Showing posts with label जातिव्यवस्था. Show all posts
Showing posts with label जातिव्यवस्था. Show all posts

Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

Monday, June 15, 2020

२ री यादी- We Two आम्ही दोघे नांदतो सुखाने : आंतरजातीय विवाहीत-प्रा.हरी नरके

आंतरजातीय विवाह या विषयावरील माझ्या पोस्टला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातून (माझ्या तीन फेबु खात्यांवर, फेबु पेजवर व ट्विटरवर मिळून) ५०० पेक्षा अधिक जोडप्यांची नावे पुढे आली. मी पहिल्या यादीत ज्यांची नावे लिहिलेली होती, त्यातले जे लोक फेसबुकवर आहेत त्यातल्या ९०% + लोकांनी ही पोस्ट अद्याप वाचलेली दिसत नाही. त्यांच्याकडून प्रतिसादाच्या स्वरूपात त्यांच्या माहितीतली आणखी नावे यायला हवी होती. ती आलेली आढळत नाहीत. ते फार मोठे लोक आहेत (सेलिब्रिटी आहेत.) बहुधा त्यांचा असल्या किरकोळ गोष्टीतला रस संपल्याने अथवा हा विषय त्यांच्या दृष्टीने कालबाह्य झालेला असल्याने त्यांनी प्रतिसाद दिलेला नसावा. कदाचित ते इतर महत्वाच्या कामात व्यग्र असतील. पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ते ही पोस्ट वाचतील व नावांची भर घालतील अशी आशाय. असो... ज्यांनी स्वत:ची वा माहितीतली नावे कळवून बहुमोल प्रतिसाद दिला त्यांचे मन:पुर्वक आभार. ज्यांनीज्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे, त्यांच्यामध्ये आपण एकटे नाही, आजूबाजूला आपले "सगेसोयरे"  बरेच आहेत याची जाणीव होऊन सुरक्षिततेची भावना या उपक्रमामुळे वाढेल.

बरेच लोक निवांतपणे रिअ‍ॅक्ट होतात. त्यांच्याकडची नावे १५ दिवसांनी येतील.

आलेली सर्व नावे आपण माझ्या पोस्टच्य कमेंट्समध्ये बघू शकता. विशेष म्हणजे यातले काही विवाह घरच्यांच्या संमतीने झालेले आहेत. बरेच प्रेमविवाह आहेत तर काही ठरवून केलेले आंतरजातीय विवाहही आहेत. काही कुंटुंबात दुसरी किंवा तिसरी पिढीही आंतरजातीय विवाह करायला पुढे आलेली दिसते. बदल होतोय. सनातन्यांनो, तुम्ही खुशाल तुमचं कोंबडं झाकून ठेवा, समतेचा सुर्य उगवणारच. जातींचा अंधार हटणारच.
काही लोकांना क्रांतीची घाई झालेली असल्याने त्यांनी जाती टाकल्या आता धर्म कधी टाकता, अमूक कधी करता, तमूक कधी करता असल्या प्रश्नांची तोफ ढागलीय. ( स्वत: काहीच न करणारे आणि फक्त उंटावरून सल्ल्यांच्या शेळ्या हाकणारे बरेच असतात.) हजारो वर्षांचे सामाजिक निर्बंध उठवून जातीबाहेर पडण्याचे बंड करणे, जातीच्या सीमा ओलांडणे हे काम सोपे नाही. कृपाकरून एकाच पिढीत त्यांच्याकडून सगळ्या भिंती तोडायची अपेक्षा करू नका. काही लोकांचा आंतरजातीय विवाहांना नानाविध कारणांनी विरोध आहे. असू द्या. लोक त्यांना जुमानण्याच्या मन:स्थितीत नाहीत.


*** जगात ८०० कोटी लोक आहेत. याचा अर्थ प्रत्येक युवक-युवतीला निवडीला ४०० कोटीमधून वाव आहे. फक्त भारताचा जरी विचार केला तरी १४० कोटी लोकसंख्या म्हणजे ७० कोटीमधून निवड करण्याऎवजी एखादी जात म्हणजे काही लाख किंवा हजारातून निवड करण्याची सक्ती स्विकारून तुम्ही आपला चॉईस कमी का करून घेताय? द्या झुगारून बंधनं आणि करा मोठ्या संख्येच्या जगातून निवड. जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश, गरिब-श्रीमंत हे काही खरं नव्हे. मानव तितुका एकच आहे गड्यांनो!


( सिनेमजगत, क्रिकेट, राजकारण, अशा वलयांकित क्षेत्रातील कित्येक नावे आली असली तरी त्यातली प्रातिनिधिक तेव्हढीच इथे घेतलीत. ) सेलिब्रिटींपेक्षा सामान्य माणसांनी हे धाडस करणे मला जास्त महत्वाचे वाटते. ज्या गोष्टीसाठी आजही निर्घृण हत्त्या होतात, सामाजिक छळ, बहिष्कार वाट्याला येतो, त्याला न घाबरता ५०० लोकांनी आपली नावे जाहीर करणे हेच एक धाडशी पाऊल आहे असे मी मानतो.... मित्र गणेश कनाटे यांनी जातीनिर्मुलनासाठी काही महत्वाच्या सुचना केलेल्या आहेत. ( Ganesh Kanate अत्यंत प्रभावी कृती म्हणून तीन गोष्टी सगळ्या जातींतल्या मुला-मुलींनी केल्यास दोन-तीन पावलं पुढे पडतील, अशी एक आशा वाटते.
१) ठरवून आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह
२) मुलांच्या जन्मानंतरच्या पहिल्या प्रमाणपत्रापासून त्यावर जातीचा आणि धर्माचा रकाना रिकामा ठेवणे
आणि
३) मुलांना आडनावं न देणे.)

धन्यवाद गणेश.

नावांमध्ये लिहिताना काही चुका झालेल्या असतील तर नजरेला आणून द्याव्यात. दुरूस्त करू.

आलेल्यातली काही व माझ्याकडची आणखी काही नावे पुढीलप्रमाणे-


(१) पु. ल. देशपांडे-सुनिता ठाकूर, (२) व्यंकटेश माडगूळकर, (३) राजेंद्र बहाळकर- वंदना वैद्य (४) जयंत गायकवाड,  (५) तिस्ता सेटलवाड जावेद आनंद, (६) प्रेमानंद रुपवते-स्नेहजा रुपवते, (७) दीनानाथ मनोहर, (८) बालाजी सुतार,  (९)निला लिमये - भीम रासकर,  (१०)सुवर्णा भुजबळ- सुरेश सावंत,  (११) गायत्री अमदाबादकर-गणेश कनाटे, (१२) शिवाजी सावंत, (१३) मिलिंद आवाड,  (१४) डॉ. प्रदीप गोखले,  (१५) अरूण टिकेकर, (१६) नागराज मंजुळे, (१७) रणजित देसाई- माधवी पेंढारकर,  (१८) अर्जुन कोकाटे-सुधा जोशी,  (१९) मंगेश पाडगांवकर,  (२०) समर खडस



(२१) सी. डी. देशमुख  (२२) सुनिल दत्त-नर्गिस  (२३) संजय अपरांती   (२४) करण थापर-निशा मेनेसेस  (२५) मोहम्मद अझरुद्दीन (२६ ) उर्मिला मार्तोडकर (२७ ) प्रियंका चोप्रा (२८ ) डॉ. पंजाबराव देशमुख  (२९) भक्ती बर्वे-शफी इनामदार (३० ) शंकर महादेवन  (३१) प्रगती बाणखेले- संतोष कोल्हे, (३२) मोहन गुंजाळ, (३३) मुकुल वासनिक-रविना खुराणा  (३४) सचिन पायलट   (३५) विलास सोनावणे, चिंचवड, (३६) विक्रम गायकवाड-सुवर्णा चव्हाण, नाशिक (३७) विजय मांडके- शकुंतला मांडके (३८ ) समता माने- बोराटे, (३९) आशा भोसले,    (४०) स्मिता पाटील- राज बब्बर,


(४१ ) अशोक चव्हाण- अमिता,  (४२) जयंत पवार (जेपी) (४३) अभिजीत पवार (सकाळ) (४४ ) ज्योत्स्ना निगम- हरिश सपकाळे  (४५) इंदिरा गांधी, (४६ ) सोनिया गांधी, (४७)  मनेका- संजय गांधी (४८) प्रियंका गांधी - रॉबर्ट वाड्रा (४९)   इरफान खान - सुतापा सिकदर (५०) अ‍ॅड. सयाजी शिंदे, (५१) पन्नालाल सुराणा - वीणा (५२) बंडू गोरे- मृणाल गोरे, (५३) डॉ . राम गायकवाड  (५४) अ‍ॅड. तथागत कांबळे- अ‍ॅड. सुष्मिता दौंड, (५५) अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते- अ‍ॅड. जयश्री पाटील  (५६) डॉ. हर्षदीप कांबळे (५७) एकेडी जाधव- राणी जाधव, (५८) प्राजक्ता लवंगारे वर्मा (५९) प्रविण परदेशी (६०) प्रविण दराडे- डॉ. पल्लवी दराडे, गेडाम


(६१) चित्कला झुत्शी (६२) डि. के. शंकरन- डॉ. जॉयस शंकरन (६३)  डॉ. अभय बंग- डॉ. राणी बंग (६४) सुलभा जोर्वेकर-उल्हास पाटील (६५ ) अजित सरदार-वसुधा (करमरकर) सरदार (६६)  डॉ समाधान इंगळे अमरजीत बाहेती  (६७) हनुमंत पवार - सपना कंदले  (६८) योगेश काणे-पुजा (६९) शर्मिष्ठा भोसले - सदानंद घायाळ ( ७०) सलीम शेख-विजया जाधव (७१) शितल साठे-सचिन माळी,  (७२)राजश्री चव्हाण- प्रवीण दामले,   (७३) जॅकलिन डोळस - अविनाश डोळस (७४) चंदु जगताप-श्रद्धा जोशी  (७५) मोहन गुंजाळ,   (७६) विजय तरवडे शोभा राऊत  (७७) Dr Prashant rokade- Sujun hade (७८) Mahendra Mahagaonkar (७९) टीना दाबी- अथर खान (८०) रणजित परदेशी-सरोज कांबळे,


(८१) उमेश बगाडे-तिलोतमा झाडे (८२) रवींद्र साळवे - नीता चांदेकर (८३) Varsha Kale- Ankush Deshpande (८४) प्रशांत पवार - सविता ठाकूर (८५) अमृता सुभाष  (८६) रतन दादाभाई टाटा  (८७) डॉ. कैलास गौड - डॉ मेधा (८८) प्रा.संध्या रंगारी - श्री. रमेश कदम (८९) लिलाताई पाटील बापूसाहेब पाटील  (९०) प्रधान सुशील-साधना रेडकर (९१) कॉ. स्मिता पानसरे - कॉ. बन्सी सातपुते (९२) अॅड अभय टाकसाळ , (९३) कृष्णात स्वाती - स्वाती कृष्णात  (९४) अक्षय इंडिकर - तेजश्री कांबळे (९५ ) मुक्ता चैतन्य (९६) संघराज रुपवते  (९७) सुलभा जोर्वेकर-उल्हास पाटील (९८) विष्णू श्रीमंगले - कीर्ती बडवे (९९) सम्यक विमल मसू - अर्चना कुलकर्णी (१००) प्रफुल्ल शशिकांत - शिल्पा प्रफुल्ल


(१०१) अमृत बंग - आरती बंग (१०२) आरजु तांबोळी - विशाल पोखरकर (१०३) सतीश देशपांडे - अश्विनी फुंदे (१०४) संदीप शिंदे - अर्चना पिंपळकर (१०५) कुणाल शिरसाठे - तेजल कांबळे (१०६) अनिल जायभाये - मयुरी सामंत  (१०७ )प्रियंका माने - समाधान पाबळे (१०८) रणजित आचार्य - विद्या हतोलकर (१०९) विशाल लामतुरे - वर्षा कांबळे  (११०) राजन दांडेकर - क्रांती पोतदार (१११) परमेश्वर जाधव - मनीषा जाधव (११२) जितू लोकायत - कल्याणी लोकायत (११३) किशोर खोबरे - निकिता चांडक (११४) आरती नाईक - महेंद्र नाईक (११५) इब्राहिम शेख - श्रुती पानसे (११६) प्रणाली सिसोदिया - अद्वैत दंडवते (११७) पूजा देवगडे - विक्रम पटेल (११८) नंदू देवगडे - श्यामला देवगडे (११९) अमृता कुलकर्णी - विशाल गुरव (१२०) सुनीता गांधी - महेंद्र इंदुलकर


(१२१) अतुल शर्मा - सुषमा पद्मावार (१२२) गोपाळ गुणाले - कीर्ती मठकरी (१२३) पूनम पाचंगे - सतीश जाधव (१२४) सागर पाटील - ऋतुगंधा देशमुख (१२५) श्वेता वानखेडे - महेश लाडे  (१२६) रवी केसकर- भाग्यश्री वाघामारे (१२७) संतोष बुरंगे- रेखा बुरंगे (१२८) संध्या फुलपगार- महेश अचिंतलवार (१२९ ) आश्विन भालेराव - कांचन दुर्गकर (१३०) शारदा भालेराव - राहूल दिवांग (१३१) सुमित कारंडे - मोनिका मोरे (१३२) राजेश खन्ना- डिंपल कपाडीया  (१३३)  बाळू चोपडे-कुलगुरू  (१३४)  संजय मोने - सुकन्या कुलकर्णी (१३५)  आनंद शिंदे-गायक  (१३६)  मनोज वाजपेयी  (१३७)  हृतिक रोशन  (१३८)  ओमर अब्दुल्ला  (१३९)  शनवाज हुसेन  (१४०) मुक्तार अब्बास नक्वी


( १४१) अजित आगरकर (१४२)  झहीर खान-सागरिका घाटगे (१४३)  सचिन तेंडुलकर-अंजली मेहता (१४४) मोहम्मद कैफ (१४५)  सुहासिनी हैदर (१४६)  शर्मिला टागोर-पतौडी  (१४७) सोहा अली खान-कुणाल खेमु (१४८) विद्या बालन  (१४९) भाग्यश्री पटवर्धन, (१५०) मस्तानी-बाजीराव, (१५१) तुकोजीराजे होळकर, (१५२) जुही चावला, (१५३) किशोरकुमार - मधुबाला, (१५४)  सुनिल गावस्कर, (१५५) डॉ विकास महात्मे (१५६) Prasad Chougule (१५७) राजेंद्र कांबळे - कल्पना कांबळे इजंतकर (१५८)  अविनाश गाडे - धनश्री मेटकरी (१५९)  प्रमोद गोसावी - विद्या कांबळे (१६०) डॉ. राकेश गावतुरे - डॉ. अभिलाषा बेहेरे


( १६१) Manisha Prabhu (१६२) प्रशांत वाघमारे -नीलम साळुंखे (१६३) बेबी लांडे-कॉ.सुभाष लांडे. (१६४) शहनाज(शर्मिला)-सुनील गोसावी (१६५) सुधीर नरके - मीरा (१६६) Ravindra Medhe  (१६७  )  उपेंद्र टण्णू  (१६८) विजय वावरे- शबाना; (१६९) उत्कर्षा रूपवते- प्रशांत सलियान,   (१७०) Sagar Shaila Raghunath (१७१) पुष्पा क्षीरसागर (१७२) शितल माकर - आशिष चव्हाण (१७३)  संजय गायकवाड - मंगला भुजबळ,               (१७४) सतीश देशपांडे- अश्वीनी फुंदे( १७५) अॅड आरती राव -Mahesh Shirtode (१७६) गणेश भांगरे -  शमीम शेख, (१७७) रजत अवसक - अश्विनी  (१७८) ऋषाली आरोटे - सुतार, (१७९) माया मंडलिक - महेश, (१८०) नवले - गुजर,


