Showing posts with label विशाखापट्टनम. Show all posts
Showing posts with label विशाखापट्टनम. Show all posts

Sunday, November 1, 2020

आंबेडकरी चळवळीचे समर्पित सेनानी काशी कृष्णा, दुबई/विशाखापट्टनम यांचे निधन- प्रा. हरी नरके














आंबेडकरी चळवळीची दक्षिण भारत आणि सौदी अरेबियातली धगधगती मशाल, कृतीशील लढवय्या, समर्पित सेनानी, मित्रवर्य कृष्णा यांचे आज सकाळी आजारपणाने निधन झाले. आठवड्यापुर्वीच त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते अविवाहीत होते. कृष्णा यांचे वय ६२ वर्षे होते. ते विशाखापट्टनचे रहिवासी होते. गेली ३० वर्षे त्यांनी दुबई व आबुधाबी येथे उच्चपदावर काम करीत असताना आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे काम घराघरापर्यंत पोचवले. १६वर्षांपुर्वी त्यांनी आंबेडकर जयंतीच्या भव्य कार्यक्रमाला मला दुबईला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाला १५०० भारतीय उपस्थित होते. त्यानंतर डिसेंबर २००९ ला त्यांनी हैद्राबादला जागतिक आंबेडकर विचार परिषदेचे भव्य आयोजन केले होते. मूकनायक या बाबासाहेबांच्या पेपरच्या शताब्द्धीच्या निमित्ताने नऊ महिन्यांपुर्वी त्यांनी विशाखापट्टनला जागतिक पातळीवरील मूकनायक शताब्धीमहोत्सव आयोजित केला होता.


तरूणवयात कृष्णा मुंबईत नोकरी करीत असताना दलित पॅंथरच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आले व ते पॅंथरचे क्रियाशील सदस्य बनले. पुढे नोकरीनिमित्त ते दुबईला गेले. तिथे त्यांनी चळवळीचे काम अतिशय तळमळीने, मेहनतीने आणि वाहून घेऊन केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते चळवळीच्या भवितव्याबद्दल झटत आणि बोलत असत. 


मी चळवळीत अनेक लोकांना जवळून पाहिले परंतु असा नि:स्वार्थ आणि ध्येयवादी नेता, कार्यकर्ता बघितला नाही. त्यांच्या बहिणीचे सासरे हे बाबासाहेबांसोबत काम करीत असत. ते आंध्रप्रदेशातील शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रमुख नेते होते. ते अनेक टर्म बाबासाहेबांच्या विविध पक्षांचे आमदारही होते.


कृष्णा यांचे निधन हे माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे. एक सुहृद, ज्येष्ठ बंधू आणि काळीजतळातला स्नेही गमावल्याचा हा शोक असीम आहे.

कृष्णा, तुझे मिशन आम्ही चालू ठेऊ.

कृष्णाला शेवटचा मानाचा, कृतज्ञ जयभीम.

-प्रा. हरी नरके,

०१/११/२०२०

Thursday, February 13, 2020

२३०० वर्षे प्राचीन अतिभव्य बौद्ध विद्यापीठ - थोटलाकोंडा, विसाखापट्टनम - प्रा.हरी नरके














२३०० वर्षे प्राचीन अतिभव्य बौद्ध विद्यापीठ  - थोटलाकोंडा, विसाखापट्टनम - प्रा.हरी नरके

देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. थोटलाकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे [लेणी] सापडली आहेत. त्यात एकावेळी किमान १००० बौद्ध भिक्खू प्रशिक्षण घेत असत. यावरून आंध्रप्रदेशातील बौद्ध धर्माचे प्राबल्य आणि सार्थकता पुरेशी स्पष्ट होते.

