवामध्ये प्रयोग केले. सकाळ व हिंदूमध्ये त्याची छान परिक्षणं आली. संदेश कुलकर्णीसर, अनिरूद्ध खुटवडसर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना नाटकाच्या अनेक अंगांचा सखोल अभ्यासही करता आला.

"संहिता ते प्रयोग" या अभ्यासक्रमा अंतर्गत लेखक आणि दिग्दर्शक याही पातळ्यांवर विचार करण्याची संधी मला मिळाली.

मीही चार संहिता लिहिल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व अनुभवांतून मला पुढच्या आयुष्याची दृष्टी मिळत गेली. शिदोरी भक्कम झाली.

आमच्या घरात स्वतंत्र ग्रंथालय काढता येईल एवढी पुस्तकं आहेत. याचा मला खूपच फायदा झाला. केवळ नाटकांचीच नाही तर वैचारिक, कथा, कादंबर्‍या, कविता, संदर्भग्रंथ पटकन हाताशी असतात. यासाठी मी स्वत:ला प्रचंड लकी मानते. ही रसद आयुष्यभर पुरेल.

आता मी ललितकला केंद्रातून पदवीधर होऊन लवकरच बाहेर पडते आहे. अजून खूप काही शिकायचं आहे.
....................................
Sangita Hari Narke -March 1, 2014 ·
"माहेर," मार्च २०१४, पृ.५२ ते ५४