(१८१) प्रतीक हुळवळे, (१८२) प्रा. वीणा- उदय जोशी, (१८३) प्रा. अविनाश कांदेकर- प्रा. स्मिता, (१८४) प्रकाश पोळ - प्रा. अनुराधा परदेशी, (१८५) प्रदीप बच्छाव, (१८६) किशोर सोनवणे,  (१८७) Nitin Gore (१८८) दिव्या भारती-साजिद नाडीयलवाला (१८९) अमोल आडसुळे - मिरा मल्लिक (१९०) राजू देसले- सुवर्णा, (१९१) adv राजपाल शिंदे- चित्रा, (१९२) नीतीश डावरे- कल्याणी (१९३) सुप्रिया गीते-सुरेश जोर्वेकर (१९४) माया लखवानी-विनोद भोईर (१९५) बेबी बेल्हेकर-भास्कर जगताप (१९६) विद्या पाटील-गिरीश चौक (१९७) सुनिता राठी-अनिल पाठक(१९८) निलेश कुलकर्णी - सुरेखा भालेराव, (१९९) प्रमोद वागदरीकर-कुमुद साळवे (२००) मेघना दगडे-प्रीतम कोटकर


(२०१) संध्या पवार-मिलिंद खेडेकर (२०२) Satish Makasare    (२०३) रुपराव नाटेकर- रोशनी आत्राम (२०४) सत्यवान हरी टण्णू (२०५) अजय सीताराम टण्णू (२०६) मिलींद सीताराम टण्णू (२०७) चारूशिला ज्ञानेश्वर टण्णू ( २०८) हर्षल अजित टण्णू (२०९) प्रशांत सातपुते  (२१०) कमलेश खरे- कंचन  (२११) Santosh Adsule- Megha Gaikwad  ( २१२) नरेंद्र चावरे- वर्षाराणी वाघमारे (२१३) लीना डुबल - लीना प्रशांत कहार  (२१४) Nishant - Vijaya Bhaskar Jadhav (२१५) Priyanka Revansiddha Chaudhary- Hitesh Suresh Ramwani (२१६) मधुरा तांबे  (२१७) कृतिका चव्हाण - सावंत (२१८) अविनाश महातेकर - अलका दामले (२१९) शिवाजी लांडे - मंदा दाणी (२२०)  कतुषा लांडे - चंद्रवदन गायकवाड


(२२१) अजय लांडे- सोनाली कमोद (२२२) राहुल नाईक - नेहा मोगरे (२२३) सुभाष लांडे- बेबी शिंदे, (२२४) हमीद शेख- लता काळे (२२५) लालासो पाटील-शकिला शेख, सांगोला (२२६) प्रकाश पोळ-अनुराधा परदेशी (२२७) शोभा चव्हाण  (२२८) अमित चंद्रमोरे (२२९) महेश चव्हाण (२३०) रुपाली रोटे-सोनावणे (२३१) राहुल यशवंते (२३२) अनिता बधान-जयवंत हिरे (२३३)  (२३४)  असिफ शेख( २३५) फिरोज खान (२३६) अनिल मोरे- रामेश्वरी शिंदे (२३७) मिलिंद शिंदे (२३८) संदिप शार्दुल (२३९) विलास रुपवते (२४०)  संजय जाधव-संगीता


(२४१) नितिन जाधव (२४२) विपुल हिरे-सुगंधा (२४३) फकिरा आहिरे (२४४) अशोक ससाणे-सुनंदा एळींजे (२४५) प्रणालि एळींजे- परमित वाघ (२४६) सुमित कारंडे - मोनिका मोरे (२४७) सागर झोलेकर, (२४८) संघराज रुपवते - जीना,  (२४९) सुबोध मोरे (२५०) किर्ति ढोले-सरमळकर  (२५१) सुनील सरदारे-निशी सरदारे (२५२) चित्रा एळींजे (२५३) सखु एळींजे-दास (२५४) दीपाली वाघ-शंतनु कांबळे (२५५)  सारिका-किशोर कर्डक( २५६) आनंद हरीभाऊ हिरे (२५७) संतोष गौतम कांबळे(२५८) प्रविण संदानशीव (२५९) गजानन भगत (२६०) प्रा.रमेश कांबळे


( २६१)  सुरेंद्र अ बनसोडे-शुभांगी जोशी ( २६२) डॉ. राहुल नेत्रगावकर - शिवनंदा पाटील (२६३) नवीन देशमुख - मधुरिमा (२६४) Vimaltai mundada- Nandakishor (२६५) Ashish Chandanshive - पूजा सावंत (२६६) अमोल सावंत-- बीकी राऊळ (२६७) सागर सावंत -- हर्षा (२६८) दिक्षा गावंडे (२६९) सागर कांबळे (२७०) शीला गांगुर्डे--देविदास कंजे (२७१) दर्शना साळवे-- नितीन निचळ (२७२) Ajit Agarkar (२७३) Dhiraaj Deshmukh (२७४) Amit Deshmukh (२७५) उषा- प्रकाश रोकडे (२७६) तुषार- तृप्ती मराठे (२७७) पिंकी मोडक- शेख (२७८) दिव्या मोहकर- मयुर बेलवले (२७९) रमेश कोष्टी (२८०) उमेशचंद्र मेश्राम,


(२८१) अमित गोसावी, (२८२) रुपेश नाईक, (२८३) बनसोड (२८४) अभिजीत हिरप - मनिषा मेश्राम (२८५) प्रभाकर बारहाते - अरुणा खरात (२८६) मनोज टाक - नीलिमा पाका (२८७) किरण कांबळे - सविता भईरट (२८८) किरण दीक्षित - प्रसाद खेकाळे (२८९) संतोष पवार - शालिनी राऊत (२९०) स्मिता पाटील - संतोष अवसरमोल (२९१) हेमंत कारले - संगीता कुलकर्णी (२९२) दिनेश भोयर - प्रज्ञा मनवर (२९३)Satish Panpatte (२९४) Renuka Tammalwar -Harshad Ravikar (२९५) वैशाली सौन्दनकर- महेश क्षीरसागर (२९६) धनश्री सौन्दनकर- चंद्रशेखर आदमाने (२९७) अमित वेल्हेकर- नेहा मार्वे (२९८) ऍड. महेंद्र सन्दनशिव - ऍड अंजली (२९९) कल्पना सुर्यवंशी - खिजेंद्र गेडाम (३००) स्वप्नील इंगळे- निशा सिरसाट


(३०१) धनंजय बनसोड - रोशनी  (३०२)  (३०३) लौकिक माने - डॉ. हर्षद आढाव (३०४) प्रकाश सांगवीकर - अंजली कुलकर्णी (३०५) ॲड. डॉ. सुभाषचंद्र पाटणकर - डॉ. प्रतिभा सुभाषचंद्र पाटणकर (सुनिता सावरकर)  (३०६) Sanjay Vishnu Sathe (३०७) कॉम्रेड राम बाहेती (३०८) डॉ.स्मिता अवचार (३०९) Pooja Natu Gaikwad -Yogesh Gaikwad (३१०) सोहम गायकवाड - अमृता सुरवसे (३११) शुभांगी त्रिभुवन - रोहन खैरे (३१२) रहीम सौदागर - गुड्डी भिंगारे (३१३) Dr Narendra Jadhav - Vasundhara (३१४) दिलीप चव्हाण-सुप्रिया गायकवाड (३१५)किशोर ढमाले-प्रतिमा परदेशी (३१६) राजू जाधव-संगीता ठोसर (३१७) किशोर जाधव-शुभांगी कुलकर्णी (३१८) मयुरी सामंत-अनिल जायभाय (३१९) Deepraj Gaikwad - Babasaheb Ghodke (३२०) Pankaj Gaikwad - Nikita

(३२१)Tejas M - Swati Mahajan, (३२२) Ashutosh Bankhele- Vrushali Shardul (३२३) Sneha Dive (३२४) Abhijeet valhe - Shital Yelve (३२५) रोशन गजभिये-सारिका (३२६) डॉ. सुरभी गजभिये-डॉ.पवन, ( ३२७) प्रतीक गजभिये -सोनाली, (३२८) प्रदीप रामटेके - संगीता, (३२९) रणजीत रामटेके - शोभना (३३०) अशोक मेश्राम-सविता घोडे, (३३१) गायत्री जवरकर-सुनील सातपुते, (३३२) रुपाली तेलतुंबडे, (३३३) कैलाश वाघमारे - मीनाक्षी राठोड (३३४) मारोती खंदारे-सरिता शर्मा (३३५) स्नेहा गिरी- सोनू अग्रवाल (३३६) अमृता कदम - सौरभ मेहता (३३७) आश्लेषा कदम - सुयश सिंग (३३८) Rajani Bhagat (३३९) श्रीराम गावंडे (पाटील) - उषा लोडाया (३४०) दुर्वेश जावळकर - रुद्राणी मिश्रा


(३४१) राहुल खोना- अभिलाषा पंत  (३४२) अॅड. राधिका इंगोले (पाटील) - चिराग ठक्कर (३४३) आदित्य दामले - रोहिणी (ऋजुता) गायकवाड  (३४४) Gautam Jadhav - सरोज नाईक (३४५) मृणालिनी आहेर -अजित गाढवे (३४६) अजय नवले -वैशाली मंडलिक (३४७) सचिन रोकडे - मनीषा प्रभू (३४८) मीनल पिंपळे-निकुंज बन्सल (३४९) जितेंद्र बनसोडे -पूजा पवार (३५०) वनिता ताठे -आनंद त्रिपाठी  (३५१) वैशाली घोरपङे- सुजीत रासकर (३५२) Mayur Chandorkar (३५३) Sanjay Navgire (३५४) Ujwal Kadam - Pinto  (३५५) देविदास पोळके - सरोज जगताप (३५६) सुहास फरांदे- देवयानी फरांदे, (३५७) नवनीत कौर- रवी राणा, (३५८) दीपाली कोतवाल-दुर्वास पाटील (३५९) प्रभाकर सांगळे-स्मिता दफ्तरदार (३६०) विजय सांगळे- गीता कुमठा


(३६१) बिपीन सांगळे- नीलम जैन (३६२) अभिजित सांगळे- प्रिया दळवी (३६३) डॉ. प्रीती सांगळे- डॉ. अश्विन गर्ग (३६४) डॉ. राहुल सांगळे-डॉ. वंदना जैन (३६५) रमेश जाधव -सोनल देशमुख. (३६६) प्रा.शैलेश बनसोडे (३६७) प्रा.व्यास (३६८) चंद्रकांत शिंदे, (३६९) प्राचार्य सीताराम गोसावी- प्रा.सीमा नाईक (३७०) आल्हाद काशीकर- स्वाती कोहे (३७१) रोहिणी गोसावी - अभिजीत देवकर (३७२) माया गोसावी - सुरज भुजबळ  (३७३) Dr Supriya Pandit Dr Amit Pedgaonkar (३७४) Santosh Parad (३७५) पंकज वाहोकार- उमा माने (३७६) सुनील इंगोले - जया भारती (३७७)  गुलाब वाघमोडे,   (३७८) परीत्याग रुपवते - अर्चना (३७९) बंधमुक्ता प्रेमानंद रुपवते - अर्शद खान , (३८०) ऊत्कर्षा प्रेमानंद रुपवते - प्रशांत सालियन


(३८१) चिरंतन संघराज रुपवते  (३८२) अपूर्व संग्राम रुपवते (३८३) दिक्षा मिलिंद गायकवाड (३८४) डॉ. गुड्डी कोळगे (३८५) युगांतर बळ्ळाल (३८६) स्वराज मिलिंद गायकवाड (३८७) Krushna More  (३८८) निलेश शिंदे - कल्याणी पवार  (३८९) प्रशांत महाले - डॉ. शीतलप्रभा मोरे  (३९०) भारती खरटमल - सतिश वानखेडे  (३९१) पद्मावती अर्धापुरे - बालाजी दमकोंडवार  (३९२) चारुशीला महाजन - दिपक संदानशिव  (३९३) गौरव कांबळे -वासंती पाटील  (३९४) Kundlik Khetri  (३९५) Adv Sunil Rathod (३९६) Kishor Ughade  (३९७)  (३९८) जगदिश सोनवणे  (३९९) सतिश कांबळे -शेख  (४००) निमिष लिमये-वर्षा गायकवाड


(४०१) विवेक कुलकर्णी- रेश्मा चव्हाण (४०२) उज्ज्वला - अनंत जोग,  (४०३) गणेश भवरे - काजल  (४०५) रंजित लष्करे - प्रियंका  (४०६) आश्विन भालेराव- कांचन दुर्गकर  (४०७) शारदा भालेराव - राहूल दिवांग  (४०८) चंद्रकांत भालेराव-तृप्ती महाडीक  (४०९) लता भालेराव- भट  (४१०)  मनिषा भालेराव - संदिप कांबळे  (४११) किशोर वाघ  (४१२) अनिल खराडे (बीड)   (४१३) हसन पठाण (बीड)   (४१४) रुपाली निंबर्ते- मंगेश भुताडे (अमरावती)  (४१५) गणेश फुले - ज्योती घोगरे (४१६) रोहन जोशी -अश्विनी नेमाड (४१७) डॉ.  प्रसाद डोके - डॉ.  स्नेहा बागडे  (४१८) रुबिना दलवाईं  (४१९) इला दलवाईं (४२०) स्मृती शिंदे



(४२१) जोधा-अकबर  (४२२) क्षिती जोग - हेमंत ढोमे,  (४२३) नरेश शिर्के - मेघना शिर्के  (४२४) विकास तांबे - कुंजल पटेल ( ४२५) Adv. Pruthviraj Jadhav- निशा धारप (४२६) Gaurav Zurunge (४२७) प्रशांत सागरे - प्रतिभा  जोशी  (४२८) Sameer Dhumal (४२९) योगेंद्र यादव- मधुलिका बॅनर्जी, (४३०) सुभाष लोमटे - निलिमा  (४३१) मिलन चव्हाण- नयना पटेल (४३२) शैला - द्वारकादास लोहिया (४३३) श्रीराम जाधव- शोभा शिराढोणकर (४३४) इंदुमती जोंधळे-महावीर जोंधळे (४३५) प्रा. डॉ.रविंद्र मेढे- शीतल कोटकर
(४३६) निलेश कुलकर्णी - सुरेखा भालेराव (४३७) Swapnil Malwande (४३८) शुभम पवार - आरती शिंदे


- प्रा. हरी नरके, १५/६/२०२०

Friday, June 12, 2020

We Two आम्ही दोघे नांदतो सौख्यभरे : आंतरजातीय विवाह झालेत, होतील


जातीबाहेर प्रेम केलं म्हणुन पुण्यात नुकतीच विराज जगतापची निर्घृण हत्त्या झाली. काही दिवसांमागे अशाच कारणाने हत्याकांडं झाली. नितीन आगे, आशा शिंदे, मंगला कांबळे, सोनई हत्त्याकांड, इंद्रजित कुलकर्णी- मेघना पाटील (कोल्हापूर), यांच्या हत्त्या झालेल्या होत्या. सजातीय विवाह हा नियम झालेला आहे. किंबहुना ‘लग्न म्हणजे सजातीयच, ही धारणा समाजमनात पक्की झालेली आहे. आंतरजातीय विवाह म्हणजे अधःपतन / वर्णसंकर / कुलभ्रष्ट होणे हा अर्थ न उच्चारताही इथे रूजवण्यात आलेला आहे. आपल्याला या नॉर्मलसीला आव्हान द्यायचंय आणि ती नाकारायची आहे म्हणून आंतरजातीय विवाह हा जाहीर उल्लेख आवश्यक ठरतो. यातून आंतरजातीय संबंध हे विवाह म्हणवून पात्र आहेत, नव्हे तो आमचा अधिकारच आहे हे आपण दाखवून देत आहोत. यातूनच नवी नॉर्मलसी रूजेल. रूळेल. समाजमान्य होइल. जातीबाहेर विवाह/प्रेम केलं म्हणून ज्या निर्घृण हत्त्या होतात त्यांना मिडीयाने " ऑनर किलिंग" म्हणणे चुकीचे आहे. ह्या संघटित गुन्हेगारीच्या कृत्याला  " ऑर्गनाइज्ड क्राईम", " ब्रुटल मर्डर", "निर्घृण हत्त्या" असेच म्हटले पाहिजे.