थोटलाकोंडा टेकडीवरील भव्य सभागृह, विविध स्तूप, चैत्यगृहं आणि अतिभव्य बुद्ध विहार असलेले हे २३०० वर्ष जुने केंद्र भव्य आणि विशालकाय आहे. इथे शिकण्यासाठी श्रीलंका, चीन, ब्रह्मदेश [म्यानमार] आणि इतर अनेक देशांमधून बौद्ध भिक्षू येत असत. हे निवासी केंद्र असून एकावेळी किमान दीडशे भिक्खुंची स्वतंत्र निवासव्यवस्था इथे आहे.

समोर स्वच्छ, सुंदर, निळाभोर समुद्र पसरलेला आहे. त्याच्या लाटा आणि त्यातून येणारी गाज प्रसन्नतेची ग्वाही देत असते.

विसाखापट्टनम हे जहाजांसाठी सर्वाधिक सुरक्षित आणि मोक्याचे बंदर असल्याने जगभरातून इथे व्यापार चाले. याठिकाणी झालेल्या उत्खननात अनेक देशांची प्राचीन नाणी सापडलेली आहेत. उत्खननात सापडलेली सातवाहन काळातील शिसे आणि रोमन देशांची चांदीची असंख्य नाणी हेच सिद्ध करतात.

भारतीय नौदलाच्या हवाई सर्वेक्षणाच्या वेळी थोटलाकोंडा लेणी आढळली. हा शोध लागल्यानंतर आंध्रप्रदेश राज्य पुरातत्व खात्याने 1988 ते 1993 दरम्यान याठिकाणी उत्खनन केले.

त्यात ह्या थेरवाद बौद्ध संकुलाचे अस्तित्व आढळून आले. संकुलाच्या दक्षिण दिशेला खडकात कोरलेली पाण्याची एक भव्य टाकी आहे. इथे आधुनिक पद्धतीचे वाटावेत असे दगडी बाथ टब तयार केलेले असून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी छोट्यामोठ्या आकाराची पंधरा दगडी तळी कोरलेली आहेत. एकाच आकाराच्या ७२ निवासी खोल्या, दीडशे लोकांना एकत्र भोजन करता येईल असा भव्य डायनिंग हॉल, एकत्र प्रार्थना करता याव्यात यासाठी भव्य सभागृह, प्रशिक्षण केंद्र यावरून थोटलाकोंडा हे भारतातले महत्वाचे बौद्ध विद्यापीठ असावे.

उत्खननात टेराकोटाच्या फरशा, स्टुको सजावटीचे तुकडे, मूर्तिकला फलक, दगडात सूक्ष्म स्तूप मॉडेल आणि बुद्धाच्या पायाचे ठसेदेखील सापडले आहेत. ब्राह्मी लिपीतील बारा शिलालेखही मिळाले. पॉलीग्राफिक अभ्यासानुसार असे दिसून येते की ही टेकडी सेनागिरी म्हणून ओळखला जात असावी; पालीतील सेनेचा अर्थ वडीलधारी, श्रेष्ठ असा होय.

शेजारच्या बावीकोंडा आणि पावरुलाकोंडासारख्या जवळपासच्या लेण्याही महत्वाच्या आहेत.

थोटलाकोंडाच्या या उत्खननात प्रत्यक्ष काम केलेले आंध्र विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे प्रा. सत्यपाल यांनी आम्हाला प्रत्यक्ष जागेवर नेऊन प्रत्येक इमारतीचे महत्व आणि बौद्ध धर्मानुसार असलेले मोल समजाऊन सांगितले. यावेळी कॅनडाचे पूज्य भंतेजी चंद्र बोधी आणि भिक्खू शांतीदूत सोबत होते. आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे मिडल इस्टचे प्रमुख काशी कृष्णा आणि नागपूरचे रवींद्र कांबळे यांच्यासोबत केलेला हा अभ्यासदौरा अविस्मरणीय ठरला. या स्थळाची फारशी प्रसिद्धी होऊ नये यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन आणि विशिष्ट विचारधारेचे लोक प्रयत्न करीत असतात. म्हणूनच अभ्यासकांनी या बौद्ध विद्यापीठाला आवर्जून भेट द्यायला हवी.