Wednesday, October 11, 2017

माझी मुलगी - प्रमिती


आज जागतिक कन्यादिनाच्या निमित्ताने सकाळने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुली, आई, वडील यांनी उत्स्फुर्त अनुभवकथन केले. अनेकदा उपस्थितांचे डोळे पाणावले. यानिमित्ताने माझी मुलगी प्रमिती हिच्या बालपणापासुनच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत होत्या. त्यातल्या या काही-
पालकांना आपल्या मुलांना पुण्यातल्या नामवंत शाळेत प्रवेश कसा मिळवायचा ही फार मोठी चिंता असते. असं म्हणतात की, लग्नाची तारीख ठरवायच्या आधी शाळाप्रवेशाची व्यवस्था करून मगच लग्न केलेलं बरं.
प्रमितीच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न मात्र तिचा तिनंच लिलया सोडवला. तिला मराठी माध्यमाच्या नामवंत शाळेत घालायचं म्हणून आम्ही ती एक वर्षांची असतानाच पुणे शहरात, कोथरूडला राहायला गेलो. घराजवळच अभिनव विद्यालय ही नामवंत शाळा होती.
एकदा आम्ही तिघे, प्रमिती, तिची आई व मी एका लग्नाला गेलो होतो. सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र फडके यांच्या मुलीचं सईचं लग्न होतं. लग्न लागल्यानंतर जेवायला थोडा वेळ होता. मंगल कार्यालयाच्या शेजारीच अण्णासाहेब उर्फ चिं.स. लाटकर यांचा बंगला होता. ते आम्हाला त्यांच्या घरी चहाला घेऊन गेले. प्रमिती तेव्हा सव्वा दोन वर्षांची होती. अण्णासाहेब तिला आपल्या मांडीवर घेऊन बसले होते. तिला त्यांनी नाव विचारलं. काय करतेस, कोणत्या शाळेत शिकतेस असंही विचारलं. त्यावर ती म्हणाली, मी अजून लहान असल्यानं शाळेत जात नाहीये. पण जून महिन्यापासून शाळेत जाणार आहे. ते म्हणाले, कोणत्या शाळेत जाणारेस? त्यावर ती पटकन म्हणाली, अभिनव विद्यालय. ते म्हणाले, का बरं तीच शाळा का? तर ती म्हणाली, तुम्हाला माहित नाही? ती पुण्यातली बेस्ट शाळा आहे. माझा मित्र अनिरुद्ध त्याच शाळेत जातो. ती शाळा माझ्या घरापासून जवळ आहे. मी ठरवलंय, त्याच शाळेत जायचं.
अण्णासाहेब खुष झाले. म्हणाले, तुला अभिनवमध्ये प्रवेश दिला. तू माझ्या शाळेची ब्रॅंड अ‍ॅंबॅसिडर होणार. तोवर आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की त्या शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब लाटकर हेच अध्यक्ष होते. आम्ही सारे प्रचंड खुष झालो.
पण तरीही एक गंमत झालीच.
मी अधुनमधून अण्णासाहेबांना फोन करून प्रवेशाची आठवण करायचो. प्रवेशफॉर्मची चौकशी करायचो. ते म्हणायचे तू कशाला चिंता करतोस? मी शब्द दिलाय ना. सगळं नीट होईल.
आणि आम्हाला कळलं की येत्या सोमवारी शाळा सुरू होतेय. प्रवेश प्रक्रिया केव्हाच पुर्ण झालीय. मी अण्णासाहेबांना जाऊन भेटलो. ते म्हणाले, अरे येत्या सोमवारी आमची मराठी माध्यमाची शाळा सुरू होणारे. इंग्रजी माध्यमाला अद्याप अवकाश आहे. तुला इंग्रजी माध्यमात मुलीला घालयचंय ना? मी म्हणालो, नाही. तिला मराठी माध्यमात घालयचंय. ते म्हणाले, अरे बाबा तू मराठी साहित्यिक आहेस ना? सगळे मराठी साहित्यिक मराठीवर भाषणं जरूर ठोकतात पण आपल्या मुलांना न चुकता इंग्रजी माध्यमात घालतात.
आता मराठीचे प्रवेश संपलेत. तू तिला इंग्रजी माध्यमातच घाल.
मी मराठीसाठी अडून बसलो.
अण्णासाहेबांनी खुप प्रयत्न केले पण जागाच शिल्लक नव्हती. माझ्या नातीला प्रवेश हवाय. एक जागा कराच असं त्यांनी मुख्याध्यापिकेला सांगितलं.
मी दररोज सकाळी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. एके दिवशी मुख्याध्यापिकेचा अण्णासाहेबांना फोन आला. एका मुलीच्या पालकांची बदली कलकत्त्याला झाल्यानं ते प्रवेश रद्द करायला आलेत. तुमच्या नातीला पाठवा.
मी 240 च्या स्पीडनं प्रमितीला घेऊन शाळेत पोचलो.
लगेच तिची प्रवेशपरीक्षा घेण्यात आली. त्यांनी विचारलेल्या पहिल्याच प्रश्नावर ती म्हणाली, तुम्हाला थोडक्यात उत्तर हवंय की सविस्तर?
त्या म्हणल्या आधी थोडक्यात सांग नी बरोबर आलं तर मग सविस्तर सांग.
सगळीच धमाल....
आणि प्रमितीला अभिनव मराठी माध्यमामध्ये बालवर्गात प्रवेश मिळाला....

