Showing posts with label बुद्ध आणि बोधिसत्व. Show all posts
Showing posts with label बुद्ध आणि बोधिसत्व. Show all posts

Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

Sunday, July 5, 2020

अमेरिका, दिल्ली, मुंबईहून आंबेडकरी विचारवंत, स्कॉलर्स, अधिकारी, नेते लिहितात-








सर , जयभीम !

आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.


आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते.  रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.


शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !

भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.

एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.

शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !

आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले,

१- शुद्धोदन आहेर.

२- संजय गायधनी.

३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)

४ - अशोक अंकुश.

५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.

६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.

७- संदीप हिरे.

८- दिपक गांगुर्डे.


Thursday, July 2, 2020

प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी, उभारला भव्य बुद्धविहार









हिंगोलीच्या पिंपळदरीत उभारला भव्य बुद्धविहार, प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी

मराठवाड्यातील हिंगोलीच्या बर्‍याच गावांना विद्यापीठाच्या नामांतरविरोधी दंगलीची झळ बसलेली होती. त्यातून सावरण्यासाठी कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी संघटना उभारण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.


यावेळी २००३ साली सर्व तरूणांना प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान ऎकवण्यात आले. त्यांच्या व्याख्यानाने तरूण इतके भारावुन गेले की विहारासाठी उत्स्फुर्तपणे वर्गणी जमू लागली. तरूणांनी केलेल्या श्रमदानातून व स्वत:च्या वर्गणीतून अतिशय भव्य बुद्धविहार उभा राहिला. असा बुद्धविहार की ज्याची किर्ती जगातल्या १६ देशात पोचलेली आहे.

या उपक्रमाला सर्व स्थानिक नागरिक व जयाजीराव पाईकराव, साहेबराव कांबळे, न्या.एम.एल.भगत व इतरांचा हातभार लागला. गावातील गरिब महिला शांताबाई महादू खिल्लारे यांनी आपले मंगळसुत्र विकुन विहाराच्या बांधकामाला देणगी दिली.

Friday, May 15, 2020

तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा

"महात्मा जोतीराव फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला. पुष्कळ मराठे त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झालेली आहे. जोतीरावांचे नाव आज कोणीच घेत नाही. आम्ही घेतो. घेणारच. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत.

शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. "

"तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा." शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे. आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. शिक्षणाबरोबर माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.

" कबीर कहे कुछ उद्द्यम किजे, आप खाये और औरनको दिजे," या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. आपण खा, दुसर्‍यांनाही द्या. स्वत:चे घर प्रथम सांभाळा, मात्र समाज कार्यालाही मदत करा. ज्ञान हे काही केवळ रोजगाराचे साधन होऊ शकत नाही. ज्ञान जीवनाच्या समग्र उन्नतीचे हत्त्यार आहे.

नाशिक सत्याग्रहाचा अनुभव तुम्हाला सांगतो. प्रथम माझ्यासोबत भाऊराव गायकवाड व अवघे पाचसहाजणच होते. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळपर्यंत एकही गडी सत्याग्रहाला आला नाही. सकाळी आम्ही पाच-सहा जणांनी मिरवणूक काढली. आमच्यावर दगडफेक झाली. नंतर आम्हाला १५ ते २० सत्याग्रही मिळाले. नंतर लोक वाढत गेले. इतके वाढले की आम्ही पाच वर्षे सत्याग्रह करू शकलो....

लहाणपणी मला माझी आई सांगायची मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. मी पोस्टमनला मामा म्हणायचो. [ हशा आणि टाळ्या ] ...

प्रत्येकाने आपल्या घरात बुद्धाचा फोटो लावला पाहिजे. बुद्ध मार्गदाता आहे."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३ जून १९५३, मुंबई, रावळी कॅंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १८/३, पृ. ३५७/५८

Thursday, May 7, 2020

गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके








गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके

१* १९०८ जाने. - भीमरावांचा मॅट्रीक परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार झाला. त्यावेळी कृ. अ. केळुसकर [ कुणबी ] लिखित बुद्ध चरित्र भीमरावांना भेट मिळाले.
हे पुस्तक वाचून आपण बुद्धाकडे वळलो. प्रेरित आणि प्रभावित झालो असे बाबासाहेब " बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या प्रस्तावनेत म्हणतात. " I read this book with great interest and was greatly impressed and mooved by it.
२* २७ मे १९२४ बार्शी- नामांतर की धर्मांतर या विषयावर बाबासाहेबांचे भाषण.
३* १३ सप्टें. १९३३- बाबासाहेब लंडनवरून सुभेदार विश्राम गंगाराम सुभेदार यांना पत्र लिहितात. त्यात ते म्हणतात, " माझा कल बुद्धधर्माकडे आहे."
४* १९३४, दादर, मुंबई, बाबासाहेबांनी बांधलेल्या बंगल्याला राजगृह हे बौद्ध नाव दिले.
५* १३ ऑक्टोबर १९३५ - येवला परिषद. बाबासाहेबांची घोषणा, " मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही."


