Showing posts with label भिमा कोरेगाव. Show all posts
Showing posts with label भिमा कोरेगाव. Show all posts

Friday, January 1, 2021

#सावित्रीउत्सव भिमा कोरेगाव आणि भिडेवाडा - प्रा. हरी नरके

भिमा कोरेगाव आणि भिडेवाडा ही दोन्ही सामाजिक बंडखोरी, व्यवस्था परिवर्तन आणि सामाजिक उलथापालथ यांची प्रतिकं आहेत. देशातल्या पोलादी सनातनी व्यवस्थेला सुरूंग लावणार्‍या ह्या दोन्ही मुलुखमैदान तोफा. भिमा कोरेगाव आता सामाजिक अस्मितेचं प्रतिक बनल्यानं १ जानेवारीला लाखोंना तिथं जाऊन अभिवादन करावसं वाटतं, पण त्याहीपेक्षा खोलवरचं, चौफेर आणि मुलगामी परिवर्तन घडवणार्‍या भिडेवाड्याकडे मात्र आमचं तेव्हढं लक्ष जात नाही. पेशवाई हा प्रस्थापित व्यवस्थेचा किल्ला होता. तिला समग्रपणे मातीत घालण्याचं काम या दोघांनीही केलं असलं तरी जास्त परिणामकारकता नेमकी कशात होती? भिडेवाड्यात की भिमा कोरेगावात? प्रस्थापित फार चतुर असतं. ते कलागती लावून देतं. दिखाऊ किंवा कमी परिणामकारकतेत आम्हाला गुंतवून ठेवतं असं तुम्हाला वाटत नाही? भिमा कोरेगावची लढाई केवळ नागवंशी विरूद्ध पेशवे अशी होती की बारा बलुतेदार, अलुतेदार, कारू, नारू, बहुजन, वंचित, अल्पसंख्यक विरूद्ध प्रस्थापित व्यवस्था अशी होती? तरिही त्यात स्त्रिया नव्हत्या. पण भिडेवाड्यात लिंगभावपिडीत, जातपिडीत, वर्गपिडीत असे सारे सारे होते, ज्ञाननिर्मितीनं केलेलं काम प्रस्थापितांचं कंबरडं मोडणारं होतं. आम्हाला आमचा फोकस शिफ्ट करावा लागेल काय? विचार करा. (लंडनचे मित्रवर्य प्रताप तांबे Pratap Tambay यांच्या कमेंटवरून )  

-प्रा. हरी नरके