* ती दीड वर्षांची असताना फादर दिब्रिटो आमच्या घरी आले होते. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं आणि तुझं नाव काय? असं विचारलं. तिनं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडं बघू लागली. ते म्हणाले, काय झालं? बाळ, माझं काही चुकलं का?
ती म्हणाली, तुमच्यात दुसर्‍यांना नाव विचारायची पद्धत असते मग स्वत:चं नाव सांगायची पद्धत का नसते? मी एक बघितलंय, मोठी माणसं दरवेळी बाळ तुझं नाव काय हाच प्रश्न का विचारतात? त्यांना बाकीचं काहीच का विचारता येत नाही?
ते चमकले. म्हणाले, माझं नाव दिब्रिटो. यापुढे मी लहान मुलाला पहिला प्रश्न तुझं नाव काय असा कधीही विचारणार नाही.
ती म्हणाली, या नावाचा अर्थ काय?...
असे तिचे प्रश्न संपतच नसत.
* ती लहान असताना निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गोविंद नामदेव, सुषमा देशपांडे, सदाशिव अमरापूरकर, डॉ. जब्बार पटेल, अतुल पेठे असे अनेक ख्यातनाम अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आमच्या घरी येत असत. आम्ही त्यांच्या घरी जात असू. यातनंच बहुधा अभिनेत्री व्हायचं बीज तिच्यात रूजलं असावं.
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राच्या प्रवेश परीक्षेत आणि पदवी परीक्षेत ती पहिली आली.
ललित कलाच्या विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकरमॅडम मला नेहमी म्हणायच्या, "सर, तुमची मुलगी उद्याची स्मिता पाटील आहे बघा."
"तू माझा सांगाती" ही मालिका तिच्या व्यक्तीगत प्रयत्नांनी तिनं मिळवली. अल्पावधीत अनेक जाणकारांची पसंती तिच्या अभिनयाला मिळाली.
* मी सार्वजनिक जीवनात गेली 35-40 वर्षे कार्यरत आहे. सतत दौरे करूनही वेळेअभावी अनेकांची निमंत्रणं मला स्विकारता येत नाहीत. एक कार्यकर्ता सलग तीनचार वर्षे फोन करायचा. पत्र लिहायचा. पण मला त्याच्या कार्यक्रमाला जाणं जमलं नव्हतं. यावर्षी त्याचा फोन आला तेव्हा मी संकोचून त्याला म्हटलं, काळजी करू नको, यावर्षी मी तुला नक्की वेळ देतो. सांग कुठली तारीख हवी?
त्यावर तो म्हणाला, त्याचं कायय नरकेसर, यावर्षी तुमची तारीख नकोय. तुमच्या मार्फत आम्हाला प्रमितीताईंची तारीख हवीय. तुम्ही तेव्हढं जमवून द्याच.
* जवळचे मित्र मला गंमतीनं म्हणतात, आता यापुढे प्रमितीचे बाबा म्हणून तुला तुझी ओळख सांगावी लागेल. तयारी ठेव बाबा. त्यांना काय माहित अशा गुणी आणि बुद्धीमान पण चोखंदळ मुलीचा बाप असणं किती भाग्याचं असतं ते!
- प्रा. हरी नरके

Thursday, August 13, 2015

आवर्जून वाचावीत अशी पुस्तकं -- प्रमिती नरके





http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=2047&boxid=160517472&ed_date=2015-8-13&ed_code=820009&ed_page=1
मी मराठी, लाईव्ह, गुरुवार, दि.१३ आगष्ट, २०१५, पृ. १
बुकमार्क
आवर्जून वाचावीत अशी पुस्तकं -- प्रमिती नरके
[ कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित होणार्‍या "तू माझा सांगाती " या मालिकेतील आवलीची भुमिका करणारी अभिनेत्री.]

माझे बाबा प्रा. हरी नरके हे लेखक आणि संशोधक असल्याने आमच्या घरी सुमारे २० हजार पुस्तकं आहेत. त्यात सतत भर पडत असते. मी त्यातली निवडक पुस्तकं वेळ काढून वाचते. माझ्या अभिरुचीनुसार मी अनेक प्रकारच्या साहित्याचं नेहमी वाचन करते. त्यात कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक लेखन, नाटक अशा अनेक साहित्य प्रकारांचा समावेश असतो.

अलीकडील काळात मी वाचलेली, लक्षात राहिलेली आणि इतरांनीही आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांमध्ये मी पहिलं नाव अभिराम भडकमकर यांच्या अॅट एनी कॉस्ट या पुस्तकाचं घेईन. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.अभिराम भडकमकर हे नाट्य-चित्रपट आणि वाहिन्यांच्या विश्वातील एक महत्त्वाचं नाव. त्यांनी लिहिलेल्या अॅट एनी कॉस्ट या कादंबरीत विविध वाहिन्यांवर सादर केल्या जाणाऱ्या मालिका, रिअॅलिटी शोज, त्यातले ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, त्यातलं प्रचंड अर्थकारण, यात सहभागी असलेले विविध मानवी स्वभाव यांचं रंगतदार चित्रण केलं आहे. या विश्वात वावरताना जे-जे जाणवलं, त्याचं प्रांजळ चित्रण आणि चिंतन करणाऱ्या या कादंबरीची चार महिन्यांत पहिली आवृत्ती संपली आहे. एका वाहिनीवरील हेड एक महिला आहे. विकास सरदेशमुख हा निर्माता एका खेड्यातील ब्रेन ट्युमरने मरत असलेल्या धनंजय चांदणे या कलाकाराच्या जगण्यावर आणि मरणावर रिअॅलिटी शो सादर करतो. त्या वेळी धनंजयची आई, बहीण, मालिकेत काम करणाऱ्या इतर महिला कलाकार या साऱ्यांच्या वर्तनातले बदल टिपत त्यावर प्रकाशझोत टाकणारी ही कादंबरी आहे. हा शो बघणाऱ्या देशभरातल्या प्रेक्षकांवरही कादंबरी भाष्य करते. सध्याचा ताजा आणि महत्त्वाचा विषय भडकमकरांनी उत्तम प्रकारे मांडला आहे.

