मी नाशिककर यांची प्रतिक्रिया अवश्य वाचा : विचार करा
फेसबुकवर(आणि एकूणच सोशलमीडियावर)
विविध मनोरंजक विषयांवर किंवा धार्मिक-सण
उत्सवावर सगळेच आनंदाने व्यक्त होत असतात.
पण स्वतःच्या सामाजिक प्रश्नांवर केवळ ब्राम्हण,बौद्ध, मराठा हे समाजच आत्मविश्वासाने व्यक्त होत असतात.
त्यांच्या प्रश्नांबद्दल हिरीरीने बाजू मांडत असतात.आणि त्यांच्या हितशत्रूंचा सडेतोड विरोध पण करत असतात.
मात्र सर्वात जास्त लोकसंख्या असलेला OBCसमाज त्यांच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक प्रश्नांवर एकदम मुक्या-बहिऱ्याप्रमाणे वागत असतो.हे चुकीचे आहे.
(सामाजिक आत्मविश्वासाचा अभाव किंवा
धार्मिक शुद्रत्वाचा न्यूनगंड ह्या पैकी कारण
असू शकते काय...??)
ह्या विराट OBCसमूहाला कायमच त्यांच्यासाठी
कोणीतरी बोलणारा, लढणारा, भांडणारा लागत असतो.
('तुम लढो, हम कपडे सम्हालते है'अशी
वृत्ती बळावलीय..!!)
OBCबांधवांनी ही किल्मिशे झुगारून,स्वतःच्या न्यायहक्कांसाठी समोरच्या जबबदार यंत्रणांना
जाब विचारायला शिकले पाहिजे..!!
👍👍👍
#OBCReservation