 समाजाची ही चौकट मोडून बंड करून कमीअधिक किंमत मोजून ज्यांनी ठरवून किंवा प्रेमातून आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह केले अशांची संख्या एकुणात भले कमी असेल परंतु आपल्या आजुबाजूला अशी जोडपी बरीच आहेत. तुम्ही किंवा तुमच्या माहितीत कुणी असा आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह केला असेल तर ती नावे कमेंट मध्ये लिहा. मागे काहीवर्षांपुर्वी मी फेबुवर अशी यादी केली होती तेव्हा ती नावे हजाराच्या वर झालेली होती. आतातर त्यात कितीतरी भर पडलेली असेल. आंतरजातीय विवाहाची दहशत, सामाजिक दडपण कमी करण्यासाठी नव्या पिढीला या यादीचा उपयोग होईल...आपल्या आजूबाजूला इतक्या मोठ्या संख्येने आंतरजातीय विवाह केलेले लोक आहेत, सुखी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कर्तृत्वाने त्यांनी या नात्याला समाजमान्यता, आदर, स्नेहही मिळवलाय. फारच प्रेरक बाब आहे ही आणि अनुकरणीयही.



१. एक विनंती, जातीबाहेर किंवा पोटजातीबाहेरसुद्धा झालेला प्रत्येक विवाह हा स्वागतार्हच आहे. मात्र इथे आपण जातीबाहेर झालेलेल्या विवाहांचीच यादी करतो आहोत. त्यामुळे उदा. कोकणस्थ, देशस्थ, कर्‍हाडे आदी पोटजातीत झालेले विवाह इकडे नोंदवू नयेत.
२. ज्यांचे विवाह जातीतल्या जातीत झालेले आहेत त्यांनी ह्यानिमित्ताने दुरूस्ती करण्याच्या फंदात पडू नये. नाहीतर नवी समस्या निर्माण व्हायची. जातीतल्या जातीत लग्न झालेय त्यांनी कोणीही अपराधी वाटून घेऊ नये. पुढच्या पिढीला जातीत लग्न करायला भाग पाडू नये, इतके केले तरी भरपूर झाले.
३. नावात वा आडनावात काही चुका आढळल्यास क्षमस्व-
४. मला सहज आठवलेली काही नावं पुढीलप्रमाणे-


(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर- डॉ. शारदा कबीर (२) बाळासाहेब आंबेडकर - अंजली मायदेव (३) निळू फुले - रजनी मेहता (४) गोपीनाथ मुंडे 
(५) सु्शीलकुमार शिंदे (६) रामदास आठवले (७) भालचंद्र फडके (८) हरी नरके- संगिता (९) सुषमा देशपांडे - कणेकर (१०) सुप्रिया सुळे

(११) गार्गी फुले- ओंकार थत्ते (१२) संजय सोनवणी (१३) प्रदीप आवटे- माधुरी (१४) संजय आवटे- अर्चना (१५) महेश भागवत (१६) सुनिल तांबे- सविता कुडतरकर
(१७) कौस्तुभ दिवेगावकर- प्रियंका बोकील (१८) गणेश विसपुत्ये- श्रुती तांबे (१९) नागनाथ कोत्तापल्ले (२०) शर्मिला रेगे


(२१) रजिया पटेल - श्रीकांत सावंगीकर (२२) युवराज मोहिते (२३) नागेश चौधरी- पुष्पा (२४) अन्वर राजन - अरूणा तिवारी (२५) मनस्विनी ल.र. - सतिश मन्वर
(२६) समीर भुजबळ - शेफाली (२७) विलास वाघ- उषा कुलकर्णी (२८) हुसेन दलवाई - शमा पंडीत (२९) संघमित्रा खोरे - सचिन कांबळे,   (३०) मुकुंद बहाळकर


(३१) मनोहर कदम- प्रतिमा जोशी (३२) संजय मं. गो.- लतिका (३३) वसंत चव्हाण- (३४) अशोक जैन- सुनिती (३५) रितेश देशमुख- जेनेलिया 
 (३६) डॉ. अनिरूद्ध फडके (३७) जुई फडके (३८) डॉ. सई ठाकूर (३९) चिन्मयी सुर्वे- सुमित राघवन (४०) लक्ष्मण माने - शशी भोसले


(४१) पार्थ पोळके (४२) मिहीर थत्ते- बोराटे (४३) गगनविहारी बोराटे (४४) अशोक अंकुश (४५) तेज निवळीकर (४६) प्रदीप मोहिते
 (४७) नंदा पाटील (४८) डॉ. निलम जाधव- पन्हाळे  (४९) सुनिता-दिलीप अरळीकर (५०) प्रज्ञा दया पवार - अभय कांता


(५१) शाहरूख खान-गौरी (५२) अमिर खान- किरण (५३) सैफ अली खान - करिना कपूर (५४) ऎश्वर्या नारकर- अविनाश (५५) प्रशांत दळवी- प्रतिक्षा लोणकर
 (५६) भाऊ पाध्ये- शोशन्ना (५७) पुष्पा भावे- अनंत भावे (५८) अस्मिता दुभाषी- संतोष मोहिते- (५९) सचिन अहीर (६०) नामदेव ढसाळ- मल्लिका अमर शेख


(६१) शाहीर अमर शेख (६२) अनिल बर्वे (६३) भारत सासणे (६४) पद्मकांत कुदळे (६५) रवींद्र सुर्वे- देशपांडे (६६) चंद्रकांत वानखेडे - माया कुलकर्णी
 (६७) भास्कर चंदावरकर- मिना कुलकर्णी (६८) सुधाकर जाधव - माया देशपांडे (६९) निरजा पटवर्धन- संदीप सावंत (७०) दिनेश ननोरे- सविता 


(७१) संजय धिवरे- भाग्यश्री बानायत (७२) दत्ता बाळसराफ-कुसुम रोकडे (७३) पद्मभुषण देशपांडे (७४) कपिल पाटील- - वर्षा कांबळे  (७५) येशू पाटील-मेरी (७६) अमर हबीब - आशा
 (७७) मंदार फणसे- संपदा डावखरे (७८ महेश म्हात्रे- सुमेधा रायकर (७९) सीताराम रायकर (८० चिन्मय मांडलेकर


(८१) संग्राम खोपडे (आर.जे.) (८२) राणा जगजितसिंह पाटील (८३) रंगा राचुरे - बजाज (८४) अनिल खैरे (८५) निलिमकुमार खैरे
(८६) आनंद सोनावणे- (८७) परिमल माया सुधाकर (८८) सुभाष वारे (८९) शांताराम पंदेरे- मंगल खिंवसरा (९०) प्रशांत कोठडिया- उज्वला मेहेंदळे


(९१) प्रतिभा शिंदे (९२) शिवाजी गायकवाड- निशा शिऊरकर (९३) यमाजी मालकर- अंजली (९४) शबाना वारणे- अजित जोगळेकर (९५) चंद्रकांत पुरी- स्वाती बॅनर्जी
(९६) प्रवीण चव्हाण- अनघा तांबे (९७) नितीन कोत्तापल्ले (९८) मनिषा तोकले- आशोक तांगडे (९९) राजन सुमन खान (१००) मुग्धा कर्णिक- धनंजय


(१०१) शैला नार्वेकर - राम सातपुते (१०२) स्नेहल नारकर - अनिल नेने (१०३) सरिता आवाड (१०४) गणेश राऊत- ज्योती भोसले (१०५) शेखर सोनाळकर
(१०६) वर्षा शेडगे (१०७) ऋत्वीज काळसेकर (१०८) मधुकरराव पिचड (१०९) मयुरा डोळस (११०) अस्मिता जोगदंड- दीपक चांदणे


(१११) भारत पाटणकर- गेल ओम्वेट (११२) सुनिल सरदार (११३) नितीन सरदार (११४) सतिश पावडे - निशा शेंडे (११५) कुमुद पावडे (११६) जयंत पवार - संध्या नरे (११७) दिलीप चव्हाण (११८)अविनाश हावळ-गुत्तीकर (११९) ज्योती सुभाष (१२०) नसिरूद्दीन शहा-रत्ना पाठक 


(१२१) रणवीर सिंग- दिपिका पदूकोन  (१२२) विराट कोहली - अनुष्का शर्मा (१२३) रामविलास पासवान (१२४) जनार्दन वाघमारे (१२५) बापू काळदाते,  (१२६) फ.मु.शिंदे,  (१२७) उत्तमराव भोईटे


-प्रा. हरी नरके, १२/६/२०२०

Thursday, June 11, 2020

जातीव्यवस्था : मजबूत होतीय की खिळखिळी? - प्रा. हरी नरके, ( भाग-१ )


लागोपाठच्या जातीअत्त्याचारांनी, हत्त्यांनी जातीचा विषय पुन्हा एकदा ऎरणीवर आलाय. चर्चाविषय बनलाय. जातीव्यवस्था ही एक मानसिकता आहे आणि भौतिक व्यवस्थासुद्धा. ती माणसांच्या तनामनात खोलवर रूजलेली आहे. अगदी अबोध मनावरही तिचीच सत्ता आहे. बलदंड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य पुरूष हे तिचे लाभार्थी आहेत. सर्व स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र हे तिचे बळी आहेत. हे लाभार्थी शतकानुशतके जातीचे हितसंबंध जपण्यासाठी राबत असतात. जातीचा प्रचार, पगडा, दरारा कायम ठेवण्यासाठी ते सदैव झटत असतात. वर्षभर झोपा काढून एका दिवसापुरते नाचत नसतात.जातपिडीत एकमेकांबद्द्ल संशय घेत, परस्परांना शिव्या घालीत अधिक एकटे पडत जातात. तिकडे तथाकथित उच्चजातीय-उच्चवर्णिय संघटित असतात. त्यांच्यात पोलादी ऎक्य असते. ते जागृत आणि प्रबळ असतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, प्रचाराची यंत्रणा आहे. त्यांच्याकडे बळकट साधनसंपत्ती आहे. सरकार, (शासन व्यवस्था) मिडीया, अर्थसत्ता, धर्मसत्ता आणि न्यायव्यवस्थासुद्धा त्यांच्याच ताब्यात असल्याने त्यांच्या शब्दांना सामाजिक प्रतिष्ठा असते. तथाकथित खालच्या जातींचे लोकसुद्धा आपापल्या वा अधिक खालच्या जातीच्या विचारवंतांचे फारसे मनावर घेत नाहीत. त्यांना " वरचे" काय म्हणतात हे महत्वाचे वाटते. वरच्यांची मान्यता मिळावी, वरच्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी यासाठी आटापिटा करीत असतात.


या तथाकथित वरच्यांच्या शब्दाला अधिक विश्वासार्हता असते, तिच्यासाठी खालचेही जीव टाकीत असतात. पाटलाचं घोडं आणि **** भूषण! ही म्हणच आहे. यामुळे जातबळींना न्याय मिळणे दुरापास्त ठरते. गरिब माणसं सहज विकली जातात. बळाच्या जोरावर फोडता येतात. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ ठरतात. भारतात २६ जाने. १९५० ला संविधान आलं पण संविधानाची मानसिकता आली नाही.

मानसिकता आजही जातीची, सरंजामी, सामंती, भांडवली आणि धार्मिक उन्मादाचीच आहे. शहरीकरण, महानगरीकरण, शिक्षण, आरक्षण आणि औद्योगिकरण यामुळे सुबत्ता आली. उंच इमारती वाढल्या. मोबाईल्स, इंटरनेट आले. शेकडो चॅनेल्स आले. मनोरंजन आणि चंगळवाद यांचा पगडा वाढला. त्या गतीनं प्रबोधनाचा वारसा या नवशहरी वर्गात, नवमध्यमवर्गात, नवशहरी भागात विस्तारला नाही. उलट देवदेव वाढला. रूढी, परंपरा, नारायण नागबळी, जातीचा माज वाढत गेला.


"बघतोस काय रागानं, **** आणलंय वाघानं," ही जुन्या सरंजामी पीळाला अधिक सुदृढता देणारी व्यवस्था  जोडीला आली. जमिनीला सोन्याचे भाव आले. गुंठेवारीचा पैसा आला. सुयोग्य गुंतवणीचे शिक्षणच नसल्याने तो लग्न, देवकार्यावर, चैनीवर उधळला जाऊ लागला.  श्रीमंती आली म्हणजे सुजाणता येतेच असे नाही. अडाणीपणा जातोच असेही नाही. तोही भुमितीश्रेणीत वाढतो. ही सगळी जातअहंकाराची जळमटं आणि सरंजामीवृत्ती सहजासहजी जाणार नाही. ती घालवण्यासाठी प्रबोधन करावेच लागेल. जातीनिर्मुलनाचा अजेंडा राबवावा लागेल. पर्यायी संस्कृती विकसित करावी लागेल. तसे फारसे न करता  " जातीयता ही एक अंधश्रद्धा आहे,"  " जातीचा अभिमान असलाच पाहिजे,"  "दुसर्‍या जातीचा द्वेश करू नका, पण आपल्या जातीचा गर्व बाळगा",  "एक *** लाख ***"  असली सुभाषितं तोंडावर फेकली जातात.


भलेभले सुशिक्षित, उच्चपदस्थ ही सुभाषिते, हे नॅरेटिव्ह वापरतात. कळत नकळत रूजवतात. त्याच्या जोडीला "जी जात नाही ती जात" ही शिवाजीराव भोसलेटाईप वाक्ये लोकप्रिय केली जातात. रा.स्व.संघ व सावरकरवादी हे अस्पृश्यता, जातीभेद नको म्हणतात. मात्र ते जातीनिर्मुलनाचे आंदोलन चालवित नाहीत.  त्यांचा जातीभेदाला तेव्हढा विरोध आहे. जातींना नाही. जाती राहाव्यात फक्त भेद तेव्हढे जावेत ही भुमिका वरवर बघता, प्रथमदर्शनी बरोबरही वाटते.


मात्र संघ-सावरकर व फुले - आंबेडकर यांच्या भुमिकांमध्ये मुलभूत फरक आहे. एक भूतदयेवर, वरच्यांच्या मेहरबानीवर जगायला सांगते तर दुसरी सर्वांना समान मानवी अधिकार हवेत, असे सांगते. फुले -आंबेडकर म्हणतात, जातीच नकोत, जातीनिर्मुलन झाले पाहिजे असे ते सांगतात. कारण जातीयता ही पायर्‍यापायर्‍यांची, श्रेणीबद्ध विषमतेची व्यवस्था आहे. ती राहू द्या असे म्हणणे म्हणजे जातीय हितसंबंध, अहंकार, श्रेणी कायम ठेवा असेच म्हणणे होय. जात राहणार तर जातीय द्वेश, विखार, पायरीने राहा ही वृत्ती राहणारच. सर्व जाती एका पातळीवर नाहीत. त्या एकाखाली एक किंवा एकावर एक अशा उभ्या आहेत.