स्पर्श मानव्याचा हे विजया लवाटे यांचं पद्मगंधा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक वाचकाला चटका लावणारं आहे. हे पुस्तक म्हणजे विजयाताईंचं आत्मकथन आहे. मृणालिनी ढवळे यांनी त्याचं शब्दांकन केलं आहे. विजयाताई पुण्यातील वेश्या आणि एच.आय.व्ही. (एड्स) झालेल्या त्यांच्या लहान मुलांसाठी काम करायच्या. पुण्यातील एक मध्यमवर्गीय बाई सामाजिक बांधिलकीतून किती मोठं काम उभं करू शकते, याचा थक्क करून सोडणारा आलेख या पुस्तकात मांडलेला आहे. आजवर शेकडो एड्सबाधित मुला-मुलींच्या आयुष्यात गोकुळ फुलवणाऱ्या विजयाताई आणि त्यांचे सहकारी यांची ही कहाणी चटका लावणारी आहे. नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध हे मुक्ता मनोहर यांचं पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी बलात्काराच्या प्रश्नावर सखोल अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक आहे. आयटीमध्ये काम करणारी नयना पुजारी, राजस्थानची भंवरीदेवी अशा अनेक बलात्कारित स्त्रियांच्या यात मांडलेल्या कथा मन सुन्न करणाऱ्या आहेत. अनेक स्त्रियांवर झालेले बलात्कार, त्यामागची पुरुषसत्ताक मानसिकता, जातीय दंगली, लढाया, शस्त्रस्पर्धा, सामुदायिक बलात्कार यांची भीषण कहाणी या पुस्तकात रेखाटलेली आहे. वेताळ पंचविशी प्रमाणेच बलात्काराच्या वेताळाबरोबर लेखिकेने मारलेल्या गप्पांतून देश-विदेशातील स्त्रीवास्तव समोर येतं. दिल्लीच्या निर्भया केसच्या निमित्ताने देशभरातील तरुणांमध्ये खूप जागृती झाली. त्याबद्दलचं भान देणारं हे पुस्तक आहे.

रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स हे  डॉ. सदानंद बोरसे यांनी केलेलं मराठी अनुवादित पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक म्हणजे अनुभवकथन आहे. एक अवाढव्य बहुराष्ट्रीय औषध कंपनी रोश ही जेव्हा अनैतिक मार्गाने, गैरप्रकार करून अमाप नफा मिळवू लागते, तेव्हा कंपनीतील एक सज्जन अधिकारी स्टॅनले अॅडॅम्स त्याविरुद्ध सरकारी आयोगाला माहिती कळवतो. त्यावर कंपनी चिडते आणि सुरू होतो एक जीवघेणा संघर्ष. कंपनी चक्क सरकार आणि पोलिस यांचं बळ वापरून अॅडॅम्सचा अपार छळ करते. त्याला तुरुंगात टाकते. त्या धक्क्याने त्याची पापभिरू बायको आत्महत्या करते. त्याच्या तीन कोवळ्या मुलींची जी ससेहोलपट होते, ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. सत्यासाठी किंमत मोजणारा अॅडॅम्स, त्याची कोवळी लेकरं आणि त्याची पत्नी यांची ही कथा खूप वेदना देणारी आहे. डॉ. सदानंद बोरसे यांनी या पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद अतिशय दर्जेदार आहे. या विषयावरील चित्रपटही खूप गाजला होता. ही लढाई अद्यापही चालूच आहे.