-प्रा.हरी नरके, १३/०२/२०२०  

Tuesday, February 11, 2020

विशाखापट्टनम में आंतरराष्ट्रीय परिषद द्वारा मनाई गयी मूकनायक पत्रिका की शताब्दी




















विशाखापट्टनम में आंतरराष्ट्रीय परिषद द्वारा मनाई गयी मूकनायक पत्रिका की शताब्दी, डॉ. आंबेडकर की प्रतिमा का विमोचन, प्रो.हरी नरके को जीवन गौरव पुरस्कार

आंध्र प्रदेश के विशाखापट्टनम में आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, कॅनडा और आंबेडकर मेमोरियल सोसायटी, विशाखापट्टनम द्वारा मूकनायक पत्रिका की शताब्दी के अवसर पर आंबेडकर भवन में आंतरराष्ट्रीय परिषद का आयोजन किया गया. इस समय प्रो. हरी नरके के हाथो से भारतरत्न तथा बोधीसत्व डॉ. बाबासाहब आंबेडकर की ब्रॉण्झ की पुर्णाकृती प्रतिमा का विमोचन किया गया. कॅनडा के भंतेजी पूज्य चंद्र बोधी जी ने कार्यक्रम की अध्यक्षता की. उनका प्रवचन बहुतही सटीक तथा उद्बोधक रहा. इस अवसर पर प्रो. हरी नरके को जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया. 1944 मे डॉ. बाबासाहब आंबेडकर विशाखापट्टनम गये थे. डॉ. बाबासाहब के निकटतम कार्यकर्ता प्रो. पावन मुर्ती [ आयु 92 वर्ष] की उपस्थिती सेमिनार मे महत्वपुर्ण रही. सेमिनार की अध्यक्षता आय. गुरूमुर्ती जी AMS ने की.

मूकनायक पत्रिका के  तथा संपादक बाबासाहब के योगदान पर मुख्य भाषण प्रो. हरी नरके ने दिया. उन्होने नवभारत के रचयिता डॉ. बाबासाहब आंबेडकर जी का  देश तथा समाज के निर्माण में रहे ऎतिहासिक योगदान पर अपना रिसर्च पेपर प्रस्तुत किया. इस समय UAE दुबई के प्रो. कासी कृष्णा, AIM, आंध्र युनिव्हर्सिटी के प्रो. पी. डी. सत्यपाल, गितम युनिव्हर्सिटी की प्रो. प्रज्ञा जी, श्री रविंद्र कांबले, AIM, समता सैनिक दल के कमांडर श्री जागृतीकुमार, भिक्खु शांतिदूत जी,  इन्होनें भी उपस्थित प्रतिनिधियो कों संबोधित किया. इस पावन अवसर पर देशविदेश से आये हुये 600 प्रतिनिधी सेमिनार में उपस्थित थे.

आंध्र प्रदेश मे 1933 से फुले-शाहू- आंबेडकर विचारधारा का प्रचार और प्रसार करनेवाली 72 तेलुगू पत्रिकाओंके सिनियर संपादको का सम्मान किया गया. उन्होने भी सभा को संबोधित किया. इस सेमिनार में देश की आजकी हालात, समाज जागृती में प्रिंट मिडीया, इलेकट्रॉंनिक मिडीया, सोशल मिडीया का महत्व, बाबासाहब का संपादक के रूप में योगदान, बाबासाहब के विचारधारा पर आधारित मिडीया के निर्माण की जरूरत और हमारा कर्तव्य ऎसे महत्वपुर्ण विषयोंपर शोधनिबंध प्रस्तुत किए गये. जन चैतन्य मंडली द्वारा आंबेडकरी गित प्रस्तुत किये गये.
महाराष्ट्र के बाहर मूक नायक पत्रिका का शताब्धी महोत्सव मनाया जाना एक ऎतिहासिक कार्य रहा.

प्रो. हरी नरके, 11 फरवरी  2020