जाती राहणार असतील तर अन्याय, पक्षपात, भेदभाव राहणारच. तेव्हा जातच गेली पाहिजे. स्वत:च्या जातीचा गर्व, अभिमान बाळगणे म्हणजेच दुसर्‍या जातींचा द्वेश करणे होय. तथाकथित वरच्या जातींना मागासांची प्रगती का बघवत नाही, माजलेत असे का वाटते, कारण त्यांनी आपल्या पायरीने राहावे, गुलाम राहावे, स्वाभिमानाने जगू नये असे वाटते म्हणून.  मित्रहो, आपला अजेंडा जातीभेद निर्मुलनाचा नसून जातीनिर्मुलनाचा आहे. हा फरक नीट लक्षात घ्या. समरसतावाद्यांना ह्यातला फरक कळणार नाही. कळला तरी वळणार नाही. कारण ते जातीव्यवस्थेचे लाभार्थी आहेत. आपण पिडीत आहोत. आपण त्यांचे गुलाम राहण्यात त्यांचा फायदा असला तरी आपला त्यात काय लाभ आहे? काहीच नाही. जातीव्यवस्था मान्य करणे म्हणजेच उच्चनिचता, श्रेष्ठकनिष्ठता, मालक-गुलाम ही मानसिकता स्विकारणे होय हे नीट समजून घ्या.


जातीव्यवस्था माणसाने निर्माण केलीय. जी गोष्ट अनित्य आहे, ती जातेय. ती जाणार. जातीव्यवस्था आज खिळीखिळी होत आलीय. प्रतिगामी शक्तींनी तिला बळकट करण्यासाठी बुस्टर दिलाय खरा. पण तरीही ती जाणारेय.मात्र  ती आपोआप जाणार नाही. त्यासाठी तुम्हालामला एकजुटीने काम करावे लागणार आहे. जगातील ८०० कोटी लोकांपैकी अवघ्या १५० कोटींमध्ये जातीव्यवस्था आहे. उरलेल्या ६५० कोटींमध्ये वर्णभेद, वंशभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद असतीलही पण हे आणि जातीव्यवस्था या वेगळया बाबी आहेत. त्यांच्यात गल्लत करू नका. परत सांगतो, जात ही व्यवस्था आहे. मानसिकता आहे. भौतिक आधारावर ती पोसली गेलीय. तिला अर्थसत्ता, धर्मसत्ता, कुटुंबसत्ता, शिक्षणसत्ता यांचा आधार असल्याने ती अधिक किचकट, गुंतागुंतीची, चिवट, सबळ आणि भयंकर आहे. पाताळयंत्री आहे.


"आरक्षणामुळे जातीयता वाढली," "शाळेच्या दाखल्यावरून जात काढली की जात आपोआप जाईल," "मनुस्मृती कुणी वाचलीय? कशाला मनूला बिचार्‍याला दोष देता?" " समान नागरी कायदा आणा, " असले युक्तीवाद भलेभले करीत असतात. हे युक्तीवाद पोरकट, विक्षिप्त, अगदी बालीश, भ्रामक, भंपक आणि मुर्खपणाचे आहेत. जातीयतेने शूद्र-अतिशूद्रांवर अन्याय केला त्याची भरपाई म्हणून आरक्षण आलेय. जात समाजात शेकडो वर्षे होती म्हणूनच आरक्षण द्यावे लागलेय.


आरक्षणाने जातीयता आलेली नाही. समाजात जातीची मानसिकता होतीच, आजही आहे, म्हणून जात शाळेच्या दाखल्यावर आलीय. दाखल्यावर आल्यामुळे समाजाला ती कळलेली नाही. ती आधीच होती. नोंदवली नाही की ती जाईल असे म्हणणे म्हणजे कोरोना टेस्ट करू नका, उपचारही करू नका, कोरोना नाहीच असे म्हणा, थाळ्या, टाळ्या वाजगा, गो कोरोना गो म्हणा, की गेला कोरोना, असली अडाणचोट वृत्ती आहे ही.


मनुस्मृती वाचलीय की नाही हा मुद्दाच नाहीये. भारतात वाचनसंस्कृती फारशी नव्हती. नाही. कथनसंस्कृती, वाणीसंस्कृती होती. आहे. म्हणून तर आजही साहित्य यापेक्षा वाड्मय हा शब्द अधिक प्रचलित आहे. वाणीद्वारे जे सांगितले गेले ते वाड्मय. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा ह्या सांगितल्या गेल्या. त्या कुणीतरी लिहून घेतल्या. आजही लाखो बुवा, बापू, महाराज, ह.भ.प., साधू, संन्याशी, गोसावी, गुरू, किर्तन, प्रवचन, सत्संग याद्वारे लक्षावधींच्या जमावांना मनुमहात्म्य सांगत असतात. आंबाभुर्जीवाले बहुजन तरूणांना सांगत असतात, " मनु हा संताच्या चार पावले पुढे होता. " तेव्हा वाचायची काय गरज आहे. हे कथन इथे रुजलेले आहे. रुतलेले आहे. मनामनावर कोरलेले आहे.


दुसरा एक मुद्दा, मनुस्मृती हा धार्मिक आणि कायद्याचा ग्रंथ होता. कायद्याचे मुख्य तत्व हे आहे की, कायदा सर्वांना माहितच असतो हे गृहित धरावे लागते. नाहीतर प्रत्येक आरोपी असा बचाव करील की मला हा कायदा माहितच नव्हता, म्हणुन मला शिक्षा करू नका. हे चालत नाही. वेद, गीता, उपनिषदे, पुराणे, महाभारत, रामायण, कुणी वाचलेय? पण म्हणून त्यांचे महात्म्य भारतीयांना माहित नाही काय? तेव्हा मनुस्मृती न वाचल्याचा ब्राह्मणी युक्तीवाद भाकड आहे. भुक्कडपणाचा आहे. ह्या पुराणकथा इथल्या प्रत्येकाच्या हाडीमाशी भिनलेल्या आहेत. मठ, मंदिर, धर्माचार्य त्यांना जोपासत आहेत.


जातीव्यवस्था निर्मुलनाची जादूची कांडी कुणालाही सापडलेली नाही. अगदी फुले-शाहू-आगरकर-आंबेडकरांनासुद्धा नाही. जातीनिर्मुलनाला शॉंर्टकट नाही. जाती घालवण्याची पंचसुत्री फुले-शाहू-आंबेडकरांनी जरूर दिलेली आहे. मुळात भारतात शोषण, पक्षपात, भेदभावाची ३ केंद्रे आहेत. (१) जात, (२) आर्थिक वर्ग, (३)लिंगभाव, स्त्री-पुरूष विषमता.


या तिन्हींवर एकत्रित मारा करण्यासाठीच हे पंचशील आहे. ही विषयपत्रिका अतिशय प्रभावी आहे. (१) सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यांचे संवर्धन (२) स्त्री-पुरूष समता, (३) आंतरजातीय विवाह, (४) संसाधनांचे फेरवाटप, (५) वादविवाद, विचारकलह, संवाद, टिकाटिप्पणी, धर्म चिकित्सा, सामाजिक प्रबोधन याच रस्त्याने आपल्याला जावे लागेल. जातीनिर्मुलनाला दुसरा रस्ता नाही.


त्यावर फोकस करायला हवा. झोकून देऊन काम करायला हवे. ही मानसिकता घालवण्याचे अभियान संघटन, प्रशिक्षण, डावपेच (स्ट्रॅटेजी) आणि परिवर्तनवादी तत्वज्ञान यांच्याद्वारेच उभे करता येईल. प्रतिक्रियावाद, अत्त्याचारविरोध, आरक्षण आणि अनुदानात अडकलेली आपली सामाजिक चळवळ आज गोल्गोल फिरतेय. आपण एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसलो आहोत. बहुजनातील मानसिक दुरावा दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नाही? की फक्त स्पर्धाभावना, एकमेकांबद्दलचा संशय, आकस, परस्परद्वेश आणि सर्वज्ञभावना, मीच एकमेव क्रांतिकारक असल्याचा दावा याने समग्र परिवर्तन साधणार आहे?


कोणीही शेंबडं पोरगं उठतं आणि सुरू होतं, " आता आ. ह. साळुंखे का बोलत नाहीत? आता अमुकने का लिहिले नाही? तमुकने लिहिले तर एव्हढेच का लिहिले? ह्याला एव्हढ्या उशीरा का जाग आली? आम्ही यांना मोठे केले, आमच्या मदतीला कोणीच येत नाही? आम्ही समर्थ आहोत, आम्हाला कोणाचीच गरज नाही. कोणावर अन्याय झाल्यावर आम्हीच लढायला जातो, आता इतरांवर अन्याय झाल्यावर आम्ही का म्हणून जावे? हरी नरके, आम्हाला आंबेडकर सांगू नका, तो आमच्या रक्तात आहे, तुम्ही तिकडे बहुजन समाजात जाऊन प्रबोधन करा, आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही प्रबुद्धच आहोत,"  हा सगळा युक्तीवाद पोकळ आहे. बोलबच्चन, बाष्कळ आणि तकलादू आहे. अरे बाबांनो, सगळं आयुष्य ज्यांनी चळवळीला वाहिलं त्यांना प्रश्न करण्यापुर्वी जरा स्वत:च्या लायकीचाही विचार करा. कोण आपण, काय आपली कुवत? साळुंखेसरांची जेव्हढी पुस्तकं आहेत ना तेव्हढं तर तुझं वयही नाही. तुझा अभ्यास किती? तू बोलतोस किती?


" तुम्ही माळ्यांना, मराठ्यांना, ब्राह्मणांना त्यांच्या वस्तीत जाऊन का सांगत नाही? आम्हाला बाबासाहेब माहितच आहेत, ते तुम्ही सांगायची गरजच नाही, आम्हालाच कशाला परत सांगताय?" हा प्रश्न, हा दावाही, जातीय दर्प आणि अर्धवट शिक्षणाच्या अहंकारातून आलेला आहे. एव्हढा अहंकार बरा नाही. जन्माच्या अपघाताने जे आंबेडकरवादी आहेत त्यांच्यापेक्षा बाय चॉईस ज्यांनी बुद्ध-आंबेडकर स्विकारलेत ते साळुंखेसर फार मोठे आहेत. त्यांच्याबद्दल शंका घेता आणि हा माझा समाजबांधव, तो माझा रक्तबांधव असली भाषा जी फुले-आंबेडकरवादाला काळीमा फासणरी जातीय किड आहे तिला जोपासता?


प्रबोधनाची गरज सगळ्यांनाच आहे. आपल्या सर्वांनाच एकमेकांची गरज आहे. आपण सगळ्यांनीच गोळ्यामेळ्यांनी राहायला हवेय. आम्ही सगळ्यांनाच शिवराय, फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर, साने, शिंदे, गांधी सांगतो आहोत. सांगत राहणार आहोत. प्रस्थापित व्यवस्था अतिशय धुर्त, लबाड, दुटप्पी, नीच आणि चलाख आहे. तिच्याशी लढायचे काम एकट्यादुकट्याचे नाहीच. आपल्यात फूट पडावी, आपण एकमेकांचे गळे पकडावेत हेच तर त्यांना हवेय. परजातींबद्दल संशयी वृत्ती हीच तर जातीयता आहे. आम्ही जर रक्ताचे नाते मानत असू तर तो बुद्ध-बाबासाहेबांचा पराभव आहे. शुद्ध रक्ताचा दावा हा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. जातीचे रक्त ही संकल्पनाच भंकस आहे. रक्ताला जात नसते. रक्ताला गट असतो. ए, बी, ओ, एबी, +, - असा.


बाबासाहेब म्हणाले, "मला जातीचे नको, विचारांचे बहुमत हवेय." ज्ञानसूर्य बाबासाहेबसुद्धा असे कधी म्हणाले नाहीत, की मला कोणाचीच गरज नाही. माझा मी समर्थ आहे. त्यांनीसुद्धा, बुद्ध, कबीर, फुले यांना गुरू मानले. त्यांनी जातीतला गुरू नाही केला. करता आला असता. त्यांनी "महार महासंघ किंवा सेवा संघ" नाही काढला. "महारनायक" नाही चालवला. बहिष्कृत भारत, हितकारीणी सभा, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत, स्वतंत्र मजूर पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद कॅंपस यातनं काही संदेश घ्यायचा की नाही?  तुम्हाला केवळ जातीचं काम करायचं असेल तर जरूर करा. पण मग बुद्ध, बाबासाहेबांची नावं घेऊ नका. फुल्यांनीही "माळी समाज महासंघ" नाही चालवला. ओठात फुले-आंबेडकर आणि पोटात जातीयता, जातसंघ, जातीचं रक्त हे शोभत नाही.


मी गेली ४० वर्षे शिवराय,फुले-शाहू, शिंदे, आगरकर, गांधी, साने, आंबेडकर अत्र, तत्र, सर्वत्र मांडतोय. माफ करा स्वत:ला ज्ञानी समजणार्‍या थोर्थोर विद्वानांनाही ५, १० टक्क्यांच्या पलिकडचे फुले, शाहू, बाबासाहेब माहित नाहीत. जे माहिती आहेत तेही वरवरचे आणि तकलादू स्वरूपात. पोपटपंची करण्यापुरते. जातीच्या टोळ्याटोळ्यांनी रहायचे तर जरूर राहा. पण हाच तर मनुवाद आहे, हीच तर जातगुलामी आहे.


" जातीसाठी खावी माती" हा फुले-आंबेडकरवाद नाही. " जी जात नाही ती जात" हा विचार परिवर्तनवादी विचार नाही. तो प्रस्थापितांचे हात बळकट करणारा विचार आहे. असा विचार करा आणि मरा. अशामुळे मनुवादी हिंदुत्ववादाला, जातीव्यवस्थेला अजून बळकटी मिळेल हे लक्षात ठेवा. सत्तेसाठी धार्मिक व जातीय तेढ वाढवण्यासाठी संघपरिवार कोणत्याही थराला जायला तयार आहे. बहुजनात वाढणारी तेढ, आपसातला संशयवाद हाच हिंदुत्ववादी शक्तींना बळ देत असतो. त्यांना विविधता, समावेशकता नकोय. त्यांना सगळीच कळसुत्री बाहुली हवीयत. आदेशावर चालणारी. ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करणारी. तिच्याशी आयुष्यभर लढणारे फार कमी आहेत. त्या मोजक्यांना गमावू नका. मन मोठं करा. चार बुकं वाचली म्हणजे अक्कल आली हा अहंकार सोडा.


इथली कुठलीही एक जात "एकसंघ" नाही. तेव्हा सब घोडे बारा टक्के करू नका. अत्याचार करणारा भले माळी, मराठा, वंजारी, आग्री, भंडारी, ब्राह्मण, राजपूत, ठाकूर, बनिया, कुणबी कुणीही असेल पण म्हणून बुद्ध, फुले, शाहू, सयाजीराव, विठ्ठल रामजी, साने गुरूजी यांनाही त्यांच्या गोटात ढकलणार आहात काय? गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र अख्ख्या समाजाला टार्गेट करू नका. जातीपातीचा विखार कोण वाढवतंय? भटके, विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, अल्पसंख्याक समाजाविरूद्ध सवर्णांना कोण पेटवतंय? कोण द्वेशाग्नी भडकवतंय? हा हिंसावादी मेंदू कोण पोसतंय?  जरा शोध तर घ्याल.