तसंच सुप्रिया दीक्षित यांचं मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं अमलताश हे आत्मकथन आणि प्रसिद्ध लेखक प्रकाश नारायण संत यांचं वनवास ही पुस्तकंही मला खूप आवडतात. सुप्रिया या प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या सुनबाई. हे अतिशय संयत, संवेदनशील आणि मध्यमवर्गीय स्त्रीची कुतरओढ, तिचा संघर्ष यांचं नेमकं वर्णन करणारं आत्मकथन आहे. लेखकाची लेखन निर्मितीप्रक्रिया, त्या कुटुंबातले स्नेहबंध, प्रतिभावंत प्रकाश संत यांच्याबद्दलचे उत्कट, हळुवार चित्रण यात वाचायला मिळतं. तक्रार नाही; पण घुसमट आहे असं नोंदवणारं हे चांगलं आत्मकथन आहे.

मलाला या बाबा भांड यांनी लिहिलेल्या साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात नोबेल पुरस्कार विजेत्या धाडशी मलालाचं छान चरित्र आहे. बाबा भांड यांनी पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने अतिरेक्यांशी दिलेला लढा अतिशय प्रेरणादायी पद्धतीने या पुस्तकात मांडला आहे.

 श्रुती आवटेचं लॉगआऊट हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. वयाच्या १६ व्या वर्षी कादंबरीकार झालेल्या श्रुती आवटेची ही अतिशय प्रसन्न, जिवंत, उत्कट आणि आजच्या युवकांचं अनुभवविश्व चितारणारी मस्त कादंबरी आहे. वयात येणं, कोवळं प्रेम, आजूबाजूचं जग यांचं या पुस्तकात केलेलं चित्रण अवाक करणारं आहे. पौगंडावस्थेतील जान्हवीचे विचार, हळवं आणि संवेदनशील जगणं वाचताना एक सुंदर कादंबरी वाचल्याचा आनंद मिळतो.
................................

Wednesday, December 3, 2014

संधी चालून येते तेव्हा..

http://epaper.eprahaar.in/#
प्रहार,मुंबई, दि. २९ नोव्हेंबर, २०१४ शनिवार पृ.२
http://prahaar.in/relax/269517
November 29, 2014 03:45:17 AM | Author प्रतीक्षा चौकेकर


टीव्ही इण्डस्ट्रीत आपल्याला काम मिळावं, दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी आपल्यालाही नशीबी यावी असं स्वप्न या इंडस्ट्रीत येणा-या प्रत्येक नवोदित कलाकाराचं असतं. त्यांना ही संधी मिळते तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पुण्यातून मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या प्रमीतीला जेव्हा ही संधी मिळते तेव्हा तिचं आयुष्य कसं बदलल याची ही गोष्ट..

pramiti Narake   अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक कलाकार शोधात असतो तो एका मोठय़ा ब्रेकच्या. काम मिळावं म्हणून हवी तेवढी मेहनत घ्यायला ते तयार होतात आणि जेव्हा अशी मोठी संधी चालून येते तेव्हा त्यांना काय वाटतं ही जाणून घ्यायची उत्सुकता मला होती, त्यातून प्रमीतीचा चेहरा समोर आला. ‘तू माझा सांगाती’ संत तुकाराम आणि आवलीची संसारगाथा या नावानं संत तुकाराम महाराजांच्या संसाराची कथा ई-टीव्हीवर सुरू झाली. संत तुकाराम यांचं नुसतं वारकरी संप्रदायाशीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राशी एक वेगळंच नातं जोडलं आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.