६* १२/१३ जाने. १९३६- पुणे, अहिल्याश्रम- धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
७* ३०, ३१ मे व १जून जाने. १९३६- मुंबई, दादर, धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
८* २४ सप्टें. १९४४ - मद्रास येथे रॅशनॅलिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या सभेत ब्रिटीश सरकारमधील केंद्रीय मंत्री म्हणून बोलताना ते म्हणाले, "बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म " यात बुद्धीवादी बौद्ध धर्मच श्रेष्ठ आहे."
९* ८ जुलै १९४५, मुंबई, पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिला " प्रज्ञा, शील, करूणा " हे ब्रिदवाक्य दिले.

१०* २० जून १९४६-  सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून बुद्ध भवन व आनंदभवन अशी सभागृहाची नामकरणे केली.
११* २ मे १९५०- दिल्लीतील बुद्ध जयंती समारंभामध्ये बाबासाहेबांचे भाषण, " बुद्धधर्म हा नीतिधर्म आहे."
१२* ५ मे १९५० मुंबई, जनता पत्राला मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले, "आपण बौद्ध धर्म स्विकारणार आहोत."

१३* २६ मे १९५० - कॅण्डी, येथे पत्रकार परिषदेत आपण बौद्ध समारंभ व विधींचा अभ्यास करण्यासाठी येथे आल्याचा उल्लेख केला. जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बाबासाहेबांचे भाषण.
१४* मे १९५०- महाबोधी सोसायटीच्या बुद्ध जयंती विशेषांकात बाबासाहेबांनी लेख लिहून बुद्ध धम्माचे भवितव्य उज्वल असल्याचे नमूद केले.
१५* ६ जून १९५०, कोलंबो, श्रीलंका, जागतिक प्रतिनिधींसमोर बाबासाहेबांचे " भारतातील बुद्ध धम्माचा उदय आणि र्‍हास" यावर भाषण

१६* जुलै १९५१, बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध संघाची स्थापना केली. " बौद्ध उपासना पाठ" ही पुस्तिका प्रकाशित केली.
१७* नोव्हेंबर १९५१, "बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या लेखनाला प्रारंभ केला. फेब्रुवारी १९५६ ला पुर्ण करून त्याच्या ८० प्रती विद्वानांना अभिप्रायार्थ पाठवल्या.

१८* १६ मे १९५४, बाबासाहेब रंगून, ब्रह्मदेशातील बुद्ध जयंती समारंभाला उपस्थित.
१९* २८ ऑक्टोबर १९५४ - मुंबई पुरंदरे स्टेडीयम, जाहीर सभेत बाबासाहेब म्हणाले, "बुद्ध, कबीर व महात्मा फुले हे आपले तीन गुरू आहेत."

२०* १९५४, बाबासाहेबांनी "दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीया" ची स्थापना केली. ४ मे १९५५ ला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

२१* २५ डिसेंबर १९५४, देहूरोड, बुद्ध मुर्तीची बाबासाहेबांच्या हस्ते विहारात स्थापना.
२२* १९५५, जनता पेपरचे " प्रबुद्ध भारत" असे नामकरण केले.

२३* १४ ऑक्टोबर १९५६, नागपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला. लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
२४* २० नोव्हेंबर १९५६, नेपाळ, काठमांडूला बाबासाहेबांचे जागतिक बौध्द परिषदेत भाषण.
२५* २५ नोव्हेंबर १९५६, सारनाथ, जिथे भगवान बुद्धांनी धम्म चक्र परिवर्तन सुत्त कथन केले तिथे बसून बाबासाहेबांचे आयुष्यातील शेवटचे भाषण, "चलो बुद्ध की ओर" ची जगाला हाक दिली.

-प्रा. हरी नरके, बौद्ध पौर्णिमा, ०७/०५/२०२०
.................................................

Thursday, October 18, 2018

बुद्ध आणि बोधिसत्व




जाने. १९०८ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रीक परिक्षेतील यशाबद्दल सत्कारात सत्यशोधक कृ. अ. केळूसकर लिखित बुद्धचरित्र भेट देण्यात आले.
त्या पुस्तकाच्या वाचनाने आपण प्रभावित झालो, प्रेरित झालो आणि बुद्धाकडे वळलो असे ते बुद्ध आणि त्यांचा धम्म च्या प्रस्तावनेत म्हणतात.
१९२४ - त्यांनी बार्शीच्या भाषणात सर्वप्रथम धर्मांतराचा उल्लेख केला.
१९३३ -  सुभेदार सवादकर ह्या आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात आपली निवड बुद्धधर्म असल्याचे ते स्पष्ट करतात.
१३ आक्टो. १९३५ - येवल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा करतात.
अशोक विजयादशमीला [१४ आक्टो. १९५६] ते धर्मांतर करतात. ५ डिसें. १९५६ - बुद्ध आणि त्यांचा धम्म या शेवटच्या ग्रंथाचे लेखन पुर्ण.
४९ वर्षांचा बुद्ध आणि बोधिसत्वांचा सहवास. एकत्र प्रवास.
- प्रा. हरी नरके