जागतिकीकरणामुळे प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झालेले आहेत. हे वर्गीय हितसंबंधाचे ताणेबाणे, राजकीय सत्तेचे आकर्षण आणि अप्पलपोटेपणा यातली गुंतागुंत विसरून सुलभीकरण करणारी मांडणी करण्याच्या नादात आजवरची सामाजिक पुण्याई मातीत घालवू नका. आम्हीच बोलावतो,  आम्हीच मानधन देऊन पोसतो, मोठे करतो, ह्या गमजा सोडा. असं उगीच कुणीही कुणालाही बोलवित नसतं. आम्हाला बोलवा असा कुणी अर्ज केला होता का? नका बोलवू ना मग. हिनवणं सोडा. बोलावण्याची भिक नको पण उपकाराचे कुत्रे आवरा.


लक्षात ठेवा, वक्त्यांचा व्यासंग, परिणामकारकता, उपयुक्ततता, त्याग आणि कळवळा यांनाही काही मार्क द्यावे लागतात. वक्त्याचा ब्रॅंड एका दिवसात तयार होत नसतो. त्यासाठीची साधना अणि पायपीट यांना कवडीमोल ठरवू नका. प्रा. रावसाहेब कसबे, उत्तमराव कांबळे, प्रा. भालचंद्र मुणगेकर यांना सगळेच समाज बोलावतात, ते का? शोध घ्या. याच्या उलट काहींना आपला म्हणवणारा समाजही वार्‍याला उभं का करीत नाही? शोधा म्हणजे सापडेल.....हा लेख व इतर ८००+ पोस्ट तुम्ही माझ्या ब्लॉग/ फेसबुक पेजवर पाहू शकता. संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.....https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR38LDRzVM_XdR2JvWeIhR7r1RUWHpp5dZAnCISJaRzDVpLLBM8pw-NIfKQ
क्रमश:

- प्रा. हरी नरके, ११/६/२०२०

Wednesday, June 10, 2020

बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, पुरोगामी विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप या बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप, वय २० वर्षे, रा. जगतापनगर, बुद्धविहाराजवळ, पिंपळे सौदागर, पुणे यांची तथाकथित उच्च जातीय मुलीवर प्रेम केले म्हणून ७ जून २०२० रोजी रा. १० वा. काटे कुटुंबियांकडून अमाणूष हत्त्या,
आरोपी : हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे यांनी एकत्रितपणे मिळून आधी टेम्पोने विराजच्या टू व्हीलरला धडक दिली, खाली पडलेल्या विराजला लोखंडी रॉडने व दगडांनी ठेचून अमाणूषपणे मारहाण करीत हत्त्या केली. मारताना आमच्या मुलीवर प्रेम करतो काय अशी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून हत्त्या केली.


सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद झालेली आहे.
एफ. आय. आर. ३०६/२०२०, भा. दं. वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, अनुसुचित जातीजमाती कायदा २०१५ चे कलम, १८८९, ३ (१) ( आर) ( एस) ३ (२ ) (व्हीए) ३ (२) (व्ही) ६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५


कोणतीही हत्त्या हा गंभीर गुन्हाच. तथाकथित वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम करतो म्हणून जातीभेदापोटी सहाजणांनी रानटीपणाने कोवळ्या युवकाला ठार मारणे हा तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा गुन्हा.

जग कुठे चाललेय आणि ही तथाकथित उच्चजातीय मानसिकतेतली माथेफिरू माणसं प्रेम केलं म्हणुन हत्त्या करतात? महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह झालेले आहेत. महात्मा फुल्यांचा दत्तक पुत्र यशवंतचे लग्न आंतरजातीय होते. राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या बहीणीचा विवाह आंतरजातीय केलेला होता. स्वत: बाबासाहेबांचा शारदा कबीर यांच्याशी झालेला विवाह आंतरजातीय होता.


या पुरोगामी राज्यात आंतरजातीय विवाह करण्यात सर्वाधिक पुढे असलेल्या समाजापैंकी पहिले तीन समाज आहेत, मराठा, बौद्ध आणि ब्राह्मण. असे असताना पुण्यासारख्या शहरात हे घडावे याची शरम वाटते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती देणार्‍या या कृतीचा मी तीव्र धिक्कार करतो. आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करतो.

राज्यातला सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

-प्रा. हरी नरके, १०/६/२०२०

Friday, June 5, 2020

अज्ञानमग्न ओबीसी आणि त्यांचं बहिष्कृत सामाजिक पर्यावरण- प्रा. हरी नरके


ही पृथ्वी फक्त माणसासाठी बनलेली नाही. तिच्यावर सृष्टीतील लक्षावधी सजिवांचा माणसाइतकाच हक्क आहे. आजकाल माणूस स्वार्थीपणाने निसर्गाचा विध्वंस करतोय. त्याला अक्षरश: ओरबाडतोय. त्याविरूद्धची निसर्गाकडून प्रतिक्रियाही उमटतेय. माणसाच्या विकासाचा इतिहास म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्या  संघर्षाचाच इतिहास आहे. मानवाने निसर्गावर विजय मिळवल्याची बरीच उदाहरणे असली तरी निसर्गानेही माणसाला धडा शिकवल्याची काही उदाहरणे आहेतच. निसर्गाबाबत शहरी, सुशिक्षित, बुद्धीजिवी बरेच जागृक असतात. मात्र तितकी जागृती सामाजिक पर्यावरणाबद्दल दिसत नाही. असा दुजाभाव का? कारण निसर्गाविषयीच्या बोलण्या, लिहिण्याला, लढण्याला जगभर प्रतिष्ठा आहे. प्रसिद्धी आहे. पुरस्कार आहेत. याउलट सामाजिक पर्यावरणविषयक बोलणे, लिहिणे, त्याची चर्चा करणे हे बुद्धीजिवींमध्ये तुच्छतेचे, हिनकसपणाचे आणि टिंगलटवाळीचे विषय आहेत. पुरोगामी भारताच्या काही बुद्धीजिवी वर्तुळांमध्ये एससी,एसटी, मायनॉरिटीविषयक बोलण्या लिहिण्याला ग्लॅमर आहे.


ओबीसी म्हणजे शूद्र. मराठा, कुणबी, माळी, तेली, आग्री, भंडारी, धनगर, वंजारी, कुंभार, सुतार, नाव्ही, साळी,.... अशा कष्टकर्‍यांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे त्यांच्या जगण्या मरण्यालाही किंमत नाही. त्यांच्याबद्दल लिहिणे, बोलणे हे मिेडीयाच्या दृष्टीने डाऊन मार्केट. राजकारण्यांना ओबीसींची मतं हवी असतात, पण त्यांच्या समस्या, दुखणी, व्यथा, वेदना ह्याची वास्तापूस त्यांना नको असते. महाराष्ट्रातला कोणताही राजकीय पक्ष ओबीसींचे प्रश्न ऎरणीवर आणायला तयार नसतो. त्यांच्यासाठी ओबीसीसेल निर्माण करण्या इतपतच त्याला महत्व असते.

लोकशाहीमध्ये डोकी महत्वाची असूनही ओबीसींना मात्र किंमत शून्य, असं का?


 जे स्वत: जन्मओबीसी असतात, त्यातल्या बर्‍याचजणांना आपण ओबीसी आहोत हे सांगायची लाज वाटत असते. गेल्या बर्‍याच वर्षातले ओबीसी पर्यावरणाबद्दलचे माझे निरिक्षण पु्ढीलप्रमाणे आहे -


 खरं तर कारू नारू, बलुतेदार, अलुतेदार हा निर्माणकर्ता समाज आहे. त्यांच्या हातात कौशल्ये आहेत. सृजनशीलता आहे. व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव आहे. निर्मितीची सगळी जादू ठासून भरलेला हा समाज देशावरचा बोजा नाही. ओबीसी चोर किंवा भिकारी नाहीत. ते देशाची अ‍ॅसेट आहेत. मग एव्हढा अभिमानास्पद वारसा असताना " ओबीसी ओळख" हा टवाळीचा विषय का? ओबीसी अस्मितेला हिन का मानलं जातं?


ओबीसीतले बुद्धीजिवी ओबीसींबद्दलच्या समाजमाध्यमांवरील अशा पोस्टना कधीही कमेंट, लाईक देत नाहीत. कारण आपण ओळखले जाऊ, त्यामुळे आपली बुद्धिजिवी वर्तुळातली प्रतिष्ठा कमी होईल अशी भिती त्यामागे असते.( यालाही अपवाद आहेत, असतात..)


उच्च अधिकारी, वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, संपादक असलेले बहुतांश ओबीसी खाजगीत आपण ओबीसी आहोत असं आम्हाला सांगतात. त्यांच्यावर अन्याय झाला की " मी ओबीसी असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला" अशी ओरडही ते करतात. एरवी मात्र त्यांना उघडपणे ओबीसीची ओळख सांगाविशी वाटत नाही. उलट ती दडवाविशीच वाटते. हा वर्ग अत्यंत कोत्या मनोवृत्तीचा, कोडगा आणि बेईमान आहे. कृतघ्न आहे.



गावकुसाबाहेरून आलेली आमची नवजागृत भावंडं ओबीसींबद्दल कायम तक्रारीच्या सुरात बोलत असतात. ओबीसी असे आहेत, नी तसे आहेत असा तुच्छतावादी सूर कायम बहुतांशांकडून येत असतो. ओबीसी जातीग्रस्त आहेत, रूढीवादी आहेत, तेच बर्‍याचदा दलित अत्त्याचारात पुढे असतात, मान्यच आहे. पण तरिही त्यांचे प्रबोधन न करता, त्यांना प्रतिगामी छावणीत ढकलून, त्यांच्यापासून फटकून राहून समाजपरिवर्तन कसं करणार आहात राजेहो?



सर्वसामान्य ओबीसी देव, धर्म, देश, ब्राह्मण, रूढी, परंपरा, संघ, मोदी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अ.भा.वि.प, समरसता मंच यांच्याबद्दल गर्व बाळगणारा असतो. त्यांच्यावर टिका करणारे, त्यांची चिकित्सा करणारे, त्यांना प्रश्न विचारणारे, बोलणारे, लिहिणारे आमच्यासारखे लोक ह्या ओबीसींना आपले शत्रू वाटतात. आमच्या अंगावर पहिलं कोण धावून कोण येतं? तर अभिजनांचे हे ओबीसी पोपट, वेठबिगार, गुलाम, वरच्यांनी ठेवलेले ओबीसी रंडवे, भडवे आणि दलालच. तरिही त्यांच्याकडे क्षमाशीलतेनं बघत शिक्षणाचं, प्रबोधनाचं, जागृतीचं काम चालूच ठेवावं लागतं.



एक गंमत म्हणजे ओबीसींना स्वत:ला काही व्यक्तीगत मदत हवी असली तर ते प्रथम आमच्याकडॆच धाव घेतात बरंका! ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली, ओबीसींच्या स्कॉलरशिप बंद झाल्या, ओबीसींच्या अ‍ॅडमिशन, क्रिमी लेयर, जात प्रमाणपत्रं, कास्ट व्हॅलिडिटी असा कुठलाही प्रश्न, मुद्दा आला की त्यांना पहिली आठवण आमची येते.


परवाच एका प्राध्यापकाचा मेल आला होता. " अर्जंट फोन नंबर पाठवा. तातडीचे बोलायचेय." मी कळवलं, " माझा फोन बहुधा बंद असतो. इमेलवरून कळवा." त्यांचा अर्जंट मुद्दा काय असावा? "अमूक तमूक मॅनेजमेंट महाविद्यालयात माझ्या मुलीला एमबीएला प्रवेश हवाय. त्यांच्याकडे ओबीसी महिला आरक्षण का नाही? तुम्ही चौकशी करुन मला ताबडतोब कळवा." जणू हरी नरके हा त्यांचा खाजगी नोकरच आहे. मी त्यांना कळवलं, " तुम्ही प्राध्यापक आहात ना? मग तुम्ही का चौकशी करीत नाही? मी तुम्हाला याबाबत काहीही मदत करू शकणार नाही. तुमचे हातपाय तुम्हीच हलवा."


मागे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाला, तर एक ओबीसी संपादक माझ्या मित्राला म्हणाले, " हरी नरके काय करताहेत?" हे बरं आहे, शिव्या तुम्हीच खा. मार तुम्हीच खा. अडीअडचणीला रात्रंदिन धावूनही जा, आणि तरिही तुम्ही विचारणार तुम्ही ओबीसींसाठी काय केलं? काय कर्ताय?


कुठेयत ओबीसींचे नेते? ओबीसी बॅकलॉग, ओबीसी जनगणना, बजेट, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, प्रमोशन व उच्च शिक्षणात आरक्षण, सर्व स्थरांवर संरक्षण, कडक अंमलबजावणी या ओबीसींच्या प्रश्नावर देशभर रान पेटवलं म्हणून छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडॆंना किती मोठी किंमत मोजावी लागली! त्यांच्या थिंक टॅंकला किती छळ सोसावा लागला!


बहितांश ओबीसी समाजाने प्रत्येक समस्येची पिशवी अडकवण्याची हक्काची खुंटी म्हणजे हरी नरके, अ‍ॅड. बी.एल.सगर किल्लारीकर, मृणाल ढोलेपाटील, संजय सोनवणी, मंगेश ससाणे, श्रावण देवरे, कमलाकर दरवडे, चंद्रकांत बावकर, प्रदीप ढोबळे, प्रकाश खेडकर, राम वाडीभष्मे,..... असं ठरवूनच टाकलंय. म्हणजे ते स्वत: काहीही करणार नाहीत, लढणारही नाहीत, खाजगीतही मदत करणार नाहीत, उलट जमेल तसं मदत करणारालाच फैलावर घेतील, शिव्याही घालतील आणि तरीही तुम्ही लढलं पाहिजे. हा धंदा खोटा. दमवणारा. थॅंकलेस. मनस्ताप देणारा.


मी तर राजकारणीही नाही. मला तुमची मतं नकोत. ओबीसी प्रश्न हा माझ्या करियरचा विषय नाही. केलं तेव्हढं भरपूर झालं. यापुढे तळमळीने नव्या पिढीतलं कुणी काही करील तर त्यांना मार्गदर्शन नक्की करू. मात्र रात्रंदिन ओबीसींसाठी सगळी शक्ती पणाला लावणं हा उद्योग म्हणजे टांगा पलटी घोडे फरार असला धंदा आहे.



मी व्यक्तीश: आयुष्यात कधीही कसलंही आरक्षण घेतलेलं नाही. घेणारही नाही. मात्र १९८० पासून मी गेली ४० वर्षे आरक्षण समर्थनार्थ लढलोय. लढतोय. आता हाच खेळ पुढे चालूसाठी एनर्जी आणायची कुठून?


ग्रामपंचायतीपासून न.पा. मनपा, न.प. तालुका पंचायत, जिल्हा परिषद या पातळीवरच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेले एकट्या महाराष्ट्रात सुमारे ६ लाख लोक आहेत. यातले किती लढायला पुढे येतात? ( यालाही अपवाद आहेत, असतात..) हे लाभार्थीच जर शेपूट घालून बसणार असतील तर लढायचं कुणासाठी आणि का?