या मालिकेत आवलीची म्हणजे तुकाराम महाराजांच्या दुस-या पत्नीची भूमिका साकारलीय ती पुण्याच्या प्रमीती नारके हिनं. लहानपणापासून सगळ्याच गोष्टीत पुढे असणा-या प्रमीतीनं आपल्याला मोठं झाल्यावर अभिनेत्री व्हायचं हे पक्क ठरवलं होतं. ती म्हणते ‘लहानपणापासून मला अभिनेत्री बनायचं होतं. कॅमेरासमोर काम करायचं होतं. या क्षेत्रात आल्यावर काम मिळेल की नाही याची खात्री नसते, आणि काम मिळालं तरी याच क्षेत्रात चांगलं करिअर बनेल की नाही याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे माझे बाबा मला सांगायाचे तू यापेक्षा काहीतरी दुसरं करं. पण मला याच क्षेत्रात यायचं होतं त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर ललीत कला केंद्रातून अभिनयाचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली.’

दर महिन्याला नवं नाटक बसवं, मोठ मोठय़ा दिग्गजांकडून अभिनयाचे धडे गिरव असं करत करत तीन वर्ष तिची ललीतमध्ये निघून गेली, पण शिक्षण संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न तिच्यासमोर होताच यासाठी लवकरात लवकर कामही मिळवायचं होतं म्हणून कमाच्या शोधात पुण्याहून तिनं मोर्चा थेट मुंबईकडे वळवला. मुंबईत आल्यानंतर इतर नवोदितांसारखी पहिली कोणती गोष्ट करायची तर काम शोधायचं हे तिन मनाशी पक्क केलं. ती म्हणते ‘मला काम मिळवायचं होतं, मुंबईत आल्यानंतर मी लगेचच काम शोधायला सुरू केलं. कामाच्या शोधात दिवसातून किमान चार ऑडीशन माझ्या असायच्याच. महिनाभर कामाच्या शोधात मी फार वणवण केलीय. एका महिन्यात मी इतक्या ऑडीशन दिल्यात की त्यांची संख्याही मला आठवत नसेल. एके दिवशी आवलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू आहेत असं कळलं आणि तिथे गेल्यावर या भूमिकेसाठी किमान पाचशेच्यावर ऑडीशन झाल्याचं कळलं. आता आपल्याला काही काम मिळणार नाही असं मला वाटलं पण शेवटी हो नाही करत आवलीच्या भूमिकेसाठी मला घेण्यात आलं.’

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर ही मालिका असल्यानं मालिकेतील कलाकारांचा गोतावळा खूपच मोठा आहे. यात अनेक अनुभवी कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची मोठी संधी प्रमीतीकडे आली तेव्हा तिला काय वाटत होतं हे सांगता ती म्हणते ‘माझ्या जोडीला सहकलाकार म्हणून चिन्मय मांडलेकर होता. तो इतका आभ्यासू आहे की त्याच्या सोबत काम करायचं म्हणजे थोडं दडपण होतं, कॅमेरासमोर याआधी मी शॉर्ट फिल्म केल्या होत्या त्यामुळे कॅमेराची भिती नव्हती. पण आपण नवोदित कलाकार त्यामुळे कॅमेरासमोर अभिनय करताना चुकलो तर आपल्यामुळे इतर कलाकारांनाही थांबावं लागणार. त्यांनाही तोच सिन पुन्हा पुन्हा करावा लागणार अशी भिती मला होतं. पण या सगळ्याच कलाकारांनी खूपच सांभाळून घेतलं त्यामुळे काम करताना आणखी मज्जा आली. ’

कलाकारांसोबत काम करताना प्रमीतीनं चिन्मय मांडलेकरचीही खूप स्तुती केली आपल्याला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तीही पहिल्याच झटक्यात यासाठी ती स्वत:ला खूपच भाग्यशाली मानते ‘ती म्हणते चिन्मयकडून खूपच शिकण्यासारखं आहे आणि कामाची सुरूवात त्याच्यासोबत करायला मिळणं हे भाग्याच आहे, त्याचं वाचनही इतक अफाट आहे. आमच्यापेक्षा तोच जास्त काम करतो, तरी तो त्या कामातून स्वत:साठी वेळ काढतो. खूप वाचन करतो. दर चार दिवसांनी त्याच्या हातातलं पुस्तक बदलतं आणि आपण मात्र काहीच करत नाही, त्यामुळे थोडी स्वत:ची चिड येते पण नेहमी काही वेगळ शिकायला मिळतं याचा आनंद वाटतो.’