अज्ञानमग्न ओबीसींसाठी लढणं म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्यांसाठी ढोल वाजवित राहणं, यश येईल का? आलं तर कधी? काहीच माहित नाही. त्यासाठी आपल्या हाताने बुद्धीजिवी वर्तुळातून बहिष्कृत व्हा, शिव्या खा, मनस्ताप सोसा. एव्हढंही करून ओबीसी पर्यावरणाला पुरोगामी बुद्धिजिवींच्या चर्चाविश्वात स्थान, सन्मान मिळेल का? बहुधा नाहीच. तरिही लढलं तर पाहिजेच.

का?

( अ )  फुले- शाहू - आंबेडकरांच्या उपकारातून अंशत:तरी मुक्त होण्यासाठी,
( ब )  अगदीच बुडती हे जन देखवेना डोळा.. असं नव्हे पण, नाही बघवत, नाही स्वस्थ बसवत म्हणून, ऎशी कळवळ्याची जाती... हा स्वभाव आहे म्हणून,
( क ) जो वारसा आधीच्यांनी आमच्या हातात दिला त्यची जनुकं पुढच्यांच्या हाती सोपवण्यासाठी,
( ड ) पुढच्या पिढ्यांना थोडे तरी बरे दिवस यावेत म्हणून,

लढल्याशिवाय कोणालाही हक्क मिळालेले नाहीत म्हणून.

चला आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढाई बुलंद करू यात. तुम्ही मात्र वाचा  आणि विसरून जा...

-प्रा. हरी नरके, ५/६/२०२०


Monday, April 20, 2020

आरएसएस सुप्रिमो गोळवलकर बाबासाहेबांना का भेटले होते?-प्रा.हरी नरके, रा.स्व.संघ 3




मराठ्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा या त्यांच्या मागणीवर बाबासाहेब म्हणाले, रा.स्व. संघ हा तर विषवृक्ष आहे!

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. " पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मणराज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही." अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब - गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जातयेत असत.

गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, " हे ब्राहमण गृहस्थ आहेत हिंदूंचे पोप. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!"

आणि संघवाले या भेटीबद्दल धादांत खोट्या अफवा पसरवतात. बाबासाहेब म्हणाले म्हणे, " संघाचे काम वाढवा, मी तुमच्या कामावर खूश आहे." चातुर्वर्ण्याची प्रस्थापना करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील?

दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषयपत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

- प्रा. हरी नरके, २० एप्रिल २०२०

{ पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५}

Wednesday, April 1, 2020

सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?






सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?- सुरेश सावंत,
सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाने लोकसत्ता लाईव्हमधील मुलाखतीत ‘मराठी मालिकांत मुख्य भूमिकेसाठी ब्राम्हण अभिनेत्रींनाच संधी दिली जात असल्याचा’ आरोप केला आणि अपेक्षेप्रमाणे टीके-प्रतिटीकेची बरीच राळ उडाली. खुद्द सुजय डहाके तसेच मराठी मालिका यांविषयी मत देण्याइतका त्यांचा परिचय मला नाही. त्यामुळे सुजय डहाकेचा आरोप मराठी मालिकांबाबत खरा की खोटा, हे मी सांगू शकत नाही. पण व्यापक सामाजिक-आर्थिक स्थिती, माध्यमांतले त्याचे प्रतिबिंब यांविषयी जे अभ्यास व निरीक्षणे मांडली जातात, त्यांचा परिचय मला आहे. सामाजिक-राजकीय चळवळीतला वावरही काही बाबी मला लक्षात आणून देत असतो. त्याआधारे सुजय डहाकेच्या आक्षेपाचा आणि त्यावरच्या टीकेचा संदर्भ पाहता येतो. सुजय डहाकेचे व्यक्तित्व उथळ की गंभीर किंवा त्याचे टीकाकार किती प्रांजळ हा माझा प्रश्न नाही. ज्या संदर्भात हा आक्षेप व त्यावरची टीका आली आहे, तो संदर्भ निश्चित गंभीर आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
सुजयच्या आरोपानंतर त्याच्या विरोधात पहिली तोफ डागली अभिनेता शशांक केतकर याने. तो म्हणतो - “माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे.” पुढे तो म्हणतो, “कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?”
ब्राम्हणी वर्चस्वाच्या विरोधात बोलणाऱ्या सुजयने त्याला संधी असताना अब्राम्हण अभिनेत्रींची निवड का केली नाही? ...हा प्रश्न वकिली युक्तिवादासाठी बरोबर आहे. त्याचे उत्तर सुजयने जरुर द्यावे. वैयक्तिक वागणूक बोले तैसा चाले नसेल तर नैतिक अधिकारही कमी होतो हे खरे. पण वैयक्तिक वागणुकीवर त्या व्यक्तीने विचारलेल्या सामाजिक महत्वाच्या प्रश्नाचे महत्व कमी ठरत नाही. तो प्रश्न नाहीच म्हणून बाजूला सारता येत नाही. एखादा थोर बेवडा दारुच्या दुष्परिणामांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देत असेल, तर ती माहिती चुकीची ठरत नाही. ‘बेवडा सांगतोय...पण खरं बोलतोय’ असेच आपण म्हणू. म्हणायला हवे. तीच बाब सुजय कामाकडे लक्ष देतो की नाही यालाही लागू आहे. तो आता काहीही करत नसेल. चकाट्या पिटत असेल. त्याचे चित्रपट चालत नसतील. तरीही त्याने केलेल्या विधानाची किंमत तो खूप काम करत असताना, चित्रपट चालत असताना केलेल्या विधानापेक्षा कमी होत नाही.
शशांकचे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. एक, ‘आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे.’ दुसरे, ‘साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?’
शशांक केतकरने या दोन मुद्द्यांतून सांगितलेला निष्कर्ष हा कि, मराठी मालिका वा सिनेमा क्षेत्रात जातीला थारा नाही. तिथे गुणवत्ता पाहिली जाते. मंजुळे गुणवान आहे. या गुणवत्तेला सानेंनी जोखले, साथ दिली आणि उत्तम कलाकृती जन्मास आल्या.
शशांक मग सुजयला दिलेल्या उत्तरात पुढे असे का म्हणतो? - “कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.”
साने, केतकर, मंजुळे, कांबळे यांत काहीही फरक तो मानत नाही. गुणवत्तेलाच त्याच्या क्षेत्रात किंमत आहे. कांबळे, छल्लारे, पवार हे गुणवान आहेत. अशा गुणवानांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा त्याला अभिमान आहे. ...असे साधे सरळ त्याला म्हणायचे आहे का?
नाही. सुजयच्या जातिवादाच्या आक्षेपाला तो उत्तर देतो आहे. कांबळे, छल्लारे व पवार हे अब्राम्हण किंवा कथित खालच्या जातीचे असतानाही माझ्यासारखा ब्राम्हण त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजेच मी जातिभेद मानत नाही. त्यातून येणारी श्रेणी मी मानत नाही. केवळ गुणवत्ता मानतो, हे तो यातून सांगतो आहे.
समाजात अन्यत्र असा जातिभेद केला जातो, जातींवरुन माणसाच्या श्रेणी ठरवल्या जातात, हे त्यास बहुधा कबूल आहे. मी मात्र ते मानत नाही आणि आमच्या क्षेत्रात असे काही होत नाही, यावर तो ठाम आहे.
शशांक स्वतः भेदभावाच्या या अमानवी प्रथेपासून पूर्ण अलिप्त आहे, याची ग्वाही देतो आहे. ते खरे असू शकते. पण तेवढेच. त्याच्या क्षेत्रात असा भेदभाव होत नाही, फक्त गुणवत्ताच महत्वाची मानली जाते, हे विधान त्यातून सिद्ध होत नाही. त्यासाठी कथित तळच्या, मधल्या जातींच्या कलावंतांच्या साक्षी आवश्यक आहेत. अर्थात केवळ त्याही पुरेशा नाहीत. त्यांच्यावर हेत्वारोप होऊ शकतात. एक पद्धतशीर समाजशास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे.
तेजश्री प्रधान हिनेही “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्षं माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?” अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या क्षेत्रात गुणवत्तेलाच महत्व दिले जाते. ती स्वतः अब्राम्हण असूनही तिला काही त्रास होत नाही, हा तिचाही निष्कर्ष आहे.
ब्राम्हण विरुद्ध सीकेपी हा तीव्र ऐतिहासिक झगडा आहे. मात्र तो जातीय उतरंडीच्या वरच्या भागातल्या जातींच्या स्पर्धेचा आहे. सीकेपी ही मागास जात नव्हे, हे इथे जाता जाता लक्षात ठेवूया. मागास विरुद्ध वरच्या जाती या संघर्षात छावण्या कशा पडतात, ते पहावे लागते.
सौरभ गोखले यानेही सुजयची लायकी काढून त्याला कडक समज दिली आहे- “पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.”
त्याचे क्षेत्र किती नितळ, निर्मळ आहे आणि आजूबाजूची घाण इथे कशी घुसडू नये हे सौरभ इथे बजावून सांगतो आहे. श्रीमुखात भडकवण्याची भाषा हा सुजयच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला वगैरे मानूया नको. सुजयच्या त्याच्या क्षेत्रातल्या मित्राचा तो सात्विक संताप आहे, असेच तूर्त गृहीत धरुया.
या सगळ्याबाबत गिरीश दातारांची एक वेगळी प्रतिक्रिया आहे. दातार नावावरुन कळते त्याप्रमाणे ब्राम्हण असावेत. ते स्वतःला ब्राम्हण वा कुठल्याही जातीचे मानतही नसतील. पण जन्म कथित ब्राम्हण घरात झालेला असावा. ते स्वतः माध्यम क्षेत्रातलेच दिसतात. ते त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात-
“माझ्या मते सुजय डहाके कलाक्षेत्रातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादाबद्दल त्याची सल व्यक्त करतोय. आणि जे अतिशय योग्य असेच आहे. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकलावंताला अशी सल का वाटतीये, याचा 'किमान विचारही' न करता, त्याच्या बोलण्यात तात्विक पातळीवर खरंच काही सत्य आहे का (मी तात्विक म्हणतोय. सांख्यिकी नाही. त्यामुळे मूर्खासारखे कोणत्या सिरीयल आणि सिनेमांमध्ये किती ब्राह्मणेतर कलाकारांनी कामे केलीयेत याची उदाहरणे देत बसू नये) हे तपासून पाहण्याची, त्याच्यावर मूर्खासारखी टीका करणाऱ्यांना गरजही वाटत नाही - हीच खरी सांस्कृतिक वंचना आहे.”
ब्राम्हणी वर्चस्व म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण करताना ते पुढे नोंदवतात – “काही अपवाद सोडल्यास, ब्राह्मणी चालीरीती, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी सणवार, ब्राह्मणी पोशाख - हाच काय जणू epitome of ideal and standard culture अर्थात - भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक आदर्शाचा अत्युच्च नमुना आहे - अश्याच प्रकारे - ब्राह्मणांनी आपले सौंदर्य निकष बहुजनांवर लादणे चालवले आहे. म्हणूनच सिरीयल, सिनेमांमध्येही बहुजन पात्रेही ब्राह्मणी चालीरीती आचरताना दिसतात. (काही मोजके अपवाद वगळता).”
त्यांच्या या कलाक्षेत्रात सहकलाकारांशी व्यवहार करताना हे ब्राम्हणी वर्चस्व कसे काम करते, याचे वर्णन ते असे करतात- “ब्राह्मणी वर्चस्ववाद म्हणजे केवळ ब्राह्मण कलाकार संख्येने अधिक असणे, किंवा ब्राह्मणेतर कलाकारांची कलेच्या क्षेत्रात कमी संख्या असणे नव्हे, तर याहून अधिक व्यापक स्वरूपात याचा विचार व्हायला पाहिजे. 'न' आणि 'ण' मधल्या फरकाने आपल्या सोबत काम करणाऱ्याला हीन लेखणे, ज्यांना तसे बोलता येत नाही म्हणून - त्यांना अत्यंत कळकळीने मराठीतले मोठे कवी तू कसे वाचले पाहिजेस, ज्यामुळे तुझी भाषा कशी सुधारेल (हे सांगणे)... हे ध्यानात घेतले तर आपणही नकळत याचे वाहक कसे होत असतो, हे ध्यानात येईल.”
आपल्या सहकाऱ्याची टीका संवेदनशीलतेने ऐकून तपासण्याची गरज तसेच गुणवत्ता कशाला म्हणायचे, ब्राम्हणी वर्चस्व हे केवळ संख्येवर अवलंबून नाही तर तो धाक निर्माण करणारा एक सांस्कृतिक मापदंड असतो, असे नमूद करुन या चर्चेला प्रगल्भ आयाम दातारांनी दिले आहेत. सुजय डहाकेच्या हेतूंना वा त्याच्या मूर्खपणाला तपासण्यात वेळ घालवण्याऐवजी दातारांनी मांडलेल्या या मुद्द्यांची चर्चा शशांक, तेजश्री, सौरभ यांनी करणे गरजेचे आहे.
सांस्कृतिक वर्चस्व संख्येवर अवलंबून नसले तरी प्रत्यक्ष संख्येची अवस्था माध्यम आणि आर्थिक क्षेत्रात काय आहे आणि जातींच्या उतरंडीचा त्याच्याशी संबंध कसा आहे, हे पाहणे कमी उद्बोधक नाही. ही अवस्था स्वातंत्र्याचे आयुर्मान पाऊणशे व्हायला येत असताना असणे हे खूप गंभीर आहे.
७-८ महिन्यांपूर्वी जाहीर झालेला हा अभ्यास. ऑक्सफॅम आणि न्यूजलाँड्री यांनी केलेला. त्यात त्यांनी जातींची उतरंड माध्यमांतल्या विविध क्षेत्रात कशी आजही कायम आहे, याचे आकडे दिले आहेत. असा अभ्यास याही आधी योगेंद्र यादव वगैरे मंडळींनी केलेला आहे. त्यांचेही निष्कर्ष तेच आहेत. हे आकडे ताजे आहेत, म्हणून ते घेतले आहेत.
आधी देशातल्या लोकसंख्येची सामाजिक विभागणी कशी आहे ती पाहू.
टक्के
विभाग
२२.८
सर्वसाधारण (ब्राम्हण, कायस्थ, क्षत्रिय, बनिया आदि उच्चवर्णीय)
५२
ओबीसी (शूद्र जाती)
१६.६
अनुसूचित जाती (दलित जाती)
८.६
अनुसूचित जमाती (आदिवासी जाती)
आता माध्यमांतल्या नेतृत्वस्थानी असणाऱ्यांचे प्रमाण पाहू.
माध्यम
सर्वसाधारण (२२.८ टक्के)
ओबीसी (५२ टक्के)
अनु. जाती (१६.६ टक्के)
अनु. जमाती (८.६ टक्के)
इंग्रजी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
८९.३ टक्के
हिंदी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
१०० टक्के
इंग्रजी वर्तमानपत्रे
९१.७ टक्के
हिंदी वर्तमानपत्रे
८७.५ टक्के
डिजिटल मीडिया
८४.२ टक्के
५.३ टक्के
नियतकालिके
७२.७ टक्के
१३.६ टक्के
याचा अर्थ काय?
लोकसंख्येत २२.८ टक्के असलेल्या उच्चवर्णीयांचे जवळपास एकहाती नेतृत्व कसे काय? फक्त दोन ठिकाणी मामुली प्रमाणात ओबीसी दिसतात. दलित-आदिवासींचा तर पत्ताच नाही. (अधिक तपशीलात गेल्यास उच्चवर्णीयांतल्या श्रेणीचेही दर्शन इथे घडते.)
गुणवत्ता केवळ उच्चवर्णीयांत आहे का? ती जन्मजात आहे का? याला शशांक, सौरभ किंवा तेजश्री यांचे उत्तर नाही असेच असेल. मग आमच्या क्षेत्रात फक्त टॅलेंट पाहिले जाते, हे विधान कसे कबूल करायचे? मराठी टीव्ही किंवा मराठी सिनेमा याला अपवाद आहे का? समजा जास्त उच्चवर्णीयच प्रमुख भूमिकांत किंवा उच्च स्थानांवर असले आणि ते खरोखरच टॅलेंटमुळेच तिथे असले तरी त्यांच्यातल्याच बहुसंख्यांमध्ये हे टॅलेंट का? ...या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ व्हायला नको का? शशांकने उल्लेखिलेल्या दोन नावांबाबतच बोलायचे तर साने व मंजुळे यांपैकी किती मंजुळे सानेंच्या जागी आहेत? नसतील तर का नाहीत? या प्रश्नाने त्रास व्हायला नको का? टॅलेंट जन्मजात नाही हे कबूल असेल तर तथाकथित खालच्या जातींचे टॅलेंट पुढे न यायला काहीतरी अडथळे आहेत आणि ते शोधून दूर करायला हवेत, ही आपली भावना व खटपट असायला हवी की नको?
पैसे-संपत्ती कमाविण्याची अक्कलपण उच्चवर्णीयांतच जास्त कशी? ...योगायोगाने? अलिकडच्याच एका अभ्यासाने मांडलेली ही खालील आकडेवारी पहा.
जात/समाज विभाग
संपत्तीतला वाटा (%)
हिंदू उच्चवर्णीय
४१
हिंदू ओबीसी
३०.७
अन्य