आवलीची भूमिका करताना प्रमीतीला काय अनुभव आले असं विचारल्यावर ती म्हणते ‘मला आवली यांच्याविषयी माहिती आधीपासून वाचण्यात आलं होतं, तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर जी काही पुस्तक लिहली होती त्या पुस्तकातून जी आवली समोर आली ती एक फटकळ, चिडीचिडी, रागीट अशा काहीशा स्वभावाची होती. पण हे पात्र जेव्हा मी स्वत: करायला घेतलं तेव्हा आवलीविषयी जे काही पूर्वग्रह माझे किंवा इतर लोकांचेही असतील ते एका फटक्यात दूर झाले. तिच्या वागण्याची खरी कारणं काय होती ही त्यानिमित्तानं मला कळली आणि ती लोकांनाही कळतील.’

आवलीची भूमिका साकारताना प्रेक्षकांकडून आलेला एक गंमतीदार किस्साही तिनं सांगितला ती म्हणते ‘टीव्हीवर मी नववारी साडीत आणि पारंपारिक दागिने अशा प्रकारची माझी वेशभूषा दाखवण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षकांना मला तसंच बघायची सवय झालीय जेव्हा मी बाहेर फिरायला जाते तेव्हा काहीजण पटकन बोलतात तुम्ही आवली आहात मग नववारी साडीत फिरलं पाहिजे. पण त्यांना कळत नाही मी आवलीची भूमिका फक्त पडद्यावर साकारते ते काम संपल्यानंतर माझं वेगळं आयुष्य सुरू होतं.’

प्रमीतीचा या इण्डस्ट्रीतला प्रवास या मालिकेपासून सुरू झालाय, अर्थात या भूमिकेनंतर तिचे काही वेगळ्या योजना असतील पण पुढे व्यवसायिक नाटक आणि सिनेमा तिला करायचा आहे.
.................................

Monday, October 13, 2014

प्रमिती आवलीच्या भुमिकेत

आज सोमवार दि.१३ आक्टोबरपासून, सायंकाळी ७.३० वाजता, ई टिव्ही मराठीवर,
प्रमिती आवलीच्या भुमिकेत


                                           {महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, दि.१३ आक्टो.२०१४}


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवली उर्फ जिजाबाई यांची संसारगाथा  "तू माझा सांगाती " सध्या ई टिव्ही मराठीवर दररोज सायं. ७.३० वा.सादर  केली जात आहे.. या अतिशय लोकप्रिय असलेल्या  मालिकेत चिन्मय मांडलेकर या गुणी अभिनेत्याने संत तुकाराम साकार केले असून छोट्या आवलीची भुमिका मृण्मयी सुपाळने केली होती. माझी मुलगी प्रमिती हिची यातल्या मोठ्या आवलीच्या भुमिकेसाठी निवड झाली आहे. तिची छोट्या पडद्यावरची ही पहिलीच भुमिका आहे. पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रामधून  {नाटयशास्त्र} अभिनयाची पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केल्यानंतर प्रमिती आज तिच्या करियरला सुरूवात करीत आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद यांची आवश्यकता आहे.

मालिका दिग्दर्शक आणि निर्माता -- संगीत कुलकर्णी.
संशोधन : उन्मेश अमृते
कथा -- ज्योती सागर.
पटकथा - शिरीष लाटकर.
संवाद : दिग्पाल लांजेकर
संगितकार -- अशोक पत्की.
कला दिग्दर्शक  -- अजित दांडेकर.
क्यामेरा - हर्षल शिपोस्कर
का. निर्माता : सिद्धार्थ नाचणे

आज सायं. ७.३० वा. प्रमितीचा सहभाग असलेला पहिला भाग  दाखवला जाईल.

पुनरप्रक्षेपण : रात्री १०.३०वा., सकाळी ७ वा., सकाळी ९ वा., दुपारी ३.३०वा., आणि सायं.५.३० वाजता
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..
........................................

{कात्रण: महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, दि.१३ आक्टो.२०१४}