मुस्लिम

हिंदू अनु. जाती
७.६
हिंदू अनु. जमाती
३.७
हिंदू समाजातली सामाजिक/जातीची उतरंड जशीच्या तशी आर्थिक बाबतीत दिसते. व्यवसायांतही त्याचा पडताळा येतो. सफाई कामात शतप्रतिशत दलित कसे? लोकसंख्येतले जातनिहाय प्रमाण सफाई कामगारांत का दिसत नाही?
सुजय डहाकेने हे सर्व प्रश्न विचारलेले नाहीत. पण त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे सर्व मुद्दे येतात. त्याने विचारलेल्या प्रश्नाला गैरलागू ठरवताना हे प्रश्न गैरलागू कसे ठरवणार? ते ढळढळीत समोर उभे आहेत. त्यांची उत्तरे द्यावीत लागतील.
स्वतंत्र भारतात विकास जरुर झाला. नव्या आर्थिक धोरणाने काही काळ आर्थिक उन्नतीला गती आली. पण हा विकास वा उन्नती कोणाच्या, किती व काय प्रकारे वाट्याला आली? त्याचा परिणाम काय झाला? ...हा हिशेब करायचा नाही का? प्रत्येक जातीत काहीजण सुळक्यासारखे वर आलेले दिसतात. पण त्यावर त्या जातीचे मोजमाप करुन चालणार नाही. त्याचे जातीतले प्रमाण किती ते पहावेच लागेल. नव्या आर्थिक धोरणानंतरच्या संपत्ती वितरणात दिवसेंदिवस विषमता वाढत चालली आहे, असे अभ्यासक नोंदवत आहेत. त्यावर उपाय नाही झाला तर तो असंतोष समाजात अन्य मार्गांनी उफाळून येतो. तो आपण अनुभवत आहोत. संविधानातली मानवी प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक न्याय, समता या मूल्यांच्या रुजवातीशिवाय समाजाचा निरामय विकास संभवनीय नाही, हे आपण समजून घ्यायला अजून किती उशीर करणार आहोत?
शशांक, तेजश्री, सौरभ यांच्यात जरुर टॅलेंट आहे. पण या टॅलेंटला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा वर्ग व जात यांचे कोंदण लाभलेले आहे. त्यांची इच्छा असो वा नसो. ते मागोत वा न मागोत. त्यांना ते मदत करतच असते. हे कोंदण गळून पडून खऱ्या टॅलेंटची निःपक्षपाती निवड होण्यासाठी आजची भयावह होत चाललेली सामाजिक-आर्थिक विषमता आपल्याला कमी करत न्यावी लागेल.
हे आकळले व त्याप्रति कृतिशील संवेदना जागी झाली तर शशांक, सौरभ, तेजश्री आणि सुजय या लढ्यात बहुधा एकत्रच दिसतील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, एप्रिल २०२०)

Friday, March 20, 2020

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - प्रा.हरी नरके


जागतिक मानवाधिकार इतिहासात जे महत्व फ्रेंच राज्यक्रांतीला आहे तेच मोल भारतीय मानवमुक्ती आंदोलनात महाड परिषदेला आहे. महाड येथे ९३ वर्षांपुर्वी १९ व २० मार्चला [१९२७]  भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षपदावरून दिलेला हा विचार आजही कालबाह्य झालेला नाही. परिषदेला ३००० पेक्षा अधिक उपस्थिती होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम उर्फ दादासाहेब गायकवाड होते. [ नाशिकचे दादासाहेब गायकवाड वेगळे.] ज्यांनी आपल्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली त्या महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षात [१८२७-१९२७] महाडला ही परिषद भरवण्यात आलेली होती. परिषदेत बाबासाहेबांनी केलेले भाषण व मांडलेले ठराव आजही प्रेरणादायी आणि कालसुसंगत आहेत.

ही परिषद पंढरपूरला घ्यावी असा प्रस्ताव बाबासाहेबांसमोर होता. परंतु ही परिषद महाडला घेण्यामागे काही खास कारणे होती. त्यांचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या भाषणात प्रारंभीच केलेला आहे.
एकेकाळी कोकण ही अस्पृश्यांची जागृत भुमी होती. महात्मा फुल्यांचे जिवलग मित्र गोपाळबाबा वलंगकर यांनी स्थापन केलेली " अनार्य दोष परिहारक मंडळी" कोकणात स्थापन झालेली होती.

या संस्थेच्या बहुमोल योगदानाचा बाबासाहेबांनी आवर्जून उल्लेख केलेला होता. बाबासाहेबांचे बालपणाचे काही दिवस दापोलीला गेलेले होते. त्यांचे मूळगाव आंबावडे [ आंबाडवे ] हे महाडपासून जवळच होते. त्यामुळे आपला परिसर हाही आपुलकीचा भाग होताच. सत्यशोधक आमदार सी. के. बोले यांच्या विधीमंडळातील ठरावानुसार महाडचे चवदार तळे सर्वांना खुले केल्याचा निर्णय महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपनीस यांनी घेतलेला होता. सुरबानाना महाडचे असल्याने या तळ्यावरच सत्याग्रह करावा असा त्यांचा व त्यांचे मेहुणे चित्रे यांचा आग्रह होता. बाबासाहेब नुकतेच आमदार झालेले होते. कायद्याची अंमलबजावणी करावी, मानवाधिकार स्थापन करावा आणि आपले गुरू जोतीराव फुले यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करावे असे अनेक उद्देश महाडची निवड करण्यमागे होते.

महाड सत्याग्रहापर्यंत बाबासाहेबांना महात्मा फुले परिचित नव्हते असे नरहर कुरूंदकर म्हणतात. ते कुरूंदकरांचे अज्ञान होय. कुरूंदकरांनी ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत वाचला असता तर त्यांनी असले निराधार व असत्य विधान केले नसते. या अंकात बाबासाहेबांनी महाड परिषदेचा सविस्तर वृत्तांत छापलेला आहे. त्यात बाबासाहेब जोतीरावांचा गौरवपुर्ण उल्लेख करतात. [ पृ.६ ] वलंगकरांनी अ. दो. प. मं.या संस्थेमार्फत अस्पृश्यांच्या फक्त अडचणी दूर केल्या नाहीत तर लेखनाद्वारे पुष्कळ जागृती निर्माण केली. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीराव फुले यांचे अनेक खरे साथीदार व उत्साही शिष्य या संस्थेचे संचालक होते. गोपाळबाबांनी केलेली जागृती अनुपम होती असे बाबासाहेब सांगतात. दीनबंधूंच्या फायली त्याच्या साक्षीदार असल्याची नोंद बाबासाहेब करतात.

अस्पृश्यता आणि जातीनिर्मुलन करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत, सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असावेत, मेलेली जनावरे ओढण्याचे व मृतमांस खाण्याचे बंद केले पाहिजे, शिक्षण व दारूबंदी सक्तीची करायला हवी, आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी व्हायला हवी, अनिष्ठ विचारांचा मनावर बसलेला गंज साफ करायला हवा, सरकारी नोकरीत शिरले पाहिजे, शेतीचा व्यवसाय करायला हवा, सहकारी बॅंका स्थापन करायला हव्यात, सहकारी पतसंस्था स्थापन करायला हव्यात, सरकारी पडीक जमिनी ताब्यात घेऊन त्या कसल्या पाहिजेत, लष्कर, पोलीस, शाळाखाते अशा महत्वाच्या जागांवर अस्पृश्यांची नेमणुक व्हायला हवी, महारकी सोडली पाहिजे, मुलगा २० वर्षांचा व मुलगी १५ वर्षांची झाल्याशिवाय लग्नं करू नयेत, शाळा, वसतीगृहे, शिष्यवृत्त्या सुरू कराव्यात आदी मुद्दे आजही मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत.

लिहिताना आणि बोलताना बाबासाहेब भीडभुर्वत बाळगीत नसत. एक मुलगा बी. ए. झाल्याने समाजास जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी पास झाल्याने होणार नाही, सरकारी नोकरीचे महत्व फक्त ब्राह्मण, मराठे व मुसलमान यांनाच समजलेले आहे. सरकारी नोकर म्हणजे सरकारचे हृदय होत. तेव्हा अस्पृश्यांनी सरकारी नोकर्‍या मिळवाव्यात. आपल्यापेक्षा आपल्या मुलाबाळांची परिस्थिती काकणभर सुधारलेली असावी असे ज्या आईबापास वाटत नाही ते आणि जनावरे यात फरक नाही. सद्गृहस्थहो, स्वत:साठी नाही तर किमान आपल्या संततीच्या उज्वल भवितव्यासाठी तरी माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या असे बाबासाहेब कळकळीने सांगतात.

बाबासाहेब द्रष्टे होते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, आंतरजातीय विवाहातून जातीनिर्मुलन, समाजजागृतीसाठी, मानवाधिकारासाठी आंदोलने ही पायाभुत भुमिका या परिषदेत त्यांनी मांडली. रूजवली. परिषदेच्या समारोपात चित्रे यांनी मांडलेल्या पुर्वनियोजित ठरावानुसार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा क्रांतिकारक कृतीकार्यक्रम राबवण्यात आला. या ओंजळभर पाण्याने जागृतीचा अग्नी पेटवला. तो आज विझूविझू झालाय. तो पुन्हा पेटवण्याची गरज आहे.

बाबासाहेबांची वाणी आणि लेखनी किती धारदार होती त्याचा आजच्या मरगळलेल्या मनांना परिचय व्हावा यासाठी पुढील उतारा नक्की वाचा-

" आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणार्‍या जातींपैंकी  ***जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालवण्याची या जातीला सवय पडून गेलेली आहे. ह्या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही. मान, मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झालेला आहे. काहीही म्हणा! जोड्यात वागवा! पण मला तुकडा वाढा अशी या जातीची वृत्ती बनून गेलेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. अशारितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे." [ पृ.७]

" पेशवाईत अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ऒळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे." [पृ.५, जो प्रसंग आम्ही "एक महानायक" या हिंदी मालिकेमध्ये कालच दाखवलेला आहे.]

- प्रा. हरी नरके,२० मार्च २०२०


Sunday, March 8, 2020

अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार-

#Vaibhav_Chhaya - या मित्राचा मालिका आणि दूरदर्शन याबद्दलची साक्षरता वाढवणारा हा महत्वाचा लेख अवश्य वाचा- अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार- वैभव छाया सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार.पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. बीएआरसी बार्क ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हीजन मेजरमेंट सायंस इंडस्ट्री बॉडी म्हणून लौकिक मिळवून आहे. आपण जे कार्यक्रम टिव्हीवर पाहतो त्याचं रेटिंग सांगणारी ही संस्था आहे. कोणता कार्यक्रम, किती व कोणत्या लोकांनी, किती वेळ पाहीला. कार्यक्रमादरम्यान किती लोकांनी पूर्ण पाहीला, जाहीराती किती टक्के लोकांनी पाहील्या, एकुण किती मिनिटे वा सेकंद किती टक्के प्रेक्षक टिव्हीसमोर होते याची इत्थंभूत माहीती बीएआरसी देत असते. यासाठी ऑडिओ वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ज्यातून टीव्ही चॅनेल्सची व्हिवरशीप मोजता येते. यासाठी बीआयओ न्यूज ही सर्विस न्यूज चॅनेलचे रेटिंग मोजते. तर बीआयओ एडव्हिजन जाहीरातींच्या व्हिवरशीप मोजते. टीव्ही प्लस ओओएच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या टेलिव्हिजन सेट्सवरील रेटिंग काऊंट करते. असे अनेक प्रोडक्ट आणि सर्विस बीएआरसी पुरवत असते. ही मोजणी करताना दोन प्रकारांत शहरांची विभागणी केली जाते. ज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद ही पाच प्रमुख शहरे आहेत. जी पहिल्या श्रेणीत मोडतात तर ऊर्वरीत शहरे दुसऱ्या श्रेणीत येतात. जसे पिंपरी, नांदेड, कोल्हापूर, सांगली इत्यादी. जाहीरातदारांच्या दृष्टीने पहिल्या श्रेणीतील पाच शहरे महत्त्वाची असतात. कारण ती शहरेच त्यांच्या मुख्य बाजारपेठा आहेत. तिथे राहणारा वर्ग हा त्यांचा मुख्य खरेदीदार आहे. इतर शहरांत त्या तुलनेने लोकल ब्रँड्स जास्त पॉप्युलर असतात. ही आकडेवारी ठरवण्यासाठी जे सँपलिंग तयार केलं जातं त्याचे वयोगट पुढीलप्रमाणे असतात. लहान मुले 4 ते 8 वर्षे, 9 ते 14 वर्षे वयातील शाळकरी मुले, 15 ते 21 मधील तरूण, 22 ते 30 मधील युवक, 31 ते 40 हा प्रौढ गट, 41 ते 50 पूर्ण प्रौढ, 51 ते 60 प्रगल्भ गट, 61 च्या पुढे ज्येष्ठ नागरिक. यांचे मॅपिंग न्यू कंस्यूमर क्लासिफिकेशन सिस्टीम द्वारे केले जाते. ज्यास NCCS असे म्हटले जाते. बीएआरसी च्या आधी ही कामे TAM द्वारे केली जात होती. TAM मध्ये सोशिओ इकॉनॉमिक क्लासिफिकेशनचा वापर व्हायचा. ज्यास SEC म्हटले जायचे. एसईसी मध्ये घरातील कमावत्या व्यक्तीचे शिक्षण आणि उत्पन्न यांच्या आधारावर कंटेटची टेस्ट, चॉईस आणि प्लेसमेंट ठरवली जायची. परंतू NCCS मध्ये शिक्षण, उत्पन्न, वीज, उपलब्धता, शेतजमीन पासून अकरा विविध पॅरामीटर्सवर जोखूनच रेटिंग आणि त्याचे एनालिसिस केले जाते. आता येऊयात मुख्य मुद्द्यावर. जसे वर म्हटलेय तसे.. आताच्या घडीला बीएआरसी मुळे टिव्हिवर कोण कोणतं कंटेट किती वेळासाठी पाहतंय हे कळतं पण त्यासोबत कोणता वर्ग तो सामुहिक पद्धतीने पाहतोय हे देखील नीट कळू लागलं आहे. साहजिक आहे. बाजारपेठा त्याच हिशोबाने वर्कआऊट होणार. मराठी इंडस्ट्रीत झी, तेव्हाची अल्फा ही पायोनिअर कंपनी होती. पहिल्या पाच शहरांची चौकट लक्षात ठेवताना त्या शहरात राहणाऱ्या लोकांना जे कंटेट आवडेल तेच कंटेट टिव्हीवर आलं. तोच कित्ता इतर चॅनेल्सने गिरवला. भारतीय कलाक्षेत्र असंही रेसिस्ट आणि कास्टिस्ट आहेच. त्यात वाद नाही. गोऱ्या रंगापलीकडे रंग असलेल्यांना अभिनय येत असला तरी कलाकार म्हणायचं नाही याचे नीट आखीव रेखीव ठोकताळे रचून काम करणाऱ्या इंडस्ट्रीत ठराविक वर्गालाच प्रतिनिधित्व मिळेल याची सोय करून ठेवलेली होती. सिनेमा हे माध्यम सोपं नाही. सिनेमासारखं सिरिअलचं ही माध्यम निश्चित सोपे नाही. ते शिकावं लागतं. शिकण्यासाठी भली मोठी गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणूकीला आपल्या आजूबाजूच्या जगाने स्विकारार्हयता दाखवणेही तितकेच गरजेचे असते. मागासवर्गीय मुलामुलींना अभिनय शिकणं ही एकतर न परवडणारी गोष्ट असते. त्यात तंत्र शिकण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते त्याची वानवा असते. सवर्ण जातीतींल मुलांना लहानपणापासून अभिनय आणि तंत्र शिक्षणाचे जे प्रिविलेजेस मिळतात ते वाड्या वस्त्यांतील शाळांमध्ये किंवा वातावरणात कुठेच मिळत नाहीत. अभिनय, नृत्य प्रशिक्षण शाळा, शिबिरे, वर्कशॉप आयोजित होण्याचं किंवा कुणीतरी पुढे येऊन शिकवण्याचं कल्चर अजून डेवलप व्हायला वेळ लागणार आहे. पिढ्या न पिढ्यांचा बॅकलॉग आहे हा. असे कितीतरी मुद्दे आहेत जे सांगता येतील. पण ही काही प्रमुख कारणे आहेत मागासवर्गीय कलाकारांचा टक्का कमी दिसण्यामागे. मराठीने मागासवर्गीय कलाकारांना कायम साईड रोल किंवा कॉमेडिअन म्हणूनच स्विकारलेलं आहे. इंडस्ट्री सुद्धा त्यांच्यात म्हणावी तशी गुंतवणूक करत नाही. आणि हे कलाकार सुद्धा स्वतःचा सेफ झोन सांभाळून कोणतीही भूमिका न घेता कातडीबचाव वागत राहतात. आता मुद्दा दुसरा... सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार. पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. यासाठी दोन उदाहरणे.. उत्कर्ष व आदर्श शिंदे सारखा गायकांनी त्याचं मार्केटमधील स्थान आणि डिमांड अतिशय शिताफीने प्रेझेंट केली. मार्केटला झक मारून दखल घ्यावी लागली. दुसरं उदाहरण, महामानवाची गौरवगाथा, सावित्रीजोती सिरीयल. दोन्ही सिरीयलच्या निर्मात्यांनी रिस्क घेतली. का, तर त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. त्यांना इंडस्ट्रीच्या ठोकताळ्यांना कसं बदलायचं हे ठाऊक होतं. त्यांनी इंडस्ट्री आणि रेटिंगच्या पटलावर नसलेल्या मागास जातींना अधोरेखित केलं. पण असा निर्माता एकच आहे हे ही वेगळं सांगायला नको. हे मागास समुह सुद्धा तुमचे ग्राहक आहेत हे वाढणाऱ्या रेटिंग वरून आपोआप स्वच्छ दिसू लागलं. हळूहळू जाहीरातींनी ठेवलेला अप्रत्यक्ष अस्पृश्यपणा सोडायला सुरूवात केली. आपल्याला ही कंटेटची भाषा आणि पॉलिटिक्स नीट समजून घेऊन काम करावं लागेल. नव्या गोष्टी, नव्या मंचांची निर्मिती करावी लागेल. स्वतःच्या रक्तकिंमतीवर ते मंच, गोष्टी, कलाप्रकार, कलाकार पोसावे लागतील. आणि हो सोबतीला ठासून बोलावं ही लागेल. उघड विरोध करावाच लागेल. नुसतं कलेतून बोला कलेतून बोला सारखं गांडू धोरण स्विकारून चालणार नाही. बाकी आपण सूज्ञ आहात. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. आणि म्हणूनच.. सुजय डहाकेच्या वक्तव्याचे मी पूर्ण समर्थन करतो आहे. टीपः कंटेटचा बिजनेस शिकणं, त्याचं कमर्शिअल आत्मसात केल्याशिवाय कंटेटला कुणी पाहणार सुद्धा नाही. BARC (Broadcast Audience Research Council) - स्थापना 2010, कार्यरत- 2015 पासून. Indian Broadcasters Foundation (IBF), Advertisers (ISA) and Advertising & Media Agencies (AAAI).

Monday, December 30, 2019

जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ





जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ-प्रा.हरी नरके


श्री सुनिल सांगळे यांनी "जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती" हा ग्रंथ लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे. जातीपातींचा विषय हा अस्मितेचा आणि वादंगाचा विषय असतो. अलिकडे तर तो अतिशय ज्वलंत किंबहुना स्फोटक विषय बनलेला आहे. या वादग्रस्त विषयाला हात लावण्याची हिंमत आज भलेभले विद्वानही करताना दिसत नाहीत. कोणाच्या भावना कधी दुखावल्या जातील आणि कधी रान पेटेल याची शाश्वती राहिलेली नाही. अशा काळात एक अतिनाजुक बनलेला विषय ज्या प्रगल्भपणे सांगळे यांनी उलगडून दाखवला आहे, ज्या संयमाने आणि समतोलपणे मांडणी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांचे मी सर्वप्रथम हार्दीक अभिनंदन करतो. सांगळे यांच्या या पुस्तकाद्वारे एका विपरित सामाजिक व्यवस्थेची केलेली उकल ही सर्वांनाच आत्मपरिक्षणाला प्रवृत्त करेल असा मला भरवसा वाटतो.

या विषयावर मराठी व इंगजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्यातली डॉ. श्री. व्यं. केतकर, डॉ. गो.स. घुर्ये, डॉ. इरावतीबाई कर्वे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आर. ई. इंथोवेन, रसेल - हिरालाल, त्रिं. ना. आत्रे आदींची पुस्तकं महत्वाची आहेत. बाकी इतर भाराभर पुस्तकातली बहुतांश पुस्तकं एकतर सवंग, उथळ, कंठाळी तरी आहेत किंवा विद्वतजड तरी आहेत. ही दोन्ही टोकं टाळून सांगळे यांनी अतिशय सोप्या, प्रवाही, सुबोध भाषेत ही रचना केलेली आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांसाठी असला तरी संशोधक-अभ्यासकांनाही तो उपयुक्त ठरेल असा झालेला आहे.
याविषयावरील अक्षरश: डझनावारी ग्रंथांचा शोध घेऊन त्यातले विवेचन आपल्या सोप्या भाषेत सांगळे आपल्याला उपलब्ध करून देतात. बोजड लिहिणे सोपे असते. मात्र सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. सोपं लिहिण्याच्या या कसोटीत सांगळे अव्वल ठरलेले आहेत. विषय सोपा करतानाही त्याचे मर्म किंवा गाभा सांगळे चिमटीत पकडून आपल्यासमोर सादर करतात.

खरंतर सांगळे यांनी कोणत्याही पीएच.डी. प्रबंधापेक्षा सरस कामगिरी केलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने त्यांच्या या पुस्तकाचा मानद पदवीसाठी विचार करायला हवा. सांगळे एक निवृत्त सनदी अधिकारी असतानाही त्यांचे वाचन चौफेर असावे याचा आनंद वाटतो. या विषयातली बहुतांश महत्वाची संदर्भ पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत व त्याचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. हे पुस्तक वाचणारांना ही मूळ संदर्भ पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.

मुळांचा शोध घेण्याची माणसाला अनावर ओढ असते. आपल्या जातीप्रधान देशात आपापल्या जातींबद्दल माहिती घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. बर्‍याचदा अशी माहिती निव्वळ ऎकिव असते. तिच्यामध्ये पुर्वगौरवाची भावना दडलेली असते. भारतीय समाज जातीपातींनी बनलेला समाज आहे. त्यातल्या काही जाती या व्यवस्थेच्या लाभार्थी असल्याने त्या एनकेण प्रकारेन या व्यवस्थेचे गोडवे गात असतात. तर ज्या या व्यवस्थेचे बळी आहेत तेही अज्ञानापोटी या व्यवस्थेचे वाहक बनतात. भारतीय समाजात उदात्तीकरण आणि मौन धारण करणे ही दोन षडयंत्रे सतत शिजत असतात. एक उच्चवर्णीय, पुरूषप्रधान, श्रीमंत मंडळींचे उदात्तीकरण करणे आणि दुसरे लिंगभाव, जात आणि वर्ग व्यवस्थेने ज्यांचे अतोनात शोषण केलेले आहे, पक्षपात आणि भेदभाव केलेला आहे त्यांच्या समस्यांबद्दल मौन धारण करणे. सांगळे मात्र या दोन्ही षडयंत्रांना नकार देतात आणि एका अभ्यासकाच्या नात्याने हा विषय निर्भयपणे आपल्याला समजाऊन सांगतात.

सांगळे यांनी अक्षरश: शेकडो जातींची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. तथापि हे केवळ माहितीचे संकलन नाही तर तिचे सम्यक विश्लेषण आणि समतोल सत्यशोधन या ग्रंथात केलेले आहे.
मनु, कौटिल्य, विविध स्मृतीकार यांचे दाखले सांगळे यांनी दिलेले आहेत. साडेतीन हजार वर्षांचा प्रवास रेखाटताना विद्यमान राष्ट्रपती श्री रामानाथ कोविंद यांचा पुरीच्या मंदिरात कसा अपमान केला गेला यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर शबरीमाला, शनि शिंगनापूर इथल्याही घटनांची आठवण त्यांनी करून दिलेली आहे. उच्चभ्रू आरक्षण विरोधक विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तवाकडे कशी डोळेझाक करतात यावरही झगझगीत प्रकाशझोत त्यांनी टाकलेला आहे.



ब्रिटीश राजवटीत हा देश, इथली माणसं समजाऊन घेण्यासाठी विल्सन, रसेल, इंथोवेन, क्रूक, रिस्ले, केनडी आदींनी या विषयांचा धांडोळा घेणारी पुस्तके लिहिली. दर दहा वर्षांनी जनगणना करून ही माहिती अद्ययावत करण्याची व गॅझिटियर मार्फत जिल्हावार अभ्यास उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाद्वारे या विषयाची तोंडओळख करून देण्याची गरज त्यांना वाटली.

त्यातून जातवार धर्मशाळा, संस्था, जातपंचायती, शाळा, महाविद्यालये, बॅंका, पेठा जन्माला आल्या. जातजाणिवा अधिक धारदार झाल्या. जातीव्यवस्था ही मनोर्‍यासारखी व्यवस्था असल्याने प्रत्येक जात आपण वरचे आहोत हे दाखवण्याचा खटाटोप करीत असते. समाज शास्त्रज्ञ डॉ. एम.एन. श्रीनिवासन म्हणतात त्याप्रमाणे " संस्कृतीकरणाचा " सिंद्धांत अर्थात वरच्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती हा भारतीय जातींचा याकाळातला स्थायीभाव दिसतो.

महात्मा फुल्यांनी १८६९ साली न्यायासाठी आरक्षण द्या अशी मागणी केली. राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण आले. त्यानंतर मात्र जादूची कांडी फिरावी तशी जातींची उतरंड आरक्षणाच्या रांगेत उभी राहिली. आपली जात कशी आणि किती मागासलेली आहे हे मांडण्याची, सिद्ध करण्याची चढाओढच लागली. त्यासाठी उग्र आणि प्रसंगी हिंसक आंदोलने होऊ लागली.
स्वतंत्र भारताचे मंडलपुर्व भारत आणि मंडलोत्तर भारत असे प्रवासाचे दोन ठळक कालखंड बनले.

जातीव्यवस्थेने कामांचे वाटप केले, ती जन्मावर आधारित नव्हती, ती कामांवर आधारित होती अशा प्रकारचे समर्थन कायम केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मौलिक पुस्तकांद्वारे या मांडणीचे समर्पक खंडन केलेले आहे. मुळात ही व्यवस्था श्रमाचे वाटप करणारी नव्हती तर ती जन्मावर आधारित श्रमिकांचे वाटप करणारी अतिशय काटेकोर मनोर्‍याची रचना होती. तिने विषमतेचे श्रेणीबद्ध वाटप केले होते. जातीव्यवस्था मुलत: आर्थिक वाटप करणारी, शासनाच्या राजदंडाच्या आधारे चालवली जाणारी व्यवस्था होती.तिने शुद्र, अतिशुद्र आणि स्त्रिया यांचे वारेमाप शोषण केले, त्यांचे मानवी अधिकार हिरावून घेतले याकडे सांगळे लक्ष वेधतात. ही व्यवस्था हिंदुंइतकीच मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख आदी धर्मातही कशी पसरली यावरही ते भाष्य करतात.

सांगळे यांनी स्वामी विवेकानंद, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, विविध दलित-भटक्यांच्या आत्मकथनांचे लेखक आदींचे दाखले देऊन विषयाचे सुबोध आकलन सादर केलेले आहे.
महाराष्ट्रातील शेकडो जातींची सांगळे यांनी दिलेली माहिती समजाऊन घेण्यासाठी तरी कार्यकर्ते, वाचक आणि अभ्यासक ह्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवले पाहिजे. सुनिल सांगळे व संजय सोनवणी यांच्यासारखे नव्या समाजथरातले लेखक या विषयावर अभ्यासपुर्ण मांडणी करताना बघितले की आजवर खिळखिळी न होणारी ही व्यवस्था निदान किलकिली तरी होईल अशी उमेद वाटू लागते.
आजच्या आधुनिक युगात ही व्यवस्था कालबाह्य झालेली आहे, आज सगळ्यात महत्वाची आहे ती अर्थसत्ता. सारे जग तिकडे झेपावत असताना मध्ययुगीन जातीय मानसिकतेत लोळत पडलेल्या आपल्या समाजाला जातीसंघर्ष काबूत ठेवण्याची हाक सांगळे देतात.
सांगळे यांच्या या समतोल, सम्यक आणि अभ्यासपुर्ण शोधग्रंथाचे स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो.
- प्रा.हरी नरके,
सदस्य- राज्य मागासवर्ग आयोग, [नि.]

पृष्ठे ३३२, किंमत रू.३५०/-
ग्रंथाली प्रकाशन,माटुंगा, मुंबई, संपर्क- ०२२- २४२१६०५७,२४३०६६२४
granthaliruchee@gmail.com